Category: Hindutva

  • After The Storm

    After The Storm

    “And if you must, then for performing this Yadnya, you shall offer me the Earth you just conquered”, Kashyapa’s voice was calm as the Maanasarovar.


    He looked at him with utmost respect. Sage Kashyapa was not a man who’d joke around. So he rose from the ground. Previously he’d risen, like a flame from the most pious pier. But that was the time when he had to fight Kaartaveerya Sahasrarjuna and his cronies. Though only a few days had been passed since then, it felt like ages. And those days saw the metamorphosis of Rama, the youngest child of Sage Jaamadagni and Sati Renuka into the most feared Parashurama, the wielder of the fiercest battle-axe. He withstood all the hardships of the war only because of the training Kashyapa gave to him. So when this time he rose, it was out of devotion, love and affection towards his Guru.

    He took some water from the Kamandalu in his hand and without thinking twice poured it into the feet of Kashyapa, who said,
    “People earn, people spend. And in between, they give up some portion. Sometimes out of fear, sometimes out of respect and sometimes simply as a duty. But rarely anyone gives up everything he just earned, only because his Guru asked him to. You are rarest even amongst those, for you had rightfully earned this Earth through Blood and Steel, and yet you didn’t even blink once when it comes to renounce it”.

    “Word of the Guru, is the word of Veda for me”, said Parashuram humbly.

    “Then you must do one more thing for me”, Kashyapa said with a smile.

    “Tell me, what it is and consider it done”.

    “Listen, before you promise”.

    “I give you my word and I’ll give my life to keep it”.

    “Very well then. Since, you have given up your claim on the Earth, you don’t have any right to dwell in it. Therefore, as the rightful owner of the planet, I banish you from my land”!

    ‘But where’d he go?’, ‘If the earth is owned by Kashyapa, where’d Rama live?’, whispered the thousand spectators. But not Parashurama. His voice was the same as it was before hearing this dreadful wish of his Guru, when he said,
    “As you please Gurudeva”.

    And the Emperor left with his hands empty and a heart filled with the satisfaction of fulfilling his duty.

    Kashyapa knew, if the order is to be restored on the Earth, it must be ruled by the Kings, not by a Sage who conquered it in the heat of passion. And this would happen only if the conquerer leaves. So he aimed for the greater good, with but a small sacrifice.

    Parashurama understood the true meaning of his Guru’s wish. But he has bigger problem to solve right now; finding a piece of Earth, that is not part of the existing Earth! His thoughts wandered around this question and so do his feet, until he reached to an impasse.

    Behind him was the earth, he was forbidden to dwell. In front of him was the vast ocean, which could have devoured anything and everything. Going back was not an option and going further was impossible. But impossible were the things he did conquer, from his very birth to single-handedly defeating the greatest Emperor of his time; all through his knowledge and might.

    He stood in front of the ocean. The ocean looked fierce with the army of infinite battle-ready tides. The scion of Bhrugus was never the one to run away from a good fight. He took out his bow and mounted an arrow on it. He then remembered his father, the most revered Sage Jamadagni. He remembered his mother, the Goddess Renuka herself. He remembered his Guru Kashyapa who trained him to defeat everything labeled ‘impossible’. And then he remembered God Shiva who opened the secrets of Dhanurveda in front of him. He bowed to his ancestors of Bhrugu clan who withstood each and every trouble life threw at them. And with the might that destroyed the Haihayas, he released it.

    The arrow sped to the sky and caught fire. Within a second it started to look like there are two Suns above, one that bestows the gift of life and another that would snatch it. The arrow crashed into the ocean with a huge explosion. And the ocean dried. It retreated back in a haste. And when the steam cleared, there was land. Land, that was never owned by anyone. Parashurama marched towards it.

    In his Aashrama, Sage Kashyapa took a moment from his busy day and simply smiled.

    — © Vikram Shriram Edke

  • दुभंगाचा अभंग – शॅडो अँड बोन

    दुभंगाचा अभंग – शॅडो अँड बोन

    राष्ट्रं कशामुळे दुभंगतात? युद्धामुळे! पंथवेडामुळे! राजकारणामुळे! राष्ट्रं अनेक कारणांनी दुभंगतात. पण या सगळ्या कारणांच्या मुळाशी असते ती एकच भावना, हाव! राष्ट्रं दुभंगतात ती कुणा एकाच्या हावरटपणापायी. भले वर्तमान त्या हावरट व्यक्तीला नायक म्हणो, पण इतिहास त्या व्यक्तीच्या कर्मांची बरोब्बर नोंद ठेवत असतो. अशीच हाव ‘राव्का’मधील एकाला सुटली. आणि तिचा परिणाम अखंड राव्का दुभंगण्यात झाला. पण हा दुभंग नुसता राजकीय व सामाजिक नाहीये. हा दुभंग आहे जादूचा, ज्याचा ती व्यक्ती ‘स्मॉल सायन्स’ असा उल्लेख करते. या उपविज्ञानातून निर्माण झाले ‘द फोल्ड’. राव्काला दुभंगणारी ही तमोमय भिंत अतिशय हिंस्र अशा व्होल्क्रांनी ग्रासलेली आहे. शतकानुशतके राव्का आपल्या उद्धारकर्त्या अवताराची, ‘द सन समनर’ची वाट पाहाते आहे. ती सूर्यावाहक व्यक्ती येते खरी, पण तिचे स्वरूप राव्काच्या अपेक्षेपेक्षा खूपच भिन्न आहे. ती सूर्यावाहक खरोखर फोल्डला नष्ट करते का, की त्यातून अजूनच वेगळे काहीतरी घडते याची अतिशय रोमहर्षक, पदोपदी राजकारणाचे पाश घट्ट विणणारी, जादूच्या विश्वात मानवता शोधणारी, वर्णद्वेषापासून ते लिंगभेदापर्यंत सगळ्यांवर भाष्य करणारी मालिका म्हणजे नेटफ्लिक्सची ‘शॅडो अँड बोन’!

    मालिका नेटफ्लिक्सची असल्यामुळे, संबंध असो वा नसो, उपरोक्त यादीतील शेवटचा मुद्दा त्यांना ओढूनताणून आणणे भागच आहे, हे चाणाक्ष वाचकांनी एव्हाना ओळखले असेलच. पण तेवढा एक मुद्दा वगळता मालिका आपल्या विषयापासून एका क्षणासाठीही हटत नाही, ही जमेची बाजू. नुकतेच मालिकेचे ८ भागांचे पहिलेच पर्व प्रकाशित झाले आहे, परंतु त्यांच्या कुणाही एका भागात जेवढ्या घटना घडतात, तेवढ्या सध्याच्या कोणत्याही मराठी मालिकेच्या १००० भागांत मिळूनही घडणार नाहीत. योग्य तिथे घटनाक्रम प्रचंड वेग धारण करतो व योग्य तिथे तोच वेग मंदावतो. या लेखक, दिग्दर्शक आणि संपादकांच्या अथक परिश्रमांतून व गगनगामी प्रतिभेतून साधलेल्या अतिशय नियंत्रित कथाप्रवाहामुळे मालिकेची रसनिष्पत्ती अनेक पटींनी वाढते. पात्रपरिपोषावर त्यांनी अतिशय सुरेख काम तर केले आहेच. परंतु लेखनातून जागोजागी अनेक लहानसहान प्रसंग अशा काही कौशल्याने पेरले आहेत की त्यांचा एकूण कथापटलावर मोठ्ठा परिणाम व्हावा.

    ‘शॅडो अँड बोन’ ही मालिका लाय बार्डुगो नामक लेखिकेच्या ग्रिशा-व्हर्समधील कादंबऱ्यांवर आधारित आहे. मालिकेचे पहिले पर्व हे ग्रिशाव्हर्समधील ‘शॅडो अँड बोन’ त्रयीतील त्याच नावाच्या पहिल्या कादंबरीवर व ‘सिक्स ऑफ क्रोज’ द्वयीमधील त्याच नावाच्या पहिल्या कादंबरीवर, अशा एकूण दोन कादंबऱ्यांवर आधारलेले आहे. मी यांपैकी एकही कादंबरी वाचलेली नाही. त्यामुळे अनुकूलन कितपत जमले यावर मी भाष्य करणार नाही. पण मालिका मात्र परिपूर्ण पक्वान्नासारखी चपखल जमून आलीये, एवढे खरे. विशेष म्हणजे ग्रिशाव्हर्समधील कादंबऱ्या व त्यांचे कथानक केव्हाच पूर्ण होऊन सिद्धीस गेले आहे. त्यामुळे ‘शॅडो अँड बोन’ मालिका जेव्हा केव्हा संपेल तेव्हा ती पूर्ण झालेली असेल. हे सुख मार्टिनव्हर्सच्या चाहत्यांच्या नशिबी अनेक दशकांनंतरही नाही. ही विधीची विडंबना म्हणायची की खूनी म्हातारा हा कासवापासून प्रेरणा घेतोय, हे ज्याचे त्याने ठरवावे.

    मालिका नेटफ्लिक्सची आणि त्यातही पाश्चात्य जगतातून आलेली असल्यामुळे, पॉलिटिकली करेक्ट राहाण्यासाठी बहुसांस्कृतिकतेच्या नावाखाली काहीतरी दाखवण्याचे त्यांच्यावर प्रचंड दडपण आहे. या मुद्याचा आपल्याशी संबंध असा की, मुख्य पात्रांपैकी झोया (सुजया दासगुप्ता) ही अभिनेत्री भारतीय व इनेज (अमिता सुमन) ही अभिनेत्री मूळची भोजपुरी भाषा बोलणारी नेपाळी आहे. बाकी मालिकेतील मुख्य पात्र अलिना साकारणारी अभिनेत्री जेसी मे-ली ही चीनी वंशाची आहे, माल साकारणारा आर्ची रेनॉ हा अँग्लो-इंडियन वंशातून आलेला आहे. ‘अ साँग ऑफ आईस अँड फायर’ मालिका जशी इंग्लंडचा काल्पनिक इतिहास सांगते, तशीच ही ग्रिशाव्हर्स मालिका व ‘शॅडो अँड बोन’ कथानकाच्या ओघात रशिया, मंगोलिया वगैरे देशांना स्पर्श करत असल्यामुळे मालिकेत दाखवलेली बहुसांस्कृतिकता अनाठायी वाटत नाही. अर्थात, काही अपवाद वगळता मालिकेतील बहुतांशी मंडळी ब्रिटिश इंग्लिश उच्चारांत का बोलतात, हा प्रश्न तरीही उरतोच. पण मला व्यक्तिश: ब्रिटिश उच्चार मनापासून आवडत असल्यामुळे, मी या त्रुटीकडे दुर्लक्ष करतो. संगीतात जसा अमुक गायक ‘रहमानचा माणूस’ म्हटलं की त्याच्या प्रतिभेबद्दल आपसूकच खात्री पटते, तसेच चित्रपट व मालिकांच्या माध्यमात अमुक माणूस ‘नोलनचा माणूस’ म्हटलं की त्याच्या अभिनयक्षमतेवर आपोआपच शिक्कामोर्तब होते. जोनाथन नोलनच्या ‘वेस्टवर्ल्ड’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या बेन बार्न्सने (जनरल किरिगन) या ही मालिकेत त्या लौकिकाला साजेसेच काम केले आहे. मला मात्र त्याच्या सोबतच फ्रेडी कार्टर (कॅझ), किट यंग (जेस्पर), डॅनिएले गॅलिगन (निना), डेझी हेड (जेन्या), कॅलाहन स्कोगमन (मॅथियस) अशा एकाहून एक सरस अभिनेत्यांचा इथे उल्लेख केल्यावाचून राहावतच नाहीये.

    हल्ली बहुतेक मालिकांची पहिली पर्वे ही कथा सांगण्यासाठी कमी आणि दुसऱ्या पर्वाची तयारी करण्यातच अधिक खर्ची पडतात. त्यामुळे त्यांचं सगळंच अर्धवट वाटत राहातं. ‘शॅडो अँड बोन’ पहिल्या पर्वाच्या अखेरच्या भागात दुसऱ्या पर्वाची बीजे तर पेरतेच, पण तत्पूर्वी अतिशय तृप्त करून सोडणारा, समाधानकारक असा फिनाले-सुद्धा देते. हीच एक नव्हे तर मालिकेतील इतरही अनेक बाबी या साचा भेदणाऱ्या आहेत. खऱ्या अर्थाने ‘शॅडो अँड बोन’ हा दुभंगाचा अभंग आहे! प्रचंड पैसा गाठिशी असूनही ‘द विचर’सारखा एखाद-दुसरा अपवाद वगळता नेटफ्लिक्स गेल्या अनेक वर्षांपासून निष्कलंक यशासाठी चाचपडते आहे. ही मालिका खात्रीने ती कोंडी फोडू शकते. नीट प्रमोट केल्यास ही मालिका म्हणजे नेटफ्लिक्सची अग्रणी, त्यांचा फ्लॅगशिप-शो होऊ शकते. तितकी ताकद या कथेत आणि त्याच्या मांडणीत पहिल्या पर्वामध्ये तरी निश्चितपणे आहेच आहे!!

    *४.७५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • उजळून ये.. उजळून ये..

    उजळून ये.. उजळून ये..

    स्त्री म्हटलं की माझ्या डोळ्यांसमोर आगीची विविध रुपे येतात. कधी देवघरात तेवणारं निरांजन, कधी साक्षात वडवानल, समयीसारखी शांत तर कधी सूर्यासम दाहक. कधी चुलीवरची आच, कधी मायेची ऊब, कधी टळटळीत दुपारची प्रखरता तर कधी पहाटेची हलकी शीतलता.

    मुण्डकोपनिषदाचा अभ्यास करताना वाचलं होतं की, अग्निच्या सात जिह्वा असतात. काळावर सत्ता चालवणारी ‘काली’, विक्राळ ‘कराली’, मनाच्या गतिची ‘मनोजवा’, इन्फ्रारेड म्हणता येईल अशी ‘सुलोहिता’, अल्ट्राव्हायलेट वर्णन करता येईल अशी ‘सुधूम्रवर्णा’, ठिणगीसारखी ‘स्फुल्लिंगिनी’ आणि समस्त विश्वालाच आवडीने गिळंकृत करणारी ‘विश्वरुची’, या सातही अग्निजिह्वा मला स्त्रीचीच विविध रूपे वाटतात. रूप कोणतेही असो, स्त्री ही ज्योत आहे. स्त्री ही मशालीचा पोत आहे. अविनाशी धग आहे. आणि प्रत्येक रूपात शुद्ध आहे.

    कविता ही बुंदी पाडावी तशी पडत नसते. वरवर चौखूर उधळल्यासारख्या वाटणाऱ्या विचारांना जेव्हा शब्दांचा लगाम लावला जातो, तेव्हा कविता जन्म घेत असते. ही अशीच एक कविता, ‘उजळून ये, उजळून ये’! कशी वाटते, ते अवश्य कळवा!

    **************************************

    मंद निरांजन तू कधी
    कल्लोळ वडवानलाचा
    तेवतेस समयीपरी
    कधी लोळ भास्कराचा
    शुद्ध तू बहरून ये
    पोत तू उसळून ये
    ज्योत तू धग अविनाशी
    उजळून ये उजळून ये

    तू कराली, तू काली,
    मनोजवा, सुलोहिता,
    सुधूम्रवर्णा, स्फुल्लिंगिनी,
    विश्वरुचि, तू अग्निजिह्वा
    शुद्ध तू बहरून ये
    पोत तू उसळून ये
    ज्योत तू धग अविनाशी
    उजळून ये उजळून ये

    चुलीवरची आच तू
    कधी तळहात ऊबेचा
    मध्याह्नीचे तू तेजही
    कधी स्पर्श प्रभातीचा
    शुद्ध तू बहरून ये
    पोत तू उसळून ये
    ज्योत तू धग अविनाशी
    उजळून ये उजळून ये

    — © विक्रम श्रीराम एडके.

  • चित्रपटांच्या उत्क्रांतीमार्गातील धातुस्तंभ : २००१ – अ स्पेस ओडिसी

    चित्रपटांच्या उत्क्रांतीमार्गातील धातुस्तंभ : २००१ – अ स्पेस ओडिसी

    उत्क्रांतीच्या पहिल्या पायरीवर, जेव्हा माणसाचा अद्याप माणूस व्हायचा होता, तेव्हा एका मानवसदृश वानरांच्या कळपापुढे अचानकपणे एक धातुस्तंभ येऊन उभा राहातो. ही वानरं टोळ्या करून राहाणारी आणि पाण्याच्या डबक्यांवरून दुसऱ्या कळपांशी भांडणारी, एकमेकांना घाबरून राहाणारी आहेत. काही वानरं त्या स्तंभाला स्पर्श करतात. स्पर्श केलेल्या वानरांचा कळप नवनवीन युक्त्या वापरून दुसऱ्या कळपांवर सहजी विजय मिळवू लागतो. लक्षावधी वर्षांनंतर चंद्रावर एका अवकाशयानाला तसाच पण आधीच्यापेक्षा मोठा स्तंभ सापडतो. त्या स्तंभाच्या खुणेवरून मानवांचे अजून एक अंतराळयान गुरूच्या दिशेने झेपावते. त्यांना तिकडे काय आढळते, याचा आध्यात्मिक, तात्त्विक, भौतिक आणि वैज्ञानिक पातळीवर घेतलेला रूपकात्मक शोध म्हणजे स्टॅन्ली कुब्रिकची १९६८ सालची श्रेष्ठतम कलाकृती, ‘२००१ – अ स्पेस ओडिसी’.

    हा चित्रपट पहिल्यांदाच पाहाताना तुम्हाला कदाचित वाटेल की, ‘अरे, यात दोन तास बावीस मिनिटे दाखवण्यासारखं काय आहे, हे तर अर्ध्या तासात दाखवून संपवता आलं असतं’! तुम्हाला कदाचित कथांचे तुकडे किंवा ठिगळं एकत्र करून चिकटवल्याचीही भावना निर्माण होऊ शकते. पण जसजसा हा चित्रपट तुम्हाला आकळत जाईल तसतशा या सगळ्या शंका साधनामार्गावरील सुरुवातीच्या शंकांसारख्या विरून जातील व तुमच्यापाशी राहिल ती केवळ चित्रपटाच्या क्षेत्रातील सद्गुरूंनी, स्टॅन्ली कुब्रिकने पावणेत्रेपन्न वर्षांपूर्वी दाखवलेली अनवट वाट!

    कुब्रिकला ठाऊक होतं की, आपल्या या चित्रपटाचे शेकडो अन्वयार्थ लावता येतील. किंबहूना तोच त्याचा उद्देश होता. त्यामुळेच त्याने ‘२००१’चा त्याला अभिप्रेत असलेला अर्थ सांगण्याचे कायमच नाकारले. ही खूपच कमाल युक्ती आहे. नीट वापरली तर कोणत्याही चित्रपटाची संस्मरणीयता शतपटींनी वाढवू शकते. पण त्यासाठी मुळात तो चित्रपट हा चित्रपट म्हणून उत्कृष्टरित्या बनवलेला असायला हवा, ही मूळ अट आहे. ‘२००१’बद्दलचा सर्वाधिक दृश्य, सर्वाधिक भौतिक भाग आपल्यासमोर येतो, तो म्हणजे त्याचे दिसणे. कुब्रिक हा परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध होता. काळाच्या अनेक पटींनी पुढचा होता. त्याची अकल्पनीय झेप चित्रपटाच्या रूपामध्ये सहजी डोकावते. भले ही चित्रपटाची रिळं डागडुजी करून रिस्टोअर केलेली असतील, तरीही इतक्या उच्चतम दर्जाची मूळ दृश्यं पाच दशकांपूर्वी चित्रित केलेली आहेत, या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. एक एक चौकट चित्रित करताना केवढी मेहनत घ्यावी लागली असेल, किती नियोजन करावे लागले असेल, कसे प्रमाणबद्ध नमुने बनवावे लागले असतील, गुरूत्वाकर्षणशून्य दृश्ये चित्रित करताना प्रतिभेचा केवढा कस लागला असेल, केवढे कष्ट पडले असतील, या विचारांनी नुसते तोंडात बोटच घालावेसे वाटत नाही तर शब्दशः अस्वस्थ व्हायला होते.

    या चित्रपटासाठी कुणा विज्ञानविषयक तज्ञ लेखकाच्या शोधात असताना कुब्रिकला अवचितपणे आर्थर सी. क्लार्क सापडला होता. दोघांच्या भांडणांतून, बौद्धीक घर्षणांतून, कल्पनामालिकांच्या भराऱ्यांतून, ज्या अनेक कथा निघाल्या त्या कथांचा एकत्रित परिणाम म्हणजे हा चित्रपट आहे. त्यामुळेच सुरुवातीला अकारणच ठिगळांसारखा वाटतो तो. पण जसजसे त्या तिन्ही कथांमधील, किंबहूना काळांमधील समान सूत्र मन:पटलावर साकारू लागते, तसतसा हा चित्रपट अधिकाधिक भुरळ घालू लागतो. काही चित्रपट हे पाहिल्या पाहिल्या विसरून जावेसे वाटतात, काही चित्रपट हे पाहिल्यावर दिवसभर विचारांच्या गर्तेत ढकलून देतात, काही चित्रपट हे दिवसेंदिवस व कधीकधी महिनोंमहिने अस्वस्थतेचे आवर्त उभे करतात; पण फार थोडे चित्रपट असतात जे तुमच्या सबंध आयुष्यालाच अधिक उत्तमतेकडे, उदात्ततेकडे, उन्नततेकडे घेऊन जातात. ‘२००१’ हा त्या दुर्मिळ प्रकारचा चित्रपट आहे. आजकालच्या ‘स्कॉर्सेसीच्या भाषेतील न-चित्रपटांवर’ पोसलेल्या अनुत्क्रांत प्राण्यांसमोर भूतकाळातून प्रकट झालेला धातुस्तंभच म्हणा ना!

    सुरुवातीच्या धातुस्तंभाला ती माकडं जिज्ञासेपोटी का होईना पण हात लावतात. नंतर मानवही चंद्रावरील धातुस्तंभाला त्याच भावनेने स्पर्श करतो. इथे चित्रपट एकाच वेळी उत्क्रांती, इच्छास्वातंत्र्य या सामान्य जाणीवांच्या कक्षेतील संकल्पनांना हात घालत असतानाच आपल्याहून श्रेष्ठतम, देवत्वाच्या कक्षेत जाणारे काहीतरी आहे, हा देखील विचार मांडतो. हे दोन्हीही विचार वरवर पाहिल्यास परस्परविरोधी वाटत असूनही कुब्रिक त्यांची तात्त्विक व दृश्य पातळीवरील मोट बांधण्यात कमालीचा यशस्वी ठरलाय. या बाबतीत असं यश कुब्रिकइतक्याच सातत्याने नंतरच्या काळात केवळ त्याचा सद्शिष्य ख्रिस्तोफर नोलनच्याच वाट्याला आलंय. ‘इंटरस्टेलर’मागचीच (२०१४) नव्हे तर नोलनच्या सबंध चित्रपट कारकीर्दीचीच प्रेरणा कुब्रिक आहे, हे उघडपणे जाणवते. नोलनचा ‘फॉलोईंग’ १९९८ साली प्रदर्शित झाला आणि कुब्रिक १९९९ ला वारला, त्याला जर अजून एक-दिड दशकांचं आयुष्य मिळालं असतं, तर नोलनच्या चित्रपटांवरील त्याची वेगळ्याच अंतर्दृष्टींनी भरलेली प्रतिक्रिया जाणून घेणे हा वैचारिक अत्यानंदाचा ठेवा होऊ शकला असता. बाकी दोघेही ब्रिटिश, दोघेही हॉलिवूडमध्ये राहूनदेखील डावे नसलेले, दोघांचेही सगळेच चित्रपट अभिजात म्हणून गणले जाऊनही कधीच (व अद्याप) सर्वश्रेष्ठ चित्रपटाचे आणि दिग्दर्शनाचे ऑस्कर न मिळवू शकलेले वगैरे साम्यस्थळे आहेतच.

    ज्यांनी चित्रपट अद्याप पाहिलेला नाही, त्यांनी आधी तो पाहावा आणि मगच हा परिच्छेद वाचावा. धातुस्तंभाला स्पर्श केल्यामुळे उत्क्रांतीला मिळालेली चालना, वळणे हा चित्रपटाचा मोठ्ठा गाभा आहे. चित्रपटातील अखेरच्या दृश्यांत हीच संकल्पना विज्ञानाच्या कक्षा ओलांडून अध्यात्माच्या कक्षेत जाते. गुरूच्या जवळ दिसणारा धातुस्तंभ आधीच्या दोघांपेक्षाही मोठा असतो. त्याच्या योगे डेव्हिड बाऊमन (कियार डुली) हा उत्क्रांतीचे लाखो टप्पे पार करून एका घरात पोहोचतो. हे घर देखील नियोक्लासिकल शैलीचे आहे, अर्थात ते सनातन तर आहेच पण त्याचवेळी नवेदेखील आहे. तिथे तो अनेक देहावस्थांचा अनुभव घेतो आणि अंती गर्भस्थ होऊन पृथ्वीच्या समकक्ष उभा राहातो. तो गर्भात आहे, याचा अर्थ त्याच्यात सृजनाची बीजं लपलीयेत. पण त्याचवेळी त्याचे डोळे सताड उघडे आहेत, कारण तो आता अंतर्दृष्टीने परिपूर्ण आहे. त्याच्यासमोर असलेली पृथ्वी ही कोणत्या काळातील आहे, ते दाखवलेले नाही. जर ती वर्तमानकाळातील असेल, तर तो तिच्या उत्क्रांतीला नवे वळण द्यायला आलाय. पण जर त्याचे यान भोवऱ्यात खेचले गेले तेव्हा त्याने खचितच काळाच्या सीमा ओलांडल्या होत्या, त्या सीमा भूतकाळाला जोडणाऱ्या असतील तर? तर कदाचित समोर असलेली पृथ्वी लक्षावधी वर्षांपूर्वीची असू शकते. मग तोच तर पहिल्या धातुस्तंभाचा स्थापक तर नसेल ना? हिंदू तत्त्वज्ञानात असाच भगवंत प्रलयानंतर सृजनापूर्वी शिशुरूपात पिंपळपानावर पहुडलेला सांगितलाय!

    आज सर्वत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुळसुळाट झालेला असताना, मानव विरुद्ध यंत्र हा एकेकाळी केवळ विज्ञानकथांच्याच वर्तुळातील विषय आपसूकच वास्तवाच्या परीघात आलाय. ‘२००१’ने पन्नास वर्षांपूर्वी संगणक एचएएल-९००० विरुद्ध मानव डॉ. डेव्हिड बाऊमनचा नियंत्रणासाठीचा संघर्ष दाखवून या बाबीचा उहापोह केलाय. ही आर्थर सी. क्लार्क आणि कुब्रिक दोघांचीही ‘भेदिले सूर्यमंडळा’ दर्जाची प्रतिभा आहे. त्या भागात डुलीने साकारलेला तणावातही शांत राहाणारा अंतराळवीर खासच जमून आलाय. पण प्रतिभेचाच विषय असेल, तर आज सर्रास वापरात असलेल्या अनेक गोष्टींचे भाकित या चित्रपटाने केलेले दिसते, उदाहरणार्थ एआय, टॅब्लेट्स वगैरे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुमारे वर्षभराने मानव पहिल्यांदा चंद्रावर उतरला. आज आपल्याला ठाऊक असलेला चंद्र आणि चित्रपटात दाखवलेला चंद्र, दोन्हींमधील समानता अचंबित करणारी आहे! नेमके हेच नोलनने ‘इंटरस्टेलर’द्वारे साधले होते. त्यात दाखवलेले कृष्णविवर आणि नासाने नंतर मिळवलेले कृष्णविवराचे पहिलेवहिले छायाचित्र हे अनेक पातळ्यांवर सारखेच आहे. अर्थात, कुब्रिककडे क्लार्क होता तसाच नोलनकडेही कीप थॉर्न आहेच. कुब्रिकने दाखवलेली अंतराळयाने भयावहरित्या सत्याच्या जवळ जाणारी आहेत. हे सारे दृक्पातळीवर आहे, फक्त ते समजून घेण्यासाठी आपले डोळे अखेरच्या शिशुप्रमाणे उघडे ठेवावे लागतात. चित्रपटात संवाद खूपच कमी आहेत व जिथे आहेत तिथेही ते फारसे महत्त्वाचे नाहीत, ही बाब कुब्रिकचा चित्रपटावर एक दृक्माध्यम म्हणून केवढा गाढ विश्वास आहे, हेच दर्शवते. कुब्रिकने चित्रपटात वापरलेले शास्त्रीय संगीत हाच दृक्परिणाम श्राव्य पातळीवर लक्षपटींनी वाढवण्यात हातभार लावते. ‘२००१’साठी कुब्रिकला सर्वश्रेष्ठ विभासांच्या विभागात ऑस्कर मिळाले आहे, ते विभास खोटे वाटण्याऐवजी आजदेखील तितकेच श्रेष्ठ भासतात, हा प्रतिभेचा अजब चमत्कारच मानला पाहिजे.

    पण इतके असूनही ‘२००१’च्या मुळाशी मानवी नाट्य आहे. ते आपल्याला आज जरासे संथ वाटेल कारण, कालौघात आपण चित्रपट हा दिड तासाचा टाईमपास मानू लागलोय. चित्रपटाकडे अनुभव म्हणून पाहाणाऱ्या प्रत्येकासाठी मात्र ‘२००१’ डोळ्यांचे, मनाचे, बुद्धीचे आणि आत्म्याचे पारणे फेडेल, यात काहीच शंका नाही. तो आपली उत्कंठा वाढवतो, भीती वाटायला लावतो, मेंदूचा भुगा करतो, आश्चर्याने आ वासायला लावतो. भावनांचे असे इंद्रधनुष्य साकारणे हीच चांगल्या चित्रपटाची ओळख नसते का! या चित्रपटाने, त्यातील धातुस्तंभांनी उत्क्रांतीला दिली तशीच पन्नास वर्षांपूर्वी विज्ञानपटांना एक नवी दिशा दिली आहे. आजही चित्रपटाला चित्रपट म्हणून बनवू इच्छिणाऱ्या, पाहू इच्छिणाऱ्या प्रत्येक ध्येसासक्ताला तो प्रेरणा देतोय, विचारांना चालना देतोय. विचार हे उत्क्रांतीचे फळ आहे की उत्क्रांती विचाराचे, हा प्रश्न उपस्थित करणारा ‘२००१’ स्वतः मात्र निश्चितपणे विचारांच्या परिसीमेचे फळ आहे, यात काहीच शंका नाही!

    — © विक्रम श्रीराम एडके.
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

  • अर्जुनाचे काऊन्सिलिंग

    अर्जुनाचे काऊन्सिलिंग

    पांडवांच्या शक्तीचा अत्यंत मोठा भाग असलेला अर्जुन ऐन युद्ध सुरू होण्याच्या काही तास आधी ‘सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति’ म्हणत हातपाय गाळून बसलाय. हे समोर उभे असलेले माझे भाऊ आहेत, आजोबा आहेत, काका आहेत, सासरे आहेत, नातू आहेत, गुरू आहेत, या स्वजनांशी मी कसा काय लढू असं म्हणत निवृत्तीची भाषा करतोय. श्रीकृष्णाचं देवत्व ज्या अनेक गोष्टींमध्ये सामावलंय, त्यांच्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे परिस्थितीचं सर्वंकष आकलन करून चटकन निर्णय घेणे. कृष्णाकडे दोनच उपाय होते, एक तर या ‘अर्जुनविषादयोगा’पुढे मान तुकवायची नाहीतर त्याला त्या अवसादातून बाहेर खेचून आणायचे! पहिला मार्ग सोपा होता, उपनिषदांच्या भाषेत प्रेयस होता पण निवडणारा साक्षात भगवंत होता म्हणूनच त्याने अवघड परंतु श्रेयस मार्ग निवडला. त्याने अर्जुनाचे ऐकून घेतले, त्याला प्रश्न विचारू दिले, त्याला पूर्णपणे रिते होऊ दिले. त्याचा एक सुद्धा प्रश्न न टाळता प्रत्येक प्रश्नाची अर्जुनाचं समाधान होईपर्यंत उत्तरं दिली. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर मनमोहनाने साक्षात मानसोपचारतज्ञाच्या भूमिकेत जाऊन अर्जुनाचं काऊन्सिलिंग केलं!

    हे करताना श्रीकृष्णाने वापरलेल्या क्लृप्त्या विलक्षण आहेत. त्याने सुरुवात केली ती अतिशय साध्या युक्तिवादाने, दोस्तीखात्यात श्रीकृष्ण अर्जुनाला सावध करतो, ‘क्लैब्यं मा स्म गम: पार्थ’! आणि मग हळूच कटाक्षपूर्ण शब्दांत तो अर्जुनाला त्याच्या कुतर्कातील चूक दाखवू लागतो, ‘अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे’. हे करताना तो ‘जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवो जन्मं मृतस्य च’ आणि ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ ही आद्यसत्ये सांगायलाही विसरत नाही. श्रीकृष्णाची विधानं अत्यंत स्पष्ट आहेत, ठाम आहेत. त्याच्या बोलण्यात कमालीचं कन्व्हिक्शन आहे, तो थेटपणे सांगतो, ‘हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग: जित्वा वा भोक्ष्यसे महिम्’. दोन्हीही परिस्थितीत युद्ध करायचंच आहे. परिस्थितीला पर्याय आहेत, युद्धाला मात्र पर्याय नाही! कन्व्हिक्शन किंवा ठामपणाच्याच बाबतीत बोलायला गेलं तर क्रोधातून संमोह, संमोहातून स्मृतिभ्रम, स्मृतिभ्रमातून बुद्धिनाश आणि बुद्धिनाशातून संपूर्ण विनाश; हा श्रीकृष्णाचा कोटिक्रम त्रिकालाबाधित आहे.

    हा ‘सांख्ययोग’ सांगूनही अर्जुन ऐकत नाही म्हटल्यावर भगवान त्याला दुसरा पैलू ‘कर्मयोग’ सांगतात. अतिशय रोखठोक तत्त्वज्ञान की बाबा, ‘नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मण:’! काय बोलणार या पुढे? श्रीकृष्णाला पक्कं ठाऊक आहे की, ‘न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम्’. तो अर्जुनाला सरळ सांगतो की, ‘स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह:’! या अध्यायाच्या सुरुवातीलाच श्रीकृष्ण अर्जुनाला उद्देशून ‘अनघ’ म्हणजे निष्पाप किंवा ‘भोळ्या’ असे संबोधन वापरतो आणि मग त्याला योग्य काय ते सांगतो.

    पण तरीही अर्जुनाच्या शंका फिटत नाहीत. मग भगवान परत नवीन पैलू सांगतात, ‘ज्ञानकर्मसन्यासयोग’! साक्षात विवस्वानाला सांगितलेल्या या योगाचे गुह्य भगवंत उलगडून सांगू लागतो की, ‘बहुनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन:, तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप’! इथेच भगवान वचन देतात, ‘अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं’! कशासाठी? ‘परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृतां, धर्मसंस्थापनार्थाय’!! भगवान इथे आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक सत्य सांगतात की, ‘ये यथा मां प्रपद्यन्ते, तांस्तथैव भजाम्यहम्’! पुढे भगवान चातुर्वर्ण्याच्या उत्पत्तीचे कारण सांगतात, ‘चातुर्वर्ण्यं मया सृष्टं’. कसे? तर ‘गुणकर्मविभागश:’! भगवान सांगतात की, ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते’. पण हे ज्ञान कुणाला लाभते, तर फक्त ‘श्रद्धावांल्लभते ज्ञानं’. आणि ‘संशयात्मा विनश्यति’ सांगताना भगवान म्हणतात की, संशयी माणसासाठी परलोक तर नसतोच, पण पृथ्वीही नसते आणि त्याच्या नशिबी सुख तर अजिबातच नसते!

    एवढ्यानेही ऐकत नाही म्हटल्यावर भगवंत मग ‘कर्मसन्यासयोग’ सांगतात की, कर्मसन्यास आणि कर्मयोग दोन्हीही कल्याणकारीच आहेत. पण दोन्हींमध्ये तुलनाच करायची झाली तर कर्मांपासून सन्यास घेण्याऐवजी कर्मयोग अधिक श्रेष्ठ आहे. हे सांगताना भगवान नेमका युक्तिवाद करतात की, ‘सन्यासस्तु महाबाहो दु:खमाप्तुमयोगत:’! हे तत्त्व ज्याला समजले तो ‘नैवं किञ्चित्करोमीति युक्तो मन्येत’.

    तरीही नाहीच ऐकत म्हटल्यावर मग भगवान ‘आत्मसंयमयोग’ सांगू लागतात. यात भगवान ढोंगी आणि दांभिक मंडळींचा बुरखा टर्रकन फाडताना म्हणतात की, केवळ अग्निचा त्याग करणारा सन्यासी नसतो आणि नुसताच निष्क्रिय राहाणारा योगी नसतो, तर ‘अनाश्रित: कर्मफलं कार्यं कर्म करोति य: सन्यासी च योगी च’! इथे भ्रमाचा भोपळा फोडल्यावर मग भगवान संगतवार योग कसा करायचा हे समजावून सांगतात. एकदा योग जमला की, ज्याप्रमाणे वारा नसलेल्या ठिकाणी दिव्याची ज्योत अचल राहाते, त्याच प्रमाणे त्या व्यक्तीचे चित्तदेखील अचल राहाते! तो सगळ्यांना आणि सगळ्यालाच समभावाने पाहू लागतो. हा योग ज्याला जमला तो, ‘यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं तत:’. पण त्याचवेळी भगवान हे देखील सांगतात की, ‘असंयतात्मना योगो दुष्प्रापो इति मे मति:’.

    तरीही ऐकत नाही म्हटल्यावर मग श्रीकृष्ण ‘ज्ञानविज्ञानयोग’ सांगताना आता स्वतःचं खरं रूप हळूहळू उघड करू लागतो. तो म्हणतो की सहस्रांमध्ये कुणीतरी एक मला मिळवण्यासाठी प्रयत्न करणारा असतो आणि त्यातही कुणीतरी एकच मला पूर्णपणे जाणतो. मी काय आहे? पृथ्वी, जल, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या सगळ्यांनी मिळून माझी जड प्रकृति आहे आणि या सगळ्यांना धारण करणारीही माझीच चेतन प्रकृति आहे! ‘अहं कृत्स्नस्य जगत: प्रभवः प्रलयस्तथा’! आणि मग भगवंत या संपूर्ण प्रकृतिची बारीकसारीक अंगे समजावताना मी कशात काय आहे ते सांगू लागतो. एक प्रकारचे तात्त्विक विश्वरूपदर्शनच!

    तरीही अर्जुन ऐकत नाही म्हटल्यावर मग भगवान ‘अक्षरब्रह्मयोग’ सांगू लागतात. लक्षात घ्या, अर्जुन निश्चितच शंकेखोर आहे. पण त्याच्या शंकादेखील अभ्यासातून आलेल्या आहेत. त्याचा मार्ग चुकलाय म्हणून तो हरवलाय फक्त. मुळात तो हुशार नसता तर श्रीकृष्णाने त्याला मित्र मानलेच नसते. म्हणूनच त्याच्या शंकादेखील हळूहळू प्रगल्भ होत चालल्यायत, उदाहरणार्थ, ‘अधियज्ञं कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन’. म्हणूनच भगवानही त्यांची शिकवणूक अधिकाधिक खोल करू लागलेयत की – अक्षर ब्रह्म आहे. जीवांच्या परमस्वभावालाच अध्यात्म म्हणतात. जीवांची ज्यातून उत्पत्ती होते त्याला कर्म म्हणतात. देहाच्या क्षरभावाला अधिभूत म्हणतात. देहातील पुरुष अर्थात आत्म्याला अधिदैव म्हणतात. परंतु देहातील अधियज्ञ मात्र मी आहे, मीच देह धारण करणाऱ्यांमधील सर्वश्रेष्ठ आहे! मनुष्य अखेरीस ज्याचं स्मरण करत-करत देहत्याग करतो, तो त्याच भावाने भावित राहातो. यासाठी तू सदोदित माझं स्मरण करता-करताच युद्ध कर म्हणजे तुला माझीच प्राप्ती होईल.

    एवढ्यानेही अर्जुन ऐकत नाही म्हटल्यावर मग भगवान ‘राजविद्याराजगुह्ययोग’ सांगू लागतात, ‘मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः’! जसा वायू सर्वत्र विचरण करत असूनही आकाशातच राहातो, त्याचप्रमाणे सारी भूतमात्रे माझ्यातच वास करतात, कल्पांती माझ्यातच लीन होतात आणि कल्पारंभी मीच त्यांची रचना करतो. श्रीकृष्ण म्हणतो, ‘मयाध्यक्षेण प्रकृति: सूयते सचराचरम्’. इथे तो कदाचित ‘नासदीय सूक्ता’चा संदर्भ देत असावा. या यज्ञाचा क्रतु तर मी आहेच, पण यज्ञदेखील मीच आहे. मीच त्यातील स्वधा आहे, मीच औषध आहे, मीच मंत्र आहे, मीच घृत आहे, मीच अग्नी आहे आणि एवढेच कशाला तर हवनदेखील मीच आहे! या जगताचा धाता, माता, पिता आणि पितामहदेखील मीच आहे. मीच वेद आहे आणि वेद्यही मीच आहे. जे माझे अनन्यभावाने चिंतन करत उपासना करतात, त्यांचे ‘योगक्षेमं वहाम्यहम्’!

    एवढ्यानेही ऐकत नाही म्हटल्यावर भगवान अर्जुनाला ‘विभुतियोग’ सांगू लागतात की, देव आणि महर्षीदेखील माझ्या उत्पत्तीला पूर्णपणे जाणत नाहीत कारण, ‘अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वश:’! बुद्धी, ज्ञान, असंमोह, क्षमा, सत्य, दम, शम, सुख, दु:ख, उत्पत्ती, प्रलय, भय, अभय, अहिंसा, समता, तुष्टी, तप, दान, यश, अपयश, भूतमात्रांचे विविध भाव सारे काही माझ्यामुळेच होते. सप्तर्षी, त्यांच्याही पूर्वीचे सनकादी चार ऋषी, चौदा मनू हे सगळे माझ्याच संकल्पातून उत्पन्न झाले आहेत. वाचणाऱ्याला हे कदाचित आत्मप्रौढीचे वाटेल, पण इथे हे लक्षात घेतले पाहिजे की श्रीकृष्ण इथे व्यक्तिगत अहंभावातून बोलत नसून आध्यात्मिक व यौगिक अर्थाने परमेश्वरभावातून बोलतोय. अर्जुन म्हणतो, ‘सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव’, पण तरीही तो भगवंताच्या विभूती विस्तारपूर्वक सांगण्याची विनंती करतो. आता अर्जुन विषादापासून दूर गेलाय हे ओळखून श्रीकृष्णही त्याच्या कलाने घेत ‘अहमात्मा गुडाकेश:’ पासून सुरुवात करतो व एकवीस श्लोकांमध्ये स्वतःच्या विभूती अत्यंत संक्षेपाने सांगतो.

    तरीही अर्जुनाच्या सगळ्या शंका फिटत नाहीच. मग मात्र ‘विश्वरूपदर्शनयोगा’च्या निमित्ताने आपल्या समग्र रूपाचे दर्शन देतो. ते पाहाताच अर्जून दीपून जातो. त्या रूपात भगवंत सांगतात की, ज्यांना मारायला तू नकार देतोयस त्यांना मी केव्हाच मारलंय, तू फक्त आता निमित्त बन! अर्जुन आता मात्र थरथर कापू लागतो. ज्याला आपण मित्र म्हणून वागणूक दिली तो प्रत्यक्षात काय आहे हे समजल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. भगवंताच्या विश्वरूपाची स्तुती करत तो म्हणतो, ‘नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते’! भिती वाटू लागल्यामुळे तो श्रीकृष्णाला पुन्हा एकवार सौम्यरूपात येण्यासाठी विनवतो आणि श्रीकृष्णही परत एकदा नेहमीसारखाच होऊन जातो.

    पण म्हणून अर्जुनाच्या शंका संपतात थोडीच! त्यामुळेच आता मग भगवंत त्याला ‘भक्तियोग’ सांगू लागतात की, तू तुझी बुद्धी आणि मन दोन्हीही माझ्यातच निवेश कर, जे कुणी असे करतात ‘तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्’! जर तुला असा निवेश नाही जमला, तर तू माझा अभ्यास कर. जर तुला हा अभ्यासयोगदेखील नाही जमला, तर केवळ मत्परायणच होऊन कर्म कर. जर ते ही नाही जमले, तर मी सांगितलेल्या योगाचा आश्रय घे. पण लक्षात ठेव की अभ्यास श्रेष्ठ आहे, पण त्याहून श्रेष्ठ ज्ञान आहे, त्याहून श्रेष्ठ ध्यान आहे, पण त्याहून श्रेष्ठ कर्मफलत्याग आहे!

    एवढ्यानेही समाधान होत नाही म्हटल्यावर भगवंत आता ‘क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग’ सांगू लागतात की, हे शरीर म्हणजे क्षेत्र अर्थात शेत आहे व याला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात तो ‘क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत’! पुढे श्रीकृष्ण क्षेत्राचे स्वरूप आणि विकार, दोन्ही खुलासेवार सांगतो. आणि मग पुन्हा एकवार ‘नासदीय सूक्ता’चा संदर्भ देत श्रीकृष्ण ब्रह्माचे स्वरूप समजावून सांगतो की, ‘अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते’.

    पण तरीही अर्जुन काही ऐकत नाही. तेव्हा भगवंत ‘गुणत्रयविभागयोग’ सांगताना म्हणतात की, देहीला देहामध्ये सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण बांधून ठेवतात. यातील सत्त्वगुण अनामय आहे. तो ‘सुखसङ्गेन बध्नाति ज्ञानसङ्गेन चानघ’. दुसरा रजोगुण रागात्मक आहे. तो ‘तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसङ्गेन देहिनम्’. आणि तिसरा आहे तो अज्ञानातून उत्पन्न होणारा तमोगुण. तो प्रमाद, आळस आणि निद्रेच्या रूपाने देहीला बांधून ठेवतो. सत्त्वगुण सुखाशी जोडतो, रजोगुण कर्माशी जोडतो आणि तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमादाशी जोडतो. हे तिन्ही गुण एकमेकांवर कुरघोडी करत असतात. विवेक उत्पन्न झाल्यास सत्त्वगुण वाढतो. रजोगुण वाढल्यास लोभ, प्रवृत्ती, सकाम कर्मारंभ, अशांती आणि स्पृहा निर्माण होतात. तमोगुण वाढल्यास अप्रकाश, अप्रवृत्ती, प्रमाद आणि मोह निर्माण होतात. या तिन्ही गुणांची आपापली फळे आहेत. पण जर परमानंदाची प्राप्ती करायची तर या तिघांनाही ओलांडणे गरजेचे असते.

    तरीही अर्जुनाच्या शंका शेष राहातात तेव्हा भगवंत त्याला ‘पुरुषोत्तमयोग’ सांगतात. यात भगवंत अश्वत्थवृक्षाचा दृष्टांत देतात की, ‘ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्’. अशा या उलट्या पिंपळाच्या झाडाचे भगवंत सांगोपांग वर्णन करतात. पण हा वृक्ष म्हणजे अंतिम सत्य नव्हे. असंगाच्या शस्त्राने त्या वृक्षाला कापून ‘यस्मिन्गता न निवर्तन्ति भूयः’ अशा परमपदाचा शोध घेण्याबाबत श्रीकृष्ण सुचवतो आणि खात्री देतो की, ‘तद्धाम परमं मम’!

    एवढ्यानेही समाधान होत नाही म्हटल्यावर मग श्रीकृष्ण पुढे ‘दैवासुरसम्पद्विभागयोग’ सांगू लागतो. अभय, सत्त्वसंशुद्धी, ज्ञानयोगामध्ये दृढस्थिती, दान, दम, यज्ञ, स्वाध्याय, तप, आर्जव, अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, शांती, अपैशुनता, दया, अलोलुपता, मार्दव, लज्जा, अचंचलता, तेज, क्षमा, धैर्य, शौच, अद्रोह, अतिमानितेचा अभाव ही सारी दैवी संपदेने युक्त पुरुषाची लक्षणे आहेत. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोर वाणी व अज्ञान ही आसुरी संपत्तीने युक्त पुरुषाची लक्षणे आहेत. हे सगळं सांगून झाल्यावर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो की, ‘मा शुचः सम्पदं दैवीमभिजातोऽसि पाण्डव’! काम, क्रोध आणि लोभ हे नरकाचे तीन दरवाजे आहेत, या तिन्हींचाही त्याग केला पाहिजे. जो या तिन्हींचा त्याग करतो, त्यालाच परमगति लाभते.

    अर्जुन विचारतो की, जे शास्त्रविधींचा त्याग करून केवळ श्रद्धापूर्वक यजन करतात, त्यांची निष्ठा सात्त्विक असते, की राजस, की तामस? भगवंत यावर उत्तर म्हणून ‘श्रद्धात्रयविभागयोग’ सांगतात की श्रद्धादेखील गुणांनुसार तीन प्रकारची असते. आणि श्रद्धाच कशाला, भगवंत सांगतात की भोजन, यज्ञ, तप आणि दान सुद्धा गुणांनुसार तीन-तीन प्रकारचे असते. भगवंत या सगळ्याचं ससंदर्भ आणि सविस्तर स्पष्टिकरण करतात.

    पुढे भगवंत ‘मोक्षसन्यासयोगा’चे निरुपण करतात. श्रीकृष्ण सांगतो की, ज्ञान, ज्ञेय आणि परिज्ञाता या तीन कर्माच्या प्रेरणा आहेत; तर करण, कर्म आणि कर्ता हे कर्माचे तीन प्रकारचे संग्रह आहेत. ज्ञान, कर्म आणि कर्ता या प्रत्येकाचेदेखील सात्त्विक, राजस आणि तामसी असे तीन-तीन प्रकार पडतात. त्याचप्रमाणे बुद्धी आणि धृती यांचेही तीन-तीन प्रकार पडतात. सुखांचेही तीन प्रकार पडतात. थोडक्यात पृथ्वीवर, अथवा स्वर्गातील देवतांमध्येही असे काहीच नाही जे या त्रिगुणांपासून मुक्त असेल. आगीतून जसा धूर येतो त्याप्रमाणेच कर्म म्हटले की दोष आलेच. पण म्हणून काही कर्म करणे सोडून द्यायचे नसते, तर केवळ आसक्ती आणि स्पृहा यांचा त्याग करायचा असतो. मी युद्ध नाही करणार, असं जे तुला वाटतं, तो तुझा अहंकार आहे. तुझा तो निश्चय मिथ्याच आहे कारण, तो तुझा स्वभाव आणि प्रकृती दोन्हींच्याही विपरित आहे.

    श्रीकृष्ण अशाप्रकारे अर्जुनाची समग्र काऊन्सिलिंग करून झाल्यावर पुढे म्हणतो की, मी तुला गोपनीयतेहूनही गोपनीय असे हे ज्ञान सांगितले, आता या उप्पर जे तुला वाटते ते तू कर – ‘यथेच्छसि तथा कुरु’! पण तू मला प्रिय असल्याने मी तुला खात्रीपूर्वक सांगतो की, ‘सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः’! आता एवढी सगळी गीता सांगून वर ठाम खात्री दिल्यावर अर्जुनाच्या मनात काय शंका राहिल? तो सुद्धा स्पष्टपणे सांगतो की, ‘नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत, स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव’! हा अद्भुत संवाद ऐकणाऱ्या संजयाच्याही अंगावर रोमांच उभे राहातात व तो सहजच बोलून जातो की, ‘यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः, तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम’! अर्थातच धृतराष्ट्राला काही ते पटणारे नसतेच. हिज लॉस! कुरुक्षेत्रावर हा एक छोटासा तरीही अत्यावश्यक असा स्पीडब्रेकर जरी आलेला असला, तरीही आता युद्धाचा गाडा सुसाट सुटणार असतो. महाभयंकर महातांडवकारी असे महाभारत होणार असते. परंतु अर्जुन आता पूर्णपणे झोकून देऊन युद्धाला उभा राहातो. त्याला कशाचीच पर्वा नसते कारण, त्याचे काऊन्सिलिंग साक्षात भगवंताने केलेले असते!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]
    टीप: कुणीही लेखक हा लिहिताना आपले तन, मन, वेळ, अभ्यास सारे काही अर्पून लिहित असतो, तेव्हा कृपया लेखकाचे नाव काढून निनावी अथवा स्वतःच्या नावाने शेअर/पोस्ट करून आपल्या मातापित्यांनी केलेले कुसंस्कार दाखवू नयेत!

  • नील

    नील

    Spoiler_Alert

    स्पॉयलर_अलर्ट

    [‘टेनेट’ पाहिलेला नसल्यास लेख वाचू नये, रसभंग होण्याची शक्यता आहे. चित्रपट पाहिल्यावरच लेख वाचावा.]

    टेनेट‘मधील माझं सध्याचं सगळ्यांत आवडतं पात्र नील आहे. एक तर रॉबर्ट पॅटिन्सनने जॉन डेव्हिड वॉशिंग्टनपेक्षा जास्त चांगलं काम केलंय. आणि दुसरं कारण असं की, त्याचं पात्र हे भविष्यातून भूतकाळात आलेलं असल्यामुळे सुरुवातीपासूनच सर्वानुभवी व परिपक्व आहे. त्या मानाने नायकाचे पात्र आत्ता कुठे शिकू लागलेय. या अनुभवाच्याच आधारे नीलने त्याच्या आयुष्याचे तत्त्वज्ञान उभारलेय, “What’s happened, happened”. या तीनच शब्दांमध्ये भौतिकशास्त्रीय आणि तात्त्विक अशा दोन्ही पातळ्यांवर अतिशय सारगर्भ चिंतन आहे.

    गणित आणि भौतिकशास्त्रात एक सिद्धांत आहे, त्याला ‘केऑस थियरी‘, अर्थात ‘कोलाहल सिद्धांत’ असे म्हणतात. हा सिद्धांत सांगतो की, कोणत्याही प्रणालीच्या वर्तमान अक्रमतेच्या पाठी मुळात काही ना काही क्रम असतो व सांप्रतची अक्रमता ही आरंभीच्या सूक्ष्म बदलांवर अवलंबून असते. दुसऱ्या भाषेत, वर्तमानावर भविष्य अवलंबून असणे, परंतु ढोबळ वर्तमानावर ढोबळ भविष्य अवलंबून नसणे, म्हणजे कोलाहल. थोडक्यात एखाद्या गतिशील प्रणालीत अथवा व्यवस्थेत सुरुवातीलाच झालेला किंचित बदलदेखील त्या प्रणाली किंवा व्यवस्थेच्या भविष्यावर फार मोठा परिणाम घडवून आणू शकतो. याचं सगळ्यांत प्रसिद्ध उदाहरण म्हणजे ‘बटरफ्लाय इफेक्ट‘ किंवा ‘पुष्पपतंग परिणाम’. असं म्हणतात की, टेक्सासमध्ये एखाद्या फुलपाखराने पंख फडफडवले तर परिणामी चीनमध्ये वादळसुद्धा होऊ शकते. अर्थात हे उदाहरण तत्त्वतः जरी सत्य असले तरीही ते शब्दशः घेण्याची आवश्यकता नाही. इथे केवळ एखाद्या लहानशा घटनेतून घटनाक्रमाची शृंखला सुरू होऊन भलं मोठ्ठं काहीतरी घडू शकतं, हा अर्थ अभिप्रेत आहे. थोडक्यात आपल्या पुढे असलेली एखादी घटना किंवा परिस्थिती ही आत्ता जशी दिसते, तशी असण्यामागे भलीमोठ्ठी कार्यकारणभावाची साखळी असू शकते. त्यामुळे जर एखादी गोष्ट आहे त्या पेक्षा वेगळी असायला हवी होती असे वाटत असेल, तर तो बदल कार्याच्या नव्हे तर कारणाच्याच पातळीवर व्हायला हवा होता. उदाहरणार्थ, पाकिस्तानची निर्मिती ही १९४७ साली झाल्यापासून सबंध जगाला आणि त्यातही विशेषतः भारताला त्रास होतोच आहे, तो त्रास व्हायलाच नव्हता पाहिजे असे वाटत असेल तर आत्ता पाकिस्तानला संपवून तो समूळ संपणारा नाही. त्याचे काही ना काही राजकीय, सामाजिक परिणाम तरी देखील उरतीलच. तो त्रास संपवायचा तर त्या भागात सहस्र वर्षांपूर्वी झालेले पहिले यशस्वी आक्रमणच मुळात अयशस्वी व्हायला हवे होते. पण ते आता काळात मागे जाऊन थोपवणे शक्य नाही. आणि त्या उप्परही कुणी ते थोपवलेच, तरीही ही गतिशील प्रणाली त्या कारणाला ओलांडून दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाने पुन्हा आत्ता आहे तशीच होणार नाही, याची काही एक खात्री नाही. थोडक्यात काय, तर “What’s happened, happened”!

    माणूस म्हणजे तरी वेगळं काय? कोणत्याही माणसाचे सध्याचे अस्तित्व हे भूतकाळातील घटनांचा एकत्रित परिणामच असतो. तुम्ही आत्ता जे काही अपयशी आहात, ते भूतकाळातील घटनांमुळे तसेच, तुम्ही आत्ता जे काही यशस्वी आहात, ते देखील भूतकाळातील घटनांमुळेच. तुम्हाला लाख वाटेल की, तेवढी अमुक एक घटना बदलता आली तर आयुष्य सुंदर होऊन गेलं असतं. पण कदाचित त्या घटनेनेच तुम्हाला आत्ता आहे ती परिपक्वता दिलेली असते, त्या घटनेत लागलेल्या ठेचेमुळेच तुम्ही नंतरच्या काळात चार शहाणे निर्णय घेतलेले असतात. तेव्हा ती घटनाच जर समजा बदलली, तर आयुष्य सुंदर होईल, याची काहीच खात्री नाही. उलट ते वेगळे आणि म्हणूनच कदाचित अजून वाईट होण्याचीही तितकीच शक्यता आहे. हा तात्त्विक भाग झाला. तुमच्या हातात काय आहे, तर भविष्यकाळ चांगला करणे. थोडक्यात, कोलाहलाच्या सिद्धांतानुसार जर तुमच्या आयुष्याला एक प्रणाली मानले तर त्यात आत्ता काही बदल केले तरच भविष्य बदलू शकते. भूतकाळ बदलू शकत नाही. म्हणजेच, “What’s happened, happened”!

    उपनिषदांमधील दोन सिद्धांत मला फारच आवडतात. ईशावास्योपनिषद (मंत्र ९) सांगते की,
    अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते।
    ततो भूय इव ते तमो य उ विद्यायां रताः॥
    अर्थात, ‘जे केवळ भौतिक विद्यांच्याच मागे धावतात ते अंधारात प्रवेश करतात. परंतु जे केवळ अध्यात्माच्याच मागे धावतात, ते त्याहून मोठ्या अंधारात प्रवेश करतात’.
    पुढे ११ वा मंत्र तर सांगतो की,
    विद्याञ्चाविद्याञ्च यस्तद्वेदोभयं सह।
    अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते॥
    अर्थात, “जो ‘तत्’ला विद्या आणि अविद्या दोन्हींच्या द्वारे जाणतो तो अविद्येने मृत्यू तरून जातो तर विद्येने अमृतत्त्व मिळवतो”.
    थोडक्यात उपनिषदाने अध्यात्म आणि भौतिकता यांचा समतोल साधायला सांगितलंय. आध्यात्मिकाने विज्ञानाला तुच्छ लेखूच नये. विज्ञानाचा स्वतःचा मार्ग आहे, त्यावरून त्याला त्याच्या गतिने मार्गक्रमण करू द्यावे. तैत्तिरीय उपनिषद (भृगू. अनुवाक ५) तर स्पष्ट सांगते की, ‘विज्ञानं ब्रह्मेति व्यजानात्’ अर्थात, ‘जाणले की विज्ञानच परब्रह्म आहे’! अर्थातच, विज्ञान म्हणजे केवळ भौतिक जगातील शास्त्रे अभिप्रेत नसून त्या शास्त्रांसोबत एकूणच सर्व बाबतीत ‘विशेष ज्ञान म्हणजेच विज्ञान’ असा व्यापक अर्थ येथे अभिप्रेत आहे.

    ‘टेनेट’मधील नील व्यक्तिश: मला तरी या उपरोक्त भौतिक आणि तात्त्विक ज्ञानाने परिपूर्ण असा विद्या-अविद्येचा संगम वाटतो. नोलनला कदाचित हे असेच्या असेच अभिप्रेत नसेल. कदाचित त्याला यातील तात्त्विक संकल्पना ठाऊकही नसतील. पण त्याने नीलचे पात्र अतिशय स्थितप्रज्ञ लिहिले आहे, हे निश्चित. त्यामुळेच तो साधंच काहीतरी काम करावं तितक्या सहजपणे बलिदान देतो. तो निरर्थक ‘जर-तर’मध्ये एकदाही पडत नाही. What’s happened, happened हे त्याच्या जीवनाचं सार आहे. त्याला काळाची माया, भौतिक आणि तात्त्विक दोन्हीही पातळ्यांवर पुरती समजलीये. म्हणूनच तो जाताना नायकाला सहजपणे सांगतो की, “I’ll see you in the beginning, friend”! मला स्वतःला नायकापेक्षा नील हाच लेखक-दिग्दर्शकाचं कथेतील प्रतिबिंब वाटतो, ते यामुळेच!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]
    #TENET #TENETची_क्षणचित्रे #Neil #Robert_Pattinson #Chaos_Theory #Butterfly_Effect #Science #Spirituality #Upanishads #Time

  • ‘टेनेट’ – उलट्या काळाचा सुलटा भविष्यवेध!

    ‘टेनेट’ – उलट्या काळाचा सुलटा भविष्यवेध!

    चलचित्र बनवणं आणि चित्रपट बनवणं, यात एक मूलभूत फरक असतो. एक उदाहरण देतो. समजा की, चलचित्र म्हणजे कविता आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत काहीतरी एक विधान करणारी. चित्रपट मात्र कवितेसारखा नसतो. चित्रपट म्हणजे सूक्त असते. त्याची प्रत्येक चौकट ही एखाद्या ऋचेसारखी असते, स्वयमेव काही कथा सांगणारी. आणि या चौकटी जेव्हा एकत्र येतात तेव्हा अनेक ऋचा मिळून जसे एक परिपूर्ण आणि काहीतरी गूढ उलगडून सांगावे तसा अर्थ सांगणारे सूक्त बनते, तसा चित्रपट सबंध पाहिला तर चौकटींनी बनलेली परंतु चौकटींपेक्षा भिन्न अशी कथा उलगडते. हा निकष लावला तर मला सांगा, जगात खरोखर किती ‘चित्रपट’ बनतात! इतकी कठोर परीक्षा घेतली तर जगातील काही भलेभले आणि तिकिटबारीवर अतोनात यशस्वी असलेले चित्रपटकारही निव्वळ चलचित्रकार सिद्ध होतील! परंतु एक असा माणूस आहे ज्याचे चित्रपट हे ‘चित्रपट’ही असतात आणि त्याचवेळी ते तिकिटबारीवर धुमाकूळदेखील घालतात, तो म्हणजे ‘एकमेवाद्वितीयो नान्यकोऽपि’ ख्रिस्तोफर नोलन! त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘टेनेट’देखील याला अपवाद नाही!!

    इतर चित्रपटकारांच्या (चलचित्रकारांच्या नव्हे!) चित्रपटांचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही चित्रपटसाक्षर असणे गरजेचे असते. नोलन आणखी एक पाऊल पुढे टाकायला लावतो. इथे तुम्हाला नुसतेच चित्रपटसाक्षर असून चालत नाही, तर विज्ञानसाक्षरदेखील असावे लागते! बहुतांशी विज्ञानपटांमध्ये कथा आणि वैज्ञानिक सिद्धांत यांचे सांधे वेगवेगळे असतात. त्यामुळे ज्यांना त्यातील विज्ञान समजत नाही त्यांनादेखील कथेचा आस्वाद घेता येतो. नोलनच्या चित्रपटांमध्ये मात्र तुम्हाला जर त्यातील विज्ञान समजत नसेल, तर तुम्हाला कथासुद्धा समजत नाही, कारण इथे कथा व विज्ञान वेगवेगळे नसतात तर ‘आत्मा-परमात्मा’सारखे त्यांच्यात अद्वैत असते. त्यामुळेच कदाचित किंवा मुद्दामहून म्हणा नोलन त्याच्या कथेतील विज्ञान एका मर्यादेपलिकडे उलगडून सांगत नाही. किंबहूना सांगूच शकत नाही कारण, त्या कथाविश्वातील बहुतांशी पात्रे ही त्या संकल्पनांशी परिचितच असतात! मी नोलनची तुलना कायमच ए. आर. रहमानशी करत असतो ते यासाठीच. रहमान कधीही त्याचे संगीत उलगडून मांडत नाही. त्यामुळे त्याचे कोणतेही नवे गाणे ऐकताना काहीतरी विचित्र ऐकल्याचा भास होतो. परंतु जसजसं आपले मन आणि मेंदू प्रशिक्षित होत जातात, तसतसं ते गाणं आपसूकच उमजू लागतं. नोलनचे चित्रपट तसेच असतात, एखादी घट्ट गुंडाळी समोर ठेवल्यासारखे. ती हळूहळू एखादं उंची मद्य मुरावं तशी तब्येतीत उलगडत जाते आणि तितका संयम ठेवला तरच आतील गाभ्याचं मूळ स्वरूप समजू शकतं! रहमान समजण्यासाठी जशी तुम्हाला जागतिक स्तरावरील संगीताच्या विविध शाखांची जाण असल्यास अनुभव शतपटींनी विस्तारतो त्याचप्रमाणे नोलनचा कोणताही चित्रपट पाहाताना तुम्हाला विज्ञानाची त्यातही भैतिकशास्त्राची परिचयापेक्षाही जास्त माहिती असेल, तरच तो अनुभव विस्तारतो. ‘टेनेट’ही याला अपवाद नाही. ‘टेनेट’ पाहायला जाणार असल्यास भौतिकशास्त्रातील दोन संकल्पना तुमच्या मनात सुस्पष्ट असल्याच पाहिजेत. आधीच पाहिला असल्यास या दोन संकल्पनांमुळे तुम्हाला तो समजण्यास, पक्षी त्याचा आस्वाद घेण्यास अजूनच साह्य होईल.

    १) एंट्रोपी
    ही भौतिकशास्त्रातील उष्मागतिकी या उपशाखेची एक संकल्पना आहे. तिचा उपयोग संख्यायामिकीमध्येही होतो. कोणत्याही प्रणालीतून उपयोगी कार्यासाठी प्रति एकक तापमानास अनुपलब्ध असलेली औष्णिक ऊर्जा म्हणजे एंट्रोपी. ही मोजता येते. साध्या भाषेत सांगायचं झालं तर, एंट्रोपी ही अव्यवस्थेचे द्योतक आहे. फक्त ही अव्यवस्था दृष्य स्तरावर नसून रेण्वीय पातळीवर असते. कार्य म्हणजे रेणूंची व्यवस्थित हालचाल. त्यामुळे एंट्रोपी मध्ये कोणत्याही प्रणालीचे रेण्वीय पातळीवर क्रमहीन होणे अपेक्षित आहे. ‘टेनेट’मध्ये मात्र ही एंट्रोपीच उलट फिरवण्याची संकल्पना मांडली आहे आणि तिचे उपयोजन थेट काळ या संकल्पनेशी केले आहे. हिंदू तत्त्वज्ञानात उत्पत्तीसाठी एक खूपच सुंदर शब्द वापरलाय, सर्ग! परंतु विनाशासाठी याच्या बरोब्बर विरुद्ध शब्द जो वापरलाय तो मात्र आहे प्रतिसर्ग! लक्षात घ्या, इथे केवळ विनाश किंवा प्रलय एवढाच अर्थ अभिप्रेत नाहीये, तर त्याहूनही सूक्ष्म पातळीला जाऊन प्रतिसर्ग म्हणजे सर्गाची प्रक्रियाच उलट फिरवणे आहे. म्हणूनच कल्पसिद्धांतानुसार प्रलयानंतर पुन्हा सृजन होते! ‘टेनेट’मध्ये एंट्रोपी उलटी फिरवल्यामुळे केवळ काळच उलटत नाही तर पदार्थ आणि पदार्थविज्ञानाचे नियमदेखील उलट होतात.

    २) फ्रेम ऑफ रेफरन्स
    फ्रेम ऑफ रेफरन्स किंवा संदर्भचौकट ही एंट्रोपीच्या तुलनेत सोपी संकल्पना आहे. कल्पना करा की, तुम्ही ‘अ’ स्थानावर आहात आणि तिथून शंभर मीटर अंतरावर सरळ रेषेत तुमचा मित्र ‘ब’ स्थानावर आहे. आता तुमच्यापासून, ‘अ’ स्थानापासून एखादी गाडी ‘ब’ स्थानाकडे म्हणजेच तुमच्या मित्राकडे गेली, तर काय होईल? दोन गोष्टी होतील. एक म्हणजे तुम्हाला गाडी ‘जाताना’ दिसेल. आणि दुसरे म्हणजे तुमच्या मित्राला गाडी ‘येताना’ दिसेल. एकाच गोष्टीचे दोन वेगवेगळे परिणाम कसे काय जाणवले? कारण, तुमचे दोघांचेही दृष्टीकोन वेगवेगळे आहेत. तुमच्या संदर्भचौकटीतून म्हणजेच तुमच्या अवकाश आणि काळातून गाडी जातेय, तर मित्राच्या संदर्भचौकटीतून गाडी येतेय. ही संकल्पना खगोलशास्त्रात अजूनच रंजक होते. समजा आपल्यापासून दहा प्रकाशवर्ष दूर असलेल्या एखाद्या ताऱ्याचा स्फोट झाला. तर आपल्या संदर्भचौकटीतून आपल्याला तो स्फोट झाल्याचे आज दिसेल. परंतु प्रत्यक्षात तो स्फोट दहा वर्षांपूर्वीच होऊन गेलाय. म्हणजेच काय, तर आपल्या संदर्भचौकटीतून आपण वर्तमानात असूनही भूतकाळ पाहातो. त्याचवेळी स्फोटाच्या दृष्टीने मात्र आपण भविष्यकाळ असतो. ही संकल्पना कथेच्या पातळीवर ‘टेनेट’मध्ये अत्यंत सुघडतेने मांडली आहे!

    आता कथानक! एक अनामिक सीआयए एजंट (जॉन डेव्हिड वॉशिंग्टन) आहे, ज्याच्यावर अचानकपणे तिसरं महायुद्ध रोखण्याची जबाबदारी येऊन पडते. हे महायुद्ध कोण घडवणार आहे? कसं घडणार आहे? त्याचे परिणाम काय होणार आहेत? त्याला काही एक ठाऊक नाही. त्याच्याकडे आहे केवळ एकच शब्द, एकच ‘हस्तसंकेत’, तो म्हणजे ‘टेनेट’! या द्विदिश शब्दातून त्याने काढलेला माग, म्हणजे हा थरारक विज्ञानपट, ‘टेनेट’. विज्ञानपट जरी असला, तरीही नोलन त्याला केवळ तेवढ्याच पातळीवर मांडत नाही. तो त्याची मांडणी करताना थरारक गुप्तचरपट अशी करतो. त्यापाठची त्याची प्रेरणा उघडपणे बाँडपट आहेत. त्यामुळे ‘टेनेट’ हा शैलीच्या पातळीवर नोलनच्याच ‘इन्सेप्शन’च्या (२०१०) समीप जाऊनही पूर्णतया भिन्न झालाय. ही भिन्नता नुसतीच कथेच्या पातळीवर नाहीये, तर इतरही अनेक पातळ्यांवर आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर ‘इन्सेप्शन’मध्ये भोवरा होता, इथे एक छल्ला आहे. परंतु त्यांचे संदर्भ अतिशय भिन्न आहेत, कथेच्या सुरुवातीपासूनच अस्तित्वात असूनही अंती नवेच आयाम देणारे! या खेरीजही काही साम्ये वेगळ्या संदर्भांत आहेतच, पण ती आत्ताच सांगणे रसभंग केल्यासारखे होईल. तो दोष न पत्करताही एक गोष्ट मी ठामपणे सांगतो की, ‘टेनेट’समोर ‘इन्सेप्शन’ भावनिक पातळीवर अधिक तरल असूनही बनवायला, मांडायला आणि रचायला खूपच जास्त सोपा चित्रपट आहे. दहा वर्षांतील नोलनची ही चित्रपटकार म्हणून झालेली उत्क्रांती अक्षरशः तोंडात बोट घालायला लावणारी आहे!

    गंमत म्हणजे, ‘टेनेट’ हा नोलनचा आजवरचा सर्वाधिक आत्मभान असलेला चित्रपटदेखील आहे. पुन्हा एकवार रसभंगाचे पातक लागू न देता एक उदाहरण देऊ इच्छितो. खूप साऱ्या अचंबित घटना घडून गेल्यानंतर एका विश्रांतीच्या क्षणी नील (रॉबर्ट पॅटिन्सन) नायकाला म्हणतो, ‘डोकं दुखायला लागलं की नाही’! तेव्हा त्याच्या माध्यमातून खरं तर नोलनच संहितेच्या पातळीवर चौथी भिंत फोडून प्रेक्षकांशी बोलत असतो! आश्चर्य असे की, २०१४ साली लिहिण्यास व २०१९ च्या पूर्वार्धात चित्रिकरणास सुरुवात झालेल्या या चित्रपटात ‘मास्क’ आणि ‘लॉकडाऊन’ या सध्याच्या काळातील सुपरिचित संकल्पना महत्त्वाच्या ठिकाणी वापरण्यात आल्या आहेत, हा भविष्यवेध समजायचा की निव्वळ योगायोग?

    ‘टेनेट’ची या सगळ्या प्रतिभा, चातुर्य, बुद्धिमत्ता वगैरेंच्याही पलिकडे जाऊन भावलेली गोष्ट म्हणजे त्यात ‘मुंबई’ दाखवलीये. तुम्ही म्हणाल, त्यात काय मोठेसे, इतर सहस्रावधी चित्रपटांमध्ये किंबहूना हॉलिवूडच्याच अनेक चित्रपटांमध्ये मुंबई दाखवलीये की! पण तरीही अंतर आहे. हॉलिवूडने बहुतांशी वेळा जेव्हा मुंबई दाखवलीये तेव्हा ती त्या शहराचं आणि पर्यायाने भारताचं बकालपण अधोरेखित करण्यासाठी दाखवलीये. नोलन हा डावा नसल्यामुळे त्याला आजवर अकॅडमी पुरस्कार जरी मिळालेला नसला, तरीही तो डावा नसल्यामुळेच दु:ख, दैन्य आणि दारिद्र्यच तेवढं विकण्याची त्याच्यावर सक्ती नाही. त्यामुळे त्याच्या नजरेतून दिसणारी मुंबई भकास नाही, तर अक्षरशः जिवंत आहे व कथेचा अत्यधिक महत्त्वाचा भागदेखील आहे. ‘इंटरस्टेलर’पासून नोलनचा छायाकार असलेल्या होय्ते व्हान होय्तेमाने टिपलेली मुंबईची दृश्ये अवर्णनीयरित्या अर्थपूर्ण झाली आहेत. एवढेच नव्हे, तर त्याने एकूण चित्रपटाचीच रंगपट्टीका अशाप्रकारे साकारलीये की गोष्टी व स्थळे ऐंशीच्या दशकातील वाटतात आणि तरीही वातावरणात एक अव्यक्त विषण्णता, प्रसंगी ताणसुद्धा जाणवत राहातो. रिळांवर चित्रण करणे ‘टेनेट’च्या पथ्यावरच पडले आहे.

    त्याचवेळी लुडविग गोरान्सनच्या रूपाने नोलनच्या कंपूत नव्यानेच दाखल झालेल्या संगीतकाराने अक्षरशः हान्स झिमरच्याही वरताण संगीत दिलेय. इतक्यातच बोलणे घाईचे होईल, परंतु जर चिकटून राहिला तर मणिरत्नमचा जसा राजानंतर रहमान झाला, तसा हा गोरान्सन सातत्य राखू शकल्यास नोलनचा होऊ शकतो. त्यातही नोलनने खूप साऱ्या छोट्याछोट्या गंमती करून ठेवल्या आहेत. उदाहरणार्थ, संगीत पुऱ्या जोमाने सुरू असतानाच एक पात्र मरतं. त्याच्या मृत्यूच्याच क्षणी बरोब्बर तेवढ्या एकाच क्षणासाठी निरव शांतता पसरते! किंवा सुरुवातीलाच एका ओपेरा हाऊसच्या प्रसंगी आता सिम्फनी चालू होण्याच्या दृष्टीने सगळी तयारी होत असतानाच एक अकल्पनीय घटना घडते आणि दृश्याचं परिमाणच बदलून जातं! एका दृश्याबद्दल लिहिल्याशिवाय राहावतच नाहीये. एक पात्र चालत असते. आणि कुंपणाच्या पलिकडे एक गाडी उभी असते. स्थिर, अचल. पण ते दृश्य चित्रित असे केलेय की वाटते ती गाडी चालत येतेय आणि मग थांबतेय. ‘फ्रेम ऑफ रेफरन्स’चे चपखल उदाहरण!

    जॉन डेव्हिड वॉशिंग्टनला त्याच्या पात्रासाठी आवश्यक असलेला माज पुरेपूर शोभलाय. पण त्याच्यापेक्षा लहान भूमिका असूनही त्याच्यापेक्षा अनेक पटींनी चांगले काम रॉबर्ट पॅटिन्सनने केलेय. चांगली संहिता असेल तर आगामी ‘द बॅटमॅन’मध्ये हा माणूस काहीच्या काही कमाल करणार, यात शंकाच नाही. ब्रिटिश मंडळी सर्जनशील गोष्टींकडे व्यवसाय म्हणून न पाहाता आसक्ती म्हणून पाहातात, याचेच हे द्योतक आहे. याच विधानाचे दुसरे उदाहरण म्हणजे मायकेल केन. या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेत्याने वाट्याला आलेला एकच प्रसंग खणखणीत वाजवला आहे. छोट्या, परंतु अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत डिंपल कपाडिया ठिकठाक वाटते. एलिझाबेथ डेबिकीने काम अतोनात चांगले जरी केलेले असले, तरीही तिची या चित्रपटातील भूमिका आणि ‘द नाईट मॅनेजर’मधील (२०१६) भूमिका यांच्यात लेखनाच्या पातळीवर काही एक अंतर नाही. केनेथ ब्रेनाने मात्र अत्युच्च दर्जाचे काम केले आहे. बऱ्याचशा पात्रांमधील परस्परसंबंध हे पूर्णपणे प्रस्थापित न करता सांकेतिक अर्थाने सूचित करणे ही म्हटलं तर ‘टेनेट’ची जमेची बाजू, म्हटलं तर दोषसुद्धा आहे. या मांडणीमुळे खूप साऱ्या गोष्टी गृहित धराव्या लागतात व गृहित धरलेल्या गोष्टी प्रत्येक वेळी पटतातच असे नाही.

    वरच्या परिच्छेदातील ओपेरावरून आठवलं, ‘टेनेट’ समजण्यापलिकडे अनुभवायचा तर तुम्हाला आणखी एक गोष्ट ठाऊक असायलाच हवी, ती म्हणजे ‘सॅटोर चौरस‘! हा चौरस अनेक ठिकाणी आढळून येतो. सर्वांत जुना चौरस पॉम्पेईत असल्याचे व तो इसवी सनाच्या पहिल्या शतकातील असल्याचे मानतात. या चौरसात असलेली पाचही नावे वेगवेगळ्या मार्गांनी द्विदिश आहेत. ही सगळी नावे पात्रांच्या स्वरूपात आणि पॉम्पेईसारखी ठिकाणे स्थळांच्या स्वरूपात नोलनने कथेत मार्मिकरित्या गुंफली आहेत. किंबहूना ‘टेनेट’ हे नावच त्या सॅटोर चौरसातून घेतले आहे.

    अजून एक गंमतीची गोष्ट सांगू? ‘डार्क नाईट त्रयी’नंतर (२००५ – २०१२) पहिल्यांदाच नोलनने एखाद्या चित्रपटाचे पुढे अनेक भाग बनविण्याचे उघड संकेत दिले आहे. ‘टेनेट’चा पट एवढा व्यापक आहे की, त्याचे एक सबंध चित्रपटविश्व, ज्याला मी ‘टेनेटव्हर्स’ म्हणेन, बनू शकतं. या चित्रपटविश्वावरून आठवलं, ‘वॉर्नर ब्रदर्स’ना खरोखरीच मानलं पाहिजे. कोणत्याही चित्रपटविश्वाचा भाग नसलेल्या, कोणत्याही पातळीवर सुपरहिरोपट नसलेल्या अशा वेगळ्याच विषयाच्या चित्रपटावर त्यांनी तब्बल २ अब्ज डॉलर्स लावले, ही खरोखर आजच्या काळात दुर्मिळ असलेली धाडसी गोष्ट आहे! अर्थात असा विश्वास दाखवायला नोलनसारखा सातत्यपूर्ण माणूसही त्यांच्याकडे होता, ही बाब वेगळी! पण दहा-बारा वर्षांपूर्वी तरी परिस्थिती जरा बरी होती. मग सुरू झालं एमसीयू. मार्टिन स्कॉर्सेसीच्या मते एमसीयूचे चित्रपट म्हणजे ‘चित्रपट’च नव्हेत! या संदर्भात या लेखाची सुरुवात पुन्हा एकदा वाचा. पण माझे मत जरासे वेगळे आहे. एमसीयूचे चित्रपट ‘चित्रपट’ असतील किंवा नसतीलही कदाचित, परंतु त्यांनी एक महत्पाप करून ठेवलेय. त्यांनी प्रेक्षकांचा एकूण बुद्ध्यांक कमी करून टाकलाय. तितकं भडक, तितकं उघड आणि तितकं उथळ (तिन्हींनाही काही सन्माननीय अपवाद आहेत!) काही असेल तरच ते पाहाण्याची आणि त्याहून सखोल काही असेल तर ते समूळ नाकारण्याची एक नवीनच वृत्ती निर्माण झालीये. विशेषतः जे मिलेनियल्स आता किशोरावस्थेत आहेत, त्यांच्या बाबतीत ही बाब प्रकर्षाने जाणवते. ते ‘टेनेट’ला स्वीकारण्याची शक्यता कमीच आहे. ‘भवभूती’च्याही ‘उत्तररामचरितम्’ला तत्कालीन मंडळींनी स्वीकारले नव्हते म्हणतात, त्यावर तो महाकवी ठामपणे म्हणाला होता की,
    “ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञां
    जानन्ति ते किमपि तान्प्रति नैष यत्नः।
    उत्पत्स्यतेऽस्ति मम कोऽपि समानधर्मा
    कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी॥”
    अशी दंतकथा आहे. मी एमसीयू अथवा कुणावरही दोषारोप करत नाही. मी केवळ एक विधान करतोय. ‘टेनेट’चे आयएमडिबी मानांकन आज कदाचित कमी असेलही, पण गेली वीस वर्षे नोलनचा प्रत्येक चित्रपट पाहाणारा एक रसिक म्हणून सांगतो, ‘टेनेट’ हा ‘तांत्रिकदृष्ट्या’ नोलनचा आजवरचा बनविण्यास सर्वांत अवघड आणि सर्वश्रेष्ठ चित्रपट आहे. तो भावनिक पातळीवर एका मर्यादेपलिकडे साद घालत नाही, तो काही पात्रांचे परस्परसंबंध गृहित धरायला लावतो या गंभीर उणीवा सोडल्या, तर तो गेल्या तीन-एक वर्षांत आलेला सर्वाधिक अर्थपूर्ण चित्रपटसुद्धा आहे!

    *४.७५/५

    — © विक्रम श्रीराम एडके.

    [अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

  • शब्दांत न मावणारी — बॉडीगार्ड

    मी अनेक चित्रपटांबद्दल लिहितो. गेल्या काही वर्षांपासून मला आवडलेल्या मालिकांबद्दल देखील नियमितपणे लिहितो. अगदी “गेम ऑफ थ्रोन्स”सारख्या (२०११-१९) ७३ भागांच्या किंवा “पर्सन ऑफ इंटरेस्ट”सारख्या (२०११-१६) १०३ भागांच्या मालिकेबद्दलही मी भरभरून लिहिलंय. त्यांच्याबद्दल लिहिताना माझी लेखणी कुंठित झाल्यासारखी, अवरुद्ध झाल्यासारखी आजवर कधी एकदा सुद्धा वाटली नाही. परंतु आज मात्र माझी लेखणी एका अवघ्या ६ भागांच्या मालिकेपुढे थबकली आहे. चोवीस तास उलटून गेले मी ही मालिका पाहून, परंतु अजूनही मी लिहिताना शंभरदा खोडतोय. ती मालिका म्हणजे, बीबीसी-वनची “बॉडीगार्ड” (२०१८-)!

    डेव्हिड बड/बुड (रिचर्ड मॅडेन) हा भूतपूर्व सैनिक युद्धावरून जरी परतलेला असला, तरीही युद्धाच्या जखमा अद्यापही अंगावर आणि मनावर बाळगून आहे. तशातच त्याची निवड कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाची सांसद आणि गृहसचिव ज्युलिया मॉण्टेग्यूचा (कीली हॉज) अंगरक्षक म्हणून होते. ही बाई मोठी धीराची आहे. अल्पावधीतच तिने राष्ट्रीय राजकारणात मोठी मजल मारलीये. आणि आता ती संसदेत जे विधेयक मांडणार आहे, त्यानंतर तर ती थेट पंतप्रधानपदाच्या शर्यतीतच आघाडी घेण्याची शक्यता आहे. यातून अर्थातच कल्पनेपल्याडचा आवाका असलेलं शह-काटशहांचं घट्ट जाळं विणलं जाऊ लागतं!

    माझा एक सर्वसाधारण नियम आहे. कोणत्याही मालिकेने पहिल्या पंधरा मिनिटांत मला प्रभावित केले नाही, तर नंतर तिने प्रभावित करण्याची शक्यता खूपच खालावते. उदाहरणार्थ, “पर्सन ऑफ इंटरेस्ट”. ती पहिल्या दहा मिनिटांतच चित्रपटीय तंत्रे, कथन आणि साहसदृश्ये अशा विविध आघाड्यांवर जी बाजी मारते की, मालिका पाहाण्याच्या उत्साहाला जेटपॅकच लागले पाहिजे. “बॉडीगार्ड”चा पहिला प्रसंग एका रेल्वेत घडतो. जवळजवळ पंधरा-वीस मिनिटं चालतो तो. खरं सांगतो, तो प्रसंग संपल्यावर मी दहा मिनिटं मालिका पॉज करून बसलो होतो, फक्त शांतपणे श्वास घेण्यासाठी! एवढी ही मालिका तुम्हाला शोषून घेते. इतका ताण मी अलिकडच्या काळात कोणत्याच मालिकेत अनुभवलेला नाही. एवढेच नव्हे, तर प्रत्येक भागातील तणावाच्या प्रत्येक प्रसंगात तितकाच तणाव निर्माण करण्यात ही मालिका पूर्णपणे यशस्वी ठरली आहे.

    डेव्हिड आपल्या कामात कमालीचा पक्का आहे. पण वैयक्तिक दृष्ट्या त्याला मॉण्टेग्यूचे राजकारण पटत नाही. किंबहूना त्याला राजकारणाची तितकी सखोल समजदेखील नाही. तो आपला साधा रांगडा सैनिक आहे. आयुष्य आणि परिस्थिती दोन्ही बाजूंनी गांजलेला आहे. त्याचं नशिब अतिशय वाईट आहे. त्याच्या कामाच्या ठिकाणी त्याला लोकांचं ऐकून घ्यावं लागतं, ते त्याचं कामच आहे. सगळीकडचे वरिष्ठ त्याला सहजी वापरून घेतात. परंतु वैयक्तिक आयुष्यातही तो अतिशय अपोलोजेटिक बनलाय. तो जितक्या वेळा बायकोला उगाचच सॉरी म्हणतो, तितकं क्वचितच कुणी म्हणत असेल. पण तरीही तो अत्यंत चाणाक्ष आहे. त्याच्या कामासाठी आवश्यक अशा एकूण एक थियरेटिकल आणि प्रॅक्टिकल कौशल्यांचा खजिना आहे त्याच्यापाशी. इतकं गुंतागुंतीचं पात्र अलिकडच्या काळात क्वचितच कोणत्या मालिकेत लिहिलं गेलं असेल. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या सगळ्याच्या सगळ्या बाबी रिचर्ड मॅडेनने ज्या काही संयतपणाने अधोरेखित केल्या आहेत त्याला तोड नाही.

    मुळात ही मालिका मी बघायला सुरू केली होती ती “अरे, रॉब स्टार्कची मालिका” असा विचार करून. परंतु पहिल्या दहाच मिनिटांत रिचर्ड मॅडेनने माझ्या मनातील त्याची रॉब स्टार्कची छवि कायमची पुसून टाकली. त्याने जे काम केलेय, ते अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. “बॉडीगार्ड”च्या भूमिकेत आपल्या वैयक्तिक भावना चेहऱ्यावर दिसू न देण्याची त्याची शैली निव्वळ अप्रतिम आहे. एकदा त्याला ड्युटीवर असताना हसायचा प्रसंग येतो, त्या वेळी तो ज्या प्रकारे पापणीची उघडझाप करावी तितक्या निमिषार्धात तोंड उघडून मिटतो की, वाह रे वाह! किंवा एकदा त्याला ड्युटीवर असताना एक वाईट बातमी समजते. तो त्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही, परंतु त्याचा एकच गाल ज्या सहजपणे थरारतो, तो निव्वळ बघण्याचा विषय आहे. तोच रिचर्ड मॅडेन डेव्हिडचे वैयक्तिक आयुष्य चितारताना मात्र कायिक अभिनयातून भावनांचा कल्लोळ असा काही चितारतो की, विचारता सोय नाही. प्रमाणापलिकडे हँडसम, ब्रिटीश आणि अभिनयाची सांगोपांग जाण असणारा हा माणूस सर्वार्थाने उज्ज्वल भविष्याचा धनी आहे. त्यामुळेच जेम्स बॉण्डची भूमिका करण्यासाठी योग्य निवड कोण असे जर कुणी मला विचारले, तर मी क्षणाचाही विलंब न करता इथून पुढे रिचर्ड मॅडेनचेच नाव घेणार आहे. शेकडो कारणं आहेत “बॉडीगार्ड” पाहाण्याची, परंतु एकाच कोणत्या तरी कारणासाठी पाहाणार असाल, तर फक्त आणि फक्त रिचर्ड मॅडेनच्या कामासाठी पाहा! अर्थातच कीली हॉजने व्यावसायिक आयुष्यात कणखर परंतु वैयक्तिक आयुष्यात कमालीची भित्री ज्युलिया मॉण्टेग्यू तितक्याच सक्षमपणे उभी केलीये. तिच्या माध्यमातून लेखक आणि दिग्दर्शकांनी राजकीय व्यक्तिमत्त्वांच्या दुहेरी आयुष्यावर केलेले भाष्य अगदीच अचूक आहे!

    काही मालिका या थ्रिलर असतात. काही पॉलिटिकल थ्रिलर असतात. काही सस्पेन्स थ्रिलर असतात. काही अॅक्शन थ्रिलर असतात. काही सायकॉलॉजिकल थ्रिलर असतात. “बॉडीगार्ड” मात्र अशा दुर्मिळ प्रजातीत येते की, ती एकाच वेळी या सगळ्याच प्रकारची आहे. ती एकाच वेळी जिहाद, उजव्या विचारसरणीचा नैसर्गिकरित्या जगभर चढता आलेख, युद्ध आणि त्याचे परिणाम, राजकारणातील दुर्गम डावपेच, कायदा आणि सुव्यवस्था, पीटीएसडी अशा वेगवेगळ्या – म्हटलं तर परस्परावलंबी आणि म्हटलं तर पूर्णतया भिन्न विषयांबद्दल अनेक स्तरांवर आणि सखोल भाष्य करते, आणि ते ही केवळ ६ च भागांत! या मालिकेत दाखवलेले राजकारण हे शब्दशः “हाऊस ऑफ कार्ड्स” (२०१३-१८) आणि “गेम ऑफ थ्रोन्स”च्या वरताण आहे. “बॉडीगार्ड” आणि त्यांच्यातील सगळ्यांत मोठा फरक म्हणजे, उपरोक्त दोन्हीही मालिका या नंतरच्या पर्वांमध्ये पारच गंडल्या, परंतु “बॉडीगार्ड”ला मात्र भल्याभल्यांना न समजू शकलेली एक गोष्ट समजलीये, नेमके कुठे थांबायचे! आपण कितीही अंदाज लावायचा प्रयत्न केला तरीही असीम संयतपणे उलगडत जाणाऱ्या या नाट्याने रहस्याच्या पेटाऱ्यावरील झाकण अखेरपर्यंत घट्ट बंद राखण्यात पूर्ण यश मिळवलेय.

    तुम्ही जर मालिका त्यांच्यातील चित्रपटीय तंत्रांसाठी पाहात असाल, तर या मालिकेसारखी दुसरी मालिका एवढ्यात तरी कोणतीच दिसत नाही. स्टीव्ह सिंगल्टन व अँड्र्यू जॉन मॅकक्लिलण्ड यांनी तणावाचे प्रसंग ज्या पद्धतीने संपादित केले आहेत, ते संपादनाचे वस्तुपाठ आहेत. जॉन ली ने ज्या पद्धतीने दृश्ये त्यांच्या चपखल कलर पॅलेटसह चितारली आहेत, ती छायाचित्रणाचा वस्तुपाठ आहेत. थॉमस व्हिन्सेंट आणि जॉन स्ट्रिक्लॅण्ड यांनी छोट्या छोट्या प्रसंगांतून, साध्याश्याच सूचक वाक्यांतून, सांकेतिक मौनांतून जे नाट्य उभे केलेय, ते दिग्दर्शनाचे वस्तुपाठ आहेत. एकच उदाहरण सांगतो. ज्युलियाची टिव्हिवर प्रश्नोत्तरी चित्रित होतेय. ती प्रश्नांची उत्तरं देतेय. परंतु कॅमेरा मात्र डेव्हिडच्या चेहऱ्यावर आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर तिची प्रश्नोत्तरी प्लेबॅकमध्ये दिसतेय. तिच्या शब्दांवर तो मौनातूनच प्रतिक्रिया देतोय, हे दृश्य इतक्या कल्पकतेने चित्रित केलेय की मन आपसूकच स्तुती करू लागते! एक उदाहरण म्हणालो, पण अजून एक सांगण्याचा मोह आवरतच नाहीये. डेव्हिड ज्युलियाच्या कार्यालयाबाहेर उभा राहून तिच्यावर लक्ष ठेवतोय. ती कार्यालयात एक मिटिंग घेतेय. दृश्य त्याच्या पीओव्हीने आणि त्रयस्थ असे इंटरकटमध्ये दिसते. परंतु ऐकू मात्र केवळ त्रयस्थ नजरेतूनच येते. त्याच्या पीओव्हीला पूर्ण शांतता आहे. का? कारण तो साऊंडप्रुफ काचेच्या बाहेर उभा आहे. इतक्या साध्या युक्तिने दिग्दर्शक तांत्रिक गंमत तर करतोच, शिवाय त्या दोघांमधील सामाजिक आणि बौद्धीक दरीदेखील उभी करतो! असे अनेक छोटे-छोटे प्रसंग आहेत, जे निव्वळ तांत्रिक क्षमतेच्या जोरावर शहारा निर्माण करतात. कसदार कथेला अशी तांत्रिक शुद्धतेची जोडच, या मालिकेला अजोड बनवते!

    व्यक्तिश: मी अमेरिकन मालिकांपेक्षा ब्रिटीश मालिकांचा चाहता आहे. एक तर ते अजूनही अभिनयाला व्यवसायापेक्षा कला अधिक समजतात. त्यांचे नाट्य हे कायमच नैसर्गिक असते. मी सदर्न, नॉर्दर्न, कॉक्नी, स्कॉटीश, आयरीश वगैरे विविध ब्रिटीश उच्चारपद्धतींचा अतोनात पंखा आहे. त्यांची शब्दसंपदा, उच्चारण्याच्या खानदानी आणि इतर पद्धती – हे खरं इंग्लिश. अमेरिकनांनी इंग्रजी भाषेचे आपल्या संस्कृतीहीन वर्तनाने अवमूल्यनच तेवढे केलेय. पण माझा हा झुकाव बाजूला ठेवूनही “बॉडीगार्ड” सगळ्यांच पातळ्यांवर सरसच ठरते. वर मी लिहिलेय की, या मालिकेबद्दल लिहिताना माझी लेखणी कुठून सुरुवात करू आणि काय काय लिहू, या विचारांनी अक्षरशः थबकलीये. आता एवढं लिहून झाल्यावरही माझी ती आणि तशीच भावना कायम आहे. एवढे लिहूनही खूप काही लिहायचे राहूनच गेले आहे, नि:संशय “बॉडीगार्ड” ही मालिका खरोखरच शब्दातीत आहे!

    *५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

    टीप: “बॉडीगार्ड” नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

  • पंचेश्वरम्

    लंकादहन करून हनुमान जसा परततो तसे युद्धकांड सुरू होते. श्रीराम हनुमानाला लंकेचे वर्णन करायला सांगतात. लक्षात घ्या, हनुमान हा जरी सीतेचा शोध लावण्यासाठीच गेलेला असला, तरीही लंकादहन करताना आणि त्याहीपूर्वी लंकेत भ्रमण करताना त्याने अतिशय बारीक नजरेने सगळे टिपलेय. तेच तो आता रामाला तपशीलवार सांगतो की (युद्ध. सर्ग ३), “लंका अत्यंत संपन्न असून मत्त हत्तींनी व्याप्त आणि रथांनी समृद्ध आहे. तिला चार मोठमोठे आणि दुर्जेय असे दरवाजे आहेत. या चारही दरवाजांवर यंत्रे बसवलेली आहेत ज्यांच्यातून शत्रूसैन्यावर बाणांचा आणि दगडांचा वर्षाव केला जाऊ शकतो. तिथेच लोखंडाने बनलेल्या अनेक काटेदार शतघ्नीसुद्धा तैनात आहेत. लंकेच्या चहुबाजूंनी अभेद्य अशी तटबंदी आहे. तिच्याभोवती खंदक आहेत ज्यात मगरी आणि मोठमोठे मासे वास करतात. खंदकांवर उपरोक्त चारही दरवाजांना जोडणारे असे चार पूल आहेत. शत्रूसैन्य या पुलांवर चढलं की त्या पुलांना पाण्यात पाडण्याची यंत्रांकरवी सोय केलेली आहे. या पैकी कोणत्याच कामांमध्ये ढिलाई न होण्याकडे रावण स्वतः जातीने लक्ष पुरवतो. याउप्पर लंकेच्या भोवती या कृत्रिम तटबंदीखेरीज नद्या, पर्वत आणि जंगलदेखील आहे. लंका ही समुद्रकिनाऱ्यापासून बरीच आत दक्षिणेकडे आहे. त्यातही ती उंचावर वसलेली आहे. तिच्या पूर्वद्वारावर दहा सहस्र राक्षसांचा खडा पहारा आहे. हे सैनिक हातात शूल धारण करतात आणि युद्धप्रसंगी तलवारींनी झुंजतात. असंच दक्षिणद्वारी एक लाखाचं चतुरंग अर्थातच हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ यांनी सुसज्ज सैन्य आहे. लंकेच्या पश्चिमेकडे सैन्यसंख्या दहा लाख आहे. हे सैनिक अस्त्रशस्त्रांमध्ये निपुण आहेत व त्यांच्याकडे ढाल आणि तलवारीसुद्धा आहेत. उत्तरेच्या दरवाजापाशी असेच दहा कोटी सैनिक उभे आहेत. त्यांच्यापैकी काही रथी आहेत व काही अश्वारोहणात निपुण असून सगळेच उच्चकुळांमध्ये जन्मलेले वीर आहेत. लंकेच्या मध्यभागी साधारण एक कोटीचे सैन्य असावे. परंतु मी इकडे येण्यापूर्वी खंदकांवरील सगळे पुल तोडून टाकलेयत. खंदक फोडून टाकलेयत. सगळीकडे आगी लावल्यायत. ठिकठिकाणी तटबंदी तोडून टाकलीये आणि सुमारे एक चतुर्थांश सैन्यदेखील मारलेय. जर आपण एखाद्या उपायाने समुद्र लांघू शकलो, तर लंका नष्ट झालीच म्हणून समजा”!

    हनुमानाची लंकेवर आक्रमण करण्यासाठी घाई चाललीये याचे कारण उघड आहे की, त्याला रावणाचे झालेले नुकसान दुरुस्त करायला वेळच मिळू द्यायचा नाहीये. त्याने लंकेचे अतिशय बारीकसारीक वर्णन केलेय. जणू लंकेचा शब्दबद्ध नकाशाच! त्यातही एक गोष्ट विशेष लक्ष वेधून घेते. ती म्हणजे (श्लो. २४ ते २७) लंकेच्या पूर्वेला दहा हजार, दक्षिणेला एक लाख, पश्चिमेला दहा लाख आणि उत्तरेला दहा कोटी सैन्य आहे. आता खरोखरच त्या काळी लंकेची लोकसंख्या एवढी होती का या भानगडीत न पडता आपण मुद्याची गोष्ट तेवढी लक्षात घेऊ. मुद्याची गोष्ट अशी की, लंकेच्या पूर्वेकडे सगळ्यांत कमी सैन्य आहे आणि घड्याळी पद्धतीने ते अनुक्रमे दक्षिण, पश्चिम व उत्तरेपर्यंत वाढत जाते. काय कारण असावे याचे? श्रीलंकेचे भौगोलिक स्थान पाहा. पूर्व आणि दक्षिण किनारपट्टीपासून कोणत्याही देशाची भूमी भरपूर लांब आहे. याउलट उत्तर आणि पश्चिमेपासून भारत खूपच जवळ आहे. त्यामुळेच रावणाने उत्तर आणि पश्चिमेकडे, जिथून आक्रमण होण्याची सर्वाधिक शक्यता आहे, तिकडे महाप्रचंड आणि विशेष सैन्य ठेवलेय तर पूर्व व दक्षिणेकडे तुलनेने कमी सैन्य ठेवलेय.

    ही तर झाली सामरिक रचना. परंतु श्रीलंकेच्या भोवती आज अशीच एक आध्यात्मिक रचनासुद्धा आहे. कोणती? लंकेच्या किनारपट्टीवर वेगवेगळ्या ठिकाणी पाच वेगवेगळी शिवमंदिरे आहेत. यांनाच पंचेश्वरम् असे म्हणतात! पहिले आहे ते उत्तरेला जाफनास्थित नगुलेश्वरम्. वायव्येला असलेले मन्नार जिल्ह्यातील केतिश्वरम् हे दुसरे. तिसरे आहे ते ईशान्येकडील त्रिंकोमाली जिल्ह्यातील कोणेश्वरम्. चौथे पश्चिमेला पुट्टालम जिल्ह्यातील मुन्नेश्वरम्. आणि पाचवे आहे दक्षिणेकडील मातरा जिल्ह्यातील तोण्डेश्वरम्! जणू श्रीलंकेचे रक्षण करण्यासाठी तिच्याभोवती उभे असलेले भगवान शिवशंकरच! त्यांचीही रचना बहुतांशी रावणाच्या सैन्यरचनेसारखीच आहे. उत्तरेपाशी तीन शिवमंदिरे आहेत आणि पश्चिम व दक्षिणेकडे अनुक्रमे एक एकच शिवमंदिरे आहेत. जणू एखादं आध्यात्मिक सुरक्षकवचच! कदाचित उत्तर आणि पश्चिमेकडून अर्थातच भारतातून जास्त दळणवळण असल्याने भाविकांची संख्या जास्त असेल व म्हणूनही मंदिरे तिकडे अधिक संख्येने असू शकतील. सतराव्या शतकात पोर्तुगीझ मिशनऱ्यांनी ही पाचही मंदिरं ध्वस्त केली होती. अनेक ठिकाणी मंदिरांच्या जागी चर्च बांधले होते. तिथे भाविकांनी वेळोवेळी परत मंदिरे उभारली आहेत.

    मी येत्या मार्चमध्ये श्रीलंकेला जातोय. या वेळच्या वेळापत्रकात सगळेच नाही तरी पंचेश्वरांपैकी दोन मंदिरांचे दर्शन घेण्याचा कार्यक्रम आहे. एक कोणेश्वरम् आणि दुसरे मुन्नेश्वरम्! यांपैकी कोणेश्वरमला दक्षिण कैलास (तमिळ: तेन कैलासम्) असे म्हणतात. याचं कारण काय असावं याचा शोध घेताना मला एक ब्लॉग आढळला. त्यात कैलास पर्वत आणि कोणेश्वरम् यांचे भौगोलिक स्थान दिले आहे. कैलासाचे स्थान ३१° ४’ उत्तर व ८१°१८’ पूर्व असे सांगितले आहे तर कोणेश्वरमचे स्थान ८°३५’ उत्तर व ८१°११’ पूर्व असे सांगितले आहे. (गुगलवर हीच स्थाने अनुक्रमे ३१°०६’ उत्तर व ८१°३१’ पूर्व आणि ८°५८’ उत्तर व ८१°२४’ पूर्व अशी आढळतात.) उपरोक्त ब्लॉगच्या लेखकाचा दावा आहे की, दोन्ही स्थाने पूर्णार्थाने जरी नाही तरी बऱ्यापैकी एकाच रेखांशावर येतात! हे वाचायला छान वाटतं, परंतु भूगोलातील कुणा तज्ञाने याची सत्यता पडताळून सांगितली तरच विश्वास ठेवलेले चांगले. दुसरे असे की, स्थानिक मान्यतेनुसार रावणाचा वध केल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी ज्या स्थानी भगवान शिवाची अर्चना केली, त्या स्थानावर मुन्नेश्वरम् मंदिर उभे आहे. मला तरी वाल्मिकी रामायणात असा कोणताच संदर्भ अद्याप आढळलेला नाही. परंतु कधीकधी स्थानिक श्रद्धा व परंपरांचे महत्त्व लेखी गोष्टींपेक्षा अधिक हे असतेच.

    दोन्हीही मंदिरांचे दर्शन घेतल्यावर त्यांच्याबद्दल सविस्तर लिहितोच. मी येत्या २ मार्च ते ९ मार्च कालावधीत श्रीलंकेला जातोय. रामायणाशी संबंधित काही स्थळे, काही पर्यटनस्थळे पाहातानाच तिथे रोज एक याप्रमाणे सोबत येणाऱ्या यात्रेकरूंसाठी वाल्मिकींच्या रामायणावर पाच व्याख्याने देणार आहे मी. तुम्हीही सहभागी होऊ इच्छित असाल, तर अद्याप जागा शिल्लक आहेत. ‘माय ट्रॅव्हल वर्ल्ड’च्या श्रीमती वीणा निंबाळकर यांच्याशी +919921907772 या क्रमांकावर संपर्क साधा आणि आजच आपल्या जागा आरक्षित करा! चला अनुभवूया रावणाच्या राज्यात रामायण!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

  • सावरकरकृत अस्पृश्यता निवारण और सामाजिक एकता

    वीर सावरकर जी की जीवनी अद्भुत, अदम्य साहसों से लबालब भरी हुई है । नेता, संगठक, क्रांतिकारी, इतिहासकार, राजनीतीज्ञ, युद्धनीतीज्ञ, वक्ता, समाज सुधारक, लेखक, लेखक के रूप में भी नाटककार, उपन्यासकार, कथाकार, कवि, कवि के रूप में भी खंडकाव्यकार, दीर्घकाव्यकार, महाकवि, शाहीर; और न जाने कितने ही पहलू मात्र एक ही व्यक्ति के है, इस पर कदाचित आने वाली पीढियाँ विश्वास भी न करें । सरल तरह से देखें तो उन के जीवन के जन्म से ले कर लंडन जाने तक का काल विद्यार्थिदशा, लंडन में क्रांतिकारी, अंदमान से ले कर रत्नागिरी तक बंदी, रत्नागिरी से ले कर बिनाशर्त मुक्तता तक समाज सुधारक, मुक्तता से ले तर स्वातंत्र्यप्राप्ती तक राजनीतीज्ञ और फिर स्वातंत्र्यप्राप्ती से ले कर आत्मार्पण तक वार्धक्य ऐसे विभाग पडते है । किंतु कोई भी व्यक्ति ऐसे विभागश: जीता है क्या? उदाहरण के तौर पर देखे, तो सावरकर जी ने १९३७ के पश्चात राजनीती में खुल कर भाग लिया । किंतु क्या उन के क्रांतिकार्य में अंग्रेजों को हराने की राजनीती नहीं थी? यहीं नियम लागू होता है इस लेख के विषय यानी ‘अस्पृश्यता निवारण और सामाजिक एकता’ को । आम तौर पे तो यह विषय केवल सावरकर जी के रत्नागिरी में किए गए कार्य से ही संबद्ध लगता है । और यह सत्य भी है कि, रत्नागिरी में स्थलबद्धता की अवस्था में वे इस कार्य में सर्वाधिक निमग्न रहे । किंतु अगर आप सावरकर जी के चरित्र का बारीकी से अवलोकन करे, तो पाएंगे कि, यह दोनों विषय उन के समूचे जीवन की ही कथा है ।

    मराठी भाषा में एक मुहावरा है, ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ । इस का शब्दार्थ होता है, बच्चे के पाँव पालने में दिखते है । किंतु इस का भावार्थ यह है कि, मनुष्य जीवन में आगे चल कर क्या करने वाला है इस की झलक बचपन से ही दिखने लगती है । बात सन १९०२ की है । उन दिनों मुंबई के ‘हिंदु युनियन क्लब’ की ‘हेमंत व्याख्यानमाला समिती’ हुआ करती थी । उन्हें ने एक काव्य स्पर्धा का आयोजन किया था । विषय था ‘बालविधवा दु:स्थितीकथन’ । सावरकर जी की आयु मात्र १९ वर्ष की थी । आज की भाषा में कहा जाए तो टीनेज । किंतु इस छोटी सी आयु में भी उन्होंने इस विषय पर जो कविता लिखी, वह थी १०२ पंक्तियों की कविता (समग्र सावरकर वाङ्मय, खंड ७, आवृत्ति वर्ष १९९३, पृ. २७) जिसे उस वर्ष का प्रथम पारितोषिक प्राप्त हुआ था । तात्पर्य यह कि, सावरकर बचपन से ही सामाजिक विषयों के प्रति जागृत एवं अभ्यासरत थे । उन का समाज के, तथा दीन-दुखियों के प्रति संवेदना से भरा यह दृष्टीकोन स्थलबद्धता से छूटने के बाद भी स्पष्ट रूप से दिखता है । सावरकर जी कि मुक्तता १९३७ में हुई । तत्पश्चात उन्हों ने हिंदुमहासभा पार्टी से जो राजनीती की, उस का उद्देश्य उन्हीं के रचे एक श्लोक में झलकता है । वे लिखते है,
    ‘राष्ट्रस्वतंत्रता ध्येयं यथा साध्यं च साधनम् ।
    अभ्युत्थानाय हिंदुनामयं पक्ष: प्रवर्तित: ।।’
    यानी सावरकर जी का उद्देश्य राष्ट्र की स्वतंत्रता के साथ ही साथ हिंदुओं का अभ्युत्थान भी था । इस अभ्युत्थान के मायने भी जातिपातिविरहित, सबल व सशक्त हिंदु समाज का निर्माण ही थे । सावरकर लिखते है कि, ‘जातिभेद के निवारण हेतु मैं विद्यार्थीदशा से ही प्रकट रूप से प्रयत्नरत था । महाविद्यालय में भी मेरा वर्तन उसी ओर रहा । आगे चल के अंदमान में मैंने इस विषय पर जो भी चिंतन किया, उस का व्यावहारिक आचरण कर के मैंने सैंकडों भेदमूलक दुष्ट धारणाओं का उच्चाटन किया है (स. सा. वा. खंड ३, आवृत्ति वर्ष १९६४, पृ. ६४२) ।

    जैसे कि उपर लिखा है, यह सत्य है कि सावरकरकृत अस्पृश्यता निवारण और सामाजिक एकता का कार्य सर्वाधिक रत्नागिरी से ही किया । किंतु ऐसी क्या बात हुई की उन्हें इस कार्य में स्वयं को पुरज़ोर झोंकना पडा? इस प्रश्न का उत्तर है अंदमान! प्राकृतिक सौंदर्य से सराबोर इस द्वीपकल्प पर अंग्रेज़ों ने सैल्युलर जेल नामक दैत्याकार कारागृह बनाया था । इस का एक भयकारी नाम कालापानी भी है । जब अंग्रेज़ों ने सावरकर जी को २५ अधिक २५ वर्ष यानी कुल ५० वर्षों का अमानुष आजीवन कारावास घोषित किया, तब उन की रवानगी इसी कालापानी में हुई (स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र, पृ. ३४२ , लेखक शि. ल. करंदीकर, आवृत्ति वर्ष २०११) । यद्यपि आज अंदमान, वीर सावरकर जी के अस्तित्व से पुनीत क्रांतितीर्थ कहलाता है, उन दिनों वह खौफ़ का पर्यायवाची ही कहलाता था । वहाँ सावरकर जी ने क्या देखा? उन्हों ने देखा कि, अनेकों कारणवश दंडित हिंदु बंदीयों कि संख्या यहाँ सर्वाधिक है, किंतु उन पर हुकूमत चलाने वाले वॉर्डन्स अधिकांश अहिंदु है । संख्याबल होते हुए भी ऐसा क्यूँ, इस प्रश्न का उत्तर उन्हें मिला हिंदुओं की जातिव्यवस्था में । संख्याबल होते हुए भी हिंदु आपस में ही बँटे हुए थे । इस त्रुटी का लाभ उठा कर अहिंदु न केवल उन पर हुकूमत चलाते थे, अपितु अज्ञानी बंदीयों का धर्मांतरण भी करते थे । इस शोचनीय अवस्था का एक उदाहरण वाचकों के समक्ष रखना बिलकुल भी अप्रस्तुत न होगा ।

    यह घटना स्वयं सावरकर जी ने स्वयं ही अपने बंदीवास के बारे में लिखी गयी जीवनी, ‘माझी जन्मठेप’ में लिखी है । अंदमान में कोयले से लदे हुए जहाज़ आया करते थे । बोरियाँ उतारने का काम बंदीयों को ही करना पडता था । इस काम पर लगे बंदीयों को समय बचाने के लिए खाना नहीं दिया जाता था, बल्कि दो-चार मुठ्ठी भर चने दिए जाते थे । तो हुआ यूँ कि, एक दिन जब भोजन का समय हुआ तो अहिंदु बंदी जल्दी से भाग कर अपनी चने की बोरियों की तरफ़ गए । और उन में से कुछ लोगों ने हिंदुओं के लिए सुनिश्चित बोरियों से भी चने खाने शुरू कर दिए । यह जब हिंदुओं ने देखा तो धर्म भ्रष्ट होने के डर से किसी भी हिंदु ने चनों को हाथ तक न लगाया । उस दिन उन्हें फ़ांका पडा । अहिंदु बंदीयों को रोज़ के मुक़ाबले अधिक खाना मिल गया । अब तो यह प्रतिदिन की ही बात हो गयी । रोज़ हिंदु कैदी काम कर के, थक-हार के खाने कि तरफ़ जाते और रोज़ वह दृश्य देख कर उन्हें भूखे पेट ही रहना पडता । उन्हों ने जब अधिकारीयों से शिकायत की तो वह लोग भी उन पर हँसने लगे । फिर वह अपने बडे बाबू यानी सावरकर जी के पास आए । सावरकर जी ने उन्हें एक तरकीब बताई । दूसरे दिन जब खाने का समय हुआ तो हिंदु बंदी सब से पहले भाग के बोरियों की ओर गए और अपनी तो अपनी अहिंदुओं की बोरियों से भी चने खाने लगे । जब झगडे की नौबत आयी, तो हिंदुओं ने सावरकर जी ने बताई बात उन को दो टूक सुना डाली की, यदि तुम्हारे पहले छूने से यह चने अहिंदु होते है, तो हमारे छूने से अब यह हिंदु हो गए है । बात ज़मादारों तक पहुँची तो वे हँसने लगे, ठीक वैसे ही जैसे वे हिंदुओं पर हँसे थे । तब कहीं जा कर उन्हें सावरकर जी द्वारा पढाया पाठ ठीक से समझा कि, धर्म का स्थान व्यक्ति का पेट नहीं अपितु उस का ह्रदय होता है ।

    इस प्रकार एक एक कर के हिंदुओं को जातिवाद की घिनौनी रूढी से बाहर निकालने का उपक्रम चल रहा था । वह भी अंदमान के निर्मम कारागार में जहाँ के हालातों के सामने नर्क भी स्वर्ग लगे । सावरकर दिन भर कोलू चला कर तेल निकालते, नारियल की रस्सियाँ बुनते, जरा-जरा सी बात पे एकांतवास तथा डंडाबेडी जैसे नृशंस दंड भोगते और इतना होते हुए भी वे शुद्धीयज्ञ चलाते, बंदीयों को पढाते, कविताएँ लिखते और जातिवाद की समस्या पर चिंतन करते रहते । हमारे और आप के आरामदायक जीवन से कहीं परे था यह व्रत । उसी चिंतन के फलस्वरूप सावरकर जी के समक्ष उजागर हुई एक बात । वह यह की, मुख्यभूमि हिंदुस्थान भी तो अंदमान का ही बडा स्वरूप है । वह भी तो अंग्रेजों द्वारा बनाया एक बंदीगृह ही है, वहाँ भी तो हिंदुओं कि बहुसंख्या होते हुए भी सदियों से मुठ्ठीभर अहिंदु राज करते आ रहे है और उस का भी तो कारण हिंदु समाज को लगा जातिवाद का रोग ही तो है । जिस आग्रह, तप, निश्चय एवं दृढता के साथ सावरकर जी ने अंदमान के कारागृह से जातिवाद मिटाया, वहीं काम मुख्यभूमी में करने की आवश्यकता थी । और यह अवसर उन्हें मिला रत्नागिरी की स्थलबद्धता में । मानों अंदमान जातिवाद मिटाने का पाठ्यक्रम हो और रत्नागिरी प्रयोगशाला ।

    क्षेत्र जितना बडा होता है, चुनौतियाँ भी उतनी ही बडी होती है । वैसे देखा जाए तो जातिव्यवस्था हिंदु धर्म का मूलभूत अंग नहीं है । यह मध्ययुग की देन है । हिंदु तो आरंभ से ही वर्णव्यवस्था मानते आ रहे है, जो जन्म से नहीं बल्कि व्यक्ती के गुण व कर्मों से जुडी हुई है (गीता. ४/१३) । किंतु बर्बर विदेशी आक्रमणों के बाद से वर्णव्यवस्था का भ्रष्ट होना शुरू हुआ जो अंततः जातिव्यवस्था में परिवर्तित हुआ । यह व्यवस्था सदियों से चलन में थी । क्या सवर्ण क्या विवर्ण, दोनों ही प्रकार के लोग इसे मानते थे । ऐसे में सावरकर जी का कहना कि यह व्यवस्था हानिकारक है, का परिणाम भी वैसे ही शून्य होना था जैसे अनेकों प्रामाणिक सुधारकों की बातों का न्यूनाधिक हुआ । लेकिन सावरकर अपने प्रतिपादन के बारे में न केवल आग्रही थे, अपितु अपनी बात मनवाने के लिए हर तरह के सकारात्मक हतकंडे अपनाने से भी नहीं चूकने वाले थे । उपयुक्ततावाद वीर सावरकर जी का विशेष गुण था । उन्हों ने पहले तो जातिवाद के प्रश्न के छोटे छोटे टुकडे किए की, आखिर जातिवाद किस तरह से हिंदु समाज को प्रभावित करता है । यह एक बिल्कुल ही नए तरह की पहल थी । इसे ही आधुनिक भाषा में प्रौब्लेम आईडेंटिफ़िकेशन कहते है । इस खोज में सावरकर जी ने पाया कि, जातिवाद की समस्या असल में ७ प्रकार से प्रभाव डालती है । वीर सावरकर जी ने इन्हें नाम दिया, ‘सात स्वदेशीय बेड़ीयाँ’ (स. सा. वा. खंड ९, जात्युच्छेदक निबंध, आवृत्ति वर्ष १९९३, पृ. ६४) । यह बेड़ीयाँ थी रोटीबंदी, बेटीबंदी, स्पर्शबंदी, व्यवसाय बंदी, सिंधुबंदी, वेदोक्तबंदी तथा शुद्धीबंदी । वीर सावरकर जी का मानना था कि यदि यह सात शृंखलाएँ तोड दी जाए, तो निश्चय ही जातिप्रथाविरहित सशक्त समाज निर्माण होगा ।

    रत्नागिरी आज भी एक छोटा सा शहर है । आज से करीब सौ वर्ष पहले यानी १९२४ के समय में तो वह और भी छोटा गाँव था । उन दिनों पूरा देश आवश्यक और अनावश्यक दोनों ही प्रकार के रूढीवाद के घेरे में था । कोंकण की भूमी रत्नागिरी भी रूढीप्रिय थी । वीर सावरकर ने क्या किया? उन्हों ने जातिवाद के विरुद्ध तीन तरफा मोर्चा खोला । वे बडे ही प्रसिद्ध क्रांतिकारी थे तो जगह-जगहों से लोग उन्हें भाषणों के के लिए बुलाते थे । सावरकर उन भाषणों में जातिवाद की रूढ़ी से होने वाली हानि बताते थे । वे एक सम्माननीय व्यक्तित्व होने के साथ ही अत्युच्च कोटी के वक्ता भी थे, तो नि:संशय उन की वाणी का प्रभाव पडता । यह तो हुआ एक मोर्चा । दूसरे, वे कई तरह के नियतकालिकों में जातिव्यवस्था पर हल्ला बोलने वाले लेख लिखते थे । उनके यह लेख तथा उन के भाषण आप को उन की पुस्तकें ‘विज्ञाननिष्ठ निबंध’, ‘जात्युच्छेदक निबंध’, ‘सामाजिक भाषणे’, ‘क्ष किरणे’ आदी में समूल पढने को मिलते है । वीर सावरकर जी लोकप्रिय माध्यमों कि ताकत भलीभाँति जानते थे । इसिलिए उन्होंने इस विषय पर दो उपन्यास (‘मला काय त्याचे’ तथा ‘काळे पाणी’), ‘उ:शाप’ आदी नाटक, तथा कई सारी कथाएँ व कविताएँ लिखी । एक तरह से देखा जाए तो वे अपने विचारों के प्रति समाज की मनोभूमिका तैयार कर रहे थे । क्यूँ कि तिसरा मोर्चा जो था, वह सब से कठिन था, प्रत्यक्ष कार्य ।

    प्रत्यक्ष कार्य के तीन भाग किए जा सकते है । मन:परिवर्तन, वैधानिक मार्ग और संघर्ष । सावरकर जी ने प्रसंग व परिस्थिती के अनुसार तीनों मार्गों का अवलंबन किया दिखाई पडता है (सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, लेखक शेषराव मोरे. आवृत्ति वर्ष २०१५, पृ. १०७) । जिन दिनों अस्पृश्यों की परछाई मात्र पडने से ही धर्म भ्रष्ट हुआ माना जाता था, यदि उन का स्पर्श हो भी गया तो लोग शुद्धी हेतू सचैल यानी कपडों के साथ स्नान कर लिया करते थे, इतना ही नहीं बल्कि घरों में किसी अस्पृश्य जाति का नाम लेना भी पाप समझा जाता था (तत्रोक्त, पृ १२१), उन दिनों अस्पृश्यता निवारण का कार्य सावरकर जी के लिए कितना कठिन रहा होगा, इस की मात्र कल्पना ही की जा सकती है । और देखिए, यह रवैया भी कोई एक तरफा नहीं था । सदियों से इसी सामाजिक व्यवस्था में पले-बढें, रहे अस्पृश्यों को भी यही एक मात्र जीवनमार्ग लगता था । उन्हें भी इस में कुछ गलत नहीं लगता था । जब शृंखलाओं से परे कोई विश्व कल्पना में ना हो, तब शृंखलाएँ तोडना और भी कठिन हो जाता है ।

    सावरकर जानते थे कि, स्पृश्य बस्ती में तो कोई अस्पृश्य अपने आप आने से रहा । तो वे खुद अस्पृश्यों की बस्तीयों में जाने लगे । देखिए, काम कितना मुश्किल है, जब सावरकर और उन के साथी अस्पृश्य बस्तीयों में जाते तो सारे बस्तीवाले एक एक कर के दरवाज़े बंद कर के, कुंडी-वुंडी लगा के अंदर छिप जाते थे । क्यूँ? क्यूँ कि उन्हें लगता था कि यह लोग, हमारा धर्म भ्रष्ट करने आए है । बार बार पुकारने पर भी कोई बाहर न आता । उल्टे, अंदर से ही जवाब देते कि, घर में कोई नहीं है (तत्रोक्त, पृ. १२१) । सावरकर जानते थे कि शुरुआत में ऐसा ही होगा । सामान्य हिंदु का मन आकर्षित करने वाली कोई एक चीज़ हम सोचे तो वह है, भजन-किर्तन । सावरकर और उन के साथी उस बस्ती के बीचोबीच जा कर प्रभु का भजन करने लगते । कई दिनों के अथक परिश्रम के पश्चात, किवाडों, खिडकियों से टुकूर-टुकूर देखने वाले लोग एक-एक कर के बाहर आने लगे, सावरकर और उन के साथियों से मिलने-जुलने लगे । यह तो केवल शुरुआत थी । अब अगला पडाव थी स्पृश्यों कि बस्तीयाँ । सावरकर जी के व्याख्यान तथा अन्य कार्यक्रमों में वे अस्पृश्यों को साथ ले आते, स्पृश्य एवं अस्पृश्य दोनों को ही साथ बैठने का आग्रह करते (तत्रोक्त, १२२) । यह तो और भी कठिन बात थी । स्पृश्य अस्पृश्यों को अपने साथ बिठाना नहीं चाहते थे और तो और अस्पृश्य भी स्पृश्यों के साथ बैठना नही चाहते थे । सब से विशेष बात तो यह थी की, जिन अस्पृश्यों को रूढीयाँ स्पृश्यों के साथ बैठने की अनुज्ञा न दे कर उन पर सामाजिक अन्याय करती थी, वे खुद भी अपने से तथाकथित निम्न स्तर की जातियों को अपने साथ बिठाने के लिए तैयार नहीं थे । यहीं स्थिती पाठशालाओं में भी थी । सावरकर सनातनियों से कहते थे कि, ‘हम कुत्ता या बिल्ली पालते है । उस से प्रेम भी करते है । इतना कि वह पशु हमारी रसोई में घूमता है, हमारे साथ खाना खाता है । वहीं हम लोग एक मनुष्य की परछाई मात्र से ही दूर भागते है । हमारी ही तरह, हाड-मांस का बना मनुष्य, हमारा ही धर्मबंधु, लेकिन उस के स्पर्श को पाप मानते है । और वहीं मनुष्य अगर हमारी ही भूल के कारण अगर परधर्म में चला गया, तो एक ही झटके में हम उसे ‘मेरा भाई’ बोल के गले से लगाने में भी नहीं हिचकिचाते । हमारे ही जैसे मनुष्य को पशु से भी न्यूनतर समझना और उस के धर्म परिवर्तन करते ही उसे गले लगाना, यह कहा का न्याय है’? वहीं वे अस्पृश्यों को भी ढाढस बँधा कर कहते थे कि (स्वातंत्र्यवीर सावरकर, लेखक धनंजय कीर, मराठी अनुवाद द. पां. खांबेटे, आवृत्ति वर्ष २००८, पृ. २०१), ‘इस क्षण में दिखाई दुर्बलता सवर्णों की दुष्टता से भी अधिक बुरी होगी । कल्याण का मार्ग कष्टों से ही हो कर जाता है । अधिकार माँगने की इस घडी में पीछे हटने की भूल मत करो । याद रखो कि तुम भी मनुष्य हो और मनुष्य कि तरह ही पौरुष प्रकट करो । जब कभी तुम सार्वजनिक मार्ग से गुज़रो और कोई तुम से दूर हटने को कहे, तो उस से कहो कि ‘यह रास्ता कोई तुम्हारे बापदादाओं की जागीर नहीं, जो जिसे चाहे उसे दूर हटने के लिए कहे’ । अपने व्यवसाय किसी के भी दबाव से मत छोडो । उल्टा, उन में सुधारणाएँ करो । कोई भी व्यवसाय श्रेष्ठ या कनिष्ठ नहीं होता । स्वच्छता से भरा जीवन जियो । नशे से दूर रहो । अपने मात-पिता, संत और वंश को कभी भी नीचा मत समझो । दोषों का त्याग करो, शिक्षा प्राप्त करो, संघर्ष करो और जातिवाद से उपर उठ कर अपने मानवी अधिकार प्राप्त करो । कोई व्यक्ति तथाकथित रूप से तुम से भी निचली जाति का हो, तो उस से भी दया भरा, समता भरा ही व्यवहार रखो ।’

    हिंदु धर्म के जो अनेक स्तंभ है, उन में से एक स्तंभ है मंदिर । मंदिर सालों से सार्वजनिक स्तर पर एकात्मता के केंद्र के रूप में दायित्व निभाते आ रहे है । किंतु क्या उन दिनों सभी मंदिर सभी जातियों के लिए खुले थे? उत्तर है, नहीं । सावरकर जी ने इस विषय पर काम करने की ठानी । क्यूँ कि अगर मंदिरों में सभी जातियों का स्वीकार होने लगता, तो जातिवाद का एक प्रमुख क़िला यूँ ही ढह जाता । लेकिन मंदिर जैसे सामाजिक एकता का केंद्र थे, वैसे ही विभिन्न जातियों के लिए उन की आस्था तथा अस्मिता का भी प्रतीक थे । इस लिए यह काम भी उतना सरल नहीं था । सावरकर जी ने पहले कदम के रूप में वह उत्सव चुना जो अपने आप में ही सामाजिक एकात्मता की धरोहर था, यानी सार्वजनिक गणेशोत्सव. महाराष्ट्र के घर घर में गणेश चतुर्थी से ले कर अनंत चतुर्दशी तक गणेश जी के पूजन की प्रथा है । कुछ जगहों पर यह उत्सव डेढ़ दिन चलता है, कहीं पाँच, कहीं सात, तो कहीं पूरे दस । गणेशोत्सव महाराष्ट्र में सार्वजनिक स्वरूप प्राप्त कर चुका था । गाँव, कस्बों, शहरों में लोग सार्वजनिक तौर पे गणेशजी की प्रतिष्ठापना करते, जिसे मराठी में ‘मंडल’ कहते है । लेकिन उन दिनों यह मंडल भी जातिगत थे तथा उन में भी भेदभाव हुआ करता था । सन १९२४ के गणेशोत्सव के दौरान रत्नागिरी में प्लेग के प्रादुर्भाव के कारण सावरकर कुछ दिनों के लिए नाशिक गए थे । तब वहाँ गणेश जी के विसर्जन के समय शोभायात्रा में पहला मान किस मंडल को दिया जाए यह प्रश्न उपस्थित हुआ । जब लोग सावरकर जी के पास यह समस्या ले कर आए, तो उन्हों ने अग्रभाग में रहने का मान बिना किसी हिचकिचाहट के एक अस्पृश्य मंडल को सौंपा । यह एक ऐतिहासिक, क्रांतिकारी घटना थी ऐसा वृत्तांकन नाशिक के ‘स्वातंत्र्य’ नामक पत्र ने १८/०९/१९२४ में किया (सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, पृ. १५३) । सावरकर जी के ही प्रयत्नों से उस साल कई अस्पृश्यों के मंडल गठित हुए । उन्हीं में से एक जगह भीड से खचाखच भरे कार्यक्रम में भाषण करते समय वीर सावरकर बोले, ‘मुझे विश्वास है कि आने वाले दिनों में अस्पृश्यता की रूढी का विनाश होते हुए मैं अपनी आँखों से देख सकूँगा । मैं चाहता हूँ कि मेरी मृत्यू के पश्चात मुझे काँधा देने के लिए विभिन्न जातियों के लोग एक हो कर आए और मुझे अग्नि दे, तभी मेरी आत्मा को समाधान मिलेगा ।’ यह सुनते ही श्रोताओं की आँखों से आँसूओं की धाराएँ छलक पडी (तत्रोक्त, पृ. १५३) । अगले वर्ष सावरकर जी ने यही क्रम रत्नागिरी में भी दोहराया । इतना ही नहीं, उन्हों ने एक पृर्वास्पृश्यों का वाद्यवृंद भी गठित किया (जो शीघ्र ही सभी जातियों के एकत्रित वाद्यवृंद में परिवर्तित हो गया ।) और गणेश जी के समक्ष पूर्वास्पृश्यों द्वारा बीडा-सुपारी (मराठी में पान-सुपारी । यहाँ पान का बीडा वगैरह केवल निमित्त मात्र होता है, असल उद्देश्य सामाजिक मेलजोल बढाना होता है ।) का समारंभ आयोजित करने की भी प्रथा आरंभ की । इस बारे में वर्णन तब के बलवंत, बकुल, सत्यशोधक आदी पत्रिकाओं में विस्तारपूर्वक पढने को मिलते है । धीरे धीरे इस बीडा-सुपारी के कार्यक्रम में सैंकडों स्पृश्य भी सहभागी होने लगे (तत्रोक्त, १५४) ।

    अब समय था एक कदम और बढाने का । १९२५ के अप्रैल में रत्नागिरी के समीप एक छोटे से गाँव शिरगाँव में महादेव लक्ष्मण गुरव नाम के एक सज्जन ने हनुमान जी का मंदिर बनाया । वे चाहते थे कि प्रतिष्ठापना में सावरकर जी भी उपस्थित रहे । यहाँ गौर करने योग्य बात यह है कि, सावरकर भले ही हिंदुत्ववादी थे किंतु वे किसी भी तरह के कर्मकांड के विरुद्ध भी थे । ऐसे में आज के समय का कोई तथाकथित विद्वान क्या करता? मना कर देता कि मुझे यह सब पसंद नहीं, शायद यह भी कहता कि तुम भी यह कर्मकांड मत करो । सावरकर जी ने ऐसा कुछ भी नहीं किया । बल्कि वे उस समारोह में गए । किंतु जाने से पहले उन्हों ने गुरव जी के सामने एक शर्त रखी । शर्त यह थी कि, मंदिर का जो प्रदक्षिणा मार्ग है, वह अस्पृश्यों के लिए भी खुला हो । उन्हों ने गुरव जी को अस्पृश्यता के विरुद्ध अपनी भूमिका बताई और परिणाम यह हुआ कि, गुरव जी तुरंत मान भी गए । इतना ही नहीं वे प्राणप्रतिष्ठा के समय पूर्वास्पृश्यों को भजन करने वालों के साथ संमिश्र बिठाने को भी तैयार हो गए (तत्रोक्त, पृ. १५५) । यह अंतर है सावरकर और कुछ तथाकथित सुधारकों में । जहाँ सावरकर समाज के लाभ को देखते हुए अपने व्यक्तिगत मतों को दूर रखने के लिए भी तैयार थे, वहीं आज-कल के कुछ आधुनिक सुधारणावादी अपने व्यक्तिगत मतों को समूचे समाज पर थोंपना चाहते है, और यहीं कारण है कि, उन्हें समाज में कभी स्वीकृति नहीं मिलती । सावरकर भले ही हिंदुत्ववादी थे, और थे क्या, हिंदुत्व की राजकीय मीमांसा पहली बार उन्हों ने ही तो अपने प्रबंध ‘हिंदुत्व’ (१९२३) में की है । किंतु वे हिंदुस्थान में रहने वाले, हिंदुस्थान से प्रेम करने वाले सभी पंथों का भला ही चाहते थे । उन के लेख, खास कर के ‘पोथिनिष्ठेची बाधा’ (मनोहर, जुन १९३५) इस बात के प्रत्यक्ष प्रमाण है । वहीं आज कल कुछ लोग समाजसुधारणा का अर्थ किसी एक धर्म को ही कोसना मात्र निकालते है । सावरकर जी का यही समष्टिवाद हल्दी-कुंकुम समारोह में भी दिखता है । वे स्वयं कदाचित इस समारोह को नहीं भी मानते होंगे, लेकिन उन्हें इस प्रथा में स्पृश्यास्पृश्य महिलाओं को एक करने का कारण दिखा तो उन्हों ने इन समारोहों को पूरे मन से प्रोत्साहित किया, और फलस्वरूप महिलाओं के मन से भी अस्पृश्यता की रूढी का उच्चाटन करने की ओर कदम बढाया (सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, पृ. १४२) ।

    धर्म हमेशा से ही नाज़ुक मामला रहा है । इसी लिए सावरकर भी उतना ही नाज़ुक एवं कुशल तरीके से व्यवहार कर रहे थे । धीरे धीरे कर के उन्हों ने पूर्वास्पृश्यों को पहले तो प्रदक्षिणा मार्ग तक जाने की अनुज्ञा दिलायी । फिर उस अनुज्ञा का दायरा पगडंडीयों तक बढाया । फिर सभामंडप । और अंततः गर्भगृह तक (१३/०९/१९२९) वे पूर्वास्पृश्यों को ले गए । धीरे धीरे कर के मंदिर में संमिश्र जाना आम बात हो गयी । १९३० में तो एक पूर्वास्पृश्य ने गणेश जी के समक्ष गायत्री मंत्र का जाप भी किया । इस घटना का वर्णन टाईम्स ऑफ इंडिया सहित अन्य कई वृत्तपत्रों ने किया था (रत्नागिरी हिंदुसभेचे प्रतिवृत्त, खंड २, १९३७) ।

    रत्नागिरी में एक सज्जन रहते थे, भागोजीसेठ कीर । शिवभक्त थे । किंतु जाति के कारण शिवालय नहीं जा सकते थे । धनि थे, तो खुद का ही शिवालय बनवा लिया, भागेश्वर मंदिर । सावरकर जी को मानते थे तो उन्हें यह घटना सुनाई । सावरकर जी ने पूछा कि, ‘आप धनवान है सो आपने अपने लिए मंदिर बनवा लिया । किंतु उन सहस्रावधी निष्कांचन पूर्वास्पृश्य भक्तों का क्या’? भागोजीसेठ सोच में पड गए । और तब सावरकर जी के विचारों से प्रेरित हो कर उन्हों ने बनवाया, पतित-पावन मंदिर (२२/०२/१९३१) । मंदिर के शिलान्यास समारोह में (१०/०३/१९२९) सावरकर जी ने मंदिर निर्माण की भूमिका बताई, कि इस मंदिर में कोई भी श्रद्धावान् हिंदु स्वच्छ तन, मन से बेरोकटोक आ सकेगा, पूजा कर सकेगा । इस मंदिर का पुजारी कोई भी ज्ञानी हिंदु बन सकेगा (स. सा. वा. खंड ९, आवृत्ति वर्ष १९९३, सामाजिक भाषणे, पृ. ९) । सभी हिंदुओं को पूजा, प्रार्थना का समान रूप से अधिकार देने वाला यह मंदिर आज भी प्रसिद्ध है । इसी मंदिर की प्रतिष्ठापना के समय की एक घटना न केवल पथदर्शी है, अपितु सावरकर जी की अपने उद्देश्य के प्रति प्रामाणिकता का विलोभनीय दर्शन भी कराती है । भागोजीसेठ चाहते थे कि, मूर्ति की प्रतिष्ठापना वेदोक्त पद्धति से हो । काशी से ब्राह्मण भी बुलाए गए । उन्हें बुलाते समय ही कल्पना दी गयी थी । किंतु वे ऐन समय पर मुकर गए कि, वेदोक्त का अधिकार अन्य जातियों को नहीं है । मुहूर्त निकला जा रहा था । शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी, भागोजीसेठ आदि सभी तैयार हो गए की चलो वेदोक्त नहीं तो पुराणोक्त पद्धति से ही सही । किंतु सावरकर जी का क्रोध फूट पडा । वे भागोजीसेठ से बोले, ‘सेठजी मंदिर आप का, आप मालिक है, सो अंततः आप जो कहे वह ही होगा । किंतु अगर सदियों से चली आ रही यह भेदभाव की शृंखला नहीं तोड सके, फिर इस मंदिर की आवश्यकता ही क्या रही? पुरानी ही प्रथाएँ चलानी है तो पुराने मंदिर क्या कम है संख्या में, जो और एक नया बना रहे है? नया मंदिर नई पहल है । यह अगर आप को स्वीकार्य नहीं तो कृपया मुझे छोड दीजिए । किंतु अगर आप अडिग रहते है, तो इस मंदिर में वेदोक्त प्रतिष्ठापना का दायित्व मेरा ।’ इतना कहते ही सावरकर उन द्विजों की ओर मुड कर बोले, ‘हम ने आप को पत्र भेजा था, उस में स्पष्ट रूप से लिखा था कि वेदोक्त पद्धति से प्रतिष्ठापना होगी । आप को यदि स्वीकार नहीं था, तो पहले ही मना कर देते । किंतु अगर आप सोचते है कि ऐन मौके पर मना करने से हम मजबूर हो जाएँगे तो गलत सोच है आप की । मैं नहीं मानता की किसी एक जाति में जन्म लेने भर से ही व्यक्ति को पौरोहित्य का अधिकार मिल जाता है । किंतु भागोजीसेठ की इच्छा थी की आप ही पौरोहित्य करे । किंतु आप के बिना भी पौरोहित्य हो सकता है । यदि आप मना कर देते है तो हम सारी जातियों के सैंकडों हिंदु इस मूर्ति को अनंत करों से उठा के ‘जय देवा’ उद्घोष के साथ स्थापित करेंगे । यह ही होगी हमारी विधी । हम सहस्रों कंठों से हिंदुधर्म का जयगान करेंगे । यह ही होगा हमारा वेदघोष । और ‘भावो हि विद्यते देव:’ यह ही होगा हमारा शास्त्राधार ।’ वीर सावरकर की यह ओजस्वी वाणी सुन के मसुरकर महाराज के आश्रम के एक शिष्य तड़ाक से आगे आए । उन का नाम था वेदशास्त्रसम्पन्न गणेशशास्त्री मोडक । उन्हों ने वेदोक्त पद्धति से ही प्रतिष्ठापना की (सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, पृ. १७४) ।

    पाठशालाओं में विभिन्न जाति के छात्रों के एकत्रित बैठने के बारे में भी सावरकर जी का रवैया कठोर ही रहा । उन्हों ने पहले तो सभी को प्रेमपूर्वक समझाया । किंतु जब कुछ लोग नहीं माने तो उन्हों ने कानूनी कार्यवाई की भी तैयारी दिखाई । इस विषय में सार्वजनिक जगहों पर अस्पृश्यों को भी नागरी अधिकार दिलाने वाला कानून १९२३ से ही था । जब सावरकर जी के विचारों को मानने वाले जनूभाऊ लिमये १९२८ में स्कूल बोर्ड के अध्यक्ष बने तो उन्हों ने भी पाठशालाओं में अस्पृश्यता का पालन ना करने के संबंध में आधिकारिक आदेश दिए । इस से सावरकर जी का काम और आसान हो गया । उन्हों ने १९२३ के सरकारी आदेश की सहस्रों प्रतियाँ करा के पूरे ज़िले में बाँटी । सरकारी कानून पता चलने पर लोकमत एकदम से अनुकूल होने लगा । किंतु उस का विरोध भी उतना ही हुआ । अस्पृश्य विद्यार्थियों को कई तरह के कष्ट दिए जाने लगे, उन के सामान को आग लगानी शुरू हुई, कुछ शिक्षकों ने उन्हें सिखाने से ही इनकार कर दिया (तत्रोक्त, पृ. १३२) । परिणामस्वरूप सावरकर जी ने रत्नागिरी के ज़िलाधिकारी से आवेदन किया (रत्नागिरी हिंदुमहासभा प्रतिवृत्त, १९२९) । इस में वे लिखते है, “The dogs may enter and even are welcomed and patted in the schools but the poor boys fared in the schools worse than dogs. The villagers resorted to the rowdy methods and drove away the untouchable boys from the schools and are not allowing them even to enter there as before. I humbly and most pressingly request you to set matters right in those villages as soon as possible and ask the police to take back the children of the untouchables to schools under the government protection against the physical threatening on the part of the rowdy rioters there’. सावरकर यहाँ अस्पृश्य विद्यार्थियों के लिए पुलिस सुरक्षा की माँग कर रहे है । यह पढ के सहसा ही अमरिका के लुज़ियाना प्रांत में गोरों के स्कूल में अपृथक पढने जाने वाली पहली आफ्रीकन-अमरिकन लडकी रुबी ब्रिजेस की याद आती है । उसे भी स्कूल में छोडने के लिए फ़ेडरल मार्शल्स जाया करते थे । रत्नागिरी के मामले में सचमुच पुलिस सुरक्षा दी गई या नहीं यह तो मुझे ज्ञात नहीं, किंतु इतना अवश्य कहूँगा कि अमरिका की घटना १९६० की है तो सावरकर द्वारा रत्नागिरी में की गयी पहल १९२९ की । इसी वर्ष स्कूल बोर्ड का परिपत्रक ज़िला बोर्ड ने रद्द करवा दिया । किंतु सावरकर अस्पृश्यता का पालन रोकने वाला परिपत्रक जारी करवाने में १९३४ में पुन: यशस्वी हुए ।

    आप किसी भी व्यक्ति से मित्रता हुई, ऐसा कब कह सकते है । आप के सैंकडों पहचानवाले हो सकते है, दसों परिचित भी हो सकते है, किंतु घनिष्ठ मित्रता, एकरूपता तभी कही जा सकती है, जब आप उन के साथ बिना किसी हिचकिचाहट के खाना खाओ । भोजन मित्रता का संकेत है । यह बात सावरकर बहुत ही अच्छी तरह से जानते थे । उन दिनों जहाँ अपने से तथाकथित निम्न जाति के व्यक्ति के साथ भोजन करना भी पाप माना जाता था, सावरकर जी ने कल्पना निकाली सहभोजन की । सभी जाति के हिंदुओं का एक साथ, एक ही पंक्ति में भोजन । रोटीबंदी की इस शृंखला पे पहला प्रहार किया सावरकर की प्रेरणा से स्थापित ‘तरुण हिंदुमंडल’ने (डिसेंबर १९२९) । विभिन्न जातियों के सौ युवाओं ने एक साथ भोजन किया । यह तो था पहला पडाव, जो केवल उस मंडल के कार्यकर्ताओं तक ही सीमित था । अब समय था रोटीबंदी की शृंखला पे दूसरा प्रहार करने का, यानी प्रकट सहभोजन कराने का । अगले वर्ष पुन: एक बार सौ लोगों के सहभोजन का आयोजन हुआ । इस बार यह समारोह सभी के लिए खुला था । लेकिन कार्य सम्पन्न हो कहाँ? कोई भी कर्मठ इस समारोह के लिए जगह देने के लिए तैयार नहीं था । अंततः खातू परिवार के नाट्यगृह में व्यवस्था हुई । किंतु तब भी कई प्रश्न शेष थे । भोजन पकाएगा कौन? इस तथाकथित पापाचरण के लिए कोई भी रसोईया तैयार नहीं था । जैसे तैसे प्रबंध हुआ । लग रहा था कि कोई नहीं आएगा । किंतु ऐन मौके पर इतनी भीड हुई कि कईयों को तो समारोह में भाग लिए बिना ही वापिस लौटना पडा (सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, पृ. १८९) ।

    सावरकर जी ने सहभोजन में सहभागी लोगों की सूची प्रकाशित करने का नियम किया था । पहले सहभोजन के पश्चात कईयों को इस बात के परिणाम, सामाजिक बहिष्कार आदि स्वरूपों में भुगतने पडे । लेकिन सावरकर जी द्वारा दिखाई दृढता के पश्चात धीरे धीरे वातावरण सकारात्मक होता गया । पहले सहभोजन की खबर देते हुए ‘टाईम्स ऑफ इंडिया’ लिखता है (०९/१२/१९३०), ‘जातिव्यवस्था ही हिंदु धर्म की अवनती का मूल कारण है ऐसा मानने वाले कुछ उत्साही सुधारकों द्वारा सहभोजन का आयोजन किया गया था । इस में सभी जातियों के लोगों ने भाग लिया’ । आगे चल के सावरकर जी ने इन समारोहों को किसी पवित्र धार्मिक कार्य जैसा स्वरूप दिया । इतना ही नहीं उन्हों ने किसी भी धार्मिक विधी से पहले जैसे संकल्प किया जाता है, वैसा ही संकल्प भी सहभोजन के लिए रचा, ‘जन्मजातजातिभेदोच्छेदनार्थम् अखिलं हिंदुसहभोजनं करिष्ये’ (रत्नागिरी हिंदुसभेचे प्रतिवृत्त, खंड २, १९३७) ।

    सावरकर जैसे स्वीकार्य रूप से सकारात्मक कार्य करना जानते थे, वैसे ही नकारात्मक विचारों को उन्हीं की भाषा में उत्तर देना भी जानते थे । एक बार एक महाशय ने सहभोजन समारोहों की आलोचना करते हुए कहा कि, ‘एक दूसरे के मुँह में थूकने से भी क्या प्रेम बढता है’? सावरकर जी ने तपाक से उत्तर दिया था कि, ‘आप जब ब्राह्मणभोज कराते है तब क्या एक दूसरे के मुँह में थूकते है’? सावरकर जानेमाने व्यक्ति होने के कारण, अनेकों विवाहादि समारोहों में उन्हें आमंत्रित किया जाता । वे भी प्रेमपूर्वक जाते । किंतु वे यजमानों को सुझाव देते कि, कार्यक्रम में सहभोजन हो । और अधिकतर लोग तैयार भी हो जाते । सावरकर जानते थे कि क्या स्पृश्य क्या अस्पृश्य, दोनों ही जिस चीज़ को धर्म मानते थे उस का निष्ठापूर्वक आचरण करते थे । इसीलिए उन्हों ने किसी का भी द्वेष न करते हुए जहाँ तक हो सके युक्तिवाद से अपनी बात मनवाना सही समझा । आज कल के कुछ धर्मसुधारक गलत रूढीयों का अनुसरण करने वालों को मूर्ख कहते है, तरह तरह के अपशब्द कहते है । इस से आप की विद्वत्ता नहीं सिद्ध होती, बल्कि कार्य की हानि ही होती है । अपशब्द वह कहता है जिसे अपने विचारों पे विश्वास न हो, जो विश्वास से भरा हुआ होता है, वह तो सरल भाषा में भी अपनी बात रख सकता है । सावरकर जी के प्रयत्नों से धीरे धीरे स्त्रीवर्ग भी सहभोजनों में सहभागी होने लगा (२१/०९/१९३१) ।

    वीर सावरकर के सहकारी तथा ‘सत्यशोधक’ पत्रिका के संपादक थे श्री. दत्तोपंत लिमये । उन की सुपुत्री का विवाह निश्चित हुआ । किंतु जब ससुराल वालों को पता चला कि लिमये जी सहभोजनी है, तो उन्हों ने विरोध दर्शाया । कहा कि जब तक लिमये जी प्रायश्चित नहीं लेते, विवाह नहीं होगा । एक तरफ बेटी का भविष्य तो दूसरी तरफ तत्त्वनिष्ठा । लिमये जी धर्मसंकट में पड गए । यह विषय सावरकर जी के समक्ष आया । तो उन्हों ने एक झटके से उन्हें प्रायश्चित लेने की अनुज्ञा दे दी और साथ ही साथ ससुराल वालों को यह भी कहा कि यह प्रायश्चित केवल विवाह तक ही सीमित रहेगा । वे मान गए । यहाँ विवाह सम्पन्न हुआ और वहाँ लिमये जी सहभोजन में पुनः जुट गए (तत्रोक्त) । सावरकर जी की यशस्विता का रहस्य उन के ऐसे व्यावहारिक तथा अनूठे मार्ग ही है । वे खुद समुद्रमार्ग से ही विदेश गए थे, लेकिन वापिस लौटने पर उन्हों ने प्रायश्चित नहीं लिया । ऐसे ही उन्हों ने शुद्धीकरण किए, बेटीबंदी तोडी, व्यवसायबंदी तोडी । १ मई १९३३ को उन्हों ने ‘अखिल हिंदु होटल’ शुरू किया जिसे चलाने वालों में से एक युवक दलित था । वहाँ भोजन करने वालों के हस्ताक्षर ले के उस की सूची रखी जाती थी । सावरकर जी के स्वीय सहायक श्री. बाळाराव सावरकर के अनुसार सावरकर जी के पास ऐसे सवा तीनसौ से अधिक हस्ताक्षर इकठ्ठा हो गए थे (रत्नागिरी पर्व, लेखक बाळाराव सावरकर, आवृत्ति वर्ष १९७२, पृ. ३००) ।

    राजर्षि छत्रपती शाहू महाराज के अनुयायी भाई माधवराव बागल जब रत्नागिरी आए तो वहाँ का वातावरण देख कर वे अवाक रह गए । उन्हों ने कहा, ‘पुणे, मुंबई जैसे बडे शहरों में भी सहभोजन के लिए ५-१० महिलाएं भी आगे नहीं आती । किंतु यहाँ सैंकडों महिलाएँ सहसा ही सहभागी होती दिखती है । वीर सावरकर यदि हमारे यहाँ होते, तो हम उन्हें सिर आँखों पे बिठा के रखते’ (सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, पृ. २१४-१५) । वीर सावरकर जी का कार्य देख कर महर्षि शिंदे बोल उठे थे (तत्रोक्त, पृ. २१५), ‘भगवान सावरकर जी को मेरी बची हुई आयु दे दे’ । दलित नेता श्री. सोनवणे के अनुसार (तत्रोक्त, पृ. २१२), ‘सहस्रों वर्षों से स्पृश्यों ने हमें दूर रखा, किंतु यह भेद भी नष्ट हो सकता है यह विश्वास, सावरकर जी के कार्य को देख कर होता है ‘ । वीर सावरकर जी ने भारतरत्न डॉ. बाबासाहब आंबेडकर जी को भी इस कार्य का अवलोकन करने हेतु निमंत्रित किया था । सावरकर, आंबेडकर जी को लिखे पत्र में लिखते है, ‘यह निमंत्रण किसी तात्त्विक चर्चा हेतु नहीं, अपितु जातिभेद नष्ट करने के लिए हिंदु समाज प्रत्यक्ष क्या क्या कार्य करना चाहता है इस बात का सक्रिय उदाहरण देने के लिए है ।’ सावरकर चाहते थे कि आंबेडकर जी की अध्यक्षता में सहस्रावधी पूर्वास्पृश्यों का सहभोजन हो व तत्पश्चात आंबेडकर जी मार्गदर्शन करे । किंतु आंबेडकर जी की कार्यमग्नता के चलते यह समारोह हो न सका । नाशिक के काळाराम मंदिर सत्याग्रह के दौरान सावरकर जी स्थलबद्ध थे । उन्हों ने तब भी आंबेडकर जी का समर्थन करने हेतु एक पत्र नाशिक के हिंदुओं के नाम लिखा था । सावरकर जी के अनुज डॉ. नारायणराव सावरकर उस समय अपने सहकारीयों के साथ नाशिक में उपस्थित थे तथा उन्हों ने मंदिरप्रवेश के लिए अनुकूल वातावरण बनाने का प्रयास भी किया था (तत्रोक्त, पृ. ११४) ।

    सावरकर जी का अस्पृश्यता निवारण और सामाजिक एकता का कार्य एक यशस्विता की गाथा है । १९२४ से ले कर १९३७ तक के स्थलबद्धता के काल में उन्हों ने रत्नागिरी ज़िला व आसपास के परिसर से अस्पृश्यता का समूल उच्चाटन कर दिया था । आगे चल के भी उन की हिंदुमहासभा के माध्यम से की गई राजनीति जातिगत भेदभावों से उपर उठ कर संपूर्ण समाज के लिए ही थी । आज भले ही अस्पृश्यता कानूनी रूप से नष्ट हो चुकी हो, किंतु जातिवाद के रूप में वह कुछ लोगों के मन में आज भी जीवित है । नए युग में पुनः विश्वगुरू बनने की चाह रखने वाले देश के लिए यह जातिभेद कितनी बडी बाधा है, कोई भी अनुमान लगा सकता है । ऐसे समय में सावरकर जी के विचारों की, उन के द्वारा चुने अभिनव मार्गों की पहले से भी अधिक आवश्यकता आन पडी है । समय की माँग है कि हम उस मार्ग पर पूरी प्रामाणिकता के साथ चले । सावरकर जी द्वारा किया गया कार्य स्वयं प्रकाश बन के पथ दिखलाएगा ।

    — © अॅड. विक्रम श्रीराम एडके,
    (सावरकर जी के चरित्र एवं विचारों के अभ्यासक तथा उन से संबंधित विषयों पर व्याख्यान देने वाले वक्ता ।)

    *लेख वडोदरा के महाराजा सयाजीराव गायकवाड विश्वविद्यालय के इन्स्टिट्यूट ऑफ लिडरशिप अैंड गवर्नंस द्वारा प्रकाशित ‘वीर सावरकर स्वतंत्रता एवं अखंडता के साधक’ में पूर्वप्रकाशित