Category: कथा

  • After The Storm

    After The Storm

    “And if you must, then for performing this Yadnya, you shall offer me the Earth you just conquered”, Kashyapa’s voice was calm as the Maanasarovar.


    He looked at him with utmost respect. Sage Kashyapa was not a man who’d joke around. So he rose from the ground. Previously he’d risen, like a flame from the most pious pier. But that was the time when he had to fight Kaartaveerya Sahasrarjuna and his cronies. Though only a few days had been passed since then, it felt like ages. And those days saw the metamorphosis of Rama, the youngest child of Sage Jaamadagni and Sati Renuka into the most feared Parashurama, the wielder of the fiercest battle-axe. He withstood all the hardships of the war only because of the training Kashyapa gave to him. So when this time he rose, it was out of devotion, love and affection towards his Guru.

    He took some water from the Kamandalu in his hand and without thinking twice poured it into the feet of Kashyapa, who said,
    “People earn, people spend. And in between, they give up some portion. Sometimes out of fear, sometimes out of respect and sometimes simply as a duty. But rarely anyone gives up everything he just earned, only because his Guru asked him to. You are rarest even amongst those, for you had rightfully earned this Earth through Blood and Steel, and yet you didn’t even blink once when it comes to renounce it”.

    “Word of the Guru, is the word of Veda for me”, said Parashuram humbly.

    “Then you must do one more thing for me”, Kashyapa said with a smile.

    “Tell me, what it is and consider it done”.

    “Listen, before you promise”.

    “I give you my word and I’ll give my life to keep it”.

    “Very well then. Since, you have given up your claim on the Earth, you don’t have any right to dwell in it. Therefore, as the rightful owner of the planet, I banish you from my land”!

    ‘But where’d he go?’, ‘If the earth is owned by Kashyapa, where’d Rama live?’, whispered the thousand spectators. But not Parashurama. His voice was the same as it was before hearing this dreadful wish of his Guru, when he said,
    “As you please Gurudeva”.

    And the Emperor left with his hands empty and a heart filled with the satisfaction of fulfilling his duty.

    Kashyapa knew, if the order is to be restored on the Earth, it must be ruled by the Kings, not by a Sage who conquered it in the heat of passion. And this would happen only if the conquerer leaves. So he aimed for the greater good, with but a small sacrifice.

    Parashurama understood the true meaning of his Guru’s wish. But he has bigger problem to solve right now; finding a piece of Earth, that is not part of the existing Earth! His thoughts wandered around this question and so do his feet, until he reached to an impasse.

    Behind him was the earth, he was forbidden to dwell. In front of him was the vast ocean, which could have devoured anything and everything. Going back was not an option and going further was impossible. But impossible were the things he did conquer, from his very birth to single-handedly defeating the greatest Emperor of his time; all through his knowledge and might.

    He stood in front of the ocean. The ocean looked fierce with the army of infinite battle-ready tides. The scion of Bhrugus was never the one to run away from a good fight. He took out his bow and mounted an arrow on it. He then remembered his father, the most revered Sage Jamadagni. He remembered his mother, the Goddess Renuka herself. He remembered his Guru Kashyapa who trained him to defeat everything labeled ‘impossible’. And then he remembered God Shiva who opened the secrets of Dhanurveda in front of him. He bowed to his ancestors of Bhrugu clan who withstood each and every trouble life threw at them. And with the might that destroyed the Haihayas, he released it.

    The arrow sped to the sky and caught fire. Within a second it started to look like there are two Suns above, one that bestows the gift of life and another that would snatch it. The arrow crashed into the ocean with a huge explosion. And the ocean dried. It retreated back in a haste. And when the steam cleared, there was land. Land, that was never owned by anyone. Parashurama marched towards it.

    In his Aashrama, Sage Kashyapa took a moment from his busy day and simply smiled.

    — © Vikram Shriram Edke

  • Vivid

    ‘Knock knock!’, the first knocking is always gentle.

    If you want to eat out in Pune, you mustn’t choose the weekend. Because on weekends, you can surely find best food, but in another person’s plate behind whom you are standing in a queue to grab the seat. It could take ages only to get a seat in a busy restaurant on weekends. There is an age-old proverb about Pune that, ‘Pune city, where nothing’s in scarcity’! Sadly, this isn’t true these days. Because where there’s abundance, people ought to follow. And more the people, scarcer the things.

    Today must be an exception that proves the rule, though. Firstly, because the only scarce thing he came across was the crowd on the ever busy JM Road. And secondly, because he found a quiet spot in a strangely quiet restaurant on a Saturday evening. As he took his place, a young and slender waiter arrived and filled an already full glass of water. He made a note of that in mind. Of course, he did. Why wouldn’t he? That was his job, for God’s sake! At least since last few days.

    Since, Baban Atmaram Bharde relocated to Pune, he did quite a few odd jobs and dated quite a few odd women. Though, the pots he smoked were anything but few.
    “Your life is becoming hollow like this joint, day by day”, warned Selma after a round of bad coital performance on his part. That was before she dumped him, or after that? Confusing as it was, he never paid any heed.

    Baban couldn’t get any of his affairs straight, until he found an online group called, ‘The Daily Meal’. It was a social media group of amateur food critics. Their slogan was ‘We are amateur but we got zeal, We’re here to tell you how was the meal’! He laughed at them while signing in. But as the days passed, he realised that what these people were doing, he could do better. He was never a nerd, but surely an avid reader. He started writing reviews of any damn restaurants he had been to. Obviously, the recurring single-hood contributed a lot in these shenanigans of his. And yet, as he practiced more, his reviews became more and more elaborate and in turn more and more viral. Soon he became an online phenomenon in food blogging. Money, fame, respect and on top of that free meals, suddenly he had everything he dreamt of and even what he hadn’t. With his various social media handles having over a million subscribers and counting, Baban Atmaram Bharde became a sensation. Yet he didn’t stop writing in The Daily Meal. Simply because, he considered himself humble enough to remember his roots.

    ‘Thump Thump!’, the knocks obviously grow stronger after a few seconds.

    High pitched tinkles of cutleries on plates perturbed Baban to the present! It was time for the first course, of the meal, and of course it didn’t have seven courses. The young, slender waiter was vanished somewhere and an older, fat one took his place. Baban took the first sip of the soup. And as it’s delicious taste started spreading through his taste buds, his ears filled with an irritating sound,
    “Aur kuch laaun Saab (Can I get you something else, Sir)?”, the old waiter was asking in an aggressively nasal voice.

    The question was simple, yet enough to ruin the maidenhood of Baban’s sipping experience. In old days, he would have seen the waiter more sympathetically. He would have thought that this old and odd personification of hospitality might have been with the restaurant since the beginning. He would have considered him, perhaps the last relic of his kind. But not now. Now he was a star and a guest of honor for the restaurant, whose fate was relying on the matrimony of his fingers and the keyboard. And any unwanted sound could have broken that marriage even before taking place and the concentration of his fork-sharp mind, as it already happened.

    “Aur kuch laaun Saab?”, the waiter kept insisting in his creepy sound. Though Pune is considered as the cultural capital of Maharashtra, people here unfortunately prefer Hindi to start a conversation with a stranger.
    “Bolta hu baad mein (Will tell you later)”, Baban replied with as much irritation in his voice as he could gather.

    The food was really fulfilling. Not just the starters, but every other course after that. Yet everytime the waiter brought him a new dish, he kept asking,
    “Aur kuch laaun Saab”? There was something unsettling in his voice, which Baban couldn’t pinpoint. He tried to change the waiter, but strangely there was none available. In fact the whole gloomy restaurant had only two people, one Baban himself and another Baban wanted to change, practically and if possible behaviorally. Obviously he couldn’t have changed the waiter to himself, so there weren’t any other options left. ‘Where did the slender one go’, Baban wondered. ‘Could that kitchen be empty too’, he thought while glancing at it before getting bombarded by another “Aur kuch laaun Saab”?

    This time Baban kept calm and replied affirmatively for some fennel-seeds. He then got up from his seat and moved towards the wash-basin, where he washed his hands carefully. He closed his eyes and gently washed his face. But as he opened the eyes, he startled to see the waiter by his side, offering him a napkin with, yes you guessed it right, “Aur kuch laaun Saab”? This time with a grin!

    Baban reached his newly bought 3BHK in Kothrud with both his tongue and stomach satisfied. Yet his mind was anything but at peace. He had tasted one of the best meals of his life and still he couldn’t get the creepy voice of that waiter out of his mind. He was filled with an unexplainable rage. So he collected every particle of the negativity that brewed in his mind, seasoned the disappointment with some articulately twisted words and served the article smoking hot on The Daily Meal. With his reputation, the restaurant was bound to lose at least 30% of its business!

    ‘Bang Bang!’, the thumping becomes desperate after a while.

    He tried to sleep. But why wasn’t his mind calm? He remained awake for quite a few hours thinking, before hearing a knock on his door. He couldn’t remember what day it is, at first. But slowly recollected that it’s a week since he posted the review on The Daily Meal. It was a huge hit as expected, with thousands of likes and shares. Two days later came the news that the owner had to close the restaurant after severe online trolling over the waiter’s behavior. ‘Who cares? in this era where virtual life is taking over the real one, everybody has to receive flack for something some day’, Baban brushed off the slightest sense of guilt, if there was any.

    ‘Thud Thud’, the urgency is quite visible now.

    Baban got up against his wish and opened the door. He felt something piercing through his heart. It was a fork. Before closing his eyes for good, Baban tried to see the person at the other end of the fork. But all he could hear was a voice, “Aur kuch laaun Saab”?

    When even the thudding resulted in vain, the neighbours dialed One Zero Zero. Police found the body of Baban Atmaram Bharde, 33 years old, thin male, with whitish brown complexion, in his rented apartment of a single room in Kharadi. The room was smothered with the smoke of weed and the smell of decaying corpse. His desktop PC was playing a screensaver of his name. Behind that they found the half-filled Sign-up page of The Daily Meal social-media group, when one Constable touched the mouse inadvertently. It seemed to be a case of death by starving and heavy intoxication. They sent the body for postmortem, whereupon they were to keep it in the morgue before someone claims it. The latter part seemed to be of lesser possibility, though. Country, where everyday thousands of people die without anyone to cry for, who would have paid attention to an oddly placed fork in the row of some spoons?

    — © Vikram Shriram Edke.

    (Email: edkevikram@gmail.com)

  • Shards Of Time

    Space: Earth-108

    Time: t+6B

    In the midst of wheeling and whooshing sound the pod disappeared and the lab, officials presiding & the people all over the world watching on live TV, erupted in applause. Many of them thanked the statues of goddess Mother in their homes, offices and public places for this achievement. After all it was the first Time Mission, as they advertised.

    Space: Earth-108

    Time: Pre-history

    “Hamier”, she called. Her voice had a slight tremble.

    The two participant scientists Dr. Ozna and her colleague Dr. Hamier had a simple task. They have to collect a few samples of soil & plants of the pre-historic era and return in an hour. Easy as pie!

    Hamier, who’s become sure about asking her out after they return, turned towards her to reply. Silence around is denser than the forest, he thought. Too much of greenery was making him disoriented (Or was it too much of oxygen?). And yet, he didn’t need to find her. In fact he didn’t need to do anything. A stone twice the size of his head hit him hard. Obviously one blow wasn’t enough to kill a man of his size, Ozna knew that. So she hit again and again until Hamier was cracked to the death!

    Space: Zero

    Time: Real

    “I screwed up. One of them derailed from the programmed path.” T said. His voice was full of regret.

    “Then shut it down and start again from the beginning”. O replied. This crude way of troubleshooting is popular among the aliens too, a human would have thought. Alas, there wasn’t any.

    O was T’s immediate boss.

    “Please, I can fix this. There must be a way”, T begged.

    But the boss is always right, and sometimes livid too.

    “Abort immediately and restart, I said”, O ordered firmly.

    T apologetically pushed the Abort button, as he did hundreds of times before. Now it was only a matter of time for project ‘Earth-108’ to transform into the cosmic ash. His job was to start over again then. Arguing was above T’s pay grade, so did understanding the physics above O’s. Otherwise he’d have known how a time-loop works.

    They started preparing for the iteration 109.

    Space: Earth-108

    Time: t+6B

    In the lab, the statue of Mother seemed to be smiling just for a second before dusting off with the whole Earth!

    Space: Earth-108

    Time: Pre-history

    Ozna was smiling, as unbeknownst to T and O, her subjects have now learnt to light a fire. Making a wheel was obviously next on the cards.

    “Hell Mother“, they cheered for her radiantly, as she watched them with utmost affection!

    — © Vikram Shriram Edke

  • खेळ

    “Boom Beach मध्ये ना आपल्याला एक आयलंड दिलेलं असतं. त्यावर आपला बेस बनवायचा, रिसोर्सेस प्रोड्युस करायचे. तसेच दुसरे बीचेस शोधून त्यांच्यावर अटॅक करायचा. आणि ते जिंकून घ्यायचे”!
    पाच वर्षांचा अर्णव बाबांना उत्साहाने सांगत होता. त्याचे बाबा, विख्यात अॅस्ट्रोफिजिसिस्ट डॉ. ज्ञानेश्वर लॅपटॉपवर काम करता करता नुसतेच “हं” म्हणाले!

    “मी आत्ता लेव्हल 47 ला आहे, माहितीये. हे तर काहीच नाही, पार्थिव तर लेव्हल 61 वर आहे पार!”, बाबा ऐकताहेत म्हणून अर्णवने माहिती पुरवणे चालूच ठेवले.

    “पण काय रे, ज्या आयलंडवर तुम्ही हल्ला करता, त्यांचेसुद्धा डिफेन्सेस असतीलच ना?”, लॅपटॉपच्या टकटकाटाच्या पार्श्वभूमीवर डॉ. ज्ञानेश्वरांनी विचारले.

    “असतात ना”, अर्णव सांगू लागला, “आपण अटॅक करायला नेमकं असं आयलंड निवडायचं जे आपल्यापेक्षा लो-लेव्हलचं असेल, म्हणजे जिंकण्याची प्रोबॅबिलिटी वाढते”.

    “आणि लो-लेव्हलचं आयलंड नसेल तर”?

    “प्रत्येक रिअल-प्लेयर आयलंडसमोर एक आयकॉन असतो. तो टच केला की, त्याची लेव्हल शफल होते आणि त्याच्याजागी दुसरं आयलंड दिसू लागतं. लो-लेव्हलचं आयलंड आलं, तर अटॅक करायचा”!

    डॉ. ज्ञानेश्वरांना गंमत वाटली, “इंटरेस्टिंग”, असं म्हणून त्यांनी लॅपटॉपवर एन्टरचे बटन दाबले. त्यासरशी त्यांना सापडलेल्या एका नवीन एक्स्ट्राटेरेस्ट्रिअल ऑब्जेक्टचा रिपोर्ट त्यांच्या इन्स्टिट्यूटला सेण्ड झाला. तो त्यांच्या लॅपटॉपमधून लहरींद्वारे सॅटेलाईटला आणि तिथून लहरींद्वारेच इन्स्टिट्यूटच्या डेटाबेसला काही सेकंदात जाणार होता, पण! पण सेकंद वाटतो तितका छोटा नसतो. हजारो नॅनोसेकंद असतात त्यात. शिवाय लहरी या अतिशय लहरी असतात, त्या थोडीच सरळ जातात!

    सुदूर अंतराळात स्थिर उभ्या असलेल्या त्या स्पेसशिपच्या डिटेक्टरने एका खास पॅटर्नमध्ये दिव्यांची उघडझाप केली. त्यासरशी शिपमधल्या त्या दोघा एलियन्सनी एकमेकांकडे पाहून डोळे मिचकावले. समोरच्या स्क्रिनवर काही अगम्य भाषेतली अक्षरं लिहून आली होती. पृथ्वीच्या इमेजशेजारी लिहिलेल्या त्या अक्षरांचे इंग्रजी भाषांतर होत होते, “लो-लेव्हल आयलंड डिटेक्टेड”!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (सर्वाधिकार लेखकाधीन. शेअरच्या बटनावर क्लिक करूनच शेअर करावे. कॉपी-पेस्ट क्षमस्व.)
    #Short_Story #Science #Fiction #SciFi #Horror #ScHorror #Science_Fiction #BoomBeach #Astro

  • आत्मबोध

    ‘धप्प’ असा जोरदार आवाज झाला आणि अरुळसामीने आवाजाच्या दिशेने पाहिले. काय घडले, हे लक्षात यायला क्षणभरही नाही लागला त्याला.लागलीच बोंब ठोकली त्याने! त्याचा आवाज ऐकून बघता-बघता इतर नावाडीही आसपास जमा झाले त्याच्या.
    “काय झालं रं बोंबलायला”, एकाने विचारलं!
    “त्यो.. त्यो सन्याशी.. त्यो मला दर्यापारच्या फत्तरावर न्हे म्हनत हुता.. त्यानी समिंदरात उडी मारलीन् ना..”
    कुणाला काहीच लक्षात येईना हा काय सांगतोय ते. मग पुन्हा पुन्हा खोदून विचारल्यावर तुकड्या तुकड्यांनी माहिती हाती लागू लागली ती अशी की, एक कुणीतरी सन्यासी, ‘पलिकडे श्रीपादशिलेवर पोहोचवशील का’, असं विचारत नावाडी अरुळसामीकडे आला होता. हे तर अरुळसामीचे रोजचेच काम! त्याने ताबडतोब नेण्या-आणण्याचा दर सांगितला. सन्याश्याकडे तर एक फुटकी कवडीदेखील नव्हती. तो खट्टू झाला. त्याने अरुळसामीला विनवणी करून पाहिली, पण भाडं मिळाल्याशिवाय जायला नकार दिला अरुळसामीने! सन्याश्याने वाट पाहिली की कुणी भाविक आपला खर्च करेल का. पण तसं तिथे कुणीच दिसत नव्हतं. अखेरीस सन्याश्याने जरा विचार केला, काश्या आवळला आणि ‘जय माँ कालीऽ’ अशी आरोळी ठोकत समुद्रात उडी ठोकला व पोहत पोहत पुढे जाऊ लागला. हे दृश्य पाहून अरुळसामी घाबरला. पट्टीच्या पोहोणाऱ्यासाठीदेखील अंतर काही कमी नव्हते ते. शिवाय समुद्रात अनेकविध पाशवी जलचर भरलेले! पोहत पोहत श्रीपादशिलेपर्यंत पोहोचण्याची शक्यता जवळजवळ शून्यवत् होती! आपला दोन पैश्यांचा व्यवसाय एखाद्याच्या जीवावर बेतणार या भीतीने घाबरून जाऊन अरुळसामीने बोंब ठोकली!

    “आरं पन तुला तरी काय येवढं नडलं होतं पैश्यांचं? नावेत येवढे लोक बसवून न्हेतोस, त्यांच्यात एकजण फुकट न्हेला अस्ता तर काय झिजली आस्ती तुझी व्हडी”, एकाने विचारले.
    अरुळसामी अजूनच खचला. म्हणाला,
    “माजी लई म्होटी चुकी झाली ह्ये तर खरंच, पन आता येळ दवडायला नगं! आधी त्या साधुबाबाला वाचिवलं पाह्यजे”!
    हे म्हणणं सगळ्यांना पटलं. ताबडतोब एक नाव काढण्यात आली आणि तिच्यात बसून ८-१० कोळी श्रीपादशिलेच्या दिशेने निघाले. रस्त्यात ना कुठे सन्यासी दिसला ना काही झटापट झाल्याचं लक्षण! कुणा मगरीने वा माश्याने फाडलं तरी या समुद्रात काय समजणार म्हणा! अखेरची आशा म्हणून सारे श्रीपादशिलेवर पोहोचले. आणि त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही – चिंब भिजलेला तो पंचविशीचा बलदंड सन्यासी शिलेवर ध्यानस्थ बसला होता. या मंडळींची चाहूल लागताच त्याने डोळे उघडले. एवढं दिव्य करीत श्रीपादशिलेवर पोहोचणे ही केवढीतरी मोठी गोष्ट होती. सन्यासी साधासुधा तर खचितच नव्हता. या दिव्यतेने दिपलेल्या सर्वांनी वाकून नमस्कार केला सन्याश्याला.

    काही क्षण शांततेत गेले. पहिला शब्द अरुळसामीच्याच तोंडून बाहेर पडला,
    “म्हाराज मला क्षमा करा. म्या चुकलो. पैश्यापायी खुळावलो हुतो म्या. तुमचं मोठंपण वळखू शकलो न्हाई मी. जो मानूस इथवर यायला सोत्ताच्या जीवाची बी पर्वा करत न्हाई, त्याचा हितं येन्यामागं नक्कीच कायतरी हेतू आसनार. कायतरी दैवी काम आसनार. मी मूर्ख तुमच्या या कानामध्ये येत होतो. नरकात बी जागा मिळनार न्हाई मला”!
    अरुळसामी स्वत:च्याच थोबाडीत मारून घेऊ लागला. ते पाहून सन्यासी झटकन पुढे झाला. अरुळसामीचे हात धरले आणि आसपासच्या समुद्राहूनही अधिक शांत, धीरगंभीर आवाजात म्हणाला,
    ‘वेडे की खुळे नावाडीबाबा तुम्ही? का स्वत:ला प्रताडित करताहात? अहो आईची इच्छा होती लेकराने पोहत पोहत तिच्यापाशी यावं, ती तिने पूर्ण करून घेतली. तुमचा कुणाचाही काहीही दोष नाही यात. खरंच”!
    सन्याश्याचा तो दृष्टीकोन आणि आभाळभर मोठेपण सर्वांना एका क्षणात वश करून गेले! एकाने धीर करून विचारले,
    “म्हाराज हितं तुमची जेवनाची काही सोय..”?
    “सोय अशी काहीच नाही. इथे ध्यान करण्यासाठी आलोय मी. मातेने जेवू घातलं तर जेवेन, अन्यथा ध्यान संपेपर्यंत उपवेशन!”, सन्यासी सहजपणे म्हणाला!
    “त्ये काही न्हाई, माझ्यामुळं तुमास्नी तरास झालाय, तुमी हितं आसेपत्तुर रोज म्याच जेवन आनून द्येनार तुमाला. तुमी आरामात ऱ्हावा, ध्यान करा. म्या घेईन सारी काळजी. येवढं तरी प्रायश्चित्त घेऊंद्याच मला”, अरुळसामीने जाहीर करून टाकलं!
    “जशी आईची इच्छा”, सन्याश्याने हसून मान डोलावली!
    “पन म्हाराज, तुमचं नाव काय? कुठनं आलात? तमिळ तर वाटत न्हाईत तुमी?”, अरुळसामीने विचारले.
    “होय, इथला नाही मी. बंगालहून आलोय. तीर्थयात्रा करतोय मी सध्या. अवघा देश फिरलो. अंती देशाच्या शेवटच्या टोकावर ध्यान करायचं म्हणून या कन्याकुमारीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिलेवर आलो! आणि नावाचं म्हणाल, तर बरीच नावे आहेत मला. कुणी विविदिशानंद म्हणतं, तर कुणी सच्चिदानंद म्हणतं! गेले काही दिवस लोक एका वेगळ्याच नावाने हाक मारतात मला. मलाही ते नाव आवडलंय – उच्चारायला सोपं, सुटसुटीत तरीही अर्थपूर्ण – विवेकानंद! तुम्हीही हवं तर याच नावाने हाक मारा मला!”, सन्याश्याचे निरागस उत्तर!
    “स्वामी विवेकानंद”, अरुळसामीने एकवार हे नाव मनात घोळवले व सारे परत फिरले!
    त्यानंतर तीन दिवस रोज दिवसातून दोनदा अरुळसामी जेवण घेऊन यायचा व खरकटं घेऊन जायचा. या तीन दिवसांत स्वामी एक शब्दही बोलले नाहीत. सातत्याने ध्यानमग्न असायचे ते. भोजनादी विधींसाठी उठत तेवढेच!

    तिसऱ्या दिवशी चमत्कार झाला. आजवरचे सारे आयुष्य स्वामीजींच्या नजरेसमोरून सरकू लागले. प्रेमळ वडील विश्वनाथबाबू आठवले – त्यांनी शिकवलेल्या एकेक गोष्टी, बाळपणीचा रम्य, श्रीमंती काळ आठवला! दाट केसांतून मायेने हात फिरवणारी आई भुवनेश्वरी देवी आठवली! आपला झालेला नास्तिकतेकडून आस्तिकतेपर्यंतचा प्रवास नजरेसमोर उभा राहिला त्यांच्या! वडील गेल्यानंतर नशिबी आलेलं पराकोटीचं दारिद्र्य आणि त्या जीवघेण्या काळात सुखाचा झरा बनलेली श्रीरामकृष्णांची साजरी छवि डोळ्यांपुढे उभी राहिली! ठाकूर म्हणत होते, “अरे नोरेन, तुझा देव हिमालयात नाही! या.. या.. दरिद्री लोकांमध्ये आहे! होय नोरेन, हा दरिद्रीनारायणच तुझा परमेश्वर आहे! यांची सेवा कर, तीच ईश्वराची सेवा ठरेल! ना जीवाची सेवा कर ना शिवाची, ‘शिवभावे जीवसेवा’ कर नोरेन ‘शिवभावे जीवसेवा’ कर! तोच तुझा मार्ग आहे! हिमालयात जाऊन या दु:ख-दैन्यापासून पळू नकोस. लोकांमध्ये जा! त्यांचं दु:ख अनुभव! ही अनुभूतीच तुला मार्ग दाखवेल! मार्ग – दु:खहरणाचा आणि मोक्षाचाही”!
    आणि आपणही कश्यातच, अगदी आश्रमातही न गुंतता तीर्थयात्रेला निघालो होतो! सारा भारत फिरलो आपण! पराकोटीची श्रीमंती पाहिली आणि तेवढंच दारिद्र्यही अनुभवलं! सोन्यारुप्यांत खेळणारे लोक पाहिले आणि एकवेळच्या जेवणाला मोताद माणसेही पाहिली! जनतेशी काहीही देणंघेणं नसलेले संस्थानिक जमिनदार पाहिले, जुलमी इंग्रज पाहिले; तर दुसरीकडे खेतडीच्या महाराजांसारखे जाणते शासकही पाहिले! अज्ञानात खितपत पडलेला समाज पाहिला, तसेच टिळकांसारखे ज्ञानीही पाहिले! हा देश शेकडो रंगांनी नटलेला तर खराच!
    पण एक आहे, या देशातला गरीब माणूस उपाशीपोटी झोपेल एकवेळ, पण त्याच्या मनात समाधान असेल! आस्थेचं, आस्तिकतेचं आणि अध्यात्माचं समाधान! याउलट इंग्रज शासकांकडे पैश्याने विकत घेण्याजोग्या साऱ्या काही सुखसुविधा आहेत, पण शांत झोप नाही, समाधान नाही!
    हे दोन्ही जोडलं पाहिजे! एकत्र केलं पाहिजे!! पाश्चात्यांची औद्योगिकता टिकवून त्यांना भारतीय अध्यात्म शिकवलं पाहिजे आणि भारतीयांचं समाधान टिकवून येथे पाश्चात्य सुखसोयी आणल्या पाहिजेत! कुणीतरी पूल बनून हे काम केलं पाहिजे!
    स्वामीजींच्या नजरेसमोर दिव्य प्रकाश पसरला होता! आत्मबोधाचा हा क्षण! त्या प्रकाशात जराशी हालचाल झाली आणि स्वामीजींच्या अत्यधिक संवेदनशील झालेल्या ग्रहणक्षम मनावर तरंग उमटले,
    ‘कुणीतरी? कुणीतरी का? तूच का नाही? तूच का बनत नाहीस या दोन परस्परपूरक जगांना जोडणारा पूल?’
    स्वामीजींच्या नजरेसमोर काही दिवसांपूर्वी वाचलेली ‘जागतिक धर्मपरिषदे’ची बातमी झळकू लागली! आज त्यांच्या प्रवासाची सांगता झाली होती. तीर्थयात्रेचं उद्यापन झालं होतं. आत्मबोधाची अनुभूती झाली होती. आणि आयुष्याला उद्देश मिळाला होता!

    यानंतर काही महिन्यांतच शिकागोची ‘जागतिक धर्मपरिषद’ टाळ्यांचा कडकडाट आणि भावनातिरेकाने मारलेल्या आरोळ्यांनी दुमदुमून गेली! याला कारणीभूत होते पाच शब्द! होय, केवळ पाचच शब्दांत स्वामीजींनी उपस्थित सर्व धर्ममार्तंडांना सर्वश्रेष्ठ धर्म कोणता, ते सप्रमाण दाखवून दिले! तलवार न उगारता, कुणालाही न फसवता, रक्ताचा एकही थेंब न सांडता एका हिंदू सन्याश्याने अवघी अमेरिका जिंकून घेतली! बघायला गेलं तर केवळ पाचच शब्द! पण त्यांच्यामागे स्वामीजींची सारी तीर्थयात्रा, सारा अनुभव, भावना आणि सारी सारी आध्यात्मिक अनुभूती सामावलेली होती! ते पाच विश्वविजयी शब्द होते,
    “सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका”!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (सर्वाधिकार लेखकाधीन. लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही स्वरुपात पुनप्रकाशित करू नये. केल्यास गुन्हा समजून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. आवडल्यास केवळ शेअर बटनावर क्लिक करून शेअर करावे, ही विनंती. लेखकाच्या अन्य कथा वाचण्यासाठी व ‘स्वामी विवेकानंद’ या विषयावर लेखकाने दिलेली व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)

    image

  • जय हो ‘रहमान’भाई!!

    जय हो ‘रहमान’भाई!!

    रात्रीचे दहा वाजून गेलेले. चेन्नईच्या ‘अपोलो कॅन्सर हॉस्पिटल’मध्ये सर्वत्र निजानीज झालेली. स्पेशल रुम क्र. १३३५ मध्ये लहानग्या निहारिकाचीही झोपायची तयारी चालू होती. अवघी पाच वर्षांची पोर. आजच केमोथेरपीचे एक सत्र संपले होते तिचे. आई — निखिला, बिछाना नीट करून देत होती तिचा. सर्व तयारी मनासारखी झाल्यावर निहारिकाने हळूच आईच्या डोळ्यांत पाहिले.

    “हो माहितीये मला”, आई निखिला हसून म्हणाली. आणि तिने आपल्या मोबाईलवर मंद आवाजात ‘हायवे’ चित्रपटातले गीत ‘सूहा साहा’ लावले. गेले काही दिवस हा रोजचाच दिनक्रम (की रात्रीक्रम!) झाला होता दोघींचा. रोज झोपताना निहारिकाला ‘सूहा साहा’ ऐकायचेच असायचे. काही दिवसांपूर्वी या गीताची जागा ‘कडल’मधील ‘सिथ्थिरई निला’ कडे होती. त्याआधी निहारिकाला ‘127 Hours’मधील ‘इफ आय राईज्’ हवे असायचे झोपताना. त्याआधी ‘विनईतांडी वरुवाया’चे शीर्षकगीत आणि कधी कधी ‘स्वदेस’मधले ‘आहिस्ता आहिस्ता’!! सध्या निहारिका — ‘निका’चा जीव ‘सूहा साहा’वर जडला होता. आणि लपवायचे कश्याला — तिची आई निखिलाचाही!

    इतके दिवस ऐकूनही या गीताचा रोज तस्साच आणि तितकाच जादुई प्रभाव कसा काय पडतो, हे निखिलाला कधीही न सुटलेले कोडे होते. पण आता अनुभवाच्या या टप्प्यावर तिने ‘रहमान’च्या कोणत्याही संगीतामागची कारणमीमांसा शोधणे बंद केले होते. तो — रहमान — तिच्या लेकराला जगवतोय एवढे पुरेसे होते तिच्यासाठी!

    हे गीत सुरू केल्यानंतर कितीही दुखत असलं, त्रास होत असला तरीही कशी कोण जाणे पण पाचच मिनिटांत निका गाढ झोपी जायची. आजही तेच घडलं! निका झोपी गेली आणि निखिलाचं मन रहमानच्या संगीतासोबत वाहात वाहात मागे जाऊ लागलं. चार वर्षांपूर्वीची — २०१० सालची ती सकाळ लख्खपणे डोळ्यांसमोर उभी राहिली निखिलाच्या. दिवाळीच्या एक दिवस आधीची ती सकाळ! त्याच दिवशी डॉ. टि. राजा यांनी निकाला ऍक्युट ल्युकेमिया —कॅन्सर असल्याचं सांगितलं होतं. नवरा-बायकोच्या पायाखालची जमिनच सरकली होती त्यादिवशी.

    “हे बघा मिस्टर आणि मिसेस नटराजन”, डॉक्टर जणू शब्द शोधत शोधत म्हणाले होते, “तुम्ही दोघेही सुशिक्षित आहात, समजूतदार आहात, फॉरेन रिटर्न्ड आहात. मला तुम्हाला कोणत्याही भ्रमात ठेवायचं नाहीये. ल्युकेमिया बरा झाल्याची खूप उदाहरणे आहेत. परंतू निकाची केस जरा वेगळी आहे. अवघी दोनच वर्षांची आहे ती. तिचं वय आणि आजाराची तीव्रता पाहाता तिच्या हाती आता सहा आठवड्यांपेक्षा.. अं.. जास्त काळ उरलेला नाहीये”.

    डोळ्यांत पाण्याचा सागर गोळा झालेला माझ्या. आणि त्या सागराच्या भोवऱ्यांत बुडत चाललेलं माझं मन. तश्यात डॉक्टरांचा आवाज लांबच्या कुठल्यातरी किनाऱ्यावरून आल्यासारखा वाटला नसता तरच नवल. शब्दांच्या लाटा कानावर आदळत होत्या. आज्ञाधारक संगणकासारखा मेंदू त्यांचे अर्थही लावत होता. पण त्या शब्दांचा कान ते मेंदू असा प्रवास आईचं काळीज जाळत चालला होता, हे कुणाला दिसणार? माझं अंतर्मन केव्हाच खुर्चीवरून उठलं होतं अन् डॉक्टरांची कॉलर पकडून जाब विचारत होतं,

    “काय डोकं-बिकं फिरलंय का डॉक्टर तुमचं? अहो साधा ताप आला असणार माझ्या बाळाला. रात्रीची अचानक घामाघूम होते हो ती फक्त! म्हणून थेट कॅन्सरवर कुठे चाललात? अहो, जरा बघा तरी हो तिच्याकडे एकदा. फुलासारखी नाजूक आहे हो माझी पोर. देव कसा काय तिच्याशी एवढा निष्ठूरपणा करेल. सांगा ना.. सांगा ना…”

    प्रत्यक्षात ओठ जणू शिवले गेले होते. आणि शरीर क्रुसावर चढवलेल्या येशूसारखं कुणीतरी खिळ्यांनी खुर्चीला जखडून टाकलं होतं.

    डॉक्टर सांगत होते, “आपण आता जो इलाज करणार आहोत, तो केवळ निकाचा अखेरचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी. वेदना सुसह्य व्हाव्यात म्हणून..”

    मला पुढचं काहीही ऐकू येणं केव्हाच बंद झालं होतं. ‘सहा आठवडे’ या दोनच शब्दांनी माझं अवघं आयुष्य व्यापून टाकलं होतं. आणि निष्ठूर मृत्यू मला व्यापूनही दशांगुळे उरला होता — जिभल्या चाटीत आणि माझ्या पोटच्या गोळ्याकडे वखवखलेल्या नजरेने पाहात!

    मी केव्हा आणि कशी निकाच्या रुममध्ये आले मला कळलंच नाही. नवरा औषधं आणि इंजेक्शन्स आणायला बाहेर गेला होता. निका झोपली होती. आमच्या लहानश्या जगाची झालेली उलथापालथ गावीही नव्हती तिच्या. इतका वेळ रोखून धरलेला बांध तिच्या शांत चेहऱ्याकडे पाहाताच फुटला. आपोआप हुंदका बाहेर आला. पण तो नुसताच हुंदका नव्हता. अस्पष्टसे शब्दही मिसळले गेले होते त्यात — ओ पालनहारे, निर्गुण ओ न्यारे, तुमरे बिन हमरा कौनु नाही..! परमेश्वरा, तुझ्याशिवाय माझं दु:ख निवारणारं कुणीच नाही रे..!! सवय म्हणा वा अन्य काही, पण मनाने त्याही स्थितीत नोंद घेतली होती — ‘लगान’!

    माझ्या आवाजानेच बहुतेक, निकाला जाग आली. तिने माझ्याकडे पाहून हात पसरले. तिच्या इशाऱ्याचा अर्थ ध्यानात यायला वेळ लागला मला. पण मी ताबडतोब मोबाईलमध्ये ते गाणे शोधले. हळू आवाजात गीत लावून फोन तिच्या उश्याशी ठेवून दिला मी. त्याक्षणी तिची कोणतीही इच्छा मी पूर्ण केली असती. निका हे गाणे ओळखायची. तिच्या चेहऱ्यावर परिचयाचे हासू फुलले. त्यानंतर दोनच मिनिटांत ती पूर्वीसारखीच गाढ झोपून गेली. गीत चालूच होते — प्रभुजी हमरी हैं बिनती, दुखीजन को धीरज दो, हारे नहीं वो कभी दुखसे.. हैं पथमें अंधियारे, दे दो वरदानमें उजियारे… शब्द समजणं केव्हाच बंद झालं होतं. मात्र त्या संगीताने अवघं वातावरण कुंद करून सोडलं होतं. खूप सकारात्मक असं.. भारून टाकणारं काहीतरी रुग्णालयाच्या खोलीत निर्माण झालं होतं. त्या भारलेल्या क्षणीच मी निर्णय घेतला. निकाच्या शांत चेहऱ्याकडे पाहाताना निर्धार अजूनच पक्का झाला होता माझा!

    नवऱ्याच्या कामाच्या शिफ्ट्समुळे त्याला तर शक्यच नव्हते. त्यामुळे निखिलाच सकाळी सकाळी सारं सामान घेऊन आली. आता तिचा मुक्काम तिच्या बाळासोबतच असणार होता. औषधोपचार सुरू झाले. परंतू औषधांसोबतच निखिला आणखी एका गोष्टीचे डोस देत होती निहारिकाला — रहमानची गाणी! जगातील इतर कोट्यवधी लोकांसारखाच तिचा खूप विश्वास होता रहमानच्या संगीतावर आणि त्यात गवसणाऱ्या परमेश्वरावर! निहारिका केवळ रहमानच्याच संगीताला चांगला प्रतिसाद देते, आनंदी होते, कितीही वेदना होत असल्या तरीही विसरते; हे निखिलाने बरोब्बर हेरलं होतं. त्यातल्या त्यात ‘ओ पालनहारे’ आणि ‘कन्नथ्थिल मुथ्थमिटाल’ मधील ‘ओरु देवम् तंद पूवे’ विशेष आवडते होते तिचे. डॉक्टरांनी फक्त सहाच आठवड्यांचा, म्हणजे अवघ्या ४२ दिवसांचाच अवधी दिला होता. ती निहारिका नाही नाही म्हणता म्हणता दिड महिना उलटून गेला तरी जिवंत होती, एवढेच नव्हे तर उपचारांना प्रतिसादही देत होती. डॉ. राजांच्या भाषेत सांगायचं झालं तर हा वैद्यकीय जगतातला चमत्कारच होता. निहारिकासारख्या केसेसमध्ये कुणीच अशी प्रगती केली नव्हती. निखिलाला ठाऊक होतं, हे सारं केवळ एकाच व्यक्तीमुळे घडतंय — ए. आर. रहमान!

    एकदा निकाच्या नियमित तपासणीसाठी एक नर्स खोलीत आली. त्यावेळी योगायोगाने ‘दिल्ली ६’मधलं ‘अर्जियाँ’ सुरू होतं. दोनेक मिनिटं गाणं ऐकल्यावर नर्स अचानक म्हणाली,
    “कव्वाली? आर यू मुस्लिम्स”?

    निखिलाने मानेनेच नकार दिला. तो विषय तिथेच थांबला. निखिलाच्या मनातून मात्र तो विषय गेला नाही. त्यादिवशी रात्री सारे झोपले तरी निखिला एकटीच स्वत:शी विचार करत जागी होती — आपला धर्म हिंदू. निहारिकाचे बाबा ख्रिश्चन. निहारिकाला आजवर कित्येकदा रक्त द्यावे लागलेय. रक्तपेढी थोडीच धर्मानुसार रक्ताची वर्गवारी करते? कित्येकदा कुणा मुसलमानाचंही रक्त तिला दिलं गेलं असेलच की. म्हणजे निहारिकाच्या धमन्यांत एकाचवेळी तीन वेगवेगळ्या धर्मांचं रक्त वाहातंय! मग निहारिकाचा धर्म कोणता? रहमानच्या संगीताचंही असंच असतं का? त्याचा धर्म आहे इस्लाम. म्हणून मग त्याचं संगीत मुसलमान ठरतं का? असं असेल तर मग रोज सकाळी गणपतीच्या मंदिरात गेल्यावर माझ्या कानांत ‘अर्झियाँ’ वा ‘हायवे’मधील ‘तू कूजा’ कसं काय वाजतं मग? आपला ख्रिश्चन नवरा का बरं ‘स्वदेस’मधलं ‘पल पल हैं भारी’सारखं श्रीरामाचं भजन ऐकताना भावूक होतो मग? ‘सपने’मधलं ‘रौशन हुई रात मरियमका बेटा उतरके जमींपे आया’ ऐकल्या ऐकल्या शेजारी राहाणाऱ्या फातिमामौसींच्या डोळ्यांत का बरं पाणी उभं राहिलं होतं मग? ‘कडल’मधलं ‘अन्बिन वासले’ तर चर्चमध्ये गायचं गीत आहे ना, तरीही केवढं आवडतं आपल्याला! खरं तर इस्लाम हा रहमानचा केवळ वरवरचाच धर्म आहे. तो त्याचा खरा धर्म नाहीच. त्याचा खरा धर्म आहे अध्यात्म! अध्यात्म — जे जगातल्या प्रत्येक धर्माच्या गाभ्यात आहे. आणि म्हणूनच रहमानचं संगीत वैश्विक आहे. त्यातल्या भावना सच्च्या आहेत. त्यातल्या जाणिवा दैवी आहेत. इतरांची गाणी आवडतात किंवा आवडतही नाहीत, परंतू रहमानची गाणी मात्र पार आत्म्यात झिरपतात.. जणू काही तेच त्यांचे खरे घरटे असावे! मी जेव्हा जेव्हा रहमानचं एखादं गीत, त्याच्या संगीताचा एखादा लहानसाच तुकडादेखील ऐकते, तेव्हा तेव्हा असं वाटतं जणू मी माझ्या मोबाईलवरून थेट परमेश्वराला फोन लावलाय आणि तोही त्याच्या खाजगी क्रमांकावर!

    विचार करता करता निखिलाला केव्हा झोप लागली तेच समजले नाही! जाग आली तेव्हा नुकतंच कुठे उजाडू लागलं होतं. बघता बघता तीन वर्षं कशी भुर्रकन उडून गेली होती! निहारिका आता हळूहळू बरी होऊ लागली होती. सावरू लागली होती. बागडू लागली होती. लब्बाड ‘जोधा-अकबर’मधलं ‘ख्वाजा मेरे ख्वाजा’ लावलं की एखाद्या सूफी संताप्रमाणे एक हात आकाशाच्या दिशेने उंचावत आणि दुसरा हात दानमुद्रेत आडवा पसरत गिरक्या घेते. मध्येच “आई ते ‘रंग दे बसंती’मधलं ‘लुकाछुपी’ लाव ना”, म्हणते! तिला रुग्णालयातून केव्हाच सुटी मिळालीये. आता फक्त अधून-मधून केमोथेरपीसाठी रुग्णालयात यावं लागतं. याप्रकारात निकाचे सारे केस झडले. निखिलाला वाईट वाटलं, तर निहारिकानेच तिला ‘लगान’मधलं ‘चले चलो’ ऐकवत धीर दिला! आजही अशीच केमोथेरपी संपवून निखिलाने गाडी सुरू केली तर मागच्या सीटवर बसलेली निहारिका मोठ्ठ्याने ओरडली, “आई, ‘रंग दे बसंती’ लाव ना, मला नाचायचंय”! अन् आनंदाला पारावार न राहिलेली निखिला कारच्या म्युझिक-सिस्टिमवर गाणं लावता-लावता स्वत:लाच ऐकू जाईलसे पुटपुटली, “जय हो रहमानभाई.. जय हो”!!!

    (सत्यघटनेवर आधारित)

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाच्या अन्य कथा/लेख वाचण्यासाठी व लेखकाने आजवर दिलेली विविध व्याख्याने ऐकण्यासाठी आणि तुमच्या परिसरात लेखकाची व्याख्याने आयोजित करण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

  • कथा

    जुनी गोष्ट आहे. त्याकाळी खूप फळं होते. परंतू सफरचंद सगळ्यांमध्येच सर्वश्रेष्ठ होते. त्याचा रंग, आकार, चव सारे काही दैवी! लोकांनाही इतर फळेही आवडायची, मात्र सफरचंद सगळ्यात जास्त आवडायचे.

    काळ पुढे पुढे जात राहिला. काही वर्षांनी एक नवीन फळ आले – आंबा! त्याची चव, रंग, आकार, सुवास सारेच निराळे! नुसता जवळ घेतला तरी मन मोहरून जायचे अक्षरशः! साहजिकच कित्येक सफरचंद-रसिक आंब्याकडे वळले. त्यांना आता आंबाच सर्वश्रेष्ठ वाटू लागला. आंबा होताच तेवढा गुणी!! परंतू यासोबतच आणखीही काही घटना घडल्या. ज्यांनी केवळ आणि केवळ सफरचंदालाच आपल्या ह्रदयसिंहासनी बसवले होते, ते केवळ सफरचंदाशीच निष्ठावान राहिले. त्यांच्या दृष्टीने आंबा मुळातच चुकीचा, निकृष्ट ठरला. त्यांनी त्याला नावे ठेवायलाही सुरुवात केली. नाही नाही ते बोलायला सुरुवात केली. काही रसिक मात्र दोन्हीही फळांचे सारखेच दिवाने झाले होते. त्यांना काय, चव चांगली असण्याशी मतलब. याखेरीज केवळ आंब्याशीच निष्ठावान असणाऱ्या रसिकांचाही एक गट हळुहळू तयार होऊ लागला होताच! त्याही मंडळींचे सफरचंद-निष्ठांसारखेच सूत्र होते — आंबा तेवढा श्रेष्ठ, बाकी सारेच निकृष्ट!!

    दरम्यान आणखीही एक घटना घडली. इतर फळांना आंब्याला मिळालेले यश पाहून कमालीचा हेवा वाटू लागला होता. सफरचंदाची इतक्या वर्षांची मक्तेदारी आपल्याला लाख प्रयत्न करूनही मोडता आली नव्हती, पण या काल आलेल्या पोराने – या आंब्याने ती पहिल्या झटक्यातच मोडून काढली; नव्हे तर स्वत:चे अढळस्थानही स्थापित केले — हे त्यांच्या रागाचे मूळ कारण होते! अश्यातच कुणा एका फळाच्या मेंदूत कल्पना चमकली! त्याने थोडा अभ्यास केला, समजून घेतले आणि स्वत:ला आंब्याचा वेष घेतला. थोड्याफार प्रयत्नाने चवीचीही नक्कल जमवून आणली! मुळातच माल नकली असल्याने किंमतही कमीच होती. चव आणि इतर अनुभवही अगदी जसाच्या तसा नसला तरीदेखील जवळजवळ सारखाच होता. साहजिकच ज्यांना आंबा परवडत नव्हता वा ज्यांच्यात मोसम येईपर्यंत थांबण्याचा संयम नव्हता, असे सारेच लोक या नकली आंब्याकडे धाव घेऊ लागले! तुफान चालू लागला हा नकली आंबा. पण काही दिवसच. कारण ही क्लृप्ती आता इतरही फळांना समजली होती. हा हा म्हणता म्हणता बाजारात या नकली आंब्यांचे पेवच फुटले. सगळ्या फळांनी आंब्याच्या लोकप्रियतेच्या या वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायला सुरुवात केली. सगळी फळं आपली मूळची, खरीखुरी चव विसरून आंबा होण्याच्या पाठी लागले होते. अपवाद केवळ — सफरचंदाचा! कितीही नाही म्हटलं तरी तो एकेकाळचा राजा होता. काळ अनुकूल असला की स्वयंप्रज्ञा नसलेली मंडळी अशीच नकला करतात, हे त्यानेही पूर्वी कधीकाळी अनुभवलेले होते. एवढेच नव्हे, तर एकच एक चव सगळीकडून मिळत राहिली, तर लोक त्या चवीलाच कंटाळतात हे त्याला पक्के ठाऊक होते! त्यामुळे तो नेटाने त्याची मूळ चव संपूर्ण ताकदीनिशी देतच राहिला, रसिकांना तृप्त करतच राहिला!

    इकडे खरा आंबा मात्र अतिशय हैराण झाला होता. सगळीकडे त्याचीच चव निर्माण झाल्यामुळे त्याची किंमत आपोआपच कमी झाली होती. शिवाय त्याची चव मुळची असल्यामुळे तिच्यासाठी एक विशेष अशी प्रक्रिया होती. तिला वेळ लागायचा. बाजारात आता तिच चव खूपच कमी वेळात उपलब्ध होऊ लागल्यामुळे आंब्याला आता कुणीच विचारेनासं झालं होतं; ना कुणाला त्याच्या मोसमाची अन् प्रक्रियेची वाट पाहायची इच्छा उरली होती. फळबाजारातून आपले चंबूगबाळे आवरण्याखेरीज आंब्याकडे कोणताच मार्ग उरला नव्हता. की होता..?

    आंब्याने निश्चय केला, अशी सहजासहजी हार मानायची नाही. कल्पनातीत कष्टांतून तावून-सुलाखून हे स्थान मिळवलं होतं त्याने. खरीखुरी, मूळची चव ही जमेची बाजू होती त्याची. गाभा होता त्याचा. त्याने खूप विचारपूर्वक निर्णय घेतला. आपला खरेपणाचा आणि वेगळेपणाचा गाभा कायम ठेवला त्याने. आणि त्याभोवती एक स्वतंत्र शरीर गुंफू लागला तो. स्वतंत्र शरीर, नवे शरीर! आधीपेक्षाही जास्त मेहनत घेतली स्वत:वर. आधीपेक्षाही अधिक कष्टांतून गेला तो. पण अखेरिस त्याने यश मिळवलेच! आंब्याचे रुपांतर आता वेगळ्याच चवीच्या, वेगळ्याच रंगाच्या, वेगळ्याच सुगंधाच्या, कुणी स्वप्नातही ज्याची कधी कल्पना केली नसेल अश्या एका नव्याच फळात झाले — स्ट्रॉबेरी!!

    स्ट्रॉबेरी पूर्ण दिमाखानिशी बाजारात उतरला. तो अनुभव जरी दैवी देत असला, तरीही त्याची अंतर्गत रचना इतकी काही गुंतागुंतीची होती की, कुणीच त्याची नक्कल करू शकत नव्हते. आणि आता नक्कल केली तरी त्याला फरक पडणार नव्हता! कारण, त्याला माहिती होते की, आपला खरेपणा हीच आपली ताकद आहे. याच खरेपणाच्या जोरावर तो जसा आंब्यातून स्ट्रॉबेरी बनला तसाच उद्या गरज पडली तर आणखीही काही वेगळे बनेल. फक्त हिंमत हारून थांबणार नव्हता तो आता!

    लोक काय, सतत नवीन चवीच्या शोधात असतात. त्यामुळे बाजाराने या स्ट्रॉबेरीचेही जोशात स्वागत केले! शिवाय पूर्वीची आंबा असतानाची पुण्याईही होतीच की त्याच्यासोबत! अर्थात रसिकांमध्ये पुन्हा एकवार गट-तट पडले. काही रसिक ताबडतोब या नव्या स्ट्रॉबेरीचे दिवाने झाले, तर काही केवळ आंब्याशीच निष्ठावंत असल्याने त्यांनी स्ट्रॉबेरीला स्पर्श करणेही पाप मानले! तेच फळ, तेच रसिक — तरीही दृष्टीकोन मात्र वेगळाच. कुठे थोडा अहंकार, तर कुठे परिवर्तन नाकारण्याची वृत्ती! परंतू स्ट्रॉबेरीला आता कश्यानेच फरक पडणार नव्हता. त्याला अनुभवाने कळून चुकले होते की, चांगला अनुभव देणे एवढेच आपल्या हातात असते. बाकी सगळेच तात्पुरते! अपेक्षेप्रमाणेच हळुहळू केवळ स्ट्रॉबेरीच्या निष्ठावंतांचाही गट तयार झालाच! त्यांपैकी बहुतेकांना आंबाही मनापासून आवडत होता आणि स्ट्रॉबेरीही! स्ट्रॉबेरी आता सिद्ध होता — नवनवीन प्रयोग करण्यासाठी! त्यासोबतच सफरचंदही टिकून होता — आपली वैशिष्ट्यपूर्ण चव देत, रसिकांना सुखावत!!

    मित्रहो, उपरोक्त कथेत सफरचंद आहे — संगीतशिरोमणी इलयराजा! आंबा आहे — १९९२ ते २००३ पर्यंतचा ए. आर. रहमान! नकली आंबे आहेत — १९९८ ते २००३ दरम्यानचे जवळजवळ सारेच संगीतकार! आणि स्ट्रॉबेरी आहे — २००३ नंतरचा ए. आर. रहमान!!

    (‘ऑर्कुट’ भरात असण्याच्या काळात वाचलेल्या एका इंग्रजी रुपककथेचा स्मृतीच्या आधारे, स्वैर आणि भरपूर स्वातंत्र्य घेऊन केलेला अनुवाद. मूळ लेखक अज्ञात.)

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख/कथा वाचण्यासाठी व व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी संपर्क करा — www.vikramedke.com)

    image

  • सागरा प्राण तळमळला..!

    सागरा प्राण तळमळला..!

    image

    ब्रायटन गावातली ती सायंकाळ तशी नेहमीसारखीच तर होती. तेच वातावरण, तीच पक्ष्यांची किलबिल, तीच फिरायला आलेली कुटूंबे.. क्वचित काही प्रेमी जोडपी.. आणि नित्यनेमाने फिरायला येणारे तेच दोघे. दोन काळे तरुण. त्या वर्तमान खेडेगावाच्या दृष्टीने काहीसे दुर्लक्षित, परंतू इतिहासाच्या आणि भविष्याच्या दृष्टीने मात्र अत्यंत महत्वाचे.

    त्यांच्यापैकी एकाचे नाव होते निरंजन पाल. आणि कुणाला सांगून खरे वाटले नसते की, जो दुसरा मुळचा अतिशय रुपवान परंतू सध्या आजाराने खंगून गेल्यासारखा वाटणारा पंचविशीतला तरुण होता त्याने आत्ता काही दिवसांपूर्वीच ज्या साम्राज्यावरून म्हणे कधी सूर्य मावळत नाही ते – जगद्व्यापी ब्रिटीश साम्राज्य – पार मुळापासून हादरवून सोडले होते. तो जरी सध्या अतिशय कृश, अक्षरश: मरणप्राय वाटत असला तरीही त्याचे नाव ऐकताच त्या किनाऱ्यावरील एकूणएक ब्रिटीशांमध्ये धावपळ माजली असती! त्याचे नाव? त्याचे नाव होते – विनायक दामोदर सावरकर!

    हो तेच ते सावरकर, जे इंग्रजांच्या राजधानीत राहून त्याच इंग्रजांचे जुलमी साम्राज्य उखडण्यासाठी बॉम्ब बनवून भारतात पाठवत होते! हो तेच ते सावरकर, ज्यांनी नुकताच कर्झन वायलीचा वध करणाऱ्या मदनलाल धिंग्राविरुद्धची निषेधसभा हाणून पाडली होती! हो तेच ते सावरकर, ज्यांनी ती सभा उधळल्यानंतर वृत्तपत्रांना पत्रे पाठवून सगळ्यांचीच तोंडे कायदेशीररित्या बंद करून टाकली होती! हो तेच ते सावरकर, ज्यांनी अटकेत असलेल्या धिंग्राचे ब्रिटिशांनी दाबून टाकलेले निवेदन प्रसिद्धवून इंग्रजांची त्यांच्याच देशात पार नाचक्की करून टाकली होती! हो तेच ते सावरकर, जे शत्रूच्या शिबिरात राहून त्याच शत्रूच्या शत्रूंशी संधान बांधून होते! हो तेच ते सावरकर, ज्यांना ‘ग्रेज इन’ने ‘बॅरिस्टर’ पदवी देऊ केली होती, परंतू ‘ब्रिटिश साम्राज्याशी एकनिष्ठ राहाण्याची शपथ घ्यावी लागणार असेल तर मला तुमच्या पदव्या नकोत’ असे ज्यांनी त्या संस्थेच्या चालकाला सुनावले होते! हो तेच ते सावरकर जे..! असो!!

    पण तेच सावरकर आज फिरताना शांत वाटत होते. नेहमी तर किती काय काय बोलत असतात. नवनवीन गोष्टी सांगत असतात. निरंजनला कळेचना! काहीतरी बोलायचं म्हणून त्यांनी बोलायचा प्रयत्न केला,

    “आज हवा छान आहे नाही”?

    उत्तरादाखल सावरकरांनी त्यांच्याकडे नुसतंच पाहिलं. मग हळूहळू एक-एक शब्द उच्चारत म्हणाले,

    “निरंजन, मला कळत नाही, असा अजून किती काळ तुझ्यावर ओझं बनून राहायचं मी..”

    “ओझं? अहो काय बोलता सावरकर? तुमचं ओझं का होणार आहे मला? अहो, तुम्ही लंडनमध्ये जो पराक्रम करून दाखवला आहे तो शतकानुशतकांतून कुणीतरी एखादाच करून दाखवतो. अहो, नायक आहात तुम्ही आम्हां भारतीयांचे. बॅरिस्टर झाला असता, तर ऐश्वर्यात लोळला असता अक्षरश:, परंतू केवळ देशजननीपायी क्रांतिचा खडतर मार्ग स्वीकारणारे तुम्ही.. अहो सारे इंग्रज तुम्हाला आतंकवादी समजत होते, इंग्लंडच्या त्या तसल्या भयानक हवामानात तुम्हाला कुणी छप्परही द्यायला तयार नव्हते, तेव्हा तुम्ही काय अपेष्टा काढल्यायत त्याच्या कथा बाबांनी (बिपिनचंद्र पाल) सांगितल्यावर तर मी तुमचा पार भक्तच झालो आहे. म्हणूनच तर आपण समवयीन असूनही आणि तुम्ही इतक्या वेळा बजावलेलं असूनही तुम्हाला ‘अरे-तुरे’ करावंसं वाटलं नाही कधी मला. अहो, इंग्रजांच्या ससेमिऱ्याममुळे तुमची तब्येत ढासळलीये आणि डॉक्टरांनी तुम्हाला हवेत बदल सुचवलाय हे बाबांकडून कळल्याबरोब्बर तुम्हाला इकडे माझ्याकडे पाठवून द्यावं असा हट्टच धरला मी त्यांच्यापाशी! तुमची तब्येत सुधारावी या परमार्थासोबतच, तुमच्यासारख्या महापुरुषाकडून चार गोष्टी शिकता आल्या तर सोने होईल माझ्या आयुष्याचे, हा स्वार्थही होताच त्यापाठी! आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही माझ्यावर ओझे आहात..?”

    सावरकर काही न बोलता नुसतेच खाली पाहात चाललेले. काही क्षण तसेच शांततेत गेले. धीर करून निरंजनच परत म्हणाले,

    “आज तुम्ही एवढे गप्प का..?”

    काहीही न बोलता सावरकरांनी एवढा वेळ हातात घट्ट दाबून धरलेला, चुरगळलेला कागदाचा तुकडा पुढे केला. निरंजनने हातात घेऊन पाहिला, तर ती तार होती – सावरकरांचा लहानगा मुलगा प्रभाकर वारल्याची!
    निरंजनच्या डोळ्यांत पाणी तरळले. सावरकरबंधू क्रांतिकार्यात सक्रिय झाल्यापासून त्यांच्या कुटूंबाला काय काय जाच सहन करावा लागतोय हे इंग्लंडमध्ये साऱ्यांना ठाऊक होते. इंग्रजांनी घरा-दारावर जप्ती आणली होती. बंधू नारायण लहान. त्याला कित्येकदा पोलिस चौकीच्या फेऱ्या माराव्या लागल्या होत्या. क्वचित मारहाणही झालेली. कुणीच आसरा द्यायला तयार नाही. दोन स्त्रिया – माई आणि येसूवहिनी – त्यांच्या पदरी मुलं – मात्र इंग्रजांच्या भीतीपायी त्यांना साधा आसरा द्यायलाही कुणी तयार होईना. माहेरी गेल्या तरी राहायची सोय नाही. स्वत:च्या माहेरी, त्या हक्काच्या घरीदेखील अक्षरश: गायींच्या गोठ्यात राहून दिवस काढत होत्या त्या. त्यांच्या आईवडलांचं काळीज रोज तिळ-तिळ तुटायचं, पण इंग्रजांपुढे त्यांचाही नाईलाज होता – न जाणो, पोरीच्या डोक्यावरचं आहे-नाही ते छप्परही जायचं! त्यात ही प्रभाकर गेल्याची तार..

    निरंजनचे मन आतल्याआत आक्रंदू लागले, “परमेश्वरा, तू या जगात नाहीसच का रे? का या देवमाणसांवर असे जुलूम करतोयस? अरे, स्वत:साठी का काही मागताहेत ते? सारं तर देऊन टाकलं त्यांनी मातृभूमीला? का असे भोग त्यांच्या नशिबात?”

    निरंजनने नजर वर करून पाहिलं. ज्या सावरकरांवर हा दु:खाचा हिमालय कोसळलेला ते स्वत: मात्र किनाऱ्यावर मौज करणाऱ्या एका कुटुंबाकडे टक लावून पाहात होते. आई-बाबा-मुलगा-मुलगी.. लहानसंच चौकोनी कुटूंब! काय विचार करत असतील सावरकर? आपलंही कुटूंब असंच असू शकलं असतं – हे वाटत असेल का त्यांना? ऐन तारुण्यात ज्या पत्नीला एकटं सोडून आलो, त्या पत्नीची आठवण येत असेल का त्यांना? की नुकताच ज्याचा मृत्यू झालाय त्या आपल्या लहानग्याच्या बाललीला आठवत असतील त्यांना? निरंजन सावरकरांच्या डोळ्यांचं निरीक्षण करत होते. चालता चालता आपण समुद्राच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत, याचेही भान राहिले नव्हते त्यांना. बघता-बघताच, रमणीच्या गळ्यातील मोतीमाळ तुटावी आणि सारे मौल्यवान मोती इतस्ततः विखुरावेत तसे, अगदी तस्सेच दोन चुकार अश्रू पापण्यांची तटबंदी ओलांडून सावरकरांच्या गालावर ओघळले. सावरकरांचा चेहरा वेदनेने अक्षरशः पिळवटून निघाला. वाटले.. वाटले आता ते हुंदका देणार..

    हुंदका आला, पण वेगळ्याच रुपाने. धीरोदात्त वीराला शोभेलसा. सावरकर कापऱ्या, अस्फुट आवाजात गाऊ लागले होते..

    “ने मजसी ने परत मातृभूमीला.. सागरा प्राण तळमळला..”

    त्या ऐतिहासिक गीताच्या जन्माचे एकमेव मानवी साक्षीदार – निरंजन – अवाक् होऊन गेला होते. ते दैवी काव्य ऐकावे की त्या महापुरुषाच्या चेहऱ्यावरचे तेज न्याहाळावे, काही कळतच नव्हते!

    एक निरंजन होते, जो नुसताच पाहात होते!

    एक सावरकर होते, जे देहभान हरपून समुद्राला साद घालित होते!!

    एक परदास्यमदाने उन्मत्त समुद्र होता.. निर्दयपणे फेसाळत हसणारा!

    आणि होते सावरकरांचे अश्रू.. ज्यांनी गाणे पूर्णच होऊ दिले नाही.. काळ तेवढा बिचारा थांबून राहिला होता!!

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख/सावरकर-कथा वाचण्यासाठी, लेखकाने दिलेली व्याख्याने ऐकण्यासाठी/आयोजित करण्यासाठी भेट द्या – www.vikramedke.com)

  • भेट: इतिहासकाराची इतिहासाशी!!

    सावरकरांना देशाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर ढकलण्यासाठी इंग्रजांनी त्यांना रत्नागिरीत स्थानबद्ध केले खरे. परंतू सावरकरांच्या व्यक्तिमत्वाची मोहिनीच इतकी काही जबरदस्त होती की, लवकरच आडगावी असलेले रत्नागिरी शहर हिंदुस्थानच्या गुप्त राजकारणाचे महत्वपूर्ण केंद्र बनले. सावरकरांना भेटायला येणाऱ्यांचा, चर्चा-मसलती करणाऱ्यांचा ओघच रत्नागिरीत सुरू झाला. मोहनदास गांधींपासून ते थेट अलीबंधूंपर्यंत सगळ्यांनाच रत्नागिरीत यावे लागले.

    त्याकाळी सावरकर रत्नागिरीच्या पटवर्धनांकडे मुक्कामी होते. असेच दुपारच्या वेळी दार वाजले म्हणून पाहातात तर काय, दारात एक वयोवृद्ध व्यक्ती उभी. वयोवृद्ध असली तरी चेहऱ्यावरील बुद्धिमत्तेची आभा मात्र चिरतरुण होती.

    image

    “कोण?”, सावरकरांनी हलकेच विचारले.
    “मी  बडोद्याचा सरदेसाई. इतिहास लिहितो म्हणून तुम्हाला कदाचित माहिती असेल”.
    सावरकर चमकलेच, “म्हणजे… तुम्ही.. रियासतकार…”?

    सावरकरांच्या नजरेसमोरून आठवणींचा पट झरझर सरकू लागला. रियासतकार सरदेसाई! त्यांनी लिहिलेल्या सुसंशोधनाधारित इतिहासावरच तर सावरकरांचा पिंड पोसलेला! विद्यार्थीदशेतच त्यांची बहुतेक पुस्तके सावरकरांनी वाचून काढलेली. “१८५७ चे स्वातंत्र्यसमर” लिहिताना अंगी बाणवलेली इतिहासलेखनाची दुर्लभ शिस्त, रियासतकारांच्याच तर पदचिन्हांवर चालताना मिळवलेली! कित्येकदा वाटलं, सरदेसायांना भेटावं. नपेक्षा किमान पत्रातून तरी संवाद साधावा. पण सावरकर पडले क्रांतिकारक. त्यांच्याशी संबंधित सगळ्यांवरच सरकारचा रोष. प्रसंगी नुसत्या ओळखीच्यांवरही राजद्रोहाचा ठपका येण्याची भिती. त्यातून रियासतकार बडोद्याच्या संस्थानात जरी नोकरी करत असले तरी बोलून-चालून सरकारी नोकरीच ती! कशी भेट व्हावी? पत्र लिहावं म्हटलं तर सावरकरांचे अक्षर म्हणजे अंगार! सावरकरांची बोटभर चिठ्ठी जरी कुणाकडे सापडली तरी त्याच्या घरादारावर जप्ती येणार हे ठरलेलेच! कित्येकदा हस्तेपरहस्ते निरोप पाठवून दोघांचे बोलणे झालेले. पण तेवढ्यापुरतेच. इच्छा असूनही भेटीची, संपर्काची अभिलाषा मनातच दाबून ठेवावी लागलेली. तेच सरदेसाई आज स्वत:च समोर उभे राहून विचारत होते की,
    “मी बडोद्याचा सरदेसाई. इतिहास लिहितो म्हणून तुम्हाला कदाचित माहिती असेल”.

    सावरकरांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी प्रेमाने रियासतकारांना घरात बोलावले. खूप गप्पा झाल्या दोघांच्या. मराठ्यांचा इतिहास किती जरी तेजस्वी असला तरी महाराष्ट्राबाहेर फारसा कुणाला ठाऊक नाही — तो जर रियासतकारांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून लिहिला तर साऱ्या जगाला महाराष्ट्राच्या पराक्रमाची किर्ती समजेल, ही आपल्या आपल्या मनीची इच्छा सावरकरांनी रियासतकारांना बोलून दाखवली. वृद्धापकाळ आणि प्रकृतीअस्वास्थ्य या कारणांमुळे हे शिवधनुष्य आपल्याला पेलणार नाही असे रियासतकारांनी प्रांजळपणे सावरकरांना सांगितले. विशेष म्हणजे, त्यानंतर लवकरच रियासतकारांनी सावरकरांच्या विनंतीचा मान राखत मराठा साम्राज्याचा इतिहास लिहिला. आणि तोही इंग्रजीतूनच लिहिला!

    निरोपाची वेळ झाली, तसे सावरकर नम्रपणे म्हणाले, “आपल्यासारख्या थोर इतिहासलेखकाचे दर्शन झाले. खरोखर भाग्यच म्हटले पाहिजे हे माझे!”
    रियासतकार हसले. म्हणाले, “भाग्य तुमचे नव्हे. भाग्य कुणाचे असेल, तर ते माझेच. कारण आम्ही नुसतेच इतिहास लिहून ठेवणारे. एकप्रकारे कारकूनच म्हणा ना! परंतू तुम्ही.. तुम्ही तर साक्षात स्वातंत्र्यवीर! कर्तृत्वाच्या बळावर इतिहास निर्माण करणारे! खऱ्या अर्थाने ‘इतिहासकर्ते’! आजवर पूर्वजांचा इतिहास अनेकदा लिहिलाय मी. मात्र आज पहिल्यांदाच जिवंत इतिहास कसा असतो, ते पाहाण्याचे भाग्य लाभलेय मला! आज मी खऱ्या अर्थाने धन्य झालो”!

    सावरकरांना काय बोलावे तेच कळेना. त्यांनी विनम्रतेने मान तुकवली. मान वर केली, तो ते इतिहासमहर्षी झपझप पावले टाकीत जात होते. इतिहासकर्ता आणि इतिहासकाराच्या भेटीचा तो अपूर्व क्षण इतिहास आपल्या आठवणींच्या कुपीत अलगद साठवून घेत होता, येणाऱ्या पिढीला त्याचा सुगंध देण्यासाठी..!

    – © विक्रम श्रीराम एडके
    (सर्वाधिकार लेखकाधीन. लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरित्रावर लेखकाने दिलेली व्याख्याने ऐकण्यासाठी, तसेच सावरकरांच्या अलौकिक चरित्रावर लेखकाचे व्याख्यान आयोजित करण्यासाठी संपर्क करा — www.vikramedke.com)

  • मानवाधिकारछाप गोष्ट

    मानवाधिकारछाप गोष्ट

    एकदा काश्मीरातील एका जिहादी आतंकवाद्याने तीन जणांना पकडले – एक पुढारी, एक मानवाधिकारछाप (हा शब्द “कछुआछाप”च्या चालीवर वाचावा) पत्रकार बाई आणि एक भारतीय जवान!
    आतंकवादी म्हणाला, “तुम्ही तिघंही आता मरणार आहात. काही शेवटची इच्छा असेल तर बोला”.
    इच्छापूर्ती म्हटली की सर्वात पुढे पळण्याचा पुढार्यांचा स्वभावच असतो! आपले पुढारीबुवाही त्याला अपवाद नव्हते. पण इच्छा पूर्ण झाली की लगेच मरावे लागणार या कल्पनेने ते काहीच बोलले नाहीत. अतिरेक्याच्याच काय मनात आलं कुणास ठाऊक, त्याने पुढार्याकडे बोट दाखवले, “तू बोल”.
    पुढार्याने क्षणभर विचार केला. म्हणाला, “आयुष्यभर मला कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहायची, त्यांच्याकडून जयजयकार ऐकायची सवय. तुही माझ्या नावाने ‘की जय..!’ असे ओरड आणि हा जयघोष चालू असतानाच मला मार. म्हणजे मी समाधानाने मरेन”.
    अतिरेकी “ठीक आहे” म्हणाला. आणि पुढार्याच्या नावाने जयजयकार करतच त्याने त्याला गोळ्या घातल्या!
    आता क्रमांक सैनिकाचा होता. अतिरेक्याने त्यालाही शेवटची इच्छा विचारली. क्षणभर विचार करून सैनिकाने आपली इच्छा पुढे ठेवली,
    “मला मारण्याआधी तू मला एक जोरदार लाथ घाल!”
    अशी विचित्र इच्छा ऐकून शेजारी उभी असलेली बाईच काय(बाईंनी आजवर मानवाधिकाराच्या लंब्याचौड्या गप्पा खूप मारल्या होत्या, पण रक्त आणि त्यातही एखाद्याचा खून पहिल्यांदाच पाहिला होता. शिवाय पुढे काय वाढून ठेवलंय यामुळे भेदरल्याही होत्या बिचार्या!), तो अतिरेकीही चकित झाला! पण शेवटची इच्छा त्याने पूर्ण करायचे ठरवले होतेच.
    त्याप्रमाणे त्याने जवानाला समोरून एक जोरदार लाथ घातली. जवान अतिरेक्याच्या पायाशी कोसळलाच. आता अतिरेकी बंदुक ताणून गोळी घालणारा, इतक्यात ते घडले! डोळ्याचे पाते लवायच्या आत आणि कुणाला काही कळायच्या आत घडले! सैनिकानेवीजेच्या वेगाने इतका वेळ आपल्या कपड्यांत बेमालूमपणे लपवून ठेवलेला चाकू काढला आणि अतिरेक्याचे डोळेही विस्फारायच्या आत त्याच्या पोटात तिरका फिरवला! फाटकी आतडी बाहेर पडत, तोंडातून रक्त ओकत अतिरेकी कोसळला, मेला!
    शत्रूच्या रुधिराने न्हाऊन निघालेला तो शूर भारतीय जवान उभा राहिला. भेदरलेल्या बाईंना त्याने आधार देऊन बसवले. जरासे पाणी पाजले. शांत झाल्यावर न राहवून बाईंनी अखेर विचारलेच,
    “तुमच्याकडं जर लपवून ठेवलेलं शस्त्र होतं आणि तुम्ही त्याला मारू शकत होता तर आधीच का नाही मारलंत? त्याला लाथ का मारायला लावलीत?”
    सैनिकाने खांदे उडवले आणि शांतपणे म्हणाला, “त्याने जर मला आधी लाथ मारण्याआधीच मी त्याला मारलं असतं, तर परिस्थिती कशी का असेना, पण बाई, तुम्हीच उद्या तुमच्या चॅनेलवर मोठमोठ्याने ओरडत सुटला असता की, भारतीय सैन्य काश्मिरात गरीब बिच्चार्या काश्मिरींवर अत्याचार करते. शेवटी जे तुम्हाला टीआरपी मिळवून देतील, तुमच्या दृष्टीने मानवाधिकार केवळ त्यांनाच असतात ना!”
    (काही महिन्यांपूर्वी वाचलेल्या इंग्रजी रुपककथेचा मी केलेला स्वैर अनुवाद. मूळ लेखक अज्ञात.)