Category: History

  • होळी – विदेशी कापडांची आणि विदेशी अहंकाराचीही!

    वंगभंगाच्या चळवळीने देश ढवळून निघाला होता. स्वदेशीची चळवळही फोफावू लागली होती. लो. टिळक आणि त्यांचे सहकारी सर्वत्र फिरून या विषयावर जागृती करत होते. दि. १ ऑक्टोबर १९०५ या दिवशी पुण्यातील सार्वजनिक सभेच्या दिवाणखान्यात साहित्यसम्राट न. चिं. केळकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. त्यात एका तरुण विद्यार्थ्याने विदेशी मालावरील बहिष्काराला ठसठशीत स्वरूप यावे म्हणून विदेशी कापडांची होळी करण्यात यावी (स्वा. सावरकर चरित्र, शि. ल. करंदीकर, आ. २०११, पृ. १०६) अशी कल्पना मांडली. तो तरुण म्हणजेच स्वा. विनायक दामोदर सावरकर!

    केळकरांना काही ही कल्पना पसंत पडली नाही. ते विदेशी कपडे जाळून फुकट घालवण्यापेक्षा अंध, पंग, रोगग्रस्त अशा बांधवांना वाटून टाकणे योग्य, असे त्यांचे मत होते. धनंजय कीरांच्या शब्दांत सांगायचे तर, “यावर सावरकरांनी हळूच टोला दिला की, या होळीने जी ज्वाळा पेटेल ती नैतिक नि भौतिक दृष्टीनेही अधिक मोलाची नि चिरस्थायी ठरेल”. (स्वा. सावरकर चरित्र, धनंजय कीर, अनु. द. पां. खांबेटे, आ. २००८, पृ. २२-२३)

    हा प्रकार झाला त्या दिवशी टिळक पुण्यात नव्हते. ते परतल्यावर सावरकरादी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कानावर आपली कल्पना घातली. टिळकांना ती पसंत पडली, पण याचे काय परिणाम होतील हा ही विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी सावरकरप्रभृती विद्यार्थ्यांना नकार दिला नाही, पण त्यांचे कर्तृत्व व तळमळ यांची पारख करण्यासाठी ते म्हणाले (करंदीकर, पृ. १०६), “होळीच करावयाची तर ती पोरकट दिसता कामा नये, किमान अर्धी गाडीभर तरी कपडे गोळा कराल तर होळी करण्याला काही अर्थ आहे”.

    सावरकरांनी हे आह्वान स्वीकारले व ते ताबडतोब विदेशी कापडे गोळा करण्याच्या उद्योगाला लागले (कीर, पृ. २३). या मोहिमेचा एक भाग म्हणून त्यांनी एक व्याख्यानही दिले (करंदीकर, पृ. १०६). त्याकाळी पुण्यात ‘महाराष्ट्र विद्यालय’ नावाची भोपटकर बंधूंनी चालवलेली एक राष्ट्रीय बाण्याची शिक्षणसंस्था होती. त्या संस्थेतील विद्यार्थ्यांचीही सावरकरांना मदत (तत्रोक्त) झाली. करंदीकर लिहितात की, टिळकांच्या मागणीप्रमाणे भरपूर कपडे उपलब्ध झाले होते (तत्रोक्त). कीर मात्र ‘कपड्यांनी भरलेली गाडी’ असा शब्द वापरतात. तेव्हा टिळकांची अपेक्षा अर्धी गाडीभरच असताना सावरकरांनी मात्र गाडीभर कपडे गोळा केले होते की काय, असा निष्कर्ष काढायला वाव आहे. कपडे किती का असेनात, ते एका महाविद्यालयीन युवकाने, फक्त ५-६ दिवसांत, कोणतीही आधुनिक माध्यमे पाठीशी नसताना केवळ तरुणांचे संघटन करून गोळा केले होते हे महत्त्वाचे!

    आणि ७ ऑक्टोबर १९०५ या दिवशी सायंकाळी ते सगळे कपडे एका गाड्यावर भरले गेले. त्यांचे बलिदान व्हावयाचे असल्यामुळे त्यांच्यावर खूप सारा गुलाल टाकण्यात आला. गाडीच्या आगेमागे नागरिकांचा प्रचंड घोळका (करंदीकर, पृ. १०६) अशा थाटात ही कपड्यांची मिरवणूक मंडईपासून निघाली! प्रा. शि. म. परांजपे, ‘भाला’कार भोपटकर वगैरे मंडळी त्यात सुरुवातीपासूनच सहभागी होती. मिरवणूक जसजशी लकडी पुलाच्या दिशेने निघाली तसतसे अजूनच लोक त्यात सहभागी होऊ लागले. ‘चित्रशाळे’च्या आसपास टिळकही त्यात सहभागी झाले. मिरवणूक लकडीपुलाच्या पलिकडे एका मैदानात थांबली. गाडीवरील कपडे एका शेतात रचण्यात आले. त्यावेळी टिळकांनी मुद्दा मांडला की (कीर, पृ. २३. करंदीकर, पृ. १०६), होळी एका जागी करावी आणि व्याख्याने दुसरीकडे द्यावीत. त्यावर सावरकरांनी कोटीक्रम मांडला की (कीर, पृ. २३), “मग ही मिरवणूक तरी कशाला हवी होती? आम्हाला कपडे इकडे पाठवून देता आले असते नि व्याख्याने रे मार्केटातच देता आली असती. वस्तुतः विलायती कपड्यांच्या जळत्या ढिगासमोर जळजळीत भाषणे करणे हेच युक्त! कारण, असे केले तरच लोकांच्या मनावर उमटणारा ठसा खोलवर जाईल नि कायम राहील”. लक्षात घ्या, सावरकर टिळकांना केवढे प्रचंड मानायचे याचे दाखले सावरकरांच्या चरित्रात अनेक सापडतात. सावरकरांनी टिळकांवर अनेक काव्ये लिहिली आहेत. टिळक गेले तेव्हा अंदमानात बंदी असलेल्या सावरकरांनी संपर्काची अभिनव साधने वापरून सेल्युलर जेलमध्येच नव्हे तर सबंध अंदमानात उपवास घडवून आणला होता (समग्र सावरकर, खंड २, आ. १९९३, माझी जन्मठेप, पृ. ४७४). परंतु तेच सावरकर, वय लहान असतानाही टिळकांच्या न पटलेल्या मुद्याला विरोध करताना डगमगले नाहीयेत. डोळस भक्ती या हल्ली दुर्मिळ होत चाललेल्या तारतम्यभावाचे केवढे उत्कृष्ट उदाहरण आहे हे! सभा होळीच्याच ठिकाणी झाली.

    टिळकांचे या प्रसंगीचे भाषण अत्यंत तेजस्वी झाले. आपल्या भाषणाच्या ओघात ‘काळ’कर्ते परांजपेंनी जळत्या ढिगातला एक कोट काढून लोकांपुढे धरला. आणि त्या खिशाची झडती घेता घेता त्यांनी व्यापाराच्या मिषाने खिसे भरभरून हिंदुस्थानची संपत्ती लुटून नेणाऱ्या इंग्रजांची हजेरी घेतली आणि ‘असा हा पातकी कोट मी अग्निसमर्पण करतो’ असे म्हणून त्यांनी तो कोट धगधगलेल्या होळीत फेकला (करंदीकर, पृ. १०६-१०७). होळीच्या ज्वाळा गगनाला जाऊन भिडल्या तशाच त्या ब्रिटिश सिंहासनालाही झळ बसवून गेल्या! या होळीनेच देशभर ठसठसत असलेल्या ब्रिटीशविरोधी द्वेषाग्नीत तेल ओतले. ७ ऑक्टोबर १९०५ हा दिवस होता दसऱ्याचा! दसऱ्याच्या दिवशी होळी पेटविणारे आणि त्यातून इंग्रजी सत्तेचा अहंकार जाळून टाकणारे, सावरकरच!

    कीर लिहितात (पृ. २३) की, त्या काळात सावरकरांनी केलेल्या भाषणांचा आपल्या स्मृतिपटलावर अनेक वर्षेपर्यंत खोल ठसा उमटून राहिला होता, असे आपल्या उत्तरायुष्यात केळकरांनी पुष्कळदा बोलून दाखवले होते. पुण्यातील सार्वजनिक सभेमध्ये सावरकरांनी केलेल्या भाषणाचे वर्णन करताना एक वार्ताहर म्हणाला होता (कीर, पृ. २४), ‘त्यांचे भाषण मनस्वी वक्तृत्वकुशल होते आणि कमालीचे ओजस्वी होते! त्यांचे वय जेमतेम बावीस वर्षांचे आहे, पण आताच त्यांनी एखाद्या कसलेल्या वक्त्याचे स्पृहणीय स्थान पटकावले आहे”.

    अर्थात, सगळ्याच प्रतिक्रिया काही उत्साहवर्धक नव्हत्या. या होळीसाठी शिक्षा म्हणून (करंदीकर, पृ. १०७) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी सावरकरांना दहा रुपये दंड ठोठावला व वसतिगृह सोडण्यास फर्मावले. सबंध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आणि सावरकरांकडे सहानुभूतीचा व द्रव्याचा ओघच वाहू लागला (कीर, पृ. २४)! गंमत म्हणजे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच सावरकरांच्या दंडासाठी स्वयंस्फूर्तीने निधी गोळा केला. एका विद्यार्थ्याने तर त्याला घरून आलेल्या मनिऑर्डरचे पैसे त्यासाठी देऊ केले. निधी दंडाच्या रकमेपेक्षाही अधिक गोळा झाला. सावरकरांनी लोकांच्या, मित्रांच्या भावनांचा मान म्हणून दंडापुरती रक्कम घेतली व उरलेले पैसे पैसाफंड व इतर काही संस्थांना देऊन टाकले. कीरांच्या मते मात्र (पृ. २४) सावरकरांनी दंड स्वतःच्या खिशातून भरला व लोकांनी आणि मित्रांनी गोळा केलेले पैसे पैसाफंड वगैरे संस्थांना देऊन टाकले. नेमके काहीही घडलेले असो, परंतु सावरकर जरी राजकारणात असले, तरीही त्यांनी हल्लीच्या काही राजकीय नेत्यांप्रमाणे तो पैसा हडप केला नाही, हे निश्चित!

    या दंडाच्या घटनेमुळे साक्षात टिळकांनी ‘केसरी’त १७ ऑक्टोबर व २४ ऑक्टोबर अशा दोन भागांत महाविद्यालयाच्या वागणुकीचा समाचार घेणारा अग्रलेख लिहिला (करंदीकर, पृ. १०७). त्याचे शीर्षक होते, ‘हे आमचे गुरूच नव्हेत’!

    — © विक्रम श्रीराम एडके

    (सावरकर चरित्राचे अभ्यासक आणि व्याख्याते. अन्य लेखांसाठी पाहा www.vikramedke.com)

  • सावरकरकृत अस्पृश्यता निवारण और सामाजिक एकता

    वीर सावरकर जी की जीवनी अद्भुत, अदम्य साहसों से लबालब भरी हुई है । नेता, संगठक, क्रांतिकारी, इतिहासकार, राजनीतीज्ञ, युद्धनीतीज्ञ, वक्ता, समाज सुधारक, लेखक, लेखक के रूप में भी नाटककार, उपन्यासकार, कथाकार, कवि, कवि के रूप में भी खंडकाव्यकार, दीर्घकाव्यकार, महाकवि, शाहीर; और न जाने कितने ही पहलू मात्र एक ही व्यक्ति के है, इस पर कदाचित आने वाली पीढियाँ विश्वास भी न करें । सरल तरह से देखें तो उन के जीवन के जन्म से ले कर लंडन जाने तक का काल विद्यार्थिदशा, लंडन में क्रांतिकारी, अंदमान से ले कर रत्नागिरी तक बंदी, रत्नागिरी से ले कर बिनाशर्त मुक्तता तक समाज सुधारक, मुक्तता से ले तर स्वातंत्र्यप्राप्ती तक राजनीतीज्ञ और फिर स्वातंत्र्यप्राप्ती से ले कर आत्मार्पण तक वार्धक्य ऐसे विभाग पडते है । किंतु कोई भी व्यक्ति ऐसे विभागश: जीता है क्या? उदाहरण के तौर पर देखे, तो सावरकर जी ने १९३७ के पश्चात राजनीती में खुल कर भाग लिया । किंतु क्या उन के क्रांतिकार्य में अंग्रेजों को हराने की राजनीती नहीं थी? यहीं नियम लागू होता है इस लेख के विषय यानी ‘अस्पृश्यता निवारण और सामाजिक एकता’ को । आम तौर पे तो यह विषय केवल सावरकर जी के रत्नागिरी में किए गए कार्य से ही संबद्ध लगता है । और यह सत्य भी है कि, रत्नागिरी में स्थलबद्धता की अवस्था में वे इस कार्य में सर्वाधिक निमग्न रहे । किंतु अगर आप सावरकर जी के चरित्र का बारीकी से अवलोकन करे, तो पाएंगे कि, यह दोनों विषय उन के समूचे जीवन की ही कथा है ।

    मराठी भाषा में एक मुहावरा है, ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ । इस का शब्दार्थ होता है, बच्चे के पाँव पालने में दिखते है । किंतु इस का भावार्थ यह है कि, मनुष्य जीवन में आगे चल कर क्या करने वाला है इस की झलक बचपन से ही दिखने लगती है । बात सन १९०२ की है । उन दिनों मुंबई के ‘हिंदु युनियन क्लब’ की ‘हेमंत व्याख्यानमाला समिती’ हुआ करती थी । उन्हें ने एक काव्य स्पर्धा का आयोजन किया था । विषय था ‘बालविधवा दु:स्थितीकथन’ । सावरकर जी की आयु मात्र १९ वर्ष की थी । आज की भाषा में कहा जाए तो टीनेज । किंतु इस छोटी सी आयु में भी उन्होंने इस विषय पर जो कविता लिखी, वह थी १०२ पंक्तियों की कविता (समग्र सावरकर वाङ्मय, खंड ७, आवृत्ति वर्ष १९९३, पृ. २७) जिसे उस वर्ष का प्रथम पारितोषिक प्राप्त हुआ था । तात्पर्य यह कि, सावरकर बचपन से ही सामाजिक विषयों के प्रति जागृत एवं अभ्यासरत थे । उन का समाज के, तथा दीन-दुखियों के प्रति संवेदना से भरा यह दृष्टीकोन स्थलबद्धता से छूटने के बाद भी स्पष्ट रूप से दिखता है । सावरकर जी कि मुक्तता १९३७ में हुई । तत्पश्चात उन्हों ने हिंदुमहासभा पार्टी से जो राजनीती की, उस का उद्देश्य उन्हीं के रचे एक श्लोक में झलकता है । वे लिखते है,
    ‘राष्ट्रस्वतंत्रता ध्येयं यथा साध्यं च साधनम् ।
    अभ्युत्थानाय हिंदुनामयं पक्ष: प्रवर्तित: ।।’
    यानी सावरकर जी का उद्देश्य राष्ट्र की स्वतंत्रता के साथ ही साथ हिंदुओं का अभ्युत्थान भी था । इस अभ्युत्थान के मायने भी जातिपातिविरहित, सबल व सशक्त हिंदु समाज का निर्माण ही थे । सावरकर लिखते है कि, ‘जातिभेद के निवारण हेतु मैं विद्यार्थीदशा से ही प्रकट रूप से प्रयत्नरत था । महाविद्यालय में भी मेरा वर्तन उसी ओर रहा । आगे चल के अंदमान में मैंने इस विषय पर जो भी चिंतन किया, उस का व्यावहारिक आचरण कर के मैंने सैंकडों भेदमूलक दुष्ट धारणाओं का उच्चाटन किया है (स. सा. वा. खंड ३, आवृत्ति वर्ष १९६४, पृ. ६४२) ।

    जैसे कि उपर लिखा है, यह सत्य है कि सावरकरकृत अस्पृश्यता निवारण और सामाजिक एकता का कार्य सर्वाधिक रत्नागिरी से ही किया । किंतु ऐसी क्या बात हुई की उन्हें इस कार्य में स्वयं को पुरज़ोर झोंकना पडा? इस प्रश्न का उत्तर है अंदमान! प्राकृतिक सौंदर्य से सराबोर इस द्वीपकल्प पर अंग्रेज़ों ने सैल्युलर जेल नामक दैत्याकार कारागृह बनाया था । इस का एक भयकारी नाम कालापानी भी है । जब अंग्रेज़ों ने सावरकर जी को २५ अधिक २५ वर्ष यानी कुल ५० वर्षों का अमानुष आजीवन कारावास घोषित किया, तब उन की रवानगी इसी कालापानी में हुई (स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र, पृ. ३४२ , लेखक शि. ल. करंदीकर, आवृत्ति वर्ष २०११) । यद्यपि आज अंदमान, वीर सावरकर जी के अस्तित्व से पुनीत क्रांतितीर्थ कहलाता है, उन दिनों वह खौफ़ का पर्यायवाची ही कहलाता था । वहाँ सावरकर जी ने क्या देखा? उन्हों ने देखा कि, अनेकों कारणवश दंडित हिंदु बंदीयों कि संख्या यहाँ सर्वाधिक है, किंतु उन पर हुकूमत चलाने वाले वॉर्डन्स अधिकांश अहिंदु है । संख्याबल होते हुए भी ऐसा क्यूँ, इस प्रश्न का उत्तर उन्हें मिला हिंदुओं की जातिव्यवस्था में । संख्याबल होते हुए भी हिंदु आपस में ही बँटे हुए थे । इस त्रुटी का लाभ उठा कर अहिंदु न केवल उन पर हुकूमत चलाते थे, अपितु अज्ञानी बंदीयों का धर्मांतरण भी करते थे । इस शोचनीय अवस्था का एक उदाहरण वाचकों के समक्ष रखना बिलकुल भी अप्रस्तुत न होगा ।

    यह घटना स्वयं सावरकर जी ने स्वयं ही अपने बंदीवास के बारे में लिखी गयी जीवनी, ‘माझी जन्मठेप’ में लिखी है । अंदमान में कोयले से लदे हुए जहाज़ आया करते थे । बोरियाँ उतारने का काम बंदीयों को ही करना पडता था । इस काम पर लगे बंदीयों को समय बचाने के लिए खाना नहीं दिया जाता था, बल्कि दो-चार मुठ्ठी भर चने दिए जाते थे । तो हुआ यूँ कि, एक दिन जब भोजन का समय हुआ तो अहिंदु बंदी जल्दी से भाग कर अपनी चने की बोरियों की तरफ़ गए । और उन में से कुछ लोगों ने हिंदुओं के लिए सुनिश्चित बोरियों से भी चने खाने शुरू कर दिए । यह जब हिंदुओं ने देखा तो धर्म भ्रष्ट होने के डर से किसी भी हिंदु ने चनों को हाथ तक न लगाया । उस दिन उन्हें फ़ांका पडा । अहिंदु बंदीयों को रोज़ के मुक़ाबले अधिक खाना मिल गया । अब तो यह प्रतिदिन की ही बात हो गयी । रोज़ हिंदु कैदी काम कर के, थक-हार के खाने कि तरफ़ जाते और रोज़ वह दृश्य देख कर उन्हें भूखे पेट ही रहना पडता । उन्हों ने जब अधिकारीयों से शिकायत की तो वह लोग भी उन पर हँसने लगे । फिर वह अपने बडे बाबू यानी सावरकर जी के पास आए । सावरकर जी ने उन्हें एक तरकीब बताई । दूसरे दिन जब खाने का समय हुआ तो हिंदु बंदी सब से पहले भाग के बोरियों की ओर गए और अपनी तो अपनी अहिंदुओं की बोरियों से भी चने खाने लगे । जब झगडे की नौबत आयी, तो हिंदुओं ने सावरकर जी ने बताई बात उन को दो टूक सुना डाली की, यदि तुम्हारे पहले छूने से यह चने अहिंदु होते है, तो हमारे छूने से अब यह हिंदु हो गए है । बात ज़मादारों तक पहुँची तो वे हँसने लगे, ठीक वैसे ही जैसे वे हिंदुओं पर हँसे थे । तब कहीं जा कर उन्हें सावरकर जी द्वारा पढाया पाठ ठीक से समझा कि, धर्म का स्थान व्यक्ति का पेट नहीं अपितु उस का ह्रदय होता है ।

    इस प्रकार एक एक कर के हिंदुओं को जातिवाद की घिनौनी रूढी से बाहर निकालने का उपक्रम चल रहा था । वह भी अंदमान के निर्मम कारागार में जहाँ के हालातों के सामने नर्क भी स्वर्ग लगे । सावरकर दिन भर कोलू चला कर तेल निकालते, नारियल की रस्सियाँ बुनते, जरा-जरा सी बात पे एकांतवास तथा डंडाबेडी जैसे नृशंस दंड भोगते और इतना होते हुए भी वे शुद्धीयज्ञ चलाते, बंदीयों को पढाते, कविताएँ लिखते और जातिवाद की समस्या पर चिंतन करते रहते । हमारे और आप के आरामदायक जीवन से कहीं परे था यह व्रत । उसी चिंतन के फलस्वरूप सावरकर जी के समक्ष उजागर हुई एक बात । वह यह की, मुख्यभूमि हिंदुस्थान भी तो अंदमान का ही बडा स्वरूप है । वह भी तो अंग्रेजों द्वारा बनाया एक बंदीगृह ही है, वहाँ भी तो हिंदुओं कि बहुसंख्या होते हुए भी सदियों से मुठ्ठीभर अहिंदु राज करते आ रहे है और उस का भी तो कारण हिंदु समाज को लगा जातिवाद का रोग ही तो है । जिस आग्रह, तप, निश्चय एवं दृढता के साथ सावरकर जी ने अंदमान के कारागृह से जातिवाद मिटाया, वहीं काम मुख्यभूमी में करने की आवश्यकता थी । और यह अवसर उन्हें मिला रत्नागिरी की स्थलबद्धता में । मानों अंदमान जातिवाद मिटाने का पाठ्यक्रम हो और रत्नागिरी प्रयोगशाला ।

    क्षेत्र जितना बडा होता है, चुनौतियाँ भी उतनी ही बडी होती है । वैसे देखा जाए तो जातिव्यवस्था हिंदु धर्म का मूलभूत अंग नहीं है । यह मध्ययुग की देन है । हिंदु तो आरंभ से ही वर्णव्यवस्था मानते आ रहे है, जो जन्म से नहीं बल्कि व्यक्ती के गुण व कर्मों से जुडी हुई है (गीता. ४/१३) । किंतु बर्बर विदेशी आक्रमणों के बाद से वर्णव्यवस्था का भ्रष्ट होना शुरू हुआ जो अंततः जातिव्यवस्था में परिवर्तित हुआ । यह व्यवस्था सदियों से चलन में थी । क्या सवर्ण क्या विवर्ण, दोनों ही प्रकार के लोग इसे मानते थे । ऐसे में सावरकर जी का कहना कि यह व्यवस्था हानिकारक है, का परिणाम भी वैसे ही शून्य होना था जैसे अनेकों प्रामाणिक सुधारकों की बातों का न्यूनाधिक हुआ । लेकिन सावरकर अपने प्रतिपादन के बारे में न केवल आग्रही थे, अपितु अपनी बात मनवाने के लिए हर तरह के सकारात्मक हतकंडे अपनाने से भी नहीं चूकने वाले थे । उपयुक्ततावाद वीर सावरकर जी का विशेष गुण था । उन्हों ने पहले तो जातिवाद के प्रश्न के छोटे छोटे टुकडे किए की, आखिर जातिवाद किस तरह से हिंदु समाज को प्रभावित करता है । यह एक बिल्कुल ही नए तरह की पहल थी । इसे ही आधुनिक भाषा में प्रौब्लेम आईडेंटिफ़िकेशन कहते है । इस खोज में सावरकर जी ने पाया कि, जातिवाद की समस्या असल में ७ प्रकार से प्रभाव डालती है । वीर सावरकर जी ने इन्हें नाम दिया, ‘सात स्वदेशीय बेड़ीयाँ’ (स. सा. वा. खंड ९, जात्युच्छेदक निबंध, आवृत्ति वर्ष १९९३, पृ. ६४) । यह बेड़ीयाँ थी रोटीबंदी, बेटीबंदी, स्पर्शबंदी, व्यवसाय बंदी, सिंधुबंदी, वेदोक्तबंदी तथा शुद्धीबंदी । वीर सावरकर जी का मानना था कि यदि यह सात शृंखलाएँ तोड दी जाए, तो निश्चय ही जातिप्रथाविरहित सशक्त समाज निर्माण होगा ।

    रत्नागिरी आज भी एक छोटा सा शहर है । आज से करीब सौ वर्ष पहले यानी १९२४ के समय में तो वह और भी छोटा गाँव था । उन दिनों पूरा देश आवश्यक और अनावश्यक दोनों ही प्रकार के रूढीवाद के घेरे में था । कोंकण की भूमी रत्नागिरी भी रूढीप्रिय थी । वीर सावरकर ने क्या किया? उन्हों ने जातिवाद के विरुद्ध तीन तरफा मोर्चा खोला । वे बडे ही प्रसिद्ध क्रांतिकारी थे तो जगह-जगहों से लोग उन्हें भाषणों के के लिए बुलाते थे । सावरकर उन भाषणों में जातिवाद की रूढ़ी से होने वाली हानि बताते थे । वे एक सम्माननीय व्यक्तित्व होने के साथ ही अत्युच्च कोटी के वक्ता भी थे, तो नि:संशय उन की वाणी का प्रभाव पडता । यह तो हुआ एक मोर्चा । दूसरे, वे कई तरह के नियतकालिकों में जातिव्यवस्था पर हल्ला बोलने वाले लेख लिखते थे । उनके यह लेख तथा उन के भाषण आप को उन की पुस्तकें ‘विज्ञाननिष्ठ निबंध’, ‘जात्युच्छेदक निबंध’, ‘सामाजिक भाषणे’, ‘क्ष किरणे’ आदी में समूल पढने को मिलते है । वीर सावरकर जी लोकप्रिय माध्यमों कि ताकत भलीभाँति जानते थे । इसिलिए उन्होंने इस विषय पर दो उपन्यास (‘मला काय त्याचे’ तथा ‘काळे पाणी’), ‘उ:शाप’ आदी नाटक, तथा कई सारी कथाएँ व कविताएँ लिखी । एक तरह से देखा जाए तो वे अपने विचारों के प्रति समाज की मनोभूमिका तैयार कर रहे थे । क्यूँ कि तिसरा मोर्चा जो था, वह सब से कठिन था, प्रत्यक्ष कार्य ।

    प्रत्यक्ष कार्य के तीन भाग किए जा सकते है । मन:परिवर्तन, वैधानिक मार्ग और संघर्ष । सावरकर जी ने प्रसंग व परिस्थिती के अनुसार तीनों मार्गों का अवलंबन किया दिखाई पडता है (सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, लेखक शेषराव मोरे. आवृत्ति वर्ष २०१५, पृ. १०७) । जिन दिनों अस्पृश्यों की परछाई मात्र पडने से ही धर्म भ्रष्ट हुआ माना जाता था, यदि उन का स्पर्श हो भी गया तो लोग शुद्धी हेतू सचैल यानी कपडों के साथ स्नान कर लिया करते थे, इतना ही नहीं बल्कि घरों में किसी अस्पृश्य जाति का नाम लेना भी पाप समझा जाता था (तत्रोक्त, पृ १२१), उन दिनों अस्पृश्यता निवारण का कार्य सावरकर जी के लिए कितना कठिन रहा होगा, इस की मात्र कल्पना ही की जा सकती है । और देखिए, यह रवैया भी कोई एक तरफा नहीं था । सदियों से इसी सामाजिक व्यवस्था में पले-बढें, रहे अस्पृश्यों को भी यही एक मात्र जीवनमार्ग लगता था । उन्हें भी इस में कुछ गलत नहीं लगता था । जब शृंखलाओं से परे कोई विश्व कल्पना में ना हो, तब शृंखलाएँ तोडना और भी कठिन हो जाता है ।

    सावरकर जानते थे कि, स्पृश्य बस्ती में तो कोई अस्पृश्य अपने आप आने से रहा । तो वे खुद अस्पृश्यों की बस्तीयों में जाने लगे । देखिए, काम कितना मुश्किल है, जब सावरकर और उन के साथी अस्पृश्य बस्तीयों में जाते तो सारे बस्तीवाले एक एक कर के दरवाज़े बंद कर के, कुंडी-वुंडी लगा के अंदर छिप जाते थे । क्यूँ? क्यूँ कि उन्हें लगता था कि यह लोग, हमारा धर्म भ्रष्ट करने आए है । बार बार पुकारने पर भी कोई बाहर न आता । उल्टे, अंदर से ही जवाब देते कि, घर में कोई नहीं है (तत्रोक्त, पृ. १२१) । सावरकर जानते थे कि शुरुआत में ऐसा ही होगा । सामान्य हिंदु का मन आकर्षित करने वाली कोई एक चीज़ हम सोचे तो वह है, भजन-किर्तन । सावरकर और उन के साथी उस बस्ती के बीचोबीच जा कर प्रभु का भजन करने लगते । कई दिनों के अथक परिश्रम के पश्चात, किवाडों, खिडकियों से टुकूर-टुकूर देखने वाले लोग एक-एक कर के बाहर आने लगे, सावरकर और उन के साथियों से मिलने-जुलने लगे । यह तो केवल शुरुआत थी । अब अगला पडाव थी स्पृश्यों कि बस्तीयाँ । सावरकर जी के व्याख्यान तथा अन्य कार्यक्रमों में वे अस्पृश्यों को साथ ले आते, स्पृश्य एवं अस्पृश्य दोनों को ही साथ बैठने का आग्रह करते (तत्रोक्त, १२२) । यह तो और भी कठिन बात थी । स्पृश्य अस्पृश्यों को अपने साथ बिठाना नहीं चाहते थे और तो और अस्पृश्य भी स्पृश्यों के साथ बैठना नही चाहते थे । सब से विशेष बात तो यह थी की, जिन अस्पृश्यों को रूढीयाँ स्पृश्यों के साथ बैठने की अनुज्ञा न दे कर उन पर सामाजिक अन्याय करती थी, वे खुद भी अपने से तथाकथित निम्न स्तर की जातियों को अपने साथ बिठाने के लिए तैयार नहीं थे । यहीं स्थिती पाठशालाओं में भी थी । सावरकर सनातनियों से कहते थे कि, ‘हम कुत्ता या बिल्ली पालते है । उस से प्रेम भी करते है । इतना कि वह पशु हमारी रसोई में घूमता है, हमारे साथ खाना खाता है । वहीं हम लोग एक मनुष्य की परछाई मात्र से ही दूर भागते है । हमारी ही तरह, हाड-मांस का बना मनुष्य, हमारा ही धर्मबंधु, लेकिन उस के स्पर्श को पाप मानते है । और वहीं मनुष्य अगर हमारी ही भूल के कारण अगर परधर्म में चला गया, तो एक ही झटके में हम उसे ‘मेरा भाई’ बोल के गले से लगाने में भी नहीं हिचकिचाते । हमारे ही जैसे मनुष्य को पशु से भी न्यूनतर समझना और उस के धर्म परिवर्तन करते ही उसे गले लगाना, यह कहा का न्याय है’? वहीं वे अस्पृश्यों को भी ढाढस बँधा कर कहते थे कि (स्वातंत्र्यवीर सावरकर, लेखक धनंजय कीर, मराठी अनुवाद द. पां. खांबेटे, आवृत्ति वर्ष २००८, पृ. २०१), ‘इस क्षण में दिखाई दुर्बलता सवर्णों की दुष्टता से भी अधिक बुरी होगी । कल्याण का मार्ग कष्टों से ही हो कर जाता है । अधिकार माँगने की इस घडी में पीछे हटने की भूल मत करो । याद रखो कि तुम भी मनुष्य हो और मनुष्य कि तरह ही पौरुष प्रकट करो । जब कभी तुम सार्वजनिक मार्ग से गुज़रो और कोई तुम से दूर हटने को कहे, तो उस से कहो कि ‘यह रास्ता कोई तुम्हारे बापदादाओं की जागीर नहीं, जो जिसे चाहे उसे दूर हटने के लिए कहे’ । अपने व्यवसाय किसी के भी दबाव से मत छोडो । उल्टा, उन में सुधारणाएँ करो । कोई भी व्यवसाय श्रेष्ठ या कनिष्ठ नहीं होता । स्वच्छता से भरा जीवन जियो । नशे से दूर रहो । अपने मात-पिता, संत और वंश को कभी भी नीचा मत समझो । दोषों का त्याग करो, शिक्षा प्राप्त करो, संघर्ष करो और जातिवाद से उपर उठ कर अपने मानवी अधिकार प्राप्त करो । कोई व्यक्ति तथाकथित रूप से तुम से भी निचली जाति का हो, तो उस से भी दया भरा, समता भरा ही व्यवहार रखो ।’

    हिंदु धर्म के जो अनेक स्तंभ है, उन में से एक स्तंभ है मंदिर । मंदिर सालों से सार्वजनिक स्तर पर एकात्मता के केंद्र के रूप में दायित्व निभाते आ रहे है । किंतु क्या उन दिनों सभी मंदिर सभी जातियों के लिए खुले थे? उत्तर है, नहीं । सावरकर जी ने इस विषय पर काम करने की ठानी । क्यूँ कि अगर मंदिरों में सभी जातियों का स्वीकार होने लगता, तो जातिवाद का एक प्रमुख क़िला यूँ ही ढह जाता । लेकिन मंदिर जैसे सामाजिक एकता का केंद्र थे, वैसे ही विभिन्न जातियों के लिए उन की आस्था तथा अस्मिता का भी प्रतीक थे । इस लिए यह काम भी उतना सरल नहीं था । सावरकर जी ने पहले कदम के रूप में वह उत्सव चुना जो अपने आप में ही सामाजिक एकात्मता की धरोहर था, यानी सार्वजनिक गणेशोत्सव. महाराष्ट्र के घर घर में गणेश चतुर्थी से ले कर अनंत चतुर्दशी तक गणेश जी के पूजन की प्रथा है । कुछ जगहों पर यह उत्सव डेढ़ दिन चलता है, कहीं पाँच, कहीं सात, तो कहीं पूरे दस । गणेशोत्सव महाराष्ट्र में सार्वजनिक स्वरूप प्राप्त कर चुका था । गाँव, कस्बों, शहरों में लोग सार्वजनिक तौर पे गणेशजी की प्रतिष्ठापना करते, जिसे मराठी में ‘मंडल’ कहते है । लेकिन उन दिनों यह मंडल भी जातिगत थे तथा उन में भी भेदभाव हुआ करता था । सन १९२४ के गणेशोत्सव के दौरान रत्नागिरी में प्लेग के प्रादुर्भाव के कारण सावरकर कुछ दिनों के लिए नाशिक गए थे । तब वहाँ गणेश जी के विसर्जन के समय शोभायात्रा में पहला मान किस मंडल को दिया जाए यह प्रश्न उपस्थित हुआ । जब लोग सावरकर जी के पास यह समस्या ले कर आए, तो उन्हों ने अग्रभाग में रहने का मान बिना किसी हिचकिचाहट के एक अस्पृश्य मंडल को सौंपा । यह एक ऐतिहासिक, क्रांतिकारी घटना थी ऐसा वृत्तांकन नाशिक के ‘स्वातंत्र्य’ नामक पत्र ने १८/०९/१९२४ में किया (सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, पृ. १५३) । सावरकर जी के ही प्रयत्नों से उस साल कई अस्पृश्यों के मंडल गठित हुए । उन्हीं में से एक जगह भीड से खचाखच भरे कार्यक्रम में भाषण करते समय वीर सावरकर बोले, ‘मुझे विश्वास है कि आने वाले दिनों में अस्पृश्यता की रूढी का विनाश होते हुए मैं अपनी आँखों से देख सकूँगा । मैं चाहता हूँ कि मेरी मृत्यू के पश्चात मुझे काँधा देने के लिए विभिन्न जातियों के लोग एक हो कर आए और मुझे अग्नि दे, तभी मेरी आत्मा को समाधान मिलेगा ।’ यह सुनते ही श्रोताओं की आँखों से आँसूओं की धाराएँ छलक पडी (तत्रोक्त, पृ. १५३) । अगले वर्ष सावरकर जी ने यही क्रम रत्नागिरी में भी दोहराया । इतना ही नहीं, उन्हों ने एक पृर्वास्पृश्यों का वाद्यवृंद भी गठित किया (जो शीघ्र ही सभी जातियों के एकत्रित वाद्यवृंद में परिवर्तित हो गया ।) और गणेश जी के समक्ष पूर्वास्पृश्यों द्वारा बीडा-सुपारी (मराठी में पान-सुपारी । यहाँ पान का बीडा वगैरह केवल निमित्त मात्र होता है, असल उद्देश्य सामाजिक मेलजोल बढाना होता है ।) का समारंभ आयोजित करने की भी प्रथा आरंभ की । इस बारे में वर्णन तब के बलवंत, बकुल, सत्यशोधक आदी पत्रिकाओं में विस्तारपूर्वक पढने को मिलते है । धीरे धीरे इस बीडा-सुपारी के कार्यक्रम में सैंकडों स्पृश्य भी सहभागी होने लगे (तत्रोक्त, १५४) ।

    अब समय था एक कदम और बढाने का । १९२५ के अप्रैल में रत्नागिरी के समीप एक छोटे से गाँव शिरगाँव में महादेव लक्ष्मण गुरव नाम के एक सज्जन ने हनुमान जी का मंदिर बनाया । वे चाहते थे कि प्रतिष्ठापना में सावरकर जी भी उपस्थित रहे । यहाँ गौर करने योग्य बात यह है कि, सावरकर भले ही हिंदुत्ववादी थे किंतु वे किसी भी तरह के कर्मकांड के विरुद्ध भी थे । ऐसे में आज के समय का कोई तथाकथित विद्वान क्या करता? मना कर देता कि मुझे यह सब पसंद नहीं, शायद यह भी कहता कि तुम भी यह कर्मकांड मत करो । सावरकर जी ने ऐसा कुछ भी नहीं किया । बल्कि वे उस समारोह में गए । किंतु जाने से पहले उन्हों ने गुरव जी के सामने एक शर्त रखी । शर्त यह थी कि, मंदिर का जो प्रदक्षिणा मार्ग है, वह अस्पृश्यों के लिए भी खुला हो । उन्हों ने गुरव जी को अस्पृश्यता के विरुद्ध अपनी भूमिका बताई और परिणाम यह हुआ कि, गुरव जी तुरंत मान भी गए । इतना ही नहीं वे प्राणप्रतिष्ठा के समय पूर्वास्पृश्यों को भजन करने वालों के साथ संमिश्र बिठाने को भी तैयार हो गए (तत्रोक्त, पृ. १५५) । यह अंतर है सावरकर और कुछ तथाकथित सुधारकों में । जहाँ सावरकर समाज के लाभ को देखते हुए अपने व्यक्तिगत मतों को दूर रखने के लिए भी तैयार थे, वहीं आज-कल के कुछ आधुनिक सुधारणावादी अपने व्यक्तिगत मतों को समूचे समाज पर थोंपना चाहते है, और यहीं कारण है कि, उन्हें समाज में कभी स्वीकृति नहीं मिलती । सावरकर भले ही हिंदुत्ववादी थे, और थे क्या, हिंदुत्व की राजकीय मीमांसा पहली बार उन्हों ने ही तो अपने प्रबंध ‘हिंदुत्व’ (१९२३) में की है । किंतु वे हिंदुस्थान में रहने वाले, हिंदुस्थान से प्रेम करने वाले सभी पंथों का भला ही चाहते थे । उन के लेख, खास कर के ‘पोथिनिष्ठेची बाधा’ (मनोहर, जुन १९३५) इस बात के प्रत्यक्ष प्रमाण है । वहीं आज कल कुछ लोग समाजसुधारणा का अर्थ किसी एक धर्म को ही कोसना मात्र निकालते है । सावरकर जी का यही समष्टिवाद हल्दी-कुंकुम समारोह में भी दिखता है । वे स्वयं कदाचित इस समारोह को नहीं भी मानते होंगे, लेकिन उन्हें इस प्रथा में स्पृश्यास्पृश्य महिलाओं को एक करने का कारण दिखा तो उन्हों ने इन समारोहों को पूरे मन से प्रोत्साहित किया, और फलस्वरूप महिलाओं के मन से भी अस्पृश्यता की रूढी का उच्चाटन करने की ओर कदम बढाया (सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, पृ. १४२) ।

    धर्म हमेशा से ही नाज़ुक मामला रहा है । इसी लिए सावरकर भी उतना ही नाज़ुक एवं कुशल तरीके से व्यवहार कर रहे थे । धीरे धीरे कर के उन्हों ने पूर्वास्पृश्यों को पहले तो प्रदक्षिणा मार्ग तक जाने की अनुज्ञा दिलायी । फिर उस अनुज्ञा का दायरा पगडंडीयों तक बढाया । फिर सभामंडप । और अंततः गर्भगृह तक (१३/०९/१९२९) वे पूर्वास्पृश्यों को ले गए । धीरे धीरे कर के मंदिर में संमिश्र जाना आम बात हो गयी । १९३० में तो एक पूर्वास्पृश्य ने गणेश जी के समक्ष गायत्री मंत्र का जाप भी किया । इस घटना का वर्णन टाईम्स ऑफ इंडिया सहित अन्य कई वृत्तपत्रों ने किया था (रत्नागिरी हिंदुसभेचे प्रतिवृत्त, खंड २, १९३७) ।

    रत्नागिरी में एक सज्जन रहते थे, भागोजीसेठ कीर । शिवभक्त थे । किंतु जाति के कारण शिवालय नहीं जा सकते थे । धनि थे, तो खुद का ही शिवालय बनवा लिया, भागेश्वर मंदिर । सावरकर जी को मानते थे तो उन्हें यह घटना सुनाई । सावरकर जी ने पूछा कि, ‘आप धनवान है सो आपने अपने लिए मंदिर बनवा लिया । किंतु उन सहस्रावधी निष्कांचन पूर्वास्पृश्य भक्तों का क्या’? भागोजीसेठ सोच में पड गए । और तब सावरकर जी के विचारों से प्रेरित हो कर उन्हों ने बनवाया, पतित-पावन मंदिर (२२/०२/१९३१) । मंदिर के शिलान्यास समारोह में (१०/०३/१९२९) सावरकर जी ने मंदिर निर्माण की भूमिका बताई, कि इस मंदिर में कोई भी श्रद्धावान् हिंदु स्वच्छ तन, मन से बेरोकटोक आ सकेगा, पूजा कर सकेगा । इस मंदिर का पुजारी कोई भी ज्ञानी हिंदु बन सकेगा (स. सा. वा. खंड ९, आवृत्ति वर्ष १९९३, सामाजिक भाषणे, पृ. ९) । सभी हिंदुओं को पूजा, प्रार्थना का समान रूप से अधिकार देने वाला यह मंदिर आज भी प्रसिद्ध है । इसी मंदिर की प्रतिष्ठापना के समय की एक घटना न केवल पथदर्शी है, अपितु सावरकर जी की अपने उद्देश्य के प्रति प्रामाणिकता का विलोभनीय दर्शन भी कराती है । भागोजीसेठ चाहते थे कि, मूर्ति की प्रतिष्ठापना वेदोक्त पद्धति से हो । काशी से ब्राह्मण भी बुलाए गए । उन्हें बुलाते समय ही कल्पना दी गयी थी । किंतु वे ऐन समय पर मुकर गए कि, वेदोक्त का अधिकार अन्य जातियों को नहीं है । मुहूर्त निकला जा रहा था । शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी, भागोजीसेठ आदि सभी तैयार हो गए की चलो वेदोक्त नहीं तो पुराणोक्त पद्धति से ही सही । किंतु सावरकर जी का क्रोध फूट पडा । वे भागोजीसेठ से बोले, ‘सेठजी मंदिर आप का, आप मालिक है, सो अंततः आप जो कहे वह ही होगा । किंतु अगर सदियों से चली आ रही यह भेदभाव की शृंखला नहीं तोड सके, फिर इस मंदिर की आवश्यकता ही क्या रही? पुरानी ही प्रथाएँ चलानी है तो पुराने मंदिर क्या कम है संख्या में, जो और एक नया बना रहे है? नया मंदिर नई पहल है । यह अगर आप को स्वीकार्य नहीं तो कृपया मुझे छोड दीजिए । किंतु अगर आप अडिग रहते है, तो इस मंदिर में वेदोक्त प्रतिष्ठापना का दायित्व मेरा ।’ इतना कहते ही सावरकर उन द्विजों की ओर मुड कर बोले, ‘हम ने आप को पत्र भेजा था, उस में स्पष्ट रूप से लिखा था कि वेदोक्त पद्धति से प्रतिष्ठापना होगी । आप को यदि स्वीकार नहीं था, तो पहले ही मना कर देते । किंतु अगर आप सोचते है कि ऐन मौके पर मना करने से हम मजबूर हो जाएँगे तो गलत सोच है आप की । मैं नहीं मानता की किसी एक जाति में जन्म लेने भर से ही व्यक्ति को पौरोहित्य का अधिकार मिल जाता है । किंतु भागोजीसेठ की इच्छा थी की आप ही पौरोहित्य करे । किंतु आप के बिना भी पौरोहित्य हो सकता है । यदि आप मना कर देते है तो हम सारी जातियों के सैंकडों हिंदु इस मूर्ति को अनंत करों से उठा के ‘जय देवा’ उद्घोष के साथ स्थापित करेंगे । यह ही होगी हमारी विधी । हम सहस्रों कंठों से हिंदुधर्म का जयगान करेंगे । यह ही होगा हमारा वेदघोष । और ‘भावो हि विद्यते देव:’ यह ही होगा हमारा शास्त्राधार ।’ वीर सावरकर की यह ओजस्वी वाणी सुन के मसुरकर महाराज के आश्रम के एक शिष्य तड़ाक से आगे आए । उन का नाम था वेदशास्त्रसम्पन्न गणेशशास्त्री मोडक । उन्हों ने वेदोक्त पद्धति से ही प्रतिष्ठापना की (सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, पृ. १७४) ।

    पाठशालाओं में विभिन्न जाति के छात्रों के एकत्रित बैठने के बारे में भी सावरकर जी का रवैया कठोर ही रहा । उन्हों ने पहले तो सभी को प्रेमपूर्वक समझाया । किंतु जब कुछ लोग नहीं माने तो उन्हों ने कानूनी कार्यवाई की भी तैयारी दिखाई । इस विषय में सार्वजनिक जगहों पर अस्पृश्यों को भी नागरी अधिकार दिलाने वाला कानून १९२३ से ही था । जब सावरकर जी के विचारों को मानने वाले जनूभाऊ लिमये १९२८ में स्कूल बोर्ड के अध्यक्ष बने तो उन्हों ने भी पाठशालाओं में अस्पृश्यता का पालन ना करने के संबंध में आधिकारिक आदेश दिए । इस से सावरकर जी का काम और आसान हो गया । उन्हों ने १९२३ के सरकारी आदेश की सहस्रों प्रतियाँ करा के पूरे ज़िले में बाँटी । सरकारी कानून पता चलने पर लोकमत एकदम से अनुकूल होने लगा । किंतु उस का विरोध भी उतना ही हुआ । अस्पृश्य विद्यार्थियों को कई तरह के कष्ट दिए जाने लगे, उन के सामान को आग लगानी शुरू हुई, कुछ शिक्षकों ने उन्हें सिखाने से ही इनकार कर दिया (तत्रोक्त, पृ. १३२) । परिणामस्वरूप सावरकर जी ने रत्नागिरी के ज़िलाधिकारी से आवेदन किया (रत्नागिरी हिंदुमहासभा प्रतिवृत्त, १९२९) । इस में वे लिखते है, “The dogs may enter and even are welcomed and patted in the schools but the poor boys fared in the schools worse than dogs. The villagers resorted to the rowdy methods and drove away the untouchable boys from the schools and are not allowing them even to enter there as before. I humbly and most pressingly request you to set matters right in those villages as soon as possible and ask the police to take back the children of the untouchables to schools under the government protection against the physical threatening on the part of the rowdy rioters there’. सावरकर यहाँ अस्पृश्य विद्यार्थियों के लिए पुलिस सुरक्षा की माँग कर रहे है । यह पढ के सहसा ही अमरिका के लुज़ियाना प्रांत में गोरों के स्कूल में अपृथक पढने जाने वाली पहली आफ्रीकन-अमरिकन लडकी रुबी ब्रिजेस की याद आती है । उसे भी स्कूल में छोडने के लिए फ़ेडरल मार्शल्स जाया करते थे । रत्नागिरी के मामले में सचमुच पुलिस सुरक्षा दी गई या नहीं यह तो मुझे ज्ञात नहीं, किंतु इतना अवश्य कहूँगा कि अमरिका की घटना १९६० की है तो सावरकर द्वारा रत्नागिरी में की गयी पहल १९२९ की । इसी वर्ष स्कूल बोर्ड का परिपत्रक ज़िला बोर्ड ने रद्द करवा दिया । किंतु सावरकर अस्पृश्यता का पालन रोकने वाला परिपत्रक जारी करवाने में १९३४ में पुन: यशस्वी हुए ।

    आप किसी भी व्यक्ति से मित्रता हुई, ऐसा कब कह सकते है । आप के सैंकडों पहचानवाले हो सकते है, दसों परिचित भी हो सकते है, किंतु घनिष्ठ मित्रता, एकरूपता तभी कही जा सकती है, जब आप उन के साथ बिना किसी हिचकिचाहट के खाना खाओ । भोजन मित्रता का संकेत है । यह बात सावरकर बहुत ही अच्छी तरह से जानते थे । उन दिनों जहाँ अपने से तथाकथित निम्न जाति के व्यक्ति के साथ भोजन करना भी पाप माना जाता था, सावरकर जी ने कल्पना निकाली सहभोजन की । सभी जाति के हिंदुओं का एक साथ, एक ही पंक्ति में भोजन । रोटीबंदी की इस शृंखला पे पहला प्रहार किया सावरकर की प्रेरणा से स्थापित ‘तरुण हिंदुमंडल’ने (डिसेंबर १९२९) । विभिन्न जातियों के सौ युवाओं ने एक साथ भोजन किया । यह तो था पहला पडाव, जो केवल उस मंडल के कार्यकर्ताओं तक ही सीमित था । अब समय था रोटीबंदी की शृंखला पे दूसरा प्रहार करने का, यानी प्रकट सहभोजन कराने का । अगले वर्ष पुन: एक बार सौ लोगों के सहभोजन का आयोजन हुआ । इस बार यह समारोह सभी के लिए खुला था । लेकिन कार्य सम्पन्न हो कहाँ? कोई भी कर्मठ इस समारोह के लिए जगह देने के लिए तैयार नहीं था । अंततः खातू परिवार के नाट्यगृह में व्यवस्था हुई । किंतु तब भी कई प्रश्न शेष थे । भोजन पकाएगा कौन? इस तथाकथित पापाचरण के लिए कोई भी रसोईया तैयार नहीं था । जैसे तैसे प्रबंध हुआ । लग रहा था कि कोई नहीं आएगा । किंतु ऐन मौके पर इतनी भीड हुई कि कईयों को तो समारोह में भाग लिए बिना ही वापिस लौटना पडा (सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, पृ. १८९) ।

    सावरकर जी ने सहभोजन में सहभागी लोगों की सूची प्रकाशित करने का नियम किया था । पहले सहभोजन के पश्चात कईयों को इस बात के परिणाम, सामाजिक बहिष्कार आदि स्वरूपों में भुगतने पडे । लेकिन सावरकर जी द्वारा दिखाई दृढता के पश्चात धीरे धीरे वातावरण सकारात्मक होता गया । पहले सहभोजन की खबर देते हुए ‘टाईम्स ऑफ इंडिया’ लिखता है (०९/१२/१९३०), ‘जातिव्यवस्था ही हिंदु धर्म की अवनती का मूल कारण है ऐसा मानने वाले कुछ उत्साही सुधारकों द्वारा सहभोजन का आयोजन किया गया था । इस में सभी जातियों के लोगों ने भाग लिया’ । आगे चल के सावरकर जी ने इन समारोहों को किसी पवित्र धार्मिक कार्य जैसा स्वरूप दिया । इतना ही नहीं उन्हों ने किसी भी धार्मिक विधी से पहले जैसे संकल्प किया जाता है, वैसा ही संकल्प भी सहभोजन के लिए रचा, ‘जन्मजातजातिभेदोच्छेदनार्थम् अखिलं हिंदुसहभोजनं करिष्ये’ (रत्नागिरी हिंदुसभेचे प्रतिवृत्त, खंड २, १९३७) ।

    सावरकर जैसे स्वीकार्य रूप से सकारात्मक कार्य करना जानते थे, वैसे ही नकारात्मक विचारों को उन्हीं की भाषा में उत्तर देना भी जानते थे । एक बार एक महाशय ने सहभोजन समारोहों की आलोचना करते हुए कहा कि, ‘एक दूसरे के मुँह में थूकने से भी क्या प्रेम बढता है’? सावरकर जी ने तपाक से उत्तर दिया था कि, ‘आप जब ब्राह्मणभोज कराते है तब क्या एक दूसरे के मुँह में थूकते है’? सावरकर जानेमाने व्यक्ति होने के कारण, अनेकों विवाहादि समारोहों में उन्हें आमंत्रित किया जाता । वे भी प्रेमपूर्वक जाते । किंतु वे यजमानों को सुझाव देते कि, कार्यक्रम में सहभोजन हो । और अधिकतर लोग तैयार भी हो जाते । सावरकर जानते थे कि क्या स्पृश्य क्या अस्पृश्य, दोनों ही जिस चीज़ को धर्म मानते थे उस का निष्ठापूर्वक आचरण करते थे । इसीलिए उन्हों ने किसी का भी द्वेष न करते हुए जहाँ तक हो सके युक्तिवाद से अपनी बात मनवाना सही समझा । आज कल के कुछ धर्मसुधारक गलत रूढीयों का अनुसरण करने वालों को मूर्ख कहते है, तरह तरह के अपशब्द कहते है । इस से आप की विद्वत्ता नहीं सिद्ध होती, बल्कि कार्य की हानि ही होती है । अपशब्द वह कहता है जिसे अपने विचारों पे विश्वास न हो, जो विश्वास से भरा हुआ होता है, वह तो सरल भाषा में भी अपनी बात रख सकता है । सावरकर जी के प्रयत्नों से धीरे धीरे स्त्रीवर्ग भी सहभोजनों में सहभागी होने लगा (२१/०९/१९३१) ।

    वीर सावरकर के सहकारी तथा ‘सत्यशोधक’ पत्रिका के संपादक थे श्री. दत्तोपंत लिमये । उन की सुपुत्री का विवाह निश्चित हुआ । किंतु जब ससुराल वालों को पता चला कि लिमये जी सहभोजनी है, तो उन्हों ने विरोध दर्शाया । कहा कि जब तक लिमये जी प्रायश्चित नहीं लेते, विवाह नहीं होगा । एक तरफ बेटी का भविष्य तो दूसरी तरफ तत्त्वनिष्ठा । लिमये जी धर्मसंकट में पड गए । यह विषय सावरकर जी के समक्ष आया । तो उन्हों ने एक झटके से उन्हें प्रायश्चित लेने की अनुज्ञा दे दी और साथ ही साथ ससुराल वालों को यह भी कहा कि यह प्रायश्चित केवल विवाह तक ही सीमित रहेगा । वे मान गए । यहाँ विवाह सम्पन्न हुआ और वहाँ लिमये जी सहभोजन में पुनः जुट गए (तत्रोक्त) । सावरकर जी की यशस्विता का रहस्य उन के ऐसे व्यावहारिक तथा अनूठे मार्ग ही है । वे खुद समुद्रमार्ग से ही विदेश गए थे, लेकिन वापिस लौटने पर उन्हों ने प्रायश्चित नहीं लिया । ऐसे ही उन्हों ने शुद्धीकरण किए, बेटीबंदी तोडी, व्यवसायबंदी तोडी । १ मई १९३३ को उन्हों ने ‘अखिल हिंदु होटल’ शुरू किया जिसे चलाने वालों में से एक युवक दलित था । वहाँ भोजन करने वालों के हस्ताक्षर ले के उस की सूची रखी जाती थी । सावरकर जी के स्वीय सहायक श्री. बाळाराव सावरकर के अनुसार सावरकर जी के पास ऐसे सवा तीनसौ से अधिक हस्ताक्षर इकठ्ठा हो गए थे (रत्नागिरी पर्व, लेखक बाळाराव सावरकर, आवृत्ति वर्ष १९७२, पृ. ३००) ।

    राजर्षि छत्रपती शाहू महाराज के अनुयायी भाई माधवराव बागल जब रत्नागिरी आए तो वहाँ का वातावरण देख कर वे अवाक रह गए । उन्हों ने कहा, ‘पुणे, मुंबई जैसे बडे शहरों में भी सहभोजन के लिए ५-१० महिलाएं भी आगे नहीं आती । किंतु यहाँ सैंकडों महिलाएँ सहसा ही सहभागी होती दिखती है । वीर सावरकर यदि हमारे यहाँ होते, तो हम उन्हें सिर आँखों पे बिठा के रखते’ (सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, पृ. २१४-१५) । वीर सावरकर जी का कार्य देख कर महर्षि शिंदे बोल उठे थे (तत्रोक्त, पृ. २१५), ‘भगवान सावरकर जी को मेरी बची हुई आयु दे दे’ । दलित नेता श्री. सोनवणे के अनुसार (तत्रोक्त, पृ. २१२), ‘सहस्रों वर्षों से स्पृश्यों ने हमें दूर रखा, किंतु यह भेद भी नष्ट हो सकता है यह विश्वास, सावरकर जी के कार्य को देख कर होता है ‘ । वीर सावरकर जी ने भारतरत्न डॉ. बाबासाहब आंबेडकर जी को भी इस कार्य का अवलोकन करने हेतु निमंत्रित किया था । सावरकर, आंबेडकर जी को लिखे पत्र में लिखते है, ‘यह निमंत्रण किसी तात्त्विक चर्चा हेतु नहीं, अपितु जातिभेद नष्ट करने के लिए हिंदु समाज प्रत्यक्ष क्या क्या कार्य करना चाहता है इस बात का सक्रिय उदाहरण देने के लिए है ।’ सावरकर चाहते थे कि आंबेडकर जी की अध्यक्षता में सहस्रावधी पूर्वास्पृश्यों का सहभोजन हो व तत्पश्चात आंबेडकर जी मार्गदर्शन करे । किंतु आंबेडकर जी की कार्यमग्नता के चलते यह समारोह हो न सका । नाशिक के काळाराम मंदिर सत्याग्रह के दौरान सावरकर जी स्थलबद्ध थे । उन्हों ने तब भी आंबेडकर जी का समर्थन करने हेतु एक पत्र नाशिक के हिंदुओं के नाम लिखा था । सावरकर जी के अनुज डॉ. नारायणराव सावरकर उस समय अपने सहकारीयों के साथ नाशिक में उपस्थित थे तथा उन्हों ने मंदिरप्रवेश के लिए अनुकूल वातावरण बनाने का प्रयास भी किया था (तत्रोक्त, पृ. ११४) ।

    सावरकर जी का अस्पृश्यता निवारण और सामाजिक एकता का कार्य एक यशस्विता की गाथा है । १९२४ से ले कर १९३७ तक के स्थलबद्धता के काल में उन्हों ने रत्नागिरी ज़िला व आसपास के परिसर से अस्पृश्यता का समूल उच्चाटन कर दिया था । आगे चल के भी उन की हिंदुमहासभा के माध्यम से की गई राजनीति जातिगत भेदभावों से उपर उठ कर संपूर्ण समाज के लिए ही थी । आज भले ही अस्पृश्यता कानूनी रूप से नष्ट हो चुकी हो, किंतु जातिवाद के रूप में वह कुछ लोगों के मन में आज भी जीवित है । नए युग में पुनः विश्वगुरू बनने की चाह रखने वाले देश के लिए यह जातिभेद कितनी बडी बाधा है, कोई भी अनुमान लगा सकता है । ऐसे समय में सावरकर जी के विचारों की, उन के द्वारा चुने अभिनव मार्गों की पहले से भी अधिक आवश्यकता आन पडी है । समय की माँग है कि हम उस मार्ग पर पूरी प्रामाणिकता के साथ चले । सावरकर जी द्वारा किया गया कार्य स्वयं प्रकाश बन के पथ दिखलाएगा ।

    — © अॅड. विक्रम श्रीराम एडके,
    (सावरकर जी के चरित्र एवं विचारों के अभ्यासक तथा उन से संबंधित विषयों पर व्याख्यान देने वाले वक्ता ।)

    *लेख वडोदरा के महाराजा सयाजीराव गायकवाड विश्वविद्यालय के इन्स्टिट्यूट ऑफ लिडरशिप अैंड गवर्नंस द्वारा प्रकाशित ‘वीर सावरकर स्वतंत्रता एवं अखंडता के साधक’ में पूर्वप्रकाशित

  • दोन भेटी

    बाजीराव ८ ऑक्टोबर १७३५ ला (Bajirao I – An Outstanding Cavalry General. Author Col. R. D. Palsokar. Pp 183) उदयपूरकडे निघाले. त्यांच्यासोबत सुमारे ८ ते १० सहस्र सैन्य होते. त्याशिवाय इतर मराठी फौजा मेवाड ते बुंदेलखंडदरम्यान (Palsokar. Pp 183) पसरलेल्या होत्या. जानेवारी १७३६ च्या अखेरीस त्यांनी तापी ओलांडली (Selections of Peshwa Daftar. Author G. S. Sardesai. Vol. 14.42 quoted at The Era of Bajirao. Author Uday S. Kulkarni. Pp 205). पुढे उदय कुलकर्णी (Pp 206-07) वंशभास्करच्या (Vol. 6) हवाल्याने एक घटना देतात. अशीच घटना ई. जयवंत पॉल (Bajirao The Warrior Peshwa. Pp 145) सर जदुनाथ सरकारांच्या हवाल्याने देतात.

    घडले असे की, महाराणा जगतसिंहांनी (दुसरा) पेशव्यांचे ५ सहस्र रुपये नजराणा, मानाची वस्त्रे, घोडे आणि एक हत्ती देऊन यथोचित स्वागत केले. दुसऱ्या दिवशी त्यांना राजदरबारात सन्मानपूर्वक बोलावण्यात आले. तिथे त्यांच्या स्वागतासाठी स्वतः महाराणा सामोरे आले. दरबारात दोन आसने ठेवली होती. एक बाजीरावांसाठी आणि दुसरे साक्षात महाराणांसाठी. बाजीराव पुढे चालत गेले आणि आसनावर न बसता खाली जमिनीवर बसले. एवढेच नव्हे, तर तेथीलच एक चामर घेऊन ते महाराणांना वारासुद्धा घालू लागले. महाराणा अर्थातच भांबावून गेले. ते म्हणाले (Sardesai. E. Jaiwant Paul), “तुम्ही ब्राह्मण आहात, मी तुमची सेवा करायला हवी”. त्यावर बाजीरावांनी त्यांना उत्तर दिले की, “मी इथे फक्त तुम्हालाच राजा मानतो कारण तुमच्या पदरी १६ उमराव आहेत”!

    काही दिवसांनी बाजीरावांनी जयपूरला प्रस्थान केले. तिथे त्यांची सवाई जयसिंहांशी भेट झाली. या ही भेटीबद्दल “वंशभास्कर”च्याच हवाल्याने कुलकर्णी (Pp 208, 209) लिहितात. सवाई जयसिंहांनी जगतसिंहांच्या इतकाच सन्मान बाजीरावांनी मलाही द्यावा अशी मागणी केली. बाजीरावांनी त्यांना ताबडतोब उत्तर दिले, “(स्वैर अनुवाद)उदयपूरच्या महाराण्यांनी कधीच मुघलांची सत्ता मानली नाही, त्या संदर्भाने मी त्यांना आमच्या छत्रपतींसारखेच मानतो. तुम्ही लोक मात्र यवनांच्या चाकरीतच धन्यता मानत आलात. त्यामुळे तुम्ही खरे तर मला कनिष्ठ. पण तरीही मी तुम्हाला बरोबरीचा दर्जा देतोय (गुह्यर्थ – मी त्यांच्याकडे बसलो तसा तुमच्याकडेही खाली बसेन अशी स्वप्नं पाहू नका!). आपण बरोबरीच्या आसनांवर बसू. मी उजवीकडे बसेन आणि तुम्ही डावीकडे बसा”! या भेटीत बाजीरावांनी हुक्क्याची मागणी केली आणि सवाई जयसिंहांना त्रास होत असूनही मुद्दामच त्यांच्या तोंडावर (Paul. Pp 146) धूर सोडत राहिले (Kulkarni. Pp 209. with reference from Vansh Bhaskar)! अशी वागणुक देण्यामागे सवाई जयसिंहांच्या पूर्वजांनी स्वराज्याला दिलेल्या त्रासाची आठवण बाजीरावांना असल्यास नवल नाही!

    गंमत अशी की, बाजीरावांनी एकीकडे महाराणा जगतसिंहांना सन्मान दिला आणि दुसरीकडे सवाई जयसिंहांना त्यांची जागा दाखवून दिली, यात बाजीरावांचे चातुर्य आणि माणसांना जोखण्याचा स्वभाव तर दिसतोच. परंतु बाजीरावांचे खरे कर्तृत्व यात दिसते की, बाजीरावांनी जशी सवाई जयसिंहांकडून चौथाई व इतर रक्कम वसूल केली (Palsokar. Pp 183) तशीच जगतसिंहांकडूनही रक्कम वसूल केली (तत्रोक्त)! किंबहूना दिल्ली दरबाराकडून इतर मागण्याही मान्य करून घेतल्या. थोडक्यात, भावनिकता आपल्या जागी आणि राजकारण आपल्या जागी! अर्थातच बाजीरावांच्या सगळ्याच मागण्या काही मान्य झाल्या नाहीत. त्याचीच परिणती पुढे दिल्लीवर धडक देण्यात (मार्च १७३७) आणि नंतर भोपाळमध्ये निज़ामाला मार देण्यात (डिसेंबर १७३७) झाली. कुलकर्णी (Pp 202) सरदेसाईंच्या हवाल्याने (Marathi Riyasat. Vol. 3. Pp 215) शाहूंचे एक वाक्य देतात त्यातच बाजीरावांचे महत्त्व आणि स्थान कळून येते. शाहू म्हणतात, “मला १ लाख सैन्य आणि बाजीराव यांच्यातून एक निवडायला सांगितले, तर मी बाजीरावांनाच निवडेन”!

    — © विक्रम श्रीराम एडके

    (बाजीरावांचे चरित्र व युद्धनीतीचे अभ्यासक आणि व्याख्याते. अन्य लेख वाचण्यासाठी आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • अपेक्षाभंग करणारा : मणिकर्णिका

    १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील झाशीच्या राणीचे स्थान केवळ मराठीजनांसाठीच नव्हे, तर सबंध भारतीयांसाठीदेखील कायमच गौरवाचे राहिले आहे. राणीवर आजपर्यंत खूप सारे साहित्य लिहिले गेले, मालिका बनल्या, चित्रपटही बनले. परंतु जेव्हा के. व्ही. विजयेंद्र प्रसाद, प्रसून जोशी, राधाकृष्ण जगर्लामुडी आणि कंगना राणावतसारखे दिग्गज या विषयासाठी एकत्र आले तेव्हा बनणारी कलाकृती निश्चितच वेगळ्या दर्जाची असणार होती. पण बुद्धीमंतांचा एक दोषच असतो की, बरेचदा ते एकत्र आल्यावर त्यांच्या बुद्धीच्या बेरजा होण्याऐवजी एकमेकांना छेद देऊन भागाकार तेवढा होऊन बसतो. माझ्या दृष्टीने ‘मणिकर्णिका’मध्येही तेच झाले.

    सुरुवातीपासूनच कंगना आणि क्रिशमध्ये दिग्दर्शनावरून वाद होते, हे सर्वश्रृत आहे. कोण चित्रपटाची माती करत होतं आणि कुणी कोणते प्रसंग दिग्दर्शित केले याबद्दल दोघांचेही वेगवेगळे दावे आहेत. परंतु आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या दाव्यांना फारसा काही अर्थ नाही, कारण जवळपास सगळीच दृश्ये सारख्याच प्रमाणात दिशाहीन वाटतात. चित्रपट एका चांगल्या बिंदूवर सुरू होतो आणि त्यानंतर सतत कसली तरी घाई असल्यासारखा पडूच लागतो. अधूनमधून काही काळ तो वर उचललाही जातो, पण दुर्दैवाने तसे प्रसंग कमीच येतात. बरं त्यांना मुद्यावर येण्याची घाई आहे म्हणावं, तर ते ही होत नाही. मुद्याच्या आजूबाजूला घुटमळणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी घडत राहातात, पण मुद्दा काही फारसा येत नाही. आणि जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा तो इतक्या निष्काळजीपणे हाताळलाय की, त्याचे गांभीर्य नुसतेच जाणवते पण त्याची अनुभूती काही येत नाही. चित्रपट ऐतिहासिक सत्यतेचा दावा करत नाही, हे समजून घेण्यासारखे आहे. परंतु चित्रपटाच्या सुरुवातीलाच इतिहासाच्या अभ्यासकांचा सल्ला घेतल्याचे व इतरही काही कथा-लोककथांचा आधार घेतल्याचे सांगणाऱ्या चित्रपटाला राणीचे आडनाव नेवाळकर होते एवढी साधी गोष्टही समजू नये? चित्रपटात अनेकदा नवलकर असा उल्लेख आहे! हे एकीकडे तर दुसरीकडे झलकारीबाई आणि क्वचित राणी यांचे आयटम साँग टाकता? मग भन्साळी आणि तुमच्यात फरक काय राहिला? पात्रांचा स्वभाव, त्यांचं आयुष्य आणि त्यांच्या मौजेच्या कल्पना दाखवण्याचा एवढा एकच मार्ग बॉलिवूडला का दिसत असावा? सिनेमॅटिक लिबर्टीला माझा जराही आक्षेप नाही, आक्षेप आहे तो निष्काऴजी सिनेमॅटिक लिबर्टीच्या जंत्रीला!

    चित्रपटाची कथा-पटकथा के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांची. साक्षात ‘बाहूबली’चे लेखक आणि राजमौलीचे वडील. त्यांनी लिहिलेले प्रसंग, त्यांची काल्पनिकता व ऐतिहासिकता यांच्या पलिकडेही उत्तमच आहेत. परंतु ते सगळेच दिशाहीन आणि जागा चुकल्यासारखे वाटतात. त्यांच्या जागा जर बदलल्या असत्या, तर ते बऱ्याच अंशी सुसह्य तरी झाले असते. आता हे पाप लेखकाचे, की दिग्दर्शकांचे, की संपादकांचे ते न कळे. राजमौली का थोर आहे ते इथे कळतं. त्याने एका काल्पनिक गोष्टीच्याही बारीकसारीक अंगांवर पाच वर्षे मेहनत घेतली. ‘मणिकर्णिका’कारांना मात्र कसली घाई होती, हेच समजत नाही. तुमचे नुसते सेट, कपडे वगैरे भारी असून चालत नाही, तुमचा दृष्टीकोन हा त्या सगळ्या भौतिक गोष्टींपेक्षा शंभरपटींनी भारी असला तरच असे शिवधनुष्य पेलले जाते. राणीच्या व्यक्तीमत्त्वाला उंची खूप दाखवलीये, पण तिला आणि इतरही पात्रांना खोलीसुद्धा तेवढीच दाखवली असती, तर बरं झालं असतं. एकूण एक पात्रं ही सपाट, एकमार्गी आहेत. त्यातही इंग्रज तर खूपच स्टिरीयोटिपिकल दाखवले आहेत. इतकी सरधोपट पात्रे निदान इतक्या मोठ्या स्तरावर बनलेल्या चित्रपटाकडून तरी अपेक्षित नव्हती. अतिशय सामान्य वाटणारे अंकित आणि संचित बलहारांचे पार्श्वसंगीत हे या पसाऱ्यात भरच तेवढी घालते. पार्श्वसंगीतात एके ठिकाणी वापरलेल्या महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे उच्चारही चुकीचे आहेत. छायांकन उत्तम पण व्हिएफएक्स काही काही ठिकाणी फारच सुमार आहेत. मला अजूनही न कळालेली गोष्ट म्हणजे कंगना राणावत काही प्रसंग वगळता युद्धात शिरस्त्राण का घालत नाही? मी काही राणीच्या चरित्राचा तज्ञ नाही, परंतु युद्धावर जाताना राणी नेहमीच शिरस्त्राण घालत असणार असे तर्कबुद्धी सांगते. कंगना मात्र प्रत्येक वेळी ते घालतेच असं नाही. का? केवळ पडद्यावर छान दिसावं म्हणून? इंग्रजांशी बाचाबाची झाल्यावर राणी अचानक घोडा दौडवत कुठे जाते, हे समजत नाही. ती उद्विग्न झाली म्हणावे तर त्याच प्रसंगात संग्रामसिंहशी भेट होते व अजूनच खटका उडतो. तो पूर्ण सिक्वेन्सच गोंधळात टाकणारा आहे. किमान मला तरी तो समजला नाही.

    प्रसून जोशींनी लिहिलेले संवाद काही क्लिषे वगळता फारच जबरदस्त आहेत. ते भूतकाळाच्या माध्यमातून वर्तमानकाळावर अतिशय नेमके भाष्य करतात. पण त्या संवादांनाही अडसर आहे तो कंगना राणावतचा. ती अत्यंत उत्तम अभिनेत्री आहे. पण तिची वाणी शुद्ध नाही. त्यामुळे तिने उच्चारल्यावर भलीभली वाक्येही सपाट वाटतात. अतुल कुलकर्णींच्या भूमिकेवरून काही ना काही कारणाने कात्री फिरवली गेली की काय असे वाटते, पण त्यांनी काम छान केलेय. जिशू सेनगुप्तांचेही काम उत्तमच, पण चित्रपट गंगाधररावांच्या मनोविश्वात डोकावण्याचे फारसे कष्टच घेत नाही. मुहंमद झीषान अय्युब, अंकिता लोखंडे, मिष्टी, डॅनी, वैभव तत्त्ववादी, सुरेश ओबेरॉय, कुलभूषण खरबंदा सगळेच आपापल्या भूमिकांत ठिकठाक. चित्रपटाची सगळ्यांत चांगली गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे गाणी! शंकर-अहसान-लॉयच्या संगीतदिग्दर्शनात प्रसून जोशींची शुद्ध हिंदीचा प्रभाव असलेली गीते फारच गोड, सुरेख आणि अर्थवाही झाली आहेत. पण चित्रपटात त्यांच्याही जागा काही वेळा चुकल्यायत.

    राणी लक्ष्मीबाई हे खरोखर आपल्या इतिहासातील एक तेजस्वी पृष्ठ आहे. त्याचा रुपेरी पडद्यावर सन्मान करतानाच सिनेमा म्हणून त्याची मांडणीदेखील चांगली असणे अपेक्षित होते. दुर्दैवाने चित्रपट अनेक आघाड्यांवर निराशाच तेवढी करतो. सर्जनशील बाजूंवर नियंत्रण असणाऱ्या कुणीतरी हुशार व्यक्तीने या विषयाला स्पर्श करेपर्यंत थांबणे, एवढेच प्रेक्षक म्हणून आपल्या हाती आहे!

    *२.५/५

    — © विक्रम श्रीराम एडके

    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • नव्या भारताचा नवा चित्रपट : उरी – द सर्जिकल स्ट्राईक

    १८ सप्टेंबर २०१६ यादिवशी पाकिस्तानच्या चार आतंकवाद्यांनी काश्मिरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील आपल्या सैन्यतळावर हल्ला केला. आपण त्या चारही आतंकवाद्यांना नरकात धाडले परंतु हे होईपर्यंत आपले सुमारे एकोणावीस जवान हुतात्मा झाले होते तर सुमारे ऐंशी ते शंभर जखमी. युद्धाची दाहकता ही अशी असते आणि ती कधीच एकतर्फी शांतता राखून कमी होत नाही. आपण जर याचे काही उत्तर दिले नसते, तर उलट त्या अतिरेक्यांच्या मालकांची हिंमत अजूनच वाढली असती. आणि म्हणूनच भारत सरकारने आणि आपल्या भारतीय सैन्याने निर्णय घेतला सर्जिकल स्ट्राईक करण्याचा! शरीरावर शल्यकर्म करताना जसे फक्त त्या रोगग्रस्त भागापुरतेच केले जाते, तसाच हा हल्लादेखील सर्जिकल अर्थातच लक्ष्यांपुरता मर्यादित असतो. यात इतरांना लक्ष्य केलेले नसते. थोडक्यात कोलॅटरल डॅमेज शून्य ठेवण्याचा यात प्रयत्न असतो. नेमके हेच आपल्या सैन्याने पाकव्याप्त काश्मिरात घुसून यशस्वीरित्या पार पाडले! ‘उरी – द सर्जिकल स्ट्राईक’ हा त्याच घटनांचे काल्पनिक रुपांतरण करतो.

    ‘उरी’ हा अतिशय रंगीत सिनेमा आहे. चित्रपटभर तुम्हाला वेगवेगळे रंग वापरलेले दिसतात. आजवर आपल्याकडे बनलेल्या युद्धपटांच्या तुलनेत हा अतिशय स्वागतार्ह बदल आहे. चित्रपटात खूप सारे खटकेबाज संवाद आहेत, पण चित्रपट त्यांच्यातही अडकून पडत नाही. उलट स्ट्राईक्सची थंड डोक्याने आखलेली योजना आणि तिची तितक्याच शिताफीने केलेली अंमलबजावणी यांच्यावर त्याचा जास्त भर आहे. याही चित्रपटात ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’सारख्याच खरोखरच्या राजकीय व प्रशासनिक व्यक्ती आहेत. त्यांची नावे चित्रपटात बदललेली असली, तरी त्या व्यक्ती प्रत्यक्षात कोण आहेत याबद्दल प्रेक्षकांना जराही संभ्रम निर्माण होत नाही. उलट ‘उरी’सोबतच प्रदर्शित झालेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’प्रमाणे यातील पात्रे या त्या त्या व्यक्तींच्या निव्वळ नकला वा अर्कचित्रे न वाटता जिवंत माणसे वाटतात, हे चित्रपटाचे मोठेच यश आहे. चित्रपट हा काही पातळ्यांवर प्रचंड भावनिक आहे. विशेषतः पूर्वार्धात. आणि तसा तो आहे म्हणूनच नंतर जे दाखवले गेलेय, त्याला एक तात्त्विक आधार प्राप्त होतो. तसं बघायला गेलं, तर चित्रपट पाहाण्यापूर्वीच आपल्याला त्याची सबंध कथा माहिती आहे. सुरुवात काय, शेवट काय; सारंच. इतकी सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट असूनही चित्रपट आपल्याला पूर्णवेळ खूर्चीच्या कडेवर बसवून श्वास वारंवार रोखायला लावतो, यासाठी लेखक आणि दिग्दर्शक आदित्य धर आणि संपादक शिवकुमार पणिकर यांचे कौतुक करावे तितके थोडे! मोठी हुशारीने गुंफलेली पटकथा आणि जागोजागी वापरलेला नैसर्गिक विनोद, या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत तर शाश्वत सचदेव यांचे जबरदस्त पार्श्वसंगीत घटनांची खोली व चित्रपटाची उंची कैकपटींनी वाढवणारे आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रेक्षकांवर विश्वास टाकून त्यांना कमीत कमी स्पून फीडिंग करणारा ‘उरी’ एक अतिशय स्मार्ट चित्रपट आहे. त्याची फ्रेमिंग आणि टेकिंग दिग्दर्शकीयदृष्ट्या अतिशय विचारपूर्वक केलेली आहे. पण!

    पण म्हणून काही तो त्रुटी आणि दोषांपासून मुक्त आहे, असं अजिबात नाही. प्रचंड हुशारीने रचलेला चित्रपट शेवटाकडे जाताना किंचित फिल्मीपणाकडे झुकू लागतो. ‘शूट टू किल’ची जागा क्वचित ठिकाणी अनावश्यक मारामारी घेते. दोन मिनिटांत पोहोचतील अशी बातमी असलेले पोलिस सोयीस्करपणे उशिरा येतात. एवढ्या मोठ्या मिशनचा महत्त्वाचा भाग एक इंटर्न होऊन बसतो. परतीच्या प्रवासात मोक्याच्या क्षणी एका पात्राची फिल्मी पद्धतीची एंट्री होते. देशासाठी केल्या जात असलेल्या अभियानालाही वैयक्तिक सूडाची फोडणी दिली जाते. गुप्ततेबद्दल प्रसिद्ध असलेले एक पात्र रिक्षाच्या प्रवासात राष्ट्रीय सुरक्षेसंबंधीच्या गोष्टी उघडपणे बोलते. हे आणि असे बरेच काही! सिनेमॅटिक लिबर्टी घेण्यात काहीच चूक नाही. परंतु एक प्रेक्षक म्हणून दिग्दर्शकाने अधिक वास्तववादी मार्ग चोखाळलेला पाहाणे मनापासून आवडले असते. कथा-पटकथा किती जरी आकर्षक असली, तरी त्यात संशोधनाचा अभाव जाणवतो.

    अभिनय ही चित्रपटाची भक्कम बाजू आहे! विकी कौशल हा जर असेच काम करत राहिला, तर तो खचितच उद्याचा सुपरस्टार असणार आहे! परेश रावल यांच्याकडून तर वाईट कामाची अपेक्षाही नाही. मोठ्या पडद्यावर मोहित रैना या गुणी अभिनेत्याला पाहाणे अतिशय सुखद आहे. कीर्ती कुल्हारीने तिची भूमिका प्रामाणिकपणे केलीये तशीच मानसी पारेख व इतरांनीही. या सगळ्यांत यामी गौतम मात्र काहीशी खटकते. तिने वाईट काम केलेय असे नाही, परंतु इंटेलिजन्स ऑफिसरच्या भूमिकेत व संवादांतही ती जराशी नाजूकच वाटते. याखेरीज स्वरूप संपतना खूप दिवसांनी पाहाणे आनंददायी आहे. योगेश सोमण, राकेश बेदी, रुख्सार वगैरेंनाही छोट्याछोट्या परंतु महत्त्वाच्या भूमिका आहेत व त्या त्यांनी ताकदीने निभावल्या आहेत.

    अर्थातच हल्ली प्रत्येक व्यक्ती, गोष्ट, कलाकृती यांना कोणत्यातरी एका गटात टाकायची फॅशन आलीये. त्या अर्थी बोलायला गेलं तर ‘उरी’ उजव्या गटातील सिनेमा आहे. तसा तो असेलही, पण त्यापेक्षाही जास्त तो बदलत्या काळाचा द्योतक आहे. चित्रपटाच्याच एका संवादाचा आधार घेऊन बोलायचं झालं, तर ‘उरी’ हा नव्या भारताचा चित्रपट आहे. तो काहीसा अडखळतो पण उठतो, उभा राहातो आणि त्याचं इच्छितस्थळ गाठतो, अगदी भारतासारखाच!!

    *४/५

    — © विक्रम श्रीराम एडके

    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • कॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण

    कलियुग हे आसुरी शक्तींचं युग आहे. त्रेता आणि द्वापारातच आसुरी शक्तींनी प्रचंड उच्छाद मांडलेला असताना, कलीत त्या शक्ती चरमसीमेवर नसतील तरच नवल! अशीच एक प्राचीन कृष्णशक्ती पृथ्वीवर आलीये. मागच्या अनेक युगांतरी तिचा ब्रह्मांडावर नियंत्रण मिळवण्याचा डाव फसला होता. परंतु हे युग काळीम्याला पोषक आहे. यावेळी चूक होणेच शक्य नाही. सबंध विश्वावरच नव्हे तर सगळ्यांच मितींमध्ये आपलं काळं साम्राज्य पसरायचं असेल, तर एका चेहऱ्याची गरज आहे. कुठे मिळणार तो चेहरा? दुसरीकडे नागराजचा काका असलेला सैतानी नागपाशा अमृतप्राशन केल्यामुळे अमर आहे, परंतु तरीदेखील तो नागराजपुढे वारंवार हरतच आलाय. तो का प्रत्येकवेळी हरतो, याचे कारण शोधून त्याच्या कुटील गुरूंनी एक आगळाच प्रयोग आखलाय यावेळी. हा प्रयोग पूर्ण होणार तोच, उपरोल्लिखित महाकाय कृष्णशक्ती पृथ्वीच्या आयामात प्रवेश करते आणि घटनांचे सारे संदर्भच बदलून जातात. सुरू होते कलियुगातले रामायण, अर्थात नागायण!

    आर्ष महाकाव्यच नव्हे तर इतिहास म्हणून गौरविलेले रामायण गेली हजारो वर्षे आपण वाचत, ऐकत, पाहात आलोय. अनेकांनी आपापल्या बुद्धी आणि प्रतिभेनुसार त्याचा अन्वयार्थ लावायचे प्रयत्नही केले. त्यातून उद्भवलेल्या शेकडो कलाकृती, ग्रंथ, नाटके, सिनेमे, कादंबऱ्या आपापल्या वकूबानुसार आज प्रसिद्ध आहेत. परंतु कॉमिक्सच्या विश्वात, विशेषतः भारतीय कॉमिक्सच्या विश्वात रामायणावर थेटपणे नव्हे तर वेगळ्या कथेच्या संदर्भाने भाष्य क्वचितच झाले असेल. कॉमिक्स वाचणाऱ्यांना सुपरिचित असलेल्या ‘राज कॉमिक्स’ने हे शिवधनुष्य (कोटी हेतुत:!) उचलले आणि उचललेच नव्हे तर त्याला प्रत्यंचा चढवून अचूक संधानही केलेय. त्यातूनच उभी राहिलीये काळ, दिशा, स्थल सगळ्यांनाच भेदून उरणारी महागाथा ‘नागायण’!

    या ‘नागायणा’त श्रीराम आहेत, सीता, लक्ष्मण, हनुमान, कैकेयी, जटायू, विश्वामित्र, राक्षस, वानर आणि अगदी रावणसुद्धा आहेत! मला आवडलेली सगळ्यांत मोठी गोष्ट म्हणजे यांतलं एकही पात्र ओढून-ताणून नाहीये. बहुतांश पात्रे नैसर्गिकरित्या आधीपासूनच राज-कॉमिक्सविश्वाचा भाग असलेली आहेत. त्यांच्या मूळ स्वभावांचे रामायणानुसार लावलेले अन्वयार्थ इतके चपखल बसतात की वाटावं, १९८६ पासून ‘राज कॉमिक्स’ जणू याच एका शृंखलेची तयारी करत होते! वाल्मिकींचे ‘रामायण’ जसे बाल, अयोध्या, अरण्य किष्किंधा, सुंदर, युद्ध आणि उत्तर अशा ७ कांडांमध्ये पसरलेले आहे, तद्वतच अनुपम सिन्हा व जॉली सिन्हांचे हे ‘नागायण’ वरण, ग्रहण, हरण, शरण, दहन, रण, समर, इति अशी ८ कांडे व १ उपसंहार अशा एकूण ९ खंडांत (पक्षी कॉमिक्समध्ये) पसरलेले आहे. यांपैकी कोणतेही कॉमिक्स दुसऱ्याहून यत्किंचितही कमी नाही. भारतीय कॉमिक्सविश्वाला सुपरकमांडो ध्रुवसारखे एकमेवाद्वितीय न अन्य कोऽपि पात्र देणारे Anupam Sinha नि:संशय शतकातील सर्वश्रेष्ठ कॉमिक-लेखकांपैकी एक आहेत आणि ‘नागायण’ची रोमहर्षक कथा व तितकीच रोमांचक मांडणी हे या गोष्टीचे जिवंत पुरावे आहेत.

    ज्यांनी मूळ वाल्मिकींचे रामायण वाचलेले असेल, त्यांना कथेचा काही काही ठिकाणी अंदाज येईल. हा म्हटलं तर दोष आहे. परंतु हे संदर्भ अनेकवार अनपेक्षित ठिकाणी आलेले असल्यामुळे ते उलगडताना अनुभवणे हा एक वेगळाच सौख्यदायी अनुभव आहे. अनेक ठिकाणी मूळ स्रोताशी विलग होताना घेतलेले स्वातंत्र्य कथेसाठी पोषकच ठरले आहे. परंतु त्यासोबतच पात्रांच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षांचा मूळ कथेवर होणारा परिणाम या सबंध शृंखलेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. सबंध कथाच भविष्यकाळात घडत असल्यामुळे नागराज आणि सुपरकमांडो ध्रुव या महानायकांच्या वैयक्तिक आयुष्यांमध्ये प्रचंड उलथापालथ झाली आहे. त्यांचे दिसणे आणि पेहरावही कथेला अनुरुप बदललेयत. आणि तरीही अंतरी ते पूर्वीचेच नागराज व ध्रुव आहेत. हा समतोल राखणे ही मोठीच अवघड जबाबदारी, परंतु ती येथे लीलया पार पाडली गेली आहे. आणि याचवेळी अरेषीय पद्धतीने मांडणी करताना पुढच्या पिढ्यांनाही उचित स्थान देऊन त्यांची चपखल स्थापनादेखील केली आहे. अर्थात ‘राज कॉमिक्स’ हे नागराजच्या तुलनेत ध्रुवला, तो सगळ्यांपेक्षा वरचढ असूनही, कायमच सापत्नभावाची वागणुक देत आलंय, हा माझ्या मनातील जुनाच सल याही शृंखलेत काहीसा जाणवतो.

    तुम्ही याआधी ‘राज कॉमिक्स’ वाचले नसेल तर काही गोष्टींचे संदर्भ लागणे अवघड जाऊन रसभंग होण्याची शक्यता आहे. या शृंखलेत हल्लीच्या परिस्थितीला अनुलक्षून काही ईस्टर-एग्ससुद्धा आहेत. परंतु ते डोळसपणे वाचणाऱ्यालाच सापडतील. अर्थात क्वचित काही गोष्टी सोडल्यास ही सबंध शृंखलाच मोठी अविस्मरणीय व अक्षरशः ‘कलेक्टर्स एडिशन’ घेऊन संग्रही ठेवावी अशीच झाली आहे. कॉमिक्स म्हणजे पोरासोरांनी वाचायच्या गोष्टी, हा आरोप तर ‘राज कॉमिक्स’ने केव्हाच धुवून टाकलाय, किंबहूना ‘नागायण’द्वारे ते या बाबतीत अजूनच शंभर पावले पुढे गेले आहेत. कधी जर ‘राज कॉमिक्स’मधील पात्रांवर चित्रपट बनलेच तर ‘नागायण’ हे शंभर ‘इन्फिनिटी वॉर’लाही भारी ठरेल, एवढा त्याचा आवाका आहे आणि एवढी त्याची महत्त्वाकांक्षी मांडणी आहे. तुम्ही तर वाचाच, परंतु आपल्या आर्ष ग्रंथांपासून दूर गेलेल्या पुढच्या पिढ्यांनाही मनोरंजक चित्रकथेद्वारे मांडलेली ही शृंखला वाचायला द्या, त्यांना त्याचे संदर्भ आणि अन्वयार्थ उलगडून सांगा व हलकेच त्यांना मूळ ग्रंथांकडे घेऊन या. संस्कार असेच होत असतात!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [www.vikramedke.com]

  • आत्मार्पण

    या माणसाने देशासाठी घर सोडले, पदवी सोडली, सनद सोडली, नोकरी-व्यवसायाची संधी सोडली, पैसा सोडला, आरोग्य सोडले, ज्ञातिगत अस्मिता सोडली, संसारावर उदक सोडले आणि वेळ आली तेव्हा कर्तव्यतृप्तीने क्लांत देहदेखील सोडला. मी बोलतोय सावरकरांबद्दल. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांबद्दल. मी कधीच आजच्या दिवसाचा उल्लेख पुण्यतिथी म्हणून करत नाही, तर आत्मार्पणदिन म्हणून करतो ते यासाठीच. सावरकरांचे प्राण काळाने हरले नाहीत. किंबहूना तितकी काळामध्ये हिंमत तरी होती की नाही, हाच प्रश्न आहे. सावरकरांनी केलेय ते आत्मार्पण! होय, हिंदूधर्मातील शाश्वत सन्यासपरंपरेतील अनेकांनी गेली सहस्रावधी वर्षे केले तेच सहर्ष आत्मार्पण. ज्यावेळी सावरकरांना जाणीव झाली की, मातृभूमीच्या विमोचनार्थ आपण हाती घेतलेल्या व्रताचे उद्यापन झाले आहे, हिंदू समाजासाठी त्यानंतरही आवाक्यात असलेले सारे काही करून झाले आहे, तेव्हा त्यांनी या धरेला देहाचा भार न ठेवता तो सोडण्याचा निर्णय घेतला. केवढी पराकोटीची नि:स्वार्थता ही?

    आपल्या ‘आत्महत्या आणि आत्मार्पण’ लेखात (जुलै १९६४) सावरकर लिहितात –
    “अत्यंत असमाधानाने, विफलतेच्या तीव्र जाणीवेने, संकटांना कंटाळून, इच्छा असतानाही सुखाने जगता येत नाही म्हणून अत्यंत अतृप्त अशा मन:स्थितीत वैतागाच्या भरात जे बळाने जीव देतात, त्यांच्या त्या कृत्याला साधारण: आत्महत्या असे म्हटले जाते. परंतु आपले जीवितकार्य, जीवनाचे ध्येय, जीवनाचा हेतू संपूर्णपणे सफल झाला आहे अशा सफलतेच्या, कृतकृत्यतेच्या भावनेने जे आपल्या ऐहिक अस्तित्वाची हर्षभराने समाप्ती करतात, त्यांच्या त्या कृत्यास आत्मार्पण असे म्हणतात. यद्यपि या परिवर्तनशील जगात सर्वतोपरी परिपूर्णता अशी केव्हाही असू शकणार नाही. जे जीवनात संपादवायचे होते ते सर्व संपादिलेले आहे म्हणून आता कर्तव्य असे काही उरलेले नाही, अशा कृतकृत्य भावनेने रिक्तकाम किंवा पूर्णकाम झालेले धन्य पुरुष आपणहून आपले प्राण विसर्जित करतात. ते आपले नश्वर जीवन विश्वाच्या चिरंतन जीवनात विलीन करून टाकतात. योगवासिष्ठात म्हटल्याप्रमाणे –
    अन्तर्रिक्तो बहिर्रिक्तो रिक्त कुम्भरिवाम्बरे ।
    अन्त:पूर्णो बहि:पूर्णो पूर्ण कुम्भरिवार्णवे ।।
    तथापि आपल्या या जीवनकार्याची सापेक्षत: परिपूर्णता झालेली आहे, अशी आत्मसंतुष्टता वाटल्यानंतर समाजाला किंवा स्वतःला जो देह वार्धक्याने म्हणा, व्याधीने म्हणा पण केवळ भारभूत असाच राहाणार आहे, त्या देहाचा गुहाप्रवेशाने, प्रायोपवेशनाने, अग्निदिव्याने, समुद्रसमाधी किंवा अंतिम योगसमाधी घेऊन किंवा अशाच कोणत्यातरी मार्गाने जे त्याग करतात, ते त्यांचे कृत्य उत्तान अर्थी बळाने जीव देणेच असताही त्याला आत्मसमर्पण म्हणून जे गौरविले जाते, ते यथार्थच आहे”.

    हे केवढेतरी सखोल चिंतन आहे सावरकरांचे. आपल्या देहाचा आता समाजाला, देशाला अथवा कुणालाच उपयोग नाही म्हणून तो देहच सोडून देणे ही एकाचवेळी स्वार्थत्याग आणि उपयोगितावाद अशा वरकरणी विरोधी वाटणाऱ्या दोन्ही गुणांची परिसीमा आहे. सावरकरांसाठी आपण काय केलं, हा विचार आत्ता कुठे आपण करू लागलो आहोत. सावरकरांच्या मनाला हा विचार दूरान्वयानेदेखील शिवलेला नव्हता. किंबहूना आजवरच्या योगदानाच्या बदल्यात काही मागायचे तर नाहीच, उलट आहे ते सारेच देऊन टाकायचे ही त्यांची सर्वोच्चातीलही सर्वोच्चतम भावना आहे. म्हणूनच सकल सुखांचा परित्याग करून हा प्रवाहाविरुद्धचा योगी फाल्गुन शुक्ल षष्ठी, शके १८८७ अर्थात २६ फेब्रुवारी १९६६ या दिनी प्रायोपवेशनाद्वारे अनंतब्रह्माच्या प्रवासास निघून गेला. जणू परमेश्वराने मानवजातीवर कृपावंत होऊन आपल्या तेजाचा एक अंश आमच्यात धाडला होता, तो लक्षावधी आयुष्यांना तेजस्वी स्पर्श करून पुन्हा एकवार अनंतात विलीन झाला. आणि त्याने स्पर्शलेली आयुष्येच नव्हे तर पिढ्यानपिढ्या उजळून निघाल्या, कायमच्या साठी!!

    — विक्रम श्रीराम एडके
    (लेखक सावरकरांच्या चरित्राचे अभ्यासक आणि व्याख्याते आहेत. व्याख्यानांच्या आयोजनासाठी संपर्क www.vikramedke.com)

  • सावरकरांचे सामाजिक कार्य : एक वस्तुनिष्ठ आकलन

    सावरकरांच्या आयुष्याचे ढोबळमानाने ५ कालखंड पडतात. पहिला जन्मापासून ते अटकेपर्यंत. दुसरा अंदमानपर्व. तिसरा रत्नागिरीपर्व. चौथा सुटकेपासून ते स्वातंत्र्यापर्यंत. आणि पाचवा स्वातंत्र्यापासून ते आत्मार्पणापर्यंत. ह्या कालखंडांपैकी रत्नागिरीपर्वात सावरकरांनी अतुल्य समाजकार्य केलेले दिसते. इतके की, डॉ. आंबेडकरांच्या “जनता”ने (एप्रिल, १९३३; संदर्भ: सावरकर-चरित्र, कीर, आ. २००८, पृ. २०८) सावरकरांच्या कार्याची तुलना थेट भगवान बुद्धांशी केली आहे. परंतु सावरकरांवर जे अनेक आक्षेप घेतले जातात, त्यात प्रमुख आक्षेप हादेखील असतो की, सावरकरांनी रत्नागिरीतून सुटल्यानंतर अथवा रत्नागिरीत स्थलबद्ध होण्याआधी कोणतेही सामाजिक कार्य केलेच नाही. सदर आक्षेपाला सावरकरद्वेषाचे, जातीद्वेषाचे आणि राजकारणाचे अनेक कंगोरे आहेत. आपण त्यामध्ये न पडता केवळ ह्या आक्षेपात कितपत तथ्य आहे याचा वस्तुनिष्ठपणे विचार करु.

    सावरकरांना शिक्षा झाली ती वयाच्या २७व्या वर्षी! अवघ्या पंचविशीतल्या पोराने का बरं काही समाजकार्य केले नाही, असा प्रश्न जर कुणाला पडणार असेल तर ते हास्यास्पद व म्हणूनच उत्तर देण्याच्याही योग्यतेचे नाही. याकाळातच सावरकरांनी केलेले क्रांतिकार्य भल्याभल्यांना जन्मभर अभ्यासावयाला पुरेल एवढे मोठे आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अनेक सूक्ष्म पदर असलेले आहे. किंबहूना त्याच क्रांतिकार्याची शिक्षा म्हणून ब्रिटीशांनी सावरकरांना फाशीहूनही कठोर अशी काळेपाण्याची शिक्षा सुनावली (१९१०). परंतु त्याही काळात सावरकरांचे विचार काय होते ते मुख्यतः त्यांच्या काव्यातून समजतात. वास्तविक अभिजन वर्गात जन्माला आलेला हा मुलगा. त्यांना कोणत्याही प्रकारचा सामाजिक प्रश्न अजिबातच दिसला नसता, तरीदेखील तत्कालीन परिस्थितीला धरुनच असले असते ते. परंतु त्याही काळात सावरकर स्वदेश, स्वदेशी, स्वधर्म, स्वातंत्र्य इ. बाबत जागृत असल्याचे त्यांच्या लेखनातून पदोपदी दिसते. आपल्या “बालविधवा दु:स्थितीकथन” (१९०२) कवितेत अवघ्या १९ वर्षांचे सावरकर लिहितात —
    “ज्यांच्या गृहिणी जाती कालांतराने ते गृहस्थ होतात ।
    कन्यापुत्रही लाभती द्यायाला धीरही स्वस्थ हो तात ।।
    वृद्धाचा सुत गेला स्वांकी तो दत्तकासि घेईल ।
    स्वपिता मरता तद्विण सुत संसारी समर्थ होईल ।।
    सर्वांसि उपाय असे शास्त्राने वा सुरुढिने विहित ।
    परि न दया ये उभयान्वयी विधवांचे साधण्यास तेवि हित ।।
    शास्त्रे उपेक्षिल्या त्या छळिल्या रुढिने तयांत शतपट हो ।
    अबलांना विधवांना अजुनि तरी तारण्यास खटपट हो ।।
    आताहि जरी उपेक्षा दु:स्थितीतुनि त्यांसि उद्धारायाते ।
    तरि हा पातकपर्वत शक्त न होईल धरू धरा याते ।।
    वैदिक हो, भिक्षुक हो, उद्धारक हो, अहो सुधारक हो ।
    सदय मनाने कोणी अबलांना संकटात तारक हो ।।
    अवलोकिता न पतिचे वदनही वैधव्य मात्र अवलोकी ।
    क तत्पुनर्विवाहा प्राप्त असो संमती न तव लोकी? ।।”
    हा सावरकरांचा खडा सवाल आहे. सावरकर ह्यावर उपायही सांगतात —
    “सत्वर कडाड मोडा हानिद ह्या रुढिचा महा खोडा ।
    तोडा दु:स्थितीबेडी अबला तारोनि धवलयश जोडा ।।”

    किंबहुना सावरकरांच्या आयुष्याचा उद्देशच मुळी भारतभूमीचा सर्वंकष उद्धार करण्यासाठी शक्य होईल ते सारे काही करणे, हाच होता. हे जसे सावरकरांनी वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी घेतलेल्या प्रतिज्ञेत दिसते. तसाच त्याचा पुनरुच्चार “सागरास”मध्येही (१९०९) आढळतो. सावरकर लिहितात —
    “जगदनुभवयोगे बनुनि मी, तव अधिकशक्त उद्धरणी मी”!

    परंतु हिंदु धर्मातील जातीव्यवस्था व त्यायोगे राष्ट्राची होत असलेली हानी यांचे दाहक वास्तव सावरकरांना सर्वाधिक जाणवले ते अंदमानात. संख्येने मुठभर असूनही मुसलमान वॉर्डर हिंदू कैद्यांवर कसे काय अत्याचार करु शकतात, याचे उत्तर त्यांना सापडले ते हिंदू पाळत असलेल्या स्पृश्यास्पृश्यतेच्या घातक रुढीमध्ये! याविषयावर सावरकरांनी अंदमानात शक्य तेवढे कार्य केले. यातूनच जन्म झाला तो हिंदुसंघटनाचा. परंतु हिंदूंनी हिंदू म्हणून जगात एकत्र यायचे असेल तर जन्मजात जातीभेदाच्या बेड्या तोडल्या पाहिजेत, हे उघड होते. रत्नागिरीतील स्थलबद्धतेचा याकामी सावरकरांनी पुरेपूर वापर केला व जातीभेदावर सुसूत्रपणे हल्ला चढवला. एकप्रकारे स्थलबद्धता इष्टापत्तीच ठरली सावरकरांसाठी. जे कार्य डॉ. आंबेडकर विवर्ण स्तरातून करत होते तेच सावरकरांनी समाजाच्या सवर्ण स्तरातून केले. दोघांचेही कार्य परस्परपूरक होते. दोघांनाही एकमेकांबद्दल आदर होता व तो त्यांनी वेळोवेळी व्यक्तदेखील केलेला दिसतो. रत्नागिरीतील कीर-मंदिर अखिल हिंदूंना खुले करण्यात येणार होते. ह्या मंदिराचे उद्घाटन डॉ. आंबेडकरांच्या हस्ते व्हावे अशी सावरकरांची प्रामाणिक इच्छा होती. परंतु आधीच ठरलेल्या वेळापत्रकामुळे डॉ. आंबेडकरांना ते शक्य झाले नाही. याप्रसंगी त्यांनी सावरकरांना पाठवलेल्या पत्राचा उल्लेख आंबेडकर व सावरकर दोघांचेही चरित्रकार असलेल्या धनंजय कीर यांनी (सावरकर-चरित्र, कीर, आ. २००८, पृ. २०२) केला आहे —
    “सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करीत आहात त्याविषयी अनुकूल अभिप्राय देण्याची ही संधी घेत आहे. जर अस्पृश्यवर्ग हिंदुसमाजाचा अभिन्न भाग व्हायचा असेल, तर नुसती अस्पृश्यता जाऊन भागणार नाही; चातुर्वर्ण्याचे उच्चाटन झाले पाहिजे. ज्या थोड्या लोकांना ह्याची आवश्यकता पटली आहे, त्यांपैकी आपण एक आहात हे सांगावयास मला आनंद वाटतो”.
    दोघांच्याही अश्या परस्परपूरकतेमुळेच दोघांचाही उल्लेख कीरांनी “समाजक्रांतिकारक” असा केला असल्याचा संदर्भ शेषराव मोरेदेखील (सावरकरांच्या समाजक्रांतिचे अंतरंग, संक्षिप्त आ. २०१५, पृ. १) देतात.

    सावरकरांनी जर आपले कार्य सामाजिक क्रांतिपुरतेच मर्यादित ठेवले असते, तर अवघ्या ५ वर्षांच्या आतच त्यांनी सबंध हिंदुस्थानातून अस्पृश्यतेचे समूळ उच्चाटन करुन दाखवले असते. हे मत आहे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे (कीर, २०८) यांचे! मग आता प्रश्न असा उभा राहातो की, सावरकरांनी बिनशर्त सुटकेनंतर हे कार्य का थांबवले? वरवर पाहाता सावरकरांनी खरोखरच कार्य थांबविल्याचे दिसते. याची कारणे २! एक म्हणजे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी राजकारणाचा व्याप अंगावर घेण्याची आवश्यकता. आणि दुसरे म्हणजे पाकिस्तानच्या रुपाने भारताचे तुकडे पडण्याची येऊन ठेपलेली वेळ. ह्या दोन्हीही गोष्टी तत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने केव्हाही अधिक निकडीच्या होत्या. परंतु याचा अर्थ सावरकरांची समाजकार्याबाबतची आस्था संपली होती असे नव्हे. सावरकरांसाठी समाजकार्य हेच हिंदुसंघटन होते व हिंदुसंघटन हेच समाजकार्य होते. यामागचे साधेसोपे तर्कशास्त्र असे की, अस्पृश्यता नष्ट झाली तरच हिंदु संघटीत होऊ शकतील ना! त्यामुळे सावरकरांसाठी हिंदुसंघटनाचा अर्थ अस्पृश्यतानिर्मूलन हादेखील होताच. किंबहूना याच अर्थाने त्यांनी हिंदुमहासभेच्या ध्येयश्लोकात “अभ्युत्थानाय हिंदुनाम्” हे शब्द समाविष्ट करुन घेतले होते. “राजकीय सुधारणा व सामाजिक सुधारणा ही राष्ट्राच्या गाड्याची दोन चाके आहेत. यांतील कोणतीही सुधारणा मागे ठेवणे योग्य नाही. या दोन चाकांवर भारत देश पुढे न्यायचा आहे. कोणतेही चाक मागे राहून चालणार नाही” (समाजसुधारक सावरकर, केळकर, आ. १९८६, पृ. १२५). तसेच १९४३ मध्ये “सामाजिक सुधारणा झाल्यावाचून स्वराज्य मिळाले तर तीन दिवससुद्धा टिकणार नाही” (स्वा. सावरकर – अखंड हिंदुस्थान पर्व, बाळाराव सावरकर, आ. १९७६, पृ. २०२) ही सावरकरांची ह्याविषयावरील मते आहेत.

    एवढेच नव्हे, तर १९४७ साली ‘हरिजन सेवक संघा’चे श्री. वि. न. बर्वे यांना पाठवलेल्या पत्रात सावरकरांनी प्रकृती ठिक झाली की अस्पृश्यतेच्या घातक रुढीवर आणखी एक अखिलभारतीय चढाई करण्याचा मनोदय बोलून दाखवला आहे (तत्रोक्त, पृ. ३६९). दुर्दैवाने त्यानंतर वर्षभरातच गांधीहत्या झाली व स्वकीय सरकारच्या कारभारातही नाहक खटल्यात गोवले गेलेले सावरकर नवीन कार्य करण्याची उभारी कधीच धरु शकले नाहीत. अर्थातच वयाच्या १५व्या वर्षापासून जो देह सतत देशकार्यासाठी झिजला, त्यापायी नानाप्रकारचे त्रास व अपमान भोगले, त्याच्याकडून पुन्हा वार्धक्यातही नव्याने कार्य करण्याची अपेक्षा करणे हेच मुळी स्वार्थीपणाचे आहे. परंतु त्याही परिस्थितीत सावरकरांनी आपल्या मृत्युपत्रात हिंदुसंघटनासाठी तरतूद केल्याचे दिसून येते. यावरुनच सावरकरांना सामाजिक कार्याबाबत वाटत असलेली कळकळ लक्षात घ्यावी. सावरकरांचे मूल्यमापन द्वेषपूर्ण अथवा विरोधी भूमिकेतून न करता वस्तुनिष्ठपणे केल्यास, आजही भयाण असलेल्या सामाजिक वास्तवात सावरकरांचे कार्य व त्यासाठी त्यांनी वापरलेले अभिनव मार्ग दीपस्तंभ बनून मार्गदर्शन करताना दिसतील!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [सावरकरांच्या चरित्राचे अभ्यासक आणि सावरकरांवर व्याख्याने देणारे वक्ते. व्याख्यानांच्या आयोजनासाठी संपर्क www.vikramedke.com]

    image

  • हिंदू चैतन्याचे अवतार!!

    बाजीराव सरकारांचे सार्वजनिक व्यक्तीमत्त्व कसे होते? चिमाजी अप्पा एका पत्रात लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३०), “वाटेस घोड्यावर बसोन चालले होते. तेव्हा एके गावचा पाटील भेटीस आला. तेव्हा असावध होते. त्यामुळे पाटलासी सहजात बोलले, जे कोंबड्यांचे प्रयोजन आहे. घेऊन येणे”. इथे चिमाजी खरे तर रागावून लिहितायत की, राऊंनी उघडउघड पाटलाकडे कोंबड्या मागितल्या. परंतु बाजीराव असेच होते. राजकारणात कुटील, मात्र त्याव्यतिरिक्त जे मनात असेल तेच ओठांवर ठेवणारे शिपाईगडी. ते उघडपणे मांसाहार करीत. मद्यप्राशन करीत. त्याकाळी पाहायला गेलं तर दोन्हीही ब्राह्मण्याला न शोभणाऱ्या गोष्टी. परंतु तसंच पाहायचं झालं तर, हिंदुपदपातशाही हे एकच उद्दीष्ट मनी बाळगून पायाला भिंगरी बांधल्यागत देशभर ससैन्य संचार करणे तरी कुठे ब्राह्मण्यात बसते? बाजीरावांना जाणीव होती की, सध्याचा काळ हा धर्म-धर्म करीत बसण्याचा नाही, तर त्या धर्माचं रक्षण करण्याचा आहे. खाणे-पिणे हे गौण आहे. ज्याला सबंध समाजाला आपलंसं करायचं असतं, त्याला आपल्या घरातल्या परंपरा बाहेरही लादण्याचा अट्टाहास करुन चालत नसतं. सतत फिरतीवर असणाऱ्याने, मुलुखगिरी-शिपाईगिरी करणाऱ्याने तर खाण्याचे चोचले करुच नयेत. तिथे सोवळेपणाची अपेक्षाही मूर्खपणाची आहे. जे मिळेल ते आणि जसे मिळेल तसे खाण्याची तयारी हवी, तरच मोहीमा साधतात.

    बाजीराव असेच होते. त्यांचे सैनिकच नव्हे तर ते स्वतःसुद्धा कधीच मोहीमांवर शिदोरी नेत नसत. काय करायचेय निष्कारण ओझे? भूक लागली, तर शत्रूचा मुलुख लुटून खायचं. ते साधणारे नसेल, तर मिळेल त्या गावी, मिळेल ती मीठभाकरी खायची. कित्येकदा तर हे जगज्जयी मराठी सैन्य घोड्यावरुन उतरतही नसे. कुठूनतरी कणसं आणायची. हातावरच हुरडा मळायचा. पोटात ढकलायचा. आणि वरुन पाणी मारायचं. हे जसे शिंदे, होळकर, सोमवंशी, जाधव, पवार, विंचूरकर करीत; तसाच त्यांचा लाडका पेशवाही करी! सरदार, सैनिकांसोबत मोहीमा करायच्या आणि खाण्यापिण्याच्या वेळी मात्र स्वत:चं सामाजिक श्रेष्ठत्व कुरवाळायचं, असा दुटप्पीपणा बाजीरावांच्या स्वभावात नव्हता. ते आपल्या सर्व थरांतल्या सरदारांसोबत राहात. त्यांच्यासोबतच जेवत. सगळे मित्र गप्पा मारत. झोप आली तर आकाशाच्या पांघरुणाखाली फत्तराचं अंथरुण करीत ताणून देत. आपले धनी आपल्यातच मिळून मिसळून वागतात, हे जेव्हा सैन्याला दिसतं, तेव्हाच कुठे सैन्य एकजिनसी राहातं. आणि म्हणूनच पालखेडसारख्या मोहीमांमध्ये हजारों किलोमीटर्सचा प्रवास घडूनही सैनिकांपैकी कुणीच हूं की चूं केलं नाही अथवा बाजीरावांवर शंका घेतली नाही. कारण, त्यांना उघड्या डोळ्यांनी दिसत होतं की; ज्या परिस्थितीतून आपण जातोय, जे खातोय, जसं राहातोय, तसंच आपला पेशवाही राहातोय. त्याने स्वतःसाठी कोणत्याही प्रकारचा वेगळा बादशाही थाट केलेला नाही. आपले भोग हेच त्याचेसुद्धा भोग आहे. मग क्षोभ कसा काय होणार? हेच बाजीरावांच्या सैन्याच्या अजिंक्यतेमागचं एक अतिशय महत्त्वाचं कारण होतं. बाजीराव सैन्यात राहून जसे थट्टामस्करी करायचे, सैन्यासोबत एकत्र बसल्यावर गाणी गायचे तसेच प्रसंगी कुणी चुकलाच तर “शिपाईगिरी कशास करता? रांडा जाले असते तर कामास येते” (मस्तानी – द. ग. गोडसे, पृ. १६२) असे अस्सल भाषेत सुनवायचेसुद्धा! त्यामुळेच सैन्याला ते जास्त आपल्यातले वाटायचे.

    स्वतः शाहू छत्रपतींना बाजीरावांच्या ह्या गुणांची पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच त्यांनी बहुतांश बाबतीत राऊंना स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळेच अनेकदा मोहीमांवर बाजीराव परस्पर निर्णय घ्यायचे, तरी बाजीरावांच्या निष्ठेबद्दल शाहू थोडीदेखील शंका बाळगत नसत. बाजीरावांवर कधीच नाराज होत नसत. उलट १७२८ मध्ये सातारा दरबारातील पेशव्यांचे मुतालिक लिहितात (तत्रोक्त), “..राऊ स्वामींची मर्जी अवघियांनी पालावी. त्यांचे चित्तास क्षोभ करु नये”! किंवा मस्तानीच्याही संदर्भात शाहूंचे चिटणीस गोविंद खंडो दि. २१ जानेवारी १७४० यादिवशी नानासाहेबांना लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३२), “ऐसियास राजश्री स्वामींची मर्जी पाहाता ते वस्तू (मस्तानी) त्याजबरोबर (बाजीराव) न द्यावी, ठेवून घ्यावी, चौकी बसवावी; त्यामुळे राऊ खटे जाले, तऱ्ही करावे ऐसी नाही”! एवढी मर्जी सांभाळत असत शाहू बाजीरावांची.

    दुर्दैव असे की, बाजीरावांचे हे वेगळेपण, देशकालपरिस्थितीनुरुप आवश्यक असलेली वागणूक, सामाजिक स्तरावर किती जरी क्रांतिकारक असली, तरी वैयक्तिक स्तरावर त्यांना कधीच समजून घेतले गेले नाही. मित्र, सैन्य आणि मालक कायमच बाजीरावांच्या बाजूने असताना त्यांना तत्कालीन इतरांची फारशी साथ लाभल्याचे दिसून येत नाही. राऊंच्या अकाली जाण्यामागे हेदेखील कारण आहे, असे वाटते. नासिरजंगला हरवून पुण्यासही न परतता खरगोण प्रांतातील जहागिरीची व्यवस्था पाहायला बाजीराव निघाले होते. जाताना त्यांनी “मस्तानीस तिकडे पाठवून द्या” असेही चिमाजींना सांगितले होते. चिमाजींनी ते मान्य केले. नानासाहेबांना लिहिलेल्या पत्रात चिमाजी लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३३), “पुण्यास गेल्यावर तिची रवानगी त्यांजकडे करावी, आपले निमित्य वारावे, त्यांचे प्राक्तनी असेल ते होईल ऐसा विचार केला आहे”. परंतु प्रत्यक्षात मात्र मस्तानीस न पाठवता काशीबाईंनाच रावेरखेडी पाठवण्यात आले. किचन-पॉलिटिक्सचे धागे हे असे गुंतागुंतीचे होते! काशीबाई येण्यापूर्वीच बाजीरावांना ताप भरला होता. त्या आल्यानंतर अवघ्या २-३ दिवसांतच बाजीराव गेले! इतरांचे माहिती नाही, परंतु स्वतः बाजीरावांच्या मनात अखेरपर्यंत कुणाबद्दलच किंतु नव्हता. २३ मार्च १७४० यादिवशी ते बुऱ्हाणपुराहून मातोश्री राधाबाईंना त्याच अप्पांबद्दलच्या काळजीपोटी लिहितात (रियासत, पृ. ३९५), “आपांस उष्णकाळामध्ये बाहेर जाऊ न द्यावे”.

    समकालीनांनी व उत्तरकालीनांनी बाजीरावांबद्दल काही का गैरसमज करुन घेतलेले असेनात, सर जदुनाथ सरकार मात्र दिघेंच्या “Peshwa Bajirao I & Maratha Expansion” च्या प्रस्तावनेत म्हणतात, “Bajirao was a heaven born cavalry leader. In the long and distinguished galaxy of Peshwas, Bajirao was unequalled for the daring and originality of his genius and the volume and value of his achievements”! परंतु मला सर्वाधिक भावते ते इंग्रज इतिहासकार सर रिचर्ड कार्नॅक टेंपल यांचे मत. आपल्या “Shivaji & The Rise of Marathas” ग्रंथात ते बाजीरावांबद्दल लिहितात, “He died as he lived, in camp under canvas among his men, and he is remembered to this day among the Marathas as the fighting Peshwa and the incarnation of Hindu energy”! Incarnation of Hindu Energy, अर्थातच “हिंदुंच्या चैतन्याचा अवतार”! केवढे चपखल विशेषण आहे हे. बाजीरावांचे अवघे आयुष्य अवघ्या चारच शब्दांत पकडणारे अमोघ विशेषण!! खरोखर बाजीराव हे हिंदूंच्या चैतन्याचे अवतारच तर होते!! त्यांनी आमची मरगळ झटकून टाकली व आम्हांला स्वाभिमान शिकवला. हिंदुपदपातशाहीची कल्पना आमच्या मनांत ठाम केली. छत्रसालसारख्या दूरदेशीच्या राजाला मदत करुन “हिंदू तेवढा एक” हा संदेश आपल्या कृतीतून दिला. स्वराज्याचे साम्राज्य केले. आणि हे सारे करताना, वैयक्तिक ऐषाराम, सुखदुःख, तहान-भूक यांची काडीमात्रही पर्वा केली नाही. स्वार्थ नेहमीच दुय्यम मानला. अवघे ४० वर्षांचे आयुष्य. त्यात अवघ्या २०व्या वर्षी पडलेली पेशवाईची अवघड जबाबदारी. केवळ २०च वर्षांत स्वराज्याचा चारही बाजूंनी अतोनात विस्तार करण्याचे कर्तृत्व. त्यासाठी अथकपणे लढलेल्या लढाया आणि सर्वच्या सर्व लढायांमध्ये अजिंक्यपद!! खरोखर तो एक झंझावातच होता. आमच्या फाटक्या झोळीत कधीच न मावणारा झंझावात. म्हणूनच आम्ही त्याला कधीच गवसणी घालू शकलो नाही. तो आला, कर्तव्य केले आणि वै. शु. १३, अर्थात २८ एप्रिल १७४० यादिवशी निजधामी निघूनसुद्धा गेला, आज नाही तर काहीशे वर्षांनी तरी आपले कर्तृत्व ह्या निद्रिस्त हिंदुसमाजास समजेल, ह्या खात्रीने!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    *लेखकाच्या नावाशिवाय अथवा स्वत:च्या नावाने कॉपी करुन या लेखामागील कष्टांचा अपमान करु नये.
    (लेखक बाजीरावांच्या युद्धनीतीचे अभ्यासक आणि व्याख्याते आहेत. अधिक माहितीसाठी पाहा www.vikramedke.com)

    image

  • सावरकर नावाचा ब्रॅण्ड!!

    नव्याने विमानात बसणाऱ्यांची एक बेक्कार गंमत होते. उद्धरिणीने (लिफ्ट हो!) जाताना कसं वजनरहित वाटतं आणि डोकं पिसाहून हलकं होतं, तसं वाटतं. आणि त्या अवस्थेत प्रतितास शेकडो किलोमीटर वेगाने आपण हवेत तिरके भिरकावलो जात असतो!! बाऽबोऽऽ!! शब्दातीत अवस्था असते उड्डाण म्हणजे!! यात एक वेगळाच त्रास होतो. कान भयानक दुखतात. हवेचा दाब सतत बदलत असतो. त्यामुळे कानांवर प्रचंड ताण येतो. जरा कुठं वर-खाली झालं की, “पुटूक पुटूक” आवाज करत कानात लहानसे स्फोट होतात की “सुंईईईऽऽ..” आवाज करत अडकून राहिलेली हवा निघून जाते. परत नव्याने दाब. तात्पुरता बहिरेपणा येतो. उतरल्यावरही कित्येक तास कान दुखत राहातात. यासगळ्यात नाक व तोंड दाबायचं आणि प्रयत्नपूर्वक कानावाटे श्वास सोडायचा, ह्या द्राविडी प्राणायामाची निराळीच गंमत असते!!

    मुंबई ते चेन्नई प्रवासात फारच त्रास झाला मला. कारण असं काही होईल याची कल्पना होती, पण इतकं होईल असं कुणाला वाटतंय!! त्यातून हवाईसुंदरीला मी फारसा आवडलो नसावा, कारण तीनतीनदा बोलावल्यावर तिने शेवटी कापसाचे बोळे आणून दिले. तशी ती पण नुसती “हवाई”च होती मेली, “सुंदरी” तर औषधालाही नव्हती! शेवटी व्हायचा तो त्रास झालाच. पण तिथून पुढे चेन्नई ते पोर्टब्लेअर प्रवासाच्या वेळी मात्र मी मानसिक तयारी करुन ठेवली होती. त्याप्रवासात काही मला खिडकीजवळची जागा नव्हती मिळालेली. उजव्या रांगेतली पहिली जागा. दोन तमिळ ख्रिश्चन कुटूंबे बिचारी माझ्यामुळे निम्मी इकडं आणि निम्मी तिकडं झालेली. नवरे, बायका आणि चिल्लीपिल्ली! “तमिळ” म्हटलं की मुळातच माझे अष्टसात्त्विकभाव जागृत होतात. का कोण जाणे पण मला मी मागच्या जन्मीचा तमिळ वाटतो, इतकी ओढ वाटते मला त्या भाषा आणि संस्कृतीबद्दल. त्यामुळे मी त्या अण्णा-अम्मांशी मोडक्यातोडक्या तमिळमध्ये गप्पा सुरु केल्या!

    त्यांच्यातले एक अण्णा कोटक बँकेत कामाला होते. मग देशाची सध्याची अवस्था, मोदी-बिदी असले “लडकोंवाले” विषय बोलून झाल्यावर गाडी हळूच “अंदमानला कश्यासाठी?” ह्या प्रश्नाकडे वळली. ती कुटूंबं सप्ताहान्त साजरा करायला सहज म्हणून चालली होती. मला विचारलं तर मी सांगितलं की, “महाराष्ट्रातून आम्ही काही लोक चाललोय अंदमानला. सावरकरांसाठी! आम्ही नुसते फिरणारच नाही आहोत तर मी व्याख्याने देणार आहे तिथे सावरकरांवर. त्यासाठी वक्ता म्हणून चाललोय”, वगैरे वगैरे. यावर साहजिकपणे त्यांनी विचारलं की, “कोण सावरकर बुवा”? बास!! नाहीतरी महाविद्यालयीन काळात एका बिग्रेडी प्राध्यापकाला नडलो होतो त्यावेळी त्यांनी हताश आवाजात म्हटलेच होते, “तू जिथं-तिथं सावरकर घुसडतोस सतत”! इथे तर सरळ समोरुन प्रश्न आला होता, “कोण सावरकर”? माझ्या डोक्यात उलटी गणती सुरु झाली, “३.. २.. १.. सुरु”!! मी तासभर त्या चार-पाच जणांना इंग्लिश आणि तमिळमध्ये सावरकर समजावून सांगत होतो. त्यांची साहजिक प्रतिक्रिया होती, “देशासाठी आयुष्यभर एवढा त्रास भोगलेला हा माणूस आम्हाला माहितीच नव्हता”! त्यांच्यापैकी एकाने विचारले की, “सावरकर प्रत्यक्षात किती थोर होते”? तेवढ्यात घोषणा झाली, “कृपया कुर्सीकी पेटियाँ बाँध ले, हम कुछही मिनटोंमें पोर्टब्लेअरके वीर सावरकर आंतरराष्ट्रीय हवाईअड्डेपे उतरनेवाले है..”! मी म्हणालो, “अंदमानमधल्या एकमेव विमानतळाला एका मराठी माणसाचं नाव द्यावं लागलं, इतके थोर होते सावरकर”! यावर आम्ही सगळेच हसायला लागलो. बोलण्याच्या भाषा लाखों असतील जगात, पण हास्याची भाषा एकच असते!!

    हा काही अंदमानप्रवासातला असा एकमेव अनुभव नाही. तिकडे आमचा समन्वयक होता एक. विकास नाव त्याचं. वडील पंजाबी, आई तेलुगू, वाढला बंगाली बहुसंख्य असलेल्या अंदमानमध्ये. त्यामुळे ह्या तिन्ही भाषा तर तो अस्खलित बोलतोच. शिवाय अंदमानात राहून राहून तमिळ आणि हिंदीतसुद्धा पारंगत झालेला. इंग्रजीही अतिशय उत्तम. बाकीचे आमच्या ठरलेल्या गाड्यांमधून फिरायचे. मी म्हणालो, “मला नाही असं फिरायचं”! तर मला त्याच्या बाईकवरुन सबंध पोर्टब्लेअर फिरवायचा हा गडी. आमच्यासोबत राहून राहून मराठीसुद्धा शिकून घेतलं त्याने गरजेपुरतं. एके दिवशी मला म्हणाला, “यार तुम ये डेढ़-दो घण्टे क्या भाषण देते हो? मुझे सुनना है”! मी म्हणालो, “आ जाओ आज शामको”! आला. सगळ्यात मागे बसला. मराठी व्याख्यान. साहेबांना एक शब्दसुद्धा कळला नाही. पण शेवटपर्यंत बसला होता. व्याख्यान संपल्यावर म्हणाला, “विक्रमसर, मुझे समझमें तो कुछ नहीं आया, पर पूरा माहौल भावूकसा हो गया था. ज़रुर कुछ अच्छी बातेंही बताई होंगी! इतना मानते हो आप महाराष्ट्रीयन लोग वीर सावरकरको”? मी म्हणालो, “सावरकर अगर भगवान नहीं तो भगवानसे कम भी नहीं हमारे लिए”! तो विचारात पडला. जरा वेळाने म्हणाला, “हम आजतक सेल्युलर जेल किसी टुरिस्ट स्पॉटकी तरहही दिखाते आए है. आज पहली बार सोच रहा हूँ की, उसके साथ लोगोंकी कितनी भावनाएँ जुडी हो सकती है! आईंदासे मैं जेल ले जाते वक़्त ये ध्यान रखूँगा और लोगोंको बताऊँगा की जिस इन्सानके लिए आपलोग यह जेल देखने आए हो, वह भगवानसमान है महाराष्ट्रमें”!!

    मला वाटतं, आपण मराठी लोक आपल्याच महापुरुषांबद्दल न्यूनगंड बाळगतो ना, म्हणून आपल्या लोकांना कुणी फारसे ओळखत नाही बाहेर. आपण आपल्याच लोकांची सकारात्मक बाजू डंके की चोटपे सांगायला लाजतो. तिकडे हॅवेलॉक बेटावर एक “राधानगर बीच” नावाचा नितांतसुंदर समुद्रकिनारा आहे. आशिया खंडातला तिसरा सगळ्यात सुंदर आणि भारतातला तर सगळ्यात सुंदर समुद्रकिनारा. पार गळ्यापर्यंत पाण्यात गेलात तरीही खाली पाहिल्यास पावले स्पष्ट दिसतील, एवढा स्वच्छ! तिकडे आम्ही सगळे मनसोक्त खेळलो. खेळून झाल्यावर कपडे-बिपडे बदलले आणि तिथल्या बाकड्यांच्या समूहात सगळेजण अर्धवर्तुळाकार बसलो. आमच्या मंडळींचा अतरंगीपणा असा की, आजचे व्याख्यान इथेच करुया. मग काय! अतीवसुंदर, नादमय समुद्र आणि त्या पार्श्वभूमीवर सावरकरांची कीर्ती सांगणारा मी! एवढे सगळे लोक एकत्र जमून एकाच माणसाचं ऐकताहेत म्हटल्यावर कुठून कुठून आलेले पर्यटकसुद्धा जमून ऐकू लागले. पाहाता-पाहाता शे-दिडशे माणसं जमली. क्वचितच कुणाला मराठी समजत असावं त्यांच्यापैकी. मी मुद्दामच मराठीतून व्याख्यान सुरु ठेवलं. व्याख्यान संपल्यावर एक बंगाली काका हातात भेळेचा पुडा घेऊन बकाणे भरता-भरता आले, “ये जो आप ‘सावन.. सावन..’ कह रहे थे, वह क्या था?” मला हसू आले. मी त्यांना म्हणालो, “सावन नहीं, सावरकर”! मग मी त्यांना सावरकर समजावून सांगितले, ते कसे सेल्युलर जेलमध्ये होते हेही सांगितले. त्यावर ते बाबूमोशाय काय म्हणाले असतील? म्हणे, “फिर हमारे सुभाषबाबू कौनसे सेलमें थे”? मी म्हणालो, “वह यहाँ कभी कैद थे ही नहीं! अंदमान प्रसिद्ध है मात्र सावरकरजीकी वजहसे”! तर म्हणे, “क्या बात करते हो? क्या सावरकर हमारे सुभाषबाबूसेभी बडे थे”? मी म्हणालो, “जी बिल्कुल! बल्की, सुभाषबाबूको आज़ाद हिंद सेनाकी कल्पनाभी सावरकरजीनेही दी थी. गुरु मानते थे वह सावरकरजी को! उनकी पुस्तकें बंगालीमें प्रकाशितभी करते थे सुभाषबाबू”! बंगालीकाका आता चमकले, “अरे बापरे, यह तो हमें पताही नहीं था. धन्यवाद सर”!

    पाहिलंत? इतर राज्यांनी महाराष्ट्राच्या तुलनेत खूपच कमी क्रांतिकारक दिले. पण केवढा पूज्यभाव त्यांच्या मनात आपापल्या क्रांतिकारकांबद्दल! नाहीतर आपण!! नुसती मराठी क्रांतिकारकांची यादीच करायची म्हटलं तरी खंडांमागून खंड भरतील, पण आम्ही करंटे न्यूनगंडी, त्यांच्याबद्दल बोलायलादेखील लाजतो. मुळात आम्हालाच काही माहिती नसतं तर बोलणार तरी काय म्हणा! पण माहिती तर त्या बंगाली काकांनाही नव्हती. तरीदेखील रेटून विचारलंच ना त्यांनी सुभाषबाबूंबद्दल? आणि आम्ही आमच्याच गौरवबिंदूंपासून दूर दूर पळतो. मला नाही वाटत, पंजाबात शीखेतर भगतसिंहांचा द्वेष करत असतील. नाही! तो ब्रॅण्ड आहे त्यांच्या राज्याचा!! बंगालात कायस्थविरोधी चळवळ आहे की नाही कोण जाणे, पण असली तरी कुणीही बंगालीबाबू सुभाषबाबूंचा द्वेष करताना नाही आढळणार तुम्हाला. ब्रॅण्ड आहे तो त्यांच्या राज्याचा! पण त्याच भगतसिंहांच्या इतके, किंबहूना काकणभर जास्तच क्रांतिकार्य केलेले राजगुरु! केवळ त्यांच्या जातीपायी त्यांचा द्वेष करणारे किती मराठी दाखवू तुम्हाला, बोला! यांची तोंडं सदोदित वाकडीच!! यांना टिळक नको, चापेकर नको, सावरकर तर साताजन्मीसुद्धा नको. बरं बाबा, मग जे तुम्हाला गोड लागतात त्यांच्याबद्दल तरी बोला. छे!! परप्रांतीयांसमोर आपल्याच लोकांचे गुणगान गातानाही हातभर फाटते. मुळात माहितीच काही नसतं. आणि इतरांचा द्वेष करण्यातच सगळं आयुष्य गेल्यामुळे सर्वसमावेशक भाषेत आपला माणूस पटवून देण्याचं कौशल्य तर त्याहूनही नसतं. काय कप्पाळ ब्रॅण्ड निर्माण होणार महाराष्ट्राचा? मग बोंबलायचं, “त्या अमुक राज्यात शिवाजी महाराजांना लुटारू म्हणून शिकवलं जातंय होऽ”! अरे थुक्रटराव, तू जर कधी बाहेरच्या जगात शिवरायांची चांगली बाजू सांगितलीच नाही, तर ते त्यांना जे समोर दिसेल तेच खरं मानणार ना ते येडपटा!! पण तू तर “शिवाजी कसे हिंदू नव्हतेच” असला पागल फेसबुकीया शोध लावत किबोर्ड बडवत बसलायस नाहीतर व्हिएतनामचा तो कोणतातरी नेता कसा रायगड बघायला आला होता याच्या खोट्यानाट्या कथा पसरवत बसलायस. मग जग शिवरायांना असंच काहीतरी वाट्टेल ते संबोधणार!!

    टिळक असोत, सावरकर असोत, शिवराय-शंभूराय वा थोरले बाजीराव असोत, हे ब्रॅण्ड आहेत महाराष्ट्राचे. छातीठोकपणे अमराठी आणि अभारतीय लोकांना कर्तृत्व सांगा त्यांचं. सकारात्मक बोला आणि बघाच त्यांचा महाराष्ट्राबद्दलचा आदर कसा दुणावतो ते! एवढे मोठे मोदी, पण पटेल आणि गांधी किती जरी भिन्न विचारधारांचे असले तरीही त्यांचं कर्तृत्व सांगताना कधी थकत नाहीत. केवळ ते त्यांच्या गुजरातचे आहेत म्हणून. मग आपणच का कर्मदरिद्रीपणा करावा? बिनधास्तपणे सांगा. मी आजवर जेव्हा जेव्हा बाहेरच्या राज्यांत गेलोय, तिथे तिथे सावरकर नावाचा ब्रॅण्ड स्थापन करुन आलोय. ही तरी नुसती अंदमानातलीच उदाहरणं झाली. भाग्यनगरात (हैदराबाद) तर ठाकूर राजासिंह सावरकरांचं कर्तृत्व समजल्यावर केवळ रडायचेच बाकी होते!! येत्या फेब्रुवारीत पुन्हा चाललोय मी अंदमानला. सावरकरांबद्दल अजाण असणाऱ्यांना सावरकर सांगायला. या माझ्यासोबत. ‘फिरस्ती टूर्स’च्या श्री. Abhijeet Kulkarni (+917843011155) यांच्याकडे नोंदणी करा, आणि गर्जा जयजयकार!! आपल्याकडे सोनं आहे रे. उधळा बेभानपणे मित्रांनो! आज-उद्या आदराच्या रुपाने महाराष्ट्राकडेच परत येणार आहे ते!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (सर्वाधिकार लेखकाधीन. लेखकाच्या नावाशिवाय कॉपी करु नये. लेखकाचे अन्य लेख वाचायचे असल्यास पाहा www.vikramedke.com)

    image