Category: History

  • आनंदवनभुवनी

    जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशावर, विशेषतः परधर्मीय देशावर आपला राजनैतिक आणि भौगोलिक अधिकार प्रस्थापित करतो; तेव्हा सगळ्यात आधी कोणते काम करत असेल, तर ते म्हणजे आपली जी कोणती संस्कृती असेल ती तिथे रुजवायचा प्रयत्न करतो. यातून काय साधतं? एकतर यामुळे तेथील लोकांना कमतर लेखून त्यांच्यावर राज्य करणं सोपं जातं. आणि दुसरा व सर्वांत महत्वाचा फायदा म्हणजे कालांतराने तेथील जनतेला आक्रमकांची संस्कृती (मग ती कदाचित पाशवी असली तरीही!) हीच आपली संस्कृती वाटू लागते, जेणेकरुन भविष्यात आक्रमकांचं त्या भूभागावरील राजकीय वर्चस्व जरी संपलं तरीदेखील संस्कृती प्रदुषित करुन ठेवल्यामुळे पिढ्यानपिढ्या तो भूभाग आक्रमकांचा सांस्कृतिकदृष्ट्या दासच बनून राहातो! याचं सर्वांत सोपं उदाहरण म्हणजे इंग्रजी ही भाषा! जगभर हाताची सगळी बोटे भरतील इतकेसुद्धा देश इंग्रजीला किंमत देत नसताना, आपल्याकडे मात्र छातीठोकपणे इंग्रजी ही अवघ्या जगाची भाषा असल्याचे खोटेच सांगितले जाते. का? कारण गोऱ्या राज्यकर्त्यांनी तसे रुजवलेय ना! तीच गोष्ट ऊर्दूची! मुळात ऊर्दू नावाची कोणतीही स्वतंत्र भाषाच अस्तित्वात नसूनदेखील आम्ही मात्र अस्तित्वात नसलेल्या भाषेचे गोडवे गातो!! राईट बंधूंना मिळालेले पेटंट हे विमानाचा शोध लावण्यासाठी मिळालेले नसून ‘विमानात उपयोगी अश्या नव्या सुधारणा करण्यासाठी’ (पेटंट क्रमांक US 821393) मिळालेले असतानाही आमच्याकडे रेटून राईट बंधूंनीच विमानाचा शोध लावल्याचे शिकवले जाते. ही अवस्था! मग राईट बंधूंच्या हयातीतच त्या पेटंटवर शेकडो केसेस चालल्या आणि जर्मनीतल्या एका कोर्टाने तर राईट बंधूंच्याच विरोधात निकाल दिला होता, हे कुठले ठाऊक असायचे!! शोध न लावणाऱ्या राईट बंधूंना श्रेय द्यायला आमच्याकडचे तथाकथित विद्वान पळपळ पळतात, परंतु तोच शोध आमच्या प्राचीन ग्रंथांतरी कुणी दाखवून दिला, तर मात्र नाके मुरडतात! परंतु त्याचवेळी तोफांच्या निर्मितीचे श्रेय बाबराला, रॉकेटच्या निर्मितीचेचे श्रेय टिपूला देताना मात्र ही मंडळी थकणार नाहीत आणि कुणी जर ह्या शोधांची वर्णने आपल्याकडच्या परंपरांमध्ये दाखवून दिली तर डोळ्यांवर कातडे ओढण्यातही कसूर करणार नाहीत!! परकीय आक्रमकांच्या कौतुकात वाहावत जाण्याची अशी एक-दोन नव्हे तर अक्षरशः सहस्रावधी उदाहरणे सांगता येतील. विवेकपिसाट फेक्युलर मंडळी किती जरी उरस्फोड करुन ह्या प्रकाराला ‘गंगाजमनी तहज़ीब’सारखे गोंडस नाव देत असली, तरीही ह्या प्रत्यक्षात मानसिक दास्यत्वाच्या रुपाने शिल्लक उरलेल्या राजकीय आणि धार्मिक दास्यत्वाच्या खुणा आहेत. मग ती आमच्या पवित्र वास्तूंची केलेली तोडफोड असो, परकीयांचे ते पाशवी आक्रमक असूनदेखील केलेले उदात्तीकरण असो, अट्टाहासाने त्यांचाच इतिहास शिकायला लावणे असो, रस्ते-वास्तू इ. ना त्यांची नावे देणे असो; थोडक्यात सांगायचे तर आपल्या देशात शत्रू म्हणून आलेल्या व इथले खऱ्या अर्थाने भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक नुकसानच केलेल्या कुणाच्याही नावाने इथले काहीही ओळखले जाणे हा सच्च्या राष्ट्रभक्तांसाठी एक सल असतो आणि असा सल मुळासकट नष्ट करणारा कुणीही नायकच ठरतो. दिल्लीतील ‘औरंगज़ेब मार्गा’चे नाव बदलून ‘एपीजे अब्दुल कलाम मार्ग’ करण्याच्या घटनेकडे ह्याही दृष्टीकोनातून पाहायला हवे. सवयीचा नसल्यामुळे थोडा जड जाईल हा दृष्टीकोन, पण अस्सल प्रामाणिक दृष्टीकोन आहे हा – परकीयांचे लांगूलचालन करणारा स्वार्थी नज़रीया नव्हे!!

    अनेक दिवसांपासूनच्या नामांतर मागणीस अखेरीस शासकीय ठप्पा मिळालाय. ह्यानिमित्ताने हिंदुस्थानात येऊन लुटालूट, जिहाद व चैन करणाऱ्या मुघलांच्या नावे असलेले एक प्रतीक तरी कमी झाले!! अर्थातच बर्नॉल हाच ज्यांचा राष्ट्रीय-लेप आहे, अश्या विवेकपिसाटांना (हा शब्द ‘लिंगपिसाट’च्या चालीवर वाचावा!) आता औरंगज़ेबाच्या प्रेमाचे उमाळे फुटू लागतील, तो कसा महान वगैरे होता ह्याचे साक्षात्कार झडू लागतील. औरंगज़ेबाची प्रतिमा उंचावण्याची अहमहमिका सुरु होईल. होऊ द्या. काय वाट्टेल ते करु द्या. त्यांचे कामच आहे ते. परकीयांचे पाय चाटण्यावरच तर त्यांची दुकानदारी चालते ना! पण आपण सामान्य माणसं आहोत. दुकानदार नाही आणि तथाकथित फेक्युलर विचारजंत तर त्याहूनही नाही. त्यामुळे आपण तर्कशास्त्र वापरायचे. समर्थांनी औरंगज़ेबाला ‘औरंग्या पापी’ का संबोधले असावे, ह्याचा विचार करायचा. मोठमोठे ग्रंथ धुंडाळण्याचीही गरज नाही. सर्वांत पहिल्यांदा दृष्टीसमोर येईल, ते ह्या औरंगज़ेबाने आमच्या शिवछत्रपतींशी मांडलेले जन्माचे वैर!! असल्या वैऱ्याचे नाव इथल्या रस्त्याला द्यायचे? तेही शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याने अवघ्या शंभर वर्षांतच मुघलांची (!) दिल्ली शब्दशः अंकीत केली होती, हा सिद्ध इतिहास असताना? जरा शोध घेतला तर लक्षात येईल की, ह्या औरंगज़ेबाने तख़्तासाठी आपल्या सख्ख्या बापाला कैदेत ठेवले आणि भावाचा हालहाल करुन खून केला. त्या औरंगज़ेबाचे आपल्या श्रीरामांच्या आणि लक्ष्मण-भरत-शत्रुघ्नांच्या देशात गुणगान चालवून घ्यायचे? कौरवांनी असाच राज्याच्या हव्यासापोटी पांडवांचा अतोनात छळ केला. त्यांना तर खलनायकच मानतो ना आपण? मग मुघलांचाच उदोउदो का म्हणून चालवून घ्यायचा? केवळ काही जणांचा जीव मतपेढीत अडकलाय म्हणून? आणि ह्या पार्श्वभूमीवर आठवा अवघ्या बत्तिशीच्या शंभूराजांचा ह्याच औरंगज़ेबाने आत्यंतिक पंथवेडातून केलेला खून!! ह्या आठवणीनंतरही जर कुणी औरंगज़ेबाची बाजू घेणार असेल, तर त्याच्या वंशशुद्धीवर शंका येणे अगदीच साहजिक ठरेल!!

    कुणाला वाटेल की, हे इतिहास-भुगोलाचे हिंदुकरण आहे. नाही. औरंगज़ेबाचा आम्ही मुसलमान म्हणून कधीच द्वेष करत नाही. तो मुसलमान नंतर होता, आधी एक पंथवेडा देशशत्रू होता ह्याची प्रत्येक न् प्रत्येक हिंदुत्ववाद्याला पूर्णतया जाणीव आहे. आणि म्हणूनच धर्माच्याच नावे बोलायला गेलो तर त्या रस्त्याला एका मुसलमानाचेच नाव दिले गेलेले असूनही सर्वच हिंदुत्ववादी मनापासून आनंदी आहेत. कारण, अब्दुल कलामही मुसलमान नंतर, परंतु आधी एक सच्चे देशभक्त होते हे त्याच हिंदुत्ववाद्यांना तितक्याच मनापासून ज्ञात आहे म्हणूनच!! काय करणार, हे हिंदुत्ववादी मेले असलेच असतात, जात-धर्म न बघता चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणतात. हिंदू बघून द्वेष आणि अहिंदू बघून त्याच्या देशघातकीपणाच्या प्रमाणात वाढतं प्रेम, ह्या तर सोयीस्कर फेक्युलरांच्या खोडी! त्या भोळ्या-भाबड्या हिंदुत्ववाद्यांना कुठल्या जमायला!!

    थोडक्यात सांगायचे झाले तर, आज ह्या नामांतराच्या निमित्ताने परकीय दास्यत्वाच्या गलिच्छ खुणा पुसणाऱ्या एका मंगलपर्वाची सुरुवात झाली आहे. शिवरायांनी ‘राज्यव्यवहारकोश’ लिहवून घेताना जो स्वकीयतेला वरीष्ठता देण्याचा देशहितकारी दृष्टीकोन ठेवला होता, तोच दृष्टीकोन ह्यापाठीदेखील आहे. मॉरिस्कोंना हाकलताना स्पॅनिश राष्ट्रभक्तांचा जो दृष्टीकोन होता, तोच अगदी तोच दृष्टीकोन आहे हा! त्यामुळेच एक ठरलेला वर्ग सोडला तर सबंध देश पक्षीय आणि पंथीय अभिनिवेश बाजूला ठेवून ह्या आरंभाचे स्वागतच करेल. हे पहिले पाऊल अशीच इतर अनेक पावले घेऊन येवो. महाराष्ट्रातही त्याच औरंगज़ेबाच्या नावाने ‘औरंगाबाद’ नांदतंय. महाराष्ट्राच्या भाळावरील ही मुघली अत्याचारांची खूणदेखील लवकरच पुसली जावो. जेथे-तेथे केवळ आणि केवळ खऱ्या देशभक्तांनाच स्थान व वरीयता मिळो. हीच आनंदवनभुवनी प्रार्थना!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (‘सामना’, दि. ६ सप्टेंबर दिनी ‘उत्सव’ पुरवणीत प्रकाशित झालेला लेख. गंमत अशी की, हा लेख सुमारे ८-९ दिवसांपूर्वी लिहिलेला आहे. तोपर्यंत ना कुणी मिशाळ तरस बरळलं होतं ना कुणी खुदानंदी कोल्हा. त्यामुळे ह्या लेखात मी व्यक्त केलेलं भाकीत तंतोतंत खरं ठरलं असंच म्हणायला हवं! माझे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी पाहा: www.vikramedke.com)

    image

  • उडी, नव्हे भारतीय स्वातंत्र्याची गुढी : भाग २

    सावरकरांनी मार्सेल्स बंदरात उडी ठोकून जो ‘भूतो न भविष्यति’ पराक्रम केला आणि त्यांच्या ह्या कुटील डावाला बळी पडून मूर्ख इंग्रज पहारेकऱ्यांनीही त्यांना तसेच नौकेवर नेण्याचा गाढवपणा केला, त्याचे पडसाद अवघ्या जगभर उमटल्याचे आपण मागील लेखांकात पाहिलेच. ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की, दोन देशांतील वादांचा निकाल ज्या हेगस्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयात दिला जातो, त्या न्यायालयात सावरकरांपायी इंग्लंडला आणि सावरकरांच्या डावात ओढल्या गेलेल्या फ्रान्सलाही जावे लागले. तसा करारच दोन्हीही देशांत ४ आणि ५ ऑक्टोबरदिनी झालेल्या पत्रव्यवहारान्वये झाला. न्यायालयासमोर एकच विषय होता – Ought Vinayak Damodar Sawarkar, in conformity with the rules of International Law to be or not to be surrenderred by the Government of the Britanic Majesty to the Government of the French Republic.

    यथाविधी न्यायाधीशमंडळ ठरवले गेले. अध्यक्षस्थानी होते, बेल्जियमचे भूतपूर्व पंतप्रधान M. Beernaert. ब्रिटनचे प्रतिनिधी होते Earl of Desert तर फ्रान्सचे प्रतिनिधी होते Louis Renault. याखेरीज नॉर्वेचे एक भूतपूर्व मंत्री Graham आणि हॉलंडच्या वरीष्ठ सभागृहाचे (Second Chamber) सदस्य Jonkheer A. F. De Savornin Lohman असे दोघे त्रयस्थ राष्ट्रांचे प्रतिनिधी होते. कामकाज असे चालणार होते की, दोन्हीही पक्ष ६ डिसेंबर १९१० दिनी न्यायालयाच्या कार्यालयात आपापली बाजू मांडणाऱ्या लेखाच्या प्रत्येकी १५ प्रती सादर करतील. पुराव्यासाठी व संदर्भ म्हणून काही कागदपत्रे वापरावयाची असतील, तर त्यांच्याही सत्यापित प्रती त्याचवेळी सादर करतील. प्रत्येक पक्षाला परस्पर बाजूच्या कागदपत्रांच्या २-२ प्रती देण्यात येतील व २ प्रती कार्यालयाच्या नोंदीसाठी राहातील. त्यानंतर १७ जानेवारी दिनी दोन्हीही पक्ष वरील पद्धतीनेच आपापले उत्तर व प्रमाणभूत पुरावे सादर करतील. ह्या उत्तरांनाही प्रत्युत्तरे द्यावयाची शक्यता व आवश्यकता निर्माण झाल्यास ती वरील उत्तरे सादर केल्यापासून १५ दिवसांचे आतच करावी लागतील. ह्यानंतर न्यायाधीश-मंडळ १४ फेब्रुवारी १९११ दिनी हेग येथे स्थानापन्न होईल व प्रत्येक पक्षाचा १-१ प्रतिनिधी त्यांच्यापुढे उपस्थित राहून आपले म्हणणे लेखी वा तोंडी आवश्यकतेनुसार मांडेल. यानंतर प्रत्युत्तरे व साक्षीही आवश्यकतेनुसार होतील. त्यानंतर न्यायमंडळ बसल्यापासून ३० दिवसांचे आत अथवा लेखी स्पष्टीकरण सादर झाल्यापासून ३० दिवसांचे आत निर्णय देणे न्यायमंडळावर बंधनकारक राहिल. परंतु न्यायाधीश-मंडळाच्या मागणीनुसार व दोन्हीही पक्षांच्या संमतीनुसार ही मुदत वाढवताही येऊ शकते (संदर्भ: २५ ऑक्टोबर १९१० दिनी लंडन येथे झालेला करार).

    ह्याप्रमाणे खटल्याचे कामकाज चालले व निकाल आला तो अर्थातच फ्रान्सच्या विरोधात! येथे खालील विधेये लक्षात घेणे अतिशय आवश्यक आहे –
    १) न्यायाधीश मंडळ ठरवताना जर्मनी, इटली, रशिया इ. युरोपातील ताकदवान राष्ट्रांच्या प्रतिनिधींना न नेमता बेल्जियम, हॉलंड व नॉर्वे ह्या तुलनेने दुर्बळ व दुय्यम राष्ट्रांच्या प्रतिनिधींनाच तेवढे नेमले गेले. ताकदवान राष्ट्रांपैकी एकाचाही प्रतिनिधी ह्या मंडळावर नसणे, ही गोष्ट अतिशय शंकास्पद होती. हा अर्थातच इंग्लंडचा धाकदपटशा होता.
    २) न्यायालयाचे कामकाज पहिला आणि शेवटचा दिवस वगळता पूर्णतः बंद दाराआडच चालले. हे सत्यान्वेषणात अर्थातच बाधक होते.
    ३) ज्या व्यक्तीसंदर्भात हा सगळा घाट घातला गेला, त्या सावरकरांना आपली बाजू मांडण्याची साधी संधीसुद्धा दिली गेली नाही. Jean Longuet नामक गृहस्थांनी सावरकरांची बाजू मांडली (‘कैसर-ए-हिंद’मधील एम. पी. टी. आचार्य यांचा १० जानेवारी १९४३ चा लेख).
    ४) बरे करारानुसार कामकाज किमान महिनाभर चालेल असा अंदाज होता. एवढेच कश्याला, तर कामकाजास मुदत वाढवून द्यावी लागते की काय अशीही शक्यता त्या करारातच समाविष्ट केली गेली होती. प्रत्यक्षात १४ फेब्रुवारीला सुरु झालेल्या खटल्याचा निकाल दहाव्याच दिवशी म्हणजे २४ फेब्रुवारीलाच देऊनही टाकला गेला होता. खटला म्हणजे नुसता फार्सच होता, हे यावरुन उघडच दिसते! एवढे असूनही अखेरीस न्यायालयाला लाजेकाजेस्तव का होईना पण ‘सावरकरांना पकडण्याच्या व तदनंतर ब्रिटिश पोलिसांच्या हवाली करण्याच्या कामी हलगर्जीपणा झाला’ हे मान्यच करावे लागले.
    ५) आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला अडकून (Pending) असताना ब्रिटिशांनी भारतात सावरकरांवर त्याच संदर्भात खटला चालवणे कायद्याप्रमाणे चुकीचे होते. पण दरम्यानच्या काळातच भारतात नाशिक-कट-खटल्याचा निकाल लावण्यात येऊन सावरकरांना पहिली जन्मठेपदेखील सुनावण्यात आली. बरे, हा खटला प्रकरण हेगकडे जाण्यापूर्वीच सुरु झाला म्हणावे, तर जानेवारीतच म्हणजे हेगचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच ब्रिटिशांनी सावरकरांवरील दुसऱ्याही आरोपाची चौकशी सुरु केली, एवढेच नव्हे तर महिना संपायच्या आतच म्हणजे ३० जानेवारी दिनी त्याही खटल्याचा निकाल लावून सावरकरांना दुसरी जन्मठेपदेखील सुनावली. ब्रिटिशांच्या ह्या कुटील खेळीमुळे हेगचा निकाल येण्याआधीच सावरकरांवर ‘दोषी’ असल्याचा शिक्का बसला व अर्थातच आंतरराष्ट्रीय न्यायमंडळाचे मत सावरकरांविषयी आपसूकच कलुषित झाले. त्यामुळे सावरकरांना फ्रान्सच्या ताब्यात दिल्याने काहीही साधले जाणार नाही असेच न्यायमंडळाचे मत पडले.

    सावरकरांना अवैधरित्या अटक केल्यावर जश्या जगभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या, तश्याच या निकालामुळेही उमटल्या. काही उदाहरणे देणे अगदीच विषयाला धरुन ठरेल. खालील सर्व संदर्भ शि. ल. करंदीकरलिखित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र’मधून –
    १) ‘लंडन टाईम्स’चा हेगस्थित प्रतिनिधी लिहितो की, हेगचा निकाल देताना न्यायमंडळाची एकवाक्यता नव्हती; एवढेच नव्हे तर फ्रान्सने मांडलेले मुद्दे पुर्णपणे दुर्लक्षित करण्यात आले.
    २) ‘पोस्ट’ ह्या जर्मन वृत्तपत्राने लिहिले की, सदर निर्णायाने सावरकर-प्रकरणाच्या खऱ्या मुद्द्यालाच बगल दिली आहे.
    ३) ‘मँचेस्टर गार्डियन’ने लिहिले की, हेगचा निर्णय वाचून लोक आश्चर्याने स्तिमित होऊन जातील.
    ४) ‘डेली न्यूज’ने तर लिहिले की, ह्या निर्णयामुळे आरोपींना असलेल्या परदेशात आश्रय मिळवण्याच्या अधिकाराचाच संकोच झाला आहे.
    ५) ब्रिटिश सांसद Wagewood ह्यांनी पं. श्यामजी कृष्ण वर्मा यांना पाठवलेल्या पत्रात लिहिले की, “सावरकर-प्रकरण मुळात त्रयस्थांकडे सोपविणे ही फ्रान्सची घोडचूक असल्याचे L’Humanite वृत्तपत्राचे म्हणणेच शेवटी खरे ठरले. माझ्या एका सांसद मित्राने मला खात्रीपूर्वक सांगितले होते की, फ्रान्सने आपली बाजू जेव्हा महत्वाची विधेये वगळून मांडली तेव्हाच फ्रान्सचे हरणे ठरुन गेले होते”.

    युरोपातली वृत्तपत्रे सावरकरांना ‘Martyr’ म्हणून गौरवित असताना आपल्याकडील अँग्लो-इंडियन वृत्तपत्रे मात्र हर्षभरित झाली होती. एकाने तर ‘The rascal at last met his fate’ अशी नीच भाषा वापरण्याइतपत मजल मारली.

    आणि सावरकर..? ज्याच्यापायी सबंध जग ढवळून निघत होते, ते सावरकर ह्यावेळी काय करीत होते?तो क्रांतियोगी शांत, अविचल, स्थितप्रज्ञ अवस्थेत डोंगराच्या तुरुंगात अंदमानला जाण्याची वाट पाहात दिवस कंठत होता. इंग्लंडला मान खाली घालायला लावून भारतीय स्वातंत्र्ययुद्ध सातासमुद्रापल्याड नेत जगभर गाजविण्याचा त्यांचा हेतू पुरेपूर सफल झाला होता. प्राप्त परिस्थितीत याहून अधिक काही करता येण्यासारखे नव्हतेच. ना सावरकर हेगच्या निकालावर अवलंबून होते. एखाद्या आरोपीला जर दोन वेगवेगळ्या अपराधांसाठी दोन वेगवेगळ्या जन्मठेपी सुनावल्या असतील, तर कायद्यानुसार त्या दोन्हीही एकत्र करुन एकच जन्मठेप भोगावयाची असा नियम असतानाही सावरकरांच्या बाबतीत मात्र स्वतःच केलेला कायदा मोडून ब्रिटिश त्यांना एकामागोमाग एक दोन जन्मठेपी – म्हणजे ५० वर्षे शिक्षा भोगायला लावत होते. ब्रिटिश सरकार सावरकरांना किती घाबरुन होते, याची याहून मोठी काय पावती हवी? हेगचा निकाल येण्याआधीच सावरकरांनी अन्यायाचा पहाड सोसला होता. त्यापुढे हेगचा निकाल म्हणजे किस झाडकी पत्ती! गंमत म्हणजे दोन जन्मठेपी सलग भोगण्याचा निर्णय घेऊन जो इंग्रज अधिकारी सावरकरांकडे आला, त्याला वाटले सावरकर आता रडतील – मग रडतील!! उलट हसत हसत सावरकर त्याला म्हणाले, “चला, एका मागोमाग एक दोन जन्म शिक्षा भोगण्याच्या निमित्ताने का होईना पण तुमच्या ख्रिस्ती सरकारने आम्हां हिंदूंचा पुनर्जन्माचा सिद्धांत तर मानला”!

    — © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, तसेच विविध विषयांवर लेखकाची व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)

    image

  • उडी, नव्हे भारतीय स्वातंत्र्याची गुढी!!

    ८ जुलै १९१० दिनी स्वा. सावरकरांनी त्रिखंडात गाजलेली उडी मारली. म्हणजे नेमकं काय केलं? गुडघ्यात मेंदू आणि त्या मेंदूलाही मूळव्याध झालेले बिग्रेडी सोडले, तर का त्या उडीला जगभरचे इतिहासकार एवढं महत्त्व देतात? सावरकरांनी उडी मारली ती ‘मोरिया’ नौका मार्सेल्स (फ्रान्स) येथील धक्क्यावर उभी असताना पोर्टहोलमधून! लक्षात घ्या, जहाज ते धक्क्याची भिंत हे अंतर आहे सुमारे ८.५ फूट. सावरकरांचा देह ५-५.५ फुटाचा. म्हणजे उडी मारताना सावरकरांना मोकळी जागा किती मिळतेय? अवघी २.५-३ फूट!! जरादेखील इकडेतिकडे झालं, तरी एकतर कपाळमोक्ष तरी होणार वा हातपाय तरी तुटणार! कारण पुन्हा पोर्टहोल ते समुद्रसपाटी ही उंची आहे सुमारे २७ फूट! एवढ्या उंचीवरुन सावरकर समुद्रात पडले. समुद्रात बरं का! मामाच्या गावच्या विहिरीत नव्हे!! त्यानंतर अवघ्या काही क्षणांत त्यांनी पोहत पोहत जहाजाच्या सुकाणूला वळसा घातला आणि ते बंदराच्या दुसऱ्या भिंतीशी आले! ही भिंत होती सुमारे ९ फूट. शिवाय सतत पाण्याच्या संपर्कामुळे अर्थातच निसरडी झालेली! सावरकर ही ९ फुटांची निसरडी भिंत अवघ्या काही पळांमध्ये चढले, यावरुन कल्पना करा की काय अचाट सामर्थ्याचा माणूस असेल तो. सावरकर बंदरावर पोहोचले, तेव्हा कुठे जहाजावर पहारेकऱ्याच्या लक्षात आलं की, ‘बंदी पळाला’. नाहीतर इतका वेळ सगळे शुंभासारखेच बसून होते. मग धावाधाव सुरु झाली. मग सावरकरांना पकडलं गेलं, जहाजावर परत आणलं गेलं आणि मग पुढचा प्रवास सुरु झाला. (सर्व संदर्भ श्रीमती अनुरुपा सिनार ह्यांच्या संशोधनातून). हे वर्णन वाचायलाही अधिक वेळ लागला असेल, इतक्या कमी वेळात ही जगाच्या इतिहासावर कायमचा परिणाम करणारी घटना घडून गेली. सावरकरांना एकदा एका चिनी सहबंद्याने विचारलं होतं की, ‘किती महिने पोहत होता’? त्यावर सावरकर म्हणाले, ‘महिने कसले? पाच मिनिटंही पोहलो नसेन’!

    मग आता प्रश्न असा उभा राहातो की, जी उडी मारुन पुन्हा अटक होईपर्यंत पाच-दहा मिनिटेसुद्धा धड गेली नव्हती, तिला इतिहासाने एवढं महत्त्व का द्यावं? पलायन म्हणाल, तर कुणी म्हणेल ते फसलेलं पलायन होतं. साहस म्हणाल, तर कुणी म्हणेल ते वाया गेलेलं साहस होतं. खरंच का ते फसलेलं पलायन आणि वाया गेलेलं साहस होतं? याचं उत्तर अवघ्या तीनच दिवसांत वृत्तपत्रांनी दिलं!!

    १) ‘ल लिबर्सियन’ ह्या वृत्तपत्राने ११ जुलै १९१० ला संपादकीय लिहिलं, “इंग्लंडचे कुख्यात साम्राज्य हे रक्तपात व दडपशाहीवरच आधारलेले आहे. सावरकरांना फ्रान्सच्या भूमीवर केलेली अवैध अटक हे त्याचेच प्रतीक आहे. सरकारने फ्रेंच राज्यक्रांतीची वैभवशाली मर्यादा राखायला हवी व सावरकरांचा ताबा मिळवून त्यांना संपूर्ण संरक्षण द्यावयास हवे”.
    २) ‘ल ह्युमनाईत’ने १२ जुलै १९१० दिनी ह्या घटनेचे वर्णन ‘फ्रान्सच्या राज्यक्रांतीशी प्रतारणा’ असे केले.
    ३) ‘द प्रेझेन्स’ने फ्रान्सच्या विदेशमंत्र्यांकडे मागणी केली की, ‘सावरकरांना ताबडतोब परत मिळवावे’.
    ४) ‘ल एब्लर’ने १६ जुलै १९१० ला लिहिले की, “स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना आश्रय देण्याची फ्रान्सची परंपरा आहे. तिलाच फ्रेंच सरकारच्या भ्याडपणामुळे काळीमा फासला गेलाय. प्रत्येक फ्रेंच माणसाला शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली आहे”.
    ५) ‘ल टेम्पस’ने १८ जुलैला लिहिले की, “सावरकरांच्या अलौकिक शौर्याचे कौतुक प्रत्येक फ्रेंच माणसाने करावयास हवे. सावरकरांची मुक्तता व सन्मानपूर्वक फ्रान्समध्ये आगमन हे फ्रेंच सरकारचे कर्तव्य आहे. त्यासाठी सावरकरांवरील अन्याय दूर होईपर्यंत कुणाही फ्रेंच माणसाने विश्रांती घेता कामा नये”.
    ६) ‘ल मातिम’ने २१ जुलैला लिहिले की, “फ्रेंच सरकारने सावरकरांना सोडवले नाही, तर जगात तोंड दाखवायला जागा राहाणार नाही”.

    इंग्लंडमध्येही धुमश्चक्री सुरु झाली. सावरकरांच्या खेळीमुळे ब्रिटिशच कसे ब्रिटिशांवर तुटून पडले पाहा –
    ७) द डेली मेल’चे संपादक रॉबर्ट लिंड २२ जुलैला लिहितात, “ब्रिटीश पोलिसांच्या नीच कृतीमुळे अन्य देशांमध्ये आश्रय घेण्याच्या कायद्याची थट्टाच झाली आहे. कायद्याची अक्षरशः टवाळी केली आहे आपण ब्रिटिशांनी”.
    ८) ‘द मॉर्निंग पोस्ट’ने ३० जुलैला लिहिले, “कायद्याचे सार्वभौमत्व जपण्याचा ब्रिटनने आजवर अभिमान बाळगला होता, तो आपण स्वत:च्याच हातांनी आज उद्ध्वस्त केला”.

    भारतमंत्री लॉर्ड मोर्लेंना चक्क आपले पद गमवावे लागले. इतर देशांत काय झाले –
    ९) १२ जुलैच्या ‘द बर्लिन पोस्ट’ ह्या जर्मन वृत्तपत्राच्या अंकात लिहिलेय, “इंग्लंड आजवर जगाला अक्कल शिकवत आलाय, पण स्वतः मात्र किती पाखंडी आहे पाहा. सावरकरांना पकडून प्रत्यक्ष कायद्याचाच बळी दिला त्यांनी”.
    १०) इटलीतील रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. झान्द्रीन ह्यांनी सावरकरांच्या मुक्ततेसाठी आंदोलन आरंभले. इटलीत!!
    ११) स्विस वृत्तपत्र ‘डेर् वॉण्डरर’ लिहिते, “ब्रूटसच्या खंजिराप्रमाणे विश्वासघात करुन ब्रिटिश सरकारने स्वातंत्र्यदेवतेचा खून केलाय”.
    १२) ‘ल सोसिएत’ हे बेल्जियन वृत्तपत्र लिहिते, “इंग्लंडच्या एका कृतीने सबंध युरोपला तमोयुगात लोटलेय”.
    १३) ब्रिटनमधील स्पेनचे उपाधिकारी पिअरॉ, पॅराग्वेचे राजदूत जॉम्बॉ, पोर्तुगालचे राजदूत इ. सर्व उच्चाधिकाऱ्यांनी ब्रिटिश सरकारचा निषेध केला आणि ब्रिटनची कारवाई अनैतिक आहे व सावरकरांना तात्काळ फ्रान्समध्ये आश्रय द्यावा, असे लेखी पत्र दिले.
    १४) ‘द असाही शिम्बुन’ ह्या जपानी वृत्तपत्रानुसार जपानचे सांसद मोयो यांनी संसदेत सावरकरांच्या मुक्ततेची मागणी प्रतिपादली.

    उपरोक्त सर्व संदर्भ डॉ. प. वि. वर्तकांच्या ‘सावरकर – चावट की वात्रट’मधून. आंतरराष्ट्रीय राजकारणात असा सर्वत्र दबाव निर्माण झाल्यामुळे अखेरीस २९ जुलैला फ्रेंच सरकारने सावरकरांच्या मुक्ततेची अधिकृत मागणी केली आणि अवघे प्रकरणच हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेले! विचार करा, एका गुलाम देशातला एक साधासा कैदी, पण त्याच्या एकाच डावामुळे फ्रान्स आणि इंग्लंड हे युरोपातले दोन ‘दादा’ देश चक्क न्यायालयात एकमेकांशी भांडताहेत आणि ह्या सगळ्याला कारणीभूत असलेले सावरकर मात्र गावातल्या गालात हसत मजा पाहाताहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल इंग्लंडच्या बाजूने लागला खरा, पण इंग्लंडने शेकडो वर्षे झडून कमावलेला सन्मान सावरकरांनी अवघ्या पाचच मिनिटांत धुळीस मिळवला होता! ह्या निकालाचा परिणाम एवढा खोल झाला की, त्यानंतर अवघ्या ५ च दिवसांत चक्क फ्रान्सच्या पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागला! आता बोला!! सावरकरांच्या ह्या कुटील खेळीमुळे इतिहासात पहिल्यांदाच जगाला समजले की, भारत नावाचा कुणीतरी देश आहे जो आपल्या स्वातंत्र्यासाठी झगडतोय. नाहीतर तोपर्यंत सगळेच आपल्याकडे दुर्लक्ष करायचे! ह्या घटनेमुळे सावरकरांचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर प्रभाव पडला, तो कायमचाच. याच प्रभावाचा पुढे सुभाषबाबूंना उपयोग झाला! अशी ही सावरकरांची त्रिखंडात गाजलेली उडी. अवघ्या जगाला प्रेरणा देणारी. कवींनी थेट हनुमंताच्या उडीसोबत तुलना केलेली. जगाच्या इतिहासात कायमची छाप सोडणारी! काय गंमत आहे पाहा, वर मी संदर्भ दिले आहेत की अवघ्या जगाने काय प्रतिक्रिया दिली. त्यावरुन दिसते की, साऱ्या जगाने सावरकरांच्या चातुर्याला कसा बरोब्बर प्रतिसाद दिला. राजकारणच ना ते! सावरकरांनी साऱ्या जगाचाच पट केला आणि चाल रचली. केवढे मोठे साहस! आपल्याला अभिमान वाटायला हवा याचा. पण आपल्याकडची काही डुकरं मात्र केवळ ‘सावरकर आपल्या जातीचे नाहीत’ एवढ्या एकाच कारणासाठी ह्या उडीची निर्भत्सना करतात. सावरकरांना ‘संडासवीर’ सारखे गलिच्छ दूषण देतात. अरे पावट्यांनो, सावरकरांनी त्या जहाजाच्या संडासातून उडी मारली म्हणून आज तुम्ही मुक्त राहून तोंडाचा कमोड करु शकता, हे विसरु नका!! अन्यथा आज तुम्ही आडून आडून देशशत्रूंचे तळवे चाटताय, ते प्रत्यक्षात चाटत बसावे लागले असते तुम्हाला!! असो. ही तर झाली गद्दारांची लायकी. पण प्रत्येक सच्च्या भारतीयास नेहमीच सावरकरांच्या ह्या उडीचा, नव्हे भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या गुढीचा अभिमान वाटत राहिल. आणि कोटी कोटी मस्तके स्वातंत्र्यवीरांपुढे नतमस्तक होत राहातील, होतच राहातील!!

    — © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा: www.vikramedke.com)

    image

  • असल उत्तर

    १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धातली घटना आहे. पाकिस्तान आधीपासूनच जिहादी मनोवृत्तीचे राष्ट्र, त्यामुळे ते युद्धखोरीसाठी सातत्याने तयारच असायचे. त्यातच अमेरिकेने त्यांना एम-४७ आणि एम-४८ पॅटन रणगाडे पुरवल्यामुळे तर त्यांची ताकद काहीच्या काहीच वाढली होती. याउलट भारताकडे मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या वेळचे काही जुने एम-४ शेरमन रणगाडे, काही सेंच्युरियन रणगाडे आणि काही हलके एएमएक्स-१३ रणगाडे असे अत्यंत जुनाट आणि तुटपुंजे असे शस्त्रबळ होते. पाकिस्तानला ही गोष्ट पक्की ठाऊक होती. त्यामुळे त्यांनी एक योजना आखली. पंजाबच्या खेमकरण क्षेत्रात त्यांनी १-२ नव्हे तर चक्क २२० पॅटन रणगाडे उतरवले. त्यांच्यापुढे आपल्या मोजक्या युद्धसामग्रीचा टिकाव लागणे कदापिही शक्य नव्हते. एवढे प्रचंड बळ उतरवून खेमकरण क्षेत्र झटक्यात जिंकून घ्यायचे आणि त्याच्या बदल्यात काश्मिरची मागणी करायची, असा पाकिस्तानचा डाव होता!

    खेमकरण क्षेत्रात त्यावेळी आपली ४थी माऊंटन डिव्हिजन तैनात होती. त्यांच्याकडे थोडंफार पायदळ आणि उपरोक्त तिन्ही प्रकारचे प्रत्येकी ४५ रणगाडे होते. या डिव्हीजनचे नेतृत्व करत होते मेजर जनरल गुरबक्ष सिंह (की हरबक्ष सिंह?)!! इतक्या कमी सामर्थ्यानिशी पाकिस्तानशी भिडणं म्हणजे अक्षरशः आत्महत्या ठरली असती. त्यांनी ताबडतोब आपल्या डिव्हिजनला ते क्षेत्र रिकामे करत माघार घेण्याचा हुकूम सोडला. दिनांक होता ८ सप्टेंबर १९६५!!

    पाकिस्तानच्या गोटात ही बातमी पोहोचताच त्यांना आनंदाचे भरतेच आले!! त्यांनी अजून जोरात आगेकूच आरंभली. आणि इथेच ते गुरबक्ष सिंहांच्या सापळ्यात अडकले!! गुरबक्ष सिंहांनी आपल्या सैन्याला माघार घेण्याचा हुकूम अवश्य दिला होता, पण माघार म्हणजे पळून जाणे नव्हे. गुरबक्ष सिंहांनी आपल्या सैन्याला खेमकरण भागातल्याच ‘असल उत्तर’ गावाला तिन्ही बाजूंनी घेरलेल्या अवस्थेत पेरून ठेवले होते. खेमकरण भाग मुळातच सुपीक आणि भुसभुशीत मातीचा. त्यातून दिवस ऊसाच्या हंगामाचे. बहरलेल्या ऊसांच्या शेतांमुळे भारतीय सैन्य सहजच लपून गेले होते. गावाला तिन्ही बाजूंनी घेरल्यामुळे आपोआपच इंग्रजी U सारखा आकार तयार झाला होता. आणि त्या व्यूहात समोरून पाकिस्तानी सैन्य आत घुसतच चालले होते!!

    पण नुसती व्यूहरचना करून उपयोग नव्हता. जोपर्यंत पाकिस्तानकडे पॅटन रणगाडे होते, तोपर्यंत आपला कोणताही व्यूह भेदणे त्यांच्यासाठी डाव्या हाताचा मळ होता. दि. ९ सप्टेंबर!! पाकिस्तानी रणगाडे आपल्या व्यूहात अगदी आतवर शिरले. आणि काही कळायच्या आतच भारतीय सैन्याने त्यांच्यावर न भूतो न भविष्यति मारा करायला सुरुवात केली. आपले रणगाडे नुसते आग ओकत होते आग!! पाकिस्तान्यांनी उत्तर देण्यासाठी प्रयत्न केला, तर त्यांच्या रणगाड्यांची आतवर शिरलेली पहिली फळी जागची हललीच नाही! त्यांनी जरा अजून जोर लावून हलायचा प्रयत्न केला तर.. हाय रे दुर्दैवा.. त्यांचे रणगाडे जमिनीत रुतून बसले होते आणि जितकी जास्त हालचाल करू तितके अजूनच रुतत चालले होते. कसा काय झाला होता हा चमत्कार?

    त्याकाळी भारत आणि पाकिस्तान दोघांकडेही रात्री युद्ध करण्याची क्षमता नव्हती. गुरबक्ष सिंहांनी ८ सप्टेंबरच्या रात्रीच त्याठिकाणची भुसभुशीत जमीन लक्षात घेऊन तिथे पाण्याचे टँकरच्या टँकर रिते केले होते. ते कमी म्हणूनच की काय, जवळच्या एका कालव्याचे सगळेच्या सगळे पाणी त्याठिकाणी वळवले होते. आधीच जमीन भुसभुशीत, त्यात प्रचंड पाणी!! दलदल तयार झाली अक्षरशः तिथे!! आणि दुसऱ्या दिवशी जडशीळ पाकिस्तानी रणगाडे अलगद त्या दलदलीत सापडले! एकदा पहिली फळी अडकली म्हटल्यावर मागच्या सर्व फळ्या आपोआपच अचल झाल्या!! भारतीय सैन्यासाठी आयती मेजवानीच जणू!! जणू काही रणगाड्यांचा सराव चाललाय अश्या थाटात निपचित पडलेल्या शत्रूवर तिन्ही बाजूंनी तुफान मारा केला आपण. पाकिस्तानने २२० रणगाडे म्हणजेच त्यांच्या समग्र क्षमतेच्या १/३ रणगाडे उतरवले होते. मात्र त्या एकाच दिवसांत आपण त्यांचे तब्बल ९७ रणगाडे उडवले आणि जवळजवळ ११ रणगाडे हस्तगत केले, आपल्या केवळ १० रणगाड्यांच्या मोबदल्यात!! इतर लोक तर सोडाच, पण पाकिस्तानचा कमांडर मेजर जनरल नासिर अहमद खान स्वतःच या लढाईत गंभीररित्या जखमी झाला!! भरपूर ताकद असलेल्या परंतु कवडीचीही अक्कल नसलेल्या पाकिस्तानला बिनशर्त माघार घ्यावी लागली, हे सांगावयास नकोच!! लवकरच त्यांचे वायुदल लाहोरहून झेपावणार होते. पण त्यांची अशी काही दातखिळ बसली, की ते वायुदल कधी झेपावलेच नाही!! याच युद्धादरम्यान कंपनी क्वार्टर मास्टर हवलदार अब्दुल हमिद यांनी एकहाती ६ रणगाडे मारले आणि ७ वा उद्ध्वस्त करताना त्यांना वीरमरण आले. या पराक्रमासाठी त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र हा सर्वोच्च लष्करी सन्मान प्रदान करण्यात आला.

    ही लढाई ‘असल उत्तरची लढाई’ म्हणून ओळखली जाते. ‘असल उत्तर’ जणू नीच पाकिस्तान्यांना भारतीय जवानांनी दिलेले ‘असल उत्तर’च (खरे प्रत्युत्तर!) ठरले!! दुसरं महायुद्ध वगळता रणगाड्यांनी लढलं गेलेलं हे जगातलं सर्वांत मोठं युद्ध!! पाकिस्तानच्या पराभवाचे स्मरण म्हणून त्या जागेचे नाव ‘पॅटन नगर’ असे ठेवण्यात आले!! ते गाव आजही उभे आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही म्हण सिद्ध करणारी भारताची विजयपताका उंचावत!!

    — © विक्रम श्रीराम एडके.
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी अथवा विविध विषयांवर लेखकाने दिलेली व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com]

    image

  • एका पेटंटची गोष्ट

    आज आपण अगदी सहजपणे मोबाईल, रेडिओ इ. साधने वापरतो. परंतु या सर्व ‘बिनतारी संदेशवहना’चा (Wireless Telecommunication) शोध कुणी लावलाय माहितीये का? हा शोध लावणारी व्यक्ती एक भारतीय आहे, नव्हे आपल्या सर्वांच्या परिचयाचीदेखील आहे! त्यांचं नाव आहे, आचार्य जगदिशचंद्र बसू (१८५८-१९३७)!! होय, ‘वनस्पतींनाही जीव असतो’ ही हिंदूधर्मातील संकल्पना वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करणारे व त्या तत्त्वावर आधारित ‘क्रेसोग्राफ’ या यंत्राची निर्मिती करणारे प्रा. जगदिशचंद्र बसू!! ते नुसते वनस्पतीशास्त्रज्ञच नव्हते, तर भौतिकशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, पुरातत्त्वविद, आणि विज्ञानकथालेखकदेखील होते! एवढेच कश्याला, आज वापरात असलेल्या ‘रेडिओ’च्या निर्मितीचेही श्रेय प्रा. बसू यांनाच दिले जाते, हे सर्वच वैज्ञानिक प्रगतीसाठी पाश्चिमात्यांकडे आस लावून पाहाणाऱ्या भारतीयांच्या गावीही नसेल! मग चंद्रावरील एका खळग्याला सन्मानपूर्वक त्यांचे नाव देण्यात आले आहे, हे माहिती असायची शक्यता तर आणखीनच धूसर!

    image
    आचार्य जगदिशचंद्र बसू

    मुळात आचार्यांचा स्वभावच निरीच्छ, त्यामुळेच त्यांनी ना कधी आपल्या संशोधनाचा व्यवसाय केला ना कधी पेटंट घेण्याच्या फंदात पडले. किंबहूना संशोधनांचे स्वामित्त्वाधिकार घेऊन त्यांचे बाजारीकरण करण्याला त्यांचा कायमच विरोध होता. ३० नोव्हेंबर १९१७ दिनी ‘बोस इन्स्टिट्यूट’ या आपल्या जगप्रसिध्द संशोधनसंस्थेचे उद्घाटन करताना त्यांनी दिलेल्या ‘Voice of Life’ या प्रसिद्ध व्याख्यानातही त्यांनी याच तत्त्वाचा पुरस्कार केलेला आढळतो! परंतु याच संस्थेच्या वेबसाईटवर (www.boseinst.ernet.in) मात्र त्यांच्या ‘Galena Detector’ या संशोधनाचे पेटंट त्यांच्या नावावर असल्याचे सांगितले आहे. हे काय गौडबंगाल आहे बुवा? वास्तविक स्वत: आचार्य बसू यांनीच लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूट या विख्यात संस्थेत व्याख्यान देताना आपले ‘Galena Detector’ हे संशोधन मांडले होते व स्पष्टपणे नमूद केले होते की, ‘सदरचे यंत्र व त्यापाठचे संशोधन सर्वांनाच व्यावसायिक व इतर सर्व वापरासाठी मोफत उपलब्ध असेल’ (संदर्भ : ‘विज्ञान प्रसार’या शासकीय उपक्रमाच्या वेबसाईटने प्रकाशित केलेले सुबोध महंतीलिखित आचार्य बसू यांचे चरित्र). एवढेच कश्याला, त्याकाळात या संशोधनाच्या व्यावसायिक उपयोजनासाठी आलेले लठ्ठ रकमेचे सारेच प्रस्ताव आचार्य बसू यांनी धुडकावून लावले होते. तरीही या संशोधनाचे पेटंट आचार्यांच्या नावे कसे काय आढळते?

    image
    स्वामी विवेकानंद

    याचे उत्तर आहेत स्वामी विवेकानंद!! बसूंचे Galena Detector हे जगातील पहिलेवहिले ‘अर्धवाहक’ (Semi-Conductor) होय. यालाच पहिल्या पिढीतला ‘प्रकाशयोगी घट’ही (Photovoltaic Cell) म्हणता येईल! असे म्हणतात की, स्वामी विवेकानंदांना आचार्यांच्या या संशोधनाचे भविष्यकालीन महत्त्व जाणवले होते. तसेच, आपल्या विरक्त वृत्तीमुळे आचार्य या संशोधनाचे पेटंट घेऊ इच्छित नाहीत, हेही स्वामीजींनी ठाऊक होते (संदर्भ : The Monk As Man – The Unknown Life Of Swami Vivekananda, पृ. १४-२५, लेखक : मणिशंकर मुखर्जी, पेंग्विन बुक्स प्रकाशन). त्यामुळेच शिकागो येथील धर्मसभेसाठी अमेरिकेला जाण्यापूर्वी त्यांनी आचार्यांची भेट घेतली व त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यात यश येत नाहीसे लक्षात आल्यावर त्यांनी सदर यंत्राच्या प्रती तयार केल्या व आपल्यासोबत अमेरिकेला नेल्या. अमेरिकेतील वास्तव्याच्या काळात स्वामीजींनी नुसती व्याख्यानेच नाही दिली, तर आपली शिष्या व प्रख्यात लेखिका-समाजसेविका श्रीमती सारा बुल हिला सांगून सदरच्या यंत्राचे पेटंटदेखील आचार्य बसूंच्या नावे नोंदवले!!

    आज सदर संशोधनाचे पेटंट पाहू गेल्यास ते अमेरिकेत नोंदवले आहे, हे दिसते (पेटंट क्र. US755840). आवेदक या नात्याने आचार्यांच्या नावासोबत श्रीमती बुल यांचेही नाव दिसते. शिवाय स्वामीजींची वैज्ञानिक संशोधनाबाबतची दूरदृष्टी व त्यांचा आचार्यांशी असलेला स्नेहदेखील सुपरिचित आहे. तेव्हा सदरचे पेटंट हे स्वामीजींच्याच सांगण्यावरून नोंदवण्यात आले हे उघड आहे. किंबहूना श्रीमती बुल व आचार्य यांचा परिचय स्वामी विवेकांनंदांमुळेच झाला. श्रीमती बुल यांनी आचार्यांना प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी ४००० डॉलर्सची मदत केल्याचेही उल्लेख आढळतात (संदर्भ : Swami Vivekananda – The Living Vedanta, पृ. २४०-२४२, लेखक : बद्रिनाथ चतुर्वेदी). परंतु स्वामीजी शिकागोसाठी मार्गस्थ झाले ३१ मे १८९३ दिनी आणि आचार्यांनी रेडिओलहरींवरील आपले संशोधन सुरु केले १८९४ साली. तेव्हा सदरचे पेटंट हे श्रीमती बुल यांनी स्वामीजींच्याच सांगण्यावरून नोंदविले हे जरी खरे असले (संदर्भ : Swami Vivekananda & Scientists, पृ. १४, विद्यार्थी विज्ञान मंथन), तरी स्वामीजी स्वत: ते यंत्र घेऊन अमेरिकेला गेले होते ही कथा खोटी असावी, असे मला वाटते. कारण, सदर पेटंटचा आवेदन दिनांक (Filing Date) हा ३० सप्टेंबर १९०१ असा आढळतो, तर संमति व प्रकाशन दिनांक (Granting & Publication Date) हा २९ मार्च १९०४ असा (Application No. : US19010077028 19010930) म्हणजेच, स्वामीजींच्या महानिर्वाणानंतरचा आढळतो.

    image
    श्रीमती सारा बुल

    परंतु सदर पेटंटची नोंदणी ही स्वामीजींच्या सांगण्यावरूनच झाली, ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. आज जेव्हा भारताने हळद, बासमती तांदूळ इ. अस्सल भारतीय संशोधनांचे पेटंट्स वेळीच न नोंदविल्यामुळे झालेला प्रचंड त्रास अनुभवलाय, त्या पार्श्वभूमीवर तर स्वामीजींची दूरदृष्टी अधिकच खुलून दिसते. एवढेच नव्हे, तर संशोधनकार्यास व्यापक स्वरूप येण्यासाठी संशोधनसंस्था असावी ही टाटा इन्स्टिट्यूटची आधारभूत कल्पनादेखील स्वामीजींनीच सर जमशेदजी टाटा यांना जपान ते शिकागो या प्रवासात सांगितली होती (संदर्भ : टाटांनी स्वामीजींना दि. २३ नोव्हेंबर १८९८ रोजी लिहिलेले पत्र). थोडक्यात, स्वामीजी केवळ अध्यात्मातच रममाण होणारे नव्हते, तर भौतिक जगात मानाने व ताठ मानेने जगण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, याचीदेखील जाण होती त्यांच्याठायी! एकप्रकारे अध्यात्म आणि विज्ञानाचा अपूर्व संगमच म्हणा ना! आजच्या भारताला याचीच सर्वाधिक आवश्यकता आहे. अध्यात्म व विज्ञान ही एकाच गाडीची दोन चाके आहेत. कोणतेही एक चाक जर पंगू असेल, तरीही गाडी मुक्कामी पोहोचू शकत नाही. भौतिक जगात जगण्यासाठी विज्ञान अत्यावश्यक आहेच, परंतु माणूस म्हणून उन्नत होण्यासाठी क्रियाशील अध्यात्मदेखील तितकेच आवश्यक आहे, हा संदेशच जणू स्वामीजींनी कृतीद्वारे दिला आहे!! स्वामीजींचा जन्म मकरसंक्रांतिचा! त्यानिमित्ताने तिळगुळ खाता-खाता आपण सर्वांनी स्वामीजींच्या चरित्रातून एवढा एक बोध घेतला तरी पुरे!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी तसेच स्वामी विवेकानंद या विषयावर लेखकाची व्याख्याने आयोजित करण्यासाठी संपर्क करा:  www.vikramedke.com)

  • आत्मबोध

    ‘धप्प’ असा जोरदार आवाज झाला आणि अरुळसामीने आवाजाच्या दिशेने पाहिले. काय घडले, हे लक्षात यायला क्षणभरही नाही लागला त्याला.लागलीच बोंब ठोकली त्याने! त्याचा आवाज ऐकून बघता-बघता इतर नावाडीही आसपास जमा झाले त्याच्या.
    “काय झालं रं बोंबलायला”, एकाने विचारलं!
    “त्यो.. त्यो सन्याशी.. त्यो मला दर्यापारच्या फत्तरावर न्हे म्हनत हुता.. त्यानी समिंदरात उडी मारलीन् ना..”
    कुणाला काहीच लक्षात येईना हा काय सांगतोय ते. मग पुन्हा पुन्हा खोदून विचारल्यावर तुकड्या तुकड्यांनी माहिती हाती लागू लागली ती अशी की, एक कुणीतरी सन्यासी, ‘पलिकडे श्रीपादशिलेवर पोहोचवशील का’, असं विचारत नावाडी अरुळसामीकडे आला होता. हे तर अरुळसामीचे रोजचेच काम! त्याने ताबडतोब नेण्या-आणण्याचा दर सांगितला. सन्याश्याकडे तर एक फुटकी कवडीदेखील नव्हती. तो खट्टू झाला. त्याने अरुळसामीला विनवणी करून पाहिली, पण भाडं मिळाल्याशिवाय जायला नकार दिला अरुळसामीने! सन्याश्याने वाट पाहिली की कुणी भाविक आपला खर्च करेल का. पण तसं तिथे कुणीच दिसत नव्हतं. अखेरीस सन्याश्याने जरा विचार केला, काश्या आवळला आणि ‘जय माँ कालीऽ’ अशी आरोळी ठोकत समुद्रात उडी ठोकला व पोहत पोहत पुढे जाऊ लागला. हे दृश्य पाहून अरुळसामी घाबरला. पट्टीच्या पोहोणाऱ्यासाठीदेखील अंतर काही कमी नव्हते ते. शिवाय समुद्रात अनेकविध पाशवी जलचर भरलेले! पोहत पोहत श्रीपादशिलेपर्यंत पोहोचण्याची शक्यता जवळजवळ शून्यवत् होती! आपला दोन पैश्यांचा व्यवसाय एखाद्याच्या जीवावर बेतणार या भीतीने घाबरून जाऊन अरुळसामीने बोंब ठोकली!

    “आरं पन तुला तरी काय येवढं नडलं होतं पैश्यांचं? नावेत येवढे लोक बसवून न्हेतोस, त्यांच्यात एकजण फुकट न्हेला अस्ता तर काय झिजली आस्ती तुझी व्हडी”, एकाने विचारले.
    अरुळसामी अजूनच खचला. म्हणाला,
    “माजी लई म्होटी चुकी झाली ह्ये तर खरंच, पन आता येळ दवडायला नगं! आधी त्या साधुबाबाला वाचिवलं पाह्यजे”!
    हे म्हणणं सगळ्यांना पटलं. ताबडतोब एक नाव काढण्यात आली आणि तिच्यात बसून ८-१० कोळी श्रीपादशिलेच्या दिशेने निघाले. रस्त्यात ना कुठे सन्यासी दिसला ना काही झटापट झाल्याचं लक्षण! कुणा मगरीने वा माश्याने फाडलं तरी या समुद्रात काय समजणार म्हणा! अखेरची आशा म्हणून सारे श्रीपादशिलेवर पोहोचले. आणि त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही – चिंब भिजलेला तो पंचविशीचा बलदंड सन्यासी शिलेवर ध्यानस्थ बसला होता. या मंडळींची चाहूल लागताच त्याने डोळे उघडले. एवढं दिव्य करीत श्रीपादशिलेवर पोहोचणे ही केवढीतरी मोठी गोष्ट होती. सन्यासी साधासुधा तर खचितच नव्हता. या दिव्यतेने दिपलेल्या सर्वांनी वाकून नमस्कार केला सन्याश्याला.

    काही क्षण शांततेत गेले. पहिला शब्द अरुळसामीच्याच तोंडून बाहेर पडला,
    “म्हाराज मला क्षमा करा. म्या चुकलो. पैश्यापायी खुळावलो हुतो म्या. तुमचं मोठंपण वळखू शकलो न्हाई मी. जो मानूस इथवर यायला सोत्ताच्या जीवाची बी पर्वा करत न्हाई, त्याचा हितं येन्यामागं नक्कीच कायतरी हेतू आसनार. कायतरी दैवी काम आसनार. मी मूर्ख तुमच्या या कानामध्ये येत होतो. नरकात बी जागा मिळनार न्हाई मला”!
    अरुळसामी स्वत:च्याच थोबाडीत मारून घेऊ लागला. ते पाहून सन्यासी झटकन पुढे झाला. अरुळसामीचे हात धरले आणि आसपासच्या समुद्राहूनही अधिक शांत, धीरगंभीर आवाजात म्हणाला,
    ‘वेडे की खुळे नावाडीबाबा तुम्ही? का स्वत:ला प्रताडित करताहात? अहो आईची इच्छा होती लेकराने पोहत पोहत तिच्यापाशी यावं, ती तिने पूर्ण करून घेतली. तुमचा कुणाचाही काहीही दोष नाही यात. खरंच”!
    सन्याश्याचा तो दृष्टीकोन आणि आभाळभर मोठेपण सर्वांना एका क्षणात वश करून गेले! एकाने धीर करून विचारले,
    “म्हाराज हितं तुमची जेवनाची काही सोय..”?
    “सोय अशी काहीच नाही. इथे ध्यान करण्यासाठी आलोय मी. मातेने जेवू घातलं तर जेवेन, अन्यथा ध्यान संपेपर्यंत उपवेशन!”, सन्यासी सहजपणे म्हणाला!
    “त्ये काही न्हाई, माझ्यामुळं तुमास्नी तरास झालाय, तुमी हितं आसेपत्तुर रोज म्याच जेवन आनून द्येनार तुमाला. तुमी आरामात ऱ्हावा, ध्यान करा. म्या घेईन सारी काळजी. येवढं तरी प्रायश्चित्त घेऊंद्याच मला”, अरुळसामीने जाहीर करून टाकलं!
    “जशी आईची इच्छा”, सन्याश्याने हसून मान डोलावली!
    “पन म्हाराज, तुमचं नाव काय? कुठनं आलात? तमिळ तर वाटत न्हाईत तुमी?”, अरुळसामीने विचारले.
    “होय, इथला नाही मी. बंगालहून आलोय. तीर्थयात्रा करतोय मी सध्या. अवघा देश फिरलो. अंती देशाच्या शेवटच्या टोकावर ध्यान करायचं म्हणून या कन्याकुमारीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिलेवर आलो! आणि नावाचं म्हणाल, तर बरीच नावे आहेत मला. कुणी विविदिशानंद म्हणतं, तर कुणी सच्चिदानंद म्हणतं! गेले काही दिवस लोक एका वेगळ्याच नावाने हाक मारतात मला. मलाही ते नाव आवडलंय – उच्चारायला सोपं, सुटसुटीत तरीही अर्थपूर्ण – विवेकानंद! तुम्हीही हवं तर याच नावाने हाक मारा मला!”, सन्याश्याचे निरागस उत्तर!
    “स्वामी विवेकानंद”, अरुळसामीने एकवार हे नाव मनात घोळवले व सारे परत फिरले!
    त्यानंतर तीन दिवस रोज दिवसातून दोनदा अरुळसामी जेवण घेऊन यायचा व खरकटं घेऊन जायचा. या तीन दिवसांत स्वामी एक शब्दही बोलले नाहीत. सातत्याने ध्यानमग्न असायचे ते. भोजनादी विधींसाठी उठत तेवढेच!

    तिसऱ्या दिवशी चमत्कार झाला. आजवरचे सारे आयुष्य स्वामीजींच्या नजरेसमोरून सरकू लागले. प्रेमळ वडील विश्वनाथबाबू आठवले – त्यांनी शिकवलेल्या एकेक गोष्टी, बाळपणीचा रम्य, श्रीमंती काळ आठवला! दाट केसांतून मायेने हात फिरवणारी आई भुवनेश्वरी देवी आठवली! आपला झालेला नास्तिकतेकडून आस्तिकतेपर्यंतचा प्रवास नजरेसमोर उभा राहिला त्यांच्या! वडील गेल्यानंतर नशिबी आलेलं पराकोटीचं दारिद्र्य आणि त्या जीवघेण्या काळात सुखाचा झरा बनलेली श्रीरामकृष्णांची साजरी छवि डोळ्यांपुढे उभी राहिली! ठाकूर म्हणत होते, “अरे नोरेन, तुझा देव हिमालयात नाही! या.. या.. दरिद्री लोकांमध्ये आहे! होय नोरेन, हा दरिद्रीनारायणच तुझा परमेश्वर आहे! यांची सेवा कर, तीच ईश्वराची सेवा ठरेल! ना जीवाची सेवा कर ना शिवाची, ‘शिवभावे जीवसेवा’ कर नोरेन ‘शिवभावे जीवसेवा’ कर! तोच तुझा मार्ग आहे! हिमालयात जाऊन या दु:ख-दैन्यापासून पळू नकोस. लोकांमध्ये जा! त्यांचं दु:ख अनुभव! ही अनुभूतीच तुला मार्ग दाखवेल! मार्ग – दु:खहरणाचा आणि मोक्षाचाही”!
    आणि आपणही कश्यातच, अगदी आश्रमातही न गुंतता तीर्थयात्रेला निघालो होतो! सारा भारत फिरलो आपण! पराकोटीची श्रीमंती पाहिली आणि तेवढंच दारिद्र्यही अनुभवलं! सोन्यारुप्यांत खेळणारे लोक पाहिले आणि एकवेळच्या जेवणाला मोताद माणसेही पाहिली! जनतेशी काहीही देणंघेणं नसलेले संस्थानिक जमिनदार पाहिले, जुलमी इंग्रज पाहिले; तर दुसरीकडे खेतडीच्या महाराजांसारखे जाणते शासकही पाहिले! अज्ञानात खितपत पडलेला समाज पाहिला, तसेच टिळकांसारखे ज्ञानीही पाहिले! हा देश शेकडो रंगांनी नटलेला तर खराच!
    पण एक आहे, या देशातला गरीब माणूस उपाशीपोटी झोपेल एकवेळ, पण त्याच्या मनात समाधान असेल! आस्थेचं, आस्तिकतेचं आणि अध्यात्माचं समाधान! याउलट इंग्रज शासकांकडे पैश्याने विकत घेण्याजोग्या साऱ्या काही सुखसुविधा आहेत, पण शांत झोप नाही, समाधान नाही!
    हे दोन्ही जोडलं पाहिजे! एकत्र केलं पाहिजे!! पाश्चात्यांची औद्योगिकता टिकवून त्यांना भारतीय अध्यात्म शिकवलं पाहिजे आणि भारतीयांचं समाधान टिकवून येथे पाश्चात्य सुखसोयी आणल्या पाहिजेत! कुणीतरी पूल बनून हे काम केलं पाहिजे!
    स्वामीजींच्या नजरेसमोर दिव्य प्रकाश पसरला होता! आत्मबोधाचा हा क्षण! त्या प्रकाशात जराशी हालचाल झाली आणि स्वामीजींच्या अत्यधिक संवेदनशील झालेल्या ग्रहणक्षम मनावर तरंग उमटले,
    ‘कुणीतरी? कुणीतरी का? तूच का नाही? तूच का बनत नाहीस या दोन परस्परपूरक जगांना जोडणारा पूल?’
    स्वामीजींच्या नजरेसमोर काही दिवसांपूर्वी वाचलेली ‘जागतिक धर्मपरिषदे’ची बातमी झळकू लागली! आज त्यांच्या प्रवासाची सांगता झाली होती. तीर्थयात्रेचं उद्यापन झालं होतं. आत्मबोधाची अनुभूती झाली होती. आणि आयुष्याला उद्देश मिळाला होता!

    यानंतर काही महिन्यांतच शिकागोची ‘जागतिक धर्मपरिषद’ टाळ्यांचा कडकडाट आणि भावनातिरेकाने मारलेल्या आरोळ्यांनी दुमदुमून गेली! याला कारणीभूत होते पाच शब्द! होय, केवळ पाचच शब्दांत स्वामीजींनी उपस्थित सर्व धर्ममार्तंडांना सर्वश्रेष्ठ धर्म कोणता, ते सप्रमाण दाखवून दिले! तलवार न उगारता, कुणालाही न फसवता, रक्ताचा एकही थेंब न सांडता एका हिंदू सन्याश्याने अवघी अमेरिका जिंकून घेतली! बघायला गेलं तर केवळ पाचच शब्द! पण त्यांच्यामागे स्वामीजींची सारी तीर्थयात्रा, सारा अनुभव, भावना आणि सारी सारी आध्यात्मिक अनुभूती सामावलेली होती! ते पाच विश्वविजयी शब्द होते,
    “सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका”!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (सर्वाधिकार लेखकाधीन. लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही स्वरुपात पुनप्रकाशित करू नये. केल्यास गुन्हा समजून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. आवडल्यास केवळ शेअर बटनावर क्लिक करून शेअर करावे, ही विनंती. लेखकाच्या अन्य कथा वाचण्यासाठी व ‘स्वामी विवेकानंद’ या विषयावर लेखकाने दिलेली व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)

    image

  • व्यासांची विज्ञानकथा

    भगवान परशुरामांवर जाहीर व्याख्याने देणारा मी महाराष्ट्रातील बहुतेक एकमेव वक्ता असेन. ही व्याख्यानेदेखील मी पारंपरिक भक्तिचरित्रात्मक ढंगाने देत नाही; उलट परशुरामांच्या चरित्राचे सामाजिक क्रांतिकारक, मुत्सद्दी राजकारणी इ. आजवर फारसे कुणाला माहिती नसलेले पैलू उलगडून विस्ताराने सांगत असतो. त्या ओघात खूप साऱ्या राजवंशांचे व ऋषिवंशांचे सविस्तर वर्णन येते. विशेषतः परशुरामांच्या भार्गववंशीय पूर्वजांच्या कथा येतात. त्यादेखील मी विस्ताराने सांगतो. हेतू हा की, लोकांना समजावे – ज्याकाळात इतर तथाकथित संस्कृतींना लज्जारक्षणासाठी वल्कले गुंडाळण्याचीदेखील अक्कल नव्हती आली, त्याकाळापासून भारत देश हा नुसता प्रगतच नव्हता तर आपल्याकडील थोर पुरुषांच्या व्यवस्थित वंशावळी राखण्याइतका काटेकोरदेखील होता. बायबलमध्येही अश्या वंशावळी येतात, मात्र काही अपवाद वगळता त्यांच्यामध्ये सर्वत्र परस्परविसंगतीच आढळून येते. हिंदू पुराणांमध्ये मात्र क्वचितच वंशावळी विसंगत आढळतात. याच व्याख्यानात मी ऋषि च्यवनांचीही कथा सांगतो. यांचा विवाह शर्याति राजाची कन्या सुकन्येशी झालेला होता.

    आज मी तुम्हाला याच संबंधीची एक विज्ञानकथा सांगणार आहे. तुम्ही म्हणाल की आत्तापर्यंत तर हा माणूस पुराणात होता, आता अचानक विज्ञानात कसा काय घुसला? पण मी चुकून असे बोललेलो नाहीये. मी विज्ञानकथाच सांगणार आहे. आणि तीदेखील साधीसुधी नव्हे, तर संस्कृत विज्ञानकथा! स्वत: महर्षी व्यासांनी लिहिलेली!! भागवत पुराणाच्या ९व्या स्कंधातील ३ऱ्या अध्यायात श्लोक क्र. २७ ते ३६ पर्यंत ही विज्ञानकथा येते. ती मी थोडक्यात सांगतो. इच्छुकांना ती मुळातूनच सविस्तर वाचावी!

    उपरोक्त राजा शर्यातिला सुकन्येखेरीज आणखी तीन मुले होती – उत्तानबर्हि, आनर्त आणि भूरिषेण! यांपैकी आनर्ताच्या वंशजांना ‘रेवत’ असे म्हणतात. त्यांची राजधानी होती कुशस्थली नावाची नगरी! या आनर्ताच्या मुलांमध्ये सर्वात मोठा होता ‘ककुद्मी’! त्याची मुलगी रेवती! खूप शोधूनही ककुद्मीला रेवतीलायक वर सापडत नव्हता. तेव्हा याबाबतीत मंत्रणा (सल्ला) घेण्यासाठी ककुद्मी रेवतीला घेऊन ब्रह्मलोकी ब्रह्मदेवांकडे गेला. तिथे पोहोचल्यानंतर ब्रह्मदेवांची भेट मिळण्यासाठी या दोघांना काही ‘क्षण’ (श्लोक ३०) थांबावे लागले. ब्रह्मदेव भेटल्यानंतर ककुद्मीने त्यांना नमस्कार केला. आपला येण्यामागचा उद्देश सांगितला आणि आपल्याला मुलीसाठी स्थळ म्हणून आवडलेल्या राजपुत्रांची यादीदेखील सांगितली व विनंती केली की, यातून कोणता मुलगा माझ्या मुलीसाठी नवरा म्हणून योग्य आहे, ते सांगावे. हे ऐकून ब्रह्मदेव हसले. म्हणाले, “महाराज, तुम्ही ज्यांची ज्यांची नावे सांगताहात, ते तर सर्व केव्हाच कालवश झाले. काहीकाहींच्या तर वंशातदेखील कुणी शिल्लक नाहीये सध्या. तुम्ही इकडे काही क्षण थांबलात, परंतु तिकडे पृथ्वीवर मात्र २७ चतुर्युगे (किमान २७ × १२००० × ४ = १२९६००० वर्षे) लोटली आहेत. तेव्हा तुम्ही परत जा. तुम्ही जाईपर्यंत नारायणाचा अंशावतार बलराम नावाने झालेला असेल. त्याच्याशी तुमच्या मुलीचा विवाह करा”. याप्रमाणे ककुद्मी व रेवती परत आले. रेवती व बलरामाचा विवाह झाला आणि ककुद्मी तपश्चर्येसाठी बद्रिनाथधामला निघून गेला.

    तुम्ही म्हणाल, यात विज्ञान कुठे आहे? सांगतो. भौतिकशास्त्रात सापेक्षतेचा सिद्धांत सांगितला जातो. याच सापेक्षतेच्या सिद्धांतातून एक विरोधाभास (पॅरॅडॉक्स) निर्माण होतो, ज्याला म्हणतात ‘जुळ्यांचा विरोधाभास’ (ट्विन्स पॅरॅडॉक्स). एकाच वेळी जन्माला आलेली एकसारखीच दिसणारी जुळी भावंडे. समजा वयाच्या विसाव्या वर्षी त्यांच्यापैकी एक जवळजवळ प्रकाशाच्या वेगाने अवकाशप्रवासाला गेला व समजा वीस वर्षांनी परत आला, तर इकडे पृथ्वीवर त्याचा भाऊ चाळीस वर्षांचा झालेला असेल. परंतु अवकाशगामी भाऊ मात्र त्यावेळीही विशीचाच असेल! हे घडते कारण, भौतिकशास्त्राचा नियम सांगतो की प्रकाशाच्या वेगाने जर एखादा कण मार्गक्रमण करत असेल, तर त्याच्यासाठी काळ हा थांबल्यासारखाच असतो. त्यामुळेच त्या अवकाशगामी भावंडाचे वय वाढत नाही. इकडे पृथ्वीवर राहाणारा भाऊ मात्र म्हातारा होतो! यालाच म्हणतात जुळ्यांचा विरोधाभास. हाच सिद्धांत ख्रिस्तोफर नोलानने आपल्या ‘इंटरस्टेलर’ (२०१४) या चित्रपटातही वापरला आहे. किंबहुना सध्याची अवकाशयाने प्रकाशाच्या वेगाने प्रवास करत नसूनही त्यांच्यातून प्रवास करणाऱ्यांना हा सिद्धांत सूक्ष्मप्रमाणात लागू पडतो, ज्याला ‘कालविस्तार’ (टाईम डायलेशन) असे म्हणतात. अर्थात, या विरोधाभासाची खूप सारी उदाहरणे व पर्याय आहेत, आपण समजण्यास सोपे व्हावे म्हणून सर्वात आदर्श पर्याय तेवढा पाहातो आहोत.

    उपरोक्त ‘जुळ्यांचा विरोधाभास’ सर्वप्रथम पॉल लँगेविन या शास्त्रज्ञाने १९११ साली मांडला. भागवताचा काळ हा इ. स. पू. ३५०० वर्षांपासून ते इ. स. ६०० पर्यंत वेगवेगळे संशोधक सांगतात. मात्र कुणीही संशोधक हा काळ १९११ नंतरचा असल्याचे सांगत नाही! परंतु तरीदेखील हाच जुळ्यांचा विरोधाभास व्यासांनी ककुद्मीच्या कथेत मांडल्याचे आढळत नाही का? ककुद्मी आणि रेवती प्रवास करत ‘ब्रह्मलोक’ नावाच्या ठिकाणी गेले, तिथे काही क्षण थांबले व परत आले. मात्र तेवढ्या काळात पृथ्वीवर लाखो वर्षे उलटून गेली होती. तरीदेखील परत आल्यानंतरही रेवती व ककुद्मीचे वय मात्र तेवढेच राहिले होते. ही ‘जुळ्यांचा विरोधाभास’ स्पष्ट करणारी कथाच नव्हे काय? व्यासांनी तर या कथेत ‘त्या लोकावर (ग्रहावर?) घालवलेला वेळ’ही विचारात घेतलाय!

    एक हिंदू म्हणून माझा ठाम विश्वास आहे की, आपली पुराणे हा ललित अंगाने मांडलेला का होईना पण खरा इतिहास आहे. मात्र हल्ली काही आंग्लाळलेली मंडळी भारतीय संस्कृतीचे ऐतिहासिकत्व मुळापासून नाकारतात. तर ठिक आहे. वादात नको पडायला. सदर कथा भागवतपुराणात आहे? आहे! ती ‘जुळ्यांचा विरोधाभास’ मांडला जाण्याच्या खूप वर्षे आधी लिहिलेली आहे? आहे! त्यात आजच्या जगातले विज्ञान विचारात पाडण्याइतपत प्रमाणात आहे? आहे! तर मग व्यासांनी एक काल्पनिक का होईना परंतु विज्ञानकथा लिहिली, एवढे तरी आपल्याला मान्य करणे भागच आहे. शिवाय विज्ञानकथा लिहिण्यासाठीसुद्धा कुठेतरी त्या अचूक विचारांपर्यंत पोहोचण्याइतके प्रगत विज्ञान अस्तित्वात असावे लागते. भारतीय संस्कृती व्यासांच्या काळात तेवढी तरी वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत होती, हेही मान्यच करावे लागते. कारण कल्पनेलादेखील कुठे ना कुठे वास्तवजगतातील अनुभवाचा आधार असतो; इथे तर व्यासांनी एका अतिशय तात्त्विक व गणितीय बाबीचा आपल्या कथेत खुबीने वापर केल्याचे दिसतेय! तेव्हा कुणी नाकारो वा स्वीकारो, सदर कथा खरोखर घडलेली असो वा नसो; या कथेतील वैज्ञानिकता कदापिही दुर्लक्षिण्याजोगी नाही. धर्मग्रंथ म्हणून सोडून दिलेल्या संस्कृत ग्रंथांतरी या कथेसारखीच सहस्रावधी विज्ञानरत्ने पडून आहेत. अवकाश आहे तो केवळ कुणीतरी डोळसपणे शोधण्याचा!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, तसेच अनेकानेक विषयांवर लेखकाची व्याख्याने आयोजित करण्यासाठी संपर्क करा:  www.vikramedke.com]

    image

  • डोवालसाहेबांच्या भाषणातले कटू तात्पर्य

    हिंदुस्थानचे राष्ट्रीयसुरक्षा-सुमंत (‘सल्लागार’ या अरबी-उद्भव शब्दासाठी मी योजलेला संस्कृतनिष्ठ मराठी शब्द. एकतर शिवकालीन इतिहासामुळे ‘सुमंत’ सर्वांना माहिती आहे आणि शिवाय तो उपयोजण्यास सोपाही आहे! मूळ रामायणकालीन संस्कृत शब्द आहे ‘सुमंत्र’ अर्थात ‘चांगले सुचविणारा’!) श्री. अजित डोवाल यांनी तब्बल ७ वर्षे पाकिस्तानात हेरगिरी करत काढली आहेत. काही दिवसांपूर्वी ‘विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशन’च्या कार्यक्रमात सहभागी झाले असताना श्री. डोवाल यांनी स्वतःच एक अनुभव सांगितला होता. मला तो मोठा अर्थपूर्ण वाटल्यामुळे येथे सांगतोय.

    डोवालसाहेब पाकिस्तानात असताना मुसलमानवेष करून राहायचे. लाहौरला (प्रभू श्रीरामांचे सुपुत्र ‘लव’ यांच्या नावावरून असलेले मूळ हिंदू नाव ‘लवपूर’) एक मोठी ‘मज़ार’ आहे. तिथे ते एकदा गेले. धार्मिक विधी करीत असताना त्यांना जवळच बसलेल्या एका म्हाताऱ्या हाजीने हाक मारून जवळ बोलावले. डोवालसाहेब त्यांच्याकडे गेले. दुआ-सलामच्याही आधी हाजीसाहेब ताडकन म्हणाले, “तू हिंदू आहेस”!
    डोवालसाहेब गडबडले, पण त्यांनी चेहऱ्यावर तसे भासवले नाही. चेहरा निर्विकार ठेवून ते म्हणाले, “तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी मुसलमानच आहे”!
    त्या हाजीने डोवालसाहेबांना आपल्या मागे येण्याची खूण केली. त्याप्रमाणे हे त्याच्या पाठोपाठ गेले. काही कक्ष ओलांडल्यावर एका लहानश्या कक्षात दोघेही पोहोचले. हाजीसाहेबांनी दार आतून लावून घेतले आणि पुन्हा डोवालसाहेबांकडे वळून म्हणाले, “तू हिंदू आहेस”!
    डोवालसाहेब विचारले, “असं कश्यावरून म्हणता”?
    त्यावर हाजीसाहेबांनी हसून सांगितले, “कारण, तुझे कान टोचलेले आहेत”!
    आता असा बिनतोड पुरावाच दिला म्हटल्यावर डोवालसाहेब वरमले. कहीतरी बोलून वेळ मारून नेण्यासाठी ते म्हणाले, “होय, मी पूर्वी हिंदू होतो. आता मात्र धर्मांतरण करून मुसलमान झालोय. अनेक वर्षे झाली त्याला”.
    हाजीसाहेब तरीसुद्धा हसून म्हणाले, “तू खोटं बोलतोयस. तू अजूनही हिंदूच आहेस”!
    आता मात्र डोवालसाहेबांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. ते काही बोलणार तेवढ्यात हाजीसाहेबच पुढे म्हणाले, “आणि माहितीये, मी तुला कसे काय ओळखले? कारण, मीसुद्धा हिंदूच आहे”!!
    डोवालसाहेब धक्क्याने पडायचेच बाकी राहिले होते! हाजीसाहेब (?) पुढं सांगू लागले, “या हरामखोरांनी माझं सारं कुटूंब मारून टाकलं. बलात्कार केले, लुटालूट केली. मी एकटाच वाचलो. आणि आता या मज़ारच्या आश्रयाने राहातोय. इथले लोक मला हाजी समजतात. मीही बाहेर त्यांच्यासारखाच नमाज़ पढतो. पण आत या माझ्या खोलीत मात्र मी रोज गुपचुप यांची पूजा करतो -“, असं म्हणून त्यांनी एक शंकराची आणि दुर्गेची मूर्ती डोवालसाहेबांना दाखवली. “..तुझ्यासारखा कुणी दिसला की मला माझं कुटूंबच परत मिळाल्यासारखं वाटतं बघ! आणि म्हणूनच माझी सगळीकडे बारीक नजर असते, की कर्णछेदन केलेला कुणी सापडतो का”!

    मित्रहो, ‘अमन की आशा’ आणि पाकिस्तानशी चर्चा या गोष्टी बोलायला खूप सोप्या आहेत. किंबहूना त्या बोलायला फारशी अक्कलसुद्धा लागत नाही. केवळ मनात अहिंसा आणि प्रेमाच्या बेगडी कल्पना असल्या की काम भागतं! परंतु खरं सांगायला गेलं, तर पाकिस्तान हा केवळ एक आतंकवादी देशच नाहीये तर ‘दार-उल-इस्लाम’च्या अभद्र कल्पनेने पछाडलेला एक अभद्र देश आहे. तो जोपर्यंत आपली जिहादी मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी मैत्री शक्यच नाही कारण, भारतासारख्या काफीर देशाला ते सातत्याने शत्रूच समजणार! कालच पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकला २६ वर्षं तुरुंगवासाची शिक्षा फर्मावली – अपराध काय, तर एका दूरचित्रवाणी कार्यक्रमात तिने एका तथाकथित धार्मिक गीतावर नृत्य केले होते! या दर्जाचे माथेफिरू आहेत ते. आणि आधुनिक शिक्षण वगैरे मिळाल्यावर तर त्यांची धर्मांधता उलट अजूनच वाढते! या सगळ्याचे मूळ त्यांच्या ‘शिकवणूकी’त आहे. ती शिकवणूक जोपर्यंत आहे, तोपर्यंत शांतता नांदणे शक्यच नाही! आणि दुर्दैवाने ती शिकवणूक भारतातही जोरदार प्रचारली जातेय. आपले पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी याबाबतीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय योग्य भूमिका घेताहेत, पण तेवढेच पुरेसे नाहीये. आपणही यात हातभार लावला पाहिजे. आपल्या डोक्यात घुसलेलं हे ‘फेक्युलॅरिझम’ नावाचं भूत समूळ उखडून फेकलं पाहिजे. लक्षात घ्या, कट्टरतेला प्रेमाने जिंकणं हा कल्पनाविलासापुरताच असलेला बेगडी आदर्शवाद झाला. प्रत्यक्ष युद्धभूमीवर मात्र कट्टरतेला त्याहून आक्रमक अशी प्रतिकट्टरताच हरवते, हा इतिहास आहे. तेव्हा हीच वेळ आहे कट्टरांच्या विरोधात प्रतियोगिता म्हणून का होईना, पण धर्माभिमानी होण्याची! नाहीतर तो दिवस दूर नाही की आपल्याला आपल्याच भूमीवर त्या हाजीसाहेबांसारखेच अज्ञातवासात जगावे लागेल. ‘लवपूर’ही एकेकाळी आपलीच भूमी नव्हती का! डोवालसाहेबांच्या भाषणातलं कटू तात्पर्य हे असं आहे!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी तसेच लेखकाने विविध विषयांवर दिलेली व्याख्याने ऐकण्यासाठी/आपल्या परिसरात आयोजिण्यासाठी क्लिक करा:  www.vikramedke.com)

    image

  • नरकचतुर्दशीच्या निमित्ताने

    व्याख्यानांच्या निमित्ताने प्रवास करताना मनुष्यस्वभावाचे अनेक नमुने पाहावयास मिळतात. वाईट कुणीच नसतं. केवळ व्यक्ती तितक्या प्रकृती एवढंच! असाच एके ठिकाणी गेलो असता, एक बाई भेटल्या. प्रचंड स्त्रीवादी! पितृसत्ताक पद्धती झुगारून समानता मागता मागता हल्लीच्या बहुतांश स्त्रीवादी बायका जश्या नकळत ‘स्त्रीवर्चस्वाचा’ टोकाचा आग्रह धरतात ना, अगदी तश्या! बोलताना त्यांच्या तोंडी एका दमात तस्लिमा नसरीनपासून ते शोभा देपर्यंत एकाहून एक नावे येत होती. स्त्रीवर किती अत्याचार होतात आणि तिने त्यापासून कशी सुटका करून घेतली पाहिजे, हाच एक धोशा. बाईंचा नवरा अजून या जगात तग धरून आहे का आणि असल्यास अश्या प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची जिद्द त्या महानुभावाने कशी कमावली, हे विचारण्याचा मला वारंवार मोह होत होता. पण तो मी टाळला. म्हटलं, बाई रागाने अंगावर धावून आल्या तर मी एवढास्सा जीव कधी कसा चेंदामेंदा होऊन जाईन समजणारही नाही! वर मीच स्त्रीयांवर अत्याचार वगैरे करणारा ठरेन ते वेगळंच! काहीही न बोलणारा श्रोता मिळाल्यामुळे बाईंना बहुतेक अजूनच चेव आला असावा. त्या त्वेषाने माझ्या दिशेने बोट करत म्हणाल्या, “तुम्ही इतिहासकारही स्त्रियांचा केवढा अपमान करता. तुम्ही म्हणता ‘हिस्टरी’ म्हणजे ‘हिज् स्टोरी’! का असं? इतिहास काय फक्त तुम्हां पुरुषांचाच असतो का? बायकांचा नसतो? ‘हिज् स्टोरी’च का? ‘हर स्टोरी’ का नाही? सांगा ना. सांगा. आता सांगा..!!”

    खरं तर इतिहासाचा ‘गमभन’ही धड माहिती नसणाऱ्या मला बाईंनी थेट ‘इतिहासकार’च ठरवून टाकल्यामुळे मी मनापासून सुखावलो होतो. पण म्हणून काय हा असा आपल्याला समस्त पुरुषजातीचे प्रतिनिधित्व (तेही न मागताच!) देत केलेला हा असा हल्ला सहन करायचा? मी हात उंचावत त्यांना थांबवलं. म्हणालो, “मी भारतीय संस्कृतीला मानणारा माणूस आहे. आपली संस्कृती ना स्त्रीवादी आहे ना तुम्हाला वाटते तशी पुरषसत्ताक. ती सत्यवादी आहे! आता राहिला प्रश्न ‘हिज् स्टोरी’ की ‘हर स्टोरी’चा, तर ते केवळ इंग्रजाळलेल्यांचे चोचले आहेत. आपल्याकडे ‘इतिहासा’ला ‘इतिहास’ असंच म्हणतात. इति + ह + आस = इतिहास. शब्दशः  अर्थ होतो, ‘पूर्वी असे घडले’!! यात कसला आलाय स्त्री आणि पुरुषाचा संबंध”?

    या बोलण्याने बाई जराश्या वरमल्या. मूक श्रोत्याकडून अश्या ‘वेगळ्याच’ प्रत्युत्तराची त्यांना अपेक्षा नसावी. मी पुढे म्हणालो,
    “तुम्ही ‘न स्त्रीस्वातंत्र्यमर्हति’ सांगणाऱ्या मनू ऋषींना स्त्रियांचा शत्रू ठरवता. पण कधी समजून घेण्याचा प्रयत्न केलाय का की, मनू नेमकं काय म्हणाले आहेत? अध्याय ९ वा, श्लोक ३ –
    ‘पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने।
    रक्षंति स्थविरे पुत्रा: न स्त्रीस्वातंत्र्यमर्हति।।’
    अर्थात स्त्रीचे कुमारवयात पिता रक्षण करतो, तरुणपणी पति आणि उतारवयात मुलगा. स्त्रीला स्वातंत्र्य नसते! इथे ‘स्वातंत्र्य’ हा शब्द आधीच्या तीन ओळीत आलेल्या ‘रक्षण’ या शब्दाच्या संदर्भात वापरलाय. आणि सर्वत्र वर्तमानकालीन रुपे वापरली आहेत, त्याअर्थी मनू काही ‘स्त्रीला स्वातंत्र्य देऊ नयेत’ असं आज्ञार्थी बोलत नाहीयेत, तर उलट त्याकाळचं समाजजीवन समजावून सांगताहेत की, ‘आपल्या समाजात वयाच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीच्या रक्षणाची इतकी काही काळजी घेतली जाते की, तिला स्वसंरक्षणासाठी करण्याची वेळ यावी इथपर्यंत गोष्टी पोहोचूच दिल्या जात नाहीत! थोडक्यात स्त्रीच्या सुखासाठी पुरुषांना कामाला लावलंय. यात काडीचा तरी स्त्रीद्वेष आहे का”?

    ही ‘बातमी’ बाईंना नवीच असावी! परंतु त्यांच्या स्त्रीवादी (की स्त्रीनियंत्रणवादी!) विचारांना असा पराभव झेपणारा नसावा. त्या काही न बोलता उठून गेल्या. हे सारं आजच आठवण्याचं कारण असं की, आज आहे नरकचतुर्दशी! आजच्याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून त्याने जबरदस्तीने बंदीवान करून ठेवलेल्या स्त्रीयांची सुटका केली होती. परंतु बराच काळ नरकासुराच्या ताब्यात राहिलेल्या त्या स्त्रियांच्या चारित्र्यावर मूर्ख समाजाने संशय घेणे साहजिकच होते. अहो, जिथे समाजाने साक्षात सीतामाईंच्या चारित्र्यावर संशय घेतला होता, तिथे या सामान्य स्त्रियांची काय कथा? किंबहूना शतपैलू मतिच्या श्रीकृष्णांसमोर या ऐतिहासिक घटनेचे उदाहरण असणारच! प्रभू श्रीरामचंद्रांचे त्यासंदर्भातले वर्तन अतिशय सरळमार्गी होते. श्रीकृष्ण अतिशय कुटील नीतीज्ञ! विवाहित सीतेवर संशय घेणे वेगळे आणि या कुमारिकांवर संशय घेणे वेगळे! श्रीकृष्ण एका शब्दाचेही स्पष्टीकरण देण्याच्या फंदात पडले नाहीत. त्यांनी सरळ त्या सगळ्या १६१०० युवतींशी एकाच मंडपात विवाहच करून टाकला. आणि एवढ्या एकाच कृतीने स्वत: राजा असलेले श्रीकृष्ण त्या स्त्रियांच्या चारित्र्याबाबत काय विचार करतात, याचा संदेश लोकांपर्यंत न बोलताच पोहोचवला! आता काय बिशाद होती कुणाची त्या तरुणींच्या चारित्र्यावर संशय घेण्याची! शिवाय या एकाच कृतीने त्या स्त्रियांचे पुनर्वसन तर झालेच, शिवाय त्यांना समाजात आवश्यक तो दर्जाही मिळाला! एकाच फटक्यात सोळा सहस्र आयुष्ये बरबाद होण्यापासून वाचली! श्रीमद्भागवतपुराणाच्या १० व्या स्कंधाच्या ५९ व्या अध्यायात या सर्व युवतींना श्रीकृष्णांनी स्वतंत्र महाल, दास-दासी इ. पुरवल्याचेही उल्लेख आहेत. त्याअर्थी स्त्रीमुक्तीवाल्यांनी आजचा दिवस ‘खराखुरा स्त्रीमुक्तीदिन’ म्हणून साजरा करायला हरकत नाही!!

    माझा स्त्रीमुक्तीवादाला काडीचाही विरोध नाही. कुणी काय विचार करावा हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. इस्लाम वा ख्रिश्चॅनिटीचा इतिहास स्त्रियांवरील अनन्वित अत्याचारांनी गच्च भरलेला आहे. त्याच्या खुणा जर पाहायच्या असतील तर आजही ISIS आणि तालिबानमध्ये काय चालतं ते तुम्ही पाहू शकता. किंबहूना त्यांच्या धर्मग्रंथांमध्येच अश्याप्रकारच्या अनेकानेक अन्यायांना नुसती परवानगीच दिलेली नाहीये, तर त्याचे धर्माच्या नावाखाली समर्थनही केले आहे. परंतु जर कुणी त्याच तागडीत हिंदू धर्मालाही तोलणार असतील, तर मात्र माझा आक्षेप आहे. धर्माचे तथाकथित ठेकेदार काय म्हणतात याच्याशी मला काहीही देणेघेणे नाही, परंतु हिंदूंचा कोणताही धर्मग्रंथ स्त्रियांवर अत्याचार सुचवत नाही, एवढे मी एक अभ्यासक या नात्याने निश्चितपणे सांगू शकतो! आणि अतिरेकी-स्त्रीवाद्यांना आवडणार नाही, परंतु भारतीय संस्कृती कोणत्याही बाबतीत स्त्रियांची बाजू घेत नाही, एवढेही मी तितक्याच निश्चयाने सांगू शकतो. आणि न रागावता विचार करणार असाल, तर भारतीय संस्कृती कोणत्याही बाबतीत पुरुषांची बाजू घेत नाही हेही मी तितक्याच ठामपणे सांगू इच्छितो! भारतीय संस्कृती बाजू घेते ती केवळ सत्याची. त्याअर्थी हिंदू संस्कृती कायम नैसर्गिक न्यायाच्या बाजूने असते. स्त्रीवादी मान्य करणार नाहीत कदाचित, परंतु स्त्री आणि पुरुषाची रचना भिन्न असते. स्त्रीमध्ये निसर्गतःच नाजूकपणा, सौम्यता असते. हिंदू संस्कृती हे ओळखून त्या-त्या बाबींमध्ये पुरुषाला तिची काळजी घ्यायला लावते. स्त्रीला वरचा दर्जा देते. म्हणून तर ‘न स्त्रीस्वातंत्र्यमर्हति’ असा काळजीचा संदेश देणारे मनू त्याच मनूस्मृतीत ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते..’ सांगून स्त्रीला थेट देवतेचा दर्जा देतात. तद्वतच पुरुषातही निसर्गतः काही रचनात्मक वैगुण्ये असतात, तिथे हिंदू संस्कृती स्त्रियांना पुढाकार घ्यायला लावते! उदाहरणार्थ – संसाररथ हाकणे!! हे पुरुषाच्या एकट्याच्या हातचे काम नोहे!! तिथे स्त्रियांमधली विचारक्षमता, समंजसपणा, सहनशीलताच कामी येते. इतके साधे सोपे आहे हे सारे! खरं तर, आपण जेव्हा केव्हा एखाद्या गोष्टीसाठी हिंदू संस्कृतीला दोष देऊ पाहातो, तेव्हा शंभरातील नव्व्याण्णव वेळा तरी तो आपल्याच गैरसमजाचा वा अनाभ्यासाचा दोष आहे, असे खुशाल समजावे! माझे अनुभवाचे बोल आहेत हे. आपण गैरसमज करतो ते आपला हिंदू धर्म आणि संस्कृतीचा सखोल अभ्यास नसतो म्हणून. म्हणजे दोष आपल्याच दृष्टीकोनाचा असतो, पण बोल मात्र हिंदू धर्म आणि संस्कृतीला लावला जातो. आणि नेमक्या अश्याचवेळी ‘सत्यमेव जयते’सारख्या उथळ मालिका बनवणाऱ्यांचं फावतं. मी तर त्याहीपुढे जाऊन असे म्हणेन की, आज जी स्त्रियांवरील अत्याचारांत वाढ झालेली दिसतेय ते आपली हिंदू संस्कृतीशी असलेली नाळ तुटण्यामुळे आणि आपल्या दिवसेंदिवस सेक्युलर होण्याच्या फालतू अट्टाहासामुळेच. नाहीतर जर समाजात स्त्रियांच्या चारित्र्याचे रक्षण करण्यासाठी झटणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचा आदर्श ठेवला गेला असता, नारीला देवतेचे स्थान देणाऱ्या मनूंचा आदर्श ठेवला गेला असता, तर समाजाचा स्त्रीकडे पाहाण्याचा दृष्टीकोनही सुधारला नसता का? चुकीच्या आधुनिकीकरणाचे तोटे आहेत ते हे असे! असो. जे झाले ते झाले. इथून पुढे तरी आपण स्त्रीमुक्ती, त्यासंदर्भात भारतीय संस्कृती यांचा पुनर्विचार करायला शिकूयात. आपल्या मुलांना खरोखरचे हिंदू संस्कार देऊयात. त्यांना उद्याचे युगपुरुष श्रीकृष्ण वा स्मृतीकार मनू होण्याची प्रेरणा देऊयात. आजच्या नरकचतुर्दशीच्या निमित्ताने याच प्रेमादरपूर्वक शुभेच्छा!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी तसेच व्याख्याने डाऊनलोड करण्यासाठी अथवा आपल्या परिसरात/शाळा-महाविद्यालयांत लेखकाची व्याख्याने आयोजित करण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

    image

  • लोकमान्यांना शंभर वर्षांनंतर लाभलेला शिष्य!!

    मोहनदास गांधी जेव्हा आफ्रिकेतून भारतात परतले होते आणि येथील विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते, तेव्हा आपल्या या प्रवासात ते लोकमान्य टिळकांनाही भेटले होते. भेट संपली. गांधी निघून गेले. ते जाताच लोकमान्य आपल्या सहकाऱ्यांकडे वळून म्हणाले, “हा माणूस पक्का बनिया दिसतोय. बोट दिलं तर हातच ताब्यात घेईल. याला दूर लोटू नका, पण फार जवळदेखील करू नका. नाहीतर हा विकून खाईल सगळ्यांना”. अर्थातच टिळकयुगाच्या अस्तानंतर लोकमान्यांचा हा मुत्सद्दी सल्ला कुणीच मानला नाही. हळूहळू सारी काँग्रेसच गांधींच्या कह्यात गेली. त्यातून पुढे काय काय रामायणे घडली आणि देशाला त्याचे काय काय परिणाम भोगावे लागले, हा एक वेगळाच विषय आहे.

    मात्र मला आज एक असा कुटील राजकारणी दिसला — मी मुद्दामहून ‘कुटील’ हा शब्द वापरतोय — ज्याने शंभर वर्षे उलटून गेल्यावरही लोकमान्यांचा सल्ला पक्का आत्मसात केलाय. नव्हे, तर अक्षरशः अंगी बाणवलाय! त्या कुटील राजकारण्याचं नाव आहे, मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी! मोदी कायम गांधींचे आणि त्यांच्या विचारांचे गुणगान करत असतात. पण म्हणून त्यांनी गांधींना कधी जवळ केल्याचे पाहिलेय का हो? तर अजिबात नाही! जेव्हा गुजरातची अस्मिता दाखवण्याची वेळ आली तेव्हा त्यांना गुजराती असलेले गांधी आठवले नाहीत, तर उलट त्यांनी सरदार पटेलांच्या रुपाने एक वेगळाच, प्रवाहाविरुद्धचा आदर्श उभा केला. एक काँग्रेसी महापुरुष हायजॅकच केला म्हणा ना! तर मुद्दा असा आहे की, मोदींनी गांधींना कधीच दूर लोटलं नाही, मात्र कधीच जवळही केलं नाही.

    गांधींना यांत्रिक प्रगतीचं नेहमीच वावडं होतं. ‘खेड्यांकडे चला’ हा त्यांचा मंत्र तर प्रसिद्धच आहे. मात्र ‘नागपूर मेट्रो’च्या उद्घाटनावेळी मोदींनी केलेलं भाषण जर नीट ऐकलं, तर तुम्हाला जाणवेल की — मोदींनी नुसती शहरांची आवश्यकताच बोलून दाखवलेली नाहीये तर छोट्या आकारांची नवनवीन शहरे स्थापन करण्याची जोरदार वकीलीही केली आहे. मोदींनी आपले याबाबतचे विचार याआधीही अनेकवार बोलून दाखवले आहेत. आणि मोदी जर एखादी गोष्ट इतकी ठासून मांडत असतील, तर ती गोष्ट ते अंमलातही आणणार यात काहीच शंका नाही. म्हणजे पुन्हा तेच —  ‘खेड्यांकडे चला’ म्हणणाऱ्या गांधींचं गुणगान तर करायचं, पण प्रत्यक्ष कृती मात्र अगदी उलट करायची!

    खरं तर गांधीवाद हा कधीच कालसुसंगत नव्हता. परंतू त्याचं नेहमीच सरकारी पातळीवरून उदात्तीकरण केलं गेलं. आणि हिंदुत्ववाद्यांनी तसेच वास्तववाद्यांनी या प्रकाराला विरोध केला की, तथाकथित विचारवंतांकडे अश्या विरोधकांवर कट्टरतेचा शिक्का मारण्याचं अस्त्र तयारच असायचं! परंतू स्वत:ला गांधीवादी दाखवत गांधीवादाच्या मूळालाच हात घालण्याच्या मोदींच्या खेळीवर कुणाकडेच तोडगा नाहीये. मी मोदींना ‘कुटील’ राजकारणी म्हणतो ते यासाठीच. आपल्याला हवा तो कार्यभाग समोरच्याला गंधवार्ताही लागू न देता साधणे, नव्हे नव्हे, समोरच्याला पूर्णवेळ ‘हा माणूस आपलेच काम करतोय’ असं वाटायला लावत काम साधणे — यासाठी व्यक्ती चाणक्य कोळून प्यायलेलीच असायला लागते!

    मोदी पंतप्रधान म्हणून तर प्रिय आहेतच, पण आज मोदींमधला मुत्सद्दी राजकारणी अधिकच प्रकर्षाने आवडून गेला. आज लोकमान्यांचा आत्मा स्वर्गात अतिशय खूष झाला असेल. कुणी सांगावं, एव्हाना ‘स्वर्ग-केसरी’त अग्रलेखही लिहायला घेतला असेल त्यांनी — ‘डोके ठिकाणावर असलेले सरकार आले हो’!!

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, तसेच विविध क्रांतिकारक, महापुरुष आणि हिंदू धर्माची महती सांगणारी लेखकाची अनेकानेक व्याख्याने डाऊनलोड करण्यासाठी अथवा आपल्या भागात आयोजिण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

    image