Category Archives: Uncategorized

After The Storm

“And if you must, then for performing this Yadnya, you shall offer me the Earth you just conquered”, Kashyapa’s voice was calm as the Maanasarovar. He looked at him with utmost respect. Sage Kashyapa was not a man who’d joke around. So he rose from the ground. Previously he’d risen, like a flame from the most pious pier. But that was the time when he had to fight Kaartaveerya Sahasrarjuna and his cronies. Though only a few days had been passed since then, it felt like ages. And those days saw the metamorphosis of Rama, the youngest child of Sage …Read more »

अॅक्वामॅन – समतोलाच्या दिशेने

२००८ साली एमसीयू सुरू झाल्यापासून मार्व्हलने जी एक थीम जशीच्या तशी राखलीये, ती ही की ते त्यांच्या पात्रांना एका मर्यादेपलिकडे अजिबात गंभीरपणे घेत नाहीत. त्यामुळे त्यांचे चित्रपटदेखील हलकेफुलके, सगळे मिळून आनंद लुटू शकतील असे रंगीबेरंगी असतात. एकाचवेळी कॉमिकनर्ड्स आणि सामान्य प्रेक्षक यांना खुश करण्याचे समतोल सूत्रच जणू त्यांनी शोधलेय. याउलट डिसीने त्यांच्या अतिमानवी पात्रांची मानवी बाजू शोधण्यावर जास्त भर दिला. परिणामतः त्यांची पात्रे अधिकाधिक गंभीर, आयुष्यातील कटकटींनी सतावल्यामुळे सतत ओढलेल्या चेहऱ्यांची होत गेली. त्यांच्या रुक्ष जीवनात विनोद मृगजळासारखा झाला. त्यांचे चित्रपटही तितकेच भेसूर होत गेले. एकीकडे मार्व्हलच्या अतरंगी चित्रपटांनी प्रचंड यश पाहिले, तर दुसरीकडे डिसी जास्तीत जास्त श्यामरंगी व टीकेचे …Read more »

जीओटी आणि भारतीय प्रतिभा

“गेम ऑफ थ्रोन्स” ही जगभरात पाहिली जाणारी, कदाचित जगातली आजघडीची सर्वाधिक प्रसिद्ध मालिका आहे. पण या मालिकेच्या न भूतो न भविष्यति यशात भारताचा सिंहाचा वाटा आहे, हे आपणापैकी किती जणांना ठाऊक आहे? या मालिकेच्या एकूणएक सूक्ष्मातिसूक्ष्म तपशीलांवर बारीकसारीक काम केलेले दिसते. अगदी प्रत्येक संस्कृतीच्या पोषाखांमध्ये आणि विविध ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या वस्त्रप्रावरणांमध्येदेखील अनेक अर्थ लपलेले आहेत. हे कपडे, तंबू वगैरे कुठे तयार होतात माहितीये? आपल्या दिल्लीतल्या लाजपतनगरमध्ये! अगदी पहिल्या पर्वापासून लाजपतनगरमधील “रंगारसन्स” ही कंपनी मालिकेतील सर्व वस्त्रप्रावरणे पुरवते. आणि सांगतो! ड्रॅगन्स!! अतिशय तपशीलवार तयार केलेले हे घातक परंतु आपल्या लाडक्या आईसाठी जीवाची बाजी लावणारे प्राणी कुठे तयार होतात माहितीये? आपल्या मुंबईतल्या …Read more »

काफिर हैं वो..

आपल्यापैकी बहुतेकांना पंडित द्वारकानाथ कौल हे नाव ऐकूनही माहिती नसेल. “नसिम” या फारसी टोपणनावाने लिहिणारे १९व्या शतकातील अतिशय महान शायर पंडित दयाशंकर कौल यांचा हा मुलगा. पंडित द्वारकानाथांना अतिशय कमी – अवघ्या २८ वर्षांचंच आयुष्य लाभलं, परंतू आपल्या अमर कृतींच्या रुपाने ते आजही जिवंत आहेत. कौल घराणं काश्मिरी पंडितांचं. द्वारकानाथजीही फारसीतून लिहित असले तरीही हिंदू धर्माचे अतिशय अभिमानी. त्यांचा हाच अभिमान तत्कालीन काही मुसलमान शायरांना खटकत असे. एकदा एका नवाबाने आपल्या संस्थानात मुशायरा (कविसंमेलन) आयोजित केला होता. द्वारकानाथजींनाही निमंत्रण होतं. द्वारकानाथजींचा द्वेष करणारे काही शायर नवाबाच्या कानाशी लागले आणि नवाबासकट सगळ्यांनी मिळून पंडितजींचा पाणउतारा करण्याची एक योजना आखली. आधीच ठरल्याप्रमाणे …Read more »

एका प्रसंगावधानाची गोष्ट!

२००१ साली अमेरिकेत आतंकवादी हल्ला झाला तेव्हा मी नववीत होतो. काही दिवसांतच त्यादिवशी घडलेल्या घटना आणि त्यांचं विश्लेषण करणाऱ्या बातम्या येऊ लागल्या. मला आठवतं, एका बातमीत सांगितलं होतं की ट्विन टॉवर्सवर विमाने आदळली तेव्हा जॉर्ज बुश कोणत्यातरी पूर्वनियोजित कार्यक्रमांतर्गत लहान मुलांच्या एका शाळेत – वर्गात तिथल्या लहानग्यांशी गप्पा मारत होते. व्हाईट हाऊसच्या कर्मचाऱ्यांपैकी एकाने धावत येऊन त्यांच्या कानात घडलेली घटना सांगितली. श्री. बुश यांनी ते ऐकले. चेहऱ्यावरील रेषही ढळू न देता त्यांनी अत्यंत हलक्या आवाजात त्या कर्मचाऱ्याला काही सूचना दिल्या आणि परत ते त्या लहानग्यांशी बोलू लागले. त्यांनी कार्यक्रम संपवला आणि मगच ते ९/११ संदर्भात पुढील कारवाई करायला बाहेर पडले. …Read more »

खरेच गणेशविसर्जनाने प्रदूषण होते का ?

खरेच गणेशविसर्जनाने प्रदूषण होते का ? गणेशोत्सव जवळ येऊ लागलाय त्याअर्थी आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन आणि त्याद्वारे होणार्या प्रदूषणाच्या नावाने शिमगा जोरजोरात सुरु होईल, हेही ओघाने आलेच. अर्थातच हिंदूंच्या प्रत्येक सणाला असा शिमगा होणे नित्याचेच असल्याने, सर्वांनाच या प्रकाराची सवय झाली आहे. हा आरडाओरडा करणारी मंडळी अन्यधर्मीयांच्या सणांच्या प्रसंगी विवेकवादी आणि पुरोगामी चिंतनात इतकी काही व्यस्त असतात की, त्यांना त्यातले प्रदूषण दिसतच नाही आणि दिसले तरी त्याबद्दल बोलावेसे वाटत नाही! असो. परंतू खरंच प्लॅस्टरच्या गणेशमूर्तींनी प्रदूषण होते का हो? केलाय कधी विचार? किंबहूना असे काही प्रदूषण होते हीच जर अंधश्रद्धेचे निर्मूलन करू म्हणणार्यांची अंधश्रद्धा असली तर? तसे असेल …Read more »

हुतात्मा राजगुरू – काही शल्ये, काही प्रश्न!

आज २४ ऑगस्ट. अर्थात हुतात्मा राजगुरू यांची जयंती. विषय केवळ आजच्या दिवसापुरते त्यांना प्रणाम करण्याचा नाहीये. विषय आहे यानिमित्ताने जरासं आत्मपरिक्षण करण्याचा. जरा स्वत:ला विचारण्याचा की, ज्या माणसाने तुमच्या-माझ्या सुखासाठी अतिशय कोवळ्या वयात आपल्या प्राणांची आहुती दिली, त्याची आज जयंती आहे हे आपल्या लक्षात तरी होतं का? जयंती सोडा राजगुरूंचे संपूर्ण नाव तरी आपण गुगलचा आधार घेतल्याशिवाय अथवा कुणाला विचारल्याशिवाय सांगू शकतो का? संपूर्ण नावही राहू द्या, राजगुरू नावाची व्यक्ती कोण होती आणि तिने काय कार्य केले होते, हे तरी आपण धडपणे सांगू शकतो का? सौ बात की एक बात – मूळात आपल्याला राजगुरूंना प्रणाम करण्याचा तरी हक्क आहे का? …Read more »

हुतात्म्यांचा गौरव

खरे तर आपण राजकुमार संतोषी आणि राकेश ओमप्रकाश मेहरांचे आभारच मानायला हवेत. कारण, आजच्या पिढीला भगतसिंह, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद “बिस्मिल”, अशफाकउल्ला खान इ. वीर हुतात्म्यांबद्दल जी काही थोडेफार माहिती आहे आणि या लोकांनी या देशाच्या बंधमोचनासाठी काहीतरी त्याग केला होता हे त्यांना कळले, ते याच दोन दिग्दर्शकांमुळे. हवं तर दुर्दैवी म्हणा पण ही वस्तुस्थिती आहे की, आमच्या देशाचे क्रांतिकारक त्यांच्यावर चित्रपट निघेपर्यंत आम्हाला धड माहितीही नसतात! बर्याच जणांना तर या वीरांची कथा चित्रपटात सांगितली तेवढीच फक्त माहिती आहे. त्यापलीकडे जाऊन या व्यक्तीमत्वांचा शोध घ्यायचा प्रयत्न यांपैकी किती जणांनी केला? वाईट वाटतं! चेतन भगतसारख्या सुमार लेखकाची सगळी पुस्तके वाचणारे …Read more »

वसंत पंचमी

हल्ली “व्हॅलेंटाईन डे”चे सर्वत्र फॅड सुरू आहे. मी या दिवसाचा विरोधक आहे आणि म्हणून याला फॅड म्हणतोय असा कृपया समज करून घेऊ नका. मी फॅड म्हणतोय कारण, त्रयस्थपणे विचार केल्यावर कळते की या दिवसाचा आणि प्रेमाचा तसा काही संबंध नाही. ही फक्त प्रेमाच्या नावाखाली फुले, ग्रिटींग्ज आदी वस्तू विकण्याची मार्केटींग स्ट्रॅटेजी आहे, बाकी काही नाही. आणि पाश्चात्यांहूनही अधिक पाश्चात्याळलेले आपल्याकडचे तरुण याला बरोब्बर बळी पडतात. प्रेमाच्या नावाखाली या दिवसाची भलावण करीत अगदी पाच रुपयांचा गुलाब वीस रुपयांना घेण्यापासून सर्व मूर्खपणा सुरू असतो! मागे नाही का त्या हॉलिवूडवाल्यांनी त्यांचे पिक्चर चालत नाहीत म्हटल्यावर “डिसेंबर २०१२”चा बागुलबुवा उभा करून, त्यावर पिक्चर काढून, …Read more »

जो जीता वोही सिकंदर ???

काल दूरचित्रवाणीवर एक प्रसिद्ध गीत पाहात होतो. बोल होते, “वो सिकंदर ही दोस्तो कहलाता हैं, हारी बाजीको जीतना जिसे आता हैं”! चित्रपटाचंही नाव साजेसंच होतं, “जो जीता वोही सिकंदर”. गेले दोन दिवस मी असत्याधारित, विकृत आणि राष्ट्राचा तेजोभंग करणार्या इतिहासाबद्दल लिहितोय. जे आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आलोय -” जो जीता वोही सिकंदर” असं खरंच होतं का? अलेक्झँडर हा अतिशय महत्वाकांक्षी होता, विश्वविजयासाठी निघाला होता हे खरे. परंतू कोणत्याही अर्थाने विश्वविजयी नव्हता. ग्रीस ते इराणपर्यंतचे प्रदेश त्याने सहज जिंकले. भारताच्या सीमेवरील गांधारजवळची (अफगाणिस्तान) छोटीछोटी गणराज्ये पाहून त्याला नक्कीच आनंदाच्या उकळ्या फुटल्या असणार! मी यापेक्षा अनेकपट मोठी साम्राज्ये सहज जिंकली, ही छोटी राज्ये तर …Read more »