Category: Uncategorized

  • After The Storm

    After The Storm

    “And if you must, then for performing this Yadnya, you shall offer me the Earth you just conquered”, Kashyapa’s voice was calm as the Maanasarovar.


    He looked at him with utmost respect. Sage Kashyapa was not a man who’d joke around. So he rose from the ground. Previously he’d risen, like a flame from the most pious pier. But that was the time when he had to fight Kaartaveerya Sahasrarjuna and his cronies. Though only a few days had been passed since then, it felt like ages. And those days saw the metamorphosis of Rama, the youngest child of Sage Jaamadagni and Sati Renuka into the most feared Parashurama, the wielder of the fiercest battle-axe. He withstood all the hardships of the war only because of the training Kashyapa gave to him. So when this time he rose, it was out of devotion, love and affection towards his Guru.

    He took some water from the Kamandalu in his hand and without thinking twice poured it into the feet of Kashyapa, who said,
    “People earn, people spend. And in between, they give up some portion. Sometimes out of fear, sometimes out of respect and sometimes simply as a duty. But rarely anyone gives up everything he just earned, only because his Guru asked him to. You are rarest even amongst those, for you had rightfully earned this Earth through Blood and Steel, and yet you didn’t even blink once when it comes to renounce it”.

    “Word of the Guru, is the word of Veda for me”, said Parashuram humbly.

    “Then you must do one more thing for me”, Kashyapa said with a smile.

    “Tell me, what it is and consider it done”.

    “Listen, before you promise”.

    “I give you my word and I’ll give my life to keep it”.

    “Very well then. Since, you have given up your claim on the Earth, you don’t have any right to dwell in it. Therefore, as the rightful owner of the planet, I banish you from my land”!

    ‘But where’d he go?’, ‘If the earth is owned by Kashyapa, where’d Rama live?’, whispered the thousand spectators. But not Parashurama. His voice was the same as it was before hearing this dreadful wish of his Guru, when he said,
    “As you please Gurudeva”.

    And the Emperor left with his hands empty and a heart filled with the satisfaction of fulfilling his duty.

    Kashyapa knew, if the order is to be restored on the Earth, it must be ruled by the Kings, not by a Sage who conquered it in the heat of passion. And this would happen only if the conquerer leaves. So he aimed for the greater good, with but a small sacrifice.

    Parashurama understood the true meaning of his Guru’s wish. But he has bigger problem to solve right now; finding a piece of Earth, that is not part of the existing Earth! His thoughts wandered around this question and so do his feet, until he reached to an impasse.

    Behind him was the earth, he was forbidden to dwell. In front of him was the vast ocean, which could have devoured anything and everything. Going back was not an option and going further was impossible. But impossible were the things he did conquer, from his very birth to single-handedly defeating the greatest Emperor of his time; all through his knowledge and might.

    He stood in front of the ocean. The ocean looked fierce with the army of infinite battle-ready tides. The scion of Bhrugus was never the one to run away from a good fight. He took out his bow and mounted an arrow on it. He then remembered his father, the most revered Sage Jamadagni. He remembered his mother, the Goddess Renuka herself. He remembered his Guru Kashyapa who trained him to defeat everything labeled ‘impossible’. And then he remembered God Shiva who opened the secrets of Dhanurveda in front of him. He bowed to his ancestors of Bhrugu clan who withstood each and every trouble life threw at them. And with the might that destroyed the Haihayas, he released it.

    The arrow sped to the sky and caught fire. Within a second it started to look like there are two Suns above, one that bestows the gift of life and another that would snatch it. The arrow crashed into the ocean with a huge explosion. And the ocean dried. It retreated back in a haste. And when the steam cleared, there was land. Land, that was never owned by anyone. Parashurama marched towards it.

    In his Aashrama, Sage Kashyapa took a moment from his busy day and simply smiled.

    — © Vikram Shriram Edke

  • अॅक्वामॅन – समतोलाच्या दिशेने

    २००८ साली एमसीयू सुरू झाल्यापासून मार्व्हलने जी एक थीम जशीच्या तशी राखलीये, ती ही की ते त्यांच्या पात्रांना एका मर्यादेपलिकडे अजिबात गंभीरपणे घेत नाहीत. त्यामुळे त्यांचे चित्रपटदेखील हलकेफुलके, सगळे मिळून आनंद लुटू शकतील असे रंगीबेरंगी असतात. एकाचवेळी कॉमिकनर्ड्स आणि सामान्य प्रेक्षक यांना खुश करण्याचे समतोल सूत्रच जणू त्यांनी शोधलेय. याउलट डिसीने त्यांच्या अतिमानवी पात्रांची मानवी बाजू शोधण्यावर जास्त भर दिला. परिणामतः त्यांची पात्रे अधिकाधिक गंभीर, आयुष्यातील कटकटींनी सतावल्यामुळे सतत ओढलेल्या चेहऱ्यांची होत गेली. त्यांच्या रुक्ष जीवनात विनोद मृगजळासारखा झाला. त्यांचे चित्रपटही तितकेच भेसूर होत गेले. एकीकडे मार्व्हलच्या अतरंगी चित्रपटांनी प्रचंड यश पाहिले, तर दुसरीकडे डिसी जास्तीत जास्त श्यामरंगी व टीकेचे धनी होऊ लागले. आणि २०१७ साली ‘वंडर वुमन’ आला! याची २ वैशिष्ट्ये. एक म्हणजे हा चित्रपट स्त्रीकेंद्रीत होता. ही हिंमत मार्व्हलनेही आजवर कधीच दाखवली नव्हती. आणि दुसरे म्हणजे या अफलातून स्त्रीच्या आयुष्यात जरासा का होईना, विनोद होता! त्याच्या पुढच्याच वर्षी आलेला ‘डेडपूल २’ जरी एमसीयूचा भाग नसला, तरी त्यात विनोद, मनोरंजन आणि पात्रपरिपोष सगळ्याचाच समतोल ढळला होता. इथे पारडे झुकू लागले. आपल्या पात्रांचा स्वभाव कायम राखूनही त्यांच्या आयुष्यात किंचित रंग भरण्याची किमया डिसी हळूहळू शिकू लागले होते. या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालाय, डिसीचा ‘अॅक्वामॅन’!

    कथा अगदीच साधी आहे. म्हणजे ‘बाहूबली’ (२०१५-१७) नावाची रुपेरी पडद्यावरील महागाथा जर दोन भागांत विभाजित न करता संपादित करून एकाच भागात बसवली आणि त्यात शब्दशः भरपूर ‘पाणी घातलं’, तर जी होईल ती! या कथेत बाहूबली आहे, भल्लालदेव आहे, कट्टप्पा आहे, देवसेना आहे, अवंतिका आहे, शिवगामी आहे; अगदी सगळा सगळा गोतावळा आहे. फक्त कोण नेमकं कोण आहे आणि ही पात्रं वेगवेगळीच आहेत की काहीवेळा एकमेकांमध्ये मिसळली आहेत, हे मी सांगणार नाही. लक्षात घ्या, कथा ‘बाहूबली’ची आहे याचा अर्थ ती ‘बाहूबली’वरून उचललीये किंवा ‘बाहूबली’ने त्यांची कथा मूळ ‘अॅक्वामॅन’वरून उचललीये, या दोन्हींपैकी काहीही मी सुचवू इच्छित नाही. मी पूर्वी कुठेतरी वाचलं होतं की, जगात मूळ कथा फक्त ५ च आहेत. त्याअर्थी कोणत्याही दोन कथा या कोणत्या ना कोणत्या पातळीवर एकमेकींसारख्या असणारच. ‘अॅक्वामॅन’चे ‘बाहूबली’शी जरा जास्तच साम्य आहे, एवढंच! तसं ते काही प्रमाणात ‘ब्लॅकपँथर’चंही (२०१८) होतंच. परंतु ‘बाहूबली’च्या मुळाशी महाभारत असल्यामुळे ‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्’ न्यायाने या गोष्टी सहज शक्य आहेत. याला चोरी म्हणत नाहीत. गंमत अशी की, ‘बाहूबली – द कन्क्ल्युजन’मधील प्रसिद्ध गीत ‘ओक्क प्राणम्’सारख्याच थीमवर, त्याच प्रकारचे व्हिज्युअल्स असलेले एक गीत ‘अॅक्वामॅन’मध्येही आहे, आता बोला!! यह थोडा ज़्यादा हो गया!!

    ‘बाहूबली’चा विषय निघालाच आहे, तर एक मुद्दा इथे लक्षात घेण्यासारखा आहे. त्या चित्रपटाचीही कथा काही फार वेगळी, पुढे काय होणार याचा अंदाज बांधता न येण्यासारखी होती का? तर अजिबातच नाही. तो चित्रपट त्याच्या कथेमुळे श्रेष्ठ नाहीये, तर त्या सामान्य कथेच्या असामान्य मांडणीमुळे तो श्रेष्ठ आहे. तीच बाब ‘अॅक्वामॅन’लाही लागू पडते. कथा (जिऑफ जोन्स, जेम्स वॅन, विल बिल) क्लिषेड असली, पटकथा (डेव्हिड लेस्ली जॉन्सन-मॅक्गोल्ड्रिक, विल बिल) उत्तरार्धात किंचित रस्ता चुकल्यासारखी असली, तरीही दिग्दर्शक जेम्स वॅनची हाताळणी मात्र लाल्याच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘एकदम कॅडॅक्क’ आहे! डिसी युनिव्हर्समध्ये एखादं जग एवढं सतरंगी असू शकतं, त्यातली सगळीच नाही परंतु मुख्य पात्रं एवढी मजेदार असू शकतात आणि त्यांची कहाणी एवढी तुफान मनोरंजक असू शकते या अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत अशक्य वाटणाऱ्या सगळ्याच गोष्टी जेम्स वॅनने प्रत्यक्षात आणून दाखवल्यायत. डिसीचा पार चेहरामोहराच बदलून टाकला वॅनभाऊंनी!! आणि या बाहूबलीयन (आपल्याकडे बाहूबली असताना उगाच हर्क्युलियन का म्हणू मी!) कार्यात भाऊंना खंबीर साथ दिलीये ती जेसनमामांनी! याला मराठी न जाणणारे लोक उगाचच जेसन मोमोआ वगैरे म्हणतात, पण ते एक असो. खाल ड्रोगो आणि बाहूबलीच्या मिश्रणामुळे हा ‘हाफ-ब्रीड’ (कोटी हेतुत:) काहीच्या काही जबरदस्त झालाय. तो जितका देखणा आहे, त्याहून जास्त तो पडद्यावर करतो ती प्रत्येकच गोष्ट देखणी वाटते. हिरोच तो! त्याला वेळोवेळी हिरोपदाला शोभेल अशा खूप साऱ्या ‘वाजीव शिट्ट्या, बडीव टाळ्या’ एण्ट्रीज आहेत. आणि सबंध चित्रपटात तो अशा काही आवेश, आत्मविश्वास आणि आविर्भावात वावरलाय की, त्याच्यासमोर साक्षात हल्क जरी आला तरी तो त्याला कुत्र्यासारखा मारेल आणि वर तो मेलाय याची खात्री करण्यापुरतंही मागे वळून पाहाणार नाही, हे शंभर टक्के सत्य भासतं! याउलट अॅम्बर हर्ड ही दृष्ट लागण्याइतकी देखणी दिसते, पडद्यावर निरनिराळ्या करामतीसुद्धा करते परंतु चेहरा मात्र कायम गर्दीत पर्स मारली गेल्यासारखा चिंताक्रांतच! म्हणजे मारामारी करतेय, चेहरा असाच. समजावून सांगतेय, चेहरा असाच. रोमान्स करतेय, चेहरा असाच! बाकी निकोल किडमन, टेम्युरा मॉरिसन, विल्यम डॅफो, पॅट्रिक विल्सन, डॉल्फ लंडग्रेन यांनी त्यांची कामे चोख बजावली आहेत. याह्या अब्दुल मतिन – दुसरा, याने साकारलेला ‘ब्लॅक-मॅण्टा’ मस्तच झालाय, परंतु पुढच्या भागांमध्ये त्याचा अधिक पात्रपरिपोष होईल, अशी अपेक्षा करुया. आणि हो, रुपर्ट ग्रेगसन-विल्यम्सचं संगीत ‘वंडर वुमन’प्रमाणेच याही चित्रपटात फारच कमाल आहे!

    आर्थरच्या लहानपणी भल्यामोठ्ठ्या अॅक्वेरियममधील सगळे मासे त्याच्या पाठिशी गोळा होतात, हा प्रसंग अक्षरशः अंगावर काटा आणणारा झाला आहे. तसाच आर्थर आणि मेराने समुद्राखाली ट्रेंचच्या समूहातून वाट काढत जाण्याचा प्रसंगही वॅनच्या आधीच्या फिल्मोग्राफीची आठवण करून देणारा झाला आहे. पण राहून राहून वाटत राहातं की, मनुष्याने समुद्रात टाकलेला बेसुमार कचरा, या मुद्याला चित्रपटात केवळ हलका स्पर्श करून सोडून दिलंय, त्याऐवजी जर तोच मुख्य मुद्दा असता आणि त्याभोवतीच अॅक्वामॅनची ओरिजिन-स्टोरी गुंफली गेली असती तर? तर चित्रपट लाखपटींनी जास्त ससंदर्भ आणि मजेदार वाटला असता. असो, सारेच काही आपल्या मनासारखे थोडीच होते! परंतु’वंडर वुमन’च्या वेळी झुकू लागलेले पारडे ‘अॅक्वामॅन’ने समतोलाच्या दिशेने फारच जास्त झुकवलेय. एमसीयूची तिसरी फेज संपत आलेली असताना डिसीला सुर सापडू लागणे किंचित उशिर झाल्यासारखे वाटेल. परंतु उशिरा काय किंवा लवकर काय, समतोल हा शेवटी समतोलच असतो. तो साधणे महत्त्वाचे. ‘अॅक्वामॅन’लाही तो पूर्णार्थाने साधता आलेला नसला तरीही त्याने डिसीला समतोलाच्या कधी नव्हे इतक्या जवळ नेऊन ठेवलेय. ते कसे, हे थिएटरमध्येच आणि तेही थ्रीडीतच पाहाणे, ही एक वेगळीच मजा आहे!!

    *४/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

  • जीओटी आणि भारतीय प्रतिभा

    “गेम ऑफ थ्रोन्स” ही जगभरात पाहिली जाणारी, कदाचित जगातली आजघडीची सर्वाधिक प्रसिद्ध मालिका आहे. पण या मालिकेच्या न भूतो न भविष्यति यशात भारताचा सिंहाचा वाटा आहे, हे आपणापैकी किती जणांना ठाऊक आहे?

    या मालिकेच्या एकूणएक सूक्ष्मातिसूक्ष्म तपशीलांवर बारीकसारीक काम केलेले दिसते. अगदी प्रत्येक संस्कृतीच्या पोषाखांमध्ये आणि विविध ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या वस्त्रप्रावरणांमध्येदेखील अनेक अर्थ लपलेले आहेत. हे कपडे, तंबू वगैरे कुठे तयार होतात माहितीये? आपल्या दिल्लीतल्या लाजपतनगरमध्ये! अगदी पहिल्या पर्वापासून लाजपतनगरमधील “रंगारसन्स” ही कंपनी मालिकेतील सर्व वस्त्रप्रावरणे पुरवते.

    आणि सांगतो! ड्रॅगन्स!! अतिशय तपशीलवार तयार केलेले हे घातक परंतु आपल्या लाडक्या आईसाठी जीवाची बाजी लावणारे प्राणी कुठे तयार होतात माहितीये? आपल्या मुंबईतल्या “प्राणा स्टुडिओज”मध्ये!

    होय, ड्रॅगन्सचे विभास (व्हिज्युअल इफेक्ट्स) मुंबईत बनतात. याउप्पर, या मालिकेतल्या सुघड तलवारी. त्यादेखील भारतातच बनतात हे क्वचितच कुणाला ठाऊक असेल! जॉन स्नोची “लाँगक्लॉ” असो, नेडची “आईस” असो, ब्रिएनची “ओथकिपर” असो, सर आर्थर डेनची “डॉन” असो, आर्याची “नीड्ल” असो अथवा अन्य कोणतीही तलवार! नाव असलेली वा नसलेली, पण मालिकेतली एकूण एक तलवार भारतात बनते. अगदी व्हॅलेरियन स्टीलच्या तलवारीसुद्धा भारतातच बनतात. विण्डलास स्टीलक्राफ्ट्स ही देहरादूनस्थित कंपनी या सर्व तलवारी बनवते. केवळ तलवारीच नव्हे तर सगळी चिलखते, अगदी जॉनस्नोचा क्लोकसुद्धा!!

    थोडक्यात मालिकेसाठी लागणारी बहुतांश प्रॉपर्टी ही भारतात बनते, भारतीयांकडून बनवली जाते. भारत हा खरोखर प्रतिभेचे आणि कारागिरीचे भांडार आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की, हे समजायला आपल्याला एका पाश्चात्य मालिकेची गरज पडतेय. डेनेरिसचे ड्रॅगन्स जर आपण हुबेहूब बनवू शकतो तर आमच्या मेगाबजेट चित्रपटांमधील विभास सामान्य का? याचे कारण एकच आहे की, आपल्याकडचे चित्रपट-मालिकाकार आपल्या लोकांवर ना विश्वास दाखवतात ना त्यांच्या प्रतिभेला स्वातंत्र्य देतात. विशेषतः आपल्या मालिका या केवळ आणि केवळ त्या-त्या चॅनेल्सच्या लहरींवर चाललेल्या, टिआरपीपुरत्याच उरलेल्या बटकी वाटतात. कल्पना करा “गेम ऑफ थ्रोन्स”चे एखादे पर्व सुरू आहे, दरम्यान दिवाळी आली आणि अवघे सेव्हन किंग्डम्स आपली मूळ कथा सोडून दिवाळी साजरी करताना दाखवले. किंवा सगळे अचानकच करवाचौथ वा स्वातंत्र्यदिन साजरे करू लागले. कल्पनादेखील करवत नाही ना? पण हे आपल्याकडच्या मालिकांमध्ये सर्रास चालते! कारण आम्हाला कथेपेक्षा टिआरपी जास्त महत्त्वाचा वाटतो.

    मला आठवते, माझ्या लहानपणी मर्यादित भागांच्या आणि कथानकावरच लक्ष केंद्रित करणाऱ्या सुंदर मालिका असायच्या. अगदी दूरदर्शनवरील “नुक्कड”पासून ते पार झीवरील “रिश्तें”पर्यंत.

    सिनेमांच्या इतकेच किंबहूना त्यांच्यापेक्षाही जास्त सिनेमॅटिक आणि कथात्मक प्रयोग केलेले असायचे मालिकांमध्ये. आता प्रयोग आणि कथांकन औषधालाही सापडत नाही कुठेच आणि कुणालाच त्याचे काही पडलेलेही नाही. पाश्चात्य चॅनेल्सवरच्या अनेकानेक सर्वांगसुंदर मालिकांच्या पार्श्वभूमीवर आपण शून्यात तर सोडाच उणेमध्ये आहोत अक्षरशः! मध्यंतरी कोणते तरी चॅनेल सुरू झाले होते. नाव विसरलो मी त्याचे. पण जगभरच्या मालिका हिंदीत डब करून दाखवायचे त्यात. अगदी पाकिस्तानी, तुर्की, इराणीसुद्धा! सुंदर कथा आणि जबरदस्त मांडणी. त्यांच्यातल्या एकाचीही सर आपल्या मालिकांना येत नाही हो. केवढा दर्जा खालावून घेतलाय आपण आपला!!

    गुलज़ारने एका साक्षात्कारात (मुलाखत) सांगितलेला किस्सा आहे. तो “ग़ालिब़” बनवत होता तेव्हा चॅनेलने सांगितलं की, ‘५२ भागांची मालिका बनवा’. तर तो म्हणाला की, ‘एवढी मोठी कथा नाहीये ती’. मग म्हणाले, ‘१३ भागांची बनवा’. तर तो म्हणाला, ‘एवढी छोटीसुद्धा नाहीये ती’. मग काय करुया? गुलज़ार म्हणाला, ‘बघा माझी जेवढी कथा आहे तेवढीच मी सांगणार. तुमच्या नियमांत बसायला मी ती कापणार नाही वा पाणी घालून वाढवणारही नाही’. शेवटी “मिर्ज़ा ग़ालिब़” १७ भागांची बनली. आज ना कथेसाठी नियम वाकवणारे चॅनेल्स राहिलेत ना आपल्या अवकाशासाठी हटून राहाणारे दिग्दर्शक राहिलेत ना इतके कष्ट करून बनवलेल्या मालिकांच्या दर्जाचे प्रेक्षक राहिलेत. कदाचित हे तिन्ही असतीलही आजसुद्धा, पण चौकटीच्या बाहेर पडायची हिंमत मात्र कुणाचीच राहिलेली नाही हे खरे. त्यामुळेच आमच्याकडचे प्रतिभेचे झरे “गेम ऑफ थ्रोन्स”सारख्या ठिकाणी जातात आणि आम्ही या ब्रेनड्रेनलाच भारी म्हणून खुश राहातो. दर्जेदार मालिका नाहीत म्हणून प्रेक्षक नाहीत आणि प्रेक्षक नाहीत म्हणून दर्जेदार मालिका नाहीत. हे दुष्टचक्र भेदले पाहिजे. पण ते भेदणार कोण, हा यक्षप्रश्नच आहे!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (संपर्क: www.vikramedke.com)

  • काफिर हैं वो..

    आपल्यापैकी बहुतेकांना पंडित द्वारकानाथ कौल हे नाव ऐकूनही माहिती नसेल. “नसिम” या फारसी टोपणनावाने लिहिणारे १९व्या शतकातील अतिशय महान शायर पंडित दयाशंकर कौल यांचा हा मुलगा. पंडित द्वारकानाथांना अतिशय कमी – अवघ्या २८ वर्षांचंच आयुष्य लाभलं, परंतू आपल्या अमर कृतींच्या रुपाने ते आजही जिवंत आहेत.

    कौल घराणं काश्मिरी पंडितांचं. द्वारकानाथजीही फारसीतून लिहित असले तरीही हिंदू धर्माचे अतिशय अभिमानी. त्यांचा हाच अभिमान तत्कालीन काही मुसलमान शायरांना खटकत असे.

    image

    एकदा एका नवाबाने आपल्या संस्थानात मुशायरा (कविसंमेलन) आयोजित केला होता. द्वारकानाथजींनाही निमंत्रण होतं. द्वारकानाथजींचा द्वेष करणारे काही शायर नवाबाच्या कानाशी लागले आणि नवाबासकट सगळ्यांनी मिळून पंडितजींचा पाणउतारा करण्याची एक योजना आखली. आधीच ठरल्याप्रमाणे नवाबाने ऐन कार्यक्रमात जाहीर केलं की, आता मी ऊर्दूतील एक ओळ देईन आणि सगळ्या कवींनी त्याओळीआधीची ओळ रचून शेर पूर्ण करायचा! यांनी आधीच ठरवलेल्या योजनेनुसार नवाबाने ओळ दिली –

    “काफिर हैं वो जो बन्दे नहीं इस्लामके”
    [इस्लामला न मानणारे काफिर असतात]

    काफिर म्हणजे “ईश्वराला न मानणारे”. मुस्लिम तत्त्वज्ञानाचे अभ्यासक सरसकटपणे या शब्दाचा अर्थ “इस्लामप्रणीत ईश्वराला न मानणारे” असा करतात. अश्या या काफिरांचं काय करावं याबद्दल कुरआनात मनोरंजक आज्ञा दिल्या आहेत, त्या प्रत्येकाने -.विशेषत: सर्वधर्मसमभाववाल्या मित्रांनी अवश्य वाचाव्यात!

    असो! तर नवाबाने उपरोक्त ओळ दिल्या दिल्या सगळे शायर एका मागोमाग एक इस्लामची स्तुती करणारे शेर रचू लागले. या ओळीवर दुसरं काहीच लिहिलं जाऊ शकत नव्हतं, त्यामुळे पंडितजींनाही आज त्यांचा सारा अभिमान बाजूला सारून स्तुतीपर शेर रचावाच लागेल, हे माहिती असल्याने सार्यांच्याच मनात जणू लाडू फुटत होते. पंडितजींना हिणवण्यासाठी एकेक रचना सादर केल्या जात होत्या.
    होता होता पंडितजींची पाळी आली! त्यांनी एकवार डोळे मिटून घेतले. डोळे उघडून आत्मविश्वासपूर्ण नजरेने रचना सादर केली,

    “लाम के मानिन्द गेसू हैं मेरे घनश्यामके ।
    काफिर हैं वो जो बन्दे नहीं इस-लामके ।।”
    [“ल” अक्षरासारखे मनमोहक कुरळे केस आहेत माझ्या घन:श्याम मुरारीचे (फारसीत
    “ल”ला “लाम असे म्हणतात). काफिरच म्हटलं पाहिजे त्यांना जे भक्त नाहीत
    या “लाम”चे! (“इस्लामके” नव्हे तर पंडितजींनी फोड केलीय “इस लामके”)]

    पार नवाबासुद्धा सारी सभा अवाक झाली! पंडितजींनी त्यांच्याच ओळीचा आधार घेऊन, भगवान श्रीकृष्णाला न मानणार्यांना “काफिर” ठरवलं होतं. काव्यप्रतिभेत स्पर्धा केली असती तर गोष्ट वेगळी, परंतू धार्मिक आधारावर पंडितजींचा अपमान करायचा प्रयत्न करणार्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन पंडितजींनी अक्षरशः सगळ्यांचे दातच घशात घातले होते! पंडितजींची वाहवाही करण्याखेरीज कुणाकडे काही पर्यायच उरला नव्हता!

    असे हे पंडित द्वारकानाथ कौल! आजकालच्या धर्मनिरपेक्ष युगात हा “सांप्रदायिक” कवी धर्मांध ठरून विस्मृतीच्या गर्तेत जाणे स्वाभाविकच आहे! स्वयंघोषित धर्मनिरपेक्षांनी आखून दिलेल्या मार्गावरच चालणार्या शिक्षणपद्धतीत तयार झालेल्यांना तर पंडितजींचे नावही माहिती असण्याची सुतराम शक्यता नाही! परंतू
    सत्य हे कुणा विचारधारेला बांधील नसून शाश्वत असते. कोंबडा झाकल्याने काही सूर्य उगवायचा राहात नाही! त्यामुळे ज्यांना अजूनही सत्यघटनांची अजूनही चाड उरली आहे, अश्यांसाठी ही घटना उजेडात आणणे मला आवश्यक वाटले. यानिमित्ताने तरी या महान कवीच्या स्मृती जाग्या राहातील, त्यांना उजाळा मिळेल, त्यांच्यापासून कुणीतरी पुन्हा प्रेरणा घेईल, किमान पंडितजींच्या लेखनाचा तरी अभ्यास करेल; ही अपेक्षा!

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी वा लेखकाने विविध विषयांवर दिलेली व्याख्याने डाऊनलोड करून ऐकण्यासाठी भेट द्या – www.vikramedke.com)

  • एका प्रसंगावधानाची गोष्ट!

    २००१ साली अमेरिकेत आतंकवादी हल्ला झाला तेव्हा मी नववीत होतो. काही दिवसांतच त्यादिवशी घडलेल्या घटना आणि त्यांचं विश्लेषण करणाऱ्या बातम्या येऊ लागल्या. मला आठवतं, एका बातमीत सांगितलं होतं की ट्विन टॉवर्सवर विमाने आदळली तेव्हा जॉर्ज बुश कोणत्यातरी पूर्वनियोजित कार्यक्रमांतर्गत लहान मुलांच्या एका शाळेत – वर्गात तिथल्या लहानग्यांशी गप्पा मारत होते. व्हाईट हाऊसच्या कर्मचाऱ्यांपैकी एकाने धावत येऊन त्यांच्या कानात घडलेली घटना सांगितली. श्री. बुश यांनी ते ऐकले. चेहऱ्यावरील रेषही ढळू न देता त्यांनी अत्यंत हलक्या आवाजात त्या कर्मचाऱ्याला काही सूचना दिल्या आणि परत ते त्या लहानग्यांशी बोलू लागले. त्यांनी कार्यक्रम संपवला आणि मगच ते ९/११ संदर्भात पुढील कारवाई करायला बाहेर पडले.

    मी स्वत:च त्यावेळी शालेय विद्यार्थी होतो. ही बातमी वाचली त्याचवेळी मला वाटून गेलं होतं की, “कर्मचाऱ्याने सांगितलेली बातमी ऐकल्या-ऐकल्या श्री. बुश समजा गडबडून गेले असते तर? तर समोरच्या लहान मुलांच्या मनोधैर्यावर या गोष्टीचा काय परिणाम झाला असता?”

    जनतेचे नेतृत्व करू इच्छिणार्‍या,  विशेषत: जनतेच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या नेत्याने खरोखरच अश्याबाबतीत प्रचंड काळजी घेणे गरजेचे असते — कारण त्याच्या एका प्रतिक्रियेवर समोरील संपूर्ण “जमावा”चे वर्तन ठरणार असते. तोच जर गडबडून गेला, तर समोरचा सगळाच्या सगळा जमाव बिथरायला वेळ लागत नाही — आणि मग घडलेल्या दुर्दैवी घटनेपेक्षाही मोठी दुर्दैवी घटना घडायलाही अजिबात वेळ लागत नाही.

    भाजपाचे पंतप्रधानपदाच्या उमेदवार श्री. नरेंद्र मोदी यांचेही परवाच्या बिहार सभेदरम्यानचे वर्तन याच निकषावर तपासायला हवे. मोदींना कल्पना नसणार का, की आसपास कसे स्फोट होताहेत. जर मैदानाच्या इतक्या जवळ आतंकवादी पोहोचू शकतात, तर थेट मंचावरच एखादा बॉम्ब असण्याचीही शक्यता अजिबात नाकारता येत नव्हती. अश्या परिस्थितीतही त्यांनी अत्यंत संयमाने आपले भाषण चालू ठेवले. त्या स्फोटांत ८ लोक गेल्याची दु:खद बातमी आपण सर्वांनी ऐकलीय. परंतू विचार करा, मोदींच्या चेहऱ्यावर जरासा जरी ताण उमटला असता, अथवा त्यांनी चुकूनही स्फोटांसंदर्भात काही प्रतिक्रिया दिली असती — आणि उत्तरादाखल तो सबंध आठ-दहा लाखांचा जमाव बिथरला असता, तर काय परिणाम झाला असता? आठ लाखांच्या जमावाची चेंगराचेंगरी होतेय, या नुसत्या कल्पनेनेही अंगावर शहारा येतो. मोदींनी उलट भाषणाच्या शेवटी “घरी जाताना सर्वांनी काळजी घ्या, जपून जा” असे सांगितले. लोकांचे मनोधैर्य खचणार नाही असे शब्द वापरले. शांतता आणि सौहार्द राखण्याचा संदेश दिला. आणि मगच काही काळ उलटून गेल्यानंतर स्फोटांसंदर्भात ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. हे एका परिपक्व नेत्याचेच लक्षण (सध्याच्या भारतीय राजकारणात अभावानेच आढळणारे!) नव्हे काय? उलट हे स्फोट टाळणे ही ज्यांची जबाबदारी होती ते मात्र कोणत्यातरी हिंदी चित्रपटाच्या संगीतविमोचन सोहळ्यात दंग होते म्हणे!

    खरं तर गेल्या दहा वर्षांपासूनही अधिक काळ मला मोदींबद्दल आदर वाटत आलाय, पण अगदी मनापासून सांगतो, परवाच्या या घटनेनंतर त्या आदरात अक्षरश: शतपटींनी भर पडलीये. मोदी भविष्यात पंतप्रधान होतील न होतील हा भाग वेगळा, मात्र अश्या प्रसंगी देशाच्या सर्वोच्च नेत्याकडे लागणारं प्रसंगावधान मोदींच्या ठायी ठासठासून भरलंय, एवढं मात्र निश्चित! “नमो” नम:!!

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी क्लिक करा – www.vikramedke.com)

    image

  • खरेच गणेशविसर्जनाने प्रदूषण होते का ?

    खरेच गणेशविसर्जनाने प्रदूषण होते का ?

    खरेच गणेशविसर्जनाने प्रदूषण होते का ?

    गणेशोत्सव जवळ येऊ लागलाय त्याअर्थी आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन आणि त्याद्वारे होणार्या प्रदूषणाच्या नावाने शिमगा जोरजोरात सुरु होईल, हेही ओघाने आलेच. अर्थातच हिंदूंच्या प्रत्येक सणाला असा शिमगा होणे नित्याचेच असल्याने, सर्वांनाच या प्रकाराची सवय झाली आहे. हा आरडाओरडा करणारी मंडळी अन्यधर्मीयांच्या सणांच्या प्रसंगी विवेकवादी आणि पुरोगामी चिंतनात इतकी काही व्यस्त असतात की, त्यांना त्यातले प्रदूषण दिसतच नाही आणि दिसले तरी त्याबद्दल बोलावेसे वाटत नाही! असो.

    परंतू खरंच प्लॅस्टरच्या गणेशमूर्तींनी प्रदूषण होते का हो? केलाय कधी विचार? किंबहूना असे काही प्रदूषण होते हीच जर अंधश्रद्धेचे निर्मूलन करू म्हणणार्यांची अंधश्रद्धा असली तर? तसे असेल तर त्यांच्या या अंधश्रद्धेचे निर्मूलन व्हायला नको? त्यासाठी आधी प्लॅस्टर ऑफ पॅरिस (रेणूसूत्र – 2CaSO4.1/2H2O) म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे.
    प्लॅस्टर ऑफ पॅरिसची निर्मिती CaSO4 अर्थात जिप्समला (सल्फेटच्या पाण्यात विरघळू शकणार्या प्रकारांपैकी एक – कॅल्शियम सल्फेट) सुमारे १५०° C तापमानावर तापवून केली जाते. सूत्राच्या दृष्टीने पाहिल्यास,

    प्लॅस्टर ऑफ पॅरिस = जिप्सम + पाणी

    बेल्जियमस्थित “युरोजिप्सम” या संघटनेने यासंदर्भात काही प्रयोग केले आहेत. या प्रयोगांचे निष्कर्ष १४ डिसेंबर २०१० रोजी अहवालरुपाने प्रसिद्ध करण्यात आले असून “सल्फेट पाण्याद्वारे पोटात गेल्यास त्यांचा मानवी शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नसल्याचे” त्यात स्पष्टपणे म्हटले आहे. या निष्कर्षाला ‘Sulphate in drinking water: interaction with human health’ by Dr. Maurice Arnaud – Eurogypsum workshop 25 Oct. 2007 चा ही आधार देण्यात आला आहे. अहवालात पुढे असेही म्हटले आहे की, “पाण्यात मुळातच सल्फेट असते; एवढेच नव्हे तर पेय खनिजजल विकणार्या अनेक कंपन्यांच्या उत्पादनांतही सल्फेटचे प्रमाण बर्यापैकी असते”. PoP हे जिप्सम आणि पाणी यांपासून बनलेले असल्याने त्याचाही शरीराला काहीच अपाय नाही हेही ओघानेच आले.
    अर्थात, हा अहवाल जिप्समउत्पादक कंपन्यांच्या संघटनेने प्रकाशित केलेला असल्याने तो ग्राह्य धरण्यात येऊ नये, असा युक्तिवाद कुणी करू शकतो. तेव्हा याबाबतीत भारताच्या “राष्ट्रीय हरित लवादा”चे (National Green Tribunal) काय म्हणणे आहे, हेही पाहूयात.
    ९ मे २०१३ रोजी लवादाच्या दिल्ली विभागाने एक निर्णय दिला, लवादाने “केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळा”चे (Central Pollution Control Board) म्हणणे अमान्य केले असून “प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे जलप्रदूषण होत नसल्याचे” स्पष्ट केले आहे. यासाठी लवादाने पुणेस्थित Srishti Eco-Research Institute (SERI) या संस्थेने Air Quality Management Cell यांच्यासोबत पुणे येथे केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आधारभूत मानला आहे.
    २०१२ साली केलेल्या या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार मुठा नदीत दररोज सुमारे १५ टन कचरा जमा होतो. गणेशमूर्तींच्या विसर्जनाने या रोजच्या कचर्यात १% हूनही कमी भर पडते. तीही वर्षातून एकदाच.
    SERI चे अध्यक्ष डॉ. संदीप जोशी यांच्या मते, “CPCB च्या निर्देशांनुसार पाहू गेल्यास PoP प्रदूषक असल्याचे कुठेच आढळत नाही. नदीत PoP च्या गणेशमूर्ती विसर्जित केल्याने प्रदूषण होते, असे महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळदेखील म्हणत नाही”. सुरेश वागवणकर या मूर्तीकाराच्या मते, “लोकांमध्ये उगाचच काहीतरी अपसमज आहेत. खरं तर PoP मुळे प्रदूषण होत नसून उलट शेतजमिनीची उत्पादनक्षमता वाढते”.
    PoP पाण्यात लवकर विरघळत नाही, ते तळाशीच साचून राहाते, PoP मुळे पाणी अल्कली होते; इ. मतेही लवादाने आपला निर्णय देताना अमान्य केली आहेत.
    यानिर्णयासंदर्भात “मिड-डे”च्या दि. १३ मे २०१३ रोजीच्या अंकात कै. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मत प्रसिद्ध झाले आहे. ते म्हणतात, “मूर्तीकार तर या निर्णयाचे स्वागत करणारच. परंतू आम्ही मात्र आमच्या मतांशी चिकटून राहाणार आहोत. आणि PoP च्या गणेशमूर्ती वापरू नयेत, असा प्रचार करीतच राहाणार आहोत”. आता डॉ. दाभोलकर आपल्यात नसल्याने मी त्यांच्याबद्दल काही टीप्पणी करीत नाही. परंतू न्यायिक संस्थेने दिलेले निर्णय मान्य न करणे, सत्याचा आधार नसतानाही आपल्याच मतांना चिकटून राहाणे, त्यांचा रेटून प्रचार-प्रसार करीत राहाणे इ. जर दुराग्रहाची आणि वैज्ञानिक दृष्टीच्या अभावाची लक्षणे असतील, तर डॉ. दाभोलकरांच्या उपरोक्त विधानाचे वर्गीकरण कश्यात करायचे याचा पुरोगामी विचारवंतांनी एकवार अवश्य विचार करावा.
    आपल्याच मतांना चिकटून राहाणारे अंधश्रद्ध लोक निदान भोळेभाबडे तरी असतात, परंतू स्वत:ला विज्ञानवादी म्हणवणारे पुरोगामीही जर असेच करत असतील तर त्यांच्या अंधश्रद्धेला काय म्हणावे, याचा एकदा विचार व्हायला हवा. शिवाय “आम्ही सांगू तीच तेवढी अंधश्रद्धा आणि केवळ तिचेच निर्मूलन झाले पाहिजे” या विचारसरणीला काय म्हणतात, याचाही आता विचार होण्याची वेळ आली आहे. शाडूच्या मूर्ती तुलनेने महाग असतात. त्या घेणे लोकांना परवडतेच असे नाही. तेव्हा विरोधकांचे याबाबतीत काही “अर्थ”पूर्ण हितसंबंध आहेत की काय, याही शक्यतेवर विचार व्हावयास हवा. तूर्तास श्रींच्या आगमनाचा मुहूर्त जवळ आला आहे, तेव्हा सामान्यजनांनी कोणत्याही भुलाव्याला न भूलता सुखकर्त्याच्या आगमनाच्या तयारीला लागावे. PoP ची मूर्ती अवश्य आणावी परंतू तिचे रंग नैसर्गिकच असावेत असा आग्रह मात्र धरावा. मूर्तींचे आपल्या परंपरेनुसार, कायद्यानुसार आणि शास्त्रानुसारच विसर्जन करावे. देव मानणार्यांसोबत तो न मानणार्यांनाही बुद्धीदाता श्रीगणेश सद्बुद्धी देवो, हीच विघ्ननाशकाच्या चरणी प्रार्थना! सर्वे सुखिनो भवन्तु!!

  • हुतात्मा राजगुरू – काही शल्ये, काही प्रश्न!

    हुतात्मा राजगुरू
    हुतात्मा राजगुरू

    आज २४ ऑगस्ट. अर्थात हुतात्मा राजगुरू यांची जयंती. विषय केवळ आजच्या दिवसापुरते त्यांना प्रणाम करण्याचा नाहीये. विषय आहे यानिमित्ताने जरासं आत्मपरिक्षण करण्याचा. जरा स्वत:ला विचारण्याचा की, ज्या माणसाने तुमच्या-माझ्या सुखासाठी अतिशय कोवळ्या वयात आपल्या प्राणांची आहुती दिली, त्याची आज जयंती आहे हे आपल्या लक्षात तरी होतं का? जयंती सोडा राजगुरूंचे संपूर्ण नाव तरी आपण गुगलचा आधार घेतल्याशिवाय अथवा कुणाला विचारल्याशिवाय सांगू शकतो का? संपूर्ण नावही राहू द्या, राजगुरू नावाची व्यक्ती कोण होती आणि तिने काय कार्य केले होते, हे तरी आपण धडपणे सांगू शकतो का? सौ बात की एक बात – मूळात आपल्याला राजगुरूंना प्रणाम करण्याचा तरी हक्क आहे का?
    मला नकारात्मकता पसरवायची नाही, परंतू खेदाने सांगावेसे वाटते की यांपैकी बहुतांश प्रश्नांची उत्तरे “नाही” अशीच येतील. का म्हणून आपल्याला या देशासाठी झटणार्यांना विसरायची आणि भलत्यासलत्यांनाच डोक्यावर बसवण्याची सवय लागलीय? भगतसिंह आणि त्यांचे कार्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे, याचं कारण आहे भगतसिंगांच्या स्मृती जपण्यासाठी पंजाबने घेतलेली अपार मेहनत. राजगुरूंसाठी महाराष्ट्राने काय केले? शासकीय गोष्टी जरावेळ राहूद्या बाजूला, तुम्ही-आम्ही मराठी म्हणवणार्या लोकांनी राजगुरूंसाठी काय केले? राजगुरूनगरातील त्यांचा राहाता वाडा आज काय अवस्थेत आहे हे पाहाण्याची, किमान चौकशी करण्याची तरी तसदी घेतलीये का आपण?
    साधासा वेष करणारा, पोलादासारखे शरीर कमावलेला, अस्खलित संस्कृतात संभाषण करणारा, शब्दवेधी नेमबाजी करणारा, पिस्तुलाच्या केवळ एकाच गोळीने दूरवर असलेल्या स्कॉटचा मर्मभेद करणारा, मृत्यूलाही शहारे यावेत असे हाल तुरूंगात सोसूनही साथीदारांची नावे न सांगणारा, आपल्या अधिकारांखातर १०० दिवसांचे उपोषण करणारा (खरोखरचे उपोषण बरं का – मिडियाच्या गर्दीशिवाय आणि अन्नपाण्याविरहीत!), देशासाठी-धर्मासाठी फाशीचा दोरही हसत-हसत कवटाळणारा – असे सहस्रावधी गुण अंगी असणार्या या माणसात कधी आपण आपला आदर्श, आपला आयडॉल शोधण्याचा प्रयत्न केलाय? नाही केला. कोणत्या अचाट भावनेपायी हा मनुष्य वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी फाशी जाण्यास सिद्ध झाला, हे पाहण्याचा आपण कधी प्रयत्न केलाय? नाही केला. बाकी सारे राहू द्या हो – हा माणूस वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी फाशी गेला; जरा एकदा आपल्या मनाला विचारा की, आपण आपल्या वयाच्या २३व्या वर्षी काय करत होतो – तेव्हा कुठे आपल्याला राजगुरूंची थोरवी कळेल. खेदपूर्वक म्हणावंसं वाटतं की, कै. वि. श्री. जोशींचे “वडवानल” आणि तत्सम अन्य चार-दोन पुस्तके वगळता मराठी भाषेत राजगुरूंबद्दल सप्रमाण लेखनच झालेले नाही, यापरतें मोठे दुर्दैव कोणते? अर्थात हे दुर्दैव नेमके कुणाचे आहे, राजगुरूंचे की आपले, हा एक वेगळाच प्रश्न आहे. असो.
    अशी शेकडो शल्ये आहेत. अनेक प्रश्न आहेत की, ज्यांची उत्तरे नकारार्थीच आहेत. आज राजगुरूंची जयंती आहे, परंतू मला वाटतं की उपरोक्त प्रश्नांपैकी काही प्रश्नांची तरी उत्तरे आपण जेव्हा आपण नकारातून होकारात बदलू शकू, तेव्हाच आपल्याला राजगुरूंना आदरांजली वाहाण्याचा वा नमन करण्याचा अधिकार असेल. अन्यथा मुर्दाडांचा आदरही मुर्दाडच असतो, नाही का!

    – © विक्रम श्रीराम एडके.

  • हुतात्म्यांचा गौरव

    हुतात्म्यांचा गौरव

    खरे तर आपण राजकुमार संतोषी आणि राकेश ओमप्रकाश मेहरांचे आभारच मानायला हवेत. कारण, आजच्या पिढीला भगतसिंह, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद “बिस्मिल”, अशफाकउल्ला खान इ. वीर हुतात्म्यांबद्दल जी काही थोडेफार माहिती आहे आणि या लोकांनी या देशाच्या बंधमोचनासाठी काहीतरी त्याग केला होता हे त्यांना कळले, ते याच दोन दिग्दर्शकांमुळे. हवं तर दुर्दैवी म्हणा पण ही वस्तुस्थिती आहे की, आमच्या देशाचे क्रांतिकारक त्यांच्यावर चित्रपट निघेपर्यंत आम्हाला धड माहितीही नसतात! बर्याच जणांना तर या वीरांची कथा चित्रपटात सांगितली तेवढीच फक्त माहिती आहे. त्यापलीकडे जाऊन या व्यक्तीमत्वांचा शोध घ्यायचा प्रयत्न यांपैकी किती जणांनी केला? वाईट वाटतं!
    चेतन भगतसारख्या सुमार लेखकाची सगळी पुस्तके वाचणारे अनेक तरुण सापडतील, पण एखाद्या थरारक कादंबरीहूनही अधिक रोमहर्षक आयुष्य जगलेल्या या हुतात्म्यांची पूर्ण नावेही त्यांना सांगता येणार नाहीत. हुतात्मा राजगुरूंचे किंवा सुखदेवांचे एवढेच कशाला अगदी भगतसिंहांचेही पूर्ण नाव काय असे विचारले तर हा लेख वाचणार्यांपैकी निम्मे जण गुगलचा आधार शोधतील.
    पंजाबातील लोकांच्या जागृतीमुळे आपल्याला भगतसिंहांबद्दल त्रोटक तरी माहिती असते, परंतू राजगुरू मराठी असूनही आपल्याला त्यांची माहिती चार वाक्यांपलीकडे सांगता येणार नाही. ही काय दर्जाची किळसवाणी उपेक्षा म्हणायची? या महायोद्ध्याला तर चित्रपटातही विनोदी पात्र बनून राहाणेच नशिबी आले. मूळचा खेड (राजगुरुनगर) येथील असलेला हा तरुण स्वकर्तृत्वाने काशीस संस्कृतचा पंडित बनला होता. ते इतके निष्णात होते की, संस्कृतमधून सहज संभाषण करीत असत. कुस्तीत त्यांचा हात धरणारा कुणीच नव्हता. नेमबाजीत ते शब्दवेधी होते, एवढेच नव्हे तर उताणे झोपून पाठीमागे असलेले लक्ष्यही ते बाणाने सहज उडवित (कधी प्रयत्न करा मग कळेल ही गोष्ट किती अवघड आहे ते!). स्वत:स कणखर बनविण्यासाठी रात्रीतून धावत-धावत १५-२० मैलांवरील स्मशानात जात, तेथील विहिरीत पोहत आणि तशीच दौड करीत पुन्हा येऊन झोपत, इतका त्यांचा दम (स्टॅमिना) होता. तासनतास मुंग्यांच्या वारुळावर बसून दाखवत, दंश झाले तरीही चेहर्यावरील रेषही न हलवता. एकदा तर त्यांनी एक जळती चिमणी एका हाताने दाबून फोडली, लोखंडी सांगाड्याचाही पार चुरा केला – हात भाजला, काचांनी रक्तबंबाळ झाले तरीही त्यांनी हुं की चूं देखील केले नाही! आणि त्याहूनही मोठी गोष्ट सांगतो. सॉंडर्स आपल्या टप्प्याबाहेर आहे, त्याला गोळी लागणे शक्य नाही अशी भगतसिंहांना शंका वाटत होती, परंतू राजगुरूंनी मात्र भगतसिंह नको नको म्हणत असतानाही तितक्याच अंतरावरून चालवलेला गोळी सॉंडर्सच्या दोन भूवयांच्या बरोब्बर मधोमध कपाळातून आरपार गेली. त्यांना परत लक्ष्याकडे पाहायचीही आवश्यकता भासली नाही. विश्वास न बसून भगतसिंहांनी नंतर त्या प्रेताला जवळून आठ गोळ्या मारल्या! असे होते राजगुरू!
    हे सगळे रामायण लिहिण्याचे कारण म्हणजे, आता २३ मार्च येतोय. केवळ त्यादिवसापुरताच या हुतात्म्यांचा गौरव नको व्हायला. तर तो त्यांच्यासारखं बनण्याचा संकल्पदिन ठरावा. “दे दी हमें आझादी बिना खड्ग बिना ढाल” च्या भ्रमातून आपण केव्हाच बाहेर पडलो आहोत. आता जरा “आझादी” कुणामुळे मिळाली याचा अभ्यास करुयात. तरच महासत्ता वगैरे स्वप्ने पाहण्यात अर्थ आहे, नाहीतर सारेच स्वाभिमानशून्य आणि म्हणूनच व्यर्थ आहे!
    – © विक्रम श्रीराम एडके.
  • वसंत पंचमी

    वसंत पंचमी

    हल्ली “व्हॅलेंटाईन डे”चे सर्वत्र फॅड सुरू आहे. मी या दिवसाचा विरोधक आहे आणि म्हणून याला फॅड म्हणतोय असा कृपया समज करून घेऊ नका. मी फॅड म्हणतोय कारण, त्रयस्थपणे विचार केल्यावर कळते की या दिवसाचा आणि प्रेमाचा तसा काही संबंध नाही. ही फक्त प्रेमाच्या नावाखाली फुले, ग्रिटींग्ज आदी वस्तू विकण्याची मार्केटींग स्ट्रॅटेजी आहे, बाकी काही नाही. आणि पाश्चात्यांहूनही अधिक पाश्चात्याळलेले आपल्याकडचे तरुण याला बरोब्बर बळी पडतात. प्रेमाच्या नावाखाली या दिवसाची भलावण करीत अगदी पाच रुपयांचा गुलाब वीस रुपयांना घेण्यापासून सर्व मूर्खपणा सुरू असतो! मागे नाही का त्या हॉलिवूडवाल्यांनी त्यांचे पिक्चर चालत नाहीत म्हटल्यावर “डिसेंबर २०१२”चा बागुलबुवा उभा करून, त्यावर पिक्चर काढून, चालवूनही दाखवला होता! आणि वेडे लोक त्याच्याशी संबंधित सर्वच गोष्टी विकत घेत होते. मग त्यात पुस्तके आली, चित्रपट आले अगदी येऊ घातलेल्या जगबुडीपासून वाचण्याचे उपायही आले. थोडक्यात तुमच्या भावनांच्या नावावर तुम्हाला “येड्यात” (हा फारच सौम्य शब्द आहे. खरं तर इथे मला “च्यु”ने सुरू होणारा एक असंसदीय शब्द सुचतोय!) काढून त्यांच्या वस्तू त्यांनी तुमच्या गळ्यात मारल्या! व्हॅलेंटाईनच्या नावाखालीही तेच चालत नाही का? तुम्ही त्यांची दरवर्षीची हमखास बाजारपेठ आहात. चराऊ कुरण, बाकी काही नाही!
    असो. तो ज्याचा त्याचा प्रश्न. माझा आणखी एक वेगळा मुद्दा आहे. आपल्याला प्रेमाचा दिवस उधार घेण्याची का बरे गरज पडावी? जगातील मोठमोठ्या संस्कृती असलेल्या मोठमोठ्या देशांतील लोकांना जेव्हा कपडे घालण्याचीही अक्कल नव्हती, तेव्हा भारतीय संस्कृती तिच्या चरमावस्थेस पोहोचलीही होती. प्रेम, विशेषत: कामभावनेचा आपल्या संस्कृतीत जितका सखोल विचार केलाय, तितका क्वचितच अन्यत्र कुठे केला गेला असेल. केवळ आपल्याकडेच या विषयाला शास्त्र म्हणून मान्यता आहे. हा विषय आपल्याकडे सर्व थरांत शिकवला तर जायचाच, इतकेच नव्हे तर आदी शंकराचार्यांचा पराभव एका स्त्रीने केवळ याच एका विषयाच्या आधारावर केला होता (आठवतेय ना परकायाप्रवेशाची गोष्ट?), इतका हा विषय महत्वाचा आहे. मग आपल्याकडे प्रेमासाठी एखादा दिवसही राखून ठेवलेला नसावा का? आहे ना, अवश्य आहे. फक्त जरा व्हॅलेंटाईनच्या प्रभावातून बाहेर येऊन पाहाता आले पाहिजे! त्या दिवसाचं नाव आहे “वसंत पंचमी”! आपल्या संस्कृतीनुसार प्रेम व्यक्त करण्याचा दिवस, रति-मदनाच्या पूजेचा दिवस! आणि यात अभिप्रेत असलेले प्रेम आई-वडलांवरील, भावा-बहिणीवरील प्रेम नाही बरं (हो, व्हॅलेंटाईनच्या समर्थनासाठी काही लोक अश्या गोष्टी बोलतात, म्हणून म्हटलं)! यात नर-मादी यांचे एकमेकांवरील प्रेमच अभिप्रेत आहे. हो, क्युपिडपेक्षा आमच्या कामदेवाचा इतिहास अधिक जुना आहे! वसंतपंचमी दरवर्षी माघ शुक्ल पंचमीला असते. यावर्षी योगायोगाने ती १४ फेब्रुवारीलाच येतेय.
    आता पुन्हा एकदा आधीच्या “मार्केटींग स्ट्रॅटेजी” या विषयाकडे येऊ! किती दिवस परकियांची बाजारपेठ म्हणून जगणार आहोत आपण? आता प्रवाह उलटा फिरवायची वेळ आलीय असे नाही वाटत का? आधीच आपल्याकडील गोष्टींचे वेड असलेल्या पाश्चिमात्यांपुढे जर आपण वसंत पंचमीचे व्यवस्थित मार्केटींग केले, तर तिला व्हॅलेंटाईन डे ची जागा सहजच मिळवून देता येईल. नाहीतरी योग, पूजा, हवन आणि हिंदू अध्यात्म या गोष्टी पाश्चिमात्य जगात “स्टेटस सिम्बॉल” बनल्या आहेतच की! मग त्यात आणखी एकाची भर घालायला काय हरकत आहे? येऊ द्या की वसंतपंचमीच्या ग्रिटींग्स, रति-मदनाच्या “गुडीज्”, बाहुल्या वगैरे! विकूयात की त्यांना! कमवूयात की पैसे. घेऊ देत की क्युपिडची जागा कामदेवाला! आपल्याकडील हौशी उद्योजक तरुणांनी खरोखर वसंतपंचमीला एकप्रकारचे “थिमॅटीक” स्वरुप देण्यासाठी आत्तापासूनच जर मेहनत घ्यायला सुरुवात केली, तर पुढील वर्षीपर्यंत सहज मार्केटमध्ये उतरता येईल. फक्त या विषयाकडे एक संधी म्हणून पाहायची तयारी तेवढी हवी! एकतर स्वदेशी, त्यात हिंदू संस्कृतीशी घट्ट नाळ असलेले, भारताला परकीय चलन मिळवून देणारे आणि वर व्यवसायाची संधी, असा चौफेर फायदा! बरे वसंत-पंचमी संपूर्णतया वैज्ञानिकही आहे बरं का! यादिवसांत निसर्गाला नवी झळाळी प्राप्त झालेली असते, प्राणीही जोड्या बनवतात. अनेक प्रजातींचा हा विणीचा हंगामही असतो. म्हणून तर आपल्या हुशार पूर्वजांनी या काळाची निवड केली ना, प्रेम व्यक्त करण्यासाठी! इंग्रजांनी इंग्रजीची, किंबहुना त्यांच्याकडील सर्वच गोष्टींची व्यवस्थित जाहिरात केली, म्हणूनच तर आज आपण वेड्यागत त्यांचं अनुकरण करतो ना! आपल्याला फक्त गोष्टी “रिप्लेस” करता यायला हव्यात! काहीतरी सेलिब्रेट करण्यासाठी सतत झुरणारी चंगळवादी मंडळी ताबडतोब नवी फॅशन म्हणून आपल्यामागे पळतील! अर्थात, त्या गोष्टींची सात्विकता राखण्याचीही काळजी आपण घ्यायलाच हवी! आणि पाश्चात्य ती गोष्ट करू लागले की, पैजेवर सांगतो, आपल्याकडचे “काळे इंग्रज” त्यांच्याही पुढे चार पावले जाऊन त्यांचे अनुकरण करतील.
    चीनने फेंगशुईच्या बाबतीत काय वेगळे केले? आता आपली वेळ आहे. यावर्षी तुम्ही तर वसंतपंचमी साजरी कराच, परंतू जगालाही ती कशी साजरी करायला लावता येईल याचाही विचार करा! अर्थातच परंपरा आणि आधुनिकता यांचा योग्य संगम करून!
    व्हॅलेंटाईन डे ला नुसताच विरोध करीत राहिलात तर हाती काहीच लागायचे नाही. तरुणाई दुरावेल आणि विरोध होतोय म्हणून अधिकच जोषात व्हॅलेंटाईन साजरा करेल हा भाग वेगळाच. शिवाय विरोध करणार्यांकडे त्या तोडीची पर्यायी व्यवस्था आहे कुठे? या संधीच्या रुपाने तो पर्याय उपलब्ध होईल. तरुणांना त्यांना कळणार्या भाषेत हिंदू संस्कृती समजावून देण्याची संधी मिळेल. एक ना अनेक फायदे. गरज आहे ती हे सारे योजनाबद्धरित्या राबविण्याची. योजकस्तत्र दुर्लभ:!
    – © विक्रम श्रीराम एडके.

  • जो जीता वोही सिकंदर ???

    जो जीता वोही सिकंदर ???

    काल दूरचित्रवाणीवर एक प्रसिद्ध गीत पाहात होतो. बोल होते, “वो सिकंदर ही दोस्तो कहलाता हैं, हारी बाजीको जीतना जिसे आता हैं”! चित्रपटाचंही नाव साजेसंच होतं, “जो जीता वोही सिकंदर”. गेले दोन दिवस मी असत्याधारित, विकृत आणि राष्ट्राचा तेजोभंग करणार्या इतिहासाबद्दल लिहितोय. जे आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आलोय -” जो जीता वोही सिकंदर” असं खरंच होतं का?
    अलेक्झँडर हा अतिशय महत्वाकांक्षी होता, विश्वविजयासाठी निघाला होता हे खरे. परंतू कोणत्याही अर्थाने विश्वविजयी नव्हता. ग्रीस ते इराणपर्यंतचे प्रदेश त्याने सहज जिंकले. भारताच्या सीमेवरील गांधारजवळची (अफगाणिस्तान) छोटीछोटी गणराज्ये पाहून त्याला नक्कीच आनंदाच्या उकळ्या फुटल्या असणार! मी यापेक्षा अनेकपट मोठी साम्राज्ये सहज जिंकली, ही छोटी राज्ये तर मी पाहातापाहाता फस्त करेन, अशी दर्पोक्तीही त्याने स्वत:शी केली असणार. परंतू कठ, ब्राह्मणक ही छोटीछोटी गणराज्येही संपूर्ण ताकदीनिशी अलेक्झँडरविरोधात उभी राहीली. शरण या सांगून कुणीच शरण जाईनात. प्रत्येकाने असा काही लढा दिला की, ग्रीक सैन्याला “विजय नको पण युद्ध आवर” असे होऊन गेले. त्यातच एक पूर्वी कधी न घडलेली गोष्ट घडली. स्वात खोर्यातील एका अज्ञात राष्ट्रवीराच्या विषारी बाणाने थेट अलेक्झँडरचाच वेध घेतला. प्रत्यक्ष सम्राटाचा वेध? त्याने कधी विचारही केला नव्हता की, एका लहानश्या राज्यातला एक अज्ञात सैनिक हे करेल! केवळ अलेक्झँडरचे सुदैवच की, तो वाचला. परंतू भारतीयांच्या पराक्रमाची त्याने धास्ती घेतली ती कायमचीच! त्याही परिस्थितीत त्याने वाटचाल चालूच ठेवली. परंतू पौरवांच्या छोट्याश्या राज्यानेही जेव्हा अलेक्झँडरला मार दिला तेव्हा त्याची अवस्था बिकट झाली. मनोधैर्य खचले. नि:संशय त्याने ही युद्धे जिंकली होती, परंतू या विजयाला काय महत्त्व होते? अहमदशहानेही पानिपत जिंकले होतेच की! परंतू तो विजय साजरा करण्याची त्याची कधी हिंमत झाली नाही. पळूनच जावं लागलं. दुसरीकडे ज्या मराठ्यांना इतिहास हरलेले म्हणून सांगतो, त्याच मराठ्यांनी अवघ्या दहाच वर्षांत पुन्हा दिल्ली काबीज केली! तेव्हा जय-पराजय हा तात्कालिक स्थितीवर अवलंबून नसतो तर दूरगामी घटनांवर अवलंबून असतो. अलेक्झँडरचेही असेच नाही का? त्याचे मनोधैर्य खचलेले, सैन्य पुढे जायला तयार नाही. सेनानायक बंडाची भाषा बोलू लागलेले. परत फिरण्यावाचून पर्यायच उरला नव्हता. विश्वविजयाला निघालेला अलेक्झँडर, भारताच्या सीमेवरूनच पळाला. छोट्याछोट्या गणराज्यांमुळे पळाला. मगधासारखी प्रचंड साम्राज्ये तर तो पाहूदेखील शकला नाही! सावरकर अगदी चपखल लिहितात,
    “असो कुणाचा जरी शिकंदर परंतू भारतजेता ना
    अंगणही ना तये देखिले कळलाही ना कुणा कुणा”
    असा हा अलेक्झँडर भारताचे अंगणही पाहू शकला नाही आणि उरलेल्या भारताला तर कळलंही नाही की असा कुणी आक्रमक हा देश जिंकण्याच्या हेतूने आला होता. अश्या माणसाला आपण जगज्जेता म्हणायचं का? काय अर्थ आहे, “जो जीता वोही सिकंदर” या म्हणीला? विचार करा. भारतातून गेल्यानंतर काही काळातच अलेक्झँडरचा मृत्यू झाला हेही उल्लेखनीय. भारत मात्र अजिंक्यचा अजिंक्यच आहे. आपण ग्रीक पचवले, शक, हूण आणि कुशाणही पचवले. ज्या टोळधाडीखाली सारे काही रगडले जात होते, त्या तुर्कांना आणि मुघलांनाही आपण नुसते पचवलेच नव्हे तर मांडलिकही केले. हा इतिहास आहे. आपला तेजस्वी इतिहास. कुणीतरी काहीतरी सांगते म्हणून तेजोभंग करून घेण्यात काय अर्थ आहे. विचार करा. अभिमान बाळगा. भविष्यातील विजयासाठी प्रेरणा घ्या! कृतिशील व्हा!
    – © विक्रम श्रीराम एडके.