Category Archives: कथा

मेरा रंगदे बसंती चोला…

तिघा वीरांना फाशी होणार हे आता नक्की झालं होतं. तीन वीर – भगतसिंह, राजगुरु अन् सुखदेव – भारतमातेच्या उद्धारासाठी जन्माला आलेली त्रिमूर्तीच जणू! अवघ्या विशी-बाविशीतली कोवळी पोरं, परंतू आपलं आयुष्य आता संपणार याचं वैषम्य वाटण्यापेक्षा आपलं जीवन कृतार्थ झालं, याची धन्यताच त्यांच्या चेहर्‍यावर झळकत होती. जन्मठेप न होता फाशी झाली याचं दु:ख होत नाही का, असं कुणीतरी विचारताच राजगुरु सहजपणे म्हणाले, “अहो, जन्मठेपेवर गेलो असतो तर मरायला वेळ लागला असता. त्यापेक्षा फाशीने चटकन् मरु म्हणजे स्वातंत्र्यलक्ष्मीच्या सेवेसाठी पटकन् पुन्हा जन्मासही येता येईल, काय!” आणि मिष्किल हसत टाळीसाठी हात पुढे केला! हे धैर्य!! इकडे सबंध देश या तिघांसाठी आक्रंदत होता. आझादही अस्वस्थ …Read more »

भिक

   मी शक्यतो रेल्वेनेच प्रवास करतो. याचं कारण म्हणजे एकतर हा प्रवास थोडा मोठा होत असल्याने यात एकप्रकारचा निवांतपणा असतो. त्यामुळे प्रवास माझ्या व्याख्यानाच्या निमित्ताने असेल तर मला शांत मनाने मी मांडणार असलेल्या मुद्द्यांवर विचार करायला पुरेसा वेळ मिळतो. नवीन लोकांशी ओळखी होतात, नवनवे अनुभव येतात. आणि तितकंच महत्वाचं म्हणजे, मोठ्या प्रवासात मला माझ्या आवडीचे संगीत भरपूर वेळ ऐकता येते.   असाच एक नगर-पुणे रेल्वेप्रवास. मी माझ्या आवडीची “युवराज” चित्रपटातील गाणी ऐकत होतो. दौंडच्या आसपास काही हिजडे गाडीत शिरले. ओंगळ लाडिकपणा करत ते प्रत्येकाकडून पैसे मागत होते. १० रुपयांच्या खाली एक पैही घेत तर नव्हतेच, पण कमी पैसे देणार्याला अथवा द्यावयास टाळाटाळ …Read more »