Author: Vikram Edke

  • अय्यप्पनुम कोशियुम – उपवास सुटल्याची तृप्ती

    अय्यप्पनुम कोशियुम – उपवास सुटल्याची तृप्ती

    उदगमंडलमच्या मार्गावर आट्टप्पाडीच्या जंगलासमीप एक कार थांबवली जाते. ट्रॅफिक पोलिस, अबकारी खाते आणि पोलिस दल यांचं नेहमीचंच जॉईंट ऑपरेशन असतं ते. तो सबंध भाग दारुमुक्त म्हणून घोषित केलाय. नेमकं याच कारमध्ये दारुच्या एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल बारा बाटल्या सापडतात. कारचा दरवाजा उघडताना आत दारू पिऊन लास झालेला माजी सैनिक कोशी कुरियन (पृथ्वीराज सुकुमारन) खाली पडतो. आधीच गरम डोक्याचा त्यात दारू प्यायलेला कोशी त्या तिन्ही सुरक्षादलाच्या लोकांसोबत भांडू लागतो. पोलिसांच्या गाडीचा हेडलाईट फोडतो तो. कोशीच्या अंगात रग आहे. सगळ्यांना मिळून एकत्रितपणेसुद्धा आवरत नाही तो. ते पाहून पीआय अय्यप्पन नायर (बिजू मेनन) गाडीतून खाली उतरतो आणि कोशीच्या खाडकन मुस्काडात लावतो. एकदा नाही तर अनेकदा. कोशीच्या मुसक्या आवळून त्याला पोलिस ठाण्यात आणलं जातं. तिथे पोलिस त्याच्या मोबाईलमधले कॉण्टॅक्ट्स पाहात असताना त्यांना केरळच्या अनेक बड्या प्रस्थांची नावं दिसतात. पोलिसांची साहजिकपणे फाटते.

    पण आता तर एफआयआर नोंदवून झालाय. आणि तसं बघायला गेलं तर या प्रकरणात खरोखरच चूक कोशीची आहे. एसआय अय्यप्पन वरीष्ठांना फोन करून विचारतो. सीआय सतीश (अनिल नेदुमंगड) त्याला सांगतात की, ‘थोडं धीराने घे. त्याला प्रेमाने वागव. त्याला त्याच्या गुन्ह्यांची गंभीरता समजावून सांग’. खरं तर पोलिस ठाण्यात आल्यावर आणि तऱ्हेतऱ्हेचे सेक्शन्स लावल्यावरही कोशीचा माज एका कणभरही कमी झालेला नाहीये. त्याचा उद्धटपणा अजूनही तितकाच आहे. त्यामुळे अय्यप्पनची त्याला चांगलं वागवण्याची अजिबातच इच्छा नाहीये. पण काय करणार, वरीष्ठांची आज्ञा! तो त्याच्या अंतरात्म्याच्या आवाजाला अनिच्छेने मुरड घालतो आणि कोशीला माणूसकीने वागवतो. बास! इथेच चूक होते त्याची. धूर्त कोशी पोलिसांच्या चांगुलपणाचा फायदा घेतो आणि त्यांच्यावरच गेम करतो. इथून सुरू होतो, ‘अय्यप्पनूम कोशियूम’ नावाचा वाघ आणि लांडग्याचा एकमेकांची शिकार करण्याचा हिंस्र आणि रानटी खेळ!

    ‘अय्यप्पनुम कोशियुम’चं बीज असं आहे ना की त्यातून अतिशय मसालेदार व्यावसायिक ॲक्शनपट बनू शकला असता. तसा तो बनत नाही, यातच त्याचं खरं यश सामावलेलं आहे. या सिनेमाचं वर्णन सर्वत्र ॲक्शन थ्रिलर असं केलंय. मी सांगतो, चुकीचं आहे ते. सिनेमात सगळे मिळून पाच-सहा फाईटसीन्स असतील. ॲक्शन हा सिनेमाचा भाग आहे, पण तो त्याचा खरा जॉन्रा नाहीच. सिनेमात सूडाचं नाट्य आहे पण तो रिव्हेंज थ्रिलरसुद्धा पूर्णपणे नाही. सिनेमा खरं तर आहे सायकॉलॉजिकल थ्रिलर. कोशी फक्त नावालाच सैनिक होता. त्याच्यात सैनिकाची शिस्त नावालासुद्धा नाही. त्याचे राजकारणात खूप वरपर्यंत संबंध आहेत. पैशांचं पाठबळ आणि अत्यंत टॉक्झिक बापाचा (रणजित) माज त्याच्यापाशी आहे. आणि त्यांच्याच जीवावर त्याची सगळी रग आहे. अय्यप्पनकडे यातली एकही गोष्ट नाही. त्याच्याकडे आहे ती फक्त खऱ्याची बाजू आणि सत्तावीस वर्षे सर्व्हिस करताना कमावलेलं गुडविल. आणि तरीही इथे ना कोशी पूर्ण खलनायक आहे ना अय्यप्पन पूर्ण नायक.

    एकमेकांवर एकापाठोपाठ एक कुरघोड्या करताना कोशी आणि अय्यप्पन दोघेही एकमेकांच्या मानसिकतेत वेळोवेळी डोकावून बघत असतात. त्यातून त्यांच्या शत्रुत्वातही विचित्र अशी मैत्री फुलत जाते. दोघेही अत्यंत मानी. त्यामुळे ते महाभारतीय युद्धासारखे आदर्श नियमांनी लढतात. कोशीचा बाप ज्यावेळी रडीचा डाव खेळायचं ठरवतो, तेव्हा आपल्या बापासमोर कधी तोंड वर करून बोलायची हिंमत नसलेला कोशी पहिल्यांदाच बापाशी भांडतो ते सुद्धा आपल्या शत्रूच्या बाजूने. आणि कोशी ज्यावेळी अय्यप्पनशी शत्रुत्व करण्यात मर्यादा ओलांडून पुढे जातो त्यावेळी कोशीचा वकील (बेंझी मॅथ्यूज) त्याला अय्यप्पनने मुळात तुला आयपीसीखाली अटक करून कसे उपकार केले आहेत ते समजावून सांगतो. आणि तरीही दोघांचंही शत्रूत्व जरादेखील पातळ होत नाही. कोशी अय्यप्पनचं अस्तित्व, त्याचं सर्वस्व हिसकावून घेतच राहातो आणि अय्यप्पन कोशीच्या अस्तित्वाचे बारीक बारीक बारीक बारीक तुकडे, इतके बारीक तुकडे की कोशी स्वतःच स्वतःला ओळखू शकणार नाही, करतच राहातो.

    सिनेमात आरडाओरडा नाही. उलट भावनांचा महापूर अतिशय संयत शब्दांत रोखून धरण्याच्या अचाट ताकदीचं प्रदर्शन आहे. संवाद टाळ्या घेणारे नाहीत तर आत्म्यावर शहारा उमटवू शकणारे भयंकर आहेत. सुरुवातीच्या प्रसंगांमध्ये कोशी एकदा अय्यप्पनच्या घराबाहेर जाऊन फुशारक्या मारतो, अय्यप्पनला अनौरस म्हणून हिणवतो. इतका वेळ ऐकून घेणारी अय्यप्पनची बायको (गौरी नंदा) तान्ह्या पोराला शांतपणे पाळण्यात घालते आणि पदर खोचून कोशीकडे येते आणि फक्त दोनच वाक्यं सुनावते. बास! कोशीची चड्डीच पिवळी व्हायची बाकी राहाते. त्याचवेळी अय्यप्पन त्याच्या बुलेटवरून येतो. कोशीची अवस्था बघून तो त्याला म्हणतो की, ‘तिने दोनच वाक्यांत तुझी फाडून ठेवली, विचार कर मी जर सुरू झालो तर तुझं काय होईल’! अय्यप्पनचं म्हणणं अक्षरशः सत्य असतं कारण त्यानंतर सीआय सतीश कोशीला जे सांगतो ते ऐकून तर त्याची पाचावर धारण बसते.

    सिनेमात खूप साऱ्या कायद्यांची खूप सारी कलमे योग्य ठिकाणी पेरली आहेत. कोणत्याही खटकेबाज संवादांपेक्षा त्यांचा प्रभाव अनेकपटींनी जास्त पडतो. हे नि:संशय एकेकाळी वकील असलेल्या दिग्दर्शक कै. सचिचेच यश आहे. कोशी आणि त्याचा ड्रायव्हर कुमारन (रमेश कोट्टायम) यांचं नातं तर इतकं सुरेख चितारलंय की काय सांगू! सिनेमा जवळजवळ तीन तासांचा आहे. पण इतकी योग्य गति राखलेला सिनेमा गेल्या अनेक वर्षांत क्वचितच आला असेल. लेखन, संपादन, दिग्दर्शन, छायाचित्रण, पार्श्वसंगीत कुठे कुठेच खोट काढायला जागा नाही. फक्त एकच त्रुटी मला आढळली ती म्हणजे क्लायमॅक्सचा ट्विस्ट प्रेक्षकांना खूप आधीच सांगून टाकायला नको होता. त्याने चित्रपटाचा प्रभाव यत्किंचितही उणावत नाही, पण तो वेगळ्या प्रकारले हाताळला असता तर तोच प्रभाव अजून वाढू शकला असता. बाकी इतकी सुरेख पात्रयोजना मी तरी ‘विक्रम-वेधा’नंतर (२०१७) पहिल्यांदाच पाहिली आहे.

    गेल्या दोन-चार वर्षांत असं होत होतं की, कोणताच चित्रपट मला संपूर्ण आवडत नव्हता. चांगला चांगला म्हणवणारा चित्रपटही पूर्ण समाधान देत नसायचा मला. निष्कलंक असं काही सापडतच नव्हतं. ‘अय्यप्पनुम कोशियुम’चं यश सांगू? या चित्रपटाने माझा अनेक वर्षांचा उपवास सुटला. सिनेमा पाहिल्यावर एकाचवेळी भारलेलं आणि अंतर्यामी रितं वाटायला लावणारी भावना या चित्रपटाने मला दिली. या चित्रपटाने माझा चित्रपट या माध्यमावरील विश्वास पुन्हा एकदा दृढ केला. या एकाच मुद्यावर तुलना करायची झाली तर हा चित्रपट ’96’च्या (२०१८) दर्जाचा आहे. ‘अय्यप्पनुम कोशियुम’चे, खरंच सांगतो, माझ्यावर खूप खूप उपकार आहेत!

    *५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    [इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा www.vikramedke.com]

  • अखंडा – यतो धर्मस्ततो जय:

    अखंडा – यतो धर्मस्ततो जय:

    कर्नाटकच्या सीमेवर सैनिकांची एक तुकडी मोहिमेवर असते. त्यांचं लक्ष्य असतं नक्षलवादी गजेंद्र साहू. कर्मधर्मसंयोगाने साहू पळून जाण्यात यशस्वी होतो व एका हिंदू साधूच्या आश्रमात शरण घेतो. आश्रम, तेथील महंत आणि त्यांचा समाजावरील प्रभाव यांच्या प्रचंड ताकदीची जाणीव साहूला होते व ती ताकद हस्तगत करण्यासाठी तो महंतांचा खून करतो आणि त्यांची जागा घेतो. त्याच आसपास एका कुटूंबात प्रसुती होते. जुळी मुलं. पण एक जिवंत आणि दुसरा मृत. गावात वास्तव्यास असलेला अघोरी अनपेक्षितरित्या त्या घरी येतो आणि मृत बालकाची मागणी करतो. मुलाची आई अद्याप मूर्च्छेत असते. वडील तिच्या नकळत ते बाळ अघोरीला देऊन टाकतात. हस्ते परहस्ते त्या मृत बालकाचा प्रवास होऊ लागतो. या तसं बघितलं तर दोन वेगवेगळ्या घटना. पण त्यांना एकत्र आणण्याचं आणि त्यातून अत्यंत श्रीमंत व्यावसायिक मूल्यं असलेला ‘अखंडा’ बनवून दाखवण्याचं श्रेय जातं ते बोयापती श्रीनूला!

    ‘अखंडा’चा पूर्वार्ध कमालीचा संथ आहे. संथ आणि पूर्वानुमेय (प्रेडिक्टेबल) घटनांनी भरलेला! पण ते सहन करत असतानाही आपल्याला आतून वाटत राहातं की हे कोणत्या तरी मोठ्ठ्या यंत्राचे सांधे जुळवणं सुरू आहे. ते सांधे एकदा जुळले की सबंध चित्रपट फुलून येणार आहे. तसंच होतं. चित्रपट जरी मूळ संघर्ष अंथरायला वेळ घेत असला तरी एकदा तो त्या क्षेत्रात घुसला की स्फुल्लिंगातून अपरिमित तेजस्वी विस्फोट व्हावा तसा फुलून येतो!

    नंदमुरी बाळकृष्ण अर्थात बालय्याला चित्रपटात दुहेरी भूमिका आहेत. एक म्हणजे रक्तपातावर विश्वास नसलेला मुरली आणि दुसरा म्हणजे दुर्जनांचा रक्तपात हेच उत्तर यावर ठाम विश्वास असलेला अखंड रुद्र सिकंदर अघोरा! पहिल्या भूमिकेतदेखील खूप सारे टाळ्या-शिट्ट्या वसूल करणारे क्षण असले तरी ते काही बालय्याचं नेहमीचं मैदान नाही. त्यामुळे त्या भूमिकेत तो काहीसा अडखळतो, काहीसा चाचपडतो. पण अंती आपल्या अनुभवाच्या जोरावर कथेचे सांधे जुळवण्याची भूमिका निभावून नेतो. आणि एकदा का ते सांधे जुळले की मग अखंडाच्या रुपात तो अक्षरशः तांडव घालतो तांडव! त्या पात्रात त्याचं रूप, त्याची देहबोली, त्याचं ठायीठायी संस्कृत बोलणं, सगळ्यांपासून तुटक व कोणत्याही सांसारिक पाशांपासून मुक्त असणं आणि कसलाही धरबंध न बाळगता थैमान घालणं साऱ्या साऱ्या गोष्टी वरच्या परिच्छेदात सांगितल्याप्रमाणेच फुलून येतात!

    बॉलिवूडची प्रथाच आहे धर्माचा शक्य तितका अपमान करणं, धर्मपरायण मंडळींना शक्य तितकं नीच लेखणं. बॉलिवूडमध्ये काम करणारे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ सारेच विदेशी शिक्षणाची पैदास असल्यामुळे त्यांना ना या देशाची माती ठाऊक असते ना त्या मातीच्या भावना. त्यामुळेच त्यांचे चित्रपटही तसेच असतात – विसविशीत, उथळ आणि अगोचर! या देशाच्या वैविध्याला एका धाग्याने जोडणारा हिंदू धर्म तर त्यांना स्वप्नातही नकोसा असतो, उलट ते त्याचा आपापल्या अभिव्यक्तींतून शक्य तितका तिरस्कारच करत असतात. तेलुगू चित्रपटसृष्टी असल्या अंधश्रद्धांना थारा देत नाही. ‘अखंडा’मध्ये सबंध चित्रपटभर भगव्या संकेतांचा मुक्तहस्ते वापर केलाय. नुसत्या नायकाच्या वेशातच नाही तर गाड्या, पात्रांच्या ओळखपत्राची दोरी अशा नजरेला सहज न दिसणाऱ्या जागांवरही केसरी उधळण आहे. चित्रपटातील जोड्या विवाहसंस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या आहेत आणि कुटूंबे कुटूंबसंस्थेवर विश्वास ठेवणारी आहेत.

    पण चित्रपटाचं सगळ्यांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे लेखक-दिग्दर्शकांचा धर्माबद्दलचा अभ्यास अतिशय सूक्ष्म आहे. अघोरी पंथाचा वेश, त्यांची वर्तनाची पद्धत इ. गोष्टी तर त्यांना यथायोग्य साधल्या आहेतच. मंदिर का आवश्यक असते आणि मंदिराच्या उभारणीत धर्म किती खोलवरचा आध्यात्मिक विचार करतो हे सांगणारा प्रसंग अतिशय सुंदर झालाय. एका प्रसंगात नायक खलनायकाला मारत असताना त्याच्या शरीरावर प्रहार करताना कुंडलिनीच्या सात चक्रांची वर्णनं करतो. बॉलिवूडवाल्यांना मुळात कुंडलिनी नावाचं काही असतं हेच ठाऊक नसेल! पण सगळ्यांत जबरदस्त प्रसंग झालाय तो जिथे नायक ‘अहिंसा परमो धर्म:’च्या पुढे जात ‘धर्म: हिंसा तथैव च’ सांगतो, तसं वागतो पण तिथून निघून जात असताना पायाखाली चुकून येत असलेल्या निर्दोष मुंगळ्याचाही जीव घेत नाही!

    पण या सगळ्या मारधाडीच्या आणि अभिनिवेशाच्या आत मला हा चित्रपट त्यातील सगळ्या गुणदोषांसह आवडण्याचं सगळ्यांत मोठं कारण सांगू? ते कारण आहे, अखंडा आणि मुरलीच्या लहान मुलीमधील हळवं नातं. त्यांच्यात सगळे मिळून पाच-दहा संवाद असतील. पण न बोलताच एक सन्यासी आणि अबोध बालिकेतील नात्याची घट्ट वीण बोयापती श्रीनूने जी सुरेख विणलीये आणि बालय्यानेही ती जितक्या अनपेक्षित संयतपणे चितारलीये तिला तोड नाही. जननी नाव दाखवलंय तिचं. अखंडा एकाच वेळी तिला लहान बालिका आणि जगज्जननी जगदंबा म्हणून लळा लावतो, ते अतिशय लाघवी आहे.

    या नव्या वर्षात ‘पुष्पा’ने सबंध देशभर धुरळा उडवलाय. तुलनाच करायची झाली तर २५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘पुष्पा’ने ३७० कोटी म्हणजेच बजेटच्या तुलनेत दिडपट पैसे कमावले आहेत. त्याचवेळी ७० कोटींत बनलेल्या ‘अखंडा’ने १५० कोटी म्हणजेच बजेटच्या तुलनेत दुप्पट कमाई केली आहे. शुद्ध संख्याशास्त्रीय भाषेत बोलायला गेलं तर ‘अखंडा’ हा निर्मात्यांसाठी अधिक फायदेशीर ठरलाय. मी गेल्या जवळपास अर्ध्या दशकाहून अधिक काळ सांगतोय की ‘रीजनल इज द न्यू नॅशनल’. ‘अखंडा’ तसाच आहे. प्रादेशिक असूनही राष्ट्रीय स्तरावर धार्मिक अस्मितेला फुंकर घालणारा. भौतिकशास्त्राचे नियम पाळायला तो काही ख्रिस्तोफर नोलनचा चित्रपट नाही. त्याच्या पूर्वार्धातील संथपणा, अनावश्यक गाणे (जय बालय्या), पूर्वार्धात बालय्याचं अवघडलेपण सहन करू शकलात आणि मसालापट हे मसालापट म्हणून बघू शकण्याइतकी परिपक्वता तुमच्या ठायी असेल तर तुम्हाला तो आवडण्याची अखंड शक्यता आहे! सर्वोत्तम अनुभवासाठी मूळ तेलुगू भाषेतच पाहा.

    *३.५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    [अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

  • खोल दूँ

    खोल दूँ

    धूप बँधी है पाँवों से
    छाँव में खुद को घोल लूँ
    सदियों से बंद हूँ किवाड़ों सी
    आज अपने आप को खोल दूँ

    मौन की परछाईयाँ जब चुभने लगती है
    सिसकियों से चिंगारियाँ उगने लगती है
    और रेंग-रेंग कर समय निगोड़ा आँखों में भर आता है
    आता है तो फिर जन्मों का वह सूद ले के ही जाता है
    बहते समय को अब के लेकिन भौहों से ही मोड़ दूँ
    सदियों से बंद हूँ किवाड़ों सी
    आज अपने आप को खोल दूँ

    — © विक्रम श्रीराम एडके
    [एक नारी का संघर्ष व्यक्त करने वाला यह गीत, एक हिंदी शॉर्टफिल्म के लिए लिखा था। किन्तु उन्हों ने किसी कारणवश फिल्म की भाषा ही बदल दी। तो यह गाना रिकार्ड ही ना हो सका। इस लिए यह है आज के #रिजैक्टेड_लिरिक्स]

    चित्र श्रेय: मूल चित्रकार को

  • पुष्पा – आहे मनोहर तरी..!

    पुष्पा – आहे मनोहर तरी..!

    रायलसीमा भागात अतिदुर्मिळ अशा रक्तचंदनाचे वृक्ष उगवतात. लाल सोने म्हटले जाते त्या झाडांना. अत्यंत मौल्यवान अशा या वृक्षाच्या लाकडांची अर्थातच तस्करी झाली नसती, तरच नवल. अशाच एका ठेक्यावर काम करणारा हमाल आहे पुष्पराज (अल्लु अर्जुन). तिरकं डोकं चालवणारा निडर पुष्पराज या चंदनाच्या तस्करीतून यशाच्या आणि सामर्थ्याच्या शिड्या कशा चढतो, याची कहाणी म्हणजे ‘पुष्पा – द राईज, पार्ट १’.

    हा चित्रपट निर्माण कसा झाला असेल? एके दिवशी दिग्दर्शक सुकुमार आणि अल्लु अर्जुन या दोघांपैकी एक कुणीतरी दुसऱ्याकडे गेला असेल व म्हणाला असेल, ‘अरे तो केजीएफ काय तुफान चालला यार! यश दाढी वाढवून कसला कूल दिसलाय! आपण पण असा एक पिक्चर केला पाहिजे’! बास, या तीन वाक्यांवर ‘पुष्पा’ उभा राहिलाय असं पाहाताक्षणीच जाणवतं. साखळी कशी असते पाहा. ‘पुष्पा’ पाहून प्रशांत नीलच्या ‘केजीएफ’ची (२०१८) आठवण येते. ‘केजीएफ’ पाहून अनुराग काश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ची (२०१२) आठवण येते. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ पाहाताना रामूच्या ‘रक्तचरित्र’ची (२०१०) आठवण येते! ‘सर्वदेवकृतं नमस्कारं केशवं प्रतिगच्छति’च्या चालीवर म्हणावेसे वाटते की, जसे जगातील सगळे ऑर्गनाईझ्ड क्राईमवर आधारलेले चित्रपट कुठे ना कुठे ‘गॉडफादर’वरून (१९७२) प्रेरित झालेले असतात, तद्वतच भारतातील सगळे माफियावाले सिनेमे कुठे ना कुठे रामूच्या एखाद्या चित्रपटावरून प्रेरित झालेले असतातच असतात. रामू आजकाल कसा का वागत असेना, चित्रपट बनवण्याच्या तंत्रात आणि हिंमतीत तो खराखुरा ट्रेंडसेटर आहे! आणि ‘रक्तचरित्र २’ (२०१०) रिकॅपमध्ये किती जरी वेळ वाया घालवत असला तरीही ही जोडगोळी चित्रपट म्हणून काहीच्या काही वरच्या दर्जाची आहे! त्या काळात सूर्या शिवकुमार अभिनयावर खरोखर मेहनत घ्यायचा. असो. विशेष म्हणजे उपरोल्लिखित साखळीतील सगळेच्या सगळे चित्रपट किमान दोन भागांत बनलेले आहेत किंवा बनताहेत आणि एक ‘केजीएफ’चा अपवाद वगळता सगळेच्या सगळे बॉक्स ऑफिसवर अंडरपरफॉर्मर्स आहेत. ‘पुष्पा’ किती जरी दणक्यात कमावत असला तरीही २००-२५० कोटींच्या बजेटवर बनलेल्या चित्रपटाला ओटिटीने हात दिल्याशिवाय रिकव्हरी होणं अवघडच आहे.

    वर मी ज्या साखळीचा उल्लेख केला त्याचे अजून एक कारण आहे. हे सगळेच्या सगळे चित्रपट एका टेम्प्लेटवर चालतात. ते टेम्प्लेट म्हणजे, पहिल्या भागात अभावातून आलेला नायक कसा मोठा डॉन होतो याची कथा आणि दुसऱ्या भागात त्या नायकाचा स्वकर्मानेच कसा ऱ्हास होतो याची कथा. याची सुरुवातही रामूनेच करून दिली आहे. रामूने आखून दिलेल्या मार्गातच दोन-पाच पावले इकडं-तिकडं करून हे सिनेमे बनतात. अपवाद फक्त एकाच चित्रपटाचा. तो टेम्प्लेट फॉलो करूनही टेम्प्लेटपेक्षा खूपच वेगळ्या धाटणीचा होता. त्याचे लेखन, दिग्दर्शन, मांडणी, संपादन, अभिनय सारं काही अक्षरशः मास्टरक्लास म्हणावं असंच होतं. तो सुद्धा बॉक्स ऑफिसवर या जॉन्राच्या बहुतांशी चित्रपटाप्रमाणेच अंडरपरफॉर्मर होता. तो चित्रपट म्हणजे वेट्रिमारनचा, ‘वडाच्चेन्नई’ (२०१८)! त्याची सर कशालाच येऊ शकत नाही.

    ‘पुष्पा’देखील ठरीव टेम्प्लेटच फॉलो करत असल्यामुळे बऱ्यापैकी प्रेडिक्टेबल आहे. पण त्या प्रेडिक्टेबिलिटीतही आपण तो पाहात राहातो याचं कारण म्हणजे, पोलिश सिनेमॅटोग्राफर मिरोस्लाव कुबा ब्रोझेकचं अत्यंत देखणं छायांकन. एकही चौकट अशी नाही जिच्या मागे काही ना काही विचार अथवा नियोजन नाही. चित्रपट प्रत्यक्षात अत्यंत शब्दबंबाळ आहे. पण तो गोंगाट बाजूला सारला तर असा देखणा चित्रपट या जॉन्रामध्ये (अर्थातच ‘वडाच्चेन्नईचा’ अपवाद वगळता) क्वचितच बनला असेल. या अत्युत्कृष्ट छायांकनाला तितक्याच जबरदस्त अभिनयाची साथ लाभलीये. रश्मिका, जगदिश प्रताप भंडारी, अजय घोष, धनंजय, राव रमेश, अजय, अनसूया वगैरे भरवश्याचे खेळाडू तर आहेतच. पण सुनील या केवळ कॉमेडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्याला मुख्य खलनायकाची भूमिका देणे हा दिग्दर्शक सुकुमारचा खरोखरच मास्टरस्ट्रोक म्हटला पाहिजे! फ़हाद फ़ासिल किती जरी नटराज असला तरीही पहिल्या भागात त्याला काहीच काम नाही.

    गडबड केव्हा होते? जेव्हा आपण पटकथेचा एकजिनसी विचार करू लागतो, तेव्हा तिच्यातले दोष हे गुणांपेक्षा अधिक ठळकपणे जाणवू लागतात! ‘विक्रम वेधा’मधील (२०१७) वेधा हा कायमच मॅन विथ द प्लॅन होता. त्याच्या एकूण एक कृतींच्या मागे अतिशय सूक्ष्म विचार आणि चपखल नियोजन असायचं. पुष्पराज मात्र सबंध चित्रपटभर टोकाचा इम्पल्सिव्ह वागत राहातो. हे एक सुकुमारच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य. ‘आर्या’ (२००४) घ्या, ‘आर्या २’ (२००९) घ्या किंवा माझा अत्यंत आवडता ‘१ नेनोक्कडिने’ (२०१४) घ्या, त्याचे नायक असेच सायकॅट्रिस्टची गरज असल्यासारखे वागत राहातात. हेच भविष्यात त्याच्या पतनाचं कारण दाखवायचं असेल तर गोष्ट वेगळी, पण आत्ताच्या स्किम ऑफ थिंग्समध्ये ते हळूहळू विचित्र वाटू लागतं. इतकं की, नायकाबद्दलची सहानुभूती एक त्याचा अत्यंत वेदनामय भूतकाळ वगळता कमी होऊ लागते.

    पुष्पा चंदनाच्या तस्करीवर हमाल म्हणून काम करू लागल्याच्या पहिल्याच दिवशी जी शक्कल लढवतो, ती सुद्धा पटत नाही. मुळात त्याच्या वर मुकादम असतील, अजून माणसे असतील ते एका हमालाला स्वतंत्र निर्णय घेऊ देतील हेच शक्य वाटत नाही. ट्रक जिथं गायब झाला त्याच्या आसपास शोध घेण्याच्या ऐवजी पोलिस पुष्पालाच विचारत बसतात, हे सुद्धा पटत नाही. पुष्पाचा भूतकाळ किती जरी त्रासाचा असला तरीही एका मर्यादेपर्यंत त्याच्या सावत्र भावांचं वागणं दुनियादारीच्या दृष्टीने चूक वाटत नाही. पुष्पाला आवडणाऱ्या श्रीवल्लीची तर अजूनच वेगळी तऱ्हा. जी पोरगी हजार रुपयांत स्माईल द्यायला तयार होते आणि पाच हजारांत चुंबन, तिने चेहरा किती जरी भोळा केला तरी ते पात्र सरळ वाटत नाही. एका प्रसंगात ती पुष्पाला म्हणते, मला तुझ्यासोबत झोपायचंय, त्याच्यानंतर काही दिवसांतच ती एकदमच लाजरेपणाचा आव आणून त्याला हात सुद्धा लावू देत नाही. मग पहिल्या प्रसंगात ती जे बोलली ते केवळ आपद्धर्म म्हणून होतं की काय, असं वाटू लागणारच की! खासदाराच्या दर्जाच्या माणसाला चंदनाचा खरा दर माहिती नाही आणि एक साधा सिंडिकेट मेंबर त्याला वर्षानुवर्षे फसवत राहातो, ही तर भाबडेपणाची हद्द आहे. फ़हाद फ़ासिलचा तर शेवटचा सबंध सिक्वेन्स केवळ अतिरंजित नाट्यनिर्मिती करण्यासाठीच ताणलाय की काय वाटते. त्या ऐवजी त्याला केवळ इंट्रोड्युस करून चित्रपट संपवला असता तर सस्पेन्स तर राहिलाच असता शिवाय चित्रपटाची जी अमर्याद लांबी आहे, ती सुद्धा काहीशी आटोक्यात आली असती. हा सस्पेन्स राखण्याचा प्रकार राजमौलीने ‘बाहूबली’मध्ये (२०१५) केवढ्या खुबीने वापरला होता, आठवा! पुढच्या भागाचे नाव जर ‘पुष्पा – द रुल’ असणार आहे तर या भागाचे नाव नुसतेच ‘पुष्पा – द राईज’ एवढेच असणे सुसंगत वाटले असते, त्यात ‘पार्ट १’ आणि ‘पार्ट २’ ही शेपटं अतिरिक्त वाटतात. सांगण्यासारखे अजून बरेच मुद्दे आहेच. पण खरं सांगू, ‘पुष्पा’ हा जर तेलुगूतील इतर मसाला चित्रपटांसारखा हलकाफुलका असला असता तर मी एवढं खोलात गेलो सुद्धा नसतो. चित्रपट स्वतःच स्वतःला अतिगंभीरपणे घेतो व वास्तववादाकडे झुकतो म्हटल्यावर मात्र त्याच अंगाने विचार करणे प्राप्त आहे!

    इतक्या सगळ्या त्रुटी असूनदेखील चित्रपट आपण पाहातच राहातो, याचं एकमेव कारण म्हणजे अल्लु अर्जुन. इतका जबरदस्त मेकअप आणि कॉस्च्युम डिझाईन हिंदीत पाहायला सुद्धा मिळत नाही. तो ज्या प्रकारे बसतो, वावरतो, कुणाला सांगून खरं वाटणार नाही की तो बन्नी आहे! ‘दुव्वाडा जगन्नाथम्’मध्ये (२०१७) त्याने जितक्या सहजपणे विजयवाड्याचा ब्राह्मणी ॲक्सेंट वापरला होता तितक्याच सहजपणे तो इथे चित्तुर ॲक्सेंटमध्ये बोलतो. त्याच्या नृत्याबद्दल तर काही बोलायची गरजच नाही. पटकथेची फारशी साथ नसूनही त्याने सबंध चित्रपट आपल्या खांद्यांवर नुसता पेललेलाच नाही, तर पार सुद्धा केलाय! देविश्री प्रसादचे संगीत चित्रपटात बरोब्बर मिसळून जाते. मी कायम म्हणतो, डिएसपी हा तिकडचा प्रीतम आहे. सिनेमा रिलिज होण्याआधी पंधरा दिवस आणि रिलिज झाल्यानंतर पंधरा दिवस गाजणारी गाणी तो प्रीतमइतक्याच चलाखीने देतो. त्या पलिकडे ना निर्माते-दिग्दर्शकांची अपेक्षा असते ना त्याची स्वतःची इच्छा. तेच त्याने इथेही यथासांग करून दाखवलेय. अल्लु अर्जुनच्या खालोखाल पुष्पा सुसह्य होण्यात त्याचा वाटा आहे. माझ्या मते हेच तात्पर्य आहे. अत्यंत डिटेल्ड पद्धतीने १७८ मिनिटं चालूनही पुष्पा सुसह्यच राहातो, स्मरणीय होत नाही. तो धडाक्यात कमावतो आहे तर कदाचित ब्रेक-ईव्हनपर्यंत जाईलही, पण क्लासिक्सच्या यादीत जाण्याची पात्रता असूनही तो त्या उपाधीच्या खूपच अलिकडे राहातो, हे दुर्दैव आहे!

    *२.७५/५

    — © विक्रम श्रीराम एडके.
    [अन्य लेखांसाठी पाहा www.vikramedke.com]

  • सर्वार्थाने फसलेला – अतरंगी रे

    सर्वार्थाने फसलेला – अतरंगी रे

    ‘अतरंगी रे’ सुरू झाल्यापासून पहिल्या पाच-सात मिनिटांतच तुम्हाला तो पॉईण्टलेस वाटू लागतो. निष्फळतेची जागा हळूहळू घृणा घेऊ लागते. तुम्ही तो कित्येकदा पॉजसुद्धा करता, पण स्टॉप करून ॲपमधून बाहेर काही तुम्ही पडत नाही. तुम्ही तो पाहातच राहाता, अगदी शेवटपर्यंत!

    बॉलिवूडच्या तुलनेत अत्यंत नव्या पार्श्वभूमीवर बेतलेला हा चित्रपट इतक्या पातळ्यांवर फसलाय आणि इतक्या निष्काळजीपणाने साकारलाय की, कुठून सुरूवात करावी आणि काय सांगू नये, तेच समजत नाही. आपल्याकडे चांगली कथा आहे म्हटल्यावर ती कशी जरी मांडली तरी चालून जाईल, या अतिआत्मविश्वासाचं फळ आहे हा चित्रपट. त्यातूनच मग कथेच्या सादरीकरणात अनेक खिंडारं आणि त्याहून जास्त प्रश्न उभे राहातात. ‘तनू वेड्स मनू’चे दोन्हीही भाग आणि ‘रांझणा’सारखे चित्रपट बनवून मानवी मनांच्या गाभाऱ्यात डोकावणारी आनंद एल. राय आणि हिमांशू शर्मा यांची दिग्दर्शक-लेखकाची जोडी जेव्हा पहिल्यांदाच खराखुरा मानसशास्त्रीय विषयावरील चित्रपट करायला घेते तेव्हाच तो उथळ आणि अतिसोपा करून मांडते, हा दैवदुर्विलास म्हणावा, की आपराधिक श्रेणीचा निष्काळजीपणा, की दोन्ही?

    एका अत्यंत ताकदवान बिहारी कुटूंबाला भर बिहारमध्ये आपली नात ज्याच्यासोबत इतक्या वेळा पळून जाते, त्याचा ठावठिकाणा का शोधता येत नाही? विशूच्या (धनुष) आईवडलांची प्रतिक्रिया इतकी कोरडेपणाने का चितारलीये? मँडीचे (डिंपल हयाती) पुढे काय होते? विशूला जी नापास होण्याची भिती वाटत असते, त्याचे पुढे काय होते? या अशा लहानसहान प्रश्नांचे तर सोडाच पण चित्रपटाची कथा फोडू नये या तत्त्वापायी मी जे मोठे प्रश्न सांगतही नाही आहे, त्यांचेसुद्धा उत्तर चित्रपटात कुठेच येत नाही. कारण लेखक-दिग्दर्शकाला माहिती आहे की, आपण थांबून एक क्षण जरी विचार केला तरी कथाबीज नावाचा पत्त्यांचा बंगला त्याच क्षणी कोसळेल. त्यामुळे ते घाई करत नुसते धावतच सुटले आहेत.

    ही घाई, हाच आजकालच्या चित्रपटांचा जणू स्थायीभाव होऊन बसलाय. मला आठवतच नाही की अखेरचा असा हिंदी चित्रपट मी कोणता पाहिला होता ज्यात भावनिक प्रसंग नुसते लांबच नाही तर गहिरेसुद्धा होते! सगळंच कसं द्विमितीय, दोन तासांच्या मर्यादेत कोंबलेलं. त्यामुळे मुळं धरतच नाहीत, भावनेचे बीज अंकुरतच नाही. ते आहे, हे गृहित धरून यंत्रवत चालणाऱ्या गोष्टी तेवढ्या मेलेल्या नजरेने पाहात राहायच्या. आता याच चित्रपटाचं बघा ना! रिंकूचं पात्र अत्यंत प्रतिकर्षक वाटावं असं लिहिलंय. तिच्यासोबत जपण्यासारखं काहीच नसताना किंबहूना जीव लावावा असं काहीच घडलेलं नसताना विशूने का म्हणून तिच्या प्रेमात पडावं? एकच उत्तर, की तो हिरो आणि आणि ती हिरोईन म्हणून!

    सबंध चित्रपट अशा प्राचीन गृहितकांनाच सिद्धांत मानून रेटलाय. आणि जिथे ते चौकट मोडतात, तिथे ते इतके उथळ होतात की, काय सांगू! मानसशास्त्रीय आजाराचे इतके घाणेरड्या व हीन दर्जाचे सादरीकरण क्वचितच एखाद्या तथाकथित पुरोगामी चित्रपटात पाहायला मिळाले असेल. त्यासोबतच बिहारची ओळख केवळ ऑनरकिलिंगपुरतीच भासवणे, दक्षिण भारताला ‘निचला हिस्सा’ म्हणणे वगैरे भेदभावमूलक हिणकस प्रकार आहेतच. हे करताना एकही, अगदी एकही ट्विस्ट धक्का देत नाही. सारे काही पहिल्या काही मिनिटांतच आपल्याला जे समजते ते शेवटपर्यंत सरळसोट रस्त्यासारखे समजतच राहाते. त्या आघाडीवर लेखक-दिग्दर्शकांनी काडीमात्रही प्रयत्न केल्याचे दिसत नाही. काडीमात्रवरून आठवलं, सारा अली खानला काडीचाही अभिनय जमत नाही. तिच्या तोंडी सगळे संवाद आणि चेहऱ्यावर सगळे भाव सपाटच वाटतात. अक्षयकुमारला एक उत्कर्षबिंदू सोडल्यास काहीही काम नाही. एकेकाळी चित्रपटांमध्ये हिरोच्या मित्रांनाही किंमत असायची. आठवा राय यांच्याच ‘रांझणा’तील मुहंमद झिषान अय्युब, ‘तनू वेड्स मनू’मधील दीपक डोब्रियाल वगैरे. इथे मात्र कथानकातील अवघड गुंते कसल्याही त्रासाविना सोपे करण्यापुरतेच त्यांना वापरून घेतलेले दिसते. चित्रपट गंडलाय हे एकदा मनाने स्वीकारलं की उत्तरार्धात तो काहीसा सुसह्य होतो, पण तोपर्यंत वेळ निघून केलेली असते.

    इतके असूनही किंवा काहीच नसूनही आपण चित्रपट शेवटपर्यंत पाहातच राहातो, याची कारणे दोन. एक म्हणजे धनुषचा नवनवीन मानांकने रचणारा वेधक अभिनय. तो जे डोळ्यांचे खेळ करतो, हसता हसता रडतो, टायमिंग साधून विनोद करतो, बॉलिवूडच्या एकूण एक हिरोंना लाजवेल अशी संवादफेक करतो, वीजेसारखा सहज नाचतो, ते सारंच अशक्य कोटीचं आहे! आणि दुसरं कारण म्हणजे रहमानचं दैवी संगीत. गाणी तर हिट आहेतच. पण रहमानने पार्श्वसंगीतातून जे अमृत ओतलंय ते तर निव्वळ अप्रतिम! विशेषतः विविध गाण्यांच्या चाली रहमान प्रसंगोपात जिब्रिश गातो ते सगळेच भाग श्रेष्ठतेने ओतप्रोत झाले आहेत. चित्रपटाच्या शेवटी जेव्हा दिग्दर्शकाच्याही नावाच्या आधी लिहून येतं की, A film by A.R. Rahman, तेव्हा रहमान नुसता त्याच्या श्रेष्ठतेमुळे हा मान हक्काने मिळवतच नसतो, तर चित्रपटात खरोखरच त्याने लेखक-दिग्दर्शकांच्याही पुढे जाऊन आत्मा ओतलाय याची ती पोचपावती असते.

    पण धनुष काय किंवा रहमान काय, चित्रपट नावाच्या यंत्राचे आटे आहेत. यंत्र जर स्वतःच चुकीच्या दिशेला घरंगळत असेल तर आटे त्याला थांबवू शकत नाहीत. पंचपक्वान्नाच्या जेवणात श्रीखंडपुरीच तेवढी चवदार निघून उपयोग नसतो. चांगल्या विषयाची वाट लावणारा ‘अतरंगी रे’ हे असेच घरंगळणारे यंत्र आहे, फसलेला बेत आहे. त्याला कुणीच वाचवू शकत नाही!

    *१/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    [अन्य लेखांसाठी पाहा www.vikramedke.com]

  • प्रपोगण्डाच्या वजनाने कोसळलेला पोकळ डोलारा : द मॅट्रिक्स रिझरेक्शन्स

    प्रपोगण्डाच्या वजनाने कोसळलेला पोकळ डोलारा : द मॅट्रिक्स रिझरेक्शन्स

    ‘रिझरेक्शन्स’च्या साधारण विसाव्या मिनिटाला स्मिथ (जोनाथन ग्रॉफ) थॉमस अँडरसनला (कियानू रीव्ह्ज़) सांगतो की, ‘आपली पॅरेंट कंपनी वॉर्नर ब्रदर्सने मूळ त्रयीचा पुढचा भाग बनवायचं ठरवलंय. आपण तयार झालो तर आपल्यासोबत नाही तर आपल्या शिवाय’! तो प्रत्यक्षातील वास्तव आणि सिनेमाच्या काल्पनिक अशा दोन्ही जगांमधील सत्यच त्या प्रसंगात सांगत असतो. सबंध चित्रपट असाच वास्तव आणि कल्पनेची सरमिसळ करत बनलाय. पण वाईट गोष्ट अशी की, त्या विसाव्या मिनिटापर्यंत सांगावं, लक्षात ठेवावं आणि आठवावं असं काहीच न घडल्यामुळे आपल्याला हा प्रसंग किती जरी स्वसंदर्भ असला तरीही अनाठायीच वाटत राहातो, अगदी पुढे वाढून ठेवलेल्या सबंध चित्रपटासारखाच. गंमत म्हणजे नियोदेखील पुढचा भाग बनवणं ही कल्पना फारशी चांगली नसल्याचं बोलून दाखवतो, त्यावेळी एक तर दिग्दर्शिका त्याच्या तोंडून चित्रपटाची निष्फळता तरी सांगत असते अथवा निर्माते उर्मट वल्गना तरी करत असतात!

    मी चित्रपटविषयक लेखन जरी गेली दहा-बारा वर्षे करत असलो तरी माझं चित्रपटसाक्षर होण्याच्या वाटेवरचं सगळ्यांत पहिलं पाऊल म्हणजे ‘द मॅट्रिक्स’ (१९९९). कळण्या-नकळण्याच्या सीमारेषेवरील वयात मी हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला आणि चित्रपट या विषयाकडे पाहाण्याची माझी दृष्टीच बदलून गेली! पुढे जसजसं चित्रपट आणि त्यातून चालवला जात असलेला राजकीय प्रपोगण्डा हे विषय आकळू लागले, तसतसं ‘द मॅट्रिक्स’ने कशी कथा व त्यातील छुपा डावा प्रपोगण्डा यांची सुरेख वीण विणली आहे हे समजत गेलं व त्यातील राजकीय विचार किती जरी निरर्थक असले तरीही चित्रपटाबद्दलचा माझा आदर वाढतच गेला. कित्येकांना त्या त्रयीतील पुढचे दोन्हीही चित्रपट आवडत नाहीत. माझ्या मनात मात्र जगभरातील कोट्यवधी लोकांप्रमाणेच सबंध त्रयीबद्दल तिच्या गुणदोषांसकट एक हळवा कोपरा आहे. त्यामुळेच चौथा भाग म्हणा वा पुनश्च हरि: ॐ, मी ‘रिझरेक्शन्स’बद्दल मनापासून उत्सुक होतो.

    पण वीस-एक वर्षांपूर्वी परिस्थिती कशी होती ना की, चित्रपटांमध्ये प्रपोगण्डा जरी असला तरी तो उघड नसल्यामुळे त्याला चांगली कथा व चांगल्या मांडणीच्या संयतपणाखाली झाकणे भाग होते. आता मात्र जगभरच्या प्रपोगण्डावाल्यांची एकत्रित वैचारिक पातळीच खालावल्यामुळे संयतपणाला औषधापुरतीही जागा राहिलेली नाही. सगळंच भडक, बटबटीत, उथळ आणि म्हणूनच अल्पायुषी होऊन बसलंय. ते तरी काय करतील म्हणा! त्यांचा प्रेक्षकवर्गच जिथे एकाग्रतेचा अभाव असलेले स्नोफ्लेक मिलेनियल्स आहेत, तिथे प्रपोगण्डाचे सुद्धा उथळ, नि:सत्त्व जंकफूड होऊन बसणे साहजिकच आहे! मेरोविन्जियन (लॅम्बर्ट विल्सन) या अशा उथळ जगासाठी नियोला जो दोष देतो, तो सगळाच प्रसंग गमतीदार झालाय!

    तर सांगायचा मुद्दा असा की, आजकालच्या कोणत्याही प्रपोगण्डाछाप चित्रपटासारखाच ‘रिझरेक्शन’ भडक व उथळ झालाय. चित्रपटातील प्रसंग घडत असताना, ‘अरेच्चा हे तर सेम रिलोडेडसारखं/रिव्हॉल्युशन्ससारखं’ असं प्रेक्षकांना आश्चर्य वाटायला जागाच ठेवलेली नाहीये. उलट आपल्याला काही वाटण्याच्या आतच त्या त्या चित्रपटातील प्रसंग इंटरकट्समध्ये चिकटवण्याचेच प्रकार प्रत्येक ठिकाणी केले आहेत. सुरुवातीला स्मृतिरंजक (नॉस्टॅल्जिक) वाटणारी ही दृश्यं केव्हा डम्ब ओव्हर-एक्स्पोझिशन वाटू लागतात, दिग्दर्शिकेला व संपादकाला कळलेलंही दिसत नाही. आणि दिलेली दृश्य-स्पष्टीकरणेसुद्धा मिलेनियल्सना कळणार नाहीत ही खात्री असल्यामुळेच की काय, पण त्यांनी आपला प्रत्येक मुद्दा संवादांतूनदेखील स्पष्ट सांगितलाय. पटकथालेखनाचा एक नियम आहे, ‘शो, डोण्ट टेल’! पण कथेप्रमाणेच या नियमालाही ‘मॅट्रिक्स’कारांनी रॅबिट होलमध्ये फेकून दिलंय!

    चित्रपटाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कृत्रिम भावनिकता! चित्रपटात तीन-चार तरी प्रसंग असे आहेत की, पडद्यावरील पात्रे अतिशय भावूक झालेली असतात, पण आपल्याला प्रेक्षक म्हणून वाटत राहातं की, ‘च्यायला एवढं सेंटी होण्याइतकं तर काहीच घडलेलं नाहीये’! याचं कारण म्हणजे लेखन व मांडणीतील अनाठायी घाई. मॉर्फियसचं (याह्या अब्दुल मतिन – २) पात्र मध्येच कॉमिक रिलिफपासून ते उगाचच चिडखोर असण्यापर्यंत का हेलकावे खातं, एक पात्र निळी गोळी निवडलेली असूनही कसल्याही कारणाशिवाय लाल गोळी का निवडतं, म्हातारी नायोबी (जेडा पिंकेट स्मिथ) मेलेल्या मॉर्फियसबद्दल इतकी खऊट का बोलते, सतीला (प्रियांका चोप्रा) इतकी क्लिषेड् बॅकस्टोरी का दिली, प्रियांका चोप्राने सगळे मिळून दोन-चार मिनिटांच्या भूमिकेत काय दिवे लावले, स्मिथला शेवटी नेमकं काय हवं आहे, अंगावर कोसळणारे निर्बुद्ध डिजिटल झॉम्बीज बॉम्ब कोणत्या अँगलने वाटतात, यांपैकी कशाचेही; अगदी एकाही प्रश्नाचे उत्तर चित्रपट देत नाही. कशालाच काहीही लॉजिक नाही, काही अर्थ नाही. किंबहूना चित्रपटालाच काही अर्थ नाही.

    अजून एक गोष्ट म्हणजे चित्रपट लिबरल असल्यामुळे हिंसेसारख्या गोष्टींच्या बहुतेक विरोधात आहे. त्यामुळे झालंय काय की, चित्रपटात ॲक्शन शब्दशः चिमुटभर आहे. आणि जी आहे ती सुद्धा अतिशय पाणचट आहे. म्हणजे काही काही प्रसंगांमध्ये तर आपल्याला दिसत असतं की मारामारी करणाऱ्या पात्रांचे हातपाय एकमेकांपासून चांगले फुट-फुटभर लांबून जातायत आणि तरीही पात्रे फटका बसल्यासारखं करतायत. इतकी ढिली ॲक्शन बी-ग्रेडच्या चित्रपटांमध्येही नसते आजकाल. काही काही प्रसंगी तीच ॲक्शन चांगली झाली आहे, पण ते सगळे प्रसंग त्यांनी आधीच ट्रेलरमध्ये दाखवून टाकले आहेत! चित्रपटात नवी वाटलेली एकमेव गोष्ट म्हणजे बुलेट टाईम आणि देज्या-वूचं एकत्रिकरण करण्याची संकल्पना! आणि आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे हॉलिवूडच्या सिनेमांसाठी अप्रत्यक्षरीत्या सक्तीचे असलेले इन्क्लुझिव्हिटीचे सगळे रकाने टिक करणारे वोक गेम डेव्हलपर्स एकत्र बसून सगळ्या जगाची व पर्यायाने चित्रपटाचीही खिल्ली उडवतात, ते प्रसंग. या मंडळींचा पोस्ट-क्रेडिट सीन तर खतरनाक जमून आलाय!

    कियानू रीव्ह्ज़ अभिनेता म्हणून भारीच आहे, हे काही नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. त्याने अतिशय जबरदस्त काम केले आहे. कॅरी-ॲन मॉसनेही तितकेच चांगले काम केले आहे. सबंध चित्रपट हा एक प्रकारे त्या दोघांची प्रेमकथाच आहे. पण त्यातही तिच्या पात्राला अक्षरशः एक्स्टेंडेड कॅमिओ वाटावा एवढा कमी स्क्रिनटाईम दिला आहे, का कोण जाणे! जेसिका हेनविकने ओव्हरॲक्टिंग केली आहे. याह्या अब्दुल मतिननेही वाईट काम केलं आहे, पण त्यात त्याचा दोष कमी आणि वाईट लेखनाचा दोष जास्त आहे. जोनाथन ग्रॉफ हा स्मिथच्या भूमिकेत ह्यूगो व्हिव्हींगच्या जवळपाससुद्धा जात नाही. खरं कमाल काम केलंय ते नील पॅट्रिक हॅरीसने ॲनालायझरच्या भूमिकेत!

    गेल्या काही काळापासून हा नियमच होऊ लागलाय की, डाव्या प्रपोगण्डाने भरलेले चित्रपट एकापाठोपाठ एक वाईट निघताहेत व फ्लॉप होताहेत. किंबहूना एक म्हण तर प्रचलितच आहे की, ‘गो वोक, गो ब्रोक’! अर्थात, याला अपवाद निश्चितपणे असतीलच. ‘रिझरेक्शन्स’ हिट होईल की फ्लॉप हे मी नाही सांगू शकत. पण तो अति स्पष्टीकरणे देणारा, भावशून्य, रटाळ, संथ, मनोरंजनाचा अभाव असलेला, आधीच्या चित्रपटांच्या पुण्याईवर पैसा कमवू पाहाणारा, प्रेक्षकांच्या लाडक्या पात्रांचा चुथडा करून टाकणारा, ‘रिव्हॉल्युशन्स’ बरा होता असं म्हणण्याची पाळी आणणारा अतिशय सुमार चित्रपट आहे. मूळ युनिव्हर्समध्ये काडीचंही योगदान न देणारा हा चित्रपट ‘निर्मात्यांसाठी पैसा कमवण्याचं एक साधन’ हे कारण वगळता सर्वार्थाने अनावश्यक होता. तरीही त्यांच्या कथेपेक्षा प्रपोगण्डाचं वजन जास्त झालं नसतं तर हा पोकळ डोलारा कदाचित इतका वाईट कोसळला नसता!

    *१.५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    [अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

  • नज़्म के अन्दर

    नज़्म के अन्दर

    नज़्म खोल के देखी है कभी?
    मिसरें छील के देखें है?
    होता है अन्दर इक दिल जावेदाँ
    न सुनो तो डेड होता है, ठिठका सा
    और सुनो तो झट से पकड लेता है उँगली
    ले चलता है रूह की कफ़सके पार
    कभी उस दिलके सँकरें रास्तें गुज़रोगे
    तो अमुमन कुरेदें जाएँगे कुछ सटें-सटेंसे लम्हें
    कुछ बहती यादें अटकी होंगी
    कुछ भुलावे के बाईपास दिखेंगे
    कम ही गुज़रना उनसे,
    अटकाव पे ज़ोर लगा देना
    तब शोर करेगा वह दिल
    रास्तें खुल जाएँगे
    इक पुल सा बन जाएगा तुम तक
    मंज़िलें वहीं मिलेंगी!

    — © विक्रम

  • Karna – As He Really Was

    Karna – As He Really Was

    Mahabharata is Itihasa. Traditionally, it’s a History, rather than imagination. And therefore, like in the real life all its characters are neither fully dark nor fully bright, but gray. Characters tilted towards the darker side are Kauravas and their allies. But even in those characters, the most vindictive was Karna. Yes, the very Karna who is presented as a hero by some writers of fictional fantasies and tv fanboys.

    Karna was not even a good warrior as his fans want to present. Allow me to give you an example. After finishing the studies, Dronacharya asked Kauravas and Pandavas to wage war on King Drupad. During the duel, the so called invincible Karna was severely wounded and fled the battlefield. He did the same after many years too while fighting with Brihannala, i.e. Arjuna while all the Kauravas tried to abduct the cows of King Virat. Karna abandoned his best friend Duryodhana and fled during the battle with Chitrarath Gandharva too. All this while his so called Kavacha and Kundala, i.e. body armor and earpieces were intact. It is mentioned that during the Mahabharata war, Karna even retreated while facing Bhima. And no, they weren’t fighting with a Gada, i.e. a Mace, Bhima’s weapon of choice, it was a battle in Archery!

    In the Lakshagruha arson conspiracy, Karna was an active conspirator with Duryodhana. After the Lakshagruha and the Swayamvar, when Dhritarashtra was of the mind of separating the Kingdom between Kauravas and Pandavas, it was Karna who advised against it. Remember, Pandavas were the rightful heirs and Kauravas were but the trustees who became greedy. It is said that Karna was insulted during the Swayamvar. But the truth was that he tried to compete despite being clearly aware of the rules.

    Karna always lusted after Draupadi. During the Dyuta, i.e. the game of dice, when Dusshasan dragged Draupadi in the hall, Karna cheered and congratulated Dusshasana. He was the one who called the queen Draupadi a whore and argued that whether she wears clothes or not is immaterial. So stripping her off was Karna’s idea. He even called for her enslavement. Undoubtedly, Duryodhana was the head of the conspiracy. But lest we forget to assess Karna’s active role too. Remember, all this happened to that woman while she was menstruating.

    Karna was a very charitable person. But his charity too wasn’t absolute. In Mahabharata he takes an oath, that until I kill Arjuna, no needy person will leave from my door without an appropriate donation. It simply means that his intentions behind the charity were not pure, but were dependent on the event of him Killing Arjuna. In other words, Karna knew that he was a sinful man and wanted to gather Punya, i.e. good virtues before facing Arjuna.

    Duryodhana was a villain. He openly expressed his envy towards Pandavas many times. But he was a villain that everyone could see. Karna was more dangerous than Duryodhana because he concealed his villainy well behind the veil of a good image. He was unpredictable to common minds. He played victim card whenever it suited him. Duryodhana called Karna his friend, but Karna manipulated him several times for his desires, made sure that Duryodhana’s envy towards Pandavas will keep on burning. And when the time came for the supreme sacrifice, he shirked away. In fact, Bhishma while openly criticizing Duryodhana served his purpose better than the so called best friend. Yes, Karna was killed while not wielding a weapon and that was wrong, but then what lives wrongfully ends wrongfully too. That is why even Karna couldn’t counter Krishna when he recounted all the past sins of the latter.

    Karna was deprived of status, wealth everything from childhood. But then, even Krishna faced exactly the same fate. One was emerged as the greatest philosopher of all time and other a sociopath. Karna was taken under Duryodhana’s wings at the early stages of life, while Krishna was a self-made man who survived many attempts on his life since very childhood. Krishna’s approach was positive even in poverty while Karna’s was negative even in abundance. Mahabharata is history. But it is a study in psychology too. Read original scriptures written by Vyasa who, let me add, was a contemporary of the times, and you will see a picture completely different than tv shows and novels.

    — © Vikram Edke
    [Visit: www.vikramedke.com]

  • अंदमानातील मित्रमेळा

    स्वा. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वातील शतावधी पैलूंपैकी एकच कोणता तरी सहज, सुगम पैलू निवडायला सांगितला, तर मी क्षणभराचाही विचार न करता उत्तर देईन की, सावरकरांचे व्यक्तिमत्त्व चुंबकासारखे होते! चुंबकाकडे जसे लोहकण आपसूकच आकर्षित होतात, तसे लोक सावरकरांच्या भोवती गोळा होत. म्हणजे अगदी लहानपणीदेखील तात्यांच्या भोवती परशुराम शिंपी, राजाराम शिंपी, पुढे देशभक्त म्हणून ख्याती प्राप्त केलेले गोपाळराव देसाई, वामनराव धोपावकर, भिकू वंजारी, त्र्यंबकराव वर्तक, वामनशास्त्री दातार वगैरे मित्रपरिवाराचा गराडा असायचा (स्वा. सावरकर चरित्र, लेखक शि. ल. करंदीकर, आ. २०११, पृ. ५४). मित्रमेळा तथा अभिनव भारताचे अगदी सुरुवातीचे सदस्य असलेले त्रिंबकराव म्हसकर आणि रावजी कृष्ण पागे हे मूळचे बाबारावांचे मित्र, परंतु ते देखील तात्यारावांच्या प्रभावाखाली आल्याशिवाय राहिले नाहीत (तत्रोक्त, पृ. ७१). सावरकर लहानपणापासूनच जातिगत भेदभावाच्या विरोधात होते, त्यामुळेच पुढे नाशिकला, तिथून पुण्याला आणि त्यानंतर लंडनला गेल्यावर हा मित्रपरिवार विस्तारतच गेला.

    तीच गोष्ट अंदमानची! लक्षात घ्या, सावरकर बॅरिस्टर होते. अंदमानात येण्याआधीच ‘इंडिया हाऊस’ आणि मार्सेतील समुद्रसाहसाच्या निमित्ताने त्रिखंड गाजवलेले होते. त्यांना अंदमानातील जमादार वगैरे तर सोडाच पण बारीही वचकून असे. साहजिकच सावरकरांना अर्थात ‘बडे बाबूं’ना बंदीवानांमध्ये विशेष मान होता. या योगे आणि सावरकरांच्या मूळच्याच चुंबकीय स्वभावामुळे बंदीगृहाच्या निर्बंधातही त्यांच्याकडे राजकीय व सामान्य बंदीच नव्हे तर अगदी वॉर्डरदेखील खेचले जात. सावरकरांचा कोठडीतील पहिलाच आठवडा होता, तेव्हाची गोष्ट आहे (माझी जन्मठेप, परचुरे प्रकाशन मंदिर, आ. २००७, पृ. ७८-७९). एके दिवशी एका वॉर्डरने सावरकरांच्या कोठडीतील गजांमधून एक दगड फेकला. निरखून पाहिले तर त्यासोबत एक चिठ्ठी होती. ती फेकताना नेमके एका पठाण वॉर्डरने पाहिले. त्याने आरडाओरडा केला. झडती सुरू झाली तशी सावरकरांनी ती चिठ्ठी अंगावरच बेमालूमपणे लपवली. सारे शांत झाल्यावर सावरकरांनी ती चिठ्ठी वाचली. काय होतं त्या चिठ्ठीत? तर त्यात अंदमानची परिस्थिती कथन केली होती. कोण कसं आहे, कुणावर विश्वास टाकावा वा टाकू नये वगैरे. मला सांगा, काय गरज होती त्या वॉर्डरला स्वतःची नोकरीच नव्हे तर अक्षरशः जीव धोक्यात घालून एका पन्नास वर्षांची शिक्षा झालेल्या सत्तावीस वर्षांच्या तरुणासाठी हे करायची? इंग्रजीत एक म्हण आहे, ‘Respect is commanded, not demanded’. त्या म्हणीचं चपखल उदाहरण, म्हणजेच ही घटना!

    अंदमानात अनेक प्रकारचे बंदी होते. काही चोर होते, काही दरोडेखोर, लुटारू, खुनी, बलात्कारीदेखील होते. पण या नृशंस मंडळींपेक्षा सर्वस्वी भिन्न होते ते क्रांतिकारक! सावरकरांच्याच शब्दांत सांगायचं झालं (तत्रोक्त, पृ. ८७, ८८) तर त्यांच्यातही ‘बॉम्बगोळेवाले’ आणि ‘जीभवाले’ असे दोन प्रमुख प्रकार होते. स्वतः सावरकरांना अंदमानात ‘डी’ अर्थात ‘डेंजरस’ लिहिलेला बिल्ला दिला होता. या ‘डी’वाल्या मंडळींना बारी आणि त्याचे वॉर्डर्स विशेष जाच करत असत. त्यातही सावरकरांवर तर आणखीनच अवकृपा केली जात असे. कधी अंदमानला गेलात तर सावरकरांची कोठडी अवश्य पाहा, त्याच्या पुढे बसण्यापुरतीच एक विशेष जागा केलेली आहे. विशेष यासाठी की, तिथे थांबल्यास नजरेत एकच गोष्ट भरते ती म्हणजे अंदमानातील फाशीगृह! सावरकरांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी बारीने केलेला हा प्रकार अंगावर अक्षरशः शहारा आणतो. पण त्याही परिस्थितीत सावरकरांची अंतर्दृष्टी कशी तीक्ष्ण होती पाहा. एके दिवशी सावरकरांच्या समोरच बारी राजबंदीवानांस “इन की ×× फाड डालनी पडेगी” असे अश्लील बोलला (तत्रोक्त, पृ. १०८). तो निघून गेल्यावर सावरकरांनी त्या तरुणांना त्यांची नावे विचारली. त्यांची म्लानवदने पाहून सावरकर त्यांना म्हणाले, “एक दिवस क्वचित येईल की अंदमानच्या याच कारागारात राजबंदीवानांचे पुतळे उभारले जातील”! सावरकरांचे हे शब्द अक्षरशः सत्य ठरले. आज सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारकाच्या उद्यानात विविध क्रांतिकारकांचे पूर्णाकृती पुतळे डौलाने उभे आहेत! सावरकरांना राजकीय बंदी असूनही मुद्दामहूनच सापत्न वागणूक दिली जाई, कोलूला जुंपले जाई. कोलू म्हणजे घाण्याला जुंपून काढण्याची शिक्षा. रोजचं पौंडांचं उद्दिष्ट गाठताना मी-मी म्हणणाऱ्या धटिंगणांसही नाकीनऊ येत असत, तिथे या फॉरेन-रिटर्न्ड बॅरीस्टरला त्रास न झाल्यासच नवल. अशा वेळी याच उपरोक्त राजबंद्यांपैकी काही जण येऊन गुपचूप सावरकरांना मदत करून जात. कित्येकांनी तर सावरकरांना कधी जेवणाची थाळीच घासू दिली नाही, ते परस्परच स्वच्छ करून टाकत. काही जण तर सावरकर नको नको म्हणत असतानाही त्यांचे कपडे धुवून टाकत. परतफेड म्हणून सावरकर कधीतरी गुपचूप त्यांचे कपडे धूत, तेव्हा त्या मंडळींच्या मनाला कोण वाईट वाटत असे! कारागृहाच्या वाळवंटातील अशा माणूसकीच्या दुर्मिळ झऱ्यांनीच सावरकरांची जिजीविषा अखेरपर्यंत ठाम राखली होती.

    अंदमान आज सुद्धा दुर्गम आहे. त्या काळात तर अजूनच दुर्गम असलेल्या अंदमानातील त्या सेल्युलर जेलमध्ये बारी एखाद्या हुकूमशहासारखा अंमल चालवित असे. बारीचे हस्तक येता-जाता सहज म्हणून शिव्या देत असत. कारागृहातील त्या वेळच्या अमानुष शिक्षांचे आणि बेड्यांचे तर आज तेथील व्यवस्थापनानेच प्रदर्शन भरवले आहे, ते पाहून आजही थरकाप होतो. छिलका कुटणे, कोलू फिरवणे, जंगलकटाई वगैरे गुरांसारखी कामे करणाऱ्या बंद्यांना जेवणात काय मिळत असे? सावरकरांच्याच शब्दांत सांगायचं झालं (तत्रोक्त, १६४) तर, ‘दुर्लक्षितपणे, घामटपणे, निष्काळजीपणे शिजवलेले आणि आरोग्यास हानिकारक’ असे हे अन्न असे. उदाहरणच द्यायचं झालं तर, बंद्यांना जी कांजी मिळे, त्यात अनेकदा घासलेट पडलेले असे. भाजीत गोम, साप तर प्रत्यही निघत. आपल्या तुलनेत अंदमान विषुववृत्ताच्या जवळ आहे. त्यामुळे तिथे पावसाळाही तसाच. बरेचदा त्याच पावसात उभे राहून भिजलेल्या पोळ्या, ओला भात खावा लागे. बरेचदा या जेवणातूनही गुलाम रसूल, मिर्ज़ाखान वगैरे पठाण जमादारांना वाटा द्यावा लागे, असे बारींद्रकुमार घोष यांनी लिहून ठेवले आहे (राजनैतिक कारस्थान, खंड २, पृ. १६०). शौचास अथवा मूत्रविसर्जनासाठी जाण्यापासूनही कैद्यांना रोखण्याचा पशूहूनही नीचतम प्रकार बारीच्या आशीर्वादाने जमादार करत असत. एकदा तत्कालीन गृहमंत्र्यांचा दौरा सुरू असताना नंदगोपाल नावाच्या एका पंजाबी राजबंद्यांनी हे गाऱ्हाणे मांडले. बारीने अर्थातच सारे काही मुळापासून नाकारले. त्यावर नंदगोपाल उसळून म्हणाले, “या बंदीगृहातील खोल्यांत तुम्ही एकदा प्रत्यक्ष हिंडा आणि तेथील भिंतींच्या कोपऱ्यांचा वास घ्या. तुमचे नाकच आमचे साक्षीदार” (माझी जन्मठेप, पृ. ९९).

    हे सारे बाहेर कुणाला कळवायची सोय होती का? तर ते ही नाही. अंदमानातून बंद पाकिट पाठवताच येत नसे. जे काही टपाल जाई ते उघडेच, अर्थात अधिकाऱ्यांनी व्यवस्थित वाचल्यावरच. असेच एक गृहस्थ होते, होतीलाल. संयुक्त प्रांतातून राजद्रोहाच्या आरोपाखाली दहा वर्षांसाठी आलेले. शुद्ध हिंदी बोलणारे व ऊर्दू आणि इंग्रजीतही प्रवीण. बारा गावचेच नव्हे तर रशिया, चीन, जपान इ. बारा देशांचे पाणी प्यायलेले. हे होतीलाल म्हणजेच श्री. होतीलाल वर्मा असल्याचे काही ऑनलाईन ब्लॉग्सवर (zillion2dinnings इ.) दिसते तर अंदमान आणि निकोबार पर्यटनाच्या अधिकृत संकेतस्थळावरही तसा उल्लेख आढळतो. त्यांनी हिकमत केली. पहारेकऱ्यांची नजर चुकवत चुकवत त्यांनी कसेबसे एक पत्र लिहून काढले. बाहेरकामास बंदीवान जात असत त्या धांदलीत त्यांनी ते एकाच्या हाती बाहेर धाडले. त्याने ते झडतीपासून मुक्त अशा एका सरकारी विश्वासास पात्र प्रवाशाकडे सोपवले. त्या पत्राचे पुढे काय झाले, ते भारतात पोहोचले की तत्पूर्वीच त्या प्रवाशाने समुद्रात फेकून दिले वगैरे बंद्यांना समजावयास काहीच मार्ग नाही. आणि एके दिवशी बारीचा भडका उडाला! त्यावरून समजले की, ते पत्र भारतात सुरेंद्रनाथ बॅनर्जींपर्यंत पोहोचले होते. त्यांनीही मोठेच धैर्य दाखवत ते आपल्या ‘द बंगाली’मध्ये (२७ एप्रिल १९१२) छापले होते. एवढेच नव्हे तर त्यावर एक स्फुटदेखील लिहिले होते. त्यावरून मोठ्ठा गदारोळ झाला होता. एकदा तर पंजाबमधील कुणा थोर पुरुषाच्या क्रांतिकारक पुत्राने (सावरकरांनी गोपनीयतेच्या कारणास्तव नावे दिलेली नाहीत) पंजाबमधील तुरुंगातून एक बंदी अंदमानात पाठवला जात असताना त्याच्या बिल्ल्यावर सावरकरांसाठी पत्र लिहून पाठवले (माझी जन्मठेप, पृ. १४४). त्या बंद्याची सर्वत्र कपडे काढून झडती झाली, पण गळ्यातला बिल्ला पाहावयाचे कुणासही सुचले नाही!

    पण अशा कुरघोड्या विरळ आणि कारागृहातील जाच मात्र शाश्वत होता. इंदुभूषण रॉय नावाचे एक तरुण क्रांतिकारक होते. त्यांना माणिकतोळा खटल्यात दहा वर्षांसाठी काळे पाण्याची शिक्षा झाली होती. सामान्यतः बंद्यांना जेव्हा तुरुंगाबाहेरची कामे देत, तेव्हा ती तुलनेने आरामदायक असत. त्यातही कुणी बंदी आजारी पडलाच तर त्याला बाहेरच्या, तुलनेने चांगल्या इस्पितळात धाडले जाई. पण राजबंद्यांना ही सुविधा उपलब्ध होती का? सावरकर लिहितात, ‘राजबंदीवान आजारी पडला तर त्यास त्या आजारी होण्याचाही एखाद्या अपराधासारखा दंड द्यावा लागे. कारण त्यास लगेच तापात वा रेच होत असता आपले अंथरुण डोक्यावर घेऊन, आपली थाळी हातात घेऊन दोन-चार-पाच मैल चालत परत त्या सेल्युलर तुरुंगाचे भीषण दार पाहावे लागे आणि आत येताच कोठडीबंद होऊन पडावे लागे’ (तत्रोक्त, पृ. १७६). या छळाला इंदुभूषण कंटाळले. त्यांनी काम नाकारले. दंडाबेडी पत्करली, पण हे काम नको असा पवित्रा घेतला. ‘नॉस्टॅल्जिया कोलकाता’ (https://nostalgiakolkata.blogspot.com/2016/07/indu-bhusan-roy.html?m=1) ब्लॉगचे लेखक लिहितात, ‘He had been suffering from blisters caused by the juice of the rambash so much that it was even difficult for him to move his fingers freely. It became so painful that he could not get a wink of sleep during the whole night. The pain and the raw sores in his hands prevented him from eating with his hand. The touch of ‘dal’ caused him so much pain that tears would roll down from his cheeks and the food could not be touched at all. He pleaded that if the same state of affairs were allowed to continue, he would die of starvation’. त्यांनी बारीला सोपे काम मागितल्यावर बारीने काय केले? बारीने इंदुभूषण यांना कोलू फिरवायला सांगितला! केवढं हे क्रौर्य.

    सावरकरांनी इंदुभूषणना धीर दिला की, ‘तुला तर दहाच वर्षे शिक्षा आहे. मला तर जन्मठेप! तेव्हा माझ्याकडे पाहून स्वतःला धीर दे. स्वदेशासाठी स्वार्थ, प्राण यांचा त्याग करणे हे जसे कर्तव्य तसेच बंधो, मनाचाही त्याग करणे कर्तव्यच आहे. तू अजून पंचविशीचे आतबाहेर माझ्यासारखाच आहेस. आणि माझ्याहून तुला सुटण्याची आशा पुष्कळ आहे. तर धीर धर. सध्या कष्ट सोसून जग की पुढे सुटताच पुन: देशमातेची सेवा करता यावी’ (माझी जन्मठेप, पृ. १७७). त्यानंतर दोन-चारच दिवस उलटले असतील. एके दिवशी सकाळी कोठड्या उघडण्याच्या वेळी एक वॉर्डर गुपचूपपणे सावरकरांपाशी आल व म्हणाला, ‘मी सांगितले म्हणून कुणास सांगू नका, पण इंदुभूषण काल फाशी खाऊन मेला’! दिनांक होता २९ एप्रिल १९१२ आणि इंदुभूषण यांचे वय होते अवघे बावीस वर्षांचे. बारीने सारे प्रकरण ‘इंदू वेड लागून मेला’ म्हणून दाबून टाकले. सावरकरांनी स्वतः व इतरांकरवी इंदुभूषणवरील अत्याचार सर्वांसमोर आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण व्यर्थ!

    असेच दुसरे क्रांतिकारक होते उल्लासकर दत्त (माझी जन्मठेप, पृ. १८०-१८७). त्यांनी लिहिलेली ‘द्वीपांतरेर कथा’ आणि ‘आमार काराजीबन’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचाही अंदमानात अतोनात छळ करण्यात आला. घाण्याला जुंपलेले बैल जिथे दिवसभरात १६ पौंड तेल काढतात, तिथे अंदमानात तीन माणसांना घाण्याला जुंपून ८० पौंड तेल काढावे लागत असे. तेही रेंगाळत नाही, तर दिवसभर पळत. एखादा जरासा रेंगाळला, तर दांडक्याने मारहाण होत असे. तरीही काम केले नाहीच तर त्याला घाण्याला बांधून इतरांना पळायला सांगत, म्हणजे हा फरपटत जाई, त्याचे डोके, तोंड आपटून फुटे. इतरांना सहा महिन्यांनंतर बाहेरचे काम देण्यात येई. पण इंग्रजांच्या दृष्टीने जहाल असलेल्यांना मात्र वर्षानुवर्षे आतच ठेवत. अखेर खूप वाट पाहिल्यानंतर उल्लासकरांना बाहेरचे काम देण्यात आले ते वीटांचे. ओल्या वीटा ने-आण करण्याचे काम बंद्यांनी करावे यासाठी त्यांना दुधाची लालूच देण्यात येई. पण त्या दुधावरही पेटी ऑफिसरचा डोळा असे. उल्लासकर आपले दूध त्याला देत नसत म्हणून रागाने त्यांची बदली बिनदुधाच्या कामावर केली गेली, ते काम म्हणजे उंच टेकडीवर असलेल्या साहेबाच्या बंगल्यावर कावडीने पाणी पोहोचवणे. जीव कासावीस व्हायचा. प्राण कंठाशी यायचे. शेवटी थकून जाऊन त्यांनी ते काम नाकारले. पण इंग्रजांना त्याचे ना सोयर ना सुतक. त्यांनी उल्लासकर दत्तांवर खटला भरला व त्यांना तुरुंगात नेऊन टाकले. तशा त्या मरणासन्न अवस्थेत उल्लासकर दत्तांना भास होऊ लागले की, बारी आपल्याला द्वंद्वयुद्ध खेळायला बोलावतो आहे व आपल्या बाजूने सावरकर लढताहेत. अखेरीस सावरकरांचा विजय होतो. उल्लासकर दत्तांना विलक्षण आनंद होतो, पण तेवढ्यात तो सारा देखावाच वितळून गेला. टळटळीत दुपारचे ऊन होते आणि उल्लासकर दत्तांच्या अंगात १०७ ताप होता! या मरणप्राय यातनांनी अखेर त्यांना उन्माद आला. तर उपचार म्हणून त्यांना वीजेचे झटके दिले गेले. तीन दिवस आणि तीन रात्र बेशुद्ध होते ते! काय अवस्था झाली असेल, फक्त एकदा विचार करून पाहा. त्यांनी फाशी घ्यायचाही प्रयत्न केला, पण नियतीला त्या क्षणी ते देखील सुख मिळू द्यायचे नव्हते त्यांना. अखेर एका पर्यवेक्षकाला त्यांची दया आली व त्याने त्यांना वेड्यांच्या इस्पितळात धाडले. दुष्ट बारी मात्र अखेरपर्यंत हेच म्हणत राहिला की, उल्लासकर ढोंग करतोय.

    नानी गोपाळांना तर त्यांच्या असहकाराची शिक्षा म्हणून वेत मारण्याची शिक्षा दिली गेली. अशा निर्घृण शिक्षेची जबाबदारी तर अधिकाऱ्यांसही घेववेना. नानी गोपाळांनी अन्नत्याग केला, कुणाचेच ऐकेनात. हद्द पाहा, त्यांना नाकातून नळी टाकून दूध पाजण्यात आले. नाकातून! अखेरीस जेव्हा सावरकर त्यांना म्हणाले की, मी देखील अन्नत्याग करेन, तेव्हा त्या धाकाने त्यांनी अन्न ग्रहण केले. स्वतः सावरकरांचे मोठे बंधू बाबारावदेखील अंदमानातच होते. तरी जवळजवळ वर्षभर दोन सख्ख्या भावांना एकमेकांचे तोंडदेखील बघू दिले नव्हते इंग्रज सरकारने! अखेर या पाशवी अत्याचारांची परिणति कारागृहात संप होण्यामध्ये झाली. त्यातही पर्यवेक्षकांचे म्हणणे असे की, सावरकर संपाला उत्तेजन देतात. सावरकर ताडकन म्हणाले की, ‘इंदूस फाशी खाण्यास मी उत्तेजन दिले का? उल्लासकरास वेडे होण्यासही मीच शिकवले का? यातनाच संपास उत्तेजन देतात, मी नव्हे’. स्वतः सावरकरांनाही आत्महत्येचे विचार येऊन गेल्याचे त्यांनीच प्रांजळपणे लिहून ठेवलेय, पण प्रत्येक वेळी अतुल्य मनोबलाने त्यांनी त्या विचारांवर मात केली. १९१८ च्या सुमारास अखेर सावरकरांना अंदमानातील कष्ट व परिस्थिती सरकारी संमतीनेच कळवता आली. त्या पत्राच्या शेकडो प्रती करून नारायणराव सावरकरांनी त्या वर्षीच्या राष्ट्रीय सभेच्या सर्व प्रतिनिधींना वाटल्या. त्यातील उतारे इंग्रजी तसेच प्रादेशिक वृत्तपत्रांनीदेखील छापले. अमृतबझार पत्रिकेने तर आपल्या लेखाचा मथळाच ‘Outrageous treatment of a political prisoner’ (माझी जन्मठेप, पृ. ३४६) असा छापला होता.

    या ही परिस्थितीत सावरकरांनी अंदमानात प्रचार आणि प्रसार केलाय. सोशल नेटवर्किंग नावाचा प्रकार उदित व्हायच्या किमान शंभर वर्षे आधी त्यांनी संघटनेचं घट्ट जाळं अंदमानात बारीच्या नाकावर टिच्चून विणून दाखवलंय. त्यांनी कैद्यांना लिहा-वाचायला शिकवलं. कित्येकांना वरच्या नोकऱ्या मिळवून दिल्या. कित्येकांची शुद्धिकरणे केली. जातीभेद मोडला. काव्ये-महाकाव्ये प्रसवली. हे संघटनेचे जाळे केवढे घट्ट विणले होते? ऑगस्ट १९२० ला लोकमान्य गेले. ही बातमी समजताच (माझी जन्मठेप, पृ. ४२२-४२३) सावरकरांनी ठरवले की, श्रद्धांजली म्हणून सर्व अंदमानात त्या दिवशी उपवास पाळला जावा. तत्काळ त्यांनी कारागृहातील जवळच्या मंडळींना हे कळवले. त्यांनी पुढच्यांस, त्यांनी पुढच्यांस करता करता बातमी गावोगाव पसरली. आणि एकाच वेळी सबंध अंदमानातील बंद्यांनी जेवण नाकारले! लक्षात घ्या, सेल्युलर जेलची रचनाच अशी आहे की, जेलच्या एका बाहूला दुसऱ्या बाहूची फक्त पाठ दिसते. शेजार-शेजारच्या खोल्याही एकमेकींपासून लांब आहेत, त्यामुळे बोलण्याची सोयच नाही. त्यातही कुणी बोलताना आढळला तर शिक्षा ठरलेलीच. त्या पार्श्वभूमीवर हा केवढा मोठा चमत्कार आहे, विचार करा.

    सामान्य बंदीच नव्हे तर क्रांतिकारकदेखील सावरकरांकडे मार्गदर्शक म्हणून पाहात. इतकेच कशाला, महायुद्धाच्या काळात रशियन रणनौका त्या परिसरात आल्या असता त्यांचे कॅप्टनही सावरकरांना भेटून जात. एम्डेन या जर्मन युद्धनौकेची कथा तर प्रसिद्धच आहे. अखेर इंग्रजांनी सावरकर बंधूंना भारतात हलविण्याचे ठरवले. सावरकरांना पाहाण्यासाठी कारागृहाबाहेर लोकांची एकच गर्दी उसळली होती. कडेकोट बंदोबस्त होता. तो मोडून, शिक्षेची पर्वा न करता एक बंदीवान अचानक सावरकरांपाशी आला व त्याने एक साधीशीच परंतु भावनांनी ओथंबलेली चाफ्यांच्या फुलांची माळ सावरकरांच्या गळ्यात घातली. का केले असेल त्याने असे? किंबहूना का एवढा जीव लावला असेल सगळ्या बंद्यांनी सावरकरांना? अंदमान आजदेखील आपल्या मुख्यभूमीपासून सुमारे दिड हजार किलोमीटर लांब आहे. तेथे भलत्यांचीच संख्या वाढावी, त्यांचा वरचष्मा राहावा, यासाठी बारीच्या जमादारांनी काही एक कसर सोडली नव्हती. अंदमानचा पाकिस्तान झाला नाही, याचे श्रेय ज्या काही संघटनावादी मंडळींना जाते, त्यात सावरकरांचा वाटा सिंहाचा आहे! सावरकरांना भारतात जाऊन शिक्षाच भोगायची होती, मुक्तता होणार नव्हतीच त्यांची इतक्यात. पण सावरकर अंदमानातून परतले ते तेथेदेखील कर्तव्यपूर्ती केल्याच्या कृतार्थ भावनेने. यात अनेकानेक ज्ञात अज्ञात राजबंद्यांनी व सामान्य बंद्यांनीही त्यांची मदत केली. सावरकरांनी काहींची नावे दिली, काहींची नावे तत्कालीन परिस्थितीमुळे ‘माझी जन्मठेप’ छापून होईपर्यंतही नाही देऊ शकले. पण जरी इतिहासाच्या पानांवर काहीसा धूसर झालेला असला, तरीदेखील हा अंदमानातील मित्रमेळाच होता!

    — © विक्रम श्रीराम एडके

    (पूर्वप्रसिद्धी – ‘चैत्रपालवी सावरकर परिवार विशेषांक’ आणि ‘ग्राहकहित दिवाळी विशेषांक’)

    * लेखक स्वा. सावरकरांच्या जीवनकार्याचे अभ्यासक व आमंत्रणानुसार सर्वत्र फिरून व्याख्याने देणारे सुप्रसिद्ध वक्ते आहेत.

  • ठहरा ठहरा सा दौर है

    ठहरा ठहरा सा दौर है

    ठहरा ठहरा सा दौर है
    भागते रहते है लोग
    चकाचौंध रौशनी से ख़्वाब जलाए
    फोन की आड में मुँह छिपाए
    जाने किस से?
    अफ़साने उग रहे है आज-कल बस
    हक़ीकतों के कोंपले फूटते नहीं है
    फकत खबरें गढ़ी जाती है यहाँ
    और हम भी यकिन छेद के उँगली की नोंक पर
    स्क्रोल कर देते है हर वारदात को
    लाईक्स, शेअर और कमेंट्स का लहू
    रिसता रहता है छेदों से, और फिर
    मौत आती है हर रात, नीन्द नहीं आती
    क़तरा कर हँसते है हम क़तरा भर
    क़तरा भर बरसते है हम छितरा कर
    दो क़तरों में सिमटा हुआ हमारा
    ठहरा ठहरा सा दौर है

    — © विक्रम श्रीराम एडके