Category: Sawarkar

  • टबू – असंतांची गोष्ट

    टबू – असंतांची गोष्ट

    १८१४ साल आहे. इंग्लंडचं अमेरीकेशी तुंबळ युद्ध सुरू आहे. ईस्ट इंडिया कंपनी ही जणू प्रतिपरमेश्वरच असावी इतकी ताकदवान आहे. इंग्लंडचा राजा तिसरा जॉर्ज हा शब्दशः वेडा आहे आणि सारा कारभार हा त्याचा अहंमन्य, दारुडा पोरगा चौथा जॉर्ज (मार्क गॅटिस) सांभाळतो आहे. अशा भयाण वातावरणात एक छोटीशी घटना घडते. डेलनी शिपिंग कंपनीचा मालक होरेस डेलनीचा (एडवर्ड फॉक्स) मृत्यू होतो. आणि साऱ्या इंग्लंडचेच नव्हे तर अमेरीकेचेही राजकारण ढवळून निघते. का? अशी कोणती मालमत्ता होती होरेस डेलनीकडे की जिच्यासाठी सगळ्यांनीच झुरावं?

    त्याहून धक्कादायक गोष्ट घडते ती वेगळीच. डेलनीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्याचा आफ्रिकेत बेपत्ता झालेला मुलगा जेम्स (टॉम हार्डी) अचानक अवतरतो. होरेसच्या मालमत्तेचा तो एकमेव वारसदार आहे. त्याच्या आगमनाने त्याच्या बहिणीचा नवरा थॉर्न गियरी (जेफरसन हॉल) जो इतके दिवस मालमत्तेच्या वाटाघाटींमध्ये मध्यवर्ती होता, तो एकदमच निष्प्रभ होऊन जातो. जेम्सच्या येण्यामुळे राजकारणाची सगळीच समीकरणं बदलतात आणि तो अचानकपणे इंग्लंडचं राजघराणं, ईस्ट इंडिया कंपनी आणि निर्दय अमेरीकेसाठी पायात सलणारा काटा होऊन बसतो.

    ‘टबू’ या छोट्याशा मालिकेची ही गोष्ट. आणि विशेष म्हणजे या कथेमध्ये कुणीच, अगदी एकही व्यक्ती संत नाही. सगळेच स्वार्थी, नीच, आणि कुकर्मांनी बरबटलेले आहेत. इंग्लंडचं राजघराणं माजलेलं आहे, ईस्ट इंडिया कंपनी त्याहून दुप्पट माजलेली आहे आणि अमेरीका आत्यंतिक निर्दय आहे. असे तीन हत्ती मिळून ज्याची शिकार करायची ठरवतात तो जेम्स डेलनी सिंह आहेच, पण तोही सज्जन नाही. हे तिघं मिळून काय पापी असतील त्यांच्या दहापट तो पापी आहे. सत्य, सुंदर, पवित्र असं त्याच्याकडे काहीच नाही. आहे ते एक स्वप्न आणि मनाच्या अडगळीत कुठेतरी हरवलेली मानवता. तो या तिघांना नुसतं अंगावरच घेत नाही तर ज्या बेक्कार पद्धतीने झुंजवतो, त्याला तोड नाही. तोड नाही म्हणजे शब्दशः तोड नाही. इतकं सूक्ष्म कंगोऱ्यांचं राजकारण क्वचितच एखाद्या मालिकेत पाहायला मिळतं. सगळ्यांत कमालीची गोष्ट ही की, एक सिंह आणि तीन हत्तींच्या महासंग्रामाची ही देदिप्यमान गाथा निर्मात्यांनी मंद आच ठेवूनही केवळ आठच भागांमध्ये सुफळ, संपूर्ण सांगून दाखवलीये. ‘टबू’ कुणी निर्मिलीये माहितीये? ज्या स्टीव्हन नाईटने ‘पीकी ब्लाईंडर्स’ लिहिली व बनवलीये तो या मालिकेचा लेखक तर आहेच शिवाय निर्मिकांपैकी एक आहे! अन्य दोघे निर्मिक आहेत स्वतः टॉम हार्डी आणि त्याचे वडील चीप्स हार्डी. आणि सांगतो, रीड्ली स्कॉट हा या मालिकेच्या निर्मात्यांपैकी एक आहे. आता लावा दर्जाचा अंदाज!!

    टॉम हार्डी काय ताकदीचा कलावंत आहे, हे मी नव्याने सांगण्याची गरज नाही. ही सबंध मालिका म्हणजे त्याच्या एकट्याचा अश्वमेध, एकट्याचा दिग्विजय म्हटला तरी चालेल इतका तो जबरदस्त खेळतो. वर म्हटल्याप्रमाणे जेम्स हा खलनायकांपेक्षा दहापट जास्त पापी आहे. आपण त्याला कचकचीत शिव्या घालतो आणि तरीही तोच जिंकावा असं मनापासून वाटत राहातं आपल्याला. ही नुसती लेखकाची ताकद नाही तर टॉमच्या अद्वितीय अभिनयाचं हे यश आहे. तो जेव्हा जेव्हा I have a use for you हे वाक्य उच्चारतो, मार्लन ब्रँडोने साकारलेल्या व्हिटो कॉर्लिऑनीचे एक वेगळेच, ब्रिटीश रूप दिसते! टॉमइतका स्क्रिनटाईम नसूनही तोडीस तोड काम केलंय ते जोनाथन प्राईसने. त्याने साकारलेला सर स्टुअर्ट स्ट्रेंज हा ब्रिटीश अरीस्टोक्रसीचं मूर्तीमंत रूप भासतो. आणि त्याच्याहूनही कमी स्क्रिनटाईम असून मार्क गॅटिसने आपली भूमिका खणखणीत वाजवलीये. अक्षरशः किळस वाटायला लावतो तो प्रिन्स जॉर्जची. ऊना चॅप्लिन मुळातच भारी आहे. पण तिच्यापेक्षा जास्त लक्षात राहाते ती जेसी बक्लीने साकारलेली लोर्ना. काय सुंदर विणलीये तिची भूमिका!

    एक भारतीय म्हणून इंग्लंडने आपल्यावर पारतंत्र्याच्या काळात केलेल्या अत्याचारांबद्दल आपल्याला मनस्वी चीड असते. स्वा. सावरकर वगैरे क्रांतिवीरांनी अंदमानसारख्या नरकात काय यातना भोगल्या असतील याची आपण वर्णने वाचलेली, ऐकलेली असतात. परंतु इंग्लंडच्या अमानुषतेची या मालिकेत दृश्य झलक जेव्हा दिसते तेव्हा शरीरच नव्हे तर मनही शहारून जातं. आणि अशा चहुबाजूंनी अमानुषतेने वेढलेल्या जगात जेव्हा एक कुणीतरी त्या नीचतम इंग्लंडला, त्या क्रूरतम ईस्ट इंडिया कंपनीला आणि त्या स्वार्थपरायण अमेरीकेला त्यांच्याच खेळात बोटावर नाचवतं, तेव्हा पाहायला मजा येणं साहजिकच आहे. पण ही मालिका यातील कोणतीही गोष्ट संयततेच्या मर्यादेबाहेर जाऊ देत नाही. किंबहूना मालिकेतील भडकपणात संयतता आहे, बटबटीत गोष्टींमध्ये तरलता आहे, म्हणूनच त्या कित्येक पट अधिक अंगावर येतात. मालिकेचं छायाचित्रण तर अप्रतिम आहेच, परंतु संपादनाने मालिकेचा वेग असा काही मस्त राखलाय की ज्याचं नाव ते!

    पटकथालेखनात म्हणतात की, तुमच्या नायकाला सहजासहजी लक्ष्यापर्यंत पोहोचू देऊ नका, त्याच्यासमोर अडचणींचे डोंगर उभे करा, तरच तुमची कथा मनोरंजक होऊ शकेल. ‘टबू’ हा नियम पाळता-पाळता कित्येकदा तोडून, मोडून, फेकून देते आणि तरीही मालिकेची रंजकता कणभरानेही कमी होत नाही. मी सहज म्हणून एखादाच भाग पाहावा असा विचार करून बसलो होतो, तो कधी या खोल डोहात आकंठ बुडालो माझं मलाच समजलं नाही. ‘टबू’ची तुलनाच करायची झाली तर ती नैसर्गिकपणे केवळ ‘पीकी ब्लाईंडर्स’शीच होऊ शकते. मात्र ‘टबू’चा आवाका आणि विस्तार कमी असल्यामुळे असेल कदाचित, पण मला व्यक्तिश: ही मालिका ‘पीकी ब्लाईंडर्स’पेक्षा अनेक पटींनी जास्त आवडलीये. तरीही मला तिची तुलना आणखी एका मालिकेशी करायचा मोह टाळता येत नाहीये, ती म्हणजे ‘बॉडीगार्ड‘! कारण दोन्हीही मालिकांची पहिली पर्वं विलक्षण उत्तुंग झाली आहेत आणि तरीही दुसरे पर्व येणार येणार म्हणूनही त्यांचा अद्याप तरी काहीच पत्ता नाहीये. अर्थात ‘बॉडीगार्ड’ ही कर्तव्यपरायण सैनिकाची गोष्ट असली तरी ‘टबू’ मात्र शब्दशः असंतांची गोष्ट आहे आणि म्हणूनच अधिक मादकदेखील आहे. नुसती मादकच नाही तर चटक लावणारी, जहरी मादक!

    *४.७५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    (अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • अंदमानातील मित्रमेळा

    स्वा. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वातील शतावधी पैलूंपैकी एकच कोणता तरी सहज, सुगम पैलू निवडायला सांगितला, तर मी क्षणभराचाही विचार न करता उत्तर देईन की, सावरकरांचे व्यक्तिमत्त्व चुंबकासारखे होते! चुंबकाकडे जसे लोहकण आपसूकच आकर्षित होतात, तसे लोक सावरकरांच्या भोवती गोळा होत. म्हणजे अगदी लहानपणीदेखील तात्यांच्या भोवती परशुराम शिंपी, राजाराम शिंपी, पुढे देशभक्त म्हणून ख्याती प्राप्त केलेले गोपाळराव देसाई, वामनराव धोपावकर, भिकू वंजारी, त्र्यंबकराव वर्तक, वामनशास्त्री दातार वगैरे मित्रपरिवाराचा गराडा असायचा (स्वा. सावरकर चरित्र, लेखक शि. ल. करंदीकर, आ. २०११, पृ. ५४). मित्रमेळा तथा अभिनव भारताचे अगदी सुरुवातीचे सदस्य असलेले त्रिंबकराव म्हसकर आणि रावजी कृष्ण पागे हे मूळचे बाबारावांचे मित्र, परंतु ते देखील तात्यारावांच्या प्रभावाखाली आल्याशिवाय राहिले नाहीत (तत्रोक्त, पृ. ७१). सावरकर लहानपणापासूनच जातिगत भेदभावाच्या विरोधात होते, त्यामुळेच पुढे नाशिकला, तिथून पुण्याला आणि त्यानंतर लंडनला गेल्यावर हा मित्रपरिवार विस्तारतच गेला.

    तीच गोष्ट अंदमानची! लक्षात घ्या, सावरकर बॅरिस्टर होते. अंदमानात येण्याआधीच ‘इंडिया हाऊस’ आणि मार्सेतील समुद्रसाहसाच्या निमित्ताने त्रिखंड गाजवलेले होते. त्यांना अंदमानातील जमादार वगैरे तर सोडाच पण बारीही वचकून असे. साहजिकच सावरकरांना अर्थात ‘बडे बाबूं’ना बंदीवानांमध्ये विशेष मान होता. या योगे आणि सावरकरांच्या मूळच्याच चुंबकीय स्वभावामुळे बंदीगृहाच्या निर्बंधातही त्यांच्याकडे राजकीय व सामान्य बंदीच नव्हे तर अगदी वॉर्डरदेखील खेचले जात. सावरकरांचा कोठडीतील पहिलाच आठवडा होता, तेव्हाची गोष्ट आहे (माझी जन्मठेप, परचुरे प्रकाशन मंदिर, आ. २००७, पृ. ७८-७९). एके दिवशी एका वॉर्डरने सावरकरांच्या कोठडीतील गजांमधून एक दगड फेकला. निरखून पाहिले तर त्यासोबत एक चिठ्ठी होती. ती फेकताना नेमके एका पठाण वॉर्डरने पाहिले. त्याने आरडाओरडा केला. झडती सुरू झाली तशी सावरकरांनी ती चिठ्ठी अंगावरच बेमालूमपणे लपवली. सारे शांत झाल्यावर सावरकरांनी ती चिठ्ठी वाचली. काय होतं त्या चिठ्ठीत? तर त्यात अंदमानची परिस्थिती कथन केली होती. कोण कसं आहे, कुणावर विश्वास टाकावा वा टाकू नये वगैरे. मला सांगा, काय गरज होती त्या वॉर्डरला स्वतःची नोकरीच नव्हे तर अक्षरशः जीव धोक्यात घालून एका पन्नास वर्षांची शिक्षा झालेल्या सत्तावीस वर्षांच्या तरुणासाठी हे करायची? इंग्रजीत एक म्हण आहे, ‘Respect is commanded, not demanded’. त्या म्हणीचं चपखल उदाहरण, म्हणजेच ही घटना!

    अंदमानात अनेक प्रकारचे बंदी होते. काही चोर होते, काही दरोडेखोर, लुटारू, खुनी, बलात्कारीदेखील होते. पण या नृशंस मंडळींपेक्षा सर्वस्वी भिन्न होते ते क्रांतिकारक! सावरकरांच्याच शब्दांत सांगायचं झालं (तत्रोक्त, पृ. ८७, ८८) तर त्यांच्यातही ‘बॉम्बगोळेवाले’ आणि ‘जीभवाले’ असे दोन प्रमुख प्रकार होते. स्वतः सावरकरांना अंदमानात ‘डी’ अर्थात ‘डेंजरस’ लिहिलेला बिल्ला दिला होता. या ‘डी’वाल्या मंडळींना बारी आणि त्याचे वॉर्डर्स विशेष जाच करत असत. त्यातही सावरकरांवर तर आणखीनच अवकृपा केली जात असे. कधी अंदमानला गेलात तर सावरकरांची कोठडी अवश्य पाहा, त्याच्या पुढे बसण्यापुरतीच एक विशेष जागा केलेली आहे. विशेष यासाठी की, तिथे थांबल्यास नजरेत एकच गोष्ट भरते ती म्हणजे अंदमानातील फाशीगृह! सावरकरांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी बारीने केलेला हा प्रकार अंगावर अक्षरशः शहारा आणतो. पण त्याही परिस्थितीत सावरकरांची अंतर्दृष्टी कशी तीक्ष्ण होती पाहा. एके दिवशी सावरकरांच्या समोरच बारी राजबंदीवानांस “इन की ×× फाड डालनी पडेगी” असे अश्लील बोलला (तत्रोक्त, पृ. १०८). तो निघून गेल्यावर सावरकरांनी त्या तरुणांना त्यांची नावे विचारली. त्यांची म्लानवदने पाहून सावरकर त्यांना म्हणाले, “एक दिवस क्वचित येईल की अंदमानच्या याच कारागारात राजबंदीवानांचे पुतळे उभारले जातील”! सावरकरांचे हे शब्द अक्षरशः सत्य ठरले. आज सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारकाच्या उद्यानात विविध क्रांतिकारकांचे पूर्णाकृती पुतळे डौलाने उभे आहेत! सावरकरांना राजकीय बंदी असूनही मुद्दामहूनच सापत्न वागणूक दिली जाई, कोलूला जुंपले जाई. कोलू म्हणजे घाण्याला जुंपून काढण्याची शिक्षा. रोजचं पौंडांचं उद्दिष्ट गाठताना मी-मी म्हणणाऱ्या धटिंगणांसही नाकीनऊ येत असत, तिथे या फॉरेन-रिटर्न्ड बॅरीस्टरला त्रास न झाल्यासच नवल. अशा वेळी याच उपरोक्त राजबंद्यांपैकी काही जण येऊन गुपचूप सावरकरांना मदत करून जात. कित्येकांनी तर सावरकरांना कधी जेवणाची थाळीच घासू दिली नाही, ते परस्परच स्वच्छ करून टाकत. काही जण तर सावरकर नको नको म्हणत असतानाही त्यांचे कपडे धुवून टाकत. परतफेड म्हणून सावरकर कधीतरी गुपचूप त्यांचे कपडे धूत, तेव्हा त्या मंडळींच्या मनाला कोण वाईट वाटत असे! कारागृहाच्या वाळवंटातील अशा माणूसकीच्या दुर्मिळ झऱ्यांनीच सावरकरांची जिजीविषा अखेरपर्यंत ठाम राखली होती.

    अंदमान आज सुद्धा दुर्गम आहे. त्या काळात तर अजूनच दुर्गम असलेल्या अंदमानातील त्या सेल्युलर जेलमध्ये बारी एखाद्या हुकूमशहासारखा अंमल चालवित असे. बारीचे हस्तक येता-जाता सहज म्हणून शिव्या देत असत. कारागृहातील त्या वेळच्या अमानुष शिक्षांचे आणि बेड्यांचे तर आज तेथील व्यवस्थापनानेच प्रदर्शन भरवले आहे, ते पाहून आजही थरकाप होतो. छिलका कुटणे, कोलू फिरवणे, जंगलकटाई वगैरे गुरांसारखी कामे करणाऱ्या बंद्यांना जेवणात काय मिळत असे? सावरकरांच्याच शब्दांत सांगायचं झालं (तत्रोक्त, १६४) तर, ‘दुर्लक्षितपणे, घामटपणे, निष्काळजीपणे शिजवलेले आणि आरोग्यास हानिकारक’ असे हे अन्न असे. उदाहरणच द्यायचं झालं तर, बंद्यांना जी कांजी मिळे, त्यात अनेकदा घासलेट पडलेले असे. भाजीत गोम, साप तर प्रत्यही निघत. आपल्या तुलनेत अंदमान विषुववृत्ताच्या जवळ आहे. त्यामुळे तिथे पावसाळाही तसाच. बरेचदा त्याच पावसात उभे राहून भिजलेल्या पोळ्या, ओला भात खावा लागे. बरेचदा या जेवणातूनही गुलाम रसूल, मिर्ज़ाखान वगैरे पठाण जमादारांना वाटा द्यावा लागे, असे बारींद्रकुमार घोष यांनी लिहून ठेवले आहे (राजनैतिक कारस्थान, खंड २, पृ. १६०). शौचास अथवा मूत्रविसर्जनासाठी जाण्यापासूनही कैद्यांना रोखण्याचा पशूहूनही नीचतम प्रकार बारीच्या आशीर्वादाने जमादार करत असत. एकदा तत्कालीन गृहमंत्र्यांचा दौरा सुरू असताना नंदगोपाल नावाच्या एका पंजाबी राजबंद्यांनी हे गाऱ्हाणे मांडले. बारीने अर्थातच सारे काही मुळापासून नाकारले. त्यावर नंदगोपाल उसळून म्हणाले, “या बंदीगृहातील खोल्यांत तुम्ही एकदा प्रत्यक्ष हिंडा आणि तेथील भिंतींच्या कोपऱ्यांचा वास घ्या. तुमचे नाकच आमचे साक्षीदार” (माझी जन्मठेप, पृ. ९९).

    हे सारे बाहेर कुणाला कळवायची सोय होती का? तर ते ही नाही. अंदमानातून बंद पाकिट पाठवताच येत नसे. जे काही टपाल जाई ते उघडेच, अर्थात अधिकाऱ्यांनी व्यवस्थित वाचल्यावरच. असेच एक गृहस्थ होते, होतीलाल. संयुक्त प्रांतातून राजद्रोहाच्या आरोपाखाली दहा वर्षांसाठी आलेले. शुद्ध हिंदी बोलणारे व ऊर्दू आणि इंग्रजीतही प्रवीण. बारा गावचेच नव्हे तर रशिया, चीन, जपान इ. बारा देशांचे पाणी प्यायलेले. हे होतीलाल म्हणजेच श्री. होतीलाल वर्मा असल्याचे काही ऑनलाईन ब्लॉग्सवर (zillion2dinnings इ.) दिसते तर अंदमान आणि निकोबार पर्यटनाच्या अधिकृत संकेतस्थळावरही तसा उल्लेख आढळतो. त्यांनी हिकमत केली. पहारेकऱ्यांची नजर चुकवत चुकवत त्यांनी कसेबसे एक पत्र लिहून काढले. बाहेरकामास बंदीवान जात असत त्या धांदलीत त्यांनी ते एकाच्या हाती बाहेर धाडले. त्याने ते झडतीपासून मुक्त अशा एका सरकारी विश्वासास पात्र प्रवाशाकडे सोपवले. त्या पत्राचे पुढे काय झाले, ते भारतात पोहोचले की तत्पूर्वीच त्या प्रवाशाने समुद्रात फेकून दिले वगैरे बंद्यांना समजावयास काहीच मार्ग नाही. आणि एके दिवशी बारीचा भडका उडाला! त्यावरून समजले की, ते पत्र भारतात सुरेंद्रनाथ बॅनर्जींपर्यंत पोहोचले होते. त्यांनीही मोठेच धैर्य दाखवत ते आपल्या ‘द बंगाली’मध्ये (२७ एप्रिल १९१२) छापले होते. एवढेच नव्हे तर त्यावर एक स्फुटदेखील लिहिले होते. त्यावरून मोठ्ठा गदारोळ झाला होता. एकदा तर पंजाबमधील कुणा थोर पुरुषाच्या क्रांतिकारक पुत्राने (सावरकरांनी गोपनीयतेच्या कारणास्तव नावे दिलेली नाहीत) पंजाबमधील तुरुंगातून एक बंदी अंदमानात पाठवला जात असताना त्याच्या बिल्ल्यावर सावरकरांसाठी पत्र लिहून पाठवले (माझी जन्मठेप, पृ. १४४). त्या बंद्याची सर्वत्र कपडे काढून झडती झाली, पण गळ्यातला बिल्ला पाहावयाचे कुणासही सुचले नाही!

    पण अशा कुरघोड्या विरळ आणि कारागृहातील जाच मात्र शाश्वत होता. इंदुभूषण रॉय नावाचे एक तरुण क्रांतिकारक होते. त्यांना माणिकतोळा खटल्यात दहा वर्षांसाठी काळे पाण्याची शिक्षा झाली होती. सामान्यतः बंद्यांना जेव्हा तुरुंगाबाहेरची कामे देत, तेव्हा ती तुलनेने आरामदायक असत. त्यातही कुणी बंदी आजारी पडलाच तर त्याला बाहेरच्या, तुलनेने चांगल्या इस्पितळात धाडले जाई. पण राजबंद्यांना ही सुविधा उपलब्ध होती का? सावरकर लिहितात, ‘राजबंदीवान आजारी पडला तर त्यास त्या आजारी होण्याचाही एखाद्या अपराधासारखा दंड द्यावा लागे. कारण त्यास लगेच तापात वा रेच होत असता आपले अंथरुण डोक्यावर घेऊन, आपली थाळी हातात घेऊन दोन-चार-पाच मैल चालत परत त्या सेल्युलर तुरुंगाचे भीषण दार पाहावे लागे आणि आत येताच कोठडीबंद होऊन पडावे लागे’ (तत्रोक्त, पृ. १७६). या छळाला इंदुभूषण कंटाळले. त्यांनी काम नाकारले. दंडाबेडी पत्करली, पण हे काम नको असा पवित्रा घेतला. ‘नॉस्टॅल्जिया कोलकाता’ (https://nostalgiakolkata.blogspot.com/2016/07/indu-bhusan-roy.html?m=1) ब्लॉगचे लेखक लिहितात, ‘He had been suffering from blisters caused by the juice of the rambash so much that it was even difficult for him to move his fingers freely. It became so painful that he could not get a wink of sleep during the whole night. The pain and the raw sores in his hands prevented him from eating with his hand. The touch of ‘dal’ caused him so much pain that tears would roll down from his cheeks and the food could not be touched at all. He pleaded that if the same state of affairs were allowed to continue, he would die of starvation’. त्यांनी बारीला सोपे काम मागितल्यावर बारीने काय केले? बारीने इंदुभूषण यांना कोलू फिरवायला सांगितला! केवढं हे क्रौर्य.

    सावरकरांनी इंदुभूषणना धीर दिला की, ‘तुला तर दहाच वर्षे शिक्षा आहे. मला तर जन्मठेप! तेव्हा माझ्याकडे पाहून स्वतःला धीर दे. स्वदेशासाठी स्वार्थ, प्राण यांचा त्याग करणे हे जसे कर्तव्य तसेच बंधो, मनाचाही त्याग करणे कर्तव्यच आहे. तू अजून पंचविशीचे आतबाहेर माझ्यासारखाच आहेस. आणि माझ्याहून तुला सुटण्याची आशा पुष्कळ आहे. तर धीर धर. सध्या कष्ट सोसून जग की पुढे सुटताच पुन: देशमातेची सेवा करता यावी’ (माझी जन्मठेप, पृ. १७७). त्यानंतर दोन-चारच दिवस उलटले असतील. एके दिवशी सकाळी कोठड्या उघडण्याच्या वेळी एक वॉर्डर गुपचूपपणे सावरकरांपाशी आल व म्हणाला, ‘मी सांगितले म्हणून कुणास सांगू नका, पण इंदुभूषण काल फाशी खाऊन मेला’! दिनांक होता २९ एप्रिल १९१२ आणि इंदुभूषण यांचे वय होते अवघे बावीस वर्षांचे. बारीने सारे प्रकरण ‘इंदू वेड लागून मेला’ म्हणून दाबून टाकले. सावरकरांनी स्वतः व इतरांकरवी इंदुभूषणवरील अत्याचार सर्वांसमोर आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण व्यर्थ!

    असेच दुसरे क्रांतिकारक होते उल्लासकर दत्त (माझी जन्मठेप, पृ. १८०-१८७). त्यांनी लिहिलेली ‘द्वीपांतरेर कथा’ आणि ‘आमार काराजीबन’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचाही अंदमानात अतोनात छळ करण्यात आला. घाण्याला जुंपलेले बैल जिथे दिवसभरात १६ पौंड तेल काढतात, तिथे अंदमानात तीन माणसांना घाण्याला जुंपून ८० पौंड तेल काढावे लागत असे. तेही रेंगाळत नाही, तर दिवसभर पळत. एखादा जरासा रेंगाळला, तर दांडक्याने मारहाण होत असे. तरीही काम केले नाहीच तर त्याला घाण्याला बांधून इतरांना पळायला सांगत, म्हणजे हा फरपटत जाई, त्याचे डोके, तोंड आपटून फुटे. इतरांना सहा महिन्यांनंतर बाहेरचे काम देण्यात येई. पण इंग्रजांच्या दृष्टीने जहाल असलेल्यांना मात्र वर्षानुवर्षे आतच ठेवत. अखेर खूप वाट पाहिल्यानंतर उल्लासकरांना बाहेरचे काम देण्यात आले ते वीटांचे. ओल्या वीटा ने-आण करण्याचे काम बंद्यांनी करावे यासाठी त्यांना दुधाची लालूच देण्यात येई. पण त्या दुधावरही पेटी ऑफिसरचा डोळा असे. उल्लासकर आपले दूध त्याला देत नसत म्हणून रागाने त्यांची बदली बिनदुधाच्या कामावर केली गेली, ते काम म्हणजे उंच टेकडीवर असलेल्या साहेबाच्या बंगल्यावर कावडीने पाणी पोहोचवणे. जीव कासावीस व्हायचा. प्राण कंठाशी यायचे. शेवटी थकून जाऊन त्यांनी ते काम नाकारले. पण इंग्रजांना त्याचे ना सोयर ना सुतक. त्यांनी उल्लासकर दत्तांवर खटला भरला व त्यांना तुरुंगात नेऊन टाकले. तशा त्या मरणासन्न अवस्थेत उल्लासकर दत्तांना भास होऊ लागले की, बारी आपल्याला द्वंद्वयुद्ध खेळायला बोलावतो आहे व आपल्या बाजूने सावरकर लढताहेत. अखेरीस सावरकरांचा विजय होतो. उल्लासकर दत्तांना विलक्षण आनंद होतो, पण तेवढ्यात तो सारा देखावाच वितळून गेला. टळटळीत दुपारचे ऊन होते आणि उल्लासकर दत्तांच्या अंगात १०७ ताप होता! या मरणप्राय यातनांनी अखेर त्यांना उन्माद आला. तर उपचार म्हणून त्यांना वीजेचे झटके दिले गेले. तीन दिवस आणि तीन रात्र बेशुद्ध होते ते! काय अवस्था झाली असेल, फक्त एकदा विचार करून पाहा. त्यांनी फाशी घ्यायचाही प्रयत्न केला, पण नियतीला त्या क्षणी ते देखील सुख मिळू द्यायचे नव्हते त्यांना. अखेर एका पर्यवेक्षकाला त्यांची दया आली व त्याने त्यांना वेड्यांच्या इस्पितळात धाडले. दुष्ट बारी मात्र अखेरपर्यंत हेच म्हणत राहिला की, उल्लासकर ढोंग करतोय.

    नानी गोपाळांना तर त्यांच्या असहकाराची शिक्षा म्हणून वेत मारण्याची शिक्षा दिली गेली. अशा निर्घृण शिक्षेची जबाबदारी तर अधिकाऱ्यांसही घेववेना. नानी गोपाळांनी अन्नत्याग केला, कुणाचेच ऐकेनात. हद्द पाहा, त्यांना नाकातून नळी टाकून दूध पाजण्यात आले. नाकातून! अखेरीस जेव्हा सावरकर त्यांना म्हणाले की, मी देखील अन्नत्याग करेन, तेव्हा त्या धाकाने त्यांनी अन्न ग्रहण केले. स्वतः सावरकरांचे मोठे बंधू बाबारावदेखील अंदमानातच होते. तरी जवळजवळ वर्षभर दोन सख्ख्या भावांना एकमेकांचे तोंडदेखील बघू दिले नव्हते इंग्रज सरकारने! अखेर या पाशवी अत्याचारांची परिणति कारागृहात संप होण्यामध्ये झाली. त्यातही पर्यवेक्षकांचे म्हणणे असे की, सावरकर संपाला उत्तेजन देतात. सावरकर ताडकन म्हणाले की, ‘इंदूस फाशी खाण्यास मी उत्तेजन दिले का? उल्लासकरास वेडे होण्यासही मीच शिकवले का? यातनाच संपास उत्तेजन देतात, मी नव्हे’. स्वतः सावरकरांनाही आत्महत्येचे विचार येऊन गेल्याचे त्यांनीच प्रांजळपणे लिहून ठेवलेय, पण प्रत्येक वेळी अतुल्य मनोबलाने त्यांनी त्या विचारांवर मात केली. १९१८ च्या सुमारास अखेर सावरकरांना अंदमानातील कष्ट व परिस्थिती सरकारी संमतीनेच कळवता आली. त्या पत्राच्या शेकडो प्रती करून नारायणराव सावरकरांनी त्या वर्षीच्या राष्ट्रीय सभेच्या सर्व प्रतिनिधींना वाटल्या. त्यातील उतारे इंग्रजी तसेच प्रादेशिक वृत्तपत्रांनीदेखील छापले. अमृतबझार पत्रिकेने तर आपल्या लेखाचा मथळाच ‘Outrageous treatment of a political prisoner’ (माझी जन्मठेप, पृ. ३४६) असा छापला होता.

    या ही परिस्थितीत सावरकरांनी अंदमानात प्रचार आणि प्रसार केलाय. सोशल नेटवर्किंग नावाचा प्रकार उदित व्हायच्या किमान शंभर वर्षे आधी त्यांनी संघटनेचं घट्ट जाळं अंदमानात बारीच्या नाकावर टिच्चून विणून दाखवलंय. त्यांनी कैद्यांना लिहा-वाचायला शिकवलं. कित्येकांना वरच्या नोकऱ्या मिळवून दिल्या. कित्येकांची शुद्धिकरणे केली. जातीभेद मोडला. काव्ये-महाकाव्ये प्रसवली. हे संघटनेचे जाळे केवढे घट्ट विणले होते? ऑगस्ट १९२० ला लोकमान्य गेले. ही बातमी समजताच (माझी जन्मठेप, पृ. ४२२-४२३) सावरकरांनी ठरवले की, श्रद्धांजली म्हणून सर्व अंदमानात त्या दिवशी उपवास पाळला जावा. तत्काळ त्यांनी कारागृहातील जवळच्या मंडळींना हे कळवले. त्यांनी पुढच्यांस, त्यांनी पुढच्यांस करता करता बातमी गावोगाव पसरली. आणि एकाच वेळी सबंध अंदमानातील बंद्यांनी जेवण नाकारले! लक्षात घ्या, सेल्युलर जेलची रचनाच अशी आहे की, जेलच्या एका बाहूला दुसऱ्या बाहूची फक्त पाठ दिसते. शेजार-शेजारच्या खोल्याही एकमेकींपासून लांब आहेत, त्यामुळे बोलण्याची सोयच नाही. त्यातही कुणी बोलताना आढळला तर शिक्षा ठरलेलीच. त्या पार्श्वभूमीवर हा केवढा मोठा चमत्कार आहे, विचार करा.

    सामान्य बंदीच नव्हे तर क्रांतिकारकदेखील सावरकरांकडे मार्गदर्शक म्हणून पाहात. इतकेच कशाला, महायुद्धाच्या काळात रशियन रणनौका त्या परिसरात आल्या असता त्यांचे कॅप्टनही सावरकरांना भेटून जात. एम्डेन या जर्मन युद्धनौकेची कथा तर प्रसिद्धच आहे. अखेर इंग्रजांनी सावरकर बंधूंना भारतात हलविण्याचे ठरवले. सावरकरांना पाहाण्यासाठी कारागृहाबाहेर लोकांची एकच गर्दी उसळली होती. कडेकोट बंदोबस्त होता. तो मोडून, शिक्षेची पर्वा न करता एक बंदीवान अचानक सावरकरांपाशी आला व त्याने एक साधीशीच परंतु भावनांनी ओथंबलेली चाफ्यांच्या फुलांची माळ सावरकरांच्या गळ्यात घातली. का केले असेल त्याने असे? किंबहूना का एवढा जीव लावला असेल सगळ्या बंद्यांनी सावरकरांना? अंदमान आजदेखील आपल्या मुख्यभूमीपासून सुमारे दिड हजार किलोमीटर लांब आहे. तेथे भलत्यांचीच संख्या वाढावी, त्यांचा वरचष्मा राहावा, यासाठी बारीच्या जमादारांनी काही एक कसर सोडली नव्हती. अंदमानचा पाकिस्तान झाला नाही, याचे श्रेय ज्या काही संघटनावादी मंडळींना जाते, त्यात सावरकरांचा वाटा सिंहाचा आहे! सावरकरांना भारतात जाऊन शिक्षाच भोगायची होती, मुक्तता होणार नव्हतीच त्यांची इतक्यात. पण सावरकर अंदमानातून परतले ते तेथेदेखील कर्तव्यपूर्ती केल्याच्या कृतार्थ भावनेने. यात अनेकानेक ज्ञात अज्ञात राजबंद्यांनी व सामान्य बंद्यांनीही त्यांची मदत केली. सावरकरांनी काहींची नावे दिली, काहींची नावे तत्कालीन परिस्थितीमुळे ‘माझी जन्मठेप’ छापून होईपर्यंतही नाही देऊ शकले. पण जरी इतिहासाच्या पानांवर काहीसा धूसर झालेला असला, तरीदेखील हा अंदमानातील मित्रमेळाच होता!

    — © विक्रम श्रीराम एडके

    (पूर्वप्रसिद्धी – ‘चैत्रपालवी सावरकर परिवार विशेषांक’ आणि ‘ग्राहकहित दिवाळी विशेषांक’)

    * लेखक स्वा. सावरकरांच्या जीवनकार्याचे अभ्यासक व आमंत्रणानुसार सर्वत्र फिरून व्याख्याने देणारे सुप्रसिद्ध वक्ते आहेत.

  • होळी – विदेशी कापडांची आणि विदेशी अहंकाराचीही!

    वंगभंगाच्या चळवळीने देश ढवळून निघाला होता. स्वदेशीची चळवळही फोफावू लागली होती. लो. टिळक आणि त्यांचे सहकारी सर्वत्र फिरून या विषयावर जागृती करत होते. दि. १ ऑक्टोबर १९०५ या दिवशी पुण्यातील सार्वजनिक सभेच्या दिवाणखान्यात साहित्यसम्राट न. चिं. केळकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. त्यात एका तरुण विद्यार्थ्याने विदेशी मालावरील बहिष्काराला ठसठशीत स्वरूप यावे म्हणून विदेशी कापडांची होळी करण्यात यावी (स्वा. सावरकर चरित्र, शि. ल. करंदीकर, आ. २०११, पृ. १०६) अशी कल्पना मांडली. तो तरुण म्हणजेच स्वा. विनायक दामोदर सावरकर!

    केळकरांना काही ही कल्पना पसंत पडली नाही. ते विदेशी कपडे जाळून फुकट घालवण्यापेक्षा अंध, पंग, रोगग्रस्त अशा बांधवांना वाटून टाकणे योग्य, असे त्यांचे मत होते. धनंजय कीरांच्या शब्दांत सांगायचे तर, “यावर सावरकरांनी हळूच टोला दिला की, या होळीने जी ज्वाळा पेटेल ती नैतिक नि भौतिक दृष्टीनेही अधिक मोलाची नि चिरस्थायी ठरेल”. (स्वा. सावरकर चरित्र, धनंजय कीर, अनु. द. पां. खांबेटे, आ. २००८, पृ. २२-२३)

    हा प्रकार झाला त्या दिवशी टिळक पुण्यात नव्हते. ते परतल्यावर सावरकरादी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कानावर आपली कल्पना घातली. टिळकांना ती पसंत पडली, पण याचे काय परिणाम होतील हा ही विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी सावरकरप्रभृती विद्यार्थ्यांना नकार दिला नाही, पण त्यांचे कर्तृत्व व तळमळ यांची पारख करण्यासाठी ते म्हणाले (करंदीकर, पृ. १०६), “होळीच करावयाची तर ती पोरकट दिसता कामा नये, किमान अर्धी गाडीभर तरी कपडे गोळा कराल तर होळी करण्याला काही अर्थ आहे”.

    सावरकरांनी हे आह्वान स्वीकारले व ते ताबडतोब विदेशी कापडे गोळा करण्याच्या उद्योगाला लागले (कीर, पृ. २३). या मोहिमेचा एक भाग म्हणून त्यांनी एक व्याख्यानही दिले (करंदीकर, पृ. १०६). त्याकाळी पुण्यात ‘महाराष्ट्र विद्यालय’ नावाची भोपटकर बंधूंनी चालवलेली एक राष्ट्रीय बाण्याची शिक्षणसंस्था होती. त्या संस्थेतील विद्यार्थ्यांचीही सावरकरांना मदत (तत्रोक्त) झाली. करंदीकर लिहितात की, टिळकांच्या मागणीप्रमाणे भरपूर कपडे उपलब्ध झाले होते (तत्रोक्त). कीर मात्र ‘कपड्यांनी भरलेली गाडी’ असा शब्द वापरतात. तेव्हा टिळकांची अपेक्षा अर्धी गाडीभरच असताना सावरकरांनी मात्र गाडीभर कपडे गोळा केले होते की काय, असा निष्कर्ष काढायला वाव आहे. कपडे किती का असेनात, ते एका महाविद्यालयीन युवकाने, फक्त ५-६ दिवसांत, कोणतीही आधुनिक माध्यमे पाठीशी नसताना केवळ तरुणांचे संघटन करून गोळा केले होते हे महत्त्वाचे!

    आणि ७ ऑक्टोबर १९०५ या दिवशी सायंकाळी ते सगळे कपडे एका गाड्यावर भरले गेले. त्यांचे बलिदान व्हावयाचे असल्यामुळे त्यांच्यावर खूप सारा गुलाल टाकण्यात आला. गाडीच्या आगेमागे नागरिकांचा प्रचंड घोळका (करंदीकर, पृ. १०६) अशा थाटात ही कपड्यांची मिरवणूक मंडईपासून निघाली! प्रा. शि. म. परांजपे, ‘भाला’कार भोपटकर वगैरे मंडळी त्यात सुरुवातीपासूनच सहभागी होती. मिरवणूक जसजशी लकडी पुलाच्या दिशेने निघाली तसतसे अजूनच लोक त्यात सहभागी होऊ लागले. ‘चित्रशाळे’च्या आसपास टिळकही त्यात सहभागी झाले. मिरवणूक लकडीपुलाच्या पलिकडे एका मैदानात थांबली. गाडीवरील कपडे एका शेतात रचण्यात आले. त्यावेळी टिळकांनी मुद्दा मांडला की (कीर, पृ. २३. करंदीकर, पृ. १०६), होळी एका जागी करावी आणि व्याख्याने दुसरीकडे द्यावीत. त्यावर सावरकरांनी कोटीक्रम मांडला की (कीर, पृ. २३), “मग ही मिरवणूक तरी कशाला हवी होती? आम्हाला कपडे इकडे पाठवून देता आले असते नि व्याख्याने रे मार्केटातच देता आली असती. वस्तुतः विलायती कपड्यांच्या जळत्या ढिगासमोर जळजळीत भाषणे करणे हेच युक्त! कारण, असे केले तरच लोकांच्या मनावर उमटणारा ठसा खोलवर जाईल नि कायम राहील”. लक्षात घ्या, सावरकर टिळकांना केवढे प्रचंड मानायचे याचे दाखले सावरकरांच्या चरित्रात अनेक सापडतात. सावरकरांनी टिळकांवर अनेक काव्ये लिहिली आहेत. टिळक गेले तेव्हा अंदमानात बंदी असलेल्या सावरकरांनी संपर्काची अभिनव साधने वापरून सेल्युलर जेलमध्येच नव्हे तर सबंध अंदमानात उपवास घडवून आणला होता (समग्र सावरकर, खंड २, आ. १९९३, माझी जन्मठेप, पृ. ४७४). परंतु तेच सावरकर, वय लहान असतानाही टिळकांच्या न पटलेल्या मुद्याला विरोध करताना डगमगले नाहीयेत. डोळस भक्ती या हल्ली दुर्मिळ होत चाललेल्या तारतम्यभावाचे केवढे उत्कृष्ट उदाहरण आहे हे! सभा होळीच्याच ठिकाणी झाली.

    टिळकांचे या प्रसंगीचे भाषण अत्यंत तेजस्वी झाले. आपल्या भाषणाच्या ओघात ‘काळ’कर्ते परांजपेंनी जळत्या ढिगातला एक कोट काढून लोकांपुढे धरला. आणि त्या खिशाची झडती घेता घेता त्यांनी व्यापाराच्या मिषाने खिसे भरभरून हिंदुस्थानची संपत्ती लुटून नेणाऱ्या इंग्रजांची हजेरी घेतली आणि ‘असा हा पातकी कोट मी अग्निसमर्पण करतो’ असे म्हणून त्यांनी तो कोट धगधगलेल्या होळीत फेकला (करंदीकर, पृ. १०६-१०७). होळीच्या ज्वाळा गगनाला जाऊन भिडल्या तशाच त्या ब्रिटिश सिंहासनालाही झळ बसवून गेल्या! या होळीनेच देशभर ठसठसत असलेल्या ब्रिटीशविरोधी द्वेषाग्नीत तेल ओतले. ७ ऑक्टोबर १९०५ हा दिवस होता दसऱ्याचा! दसऱ्याच्या दिवशी होळी पेटविणारे आणि त्यातून इंग्रजी सत्तेचा अहंकार जाळून टाकणारे, सावरकरच!

    कीर लिहितात (पृ. २३) की, त्या काळात सावरकरांनी केलेल्या भाषणांचा आपल्या स्मृतिपटलावर अनेक वर्षेपर्यंत खोल ठसा उमटून राहिला होता, असे आपल्या उत्तरायुष्यात केळकरांनी पुष्कळदा बोलून दाखवले होते. पुण्यातील सार्वजनिक सभेमध्ये सावरकरांनी केलेल्या भाषणाचे वर्णन करताना एक वार्ताहर म्हणाला होता (कीर, पृ. २४), ‘त्यांचे भाषण मनस्वी वक्तृत्वकुशल होते आणि कमालीचे ओजस्वी होते! त्यांचे वय जेमतेम बावीस वर्षांचे आहे, पण आताच त्यांनी एखाद्या कसलेल्या वक्त्याचे स्पृहणीय स्थान पटकावले आहे”.

    अर्थात, सगळ्याच प्रतिक्रिया काही उत्साहवर्धक नव्हत्या. या होळीसाठी शिक्षा म्हणून (करंदीकर, पृ. १०७) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी सावरकरांना दहा रुपये दंड ठोठावला व वसतिगृह सोडण्यास फर्मावले. सबंध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आणि सावरकरांकडे सहानुभूतीचा व द्रव्याचा ओघच वाहू लागला (कीर, पृ. २४)! गंमत म्हणजे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच सावरकरांच्या दंडासाठी स्वयंस्फूर्तीने निधी गोळा केला. एका विद्यार्थ्याने तर त्याला घरून आलेल्या मनिऑर्डरचे पैसे त्यासाठी देऊ केले. निधी दंडाच्या रकमेपेक्षाही अधिक गोळा झाला. सावरकरांनी लोकांच्या, मित्रांच्या भावनांचा मान म्हणून दंडापुरती रक्कम घेतली व उरलेले पैसे पैसाफंड व इतर काही संस्थांना देऊन टाकले. कीरांच्या मते मात्र (पृ. २४) सावरकरांनी दंड स्वतःच्या खिशातून भरला व लोकांनी आणि मित्रांनी गोळा केलेले पैसे पैसाफंड वगैरे संस्थांना देऊन टाकले. नेमके काहीही घडलेले असो, परंतु सावरकर जरी राजकारणात असले, तरीही त्यांनी हल्लीच्या काही राजकीय नेत्यांप्रमाणे तो पैसा हडप केला नाही, हे निश्चित!

    या दंडाच्या घटनेमुळे साक्षात टिळकांनी ‘केसरी’त १७ ऑक्टोबर व २४ ऑक्टोबर अशा दोन भागांत महाविद्यालयाच्या वागणुकीचा समाचार घेणारा अग्रलेख लिहिला (करंदीकर, पृ. १०७). त्याचे शीर्षक होते, ‘हे आमचे गुरूच नव्हेत’!

    — © विक्रम श्रीराम एडके

    (सावरकर चरित्राचे अभ्यासक आणि व्याख्याते. अन्य लेखांसाठी पाहा www.vikramedke.com)

  • सावरकरकृत अस्पृश्यता निवारण और सामाजिक एकता

    वीर सावरकर जी की जीवनी अद्भुत, अदम्य साहसों से लबालब भरी हुई है । नेता, संगठक, क्रांतिकारी, इतिहासकार, राजनीतीज्ञ, युद्धनीतीज्ञ, वक्ता, समाज सुधारक, लेखक, लेखक के रूप में भी नाटककार, उपन्यासकार, कथाकार, कवि, कवि के रूप में भी खंडकाव्यकार, दीर्घकाव्यकार, महाकवि, शाहीर; और न जाने कितने ही पहलू मात्र एक ही व्यक्ति के है, इस पर कदाचित आने वाली पीढियाँ विश्वास भी न करें । सरल तरह से देखें तो उन के जीवन के जन्म से ले कर लंडन जाने तक का काल विद्यार्थिदशा, लंडन में क्रांतिकारी, अंदमान से ले कर रत्नागिरी तक बंदी, रत्नागिरी से ले कर बिनाशर्त मुक्तता तक समाज सुधारक, मुक्तता से ले तर स्वातंत्र्यप्राप्ती तक राजनीतीज्ञ और फिर स्वातंत्र्यप्राप्ती से ले कर आत्मार्पण तक वार्धक्य ऐसे विभाग पडते है । किंतु कोई भी व्यक्ति ऐसे विभागश: जीता है क्या? उदाहरण के तौर पर देखे, तो सावरकर जी ने १९३७ के पश्चात राजनीती में खुल कर भाग लिया । किंतु क्या उन के क्रांतिकार्य में अंग्रेजों को हराने की राजनीती नहीं थी? यहीं नियम लागू होता है इस लेख के विषय यानी ‘अस्पृश्यता निवारण और सामाजिक एकता’ को । आम तौर पे तो यह विषय केवल सावरकर जी के रत्नागिरी में किए गए कार्य से ही संबद्ध लगता है । और यह सत्य भी है कि, रत्नागिरी में स्थलबद्धता की अवस्था में वे इस कार्य में सर्वाधिक निमग्न रहे । किंतु अगर आप सावरकर जी के चरित्र का बारीकी से अवलोकन करे, तो पाएंगे कि, यह दोनों विषय उन के समूचे जीवन की ही कथा है ।

    मराठी भाषा में एक मुहावरा है, ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ । इस का शब्दार्थ होता है, बच्चे के पाँव पालने में दिखते है । किंतु इस का भावार्थ यह है कि, मनुष्य जीवन में आगे चल कर क्या करने वाला है इस की झलक बचपन से ही दिखने लगती है । बात सन १९०२ की है । उन दिनों मुंबई के ‘हिंदु युनियन क्लब’ की ‘हेमंत व्याख्यानमाला समिती’ हुआ करती थी । उन्हें ने एक काव्य स्पर्धा का आयोजन किया था । विषय था ‘बालविधवा दु:स्थितीकथन’ । सावरकर जी की आयु मात्र १९ वर्ष की थी । आज की भाषा में कहा जाए तो टीनेज । किंतु इस छोटी सी आयु में भी उन्होंने इस विषय पर जो कविता लिखी, वह थी १०२ पंक्तियों की कविता (समग्र सावरकर वाङ्मय, खंड ७, आवृत्ति वर्ष १९९३, पृ. २७) जिसे उस वर्ष का प्रथम पारितोषिक प्राप्त हुआ था । तात्पर्य यह कि, सावरकर बचपन से ही सामाजिक विषयों के प्रति जागृत एवं अभ्यासरत थे । उन का समाज के, तथा दीन-दुखियों के प्रति संवेदना से भरा यह दृष्टीकोन स्थलबद्धता से छूटने के बाद भी स्पष्ट रूप से दिखता है । सावरकर जी कि मुक्तता १९३७ में हुई । तत्पश्चात उन्हों ने हिंदुमहासभा पार्टी से जो राजनीती की, उस का उद्देश्य उन्हीं के रचे एक श्लोक में झलकता है । वे लिखते है,
    ‘राष्ट्रस्वतंत्रता ध्येयं यथा साध्यं च साधनम् ।
    अभ्युत्थानाय हिंदुनामयं पक्ष: प्रवर्तित: ।।’
    यानी सावरकर जी का उद्देश्य राष्ट्र की स्वतंत्रता के साथ ही साथ हिंदुओं का अभ्युत्थान भी था । इस अभ्युत्थान के मायने भी जातिपातिविरहित, सबल व सशक्त हिंदु समाज का निर्माण ही थे । सावरकर लिखते है कि, ‘जातिभेद के निवारण हेतु मैं विद्यार्थीदशा से ही प्रकट रूप से प्रयत्नरत था । महाविद्यालय में भी मेरा वर्तन उसी ओर रहा । आगे चल के अंदमान में मैंने इस विषय पर जो भी चिंतन किया, उस का व्यावहारिक आचरण कर के मैंने सैंकडों भेदमूलक दुष्ट धारणाओं का उच्चाटन किया है (स. सा. वा. खंड ३, आवृत्ति वर्ष १९६४, पृ. ६४२) ।

    जैसे कि उपर लिखा है, यह सत्य है कि सावरकरकृत अस्पृश्यता निवारण और सामाजिक एकता का कार्य सर्वाधिक रत्नागिरी से ही किया । किंतु ऐसी क्या बात हुई की उन्हें इस कार्य में स्वयं को पुरज़ोर झोंकना पडा? इस प्रश्न का उत्तर है अंदमान! प्राकृतिक सौंदर्य से सराबोर इस द्वीपकल्प पर अंग्रेज़ों ने सैल्युलर जेल नामक दैत्याकार कारागृह बनाया था । इस का एक भयकारी नाम कालापानी भी है । जब अंग्रेज़ों ने सावरकर जी को २५ अधिक २५ वर्ष यानी कुल ५० वर्षों का अमानुष आजीवन कारावास घोषित किया, तब उन की रवानगी इसी कालापानी में हुई (स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र, पृ. ३४२ , लेखक शि. ल. करंदीकर, आवृत्ति वर्ष २०११) । यद्यपि आज अंदमान, वीर सावरकर जी के अस्तित्व से पुनीत क्रांतितीर्थ कहलाता है, उन दिनों वह खौफ़ का पर्यायवाची ही कहलाता था । वहाँ सावरकर जी ने क्या देखा? उन्हों ने देखा कि, अनेकों कारणवश दंडित हिंदु बंदीयों कि संख्या यहाँ सर्वाधिक है, किंतु उन पर हुकूमत चलाने वाले वॉर्डन्स अधिकांश अहिंदु है । संख्याबल होते हुए भी ऐसा क्यूँ, इस प्रश्न का उत्तर उन्हें मिला हिंदुओं की जातिव्यवस्था में । संख्याबल होते हुए भी हिंदु आपस में ही बँटे हुए थे । इस त्रुटी का लाभ उठा कर अहिंदु न केवल उन पर हुकूमत चलाते थे, अपितु अज्ञानी बंदीयों का धर्मांतरण भी करते थे । इस शोचनीय अवस्था का एक उदाहरण वाचकों के समक्ष रखना बिलकुल भी अप्रस्तुत न होगा ।

    यह घटना स्वयं सावरकर जी ने स्वयं ही अपने बंदीवास के बारे में लिखी गयी जीवनी, ‘माझी जन्मठेप’ में लिखी है । अंदमान में कोयले से लदे हुए जहाज़ आया करते थे । बोरियाँ उतारने का काम बंदीयों को ही करना पडता था । इस काम पर लगे बंदीयों को समय बचाने के लिए खाना नहीं दिया जाता था, बल्कि दो-चार मुठ्ठी भर चने दिए जाते थे । तो हुआ यूँ कि, एक दिन जब भोजन का समय हुआ तो अहिंदु बंदी जल्दी से भाग कर अपनी चने की बोरियों की तरफ़ गए । और उन में से कुछ लोगों ने हिंदुओं के लिए सुनिश्चित बोरियों से भी चने खाने शुरू कर दिए । यह जब हिंदुओं ने देखा तो धर्म भ्रष्ट होने के डर से किसी भी हिंदु ने चनों को हाथ तक न लगाया । उस दिन उन्हें फ़ांका पडा । अहिंदु बंदीयों को रोज़ के मुक़ाबले अधिक खाना मिल गया । अब तो यह प्रतिदिन की ही बात हो गयी । रोज़ हिंदु कैदी काम कर के, थक-हार के खाने कि तरफ़ जाते और रोज़ वह दृश्य देख कर उन्हें भूखे पेट ही रहना पडता । उन्हों ने जब अधिकारीयों से शिकायत की तो वह लोग भी उन पर हँसने लगे । फिर वह अपने बडे बाबू यानी सावरकर जी के पास आए । सावरकर जी ने उन्हें एक तरकीब बताई । दूसरे दिन जब खाने का समय हुआ तो हिंदु बंदी सब से पहले भाग के बोरियों की ओर गए और अपनी तो अपनी अहिंदुओं की बोरियों से भी चने खाने लगे । जब झगडे की नौबत आयी, तो हिंदुओं ने सावरकर जी ने बताई बात उन को दो टूक सुना डाली की, यदि तुम्हारे पहले छूने से यह चने अहिंदु होते है, तो हमारे छूने से अब यह हिंदु हो गए है । बात ज़मादारों तक पहुँची तो वे हँसने लगे, ठीक वैसे ही जैसे वे हिंदुओं पर हँसे थे । तब कहीं जा कर उन्हें सावरकर जी द्वारा पढाया पाठ ठीक से समझा कि, धर्म का स्थान व्यक्ति का पेट नहीं अपितु उस का ह्रदय होता है ।

    इस प्रकार एक एक कर के हिंदुओं को जातिवाद की घिनौनी रूढी से बाहर निकालने का उपक्रम चल रहा था । वह भी अंदमान के निर्मम कारागार में जहाँ के हालातों के सामने नर्क भी स्वर्ग लगे । सावरकर दिन भर कोलू चला कर तेल निकालते, नारियल की रस्सियाँ बुनते, जरा-जरा सी बात पे एकांतवास तथा डंडाबेडी जैसे नृशंस दंड भोगते और इतना होते हुए भी वे शुद्धीयज्ञ चलाते, बंदीयों को पढाते, कविताएँ लिखते और जातिवाद की समस्या पर चिंतन करते रहते । हमारे और आप के आरामदायक जीवन से कहीं परे था यह व्रत । उसी चिंतन के फलस्वरूप सावरकर जी के समक्ष उजागर हुई एक बात । वह यह की, मुख्यभूमि हिंदुस्थान भी तो अंदमान का ही बडा स्वरूप है । वह भी तो अंग्रेजों द्वारा बनाया एक बंदीगृह ही है, वहाँ भी तो हिंदुओं कि बहुसंख्या होते हुए भी सदियों से मुठ्ठीभर अहिंदु राज करते आ रहे है और उस का भी तो कारण हिंदु समाज को लगा जातिवाद का रोग ही तो है । जिस आग्रह, तप, निश्चय एवं दृढता के साथ सावरकर जी ने अंदमान के कारागृह से जातिवाद मिटाया, वहीं काम मुख्यभूमी में करने की आवश्यकता थी । और यह अवसर उन्हें मिला रत्नागिरी की स्थलबद्धता में । मानों अंदमान जातिवाद मिटाने का पाठ्यक्रम हो और रत्नागिरी प्रयोगशाला ।

    क्षेत्र जितना बडा होता है, चुनौतियाँ भी उतनी ही बडी होती है । वैसे देखा जाए तो जातिव्यवस्था हिंदु धर्म का मूलभूत अंग नहीं है । यह मध्ययुग की देन है । हिंदु तो आरंभ से ही वर्णव्यवस्था मानते आ रहे है, जो जन्म से नहीं बल्कि व्यक्ती के गुण व कर्मों से जुडी हुई है (गीता. ४/१३) । किंतु बर्बर विदेशी आक्रमणों के बाद से वर्णव्यवस्था का भ्रष्ट होना शुरू हुआ जो अंततः जातिव्यवस्था में परिवर्तित हुआ । यह व्यवस्था सदियों से चलन में थी । क्या सवर्ण क्या विवर्ण, दोनों ही प्रकार के लोग इसे मानते थे । ऐसे में सावरकर जी का कहना कि यह व्यवस्था हानिकारक है, का परिणाम भी वैसे ही शून्य होना था जैसे अनेकों प्रामाणिक सुधारकों की बातों का न्यूनाधिक हुआ । लेकिन सावरकर अपने प्रतिपादन के बारे में न केवल आग्रही थे, अपितु अपनी बात मनवाने के लिए हर तरह के सकारात्मक हतकंडे अपनाने से भी नहीं चूकने वाले थे । उपयुक्ततावाद वीर सावरकर जी का विशेष गुण था । उन्हों ने पहले तो जातिवाद के प्रश्न के छोटे छोटे टुकडे किए की, आखिर जातिवाद किस तरह से हिंदु समाज को प्रभावित करता है । यह एक बिल्कुल ही नए तरह की पहल थी । इसे ही आधुनिक भाषा में प्रौब्लेम आईडेंटिफ़िकेशन कहते है । इस खोज में सावरकर जी ने पाया कि, जातिवाद की समस्या असल में ७ प्रकार से प्रभाव डालती है । वीर सावरकर जी ने इन्हें नाम दिया, ‘सात स्वदेशीय बेड़ीयाँ’ (स. सा. वा. खंड ९, जात्युच्छेदक निबंध, आवृत्ति वर्ष १९९३, पृ. ६४) । यह बेड़ीयाँ थी रोटीबंदी, बेटीबंदी, स्पर्शबंदी, व्यवसाय बंदी, सिंधुबंदी, वेदोक्तबंदी तथा शुद्धीबंदी । वीर सावरकर जी का मानना था कि यदि यह सात शृंखलाएँ तोड दी जाए, तो निश्चय ही जातिप्रथाविरहित सशक्त समाज निर्माण होगा ।

    रत्नागिरी आज भी एक छोटा सा शहर है । आज से करीब सौ वर्ष पहले यानी १९२४ के समय में तो वह और भी छोटा गाँव था । उन दिनों पूरा देश आवश्यक और अनावश्यक दोनों ही प्रकार के रूढीवाद के घेरे में था । कोंकण की भूमी रत्नागिरी भी रूढीप्रिय थी । वीर सावरकर ने क्या किया? उन्हों ने जातिवाद के विरुद्ध तीन तरफा मोर्चा खोला । वे बडे ही प्रसिद्ध क्रांतिकारी थे तो जगह-जगहों से लोग उन्हें भाषणों के के लिए बुलाते थे । सावरकर उन भाषणों में जातिवाद की रूढ़ी से होने वाली हानि बताते थे । वे एक सम्माननीय व्यक्तित्व होने के साथ ही अत्युच्च कोटी के वक्ता भी थे, तो नि:संशय उन की वाणी का प्रभाव पडता । यह तो हुआ एक मोर्चा । दूसरे, वे कई तरह के नियतकालिकों में जातिव्यवस्था पर हल्ला बोलने वाले लेख लिखते थे । उनके यह लेख तथा उन के भाषण आप को उन की पुस्तकें ‘विज्ञाननिष्ठ निबंध’, ‘जात्युच्छेदक निबंध’, ‘सामाजिक भाषणे’, ‘क्ष किरणे’ आदी में समूल पढने को मिलते है । वीर सावरकर जी लोकप्रिय माध्यमों कि ताकत भलीभाँति जानते थे । इसिलिए उन्होंने इस विषय पर दो उपन्यास (‘मला काय त्याचे’ तथा ‘काळे पाणी’), ‘उ:शाप’ आदी नाटक, तथा कई सारी कथाएँ व कविताएँ लिखी । एक तरह से देखा जाए तो वे अपने विचारों के प्रति समाज की मनोभूमिका तैयार कर रहे थे । क्यूँ कि तिसरा मोर्चा जो था, वह सब से कठिन था, प्रत्यक्ष कार्य ।

    प्रत्यक्ष कार्य के तीन भाग किए जा सकते है । मन:परिवर्तन, वैधानिक मार्ग और संघर्ष । सावरकर जी ने प्रसंग व परिस्थिती के अनुसार तीनों मार्गों का अवलंबन किया दिखाई पडता है (सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, लेखक शेषराव मोरे. आवृत्ति वर्ष २०१५, पृ. १०७) । जिन दिनों अस्पृश्यों की परछाई मात्र पडने से ही धर्म भ्रष्ट हुआ माना जाता था, यदि उन का स्पर्श हो भी गया तो लोग शुद्धी हेतू सचैल यानी कपडों के साथ स्नान कर लिया करते थे, इतना ही नहीं बल्कि घरों में किसी अस्पृश्य जाति का नाम लेना भी पाप समझा जाता था (तत्रोक्त, पृ १२१), उन दिनों अस्पृश्यता निवारण का कार्य सावरकर जी के लिए कितना कठिन रहा होगा, इस की मात्र कल्पना ही की जा सकती है । और देखिए, यह रवैया भी कोई एक तरफा नहीं था । सदियों से इसी सामाजिक व्यवस्था में पले-बढें, रहे अस्पृश्यों को भी यही एक मात्र जीवनमार्ग लगता था । उन्हें भी इस में कुछ गलत नहीं लगता था । जब शृंखलाओं से परे कोई विश्व कल्पना में ना हो, तब शृंखलाएँ तोडना और भी कठिन हो जाता है ।

    सावरकर जानते थे कि, स्पृश्य बस्ती में तो कोई अस्पृश्य अपने आप आने से रहा । तो वे खुद अस्पृश्यों की बस्तीयों में जाने लगे । देखिए, काम कितना मुश्किल है, जब सावरकर और उन के साथी अस्पृश्य बस्तीयों में जाते तो सारे बस्तीवाले एक एक कर के दरवाज़े बंद कर के, कुंडी-वुंडी लगा के अंदर छिप जाते थे । क्यूँ? क्यूँ कि उन्हें लगता था कि यह लोग, हमारा धर्म भ्रष्ट करने आए है । बार बार पुकारने पर भी कोई बाहर न आता । उल्टे, अंदर से ही जवाब देते कि, घर में कोई नहीं है (तत्रोक्त, पृ. १२१) । सावरकर जानते थे कि शुरुआत में ऐसा ही होगा । सामान्य हिंदु का मन आकर्षित करने वाली कोई एक चीज़ हम सोचे तो वह है, भजन-किर्तन । सावरकर और उन के साथी उस बस्ती के बीचोबीच जा कर प्रभु का भजन करने लगते । कई दिनों के अथक परिश्रम के पश्चात, किवाडों, खिडकियों से टुकूर-टुकूर देखने वाले लोग एक-एक कर के बाहर आने लगे, सावरकर और उन के साथियों से मिलने-जुलने लगे । यह तो केवल शुरुआत थी । अब अगला पडाव थी स्पृश्यों कि बस्तीयाँ । सावरकर जी के व्याख्यान तथा अन्य कार्यक्रमों में वे अस्पृश्यों को साथ ले आते, स्पृश्य एवं अस्पृश्य दोनों को ही साथ बैठने का आग्रह करते (तत्रोक्त, १२२) । यह तो और भी कठिन बात थी । स्पृश्य अस्पृश्यों को अपने साथ बिठाना नहीं चाहते थे और तो और अस्पृश्य भी स्पृश्यों के साथ बैठना नही चाहते थे । सब से विशेष बात तो यह थी की, जिन अस्पृश्यों को रूढीयाँ स्पृश्यों के साथ बैठने की अनुज्ञा न दे कर उन पर सामाजिक अन्याय करती थी, वे खुद भी अपने से तथाकथित निम्न स्तर की जातियों को अपने साथ बिठाने के लिए तैयार नहीं थे । यहीं स्थिती पाठशालाओं में भी थी । सावरकर सनातनियों से कहते थे कि, ‘हम कुत्ता या बिल्ली पालते है । उस से प्रेम भी करते है । इतना कि वह पशु हमारी रसोई में घूमता है, हमारे साथ खाना खाता है । वहीं हम लोग एक मनुष्य की परछाई मात्र से ही दूर भागते है । हमारी ही तरह, हाड-मांस का बना मनुष्य, हमारा ही धर्मबंधु, लेकिन उस के स्पर्श को पाप मानते है । और वहीं मनुष्य अगर हमारी ही भूल के कारण अगर परधर्म में चला गया, तो एक ही झटके में हम उसे ‘मेरा भाई’ बोल के गले से लगाने में भी नहीं हिचकिचाते । हमारे ही जैसे मनुष्य को पशु से भी न्यूनतर समझना और उस के धर्म परिवर्तन करते ही उसे गले लगाना, यह कहा का न्याय है’? वहीं वे अस्पृश्यों को भी ढाढस बँधा कर कहते थे कि (स्वातंत्र्यवीर सावरकर, लेखक धनंजय कीर, मराठी अनुवाद द. पां. खांबेटे, आवृत्ति वर्ष २००८, पृ. २०१), ‘इस क्षण में दिखाई दुर्बलता सवर्णों की दुष्टता से भी अधिक बुरी होगी । कल्याण का मार्ग कष्टों से ही हो कर जाता है । अधिकार माँगने की इस घडी में पीछे हटने की भूल मत करो । याद रखो कि तुम भी मनुष्य हो और मनुष्य कि तरह ही पौरुष प्रकट करो । जब कभी तुम सार्वजनिक मार्ग से गुज़रो और कोई तुम से दूर हटने को कहे, तो उस से कहो कि ‘यह रास्ता कोई तुम्हारे बापदादाओं की जागीर नहीं, जो जिसे चाहे उसे दूर हटने के लिए कहे’ । अपने व्यवसाय किसी के भी दबाव से मत छोडो । उल्टा, उन में सुधारणाएँ करो । कोई भी व्यवसाय श्रेष्ठ या कनिष्ठ नहीं होता । स्वच्छता से भरा जीवन जियो । नशे से दूर रहो । अपने मात-पिता, संत और वंश को कभी भी नीचा मत समझो । दोषों का त्याग करो, शिक्षा प्राप्त करो, संघर्ष करो और जातिवाद से उपर उठ कर अपने मानवी अधिकार प्राप्त करो । कोई व्यक्ति तथाकथित रूप से तुम से भी निचली जाति का हो, तो उस से भी दया भरा, समता भरा ही व्यवहार रखो ।’

    हिंदु धर्म के जो अनेक स्तंभ है, उन में से एक स्तंभ है मंदिर । मंदिर सालों से सार्वजनिक स्तर पर एकात्मता के केंद्र के रूप में दायित्व निभाते आ रहे है । किंतु क्या उन दिनों सभी मंदिर सभी जातियों के लिए खुले थे? उत्तर है, नहीं । सावरकर जी ने इस विषय पर काम करने की ठानी । क्यूँ कि अगर मंदिरों में सभी जातियों का स्वीकार होने लगता, तो जातिवाद का एक प्रमुख क़िला यूँ ही ढह जाता । लेकिन मंदिर जैसे सामाजिक एकता का केंद्र थे, वैसे ही विभिन्न जातियों के लिए उन की आस्था तथा अस्मिता का भी प्रतीक थे । इस लिए यह काम भी उतना सरल नहीं था । सावरकर जी ने पहले कदम के रूप में वह उत्सव चुना जो अपने आप में ही सामाजिक एकात्मता की धरोहर था, यानी सार्वजनिक गणेशोत्सव. महाराष्ट्र के घर घर में गणेश चतुर्थी से ले कर अनंत चतुर्दशी तक गणेश जी के पूजन की प्रथा है । कुछ जगहों पर यह उत्सव डेढ़ दिन चलता है, कहीं पाँच, कहीं सात, तो कहीं पूरे दस । गणेशोत्सव महाराष्ट्र में सार्वजनिक स्वरूप प्राप्त कर चुका था । गाँव, कस्बों, शहरों में लोग सार्वजनिक तौर पे गणेशजी की प्रतिष्ठापना करते, जिसे मराठी में ‘मंडल’ कहते है । लेकिन उन दिनों यह मंडल भी जातिगत थे तथा उन में भी भेदभाव हुआ करता था । सन १९२४ के गणेशोत्सव के दौरान रत्नागिरी में प्लेग के प्रादुर्भाव के कारण सावरकर कुछ दिनों के लिए नाशिक गए थे । तब वहाँ गणेश जी के विसर्जन के समय शोभायात्रा में पहला मान किस मंडल को दिया जाए यह प्रश्न उपस्थित हुआ । जब लोग सावरकर जी के पास यह समस्या ले कर आए, तो उन्हों ने अग्रभाग में रहने का मान बिना किसी हिचकिचाहट के एक अस्पृश्य मंडल को सौंपा । यह एक ऐतिहासिक, क्रांतिकारी घटना थी ऐसा वृत्तांकन नाशिक के ‘स्वातंत्र्य’ नामक पत्र ने १८/०९/१९२४ में किया (सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, पृ. १५३) । सावरकर जी के ही प्रयत्नों से उस साल कई अस्पृश्यों के मंडल गठित हुए । उन्हीं में से एक जगह भीड से खचाखच भरे कार्यक्रम में भाषण करते समय वीर सावरकर बोले, ‘मुझे विश्वास है कि आने वाले दिनों में अस्पृश्यता की रूढी का विनाश होते हुए मैं अपनी आँखों से देख सकूँगा । मैं चाहता हूँ कि मेरी मृत्यू के पश्चात मुझे काँधा देने के लिए विभिन्न जातियों के लोग एक हो कर आए और मुझे अग्नि दे, तभी मेरी आत्मा को समाधान मिलेगा ।’ यह सुनते ही श्रोताओं की आँखों से आँसूओं की धाराएँ छलक पडी (तत्रोक्त, पृ. १५३) । अगले वर्ष सावरकर जी ने यही क्रम रत्नागिरी में भी दोहराया । इतना ही नहीं, उन्हों ने एक पृर्वास्पृश्यों का वाद्यवृंद भी गठित किया (जो शीघ्र ही सभी जातियों के एकत्रित वाद्यवृंद में परिवर्तित हो गया ।) और गणेश जी के समक्ष पूर्वास्पृश्यों द्वारा बीडा-सुपारी (मराठी में पान-सुपारी । यहाँ पान का बीडा वगैरह केवल निमित्त मात्र होता है, असल उद्देश्य सामाजिक मेलजोल बढाना होता है ।) का समारंभ आयोजित करने की भी प्रथा आरंभ की । इस बारे में वर्णन तब के बलवंत, बकुल, सत्यशोधक आदी पत्रिकाओं में विस्तारपूर्वक पढने को मिलते है । धीरे धीरे इस बीडा-सुपारी के कार्यक्रम में सैंकडों स्पृश्य भी सहभागी होने लगे (तत्रोक्त, १५४) ।

    अब समय था एक कदम और बढाने का । १९२५ के अप्रैल में रत्नागिरी के समीप एक छोटे से गाँव शिरगाँव में महादेव लक्ष्मण गुरव नाम के एक सज्जन ने हनुमान जी का मंदिर बनाया । वे चाहते थे कि प्रतिष्ठापना में सावरकर जी भी उपस्थित रहे । यहाँ गौर करने योग्य बात यह है कि, सावरकर भले ही हिंदुत्ववादी थे किंतु वे किसी भी तरह के कर्मकांड के विरुद्ध भी थे । ऐसे में आज के समय का कोई तथाकथित विद्वान क्या करता? मना कर देता कि मुझे यह सब पसंद नहीं, शायद यह भी कहता कि तुम भी यह कर्मकांड मत करो । सावरकर जी ने ऐसा कुछ भी नहीं किया । बल्कि वे उस समारोह में गए । किंतु जाने से पहले उन्हों ने गुरव जी के सामने एक शर्त रखी । शर्त यह थी कि, मंदिर का जो प्रदक्षिणा मार्ग है, वह अस्पृश्यों के लिए भी खुला हो । उन्हों ने गुरव जी को अस्पृश्यता के विरुद्ध अपनी भूमिका बताई और परिणाम यह हुआ कि, गुरव जी तुरंत मान भी गए । इतना ही नहीं वे प्राणप्रतिष्ठा के समय पूर्वास्पृश्यों को भजन करने वालों के साथ संमिश्र बिठाने को भी तैयार हो गए (तत्रोक्त, पृ. १५५) । यह अंतर है सावरकर और कुछ तथाकथित सुधारकों में । जहाँ सावरकर समाज के लाभ को देखते हुए अपने व्यक्तिगत मतों को दूर रखने के लिए भी तैयार थे, वहीं आज-कल के कुछ आधुनिक सुधारणावादी अपने व्यक्तिगत मतों को समूचे समाज पर थोंपना चाहते है, और यहीं कारण है कि, उन्हें समाज में कभी स्वीकृति नहीं मिलती । सावरकर भले ही हिंदुत्ववादी थे, और थे क्या, हिंदुत्व की राजकीय मीमांसा पहली बार उन्हों ने ही तो अपने प्रबंध ‘हिंदुत्व’ (१९२३) में की है । किंतु वे हिंदुस्थान में रहने वाले, हिंदुस्थान से प्रेम करने वाले सभी पंथों का भला ही चाहते थे । उन के लेख, खास कर के ‘पोथिनिष्ठेची बाधा’ (मनोहर, जुन १९३५) इस बात के प्रत्यक्ष प्रमाण है । वहीं आज कल कुछ लोग समाजसुधारणा का अर्थ किसी एक धर्म को ही कोसना मात्र निकालते है । सावरकर जी का यही समष्टिवाद हल्दी-कुंकुम समारोह में भी दिखता है । वे स्वयं कदाचित इस समारोह को नहीं भी मानते होंगे, लेकिन उन्हें इस प्रथा में स्पृश्यास्पृश्य महिलाओं को एक करने का कारण दिखा तो उन्हों ने इन समारोहों को पूरे मन से प्रोत्साहित किया, और फलस्वरूप महिलाओं के मन से भी अस्पृश्यता की रूढी का उच्चाटन करने की ओर कदम बढाया (सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, पृ. १४२) ।

    धर्म हमेशा से ही नाज़ुक मामला रहा है । इसी लिए सावरकर भी उतना ही नाज़ुक एवं कुशल तरीके से व्यवहार कर रहे थे । धीरे धीरे कर के उन्हों ने पूर्वास्पृश्यों को पहले तो प्रदक्षिणा मार्ग तक जाने की अनुज्ञा दिलायी । फिर उस अनुज्ञा का दायरा पगडंडीयों तक बढाया । फिर सभामंडप । और अंततः गर्भगृह तक (१३/०९/१९२९) वे पूर्वास्पृश्यों को ले गए । धीरे धीरे कर के मंदिर में संमिश्र जाना आम बात हो गयी । १९३० में तो एक पूर्वास्पृश्य ने गणेश जी के समक्ष गायत्री मंत्र का जाप भी किया । इस घटना का वर्णन टाईम्स ऑफ इंडिया सहित अन्य कई वृत्तपत्रों ने किया था (रत्नागिरी हिंदुसभेचे प्रतिवृत्त, खंड २, १९३७) ।

    रत्नागिरी में एक सज्जन रहते थे, भागोजीसेठ कीर । शिवभक्त थे । किंतु जाति के कारण शिवालय नहीं जा सकते थे । धनि थे, तो खुद का ही शिवालय बनवा लिया, भागेश्वर मंदिर । सावरकर जी को मानते थे तो उन्हें यह घटना सुनाई । सावरकर जी ने पूछा कि, ‘आप धनवान है सो आपने अपने लिए मंदिर बनवा लिया । किंतु उन सहस्रावधी निष्कांचन पूर्वास्पृश्य भक्तों का क्या’? भागोजीसेठ सोच में पड गए । और तब सावरकर जी के विचारों से प्रेरित हो कर उन्हों ने बनवाया, पतित-पावन मंदिर (२२/०२/१९३१) । मंदिर के शिलान्यास समारोह में (१०/०३/१९२९) सावरकर जी ने मंदिर निर्माण की भूमिका बताई, कि इस मंदिर में कोई भी श्रद्धावान् हिंदु स्वच्छ तन, मन से बेरोकटोक आ सकेगा, पूजा कर सकेगा । इस मंदिर का पुजारी कोई भी ज्ञानी हिंदु बन सकेगा (स. सा. वा. खंड ९, आवृत्ति वर्ष १९९३, सामाजिक भाषणे, पृ. ९) । सभी हिंदुओं को पूजा, प्रार्थना का समान रूप से अधिकार देने वाला यह मंदिर आज भी प्रसिद्ध है । इसी मंदिर की प्रतिष्ठापना के समय की एक घटना न केवल पथदर्शी है, अपितु सावरकर जी की अपने उद्देश्य के प्रति प्रामाणिकता का विलोभनीय दर्शन भी कराती है । भागोजीसेठ चाहते थे कि, मूर्ति की प्रतिष्ठापना वेदोक्त पद्धति से हो । काशी से ब्राह्मण भी बुलाए गए । उन्हें बुलाते समय ही कल्पना दी गयी थी । किंतु वे ऐन समय पर मुकर गए कि, वेदोक्त का अधिकार अन्य जातियों को नहीं है । मुहूर्त निकला जा रहा था । शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी, भागोजीसेठ आदि सभी तैयार हो गए की चलो वेदोक्त नहीं तो पुराणोक्त पद्धति से ही सही । किंतु सावरकर जी का क्रोध फूट पडा । वे भागोजीसेठ से बोले, ‘सेठजी मंदिर आप का, आप मालिक है, सो अंततः आप जो कहे वह ही होगा । किंतु अगर सदियों से चली आ रही यह भेदभाव की शृंखला नहीं तोड सके, फिर इस मंदिर की आवश्यकता ही क्या रही? पुरानी ही प्रथाएँ चलानी है तो पुराने मंदिर क्या कम है संख्या में, जो और एक नया बना रहे है? नया मंदिर नई पहल है । यह अगर आप को स्वीकार्य नहीं तो कृपया मुझे छोड दीजिए । किंतु अगर आप अडिग रहते है, तो इस मंदिर में वेदोक्त प्रतिष्ठापना का दायित्व मेरा ।’ इतना कहते ही सावरकर उन द्विजों की ओर मुड कर बोले, ‘हम ने आप को पत्र भेजा था, उस में स्पष्ट रूप से लिखा था कि वेदोक्त पद्धति से प्रतिष्ठापना होगी । आप को यदि स्वीकार नहीं था, तो पहले ही मना कर देते । किंतु अगर आप सोचते है कि ऐन मौके पर मना करने से हम मजबूर हो जाएँगे तो गलत सोच है आप की । मैं नहीं मानता की किसी एक जाति में जन्म लेने भर से ही व्यक्ति को पौरोहित्य का अधिकार मिल जाता है । किंतु भागोजीसेठ की इच्छा थी की आप ही पौरोहित्य करे । किंतु आप के बिना भी पौरोहित्य हो सकता है । यदि आप मना कर देते है तो हम सारी जातियों के सैंकडों हिंदु इस मूर्ति को अनंत करों से उठा के ‘जय देवा’ उद्घोष के साथ स्थापित करेंगे । यह ही होगी हमारी विधी । हम सहस्रों कंठों से हिंदुधर्म का जयगान करेंगे । यह ही होगा हमारा वेदघोष । और ‘भावो हि विद्यते देव:’ यह ही होगा हमारा शास्त्राधार ।’ वीर सावरकर की यह ओजस्वी वाणी सुन के मसुरकर महाराज के आश्रम के एक शिष्य तड़ाक से आगे आए । उन का नाम था वेदशास्त्रसम्पन्न गणेशशास्त्री मोडक । उन्हों ने वेदोक्त पद्धति से ही प्रतिष्ठापना की (सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, पृ. १७४) ।

    पाठशालाओं में विभिन्न जाति के छात्रों के एकत्रित बैठने के बारे में भी सावरकर जी का रवैया कठोर ही रहा । उन्हों ने पहले तो सभी को प्रेमपूर्वक समझाया । किंतु जब कुछ लोग नहीं माने तो उन्हों ने कानूनी कार्यवाई की भी तैयारी दिखाई । इस विषय में सार्वजनिक जगहों पर अस्पृश्यों को भी नागरी अधिकार दिलाने वाला कानून १९२३ से ही था । जब सावरकर जी के विचारों को मानने वाले जनूभाऊ लिमये १९२८ में स्कूल बोर्ड के अध्यक्ष बने तो उन्हों ने भी पाठशालाओं में अस्पृश्यता का पालन ना करने के संबंध में आधिकारिक आदेश दिए । इस से सावरकर जी का काम और आसान हो गया । उन्हों ने १९२३ के सरकारी आदेश की सहस्रों प्रतियाँ करा के पूरे ज़िले में बाँटी । सरकारी कानून पता चलने पर लोकमत एकदम से अनुकूल होने लगा । किंतु उस का विरोध भी उतना ही हुआ । अस्पृश्य विद्यार्थियों को कई तरह के कष्ट दिए जाने लगे, उन के सामान को आग लगानी शुरू हुई, कुछ शिक्षकों ने उन्हें सिखाने से ही इनकार कर दिया (तत्रोक्त, पृ. १३२) । परिणामस्वरूप सावरकर जी ने रत्नागिरी के ज़िलाधिकारी से आवेदन किया (रत्नागिरी हिंदुमहासभा प्रतिवृत्त, १९२९) । इस में वे लिखते है, “The dogs may enter and even are welcomed and patted in the schools but the poor boys fared in the schools worse than dogs. The villagers resorted to the rowdy methods and drove away the untouchable boys from the schools and are not allowing them even to enter there as before. I humbly and most pressingly request you to set matters right in those villages as soon as possible and ask the police to take back the children of the untouchables to schools under the government protection against the physical threatening on the part of the rowdy rioters there’. सावरकर यहाँ अस्पृश्य विद्यार्थियों के लिए पुलिस सुरक्षा की माँग कर रहे है । यह पढ के सहसा ही अमरिका के लुज़ियाना प्रांत में गोरों के स्कूल में अपृथक पढने जाने वाली पहली आफ्रीकन-अमरिकन लडकी रुबी ब्रिजेस की याद आती है । उसे भी स्कूल में छोडने के लिए फ़ेडरल मार्शल्स जाया करते थे । रत्नागिरी के मामले में सचमुच पुलिस सुरक्षा दी गई या नहीं यह तो मुझे ज्ञात नहीं, किंतु इतना अवश्य कहूँगा कि अमरिका की घटना १९६० की है तो सावरकर द्वारा रत्नागिरी में की गयी पहल १९२९ की । इसी वर्ष स्कूल बोर्ड का परिपत्रक ज़िला बोर्ड ने रद्द करवा दिया । किंतु सावरकर अस्पृश्यता का पालन रोकने वाला परिपत्रक जारी करवाने में १९३४ में पुन: यशस्वी हुए ।

    आप किसी भी व्यक्ति से मित्रता हुई, ऐसा कब कह सकते है । आप के सैंकडों पहचानवाले हो सकते है, दसों परिचित भी हो सकते है, किंतु घनिष्ठ मित्रता, एकरूपता तभी कही जा सकती है, जब आप उन के साथ बिना किसी हिचकिचाहट के खाना खाओ । भोजन मित्रता का संकेत है । यह बात सावरकर बहुत ही अच्छी तरह से जानते थे । उन दिनों जहाँ अपने से तथाकथित निम्न जाति के व्यक्ति के साथ भोजन करना भी पाप माना जाता था, सावरकर जी ने कल्पना निकाली सहभोजन की । सभी जाति के हिंदुओं का एक साथ, एक ही पंक्ति में भोजन । रोटीबंदी की इस शृंखला पे पहला प्रहार किया सावरकर की प्रेरणा से स्थापित ‘तरुण हिंदुमंडल’ने (डिसेंबर १९२९) । विभिन्न जातियों के सौ युवाओं ने एक साथ भोजन किया । यह तो था पहला पडाव, जो केवल उस मंडल के कार्यकर्ताओं तक ही सीमित था । अब समय था रोटीबंदी की शृंखला पे दूसरा प्रहार करने का, यानी प्रकट सहभोजन कराने का । अगले वर्ष पुन: एक बार सौ लोगों के सहभोजन का आयोजन हुआ । इस बार यह समारोह सभी के लिए खुला था । लेकिन कार्य सम्पन्न हो कहाँ? कोई भी कर्मठ इस समारोह के लिए जगह देने के लिए तैयार नहीं था । अंततः खातू परिवार के नाट्यगृह में व्यवस्था हुई । किंतु तब भी कई प्रश्न शेष थे । भोजन पकाएगा कौन? इस तथाकथित पापाचरण के लिए कोई भी रसोईया तैयार नहीं था । जैसे तैसे प्रबंध हुआ । लग रहा था कि कोई नहीं आएगा । किंतु ऐन मौके पर इतनी भीड हुई कि कईयों को तो समारोह में भाग लिए बिना ही वापिस लौटना पडा (सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, पृ. १८९) ।

    सावरकर जी ने सहभोजन में सहभागी लोगों की सूची प्रकाशित करने का नियम किया था । पहले सहभोजन के पश्चात कईयों को इस बात के परिणाम, सामाजिक बहिष्कार आदि स्वरूपों में भुगतने पडे । लेकिन सावरकर जी द्वारा दिखाई दृढता के पश्चात धीरे धीरे वातावरण सकारात्मक होता गया । पहले सहभोजन की खबर देते हुए ‘टाईम्स ऑफ इंडिया’ लिखता है (०९/१२/१९३०), ‘जातिव्यवस्था ही हिंदु धर्म की अवनती का मूल कारण है ऐसा मानने वाले कुछ उत्साही सुधारकों द्वारा सहभोजन का आयोजन किया गया था । इस में सभी जातियों के लोगों ने भाग लिया’ । आगे चल के सावरकर जी ने इन समारोहों को किसी पवित्र धार्मिक कार्य जैसा स्वरूप दिया । इतना ही नहीं उन्हों ने किसी भी धार्मिक विधी से पहले जैसे संकल्प किया जाता है, वैसा ही संकल्प भी सहभोजन के लिए रचा, ‘जन्मजातजातिभेदोच्छेदनार्थम् अखिलं हिंदुसहभोजनं करिष्ये’ (रत्नागिरी हिंदुसभेचे प्रतिवृत्त, खंड २, १९३७) ।

    सावरकर जैसे स्वीकार्य रूप से सकारात्मक कार्य करना जानते थे, वैसे ही नकारात्मक विचारों को उन्हीं की भाषा में उत्तर देना भी जानते थे । एक बार एक महाशय ने सहभोजन समारोहों की आलोचना करते हुए कहा कि, ‘एक दूसरे के मुँह में थूकने से भी क्या प्रेम बढता है’? सावरकर जी ने तपाक से उत्तर दिया था कि, ‘आप जब ब्राह्मणभोज कराते है तब क्या एक दूसरे के मुँह में थूकते है’? सावरकर जानेमाने व्यक्ति होने के कारण, अनेकों विवाहादि समारोहों में उन्हें आमंत्रित किया जाता । वे भी प्रेमपूर्वक जाते । किंतु वे यजमानों को सुझाव देते कि, कार्यक्रम में सहभोजन हो । और अधिकतर लोग तैयार भी हो जाते । सावरकर जानते थे कि क्या स्पृश्य क्या अस्पृश्य, दोनों ही जिस चीज़ को धर्म मानते थे उस का निष्ठापूर्वक आचरण करते थे । इसीलिए उन्हों ने किसी का भी द्वेष न करते हुए जहाँ तक हो सके युक्तिवाद से अपनी बात मनवाना सही समझा । आज कल के कुछ धर्मसुधारक गलत रूढीयों का अनुसरण करने वालों को मूर्ख कहते है, तरह तरह के अपशब्द कहते है । इस से आप की विद्वत्ता नहीं सिद्ध होती, बल्कि कार्य की हानि ही होती है । अपशब्द वह कहता है जिसे अपने विचारों पे विश्वास न हो, जो विश्वास से भरा हुआ होता है, वह तो सरल भाषा में भी अपनी बात रख सकता है । सावरकर जी के प्रयत्नों से धीरे धीरे स्त्रीवर्ग भी सहभोजनों में सहभागी होने लगा (२१/०९/१९३१) ।

    वीर सावरकर के सहकारी तथा ‘सत्यशोधक’ पत्रिका के संपादक थे श्री. दत्तोपंत लिमये । उन की सुपुत्री का विवाह निश्चित हुआ । किंतु जब ससुराल वालों को पता चला कि लिमये जी सहभोजनी है, तो उन्हों ने विरोध दर्शाया । कहा कि जब तक लिमये जी प्रायश्चित नहीं लेते, विवाह नहीं होगा । एक तरफ बेटी का भविष्य तो दूसरी तरफ तत्त्वनिष्ठा । लिमये जी धर्मसंकट में पड गए । यह विषय सावरकर जी के समक्ष आया । तो उन्हों ने एक झटके से उन्हें प्रायश्चित लेने की अनुज्ञा दे दी और साथ ही साथ ससुराल वालों को यह भी कहा कि यह प्रायश्चित केवल विवाह तक ही सीमित रहेगा । वे मान गए । यहाँ विवाह सम्पन्न हुआ और वहाँ लिमये जी सहभोजन में पुनः जुट गए (तत्रोक्त) । सावरकर जी की यशस्विता का रहस्य उन के ऐसे व्यावहारिक तथा अनूठे मार्ग ही है । वे खुद समुद्रमार्ग से ही विदेश गए थे, लेकिन वापिस लौटने पर उन्हों ने प्रायश्चित नहीं लिया । ऐसे ही उन्हों ने शुद्धीकरण किए, बेटीबंदी तोडी, व्यवसायबंदी तोडी । १ मई १९३३ को उन्हों ने ‘अखिल हिंदु होटल’ शुरू किया जिसे चलाने वालों में से एक युवक दलित था । वहाँ भोजन करने वालों के हस्ताक्षर ले के उस की सूची रखी जाती थी । सावरकर जी के स्वीय सहायक श्री. बाळाराव सावरकर के अनुसार सावरकर जी के पास ऐसे सवा तीनसौ से अधिक हस्ताक्षर इकठ्ठा हो गए थे (रत्नागिरी पर्व, लेखक बाळाराव सावरकर, आवृत्ति वर्ष १९७२, पृ. ३००) ।

    राजर्षि छत्रपती शाहू महाराज के अनुयायी भाई माधवराव बागल जब रत्नागिरी आए तो वहाँ का वातावरण देख कर वे अवाक रह गए । उन्हों ने कहा, ‘पुणे, मुंबई जैसे बडे शहरों में भी सहभोजन के लिए ५-१० महिलाएं भी आगे नहीं आती । किंतु यहाँ सैंकडों महिलाएँ सहसा ही सहभागी होती दिखती है । वीर सावरकर यदि हमारे यहाँ होते, तो हम उन्हें सिर आँखों पे बिठा के रखते’ (सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, पृ. २१४-१५) । वीर सावरकर जी का कार्य देख कर महर्षि शिंदे बोल उठे थे (तत्रोक्त, पृ. २१५), ‘भगवान सावरकर जी को मेरी बची हुई आयु दे दे’ । दलित नेता श्री. सोनवणे के अनुसार (तत्रोक्त, पृ. २१२), ‘सहस्रों वर्षों से स्पृश्यों ने हमें दूर रखा, किंतु यह भेद भी नष्ट हो सकता है यह विश्वास, सावरकर जी के कार्य को देख कर होता है ‘ । वीर सावरकर जी ने भारतरत्न डॉ. बाबासाहब आंबेडकर जी को भी इस कार्य का अवलोकन करने हेतु निमंत्रित किया था । सावरकर, आंबेडकर जी को लिखे पत्र में लिखते है, ‘यह निमंत्रण किसी तात्त्विक चर्चा हेतु नहीं, अपितु जातिभेद नष्ट करने के लिए हिंदु समाज प्रत्यक्ष क्या क्या कार्य करना चाहता है इस बात का सक्रिय उदाहरण देने के लिए है ।’ सावरकर चाहते थे कि आंबेडकर जी की अध्यक्षता में सहस्रावधी पूर्वास्पृश्यों का सहभोजन हो व तत्पश्चात आंबेडकर जी मार्गदर्शन करे । किंतु आंबेडकर जी की कार्यमग्नता के चलते यह समारोह हो न सका । नाशिक के काळाराम मंदिर सत्याग्रह के दौरान सावरकर जी स्थलबद्ध थे । उन्हों ने तब भी आंबेडकर जी का समर्थन करने हेतु एक पत्र नाशिक के हिंदुओं के नाम लिखा था । सावरकर जी के अनुज डॉ. नारायणराव सावरकर उस समय अपने सहकारीयों के साथ नाशिक में उपस्थित थे तथा उन्हों ने मंदिरप्रवेश के लिए अनुकूल वातावरण बनाने का प्रयास भी किया था (तत्रोक्त, पृ. ११४) ।

    सावरकर जी का अस्पृश्यता निवारण और सामाजिक एकता का कार्य एक यशस्विता की गाथा है । १९२४ से ले कर १९३७ तक के स्थलबद्धता के काल में उन्हों ने रत्नागिरी ज़िला व आसपास के परिसर से अस्पृश्यता का समूल उच्चाटन कर दिया था । आगे चल के भी उन की हिंदुमहासभा के माध्यम से की गई राजनीति जातिगत भेदभावों से उपर उठ कर संपूर्ण समाज के लिए ही थी । आज भले ही अस्पृश्यता कानूनी रूप से नष्ट हो चुकी हो, किंतु जातिवाद के रूप में वह कुछ लोगों के मन में आज भी जीवित है । नए युग में पुनः विश्वगुरू बनने की चाह रखने वाले देश के लिए यह जातिभेद कितनी बडी बाधा है, कोई भी अनुमान लगा सकता है । ऐसे समय में सावरकर जी के विचारों की, उन के द्वारा चुने अभिनव मार्गों की पहले से भी अधिक आवश्यकता आन पडी है । समय की माँग है कि हम उस मार्ग पर पूरी प्रामाणिकता के साथ चले । सावरकर जी द्वारा किया गया कार्य स्वयं प्रकाश बन के पथ दिखलाएगा ।

    — © अॅड. विक्रम श्रीराम एडके,
    (सावरकर जी के चरित्र एवं विचारों के अभ्यासक तथा उन से संबंधित विषयों पर व्याख्यान देने वाले वक्ता ।)

    *लेख वडोदरा के महाराजा सयाजीराव गायकवाड विश्वविद्यालय के इन्स्टिट्यूट ऑफ लिडरशिप अैंड गवर्नंस द्वारा प्रकाशित ‘वीर सावरकर स्वतंत्रता एवं अखंडता के साधक’ में पूर्वप्रकाशित

  • आत्मार्पण

    या माणसाने देशासाठी घर सोडले, पदवी सोडली, सनद सोडली, नोकरी-व्यवसायाची संधी सोडली, पैसा सोडला, आरोग्य सोडले, ज्ञातिगत अस्मिता सोडली, संसारावर उदक सोडले आणि वेळ आली तेव्हा कर्तव्यतृप्तीने क्लांत देहदेखील सोडला. मी बोलतोय सावरकरांबद्दल. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांबद्दल. मी कधीच आजच्या दिवसाचा उल्लेख पुण्यतिथी म्हणून करत नाही, तर आत्मार्पणदिन म्हणून करतो ते यासाठीच. सावरकरांचे प्राण काळाने हरले नाहीत. किंबहूना तितकी काळामध्ये हिंमत तरी होती की नाही, हाच प्रश्न आहे. सावरकरांनी केलेय ते आत्मार्पण! होय, हिंदूधर्मातील शाश्वत सन्यासपरंपरेतील अनेकांनी गेली सहस्रावधी वर्षे केले तेच सहर्ष आत्मार्पण. ज्यावेळी सावरकरांना जाणीव झाली की, मातृभूमीच्या विमोचनार्थ आपण हाती घेतलेल्या व्रताचे उद्यापन झाले आहे, हिंदू समाजासाठी त्यानंतरही आवाक्यात असलेले सारे काही करून झाले आहे, तेव्हा त्यांनी या धरेला देहाचा भार न ठेवता तो सोडण्याचा निर्णय घेतला. केवढी पराकोटीची नि:स्वार्थता ही?

    आपल्या ‘आत्महत्या आणि आत्मार्पण’ लेखात (जुलै १९६४) सावरकर लिहितात –
    “अत्यंत असमाधानाने, विफलतेच्या तीव्र जाणीवेने, संकटांना कंटाळून, इच्छा असतानाही सुखाने जगता येत नाही म्हणून अत्यंत अतृप्त अशा मन:स्थितीत वैतागाच्या भरात जे बळाने जीव देतात, त्यांच्या त्या कृत्याला साधारण: आत्महत्या असे म्हटले जाते. परंतु आपले जीवितकार्य, जीवनाचे ध्येय, जीवनाचा हेतू संपूर्णपणे सफल झाला आहे अशा सफलतेच्या, कृतकृत्यतेच्या भावनेने जे आपल्या ऐहिक अस्तित्वाची हर्षभराने समाप्ती करतात, त्यांच्या त्या कृत्यास आत्मार्पण असे म्हणतात. यद्यपि या परिवर्तनशील जगात सर्वतोपरी परिपूर्णता अशी केव्हाही असू शकणार नाही. जे जीवनात संपादवायचे होते ते सर्व संपादिलेले आहे म्हणून आता कर्तव्य असे काही उरलेले नाही, अशा कृतकृत्य भावनेने रिक्तकाम किंवा पूर्णकाम झालेले धन्य पुरुष आपणहून आपले प्राण विसर्जित करतात. ते आपले नश्वर जीवन विश्वाच्या चिरंतन जीवनात विलीन करून टाकतात. योगवासिष्ठात म्हटल्याप्रमाणे –
    अन्तर्रिक्तो बहिर्रिक्तो रिक्त कुम्भरिवाम्बरे ।
    अन्त:पूर्णो बहि:पूर्णो पूर्ण कुम्भरिवार्णवे ।।
    तथापि आपल्या या जीवनकार्याची सापेक्षत: परिपूर्णता झालेली आहे, अशी आत्मसंतुष्टता वाटल्यानंतर समाजाला किंवा स्वतःला जो देह वार्धक्याने म्हणा, व्याधीने म्हणा पण केवळ भारभूत असाच राहाणार आहे, त्या देहाचा गुहाप्रवेशाने, प्रायोपवेशनाने, अग्निदिव्याने, समुद्रसमाधी किंवा अंतिम योगसमाधी घेऊन किंवा अशाच कोणत्यातरी मार्गाने जे त्याग करतात, ते त्यांचे कृत्य उत्तान अर्थी बळाने जीव देणेच असताही त्याला आत्मसमर्पण म्हणून जे गौरविले जाते, ते यथार्थच आहे”.

    हे केवढेतरी सखोल चिंतन आहे सावरकरांचे. आपल्या देहाचा आता समाजाला, देशाला अथवा कुणालाच उपयोग नाही म्हणून तो देहच सोडून देणे ही एकाचवेळी स्वार्थत्याग आणि उपयोगितावाद अशा वरकरणी विरोधी वाटणाऱ्या दोन्ही गुणांची परिसीमा आहे. सावरकरांसाठी आपण काय केलं, हा विचार आत्ता कुठे आपण करू लागलो आहोत. सावरकरांच्या मनाला हा विचार दूरान्वयानेदेखील शिवलेला नव्हता. किंबहूना आजवरच्या योगदानाच्या बदल्यात काही मागायचे तर नाहीच, उलट आहे ते सारेच देऊन टाकायचे ही त्यांची सर्वोच्चातीलही सर्वोच्चतम भावना आहे. म्हणूनच सकल सुखांचा परित्याग करून हा प्रवाहाविरुद्धचा योगी फाल्गुन शुक्ल षष्ठी, शके १८८७ अर्थात २६ फेब्रुवारी १९६६ या दिनी प्रायोपवेशनाद्वारे अनंतब्रह्माच्या प्रवासास निघून गेला. जणू परमेश्वराने मानवजातीवर कृपावंत होऊन आपल्या तेजाचा एक अंश आमच्यात धाडला होता, तो लक्षावधी आयुष्यांना तेजस्वी स्पर्श करून पुन्हा एकवार अनंतात विलीन झाला. आणि त्याने स्पर्शलेली आयुष्येच नव्हे तर पिढ्यानपिढ्या उजळून निघाल्या, कायमच्या साठी!!

    — विक्रम श्रीराम एडके
    (लेखक सावरकरांच्या चरित्राचे अभ्यासक आणि व्याख्याते आहेत. व्याख्यानांच्या आयोजनासाठी संपर्क www.vikramedke.com)

  • सावरकरांचे सामाजिक कार्य : एक वस्तुनिष्ठ आकलन

    सावरकरांच्या आयुष्याचे ढोबळमानाने ५ कालखंड पडतात. पहिला जन्मापासून ते अटकेपर्यंत. दुसरा अंदमानपर्व. तिसरा रत्नागिरीपर्व. चौथा सुटकेपासून ते स्वातंत्र्यापर्यंत. आणि पाचवा स्वातंत्र्यापासून ते आत्मार्पणापर्यंत. ह्या कालखंडांपैकी रत्नागिरीपर्वात सावरकरांनी अतुल्य समाजकार्य केलेले दिसते. इतके की, डॉ. आंबेडकरांच्या “जनता”ने (एप्रिल, १९३३; संदर्भ: सावरकर-चरित्र, कीर, आ. २००८, पृ. २०८) सावरकरांच्या कार्याची तुलना थेट भगवान बुद्धांशी केली आहे. परंतु सावरकरांवर जे अनेक आक्षेप घेतले जातात, त्यात प्रमुख आक्षेप हादेखील असतो की, सावरकरांनी रत्नागिरीतून सुटल्यानंतर अथवा रत्नागिरीत स्थलबद्ध होण्याआधी कोणतेही सामाजिक कार्य केलेच नाही. सदर आक्षेपाला सावरकरद्वेषाचे, जातीद्वेषाचे आणि राजकारणाचे अनेक कंगोरे आहेत. आपण त्यामध्ये न पडता केवळ ह्या आक्षेपात कितपत तथ्य आहे याचा वस्तुनिष्ठपणे विचार करु.

    सावरकरांना शिक्षा झाली ती वयाच्या २७व्या वर्षी! अवघ्या पंचविशीतल्या पोराने का बरं काही समाजकार्य केले नाही, असा प्रश्न जर कुणाला पडणार असेल तर ते हास्यास्पद व म्हणूनच उत्तर देण्याच्याही योग्यतेचे नाही. याकाळातच सावरकरांनी केलेले क्रांतिकार्य भल्याभल्यांना जन्मभर अभ्यासावयाला पुरेल एवढे मोठे आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अनेक सूक्ष्म पदर असलेले आहे. किंबहूना त्याच क्रांतिकार्याची शिक्षा म्हणून ब्रिटीशांनी सावरकरांना फाशीहूनही कठोर अशी काळेपाण्याची शिक्षा सुनावली (१९१०). परंतु त्याही काळात सावरकरांचे विचार काय होते ते मुख्यतः त्यांच्या काव्यातून समजतात. वास्तविक अभिजन वर्गात जन्माला आलेला हा मुलगा. त्यांना कोणत्याही प्रकारचा सामाजिक प्रश्न अजिबातच दिसला नसता, तरीदेखील तत्कालीन परिस्थितीला धरुनच असले असते ते. परंतु त्याही काळात सावरकर स्वदेश, स्वदेशी, स्वधर्म, स्वातंत्र्य इ. बाबत जागृत असल्याचे त्यांच्या लेखनातून पदोपदी दिसते. आपल्या “बालविधवा दु:स्थितीकथन” (१९०२) कवितेत अवघ्या १९ वर्षांचे सावरकर लिहितात —
    “ज्यांच्या गृहिणी जाती कालांतराने ते गृहस्थ होतात ।
    कन्यापुत्रही लाभती द्यायाला धीरही स्वस्थ हो तात ।।
    वृद्धाचा सुत गेला स्वांकी तो दत्तकासि घेईल ।
    स्वपिता मरता तद्विण सुत संसारी समर्थ होईल ।।
    सर्वांसि उपाय असे शास्त्राने वा सुरुढिने विहित ।
    परि न दया ये उभयान्वयी विधवांचे साधण्यास तेवि हित ।।
    शास्त्रे उपेक्षिल्या त्या छळिल्या रुढिने तयांत शतपट हो ।
    अबलांना विधवांना अजुनि तरी तारण्यास खटपट हो ।।
    आताहि जरी उपेक्षा दु:स्थितीतुनि त्यांसि उद्धारायाते ।
    तरि हा पातकपर्वत शक्त न होईल धरू धरा याते ।।
    वैदिक हो, भिक्षुक हो, उद्धारक हो, अहो सुधारक हो ।
    सदय मनाने कोणी अबलांना संकटात तारक हो ।।
    अवलोकिता न पतिचे वदनही वैधव्य मात्र अवलोकी ।
    क तत्पुनर्विवाहा प्राप्त असो संमती न तव लोकी? ।।”
    हा सावरकरांचा खडा सवाल आहे. सावरकर ह्यावर उपायही सांगतात —
    “सत्वर कडाड मोडा हानिद ह्या रुढिचा महा खोडा ।
    तोडा दु:स्थितीबेडी अबला तारोनि धवलयश जोडा ।।”

    किंबहुना सावरकरांच्या आयुष्याचा उद्देशच मुळी भारतभूमीचा सर्वंकष उद्धार करण्यासाठी शक्य होईल ते सारे काही करणे, हाच होता. हे जसे सावरकरांनी वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी घेतलेल्या प्रतिज्ञेत दिसते. तसाच त्याचा पुनरुच्चार “सागरास”मध्येही (१९०९) आढळतो. सावरकर लिहितात —
    “जगदनुभवयोगे बनुनि मी, तव अधिकशक्त उद्धरणी मी”!

    परंतु हिंदु धर्मातील जातीव्यवस्था व त्यायोगे राष्ट्राची होत असलेली हानी यांचे दाहक वास्तव सावरकरांना सर्वाधिक जाणवले ते अंदमानात. संख्येने मुठभर असूनही मुसलमान वॉर्डर हिंदू कैद्यांवर कसे काय अत्याचार करु शकतात, याचे उत्तर त्यांना सापडले ते हिंदू पाळत असलेल्या स्पृश्यास्पृश्यतेच्या घातक रुढीमध्ये! याविषयावर सावरकरांनी अंदमानात शक्य तेवढे कार्य केले. यातूनच जन्म झाला तो हिंदुसंघटनाचा. परंतु हिंदूंनी हिंदू म्हणून जगात एकत्र यायचे असेल तर जन्मजात जातीभेदाच्या बेड्या तोडल्या पाहिजेत, हे उघड होते. रत्नागिरीतील स्थलबद्धतेचा याकामी सावरकरांनी पुरेपूर वापर केला व जातीभेदावर सुसूत्रपणे हल्ला चढवला. एकप्रकारे स्थलबद्धता इष्टापत्तीच ठरली सावरकरांसाठी. जे कार्य डॉ. आंबेडकर विवर्ण स्तरातून करत होते तेच सावरकरांनी समाजाच्या सवर्ण स्तरातून केले. दोघांचेही कार्य परस्परपूरक होते. दोघांनाही एकमेकांबद्दल आदर होता व तो त्यांनी वेळोवेळी व्यक्तदेखील केलेला दिसतो. रत्नागिरीतील कीर-मंदिर अखिल हिंदूंना खुले करण्यात येणार होते. ह्या मंदिराचे उद्घाटन डॉ. आंबेडकरांच्या हस्ते व्हावे अशी सावरकरांची प्रामाणिक इच्छा होती. परंतु आधीच ठरलेल्या वेळापत्रकामुळे डॉ. आंबेडकरांना ते शक्य झाले नाही. याप्रसंगी त्यांनी सावरकरांना पाठवलेल्या पत्राचा उल्लेख आंबेडकर व सावरकर दोघांचेही चरित्रकार असलेल्या धनंजय कीर यांनी (सावरकर-चरित्र, कीर, आ. २००८, पृ. २०२) केला आहे —
    “सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करीत आहात त्याविषयी अनुकूल अभिप्राय देण्याची ही संधी घेत आहे. जर अस्पृश्यवर्ग हिंदुसमाजाचा अभिन्न भाग व्हायचा असेल, तर नुसती अस्पृश्यता जाऊन भागणार नाही; चातुर्वर्ण्याचे उच्चाटन झाले पाहिजे. ज्या थोड्या लोकांना ह्याची आवश्यकता पटली आहे, त्यांपैकी आपण एक आहात हे सांगावयास मला आनंद वाटतो”.
    दोघांच्याही अश्या परस्परपूरकतेमुळेच दोघांचाही उल्लेख कीरांनी “समाजक्रांतिकारक” असा केला असल्याचा संदर्भ शेषराव मोरेदेखील (सावरकरांच्या समाजक्रांतिचे अंतरंग, संक्षिप्त आ. २०१५, पृ. १) देतात.

    सावरकरांनी जर आपले कार्य सामाजिक क्रांतिपुरतेच मर्यादित ठेवले असते, तर अवघ्या ५ वर्षांच्या आतच त्यांनी सबंध हिंदुस्थानातून अस्पृश्यतेचे समूळ उच्चाटन करुन दाखवले असते. हे मत आहे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे (कीर, २०८) यांचे! मग आता प्रश्न असा उभा राहातो की, सावरकरांनी बिनशर्त सुटकेनंतर हे कार्य का थांबवले? वरवर पाहाता सावरकरांनी खरोखरच कार्य थांबविल्याचे दिसते. याची कारणे २! एक म्हणजे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी राजकारणाचा व्याप अंगावर घेण्याची आवश्यकता. आणि दुसरे म्हणजे पाकिस्तानच्या रुपाने भारताचे तुकडे पडण्याची येऊन ठेपलेली वेळ. ह्या दोन्हीही गोष्टी तत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने केव्हाही अधिक निकडीच्या होत्या. परंतु याचा अर्थ सावरकरांची समाजकार्याबाबतची आस्था संपली होती असे नव्हे. सावरकरांसाठी समाजकार्य हेच हिंदुसंघटन होते व हिंदुसंघटन हेच समाजकार्य होते. यामागचे साधेसोपे तर्कशास्त्र असे की, अस्पृश्यता नष्ट झाली तरच हिंदु संघटीत होऊ शकतील ना! त्यामुळे सावरकरांसाठी हिंदुसंघटनाचा अर्थ अस्पृश्यतानिर्मूलन हादेखील होताच. किंबहूना याच अर्थाने त्यांनी हिंदुमहासभेच्या ध्येयश्लोकात “अभ्युत्थानाय हिंदुनाम्” हे शब्द समाविष्ट करुन घेतले होते. “राजकीय सुधारणा व सामाजिक सुधारणा ही राष्ट्राच्या गाड्याची दोन चाके आहेत. यांतील कोणतीही सुधारणा मागे ठेवणे योग्य नाही. या दोन चाकांवर भारत देश पुढे न्यायचा आहे. कोणतेही चाक मागे राहून चालणार नाही” (समाजसुधारक सावरकर, केळकर, आ. १९८६, पृ. १२५). तसेच १९४३ मध्ये “सामाजिक सुधारणा झाल्यावाचून स्वराज्य मिळाले तर तीन दिवससुद्धा टिकणार नाही” (स्वा. सावरकर – अखंड हिंदुस्थान पर्व, बाळाराव सावरकर, आ. १९७६, पृ. २०२) ही सावरकरांची ह्याविषयावरील मते आहेत.

    एवढेच नव्हे, तर १९४७ साली ‘हरिजन सेवक संघा’चे श्री. वि. न. बर्वे यांना पाठवलेल्या पत्रात सावरकरांनी प्रकृती ठिक झाली की अस्पृश्यतेच्या घातक रुढीवर आणखी एक अखिलभारतीय चढाई करण्याचा मनोदय बोलून दाखवला आहे (तत्रोक्त, पृ. ३६९). दुर्दैवाने त्यानंतर वर्षभरातच गांधीहत्या झाली व स्वकीय सरकारच्या कारभारातही नाहक खटल्यात गोवले गेलेले सावरकर नवीन कार्य करण्याची उभारी कधीच धरु शकले नाहीत. अर्थातच वयाच्या १५व्या वर्षापासून जो देह सतत देशकार्यासाठी झिजला, त्यापायी नानाप्रकारचे त्रास व अपमान भोगले, त्याच्याकडून पुन्हा वार्धक्यातही नव्याने कार्य करण्याची अपेक्षा करणे हेच मुळी स्वार्थीपणाचे आहे. परंतु त्याही परिस्थितीत सावरकरांनी आपल्या मृत्युपत्रात हिंदुसंघटनासाठी तरतूद केल्याचे दिसून येते. यावरुनच सावरकरांना सामाजिक कार्याबाबत वाटत असलेली कळकळ लक्षात घ्यावी. सावरकरांचे मूल्यमापन द्वेषपूर्ण अथवा विरोधी भूमिकेतून न करता वस्तुनिष्ठपणे केल्यास, आजही भयाण असलेल्या सामाजिक वास्तवात सावरकरांचे कार्य व त्यासाठी त्यांनी वापरलेले अभिनव मार्ग दीपस्तंभ बनून मार्गदर्शन करताना दिसतील!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [सावरकरांच्या चरित्राचे अभ्यासक आणि सावरकरांवर व्याख्याने देणारे वक्ते. व्याख्यानांच्या आयोजनासाठी संपर्क www.vikramedke.com]

    image

  • सावरकर नावाचा ब्रॅण्ड!!

    नव्याने विमानात बसणाऱ्यांची एक बेक्कार गंमत होते. उद्धरिणीने (लिफ्ट हो!) जाताना कसं वजनरहित वाटतं आणि डोकं पिसाहून हलकं होतं, तसं वाटतं. आणि त्या अवस्थेत प्रतितास शेकडो किलोमीटर वेगाने आपण हवेत तिरके भिरकावलो जात असतो!! बाऽबोऽऽ!! शब्दातीत अवस्था असते उड्डाण म्हणजे!! यात एक वेगळाच त्रास होतो. कान भयानक दुखतात. हवेचा दाब सतत बदलत असतो. त्यामुळे कानांवर प्रचंड ताण येतो. जरा कुठं वर-खाली झालं की, “पुटूक पुटूक” आवाज करत कानात लहानसे स्फोट होतात की “सुंईईईऽऽ..” आवाज करत अडकून राहिलेली हवा निघून जाते. परत नव्याने दाब. तात्पुरता बहिरेपणा येतो. उतरल्यावरही कित्येक तास कान दुखत राहातात. यासगळ्यात नाक व तोंड दाबायचं आणि प्रयत्नपूर्वक कानावाटे श्वास सोडायचा, ह्या द्राविडी प्राणायामाची निराळीच गंमत असते!!

    मुंबई ते चेन्नई प्रवासात फारच त्रास झाला मला. कारण असं काही होईल याची कल्पना होती, पण इतकं होईल असं कुणाला वाटतंय!! त्यातून हवाईसुंदरीला मी फारसा आवडलो नसावा, कारण तीनतीनदा बोलावल्यावर तिने शेवटी कापसाचे बोळे आणून दिले. तशी ती पण नुसती “हवाई”च होती मेली, “सुंदरी” तर औषधालाही नव्हती! शेवटी व्हायचा तो त्रास झालाच. पण तिथून पुढे चेन्नई ते पोर्टब्लेअर प्रवासाच्या वेळी मात्र मी मानसिक तयारी करुन ठेवली होती. त्याप्रवासात काही मला खिडकीजवळची जागा नव्हती मिळालेली. उजव्या रांगेतली पहिली जागा. दोन तमिळ ख्रिश्चन कुटूंबे बिचारी माझ्यामुळे निम्मी इकडं आणि निम्मी तिकडं झालेली. नवरे, बायका आणि चिल्लीपिल्ली! “तमिळ” म्हटलं की मुळातच माझे अष्टसात्त्विकभाव जागृत होतात. का कोण जाणे पण मला मी मागच्या जन्मीचा तमिळ वाटतो, इतकी ओढ वाटते मला त्या भाषा आणि संस्कृतीबद्दल. त्यामुळे मी त्या अण्णा-अम्मांशी मोडक्यातोडक्या तमिळमध्ये गप्पा सुरु केल्या!

    त्यांच्यातले एक अण्णा कोटक बँकेत कामाला होते. मग देशाची सध्याची अवस्था, मोदी-बिदी असले “लडकोंवाले” विषय बोलून झाल्यावर गाडी हळूच “अंदमानला कश्यासाठी?” ह्या प्रश्नाकडे वळली. ती कुटूंबं सप्ताहान्त साजरा करायला सहज म्हणून चालली होती. मला विचारलं तर मी सांगितलं की, “महाराष्ट्रातून आम्ही काही लोक चाललोय अंदमानला. सावरकरांसाठी! आम्ही नुसते फिरणारच नाही आहोत तर मी व्याख्याने देणार आहे तिथे सावरकरांवर. त्यासाठी वक्ता म्हणून चाललोय”, वगैरे वगैरे. यावर साहजिकपणे त्यांनी विचारलं की, “कोण सावरकर बुवा”? बास!! नाहीतरी महाविद्यालयीन काळात एका बिग्रेडी प्राध्यापकाला नडलो होतो त्यावेळी त्यांनी हताश आवाजात म्हटलेच होते, “तू जिथं-तिथं सावरकर घुसडतोस सतत”! इथे तर सरळ समोरुन प्रश्न आला होता, “कोण सावरकर”? माझ्या डोक्यात उलटी गणती सुरु झाली, “३.. २.. १.. सुरु”!! मी तासभर त्या चार-पाच जणांना इंग्लिश आणि तमिळमध्ये सावरकर समजावून सांगत होतो. त्यांची साहजिक प्रतिक्रिया होती, “देशासाठी आयुष्यभर एवढा त्रास भोगलेला हा माणूस आम्हाला माहितीच नव्हता”! त्यांच्यापैकी एकाने विचारले की, “सावरकर प्रत्यक्षात किती थोर होते”? तेवढ्यात घोषणा झाली, “कृपया कुर्सीकी पेटियाँ बाँध ले, हम कुछही मिनटोंमें पोर्टब्लेअरके वीर सावरकर आंतरराष्ट्रीय हवाईअड्डेपे उतरनेवाले है..”! मी म्हणालो, “अंदमानमधल्या एकमेव विमानतळाला एका मराठी माणसाचं नाव द्यावं लागलं, इतके थोर होते सावरकर”! यावर आम्ही सगळेच हसायला लागलो. बोलण्याच्या भाषा लाखों असतील जगात, पण हास्याची भाषा एकच असते!!

    हा काही अंदमानप्रवासातला असा एकमेव अनुभव नाही. तिकडे आमचा समन्वयक होता एक. विकास नाव त्याचं. वडील पंजाबी, आई तेलुगू, वाढला बंगाली बहुसंख्य असलेल्या अंदमानमध्ये. त्यामुळे ह्या तिन्ही भाषा तर तो अस्खलित बोलतोच. शिवाय अंदमानात राहून राहून तमिळ आणि हिंदीतसुद्धा पारंगत झालेला. इंग्रजीही अतिशय उत्तम. बाकीचे आमच्या ठरलेल्या गाड्यांमधून फिरायचे. मी म्हणालो, “मला नाही असं फिरायचं”! तर मला त्याच्या बाईकवरुन सबंध पोर्टब्लेअर फिरवायचा हा गडी. आमच्यासोबत राहून राहून मराठीसुद्धा शिकून घेतलं त्याने गरजेपुरतं. एके दिवशी मला म्हणाला, “यार तुम ये डेढ़-दो घण्टे क्या भाषण देते हो? मुझे सुनना है”! मी म्हणालो, “आ जाओ आज शामको”! आला. सगळ्यात मागे बसला. मराठी व्याख्यान. साहेबांना एक शब्दसुद्धा कळला नाही. पण शेवटपर्यंत बसला होता. व्याख्यान संपल्यावर म्हणाला, “विक्रमसर, मुझे समझमें तो कुछ नहीं आया, पर पूरा माहौल भावूकसा हो गया था. ज़रुर कुछ अच्छी बातेंही बताई होंगी! इतना मानते हो आप महाराष्ट्रीयन लोग वीर सावरकरको”? मी म्हणालो, “सावरकर अगर भगवान नहीं तो भगवानसे कम भी नहीं हमारे लिए”! तो विचारात पडला. जरा वेळाने म्हणाला, “हम आजतक सेल्युलर जेल किसी टुरिस्ट स्पॉटकी तरहही दिखाते आए है. आज पहली बार सोच रहा हूँ की, उसके साथ लोगोंकी कितनी भावनाएँ जुडी हो सकती है! आईंदासे मैं जेल ले जाते वक़्त ये ध्यान रखूँगा और लोगोंको बताऊँगा की जिस इन्सानके लिए आपलोग यह जेल देखने आए हो, वह भगवानसमान है महाराष्ट्रमें”!!

    मला वाटतं, आपण मराठी लोक आपल्याच महापुरुषांबद्दल न्यूनगंड बाळगतो ना, म्हणून आपल्या लोकांना कुणी फारसे ओळखत नाही बाहेर. आपण आपल्याच लोकांची सकारात्मक बाजू डंके की चोटपे सांगायला लाजतो. तिकडे हॅवेलॉक बेटावर एक “राधानगर बीच” नावाचा नितांतसुंदर समुद्रकिनारा आहे. आशिया खंडातला तिसरा सगळ्यात सुंदर आणि भारतातला तर सगळ्यात सुंदर समुद्रकिनारा. पार गळ्यापर्यंत पाण्यात गेलात तरीही खाली पाहिल्यास पावले स्पष्ट दिसतील, एवढा स्वच्छ! तिकडे आम्ही सगळे मनसोक्त खेळलो. खेळून झाल्यावर कपडे-बिपडे बदलले आणि तिथल्या बाकड्यांच्या समूहात सगळेजण अर्धवर्तुळाकार बसलो. आमच्या मंडळींचा अतरंगीपणा असा की, आजचे व्याख्यान इथेच करुया. मग काय! अतीवसुंदर, नादमय समुद्र आणि त्या पार्श्वभूमीवर सावरकरांची कीर्ती सांगणारा मी! एवढे सगळे लोक एकत्र जमून एकाच माणसाचं ऐकताहेत म्हटल्यावर कुठून कुठून आलेले पर्यटकसुद्धा जमून ऐकू लागले. पाहाता-पाहाता शे-दिडशे माणसं जमली. क्वचितच कुणाला मराठी समजत असावं त्यांच्यापैकी. मी मुद्दामच मराठीतून व्याख्यान सुरु ठेवलं. व्याख्यान संपल्यावर एक बंगाली काका हातात भेळेचा पुडा घेऊन बकाणे भरता-भरता आले, “ये जो आप ‘सावन.. सावन..’ कह रहे थे, वह क्या था?” मला हसू आले. मी त्यांना म्हणालो, “सावन नहीं, सावरकर”! मग मी त्यांना सावरकर समजावून सांगितले, ते कसे सेल्युलर जेलमध्ये होते हेही सांगितले. त्यावर ते बाबूमोशाय काय म्हणाले असतील? म्हणे, “फिर हमारे सुभाषबाबू कौनसे सेलमें थे”? मी म्हणालो, “वह यहाँ कभी कैद थे ही नहीं! अंदमान प्रसिद्ध है मात्र सावरकरजीकी वजहसे”! तर म्हणे, “क्या बात करते हो? क्या सावरकर हमारे सुभाषबाबूसेभी बडे थे”? मी म्हणालो, “जी बिल्कुल! बल्की, सुभाषबाबूको आज़ाद हिंद सेनाकी कल्पनाभी सावरकरजीनेही दी थी. गुरु मानते थे वह सावरकरजी को! उनकी पुस्तकें बंगालीमें प्रकाशितभी करते थे सुभाषबाबू”! बंगालीकाका आता चमकले, “अरे बापरे, यह तो हमें पताही नहीं था. धन्यवाद सर”!

    पाहिलंत? इतर राज्यांनी महाराष्ट्राच्या तुलनेत खूपच कमी क्रांतिकारक दिले. पण केवढा पूज्यभाव त्यांच्या मनात आपापल्या क्रांतिकारकांबद्दल! नाहीतर आपण!! नुसती मराठी क्रांतिकारकांची यादीच करायची म्हटलं तरी खंडांमागून खंड भरतील, पण आम्ही करंटे न्यूनगंडी, त्यांच्याबद्दल बोलायलादेखील लाजतो. मुळात आम्हालाच काही माहिती नसतं तर बोलणार तरी काय म्हणा! पण माहिती तर त्या बंगाली काकांनाही नव्हती. तरीदेखील रेटून विचारलंच ना त्यांनी सुभाषबाबूंबद्दल? आणि आम्ही आमच्याच गौरवबिंदूंपासून दूर दूर पळतो. मला नाही वाटत, पंजाबात शीखेतर भगतसिंहांचा द्वेष करत असतील. नाही! तो ब्रॅण्ड आहे त्यांच्या राज्याचा!! बंगालात कायस्थविरोधी चळवळ आहे की नाही कोण जाणे, पण असली तरी कुणीही बंगालीबाबू सुभाषबाबूंचा द्वेष करताना नाही आढळणार तुम्हाला. ब्रॅण्ड आहे तो त्यांच्या राज्याचा! पण त्याच भगतसिंहांच्या इतके, किंबहूना काकणभर जास्तच क्रांतिकार्य केलेले राजगुरु! केवळ त्यांच्या जातीपायी त्यांचा द्वेष करणारे किती मराठी दाखवू तुम्हाला, बोला! यांची तोंडं सदोदित वाकडीच!! यांना टिळक नको, चापेकर नको, सावरकर तर साताजन्मीसुद्धा नको. बरं बाबा, मग जे तुम्हाला गोड लागतात त्यांच्याबद्दल तरी बोला. छे!! परप्रांतीयांसमोर आपल्याच लोकांचे गुणगान गातानाही हातभर फाटते. मुळात माहितीच काही नसतं. आणि इतरांचा द्वेष करण्यातच सगळं आयुष्य गेल्यामुळे सर्वसमावेशक भाषेत आपला माणूस पटवून देण्याचं कौशल्य तर त्याहूनही नसतं. काय कप्पाळ ब्रॅण्ड निर्माण होणार महाराष्ट्राचा? मग बोंबलायचं, “त्या अमुक राज्यात शिवाजी महाराजांना लुटारू म्हणून शिकवलं जातंय होऽ”! अरे थुक्रटराव, तू जर कधी बाहेरच्या जगात शिवरायांची चांगली बाजू सांगितलीच नाही, तर ते त्यांना जे समोर दिसेल तेच खरं मानणार ना ते येडपटा!! पण तू तर “शिवाजी कसे हिंदू नव्हतेच” असला पागल फेसबुकीया शोध लावत किबोर्ड बडवत बसलायस नाहीतर व्हिएतनामचा तो कोणतातरी नेता कसा रायगड बघायला आला होता याच्या खोट्यानाट्या कथा पसरवत बसलायस. मग जग शिवरायांना असंच काहीतरी वाट्टेल ते संबोधणार!!

    टिळक असोत, सावरकर असोत, शिवराय-शंभूराय वा थोरले बाजीराव असोत, हे ब्रॅण्ड आहेत महाराष्ट्राचे. छातीठोकपणे अमराठी आणि अभारतीय लोकांना कर्तृत्व सांगा त्यांचं. सकारात्मक बोला आणि बघाच त्यांचा महाराष्ट्राबद्दलचा आदर कसा दुणावतो ते! एवढे मोठे मोदी, पण पटेल आणि गांधी किती जरी भिन्न विचारधारांचे असले तरीही त्यांचं कर्तृत्व सांगताना कधी थकत नाहीत. केवळ ते त्यांच्या गुजरातचे आहेत म्हणून. मग आपणच का कर्मदरिद्रीपणा करावा? बिनधास्तपणे सांगा. मी आजवर जेव्हा जेव्हा बाहेरच्या राज्यांत गेलोय, तिथे तिथे सावरकर नावाचा ब्रॅण्ड स्थापन करुन आलोय. ही तरी नुसती अंदमानातलीच उदाहरणं झाली. भाग्यनगरात (हैदराबाद) तर ठाकूर राजासिंह सावरकरांचं कर्तृत्व समजल्यावर केवळ रडायचेच बाकी होते!! येत्या फेब्रुवारीत पुन्हा चाललोय मी अंदमानला. सावरकरांबद्दल अजाण असणाऱ्यांना सावरकर सांगायला. या माझ्यासोबत. ‘फिरस्ती टूर्स’च्या श्री. Abhijeet Kulkarni (+917843011155) यांच्याकडे नोंदणी करा, आणि गर्जा जयजयकार!! आपल्याकडे सोनं आहे रे. उधळा बेभानपणे मित्रांनो! आज-उद्या आदराच्या रुपाने महाराष्ट्राकडेच परत येणार आहे ते!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (सर्वाधिकार लेखकाधीन. लेखकाच्या नावाशिवाय कॉपी करु नये. लेखकाचे अन्य लेख वाचायचे असल्यास पाहा www.vikramedke.com)

    image