Blog

  • संग मेरे हमदम..!

    [There is a very beautiful song in “Kadal” called “Moongil Thottam” set on A. R. Rahman’s tunes & sung by Abhay Jodhpurkar/Harini.  This poem is on that tune. It is not a translation of the song but an original poetry conveying the mood of the song. The soul purpose is to capture the beautiful mood set by the song in Hindi (rather Hindusthani) language. If any group/band want to make a cover version of original song using these lyrics, kindly contact me as this work of poetry is protected by Bhaaratiya copyright laws. Enjoy the poetry & do give a feedback!]

    पू:
    हमने तुमको, जबसे चाहा,
    चाँद हैं जैसे आया ज़मींपर..
    सांसोंमें हैं, मीठीसी खलबल,
    इश्क नया हैं, ऐ दिल संभलकर..!
    संग मेरे हमदम, संग हैं जहाँ..
    ख़ुदा पास हैं तो दूरी कहाँ?

    स्त्रि:
    मैंने फ़लकपे, तेरा नाम लिखा,
    सारा आसमाँ, सुनहरासा हो गया..!
    पू:
    फूलोंपर कभी, ठहरे ओस तो,
    वो फूल तेरे, चेहरेसा हो गया..!
    स्त्रि:
    संग मेरे हमदम, संग हैं जहाँ..
    ख़ुदा पास हैं तो दूरी कहाँ?

    पू:
    महकी बारिशें, करती साजिशें,
    उसपे दिलमें, दहकीसी ख्वाहिशें..!
    स्त्रि:
    तुम  आवाज़ दो, तो परवाज़ हो,
    बहके परोंसे उडती हैं ख्वाहिशें..!
    संग मेरे हमदम, संग हैं जहाँ..
    ख़ुदा पास हैं तो दूरी कहाँ?

    © विक्रम.

  • रिश्ता

    कौन हूँ मैं तुम्हारा, और कौन हो तुम मेरी!
    खयालोंके कच्चे धागे, बस अहसासोंकी डोरी!!

    मैं एक मुसाफिर जरासा, तू शीतलसी हैं छाया!
    सौ अफसाने लिख दिये, किताब फिरभी अधूरी!!


    मैं चॉंद तांकता रहता हूँ, उसपार कहीं हैं गॉंव तेरा!
    बादलोकी कालीन बिछाओ तो जरा, के मिलना बडा जरूरी!!

    – © विक्रम

  • कसं जगायचं..?


    कसं जगायचं..
    तुजविण जीवन सूने, कसं जगायचं..?

    तुझ्या घरपासनं मी चकरा मारतोय रोज
    दिसशील तू कधीतरी ही आशा फुलते रोज
    मग दिसताच तू मला, मी खुदकन हसायचं
    पण नाहीच हे होणे, कसं जगायचं…?
    कसं जगायचं..
    तुजविण जीवन सूने, कसं जगायचं..?

    कॉलेजवरती कट्ट्यावरती विषय तुझाच मनी
    हळूच टिपतो डोळे जेव्हा बघत नाही कोणी
    येणाऱ्या प्रत्येकीत आता तू मला दिसायचं
    बघ फितूर झाले डोळे, कसं जगायचं…?
    कसं जगायचं..
    तुजविण जीवन सूने, कसं जगायचं..?

    कुठेच नाही लक्ष मी गर्दीत एकटा
    भिजून भिजून किती तरी माझा रुमाल कोरडा
    तिन्ही-त्रिकाळ तुलाच मी देवाकडे मागायचं
    पण नाहीच तो ही देणे, कसं जगायचं…?
    कसं जगायचं..
    तुजविण जीवन सूने, कसं जगायचं..?

    भेटणारच तू मला हे मला माहित आहे
    होणारच तू माझी हे मला ठाऊक आहे
    मग आपल्या नात्याचं रेशीम मी तेव्हा उलगडायचं
    पण तोवर कसले जगणे, कसं जगायचं…?
    कसं जगायचं..
    तुजविण जीवन सूने, कसं जगायचं..?

    – © विक्रम.

  • कौन हूँ मैं ये सोचता हूँ..!

    कौन हूँ मै ये सोचता हूँ,
    खयालोंके गुच्छे नोंचता
    हूँ! 
    अधमरे ख्वाब मेरे,
    सूखे पानी से सिंचता हूँ!!

    शायद अंगारा मैं बुझी आग का,
    अंदर ही अंदर जलता हूँ!
    नहीं मिलता जवाब फिरभी,
    मैं धुआँ धुआँ टटोलता हूँ!!

    मैं वहशी हूँ दरिंदा कोई,
    भागते साएँ दबोचता हूँ!
    फिरभी अपनेही कानोंमें,
    मैं बनके चीख गुँजता हूँ!!

    इन्साँ हूँ पागल मैं कोई,
    खुदको मिलनेसे डरता हूँ!
    मेरे अंदर हैं जो खुदा उसको,
    बाहर सजदे करता हूँ!!

    कौन हूँ मैं ये सोचता हूँ..!

    – © विक्रम.

  • तेरा चेहरा..!

    आंसू का एक क़तरा,
    आँखोंसे आज उतरा,
    याद आया जो, तेरा चेहरा..!

    नजरोंसे जो ओझल हैं तू,
    संगरीसी, बोझल हैं तू!
    अह्सासोंका बादल हैं तू,
    दर्दसे भी चंचल हैं तू!
    नजरोंके अह्सासोंका बादल आज पिघला,
    याद आया जो, तेरा चेहरा..!

    ग़मकी भी होती हैं एक खुशबू,
    सूँघता हूँ अब तो मैं हरसू!
    तेरी इक-इक सदाको मैं तरसू,
    अपनीही आँखोंसे अब मैं बरसू!
    ग़म ही की बाँटें खुशबू तेरा सूखा-सूखा गजरा,
    याद आया जो, तेरा चेहरा..!

    © विक्रम.
     

  • जिंदगीकी ढलानपे सुलगती दिवानगी पीछे छोड दी हैं मैंने

    जिंदगीकी ढलानपे सुलगती दिवानगी पीछे छोड दी हैं मैंने
    कहीं मेरे जलते, सुलगते ख्वाब पिघला ही न दें इस ढलान को, वो मुझे रौंदनेसे पहले!
    या फिर मैं ही न कुचल दूँ इस ढलानको नझ्मोंके बोझसे..
    जिंदगीकी ढलानपे सुलगती दिवानगी पीछे छोड दी हैं मैंने..!
    के यकीं नहीं मुझे मैं टूँट जाऊँगा अबकी बार,
    डर इस बातका हैं की गिरनेके बाद फिर कोई नई ढलान तो मेरा इंतजार नहीं कर रही होगी?
    डर गिरनेका नहीं, डर टूटनेका नहीं, डर इस “गिरते रहने”से लगता हैं..
    जिंदगीकी ढलानपे सुलगती दिवानगी पीछे छोड दी हैं मैंने..!
    – © विक्रम.
  • तलाश – मंत्रावेगळे गंधर्वगान!

       कल्पना करा की तुम्ही एखाद्या मैफिलीला गेला आहात. चांगल्या नावाजलेल्या गायकाची मैफिल आहे ही. आज मात्र तो गायक गाताना सतत चुका करतोय. काही जागा जिथं खरं तर सूर असायला हवा होता, त्या मोकळ्याच सोडतोय. का असं करतोय तो? त्याला वेड लागलंय का? मैफिल पुढे सरकत जाते आणि अचानक, अचानक तुम्हाला साक्षात्कार होतो की, इतका वेळ आपण ज्याला संगीत समजत होतो, ते संगीत नव्हतंच मुळी! संगीत

    तर त्या सूर नसलेल्या मोकळ्या जागांतच होतं. गायकी चालू होती ती तिथं! मूर्ख तो गायक नव्हता, तर आपणच होतो, जे नसलेल्या गोष्टी पाहता पाहता असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होतो; किंबहुना त्यांना तुछ लेखत होतो. मला कल्पना आहे की, तुम्हाला माझे हे लेखन अतिशय विचित्र वाटते आहे. पण संगीताचा नव्यानेच साक्षात्कार व्हावा, समोरची मैफिल ही अचानक “गंधर्वगान” व्हावी अशी, अगदी अशीच अवस्था माझी “तलाश” पाहून झालीय.

        मी मुद्दामच “गंधर्वगान” हा शब्द वापरलाय. “गंधर्वगान” – असं संगीत जे या जगातलं नसतंच. “तलाश”ही हिट होण्यासाठी बनलेला नाहीये, तो वेगळा आहे, मंत्रावेगळा! आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी, कुठे ना कुठे अश्या घटना घडलेल्या असतात, ज्यांची कारणमीमांसा करणे अशक्य असते. जणू काही एखादी खिडकी उघडते आणि आपण “त्या” जगात क्षणभरासाठी डोकावून येतो. नीट विचार करा, आठवा, तुमच्या आयुष्यातही अश्या घटना नक्कीच घडलेल्या असणार. आपण त्या मनाच्या तळाशी गाडून टाकतो, कुणाला सांगत नाही कारण, एकतर या घटना सिद्धतेच्या कोटीतल्याच नसतात; आणि दुसरे म्हणजे हे अनुभव इतके व्यक्तीसापेक्ष असतात ना की, दुसर्या कुणाला सांगितले तर त्याचा विश्वास बसेल न बसेल यापेक्षा आपला, केवळ आपलाच असलेला हा ठेवा हरवेल की काय हीच भीती अधिक वाटत असते. खरं सांगू, मनाच्या तळाशी खोलवर जाऊन बसलेल्या माझ्या आयुष्यातील अश्या सर्व घटना “तलाश”ने ढवळून वर आणल्या आहेत.

        माझी माहिती कदाचित तोकडी असू शकेल पण, अश्या धाटणीचा चित्रपट याआधी क्वचितच कुठे बनला असेल. मुळात गूढकथा पडद्यावर मांडण्याची हिम्मत फारच कमी लोकांमध्ये आहे. नववास्तववाद आणि नवकाल्पनिकता यांच्या सीमारेषेवर कुठेतरी घुटमळणारा हा चित्रपट आहे. ही केवळ रहस्यकथा नाही. मी पाहतोय की काही लेक एसेमेस, फेसबुक पोस्ट्स यांच्याद्वारे “तलाश”चं रहस्य आपण काहीतरी फार मोठा तीर मारतोय या आविर्भावात आधीच सांगत आहेत. मुळात कोणत्याही प्रामाणिक कलाकृतीला मारक ठरेल असे काही वागणे हेच अतिशय ओंगळवाणे आहे. तरीही ज्यांना यात मजा वाटतेय, त्यांच्यासाठी आधीचं वाक्य पुन्हा एकदा लिहितो, ही केवळ रहस्यकथा नाही! रहस्य हे केवळ एक माध्यम आहे. “तलाश” आहे मुख्य पात्र (आमीर- सुरजन सिंह) घेत असलेला शोध – “स्व”चा. हा शोधच या कथेचा गाभा हे. त्यामुळे या कथेचं रहस्य किती जरी माहिती झालं तरीही दिग्दर्शिकेच्या हेतूला बाधा येत नाही. या चित्रपटातील प्रत्येक घटनेला, प्रत्येक पात्राला अनेक अर्थ आहेत; काहींची आपण कल्पना करू शकतो तर काहींची अजिबातच नाही. त्यातही मी ज्यांची कल्पना करेन त्यांची तुम्ही करालच असे नाही, आणि तुम्ही ज्यांची कराल त्यांची मी करू शकेनच असेही नाही.

        दिग्दर्शिकेने रहस्यकथेचे किंबहुना गूढकथेचे माध्यम स्वीकारले असल्याने मी या कथेची थोडीशीही कल्पना न देणे साहजिकच आहे. पण एका निरुपद्रवी गोष्टीचा उल्लेख मात्र मी करू शकतो. समोर येणाऱ्या कोणत्याही केसमधील घटनांचा संबंध आपल्या मुलाच्या मृत्यूशी नकळतपणे जोडण्याची आमिरच्या पात्राला सवय असते. या गोष्टीचे असे काही संयत चित्रण रीमा कागतीने केलेय की त्याला तोड नाही. खरं तर या एका कथेत अनेक कथा, अनेक पात्रं, त्यांची एकमेकांशी थेट संबंध नसलेली आयुष्यं इतकी बेमालूमपणे मिसळून टाकलीयत की, त्यांचा आपसूकच एक “कोलाज” तयार झालाय. त्यातील कोणताही एक तुकडा जरी काढून टाकला तरीही, सबंध कथा – सबंध चित्रपट चुकेल. या संदर्भात लेखिका-दिग्दर्शिका रीमा कागती आणि सहलेखिका झोया अख्तर यांची जितकी स्तुती करावी तेवढी थोडीच आहे (कोण म्हणतं बायकांना डोकं नसतं!).

        आमीर पोलीस अधिकार्याची भूमिका करतोय म्हणून तुम्ही जर “दबंग” अथवा “राउडी राठोड” डोक्यात घेऊन जाणार असाल तर तुमचा भ्रमनिरास होईल. तुम्ही अगदी “सरफरोश” जरी डोक्यात घेऊन गेलात तरीही भ्रमनिरासच होईल! हे पात्र या सगळ्यांपेक्षा वेगळे आहे. पंचलाईन्स नाहीत किंवा मारधाडही नाही! मग आमिरचे पात्र आपल्याला अजिबातच इम्प्रेस करू शकत नाही का? तर शशीच्या मैत्रिणीला कामाठीपुर्यातून सोडवण्याचा प्रसंग पहा. छोटासाच आहे, पण आमिरचे डोळे अक्षरश: आग ओकतात आग! खरं तर आमीर खान आपल्या प्रत्येक नव्या चित्रपटात आधीच्या चित्रपटापेक्षाही चांगला अभिनय कसा काय करू शकतो, हे एक कोडेच आहे – त्याचीही एकदा “तलाश” झाली पाहिजे! राणी मुखर्जीने छोट्याश्या भूमिकेत सुंदर काम केलेय. करीना कपूरने तर कमालच केलीय. पण विशेष लक्षात राहतो तो नवाझुद्दिन सिद्दिकी या गुणी कलाकाराने साकारलेला तैमुर! खरोखर सलाम त्याला! राजकुमार यादव (देवव्रत कुलकर्णी) आणि शेरनाझ पटेल (फ्रेनी) या दोन कलाकारांचा उल्लेख न करणे म्हणजे त्यांच्या अभिनयकौशल्यावर अन्याय केल्यासारखे होईल.

        खरोखर हा चित्रपट शब्दातीत आहे. सत्याच्या शोधात अनेक असत्ये पुढे येतात, पण जेव्हा निखालस सत्य स्वत:हून समोर येते, त्यावेळी अनेकदा आपण त्यासाठी तयार नसतो. अवश्य चित्रपटगृहात जा आणि पहा “स्व”च्या या “तलाश”साठी तुम्ही तयार आहात का!

    *४/५.

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (edkevikram@gmail.com)

  • भिक

       मी शक्यतो रेल्वेनेच प्रवास करतो. याचं कारण म्हणजे एकतर हा प्रवास थोडा मोठा होत असल्याने यात एकप्रकारचा निवांतपणा असतो. त्यामुळे प्रवास माझ्या व्याख्यानाच्या निमित्ताने असेल तर मला शांत मनाने मी मांडणार असलेल्या मुद्द्यांवर विचार करायला पुरेसा वेळ मिळतो. नवीन लोकांशी ओळखी होतात, नवनवे अनुभव येतात. आणि तितकंच महत्वाचं म्हणजे, मोठ्या प्रवासात मला माझ्या आवडीचे संगीत भरपूर वेळ ऐकता येते.
       असाच एक नगर-पुणे रेल्वेप्रवास. मी माझ्या आवडीची “युवराज” चित्रपटातील गाणी ऐकत होतो. दौंडच्या आसपास काही हिजडे गाडीत शिरले. ओंगळ लाडिकपणा करत ते प्रत्येकाकडून पैसे मागत होते. १० रुपयांच्या खाली एक पैही घेत तर नव्हतेच, पण कमी पैसे देणार्याला अथवा द्यावयास टाळाटाळ करणार्याला गलिच्च शिव्या घालत होते, नको तिथे स्पर्श करून त्रास देत होते. मला हा प्रकार काही नवा नव्हता, त्यामुळे त्यांच्याशी घासाघीस करण्यात काहीच अर्थ नाही हेही ठाऊक होते! कटकट नको म्हणून मी इतरांप्रमाणेच पैसे दिले, ती “मंडळी” निघून गेली, मीही पुन्हा गाणी ऐकू लागलो.
       अचानक हेडफोन्सच्या आवाजावर ताण करणारा एक बायकी आवाज ऐकू येऊ लागला, “परदेसी परदेसी जाना नहीं...”
       पाहतो तो एक भिकारी स्त्री कडेवर एवढूस्से पोर घेऊन गाणे गात होती. तिच्याकडे लक्ष देण्याची कोणत्याही प्रकारे सक्ती नसल्याने, किंबहुना त्या बाईचे कोणतेही म्हणावे असे उपद्रवमूल्य नसल्याने जो तो आपापल्या कामात गढलेला होता.
       मघाशी ते हिजडेही भिकच मागत होते आणि आता ही बाईदेखील भिकच मागतेय. पण “ते” भिक जणू त्यांचा अधिकारच असल्याप्रमाणे सक्तीने वसूल करत होते. त्यांना पैसे देणं प्रत्येकालाच भाग होतं. पण या बाईला कुणी पैसे द्यायचे नाकारले तरीही ती कुणाचंच काही वाकडं करू शकणार नव्हती, हे प्रत्येक जण जाणून होता. आणि म्हणूनच कुणी तिच्याकडे साधं लक्ष द्यायलाही तयार नव्हतं. माझ्या मोबाईलवर गाणी चालूच होती, पण आता मी हेडफोन काढून ठेवल्यामुळे गाडीच्या धडधडाटात त्यांचा आवाज अतिशय मंद, दुरून कुठूनतरी येत असल्यासारखा ऐकू येत होता.
       बरं ती काय नुसतीच भिक मागत होती का, तर अजिबात नाही. त्याबदल्यात ती गाणी गात होती. फार सुरात नसेलही ती, पण एखादी गोष्ट फुकटात किंवा तोंड वेंगाडून न घेण्याचा स्वाभिमान तिच्यात निश्चितच दिसत होता. या विचाराने मला अस्वस्थ करून सोडले. मी खिशात हात घालून एक ५ रुपयांचं नाणं तिला देऊ केलं, तर या बाईने मला हातानेच गाणे संपेपर्यंत थांबण्याचा इशारा केला. म्हणजे तिला खरोखरच बदल्यात काहीतरी देऊ केल्याशिवाय एक पैसाही नको होता. मी थांबलो. गाणे संपल्यावर तिने एकेकापुढे पदर पसरायला सुरुवात केली. कुणी ५ कुणी १० रुपये, कुणी आणखी जमेल तितके पैसे देत होते. मीही पैसे दिले.
    खरी गम्मत तर पुढेच झाली, एका सरदारजींनी १०० ची नोट पुढे केली आणि म्हणाले, सुटे पैसे नाहीत. तिने ते पैसे घेतले, आणि पुढच्या बोगीत गेली. सुमारे १५ मिनिटानंतर ती पुन्हा आमच्या बोगीत आली आणि तिने त्या सरदारजींना ५-१० नोटा आणि नाण्यांच्या स्वरूपात ९० रुपये परत केले! बोगीतील आम्ही सारेच अवाक झालो. सरदारजीही “मला वाटलं नव्हतं तू परत येशील. सगळे पैसे ठेवले असतेस तरी चाललं असतं”, असं काहीतरी म्हणाले.
       यावर ती शांतपणे म्हणाली, “साहेब मला माहितीय माझी लायकी काय आहे. उगाच जास्त पैसे घेऊन मी काय करू..”?
       भिक मागणे या प्रकाराचं कुठल्याही प्रकारे उदात्तीकरण करायचा माझा अजिबात प्रयत्न नाही. पण त्याच दिवशी नगरच्या स्थानकावर एक खुरडत-खुरडत रांगणारा भिकारी दिसला होता. कुणालाही सहजच दया यावी अशी त्या म्हातार्याची अवस्था होती. लोक कणव येऊन त्याला पैसेही देत होते. पण पाचच मिनिटांनी तो भिकारी मला जेव्हा व्यवस्थित चालत पाण्याच्या नळावर पाणी पिताना दिसला, तेव्हा मला हसू आवरले नाही! त्यानंतर गाडीतील तो हिजड्यांचा उच्छाद! या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या बाईचे एकूणच वागणे मनाला कुठेतरी स्पर्श करून गेले. गाडी पुढे जातच होती, आणि माझ्या मोबाईलमध्ये श्रीनिवास आपल्या मखमली आवाजात गात होता,
    “जिन्दगी जिन्दगी, क्या कमी रह गयी…
    आंख की कोर में, क्यू नमी रह गयी…
    जिन्दगी जिन्दगी…”

    गाडी पुढे जातच होती, जातच होती…

    © विक्रम श्रीराम एडके.
    (edkevikram@gmail.com)

  • Burning For Freedom

     

       इंटरनेट आणि सोशल मिडीयाच्या आभासी जगताने कुणाला काय दिलं माहिती नाही. पण मला मात्र अनेक जिवाभावाचे मित्र-मैत्रिणी दिले आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे पुष्कराज खेडेकर! आमची ओळख कधी आणि कुठे झाली मला खरोखरच आठवत नाही, पण २ वेगवेगळ्या देशांत राहत असूनही आमचा संवाद निरंतर सुरु आहे. याचे कारण म्हणजे आम्हाला जोडणारा समान धागा – स्वातंत्र्यवीर सावरकर! मला आठवतं कि पुण्यात मी दिलेल्या पहिल्याच व्याख्यानालाही त्यांनी भारतातील त्यांच्या सुट्टीचा कालावधी अडजस्ट करून हजेरी लावली होती!

        पुष्कराजमुळेच माझी ओळख श्रीमती अनुरूपा सिनार यांच्याशी झाली. खरंच सांगतो, झपाटलेपण काय असतं ना, ते या जिद्दी विदुषीकडून शिकावं! मराठीचा फारसा गंध नसताना, दूरदेशी वास्तव्यास असताना आणि संदर्भ-साहित्य मिळण्यापासून अनेक अडचणी असतानाही यांनी २००९ साली वीर सावरकरांची जीवनगाथा सबंध जगाला कळावी म्हणून इंग्रजीतून कादंबरी लिहिण्याचा संकल्प सोडला, आणि अक्षरशः शेकडो अडथळे ओलांडून तो पूर्णत्वासही नेला. आणि यातून जन्माला आली कादंबरी – Burning For Freedom!

        या दोन्हीही गोष्टी सांगायचे कारण म्हणजे, मी सावरकरांवर तसेच हिंदुत्वावर व्याख्याने देतो म्हणून माझ्या अभ्यासासाठी पुष्कराजने हे पुस्तक मला पार अमेरिकेहून पाठवायचं ठरवलं आणि अनुरुपाजींनी तत्परतेने त्यासाठी वैयक्तिक संदेशही दिला. पुष्कराजने पाठवलेलं हे पुस्तक मला आजच मिळालंय आणि मी झपाटल्यागत वाचायला सुरुवातही केली आहे. अतिशय काव्यमय तरीही विषयाशी पूर्णतः प्रामाणिक राहत लिहिलेली इंग्रजीतील ही या विषयावरील एकमेव कादंबरी असावी. कादंबरी असूनही त्यातील काही भागांसाठी अनुरुपाजींनी केलेले संशोधन नवे तर आहेच परंतु त्यांच्या चिकाटीची साक्ष देणारेही आहे! सावरकरांवर ज्यांची निष्ठा आहे त्यांनी तर हे पुस्तक अवश्य वाचावेच शिवाय इंग्रजी साहित्याची आवड असणार्या परंतु सावरकर माहिती नसणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींनाही हे पुस्तक आवर्जून वाचायला द्यावे – इतके हे पुस्तक सुंदर आहे!

        पुस्तकाच्या मलपृष्ठावर असलेला पुढील मजकूर माझ्या मनाला फारच भिडला आहे –

    This is the story of one man’s – Vinayak Damodar Savarkar’s – sacrifice of his name, fame, comfort & family life in the fifty years of his quest for the freedom of his beloved motherland, India. It is the story of politics & power plays. Exposed here is the reality that lies behind the mask of Truth; exposed are the shenanigans of Mahatma Gandhi in the Freedom Movement of India. The reality is a far cry from the rosy picture presented by what passes as history.
    Here, Savarkar’s life is creatively intertwined with a fictional character, Keshav Wadkar, taking the reader from the horrors of the Cellular Jail in 1913 to the assassination of Mahatma Gandhi in 1948. Savarkar fought to preserve the integrity of India, to reinstate the honor of his motherland without ripping her heart out. For the emancipation of his beloved country & people, he suffered agonies & gross injustices at the hands of the British government. Gandhi-Nehru-led Indian National Congress, and the successive Governments of free India.
    That his contribution to India should be negated to bolster the political aspirations of any political party is inacceptable.
    THE TRUTH CANNOT – AND SHALL NOT –BE HIDDEN!

        मला खात्री आहे की हि कादंबरी पाठवल्याबद्दल मी आभार मानणे या दोघांनाही आवडणार नाही, तेव्हा तो प्रयत्नही मी करणार नाही. उलट त्यांच्या या प्रेमळ ऋणाखाली राहण्यात मला आनंदच आहे! हे पुस्तक आपण सर्वांनीही अवश्य मागवून वाचावे असे मी नक्की म्हणेन.

    * काही उपयुक्त लिंक्स –
    १) श्रीमती अनुरूपा सिनार यांची वेबसाईट :
    www.anurupacinar.com
    २) श्रीमती अनुरूपा सिनार यांचा ब्लॉग :
    http://anurupacinar.blogspot.in/
    ३) पुस्तक ऑनलाईन मागविण्यासाठी लिंक :
    http://www.amazon.com/Burning-Freedom-Goddess-Death-without/dp/1426974981

    – आपलाच,
    विक्रम श्रीराम एडके
    (edkevikram@gmail.com)

  • हिंदुत्व हे मोठे अजब रसायन आहे

    हिंदुत्व हे मोठे अजब रसायन आहे. ते संपले म्हणून कुणी पोत खाली करू गेले तर त्याची ज्वाळा दुप्पट त्वेषाने वर वरच उफाळते.
       जगज्जेत्या शिकन्दराला भ्रम होता की हा हा म्हणता म्हणता हिंदुस्थान काबीज करेल. तो शिकंदर हिंदुस्थानचे साधे अंगणही बघू शकला नाही! कालौघात चाणक्यही गेले आणि चंद्रगुप्तही, केवळ हिंदुत्व तेवढे टिकून राहिले. म्लेन्छांनी या भूमीला उणीपुरी ६०० वर्षे गुलाम करून ठेवले. आता हिंदुत्व औषधालाही उरणार नाही असे वाटत असताना ते नुसते तगलेच नाही तर या भूमीत त्याने शिवप्रभून्सारखा संजीवन योद्धाही जन्मास घालून दाखवला. शिवप्रभूही गेले आणि शंभूछ्त्रपतीही पण तोवर हिंदुत्वाची धुरा बाजीराव बल्लाळ नावाच्या महायोद्ध्याने केव्हाच पेलली होती!
       इंग्रजी अंमलातही हे दैवी रसायन आपले अस्तित्व दाखवून देताच होते, कधी १८५७ च्या रूपाने तर कधी अनेकानेक क्रांतिकारकांच्या रूपाने! पुढे जन्माला आला तो विनायक दामोदर सावरकर नावाचा महानायक, हिंदू-हृदय-सम्राट! या महानायकाने हिंदुत्वाचा उद्घोष असा काही केला की सबंध देश ढवळून निघाला! पुन्हा तोच प्रश्न, सावरकरांच्या नंतर कोण?
       सावरकरांच्या नंतर कोण? अरे केव्हाच जन्माला आला होता एक हिंदू-हृदय-सम्राट! “बाळ” नावाचा “बाप” माणूस, ज्याने गेली पाच दशके केवळ हिंदूंच्याच कशाला, सर्वच सच्च्या देशभक्तांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
       आज हा बापही गेला. पण म्हणून हिंदुत्व पोरके झाले असे मानायचे काही कारण नाही. मराठी वाघ जरी अनंताच्या यात्रेवर प्रयाण करता झाला असला तरीही, गुजरातचा सिंह अजून जिवंत आहे. म्हणून म्हणतो, हिंदुत्व संपले नाही, हिंदुत्व संपत नाही. ते एक मोठे अजब रसायन आहे. ते संपले म्हणून कुणी पोत खाली करू गेले तर त्याची ज्वाळा दुप्पट त्वेषाने वर वरच उफाळते!
    © विक्रम श्रीराम एडके.