Author: Vikram Edke

  • होळी – विदेशी कापडांची आणि विदेशी अहंकाराचीही!

    वंगभंगाच्या चळवळीने देश ढवळून निघाला होता. स्वदेशीची चळवळही फोफावू लागली होती. लो. टिळक आणि त्यांचे सहकारी सर्वत्र फिरून या विषयावर जागृती करत होते. दि. १ ऑक्टोबर १९०५ या दिवशी पुण्यातील सार्वजनिक सभेच्या दिवाणखान्यात साहित्यसम्राट न. चिं. केळकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. त्यात एका तरुण विद्यार्थ्याने विदेशी मालावरील बहिष्काराला ठसठशीत स्वरूप यावे म्हणून विदेशी कापडांची होळी करण्यात यावी (स्वा. सावरकर चरित्र, शि. ल. करंदीकर, आ. २०११, पृ. १०६) अशी कल्पना मांडली. तो तरुण म्हणजेच स्वा. विनायक दामोदर सावरकर!

    केळकरांना काही ही कल्पना पसंत पडली नाही. ते विदेशी कपडे जाळून फुकट घालवण्यापेक्षा अंध, पंग, रोगग्रस्त अशा बांधवांना वाटून टाकणे योग्य, असे त्यांचे मत होते. धनंजय कीरांच्या शब्दांत सांगायचे तर, “यावर सावरकरांनी हळूच टोला दिला की, या होळीने जी ज्वाळा पेटेल ती नैतिक नि भौतिक दृष्टीनेही अधिक मोलाची नि चिरस्थायी ठरेल”. (स्वा. सावरकर चरित्र, धनंजय कीर, अनु. द. पां. खांबेटे, आ. २००८, पृ. २२-२३)

    हा प्रकार झाला त्या दिवशी टिळक पुण्यात नव्हते. ते परतल्यावर सावरकरादी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कानावर आपली कल्पना घातली. टिळकांना ती पसंत पडली, पण याचे काय परिणाम होतील हा ही विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी सावरकरप्रभृती विद्यार्थ्यांना नकार दिला नाही, पण त्यांचे कर्तृत्व व तळमळ यांची पारख करण्यासाठी ते म्हणाले (करंदीकर, पृ. १०६), “होळीच करावयाची तर ती पोरकट दिसता कामा नये, किमान अर्धी गाडीभर तरी कपडे गोळा कराल तर होळी करण्याला काही अर्थ आहे”.

    सावरकरांनी हे आह्वान स्वीकारले व ते ताबडतोब विदेशी कापडे गोळा करण्याच्या उद्योगाला लागले (कीर, पृ. २३). या मोहिमेचा एक भाग म्हणून त्यांनी एक व्याख्यानही दिले (करंदीकर, पृ. १०६). त्याकाळी पुण्यात ‘महाराष्ट्र विद्यालय’ नावाची भोपटकर बंधूंनी चालवलेली एक राष्ट्रीय बाण्याची शिक्षणसंस्था होती. त्या संस्थेतील विद्यार्थ्यांचीही सावरकरांना मदत (तत्रोक्त) झाली. करंदीकर लिहितात की, टिळकांच्या मागणीप्रमाणे भरपूर कपडे उपलब्ध झाले होते (तत्रोक्त). कीर मात्र ‘कपड्यांनी भरलेली गाडी’ असा शब्द वापरतात. तेव्हा टिळकांची अपेक्षा अर्धी गाडीभरच असताना सावरकरांनी मात्र गाडीभर कपडे गोळा केले होते की काय, असा निष्कर्ष काढायला वाव आहे. कपडे किती का असेनात, ते एका महाविद्यालयीन युवकाने, फक्त ५-६ दिवसांत, कोणतीही आधुनिक माध्यमे पाठीशी नसताना केवळ तरुणांचे संघटन करून गोळा केले होते हे महत्त्वाचे!

    आणि ७ ऑक्टोबर १९०५ या दिवशी सायंकाळी ते सगळे कपडे एका गाड्यावर भरले गेले. त्यांचे बलिदान व्हावयाचे असल्यामुळे त्यांच्यावर खूप सारा गुलाल टाकण्यात आला. गाडीच्या आगेमागे नागरिकांचा प्रचंड घोळका (करंदीकर, पृ. १०६) अशा थाटात ही कपड्यांची मिरवणूक मंडईपासून निघाली! प्रा. शि. म. परांजपे, ‘भाला’कार भोपटकर वगैरे मंडळी त्यात सुरुवातीपासूनच सहभागी होती. मिरवणूक जसजशी लकडी पुलाच्या दिशेने निघाली तसतसे अजूनच लोक त्यात सहभागी होऊ लागले. ‘चित्रशाळे’च्या आसपास टिळकही त्यात सहभागी झाले. मिरवणूक लकडीपुलाच्या पलिकडे एका मैदानात थांबली. गाडीवरील कपडे एका शेतात रचण्यात आले. त्यावेळी टिळकांनी मुद्दा मांडला की (कीर, पृ. २३. करंदीकर, पृ. १०६), होळी एका जागी करावी आणि व्याख्याने दुसरीकडे द्यावीत. त्यावर सावरकरांनी कोटीक्रम मांडला की (कीर, पृ. २३), “मग ही मिरवणूक तरी कशाला हवी होती? आम्हाला कपडे इकडे पाठवून देता आले असते नि व्याख्याने रे मार्केटातच देता आली असती. वस्तुतः विलायती कपड्यांच्या जळत्या ढिगासमोर जळजळीत भाषणे करणे हेच युक्त! कारण, असे केले तरच लोकांच्या मनावर उमटणारा ठसा खोलवर जाईल नि कायम राहील”. लक्षात घ्या, सावरकर टिळकांना केवढे प्रचंड मानायचे याचे दाखले सावरकरांच्या चरित्रात अनेक सापडतात. सावरकरांनी टिळकांवर अनेक काव्ये लिहिली आहेत. टिळक गेले तेव्हा अंदमानात बंदी असलेल्या सावरकरांनी संपर्काची अभिनव साधने वापरून सेल्युलर जेलमध्येच नव्हे तर सबंध अंदमानात उपवास घडवून आणला होता (समग्र सावरकर, खंड २, आ. १९९३, माझी जन्मठेप, पृ. ४७४). परंतु तेच सावरकर, वय लहान असतानाही टिळकांच्या न पटलेल्या मुद्याला विरोध करताना डगमगले नाहीयेत. डोळस भक्ती या हल्ली दुर्मिळ होत चाललेल्या तारतम्यभावाचे केवढे उत्कृष्ट उदाहरण आहे हे! सभा होळीच्याच ठिकाणी झाली.

    टिळकांचे या प्रसंगीचे भाषण अत्यंत तेजस्वी झाले. आपल्या भाषणाच्या ओघात ‘काळ’कर्ते परांजपेंनी जळत्या ढिगातला एक कोट काढून लोकांपुढे धरला. आणि त्या खिशाची झडती घेता घेता त्यांनी व्यापाराच्या मिषाने खिसे भरभरून हिंदुस्थानची संपत्ती लुटून नेणाऱ्या इंग्रजांची हजेरी घेतली आणि ‘असा हा पातकी कोट मी अग्निसमर्पण करतो’ असे म्हणून त्यांनी तो कोट धगधगलेल्या होळीत फेकला (करंदीकर, पृ. १०६-१०७). होळीच्या ज्वाळा गगनाला जाऊन भिडल्या तशाच त्या ब्रिटिश सिंहासनालाही झळ बसवून गेल्या! या होळीनेच देशभर ठसठसत असलेल्या ब्रिटीशविरोधी द्वेषाग्नीत तेल ओतले. ७ ऑक्टोबर १९०५ हा दिवस होता दसऱ्याचा! दसऱ्याच्या दिवशी होळी पेटविणारे आणि त्यातून इंग्रजी सत्तेचा अहंकार जाळून टाकणारे, सावरकरच!

    कीर लिहितात (पृ. २३) की, त्या काळात सावरकरांनी केलेल्या भाषणांचा आपल्या स्मृतिपटलावर अनेक वर्षेपर्यंत खोल ठसा उमटून राहिला होता, असे आपल्या उत्तरायुष्यात केळकरांनी पुष्कळदा बोलून दाखवले होते. पुण्यातील सार्वजनिक सभेमध्ये सावरकरांनी केलेल्या भाषणाचे वर्णन करताना एक वार्ताहर म्हणाला होता (कीर, पृ. २४), ‘त्यांचे भाषण मनस्वी वक्तृत्वकुशल होते आणि कमालीचे ओजस्वी होते! त्यांचे वय जेमतेम बावीस वर्षांचे आहे, पण आताच त्यांनी एखाद्या कसलेल्या वक्त्याचे स्पृहणीय स्थान पटकावले आहे”.

    अर्थात, सगळ्याच प्रतिक्रिया काही उत्साहवर्धक नव्हत्या. या होळीसाठी शिक्षा म्हणून (करंदीकर, पृ. १०७) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी सावरकरांना दहा रुपये दंड ठोठावला व वसतिगृह सोडण्यास फर्मावले. सबंध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आणि सावरकरांकडे सहानुभूतीचा व द्रव्याचा ओघच वाहू लागला (कीर, पृ. २४)! गंमत म्हणजे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच सावरकरांच्या दंडासाठी स्वयंस्फूर्तीने निधी गोळा केला. एका विद्यार्थ्याने तर त्याला घरून आलेल्या मनिऑर्डरचे पैसे त्यासाठी देऊ केले. निधी दंडाच्या रकमेपेक्षाही अधिक गोळा झाला. सावरकरांनी लोकांच्या, मित्रांच्या भावनांचा मान म्हणून दंडापुरती रक्कम घेतली व उरलेले पैसे पैसाफंड व इतर काही संस्थांना देऊन टाकले. कीरांच्या मते मात्र (पृ. २४) सावरकरांनी दंड स्वतःच्या खिशातून भरला व लोकांनी आणि मित्रांनी गोळा केलेले पैसे पैसाफंड वगैरे संस्थांना देऊन टाकले. नेमके काहीही घडलेले असो, परंतु सावरकर जरी राजकारणात असले, तरीही त्यांनी हल्लीच्या काही राजकीय नेत्यांप्रमाणे तो पैसा हडप केला नाही, हे निश्चित!

    या दंडाच्या घटनेमुळे साक्षात टिळकांनी ‘केसरी’त १७ ऑक्टोबर व २४ ऑक्टोबर अशा दोन भागांत महाविद्यालयाच्या वागणुकीचा समाचार घेणारा अग्रलेख लिहिला (करंदीकर, पृ. १०७). त्याचे शीर्षक होते, ‘हे आमचे गुरूच नव्हेत’!

    — © विक्रम श्रीराम एडके

    (सावरकर चरित्राचे अभ्यासक आणि व्याख्याते. अन्य लेखांसाठी पाहा www.vikramedke.com)

  • Prisoner Of Subtlety — Joker

    Give a man some tragedy and you can make a hero out of him, but give him more and you might end up making a villain you never wished for. Todd Phillips’ “Joker” can be summed up in these two lines. The fact that this theme has played in a number of artistic expressions over several times gets diluted by the performances it commands. Though marketed as a psychological thriller, the tale is more of a psychological study that delves into the mind of Batman’s most celebrated antagonist ever.

    Arthur Fleck (Phoenix) is a struggling stand-up comedian. His struggle is more personal than professional. He has dreams, wishes and feelings like every other person, but he is ridden by many psychological conditions that hinder both his professional and personal lives. The whole city of Gotham is slowly sinking into the chaos and so do the conscience of its residents. People are sharply divided into wealthy and poor classes, there is no middle ground. Those who are wealthy, don’t care and for others, poverty has taken a toll on their sensibilities. Arthur’s world torns apart between these outer and inner conflicts. In fact both the situations affect each other and he slithers down the path of darkness.

    Joaquin Phoenix has given everything for the role, physically and mentally. He is in almost every other scene and still you don’t get tired of him, not even for a single moment. He is sheer magic. His eyes illuminate with anger and at the same time darken with melancholy. His body emotes even the smallest nuances of the character. He laughs when he cries and cries as he laughs. You can see his each and every mental condition through the language of his terribly skinny body. The way he walks, the way he talks, the way he moves a muscle, everything adds up something to the character and its story. In this universe, Joker isn’t insane or lunatic. He just sees, feels and experiences the world differently, in a way that can only be understood to him. Phoenix has immersed himself into this psyche of Joker so literally that you start to worry for the actor’s wellbeing. And for some strange resemblance, I saw Akshaye Khanna in his place too many times. I really wish Khanna should get such a role at least once in his lifetime to show the world what he is capable of. But that’s beside the point.

    Every tale comes with its flaws. Joker takes too much time to set the premise, almost to the half of the second act. Though Phoenix holds the reins firmly, the writing doesn’t support him in some of those parts. Joker starts in an alley and ends symbollically in another. But the road in between gets bumpy sometimes. Their core theme has been played out so many times in movies and fiction that there’s almost nothing novel remained to do in it. This makes the first half somewhat unfocused, disoriented, almost to the point that some of Arthur’s conditions start looking like mere tools to fill in the blanks. Comedy is always been a way to make political statements and given the times we live in, Joker too does this in its own tragicomic way. But when it comes to owning those statements, it shys away. The class division seems forced. Characters like Thomas Wayne (Brett Cullen) are reduced to mere caricatures and their speeches nonsensical to create a forced conflict the movie wants. The film is in too much hangover (pun intended) of Scorcese’s “Taxi Driver” (1976) and though at first it seems an artsy homage to the classic with Robert De Niro himself on board, many a times it works against the film. The twist in the tale at the end of the second act, though predictable and adds up to the hesitance of owning the narrative, is beautifully unfolded.

    In the climactic moments when Joker spreads his wings to the fullest, many things were happening around. Some lives are taken, some characters change forever, those who are responsible for the tragedy cheer up for the outcome. And I wondered, was the posing Joker sensing all this in that moment? Does he have a faintest of the inkling of the butterfly effect caused on and due to his existence, that built up this very moment? These are those subtle moments, one cannot answer for real. Joker, though a good movie, is a prisoner of those moments!

    PS: I might sound foolish to see Akshaye Khanna in Joaquin Phoenix, my wish that he should get to showcase his potential in such a role, might sound even insane. But you know, insanity is just a form of sanity not everyone understands!

    *4/5

    — © Vikram Edke
    [For more articles visit www.vikramedke.com]

  • साहवेना ‘साहो’

    सध्या एका व्यक्तीचा व्हिडिओ खूप व्हायरल आहे. ती व्यक्ती मोठ्या ऐटीत पॅराग्लायडिंग करायला जाते, पण लगेचच आपली चूक त्याच्या लक्षात येते. मग जमिनीवर उतरेपर्यंत त्या व्यक्तीचं कळवळणं, स्वतःलाच शिव्या देणं सध्या सगळीकडे चर्चेचा विषय झालाय. नेमकं असंच मला आज चित्रपटगृहात वाटलं! पहिल्या दहाच मिनिटांत माझी अवस्था ‘भाई मुझे लंबी राईड नहीं करनी, सौ-दो सौ ज्यादा ले ले पर लँड करा दे’ झाली होती. त्या व्हिडिओतील व्यक्तीचे आडनाव ‘साहू’ निघावे आणि तशीच अवस्था करविणाऱ्या चित्रपटाचे नाव ‘साहो’ निघावे, हा काय दर्जाचा दैवदुर्विलास म्हणावा, देवच जाणे!

    एक आंतरराष्ट्रीय माफिया संघटना आहे. तिचा प्रमुख पृथ्वीराजने (टिनू आनंद) तिची सूत्रे रॉयला (जॅकी श्रॉफ) सोपवली. रॉयचा प्रयत्न त्या संघटनेला कायद्याच्या चौकटीत बसवण्याचा आहे. त्यासाठी तो भारतात बिझनेस सुरू करु इच्छितो. रॉय या गोष्टीसाठी इतका उतावीळ आहे की, तो त्यासाठी केंद्रीय मंत्र्याचं (तनिकेला भरणी) अपहरणही करायला मागे-पुढे पाहात नाही. दरम्यान शहरात विशेष प्रकारच्या चोऱ्या होऊ लागतात. त्या चोऱ्यांचा तपास करण्यासाठी एका खास पोलिस अधिकाऱ्याची नेमणूक होते. आता या दोन गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध आहे आणि त्यात साहो (प्रभास) कुठे येतो, याची गुंतावळ झालेली कथा म्हणजे दिग्दर्शक सुजीतचा ‘साहो’! आपल्याकडे टिव्हीवरच्या गाण्यांच्या स्पर्धा पाहून जरा कुणी बरं गायलं की, ‘क्या बात है’ म्हणायची पद्धत पडलीये. या ‘क्या बात है’चं संस्कृत रूप काय असावं असा विचार केला तर एकच शब्द आठवतो, ‘साधो’! त्याच्या जवळपास जाणारा हिंदी उद्गार कदाचित ‘जय हो’च असू शकतो. ‘साहो’ शब्द गुगल केल्यावर येणारा अर्थ असाच काहीसा आहे. हाय, चित्रपटही तसाच असता तर?

    अरेषीय कथाकथन म्हणजे भूसुरुंगाने भरलेल्या मैदानातून चालण्यासारखे असते. तुम्ही जर सुखरूप सगळ्या जंजाळातून बाहेर पडलात तर लोक टाळ्या वाजवतात, पण एक पाऊल चुकीचं पडलं तर सगळ्याचाच इस्कोट होतो. ‘साहो’चे नेमके तेच झालेय. एक प्रसंग पूर्ण होण्याआधीच दुसरा त्यात मिसळला जातो. हा सर्जनशील निर्णय म्हणून विचारपूर्वक घेतला गेला, तर अतिशय शैलीदार वाटू शकतो. पण दिग्दर्शक सुजीतने नुसतीच शैली उचलली, विचार नाही. त्यामुळे ‘साहो’तील बहुतांश प्रसंग तुटक आणि अपूर्ण वाटतात. सबंध चित्रपट म्हणून विचार केला तर तो केवळ तुटक प्रसंगांची अपूर्ण भेळ बनून राहातो मग. दिग्दर्शकाने त्यात खूप सारे पात्र आणि उपकथानकं घुसडलीयेत. पण त्यांच्यापैकी कुणालाच लेखन, संपादन आणि दिग्दर्शनाच्या पातळीवर न्याय दिला न गेल्यामुळे ते सगळेच निरर्थक वाटतात. एकीकडे वाटत राहातं की, पटकथेचा अजून एक कित्ता झाला असता तर चित्रपट जरा तरी सुसह्य वाटला असता. दुसरीकडे वाटतं की, अचानकच मोठे स्टुडिओज आणि प्रोडक्शन हाऊसेस सहभागी झाल्यामुळे एक छोटा प्रोजेक्ट म्हणून कदाचित छान वाटू शकणारा चित्रपट मोठ्यांच्या साठमारीत गंडला आणि नवख्या दिग्दर्शकाचे त्याच्या सर्जनशील बाजूवरील सगळेच नियंत्रण सुटले. दोन्हीही परिस्थितीत एका चांगल्या विषयाची माती झालीये.

    शैलीदारपणा म्हणावा तर त्या आघाडीवरसुद्धा प्रचंड संधी असूनही चित्रपट हुकलाय. हिरोच्या हिरोईझमवर चालणाऱ्या चित्रपटात हिरोच्या एंट्रीलाच धमाका होत नाही! त्या वेळी असलेली मारधाडही तुमच्यात उत्साहाच्या लाटा निर्माण करत नाही! चित्रपटाला अनेक साहस-दिग्दर्शक असूनही जवळजवळ सगळीच साहसदृश्ये अतिशय मलूल आणि वाईट झालीयेत. जी आहेत ती सुद्धा सलग नाहीत, तिथेही इतरत्र असलेला तुटकपणा आहे. एका प्रसंगात प्रभास म्हणतो, ‘मेरे लाईफ में अॅक्शन बहोत हो गया, अब रोमान्स चाहिए’! प्रत्यक्षात त्या प्रसंगापर्यंत अॅक्शनचे क्षण फारच थोडे आलेले असतात आणि जे आलेले असतात तेही गंडलेले. मग वाटतं की, पटकथा वाईट असली तरी किमान संपादन तरी अजून बरे असले असते तर बरे झाले असते, पण त्या ही पातळीवर (ए. श्रीकर प्रसाद) सगळा आनंदच आहे. दुसऱ्या एका प्रसंगात खूप गोळीबार सुरू असताना प्रभासला अमृता (श्रद्धा कपूर) विचारते, ‘यह कौन लोग है जो मुझ से भी ज़्यादा नफ़रत करते है तुम से’? त्यावर प्रभास उत्तरतो, ‘फॅन्स’! वाईट गोष्ट ही की, त्या क्षणी खरे वाटते ते!!

    प्रभास अभिनेता अजिबातच वाईट नाहीये. त्याच्या मर्यादेत चांगलाच आहे तो. पण त्याचे हिंदी बोलणे फारच सपक वाटते. बरेचदा तर तो तोंडातल्या तोंडात बोलतो ते धड समजतच नाही. तेलुगूत तो नक्कीच चांगला बोललेला असणार हे मान्य जरी केलं तरी जिथे मुळात त्याच्या पात्रालाच हातचं राखल्यासारखं लिहिलंय, तिथे संवादांना काय अर्थ असणार? एका प्रसंगात तर त्याला जेटपॅक लावलेला एक माणूस हवेतल्या हवेत पकडतो. ते दोघेही बिल्डिंगच्या काचा फोडून आत पडतात. भाऊंच्या अंगावर एक जखमसुद्धा नाही. तसाच उठतो. ते जेटपॅक अंगावर चढवतो. हिरोईन हेलिकॉप्टरमधून पडत असते. तिला वाचवायला जातो. रस्त्यात मध्येच त्याच्या जेटपॅकचं इंधन संपतं. तर ते हवेतच उतरवून हवेतल्या हवेत झेप घेऊन तो हिरोईनला पकडतो. दोघे पाण्यात (आणि पिक्चर पण!)! नाही, नेमके पाण्यातच कसे काय पडले ते, वगैरे प्रश्न मी विचारणार नाही. कारण, या प्रकारचे शेकडो अविश्वसनीय प्रसंग वेगवेगळ्या चित्रपटसृष्टीतील चित्रपटांतून अनेकवेळा सहर्ष आवडलेयत मला. पण केव्हा? जेव्हा ते शैलीदारपणे मांडलेले असतात, तेव्हा! प्रभासच्याच ‘बाहूबली’त (२०१५-१७) असे पन्नासेक प्रसंग असतील. पण ते राजमौलीने असे काही हाताळलेयत की आपण आनंदाने बुद्धीला बासनात गुंडाळून ठेवतो. इथे तसं होत नाही! हा दोष दिग्दर्शकाचा आहे. आणखी एका प्रसंगात..! जाऊ द्या, किती सांगणार मी तरी?

    दुसरे म्हणजे, प्रभास सबंध चित्रपटभर (आणि बाहेरही) सतत आळसावलेलाच वाटतो. ‘बाहूबली’ची चुस्ती तात्पुरती आणि सुस्तीच शाश्वत आहे की काय, असे वाटते त्याच्याकडे पाहून. चित्रपटावर साडेतीनशे कोटी खर्च करताना नेमके प्रभासच्या आंघोळीच्याच वेळी बजेट संपले की काय, अशीही शंका चाटून जाते! क्लायमॅक्स खूपच प्रेडिक्टेबल असला तरीही बरा हाताळलाय दिग्दर्शकाने, हे तेवढेच दु:खात सुख. त्यामुळे सुजीत वाईट दिग्दर्शक असेलच असे नाही. पण त्याला एवढे मोठे बजेट हाताळता नाही आले आणि एवढी मोठी संधी गमावली, हे निश्चित. आर. मधीचे छायांकन खूपच चांगले झालेय. विभासांचा (व्हिएफएक्स) अतिरेक मात्र काही वेळा अंगावर येतो आणि बऱ्याच ठिकाणी सुमार वाटतो.

    प्रभासच्या पात्राला लेखन आणि दिग्दर्शकीय पातळीवर न्याय न मिळण्याचे महत्त्वाचे कारण हे की, दिग्दर्शकाला शेवटी उघड करण्यासाठी एक रहस्य राखून ठेवायचेय. पण गंमत अशी की, चित्रपटाच्या पहिल्या पाचच मिनिटांत तुम्ही ते रहस्य ओळखू शकता, एवढंच नव्हे तर नेमकं कोण कोण त्या कट-कारस्थानात सहभागी आहे, हे सुद्धा ओळखू शकता. हा लेखनाचा (सुजीत) दोष आहे. त्या व्यतिरिक्तही कोणत्याच प्रसंगात फारशी मजा नाही. मुख्य पात्रांचा आनंदीआनंद जरी असला, तरीही दुय्यम पात्रांनी मात्र वाट्याला आलेली कामं मस्त केलीयेत. जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर, चंकी पांडे, मुरली शर्मा, प्रकाश बेलवाडी, वेन्नेला किशोर वगैरे मुरलेली मंडळी खरोखर भाव खाऊन जातात. मंदिरा बेदी, नील नितीन मुकेश यांनीही बरे काम केलेय. सगळ्यांत जास्त कौतुक वाटते ते अरुण विजयचे! मणिरत्नमच्या ‘चेक्का चिवंता वानम’नंतर (२०१८) या ही चित्रपटात त्याने भूमिकेला साजेसे काम केलेय.

    चित्रपटाची अजून एक लंगडी बाजू म्हणजे त्याचे संगीत. खरं तर, संगीत हे कोणत्याही दाक्षिणात्य ब्लॉकबस्टरचे बलस्थान असते. पण या चित्रपटाची बहुतांश गाणी अतिशय सामान्य, चार दिवसांचे आयुष्य असलेली आहेत. रहमान मागे एकदा म्हणाला होता की, ‘हिंदीत एकाच चित्रपटासाठी खूप सारे संगीतकार घेण्याचा दुर्दैवी पायंडा पडलाय. त्यामुळे गाणी चित्रपटाशी एकरूप वाटत नाहीत’. हिंदीचा हा रोग ‘साहो’च्या निमित्ताने तेलुगू चित्रपटसृष्टीलाही लागल्याचे दिसते. तेलुगूतील एवढे प्रतिभावंत संगीतकार सोडून त्यांना बादशाह, गुरू रंधावा, तनिष्क बागची वगैरे असुरांकडे जाण्याची का गरज पडली असावी? मला वाटते हा दोष दिग्दर्शकाचा कमी आणि टि-सीरीजसारख्या कंपनीचा जास्त आहे. ही मंडळी काहीतरी छान, चिरस्मरणीय करावे म्हणून काम करत नाहीत, तर पायाजवळ पाहातात फक्त! पण जर तसे असेल, तर दिग्दर्शकाचे चित्रपटाच्या सर्जनशील बाजूवर नियंत्रण नसल्याचेच यातून दिसून येते. फक्त एकच शंकर-अहसान-लॉयचे गाणे ‘त्यातल्या त्यात चांगले’ आहे. सबंध संगीत एकाच चांगल्या संगीतकाराने केले असते, तर चित्रपटाच्या साऊंडवर आणि व्यवसायावरही खूपच सकारात्मक परिणाम झाला असता. गिब्रन या इतरवेळी चांगले पार्श्वसंगीत करणाऱ्या संगीतकाराचेही पार्श्वसंगीत कर्कश्श झालेय.

    असा हा जवळजवळ सर्वच पातळ्यांवर फसलेला चित्रपट ‘साहो’. तेलुगू, तमिळ, कन्नड चित्रपटसृष्टीला हिंदीवाले नावाजू लागल्यामुळे वाटलं होतं की, हिंदी चित्रपट सुधारतील. पण हे तर त्यांनाच बिघडवायला निघालेत. तरीही ‘साहो’ हा साडेतीनशे कोटींचा अपवाद असावा, बनू घातलेला नियम नव्हे, अशी मनापासून अपेक्षा आहे. कारण, ‘साहो’ खरोखरच साहवत नाही!!

    *१.५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    (अन्य लेखांसाठी पाहा www.vikramedke.com)

  • सुपरहिरो जॉनरवरील फ्रेश दृष्टीकोन : द बॉईज

    अनेक जण आपापल्या क्षेत्रांत शिखरावर पोहोचतात, सेलिब्रिटी होतात. इतके की त्यांचे चाहते असलेले आपण त्यांचे भक्त कधी बनून जातो, समजतही नाही. त्यांची प्रत्येक गोष्ट मग आपल्याला आवडू लागते. त्यांच्या चांगल्या गोष्टींचं बेफाट कौतुक केलं जातं आणि त्यांच्या चुकांचं कधीकधी आडून तर कधीकधी उघडपणे समर्थनही केलं जातं. त्यांच्यावर असलेली चाहत्यांची भक्तीच त्यांना देवाच्या दर्जाप्रत नेते आणि खरा देव पाहिलेला नसला म्हणून काय झालं, या देवाच्या भेटीची आस चाहत्यांना लागून राहाते. भेट होईपर्यंत ठिक असतं, पण त्याहून अधिक परिचय समजा वाढत गेला तर बहुतांश वेळी हाती एकच गोष्ट लागते, ती म्हणजे मोहभंग! कारण, ओळख वाढत गेली की लक्षात येतं की, ती सुद्धा आपल्यासारखीच माणसं आहेत, चुका करणारी आणि शेकडो दोषांनी भरलेली, स्वार्थी माणसे. त्यांच्यापैकी बहुतेकांचे पाय हे मातीचेच निघतात, अगदी तुमच्या-माझ्यासारखेच. विशेषतः चंदेरी दुनियेतील सेलिब्रिटींच्या बाबतीत हे अधिकच प्रकर्षाने जाणवते. तिथे त्यांची कला आणि त्यांचा इतर बाबतीतला वकूब यांच्यात फरक न करता आल्यास, मोहभंगाची जागा आघात सहजच घेऊ शकतो. वैयक्तिक पातळीवर असल्यास तो आघातही पचवता येईल एकवेळ, पण जर त्या तथाकथित सेलिब्रिटींचा स्खलनशील स्वभाव हा सबंध मानवतेलाच धोका बनला तर? कथेच्या बहुपटली कोशाच्या आत, अॅमेझॉन प्राईमच्या ‘द बॉईज’ या मालिकेचा मुख्य गाभा हा आहे!

    हे असं जग आहे, जिथे सुपरहिरोज खरे आहेत. ते अमेरिकेचं रक्षण करतात. पण एकटे-दुकटे अथवा समूहाने नव्हे, तर एखाद्या टॅलेण्ट-मॅनेजमेंट कंपनीसारखी त्यांना मॅनेज करणारी एक कंपनी आहे, ‘वॉट’; तिच्या माध्यमातून. ‘वॉट’कडे शेकडो सुपरहिरोज आहेत. अमेरिकेतील जवळपास प्रत्येक शहरासाठी एक सुपरहिरो आहे त्यांच्याकडे. पण त्यातही सगळ्यांत जास्त ‘मार्केट’ आहे ते ७ सुपरहिरोजना, ज्यांना म्हटलं जातं ‘द सेव्हन’! हे सगळे सुपरहिरोज अमेरिकेचं रक्षण करतात, पण स्वतःहून नव्हे तर सेलिब्रिटीजना जशा कॉलशीट्स दिल्या जातात तशा कॉलशीट्सच्या माध्यमांतून यांना मिशन्स दिली जातात. त्यांच्यावर सिनेमे निघतात, मालिका निघतात, कॉमिक्स निघतात इतरही शेकडो प्रकारच्या मर्चंडाईझ निघतात, त्या सगळ्यांची मुख्य लाभार्थी जरी वॉट असली, तरी या सगळ्या सुपरहिरोजना कंपनीतील त्यांच्या त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात पैसेसुद्धा मिळतात. अशी ही हजारो बिलियन डॉलर्सची कॉर्पोरेट इंडस्ट्री आहे.

    आता इंडस्ट्री आहे तिथे पैसा आहे आणि पैसा आहे तिथे पापसुद्धा आहेच! हे सगळे सुपरहिरोज बाह्यतः मानवतेचे अक्षरशः पुतळे आहेत, परंतु त्यांच्या आयुष्यात कुणी जसजसं डोकावतं तसतसं दिसतं की, वास्तव काहीतरी वेगळंच आहे. ज्याला कुणाला हे वास्तव समजू लागतं किंवा नुसता वास जरी लागतो, त्याचं काय होतं, हा एक वेगळाच विषय आहे. परंतु यातूनच त्या सुपरहिरोंच्या विरुद्ध संघर्ष उभा राहातो, ज्याचं नेतृत्व करतात सामान्य माणसे. एकीकडे महाशक्तीशाली सुपरहिरोज ज्यांना अफाट पैसेवाल्या कॉर्पोरेशनचा आणि अनेकानेक प्रभावशाली व्यक्तींचा पाठिंबा आहे आणि दुसरीकडे जवळपास काहीही संसाधनं नसलेली सामान्य माणसे यांच्यातील विषम, भावनिकरित्या गुंतागुंतीचा आणि जीवनाचे अनेक स्तर छेदून जाणारा संघर्ष ही ‘द बॉईज’ची कहाणी आहे.

    हल्ली गल्लोगल्ली वेबप्लॅटफॉर्म्स उदयाला आल्यामुळे वेबसीरीजचा उंदरांसारखा सुळसुळाट झालाय. अद्याप कोणतीच सेन्सॉरशिप नसल्यामुळे त्यांच्यात गलिच्छ भाषा आणि लैंगिकतेचा सुकाळ असतो, मग भले कथानकाची गरज असो वा नसो. सवंगतेवर प्रसिद्धी मिळवण्याची वृत्ती अशी काही आरामदायी होऊन बसते की, कथानकाकडे दुर्लक्ष होते आणि शिवीगाळ व नग्नताच धीटपणा समजले जातात. ‘द बॉईज’चे वैशिष्ट्य हे की, ते बोल्डनेस अर्थात धिटाईला एक पाऊल पुढे नेतात. त्यांची पात्रंही शिवीगाळ करतात. त्यांच्यातही खूप सारी नग्नता आहे. किंबहूना अनेक मालिका पाहाण्याची सवय असूनही त्यातील रक्तपाताची काही दृश्ये बघवणार नाहीत बहुतेकांना. पण या सगळ्या गोष्टी दुय्यम ठरतात. कारण एक, त्यांची कथा व मांडणी अतिशय सशक्त आहेत आणि मुख्य महत्त्व त्यालाच आहे. दोन, शिवीगाळ आणि नग्नता या दोन्हीही गोष्टी या मालिकेची खरीखुरी आवश्यकता आहेत, तरच त्यांना जी पात्रं आणि घटना उभ्या करायच्या आहेत त्यांचा आवश्यक तो प्रभाव पडू शकेल. उदाहरणार्थ, मालिकेची सुरुवातच एका महाभयंकर रक्तपाताने होते. पण तो रक्तपात महाभयंकर असतो, म्हणूनच पुढे घडणारे सगळे महाभारत आवश्यक होऊन बसते. किंवा त्यातील जी जी पात्रे शिव्या देतात, त्यांचे वैयक्तिक आयुष्य दुरुस्तीच्या पल्याड बिघडलेय हेच त्यातून दिसते. त्यांच्या जागी कुणीही व्यक्ती दुसरं काही बोलूच शकली नसती.

    पण मी जेव्हा धिटाईला एक पाऊल पुढे नेतात म्हणतो, तेव्हा मला फक्त नग्नता आणि शिवीगाळ अपेक्षित नाही. ही मालिका कथानकाच्या ओघात आसपासच्या अनेकानेक राजकीय, सामाजिक मुद्यांवर अतिशय धीट आणि तर्कसंगत भाष्य करते. ती कॉर्पोरेट कार्यप्रणालीच्या भावनाशून्यतेचा, डाव्या विचारसरणीच्या दांभिकतेचा, धर्मप्रसारासाठी अवलंबल्या जाणाऱ्या मार्गांचा, अतिरेकी-स्त्रीवादाच्या उथळपणाचा बुरखा टराटर फाडते. ती दहशतवाद्यांना जिहादी म्हणायला कचरत नाही आणि त्यातील स्त्रिया त्यांच्यावरील अत्याचारांना वाचा फोडतो म्हणता-म्हणता त्या घटनांचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करणाऱ्यांच्या विरुद्ध उभ्या राहायला घाबरत नाहीत. इतक्या उघडपणे ढोंगीपणाला फाट्यावर मारणारी दुसरी कोणती मालिका अलिकडच्या काळात क्वचितच आली असेल!

    मार्व्हल आणि डिसीची युनिव्हर्सेस सुरू झाल्यापासून गेल्या दशकभरात पन्नास-एक तरी सुपरहिरोपट आणि मालिका आल्या आहेत. त्यातील काही चांगले होते तर काही अतिशय टुकार. पण कसेही असो, आता कुठेतरी त्या दरवर्षी नेमाने येणाऱ्या सुपरहिरोपट आणि मालिकांचे अजीर्ण होऊ लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘द बॉईज’चं एक अतिशय ताजा आणि वेगळाच दृष्टीकोन घेऊन येणं अत्यंत सुखावह आहे. गंमत म्हणजे यातील सुपरहिरोंची पात्रे ही डिसीच्या पात्रांवरच बेतलेली आहेत. मालिका पाहाताना ते सहजच लक्षात येते. पण मालिकेतील त्याहून मोठ्ठी गोष्ट मात्र मार्व्हलवर बेतलेली आहे, कोणती ते तुम्हीच पाहून ठरवा. कामे सगळ्यांचीच जबरदस्त झाली आहेत परंतु त्यातही कार्ल अर्बन, जॅक क्वेड, अँथनी स्टार, टोमर कॅपोन, कॅरेन फुकुहारा, एलिझाबेथ श्यू, एरिन मोरियार्टी यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.

    तुम्हाला वाटेल की, मी बोलता-बोलता काही स्पॉयलर्स दिलीयेत का? तर मी स्पष्टपणे सांगतो, नाही! ‘द बॉईज’चे वैशिष्ट्य हे की, तिच्या प्रत्येक भागात एक मोठ्ठा ट्विस्ट आहे आणि तिच्या पर्वाखेरच्या भागात तर एक भलामोठ्ठा ट्विस्ट आहे जो आगामी पर्वाचीच नव्हे तर सबंध मालिकेचीच दिशा बदलू शकतो. मग आता प्रश्न असा उद्भवतो की, ही मालिका सर्वश्रेष्ठ मालिकांच्या दर्जाची आहे का? तर पहिल्याच पर्वात तसं म्हणणं धाडसाचं ठरेल. त्यांनी त्यांचं दर्जात्मक सातत्य अखेरपर्यंत टिकवलं, तरच तसं म्हणता येईल. परंतु त्यांचं अवघ्या ८ च भागांचं पहिलंच पर्व मात्र कोणत्याही श्रेष्ठतम मालिकेइतकेच दर्जेदार आणि पुढे काय होईल ते वेड्यासारखं पाहायला लावणारं आहे, एवढं निश्चित. पुढच्या पर्वाची प्रतीक्षा राहील!!

    *५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • सावरकरकृत अस्पृश्यता निवारण और सामाजिक एकता

    वीर सावरकर जी की जीवनी अद्भुत, अदम्य साहसों से लबालब भरी हुई है । नेता, संगठक, क्रांतिकारी, इतिहासकार, राजनीतीज्ञ, युद्धनीतीज्ञ, वक्ता, समाज सुधारक, लेखक, लेखक के रूप में भी नाटककार, उपन्यासकार, कथाकार, कवि, कवि के रूप में भी खंडकाव्यकार, दीर्घकाव्यकार, महाकवि, शाहीर; और न जाने कितने ही पहलू मात्र एक ही व्यक्ति के है, इस पर कदाचित आने वाली पीढियाँ विश्वास भी न करें । सरल तरह से देखें तो उन के जीवन के जन्म से ले कर लंडन जाने तक का काल विद्यार्थिदशा, लंडन में क्रांतिकारी, अंदमान से ले कर रत्नागिरी तक बंदी, रत्नागिरी से ले कर बिनाशर्त मुक्तता तक समाज सुधारक, मुक्तता से ले तर स्वातंत्र्यप्राप्ती तक राजनीतीज्ञ और फिर स्वातंत्र्यप्राप्ती से ले कर आत्मार्पण तक वार्धक्य ऐसे विभाग पडते है । किंतु कोई भी व्यक्ति ऐसे विभागश: जीता है क्या? उदाहरण के तौर पर देखे, तो सावरकर जी ने १९३७ के पश्चात राजनीती में खुल कर भाग लिया । किंतु क्या उन के क्रांतिकार्य में अंग्रेजों को हराने की राजनीती नहीं थी? यहीं नियम लागू होता है इस लेख के विषय यानी ‘अस्पृश्यता निवारण और सामाजिक एकता’ को । आम तौर पे तो यह विषय केवल सावरकर जी के रत्नागिरी में किए गए कार्य से ही संबद्ध लगता है । और यह सत्य भी है कि, रत्नागिरी में स्थलबद्धता की अवस्था में वे इस कार्य में सर्वाधिक निमग्न रहे । किंतु अगर आप सावरकर जी के चरित्र का बारीकी से अवलोकन करे, तो पाएंगे कि, यह दोनों विषय उन के समूचे जीवन की ही कथा है ।

    मराठी भाषा में एक मुहावरा है, ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ । इस का शब्दार्थ होता है, बच्चे के पाँव पालने में दिखते है । किंतु इस का भावार्थ यह है कि, मनुष्य जीवन में आगे चल कर क्या करने वाला है इस की झलक बचपन से ही दिखने लगती है । बात सन १९०२ की है । उन दिनों मुंबई के ‘हिंदु युनियन क्लब’ की ‘हेमंत व्याख्यानमाला समिती’ हुआ करती थी । उन्हें ने एक काव्य स्पर्धा का आयोजन किया था । विषय था ‘बालविधवा दु:स्थितीकथन’ । सावरकर जी की आयु मात्र १९ वर्ष की थी । आज की भाषा में कहा जाए तो टीनेज । किंतु इस छोटी सी आयु में भी उन्होंने इस विषय पर जो कविता लिखी, वह थी १०२ पंक्तियों की कविता (समग्र सावरकर वाङ्मय, खंड ७, आवृत्ति वर्ष १९९३, पृ. २७) जिसे उस वर्ष का प्रथम पारितोषिक प्राप्त हुआ था । तात्पर्य यह कि, सावरकर बचपन से ही सामाजिक विषयों के प्रति जागृत एवं अभ्यासरत थे । उन का समाज के, तथा दीन-दुखियों के प्रति संवेदना से भरा यह दृष्टीकोन स्थलबद्धता से छूटने के बाद भी स्पष्ट रूप से दिखता है । सावरकर जी कि मुक्तता १९३७ में हुई । तत्पश्चात उन्हों ने हिंदुमहासभा पार्टी से जो राजनीती की, उस का उद्देश्य उन्हीं के रचे एक श्लोक में झलकता है । वे लिखते है,
    ‘राष्ट्रस्वतंत्रता ध्येयं यथा साध्यं च साधनम् ।
    अभ्युत्थानाय हिंदुनामयं पक्ष: प्रवर्तित: ।।’
    यानी सावरकर जी का उद्देश्य राष्ट्र की स्वतंत्रता के साथ ही साथ हिंदुओं का अभ्युत्थान भी था । इस अभ्युत्थान के मायने भी जातिपातिविरहित, सबल व सशक्त हिंदु समाज का निर्माण ही थे । सावरकर लिखते है कि, ‘जातिभेद के निवारण हेतु मैं विद्यार्थीदशा से ही प्रकट रूप से प्रयत्नरत था । महाविद्यालय में भी मेरा वर्तन उसी ओर रहा । आगे चल के अंदमान में मैंने इस विषय पर जो भी चिंतन किया, उस का व्यावहारिक आचरण कर के मैंने सैंकडों भेदमूलक दुष्ट धारणाओं का उच्चाटन किया है (स. सा. वा. खंड ३, आवृत्ति वर्ष १९६४, पृ. ६४२) ।

    जैसे कि उपर लिखा है, यह सत्य है कि सावरकरकृत अस्पृश्यता निवारण और सामाजिक एकता का कार्य सर्वाधिक रत्नागिरी से ही किया । किंतु ऐसी क्या बात हुई की उन्हें इस कार्य में स्वयं को पुरज़ोर झोंकना पडा? इस प्रश्न का उत्तर है अंदमान! प्राकृतिक सौंदर्य से सराबोर इस द्वीपकल्प पर अंग्रेज़ों ने सैल्युलर जेल नामक दैत्याकार कारागृह बनाया था । इस का एक भयकारी नाम कालापानी भी है । जब अंग्रेज़ों ने सावरकर जी को २५ अधिक २५ वर्ष यानी कुल ५० वर्षों का अमानुष आजीवन कारावास घोषित किया, तब उन की रवानगी इसी कालापानी में हुई (स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र, पृ. ३४२ , लेखक शि. ल. करंदीकर, आवृत्ति वर्ष २०११) । यद्यपि आज अंदमान, वीर सावरकर जी के अस्तित्व से पुनीत क्रांतितीर्थ कहलाता है, उन दिनों वह खौफ़ का पर्यायवाची ही कहलाता था । वहाँ सावरकर जी ने क्या देखा? उन्हों ने देखा कि, अनेकों कारणवश दंडित हिंदु बंदीयों कि संख्या यहाँ सर्वाधिक है, किंतु उन पर हुकूमत चलाने वाले वॉर्डन्स अधिकांश अहिंदु है । संख्याबल होते हुए भी ऐसा क्यूँ, इस प्रश्न का उत्तर उन्हें मिला हिंदुओं की जातिव्यवस्था में । संख्याबल होते हुए भी हिंदु आपस में ही बँटे हुए थे । इस त्रुटी का लाभ उठा कर अहिंदु न केवल उन पर हुकूमत चलाते थे, अपितु अज्ञानी बंदीयों का धर्मांतरण भी करते थे । इस शोचनीय अवस्था का एक उदाहरण वाचकों के समक्ष रखना बिलकुल भी अप्रस्तुत न होगा ।

    यह घटना स्वयं सावरकर जी ने स्वयं ही अपने बंदीवास के बारे में लिखी गयी जीवनी, ‘माझी जन्मठेप’ में लिखी है । अंदमान में कोयले से लदे हुए जहाज़ आया करते थे । बोरियाँ उतारने का काम बंदीयों को ही करना पडता था । इस काम पर लगे बंदीयों को समय बचाने के लिए खाना नहीं दिया जाता था, बल्कि दो-चार मुठ्ठी भर चने दिए जाते थे । तो हुआ यूँ कि, एक दिन जब भोजन का समय हुआ तो अहिंदु बंदी जल्दी से भाग कर अपनी चने की बोरियों की तरफ़ गए । और उन में से कुछ लोगों ने हिंदुओं के लिए सुनिश्चित बोरियों से भी चने खाने शुरू कर दिए । यह जब हिंदुओं ने देखा तो धर्म भ्रष्ट होने के डर से किसी भी हिंदु ने चनों को हाथ तक न लगाया । उस दिन उन्हें फ़ांका पडा । अहिंदु बंदीयों को रोज़ के मुक़ाबले अधिक खाना मिल गया । अब तो यह प्रतिदिन की ही बात हो गयी । रोज़ हिंदु कैदी काम कर के, थक-हार के खाने कि तरफ़ जाते और रोज़ वह दृश्य देख कर उन्हें भूखे पेट ही रहना पडता । उन्हों ने जब अधिकारीयों से शिकायत की तो वह लोग भी उन पर हँसने लगे । फिर वह अपने बडे बाबू यानी सावरकर जी के पास आए । सावरकर जी ने उन्हें एक तरकीब बताई । दूसरे दिन जब खाने का समय हुआ तो हिंदु बंदी सब से पहले भाग के बोरियों की ओर गए और अपनी तो अपनी अहिंदुओं की बोरियों से भी चने खाने लगे । जब झगडे की नौबत आयी, तो हिंदुओं ने सावरकर जी ने बताई बात उन को दो टूक सुना डाली की, यदि तुम्हारे पहले छूने से यह चने अहिंदु होते है, तो हमारे छूने से अब यह हिंदु हो गए है । बात ज़मादारों तक पहुँची तो वे हँसने लगे, ठीक वैसे ही जैसे वे हिंदुओं पर हँसे थे । तब कहीं जा कर उन्हें सावरकर जी द्वारा पढाया पाठ ठीक से समझा कि, धर्म का स्थान व्यक्ति का पेट नहीं अपितु उस का ह्रदय होता है ।

    इस प्रकार एक एक कर के हिंदुओं को जातिवाद की घिनौनी रूढी से बाहर निकालने का उपक्रम चल रहा था । वह भी अंदमान के निर्मम कारागार में जहाँ के हालातों के सामने नर्क भी स्वर्ग लगे । सावरकर दिन भर कोलू चला कर तेल निकालते, नारियल की रस्सियाँ बुनते, जरा-जरा सी बात पे एकांतवास तथा डंडाबेडी जैसे नृशंस दंड भोगते और इतना होते हुए भी वे शुद्धीयज्ञ चलाते, बंदीयों को पढाते, कविताएँ लिखते और जातिवाद की समस्या पर चिंतन करते रहते । हमारे और आप के आरामदायक जीवन से कहीं परे था यह व्रत । उसी चिंतन के फलस्वरूप सावरकर जी के समक्ष उजागर हुई एक बात । वह यह की, मुख्यभूमि हिंदुस्थान भी तो अंदमान का ही बडा स्वरूप है । वह भी तो अंग्रेजों द्वारा बनाया एक बंदीगृह ही है, वहाँ भी तो हिंदुओं कि बहुसंख्या होते हुए भी सदियों से मुठ्ठीभर अहिंदु राज करते आ रहे है और उस का भी तो कारण हिंदु समाज को लगा जातिवाद का रोग ही तो है । जिस आग्रह, तप, निश्चय एवं दृढता के साथ सावरकर जी ने अंदमान के कारागृह से जातिवाद मिटाया, वहीं काम मुख्यभूमी में करने की आवश्यकता थी । और यह अवसर उन्हें मिला रत्नागिरी की स्थलबद्धता में । मानों अंदमान जातिवाद मिटाने का पाठ्यक्रम हो और रत्नागिरी प्रयोगशाला ।

    क्षेत्र जितना बडा होता है, चुनौतियाँ भी उतनी ही बडी होती है । वैसे देखा जाए तो जातिव्यवस्था हिंदु धर्म का मूलभूत अंग नहीं है । यह मध्ययुग की देन है । हिंदु तो आरंभ से ही वर्णव्यवस्था मानते आ रहे है, जो जन्म से नहीं बल्कि व्यक्ती के गुण व कर्मों से जुडी हुई है (गीता. ४/१३) । किंतु बर्बर विदेशी आक्रमणों के बाद से वर्णव्यवस्था का भ्रष्ट होना शुरू हुआ जो अंततः जातिव्यवस्था में परिवर्तित हुआ । यह व्यवस्था सदियों से चलन में थी । क्या सवर्ण क्या विवर्ण, दोनों ही प्रकार के लोग इसे मानते थे । ऐसे में सावरकर जी का कहना कि यह व्यवस्था हानिकारक है, का परिणाम भी वैसे ही शून्य होना था जैसे अनेकों प्रामाणिक सुधारकों की बातों का न्यूनाधिक हुआ । लेकिन सावरकर अपने प्रतिपादन के बारे में न केवल आग्रही थे, अपितु अपनी बात मनवाने के लिए हर तरह के सकारात्मक हतकंडे अपनाने से भी नहीं चूकने वाले थे । उपयुक्ततावाद वीर सावरकर जी का विशेष गुण था । उन्हों ने पहले तो जातिवाद के प्रश्न के छोटे छोटे टुकडे किए की, आखिर जातिवाद किस तरह से हिंदु समाज को प्रभावित करता है । यह एक बिल्कुल ही नए तरह की पहल थी । इसे ही आधुनिक भाषा में प्रौब्लेम आईडेंटिफ़िकेशन कहते है । इस खोज में सावरकर जी ने पाया कि, जातिवाद की समस्या असल में ७ प्रकार से प्रभाव डालती है । वीर सावरकर जी ने इन्हें नाम दिया, ‘सात स्वदेशीय बेड़ीयाँ’ (स. सा. वा. खंड ९, जात्युच्छेदक निबंध, आवृत्ति वर्ष १९९३, पृ. ६४) । यह बेड़ीयाँ थी रोटीबंदी, बेटीबंदी, स्पर्शबंदी, व्यवसाय बंदी, सिंधुबंदी, वेदोक्तबंदी तथा शुद्धीबंदी । वीर सावरकर जी का मानना था कि यदि यह सात शृंखलाएँ तोड दी जाए, तो निश्चय ही जातिप्रथाविरहित सशक्त समाज निर्माण होगा ।

    रत्नागिरी आज भी एक छोटा सा शहर है । आज से करीब सौ वर्ष पहले यानी १९२४ के समय में तो वह और भी छोटा गाँव था । उन दिनों पूरा देश आवश्यक और अनावश्यक दोनों ही प्रकार के रूढीवाद के घेरे में था । कोंकण की भूमी रत्नागिरी भी रूढीप्रिय थी । वीर सावरकर ने क्या किया? उन्हों ने जातिवाद के विरुद्ध तीन तरफा मोर्चा खोला । वे बडे ही प्रसिद्ध क्रांतिकारी थे तो जगह-जगहों से लोग उन्हें भाषणों के के लिए बुलाते थे । सावरकर उन भाषणों में जातिवाद की रूढ़ी से होने वाली हानि बताते थे । वे एक सम्माननीय व्यक्तित्व होने के साथ ही अत्युच्च कोटी के वक्ता भी थे, तो नि:संशय उन की वाणी का प्रभाव पडता । यह तो हुआ एक मोर्चा । दूसरे, वे कई तरह के नियतकालिकों में जातिव्यवस्था पर हल्ला बोलने वाले लेख लिखते थे । उनके यह लेख तथा उन के भाषण आप को उन की पुस्तकें ‘विज्ञाननिष्ठ निबंध’, ‘जात्युच्छेदक निबंध’, ‘सामाजिक भाषणे’, ‘क्ष किरणे’ आदी में समूल पढने को मिलते है । वीर सावरकर जी लोकप्रिय माध्यमों कि ताकत भलीभाँति जानते थे । इसिलिए उन्होंने इस विषय पर दो उपन्यास (‘मला काय त्याचे’ तथा ‘काळे पाणी’), ‘उ:शाप’ आदी नाटक, तथा कई सारी कथाएँ व कविताएँ लिखी । एक तरह से देखा जाए तो वे अपने विचारों के प्रति समाज की मनोभूमिका तैयार कर रहे थे । क्यूँ कि तिसरा मोर्चा जो था, वह सब से कठिन था, प्रत्यक्ष कार्य ।

    प्रत्यक्ष कार्य के तीन भाग किए जा सकते है । मन:परिवर्तन, वैधानिक मार्ग और संघर्ष । सावरकर जी ने प्रसंग व परिस्थिती के अनुसार तीनों मार्गों का अवलंबन किया दिखाई पडता है (सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, लेखक शेषराव मोरे. आवृत्ति वर्ष २०१५, पृ. १०७) । जिन दिनों अस्पृश्यों की परछाई मात्र पडने से ही धर्म भ्रष्ट हुआ माना जाता था, यदि उन का स्पर्श हो भी गया तो लोग शुद्धी हेतू सचैल यानी कपडों के साथ स्नान कर लिया करते थे, इतना ही नहीं बल्कि घरों में किसी अस्पृश्य जाति का नाम लेना भी पाप समझा जाता था (तत्रोक्त, पृ १२१), उन दिनों अस्पृश्यता निवारण का कार्य सावरकर जी के लिए कितना कठिन रहा होगा, इस की मात्र कल्पना ही की जा सकती है । और देखिए, यह रवैया भी कोई एक तरफा नहीं था । सदियों से इसी सामाजिक व्यवस्था में पले-बढें, रहे अस्पृश्यों को भी यही एक मात्र जीवनमार्ग लगता था । उन्हें भी इस में कुछ गलत नहीं लगता था । जब शृंखलाओं से परे कोई विश्व कल्पना में ना हो, तब शृंखलाएँ तोडना और भी कठिन हो जाता है ।

    सावरकर जानते थे कि, स्पृश्य बस्ती में तो कोई अस्पृश्य अपने आप आने से रहा । तो वे खुद अस्पृश्यों की बस्तीयों में जाने लगे । देखिए, काम कितना मुश्किल है, जब सावरकर और उन के साथी अस्पृश्य बस्तीयों में जाते तो सारे बस्तीवाले एक एक कर के दरवाज़े बंद कर के, कुंडी-वुंडी लगा के अंदर छिप जाते थे । क्यूँ? क्यूँ कि उन्हें लगता था कि यह लोग, हमारा धर्म भ्रष्ट करने आए है । बार बार पुकारने पर भी कोई बाहर न आता । उल्टे, अंदर से ही जवाब देते कि, घर में कोई नहीं है (तत्रोक्त, पृ. १२१) । सावरकर जानते थे कि शुरुआत में ऐसा ही होगा । सामान्य हिंदु का मन आकर्षित करने वाली कोई एक चीज़ हम सोचे तो वह है, भजन-किर्तन । सावरकर और उन के साथी उस बस्ती के बीचोबीच जा कर प्रभु का भजन करने लगते । कई दिनों के अथक परिश्रम के पश्चात, किवाडों, खिडकियों से टुकूर-टुकूर देखने वाले लोग एक-एक कर के बाहर आने लगे, सावरकर और उन के साथियों से मिलने-जुलने लगे । यह तो केवल शुरुआत थी । अब अगला पडाव थी स्पृश्यों कि बस्तीयाँ । सावरकर जी के व्याख्यान तथा अन्य कार्यक्रमों में वे अस्पृश्यों को साथ ले आते, स्पृश्य एवं अस्पृश्य दोनों को ही साथ बैठने का आग्रह करते (तत्रोक्त, १२२) । यह तो और भी कठिन बात थी । स्पृश्य अस्पृश्यों को अपने साथ बिठाना नहीं चाहते थे और तो और अस्पृश्य भी स्पृश्यों के साथ बैठना नही चाहते थे । सब से विशेष बात तो यह थी की, जिन अस्पृश्यों को रूढीयाँ स्पृश्यों के साथ बैठने की अनुज्ञा न दे कर उन पर सामाजिक अन्याय करती थी, वे खुद भी अपने से तथाकथित निम्न स्तर की जातियों को अपने साथ बिठाने के लिए तैयार नहीं थे । यहीं स्थिती पाठशालाओं में भी थी । सावरकर सनातनियों से कहते थे कि, ‘हम कुत्ता या बिल्ली पालते है । उस से प्रेम भी करते है । इतना कि वह पशु हमारी रसोई में घूमता है, हमारे साथ खाना खाता है । वहीं हम लोग एक मनुष्य की परछाई मात्र से ही दूर भागते है । हमारी ही तरह, हाड-मांस का बना मनुष्य, हमारा ही धर्मबंधु, लेकिन उस के स्पर्श को पाप मानते है । और वहीं मनुष्य अगर हमारी ही भूल के कारण अगर परधर्म में चला गया, तो एक ही झटके में हम उसे ‘मेरा भाई’ बोल के गले से लगाने में भी नहीं हिचकिचाते । हमारे ही जैसे मनुष्य को पशु से भी न्यूनतर समझना और उस के धर्म परिवर्तन करते ही उसे गले लगाना, यह कहा का न्याय है’? वहीं वे अस्पृश्यों को भी ढाढस बँधा कर कहते थे कि (स्वातंत्र्यवीर सावरकर, लेखक धनंजय कीर, मराठी अनुवाद द. पां. खांबेटे, आवृत्ति वर्ष २००८, पृ. २०१), ‘इस क्षण में दिखाई दुर्बलता सवर्णों की दुष्टता से भी अधिक बुरी होगी । कल्याण का मार्ग कष्टों से ही हो कर जाता है । अधिकार माँगने की इस घडी में पीछे हटने की भूल मत करो । याद रखो कि तुम भी मनुष्य हो और मनुष्य कि तरह ही पौरुष प्रकट करो । जब कभी तुम सार्वजनिक मार्ग से गुज़रो और कोई तुम से दूर हटने को कहे, तो उस से कहो कि ‘यह रास्ता कोई तुम्हारे बापदादाओं की जागीर नहीं, जो जिसे चाहे उसे दूर हटने के लिए कहे’ । अपने व्यवसाय किसी के भी दबाव से मत छोडो । उल्टा, उन में सुधारणाएँ करो । कोई भी व्यवसाय श्रेष्ठ या कनिष्ठ नहीं होता । स्वच्छता से भरा जीवन जियो । नशे से दूर रहो । अपने मात-पिता, संत और वंश को कभी भी नीचा मत समझो । दोषों का त्याग करो, शिक्षा प्राप्त करो, संघर्ष करो और जातिवाद से उपर उठ कर अपने मानवी अधिकार प्राप्त करो । कोई व्यक्ति तथाकथित रूप से तुम से भी निचली जाति का हो, तो उस से भी दया भरा, समता भरा ही व्यवहार रखो ।’

    हिंदु धर्म के जो अनेक स्तंभ है, उन में से एक स्तंभ है मंदिर । मंदिर सालों से सार्वजनिक स्तर पर एकात्मता के केंद्र के रूप में दायित्व निभाते आ रहे है । किंतु क्या उन दिनों सभी मंदिर सभी जातियों के लिए खुले थे? उत्तर है, नहीं । सावरकर जी ने इस विषय पर काम करने की ठानी । क्यूँ कि अगर मंदिरों में सभी जातियों का स्वीकार होने लगता, तो जातिवाद का एक प्रमुख क़िला यूँ ही ढह जाता । लेकिन मंदिर जैसे सामाजिक एकता का केंद्र थे, वैसे ही विभिन्न जातियों के लिए उन की आस्था तथा अस्मिता का भी प्रतीक थे । इस लिए यह काम भी उतना सरल नहीं था । सावरकर जी ने पहले कदम के रूप में वह उत्सव चुना जो अपने आप में ही सामाजिक एकात्मता की धरोहर था, यानी सार्वजनिक गणेशोत्सव. महाराष्ट्र के घर घर में गणेश चतुर्थी से ले कर अनंत चतुर्दशी तक गणेश जी के पूजन की प्रथा है । कुछ जगहों पर यह उत्सव डेढ़ दिन चलता है, कहीं पाँच, कहीं सात, तो कहीं पूरे दस । गणेशोत्सव महाराष्ट्र में सार्वजनिक स्वरूप प्राप्त कर चुका था । गाँव, कस्बों, शहरों में लोग सार्वजनिक तौर पे गणेशजी की प्रतिष्ठापना करते, जिसे मराठी में ‘मंडल’ कहते है । लेकिन उन दिनों यह मंडल भी जातिगत थे तथा उन में भी भेदभाव हुआ करता था । सन १९२४ के गणेशोत्सव के दौरान रत्नागिरी में प्लेग के प्रादुर्भाव के कारण सावरकर कुछ दिनों के लिए नाशिक गए थे । तब वहाँ गणेश जी के विसर्जन के समय शोभायात्रा में पहला मान किस मंडल को दिया जाए यह प्रश्न उपस्थित हुआ । जब लोग सावरकर जी के पास यह समस्या ले कर आए, तो उन्हों ने अग्रभाग में रहने का मान बिना किसी हिचकिचाहट के एक अस्पृश्य मंडल को सौंपा । यह एक ऐतिहासिक, क्रांतिकारी घटना थी ऐसा वृत्तांकन नाशिक के ‘स्वातंत्र्य’ नामक पत्र ने १८/०९/१९२४ में किया (सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, पृ. १५३) । सावरकर जी के ही प्रयत्नों से उस साल कई अस्पृश्यों के मंडल गठित हुए । उन्हीं में से एक जगह भीड से खचाखच भरे कार्यक्रम में भाषण करते समय वीर सावरकर बोले, ‘मुझे विश्वास है कि आने वाले दिनों में अस्पृश्यता की रूढी का विनाश होते हुए मैं अपनी आँखों से देख सकूँगा । मैं चाहता हूँ कि मेरी मृत्यू के पश्चात मुझे काँधा देने के लिए विभिन्न जातियों के लोग एक हो कर आए और मुझे अग्नि दे, तभी मेरी आत्मा को समाधान मिलेगा ।’ यह सुनते ही श्रोताओं की आँखों से आँसूओं की धाराएँ छलक पडी (तत्रोक्त, पृ. १५३) । अगले वर्ष सावरकर जी ने यही क्रम रत्नागिरी में भी दोहराया । इतना ही नहीं, उन्हों ने एक पृर्वास्पृश्यों का वाद्यवृंद भी गठित किया (जो शीघ्र ही सभी जातियों के एकत्रित वाद्यवृंद में परिवर्तित हो गया ।) और गणेश जी के समक्ष पूर्वास्पृश्यों द्वारा बीडा-सुपारी (मराठी में पान-सुपारी । यहाँ पान का बीडा वगैरह केवल निमित्त मात्र होता है, असल उद्देश्य सामाजिक मेलजोल बढाना होता है ।) का समारंभ आयोजित करने की भी प्रथा आरंभ की । इस बारे में वर्णन तब के बलवंत, बकुल, सत्यशोधक आदी पत्रिकाओं में विस्तारपूर्वक पढने को मिलते है । धीरे धीरे इस बीडा-सुपारी के कार्यक्रम में सैंकडों स्पृश्य भी सहभागी होने लगे (तत्रोक्त, १५४) ।

    अब समय था एक कदम और बढाने का । १९२५ के अप्रैल में रत्नागिरी के समीप एक छोटे से गाँव शिरगाँव में महादेव लक्ष्मण गुरव नाम के एक सज्जन ने हनुमान जी का मंदिर बनाया । वे चाहते थे कि प्रतिष्ठापना में सावरकर जी भी उपस्थित रहे । यहाँ गौर करने योग्य बात यह है कि, सावरकर भले ही हिंदुत्ववादी थे किंतु वे किसी भी तरह के कर्मकांड के विरुद्ध भी थे । ऐसे में आज के समय का कोई तथाकथित विद्वान क्या करता? मना कर देता कि मुझे यह सब पसंद नहीं, शायद यह भी कहता कि तुम भी यह कर्मकांड मत करो । सावरकर जी ने ऐसा कुछ भी नहीं किया । बल्कि वे उस समारोह में गए । किंतु जाने से पहले उन्हों ने गुरव जी के सामने एक शर्त रखी । शर्त यह थी कि, मंदिर का जो प्रदक्षिणा मार्ग है, वह अस्पृश्यों के लिए भी खुला हो । उन्हों ने गुरव जी को अस्पृश्यता के विरुद्ध अपनी भूमिका बताई और परिणाम यह हुआ कि, गुरव जी तुरंत मान भी गए । इतना ही नहीं वे प्राणप्रतिष्ठा के समय पूर्वास्पृश्यों को भजन करने वालों के साथ संमिश्र बिठाने को भी तैयार हो गए (तत्रोक्त, पृ. १५५) । यह अंतर है सावरकर और कुछ तथाकथित सुधारकों में । जहाँ सावरकर समाज के लाभ को देखते हुए अपने व्यक्तिगत मतों को दूर रखने के लिए भी तैयार थे, वहीं आज-कल के कुछ आधुनिक सुधारणावादी अपने व्यक्तिगत मतों को समूचे समाज पर थोंपना चाहते है, और यहीं कारण है कि, उन्हें समाज में कभी स्वीकृति नहीं मिलती । सावरकर भले ही हिंदुत्ववादी थे, और थे क्या, हिंदुत्व की राजकीय मीमांसा पहली बार उन्हों ने ही तो अपने प्रबंध ‘हिंदुत्व’ (१९२३) में की है । किंतु वे हिंदुस्थान में रहने वाले, हिंदुस्थान से प्रेम करने वाले सभी पंथों का भला ही चाहते थे । उन के लेख, खास कर के ‘पोथिनिष्ठेची बाधा’ (मनोहर, जुन १९३५) इस बात के प्रत्यक्ष प्रमाण है । वहीं आज कल कुछ लोग समाजसुधारणा का अर्थ किसी एक धर्म को ही कोसना मात्र निकालते है । सावरकर जी का यही समष्टिवाद हल्दी-कुंकुम समारोह में भी दिखता है । वे स्वयं कदाचित इस समारोह को नहीं भी मानते होंगे, लेकिन उन्हें इस प्रथा में स्पृश्यास्पृश्य महिलाओं को एक करने का कारण दिखा तो उन्हों ने इन समारोहों को पूरे मन से प्रोत्साहित किया, और फलस्वरूप महिलाओं के मन से भी अस्पृश्यता की रूढी का उच्चाटन करने की ओर कदम बढाया (सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, पृ. १४२) ।

    धर्म हमेशा से ही नाज़ुक मामला रहा है । इसी लिए सावरकर भी उतना ही नाज़ुक एवं कुशल तरीके से व्यवहार कर रहे थे । धीरे धीरे कर के उन्हों ने पूर्वास्पृश्यों को पहले तो प्रदक्षिणा मार्ग तक जाने की अनुज्ञा दिलायी । फिर उस अनुज्ञा का दायरा पगडंडीयों तक बढाया । फिर सभामंडप । और अंततः गर्भगृह तक (१३/०९/१९२९) वे पूर्वास्पृश्यों को ले गए । धीरे धीरे कर के मंदिर में संमिश्र जाना आम बात हो गयी । १९३० में तो एक पूर्वास्पृश्य ने गणेश जी के समक्ष गायत्री मंत्र का जाप भी किया । इस घटना का वर्णन टाईम्स ऑफ इंडिया सहित अन्य कई वृत्तपत्रों ने किया था (रत्नागिरी हिंदुसभेचे प्रतिवृत्त, खंड २, १९३७) ।

    रत्नागिरी में एक सज्जन रहते थे, भागोजीसेठ कीर । शिवभक्त थे । किंतु जाति के कारण शिवालय नहीं जा सकते थे । धनि थे, तो खुद का ही शिवालय बनवा लिया, भागेश्वर मंदिर । सावरकर जी को मानते थे तो उन्हें यह घटना सुनाई । सावरकर जी ने पूछा कि, ‘आप धनवान है सो आपने अपने लिए मंदिर बनवा लिया । किंतु उन सहस्रावधी निष्कांचन पूर्वास्पृश्य भक्तों का क्या’? भागोजीसेठ सोच में पड गए । और तब सावरकर जी के विचारों से प्रेरित हो कर उन्हों ने बनवाया, पतित-पावन मंदिर (२२/०२/१९३१) । मंदिर के शिलान्यास समारोह में (१०/०३/१९२९) सावरकर जी ने मंदिर निर्माण की भूमिका बताई, कि इस मंदिर में कोई भी श्रद्धावान् हिंदु स्वच्छ तन, मन से बेरोकटोक आ सकेगा, पूजा कर सकेगा । इस मंदिर का पुजारी कोई भी ज्ञानी हिंदु बन सकेगा (स. सा. वा. खंड ९, आवृत्ति वर्ष १९९३, सामाजिक भाषणे, पृ. ९) । सभी हिंदुओं को पूजा, प्रार्थना का समान रूप से अधिकार देने वाला यह मंदिर आज भी प्रसिद्ध है । इसी मंदिर की प्रतिष्ठापना के समय की एक घटना न केवल पथदर्शी है, अपितु सावरकर जी की अपने उद्देश्य के प्रति प्रामाणिकता का विलोभनीय दर्शन भी कराती है । भागोजीसेठ चाहते थे कि, मूर्ति की प्रतिष्ठापना वेदोक्त पद्धति से हो । काशी से ब्राह्मण भी बुलाए गए । उन्हें बुलाते समय ही कल्पना दी गयी थी । किंतु वे ऐन समय पर मुकर गए कि, वेदोक्त का अधिकार अन्य जातियों को नहीं है । मुहूर्त निकला जा रहा था । शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी, भागोजीसेठ आदि सभी तैयार हो गए की चलो वेदोक्त नहीं तो पुराणोक्त पद्धति से ही सही । किंतु सावरकर जी का क्रोध फूट पडा । वे भागोजीसेठ से बोले, ‘सेठजी मंदिर आप का, आप मालिक है, सो अंततः आप जो कहे वह ही होगा । किंतु अगर सदियों से चली आ रही यह भेदभाव की शृंखला नहीं तोड सके, फिर इस मंदिर की आवश्यकता ही क्या रही? पुरानी ही प्रथाएँ चलानी है तो पुराने मंदिर क्या कम है संख्या में, जो और एक नया बना रहे है? नया मंदिर नई पहल है । यह अगर आप को स्वीकार्य नहीं तो कृपया मुझे छोड दीजिए । किंतु अगर आप अडिग रहते है, तो इस मंदिर में वेदोक्त प्रतिष्ठापना का दायित्व मेरा ।’ इतना कहते ही सावरकर उन द्विजों की ओर मुड कर बोले, ‘हम ने आप को पत्र भेजा था, उस में स्पष्ट रूप से लिखा था कि वेदोक्त पद्धति से प्रतिष्ठापना होगी । आप को यदि स्वीकार नहीं था, तो पहले ही मना कर देते । किंतु अगर आप सोचते है कि ऐन मौके पर मना करने से हम मजबूर हो जाएँगे तो गलत सोच है आप की । मैं नहीं मानता की किसी एक जाति में जन्म लेने भर से ही व्यक्ति को पौरोहित्य का अधिकार मिल जाता है । किंतु भागोजीसेठ की इच्छा थी की आप ही पौरोहित्य करे । किंतु आप के बिना भी पौरोहित्य हो सकता है । यदि आप मना कर देते है तो हम सारी जातियों के सैंकडों हिंदु इस मूर्ति को अनंत करों से उठा के ‘जय देवा’ उद्घोष के साथ स्थापित करेंगे । यह ही होगी हमारी विधी । हम सहस्रों कंठों से हिंदुधर्म का जयगान करेंगे । यह ही होगा हमारा वेदघोष । और ‘भावो हि विद्यते देव:’ यह ही होगा हमारा शास्त्राधार ।’ वीर सावरकर की यह ओजस्वी वाणी सुन के मसुरकर महाराज के आश्रम के एक शिष्य तड़ाक से आगे आए । उन का नाम था वेदशास्त्रसम्पन्न गणेशशास्त्री मोडक । उन्हों ने वेदोक्त पद्धति से ही प्रतिष्ठापना की (सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, पृ. १७४) ।

    पाठशालाओं में विभिन्न जाति के छात्रों के एकत्रित बैठने के बारे में भी सावरकर जी का रवैया कठोर ही रहा । उन्हों ने पहले तो सभी को प्रेमपूर्वक समझाया । किंतु जब कुछ लोग नहीं माने तो उन्हों ने कानूनी कार्यवाई की भी तैयारी दिखाई । इस विषय में सार्वजनिक जगहों पर अस्पृश्यों को भी नागरी अधिकार दिलाने वाला कानून १९२३ से ही था । जब सावरकर जी के विचारों को मानने वाले जनूभाऊ लिमये १९२८ में स्कूल बोर्ड के अध्यक्ष बने तो उन्हों ने भी पाठशालाओं में अस्पृश्यता का पालन ना करने के संबंध में आधिकारिक आदेश दिए । इस से सावरकर जी का काम और आसान हो गया । उन्हों ने १९२३ के सरकारी आदेश की सहस्रों प्रतियाँ करा के पूरे ज़िले में बाँटी । सरकारी कानून पता चलने पर लोकमत एकदम से अनुकूल होने लगा । किंतु उस का विरोध भी उतना ही हुआ । अस्पृश्य विद्यार्थियों को कई तरह के कष्ट दिए जाने लगे, उन के सामान को आग लगानी शुरू हुई, कुछ शिक्षकों ने उन्हें सिखाने से ही इनकार कर दिया (तत्रोक्त, पृ. १३२) । परिणामस्वरूप सावरकर जी ने रत्नागिरी के ज़िलाधिकारी से आवेदन किया (रत्नागिरी हिंदुमहासभा प्रतिवृत्त, १९२९) । इस में वे लिखते है, “The dogs may enter and even are welcomed and patted in the schools but the poor boys fared in the schools worse than dogs. The villagers resorted to the rowdy methods and drove away the untouchable boys from the schools and are not allowing them even to enter there as before. I humbly and most pressingly request you to set matters right in those villages as soon as possible and ask the police to take back the children of the untouchables to schools under the government protection against the physical threatening on the part of the rowdy rioters there’. सावरकर यहाँ अस्पृश्य विद्यार्थियों के लिए पुलिस सुरक्षा की माँग कर रहे है । यह पढ के सहसा ही अमरिका के लुज़ियाना प्रांत में गोरों के स्कूल में अपृथक पढने जाने वाली पहली आफ्रीकन-अमरिकन लडकी रुबी ब्रिजेस की याद आती है । उसे भी स्कूल में छोडने के लिए फ़ेडरल मार्शल्स जाया करते थे । रत्नागिरी के मामले में सचमुच पुलिस सुरक्षा दी गई या नहीं यह तो मुझे ज्ञात नहीं, किंतु इतना अवश्य कहूँगा कि अमरिका की घटना १९६० की है तो सावरकर द्वारा रत्नागिरी में की गयी पहल १९२९ की । इसी वर्ष स्कूल बोर्ड का परिपत्रक ज़िला बोर्ड ने रद्द करवा दिया । किंतु सावरकर अस्पृश्यता का पालन रोकने वाला परिपत्रक जारी करवाने में १९३४ में पुन: यशस्वी हुए ।

    आप किसी भी व्यक्ति से मित्रता हुई, ऐसा कब कह सकते है । आप के सैंकडों पहचानवाले हो सकते है, दसों परिचित भी हो सकते है, किंतु घनिष्ठ मित्रता, एकरूपता तभी कही जा सकती है, जब आप उन के साथ बिना किसी हिचकिचाहट के खाना खाओ । भोजन मित्रता का संकेत है । यह बात सावरकर बहुत ही अच्छी तरह से जानते थे । उन दिनों जहाँ अपने से तथाकथित निम्न जाति के व्यक्ति के साथ भोजन करना भी पाप माना जाता था, सावरकर जी ने कल्पना निकाली सहभोजन की । सभी जाति के हिंदुओं का एक साथ, एक ही पंक्ति में भोजन । रोटीबंदी की इस शृंखला पे पहला प्रहार किया सावरकर की प्रेरणा से स्थापित ‘तरुण हिंदुमंडल’ने (डिसेंबर १९२९) । विभिन्न जातियों के सौ युवाओं ने एक साथ भोजन किया । यह तो था पहला पडाव, जो केवल उस मंडल के कार्यकर्ताओं तक ही सीमित था । अब समय था रोटीबंदी की शृंखला पे दूसरा प्रहार करने का, यानी प्रकट सहभोजन कराने का । अगले वर्ष पुन: एक बार सौ लोगों के सहभोजन का आयोजन हुआ । इस बार यह समारोह सभी के लिए खुला था । लेकिन कार्य सम्पन्न हो कहाँ? कोई भी कर्मठ इस समारोह के लिए जगह देने के लिए तैयार नहीं था । अंततः खातू परिवार के नाट्यगृह में व्यवस्था हुई । किंतु तब भी कई प्रश्न शेष थे । भोजन पकाएगा कौन? इस तथाकथित पापाचरण के लिए कोई भी रसोईया तैयार नहीं था । जैसे तैसे प्रबंध हुआ । लग रहा था कि कोई नहीं आएगा । किंतु ऐन मौके पर इतनी भीड हुई कि कईयों को तो समारोह में भाग लिए बिना ही वापिस लौटना पडा (सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, पृ. १८९) ।

    सावरकर जी ने सहभोजन में सहभागी लोगों की सूची प्रकाशित करने का नियम किया था । पहले सहभोजन के पश्चात कईयों को इस बात के परिणाम, सामाजिक बहिष्कार आदि स्वरूपों में भुगतने पडे । लेकिन सावरकर जी द्वारा दिखाई दृढता के पश्चात धीरे धीरे वातावरण सकारात्मक होता गया । पहले सहभोजन की खबर देते हुए ‘टाईम्स ऑफ इंडिया’ लिखता है (०९/१२/१९३०), ‘जातिव्यवस्था ही हिंदु धर्म की अवनती का मूल कारण है ऐसा मानने वाले कुछ उत्साही सुधारकों द्वारा सहभोजन का आयोजन किया गया था । इस में सभी जातियों के लोगों ने भाग लिया’ । आगे चल के सावरकर जी ने इन समारोहों को किसी पवित्र धार्मिक कार्य जैसा स्वरूप दिया । इतना ही नहीं उन्हों ने किसी भी धार्मिक विधी से पहले जैसे संकल्प किया जाता है, वैसा ही संकल्प भी सहभोजन के लिए रचा, ‘जन्मजातजातिभेदोच्छेदनार्थम् अखिलं हिंदुसहभोजनं करिष्ये’ (रत्नागिरी हिंदुसभेचे प्रतिवृत्त, खंड २, १९३७) ।

    सावरकर जैसे स्वीकार्य रूप से सकारात्मक कार्य करना जानते थे, वैसे ही नकारात्मक विचारों को उन्हीं की भाषा में उत्तर देना भी जानते थे । एक बार एक महाशय ने सहभोजन समारोहों की आलोचना करते हुए कहा कि, ‘एक दूसरे के मुँह में थूकने से भी क्या प्रेम बढता है’? सावरकर जी ने तपाक से उत्तर दिया था कि, ‘आप जब ब्राह्मणभोज कराते है तब क्या एक दूसरे के मुँह में थूकते है’? सावरकर जानेमाने व्यक्ति होने के कारण, अनेकों विवाहादि समारोहों में उन्हें आमंत्रित किया जाता । वे भी प्रेमपूर्वक जाते । किंतु वे यजमानों को सुझाव देते कि, कार्यक्रम में सहभोजन हो । और अधिकतर लोग तैयार भी हो जाते । सावरकर जानते थे कि क्या स्पृश्य क्या अस्पृश्य, दोनों ही जिस चीज़ को धर्म मानते थे उस का निष्ठापूर्वक आचरण करते थे । इसीलिए उन्हों ने किसी का भी द्वेष न करते हुए जहाँ तक हो सके युक्तिवाद से अपनी बात मनवाना सही समझा । आज कल के कुछ धर्मसुधारक गलत रूढीयों का अनुसरण करने वालों को मूर्ख कहते है, तरह तरह के अपशब्द कहते है । इस से आप की विद्वत्ता नहीं सिद्ध होती, बल्कि कार्य की हानि ही होती है । अपशब्द वह कहता है जिसे अपने विचारों पे विश्वास न हो, जो विश्वास से भरा हुआ होता है, वह तो सरल भाषा में भी अपनी बात रख सकता है । सावरकर जी के प्रयत्नों से धीरे धीरे स्त्रीवर्ग भी सहभोजनों में सहभागी होने लगा (२१/०९/१९३१) ।

    वीर सावरकर के सहकारी तथा ‘सत्यशोधक’ पत्रिका के संपादक थे श्री. दत्तोपंत लिमये । उन की सुपुत्री का विवाह निश्चित हुआ । किंतु जब ससुराल वालों को पता चला कि लिमये जी सहभोजनी है, तो उन्हों ने विरोध दर्शाया । कहा कि जब तक लिमये जी प्रायश्चित नहीं लेते, विवाह नहीं होगा । एक तरफ बेटी का भविष्य तो दूसरी तरफ तत्त्वनिष्ठा । लिमये जी धर्मसंकट में पड गए । यह विषय सावरकर जी के समक्ष आया । तो उन्हों ने एक झटके से उन्हें प्रायश्चित लेने की अनुज्ञा दे दी और साथ ही साथ ससुराल वालों को यह भी कहा कि यह प्रायश्चित केवल विवाह तक ही सीमित रहेगा । वे मान गए । यहाँ विवाह सम्पन्न हुआ और वहाँ लिमये जी सहभोजन में पुनः जुट गए (तत्रोक्त) । सावरकर जी की यशस्विता का रहस्य उन के ऐसे व्यावहारिक तथा अनूठे मार्ग ही है । वे खुद समुद्रमार्ग से ही विदेश गए थे, लेकिन वापिस लौटने पर उन्हों ने प्रायश्चित नहीं लिया । ऐसे ही उन्हों ने शुद्धीकरण किए, बेटीबंदी तोडी, व्यवसायबंदी तोडी । १ मई १९३३ को उन्हों ने ‘अखिल हिंदु होटल’ शुरू किया जिसे चलाने वालों में से एक युवक दलित था । वहाँ भोजन करने वालों के हस्ताक्षर ले के उस की सूची रखी जाती थी । सावरकर जी के स्वीय सहायक श्री. बाळाराव सावरकर के अनुसार सावरकर जी के पास ऐसे सवा तीनसौ से अधिक हस्ताक्षर इकठ्ठा हो गए थे (रत्नागिरी पर्व, लेखक बाळाराव सावरकर, आवृत्ति वर्ष १९७२, पृ. ३००) ।

    राजर्षि छत्रपती शाहू महाराज के अनुयायी भाई माधवराव बागल जब रत्नागिरी आए तो वहाँ का वातावरण देख कर वे अवाक रह गए । उन्हों ने कहा, ‘पुणे, मुंबई जैसे बडे शहरों में भी सहभोजन के लिए ५-१० महिलाएं भी आगे नहीं आती । किंतु यहाँ सैंकडों महिलाएँ सहसा ही सहभागी होती दिखती है । वीर सावरकर यदि हमारे यहाँ होते, तो हम उन्हें सिर आँखों पे बिठा के रखते’ (सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, पृ. २१४-१५) । वीर सावरकर जी का कार्य देख कर महर्षि शिंदे बोल उठे थे (तत्रोक्त, पृ. २१५), ‘भगवान सावरकर जी को मेरी बची हुई आयु दे दे’ । दलित नेता श्री. सोनवणे के अनुसार (तत्रोक्त, पृ. २१२), ‘सहस्रों वर्षों से स्पृश्यों ने हमें दूर रखा, किंतु यह भेद भी नष्ट हो सकता है यह विश्वास, सावरकर जी के कार्य को देख कर होता है ‘ । वीर सावरकर जी ने भारतरत्न डॉ. बाबासाहब आंबेडकर जी को भी इस कार्य का अवलोकन करने हेतु निमंत्रित किया था । सावरकर, आंबेडकर जी को लिखे पत्र में लिखते है, ‘यह निमंत्रण किसी तात्त्विक चर्चा हेतु नहीं, अपितु जातिभेद नष्ट करने के लिए हिंदु समाज प्रत्यक्ष क्या क्या कार्य करना चाहता है इस बात का सक्रिय उदाहरण देने के लिए है ।’ सावरकर चाहते थे कि आंबेडकर जी की अध्यक्षता में सहस्रावधी पूर्वास्पृश्यों का सहभोजन हो व तत्पश्चात आंबेडकर जी मार्गदर्शन करे । किंतु आंबेडकर जी की कार्यमग्नता के चलते यह समारोह हो न सका । नाशिक के काळाराम मंदिर सत्याग्रह के दौरान सावरकर जी स्थलबद्ध थे । उन्हों ने तब भी आंबेडकर जी का समर्थन करने हेतु एक पत्र नाशिक के हिंदुओं के नाम लिखा था । सावरकर जी के अनुज डॉ. नारायणराव सावरकर उस समय अपने सहकारीयों के साथ नाशिक में उपस्थित थे तथा उन्हों ने मंदिरप्रवेश के लिए अनुकूल वातावरण बनाने का प्रयास भी किया था (तत्रोक्त, पृ. ११४) ।

    सावरकर जी का अस्पृश्यता निवारण और सामाजिक एकता का कार्य एक यशस्विता की गाथा है । १९२४ से ले कर १९३७ तक के स्थलबद्धता के काल में उन्हों ने रत्नागिरी ज़िला व आसपास के परिसर से अस्पृश्यता का समूल उच्चाटन कर दिया था । आगे चल के भी उन की हिंदुमहासभा के माध्यम से की गई राजनीति जातिगत भेदभावों से उपर उठ कर संपूर्ण समाज के लिए ही थी । आज भले ही अस्पृश्यता कानूनी रूप से नष्ट हो चुकी हो, किंतु जातिवाद के रूप में वह कुछ लोगों के मन में आज भी जीवित है । नए युग में पुनः विश्वगुरू बनने की चाह रखने वाले देश के लिए यह जातिभेद कितनी बडी बाधा है, कोई भी अनुमान लगा सकता है । ऐसे समय में सावरकर जी के विचारों की, उन के द्वारा चुने अभिनव मार्गों की पहले से भी अधिक आवश्यकता आन पडी है । समय की माँग है कि हम उस मार्ग पर पूरी प्रामाणिकता के साथ चले । सावरकर जी द्वारा किया गया कार्य स्वयं प्रकाश बन के पथ दिखलाएगा ।

    — © अॅड. विक्रम श्रीराम एडके,
    (सावरकर जी के चरित्र एवं विचारों के अभ्यासक तथा उन से संबंधित विषयों पर व्याख्यान देने वाले वक्ता ।)

    *लेख वडोदरा के महाराजा सयाजीराव गायकवाड विश्वविद्यालय के इन्स्टिट्यूट ऑफ लिडरशिप अैंड गवर्नंस द्वारा प्रकाशित ‘वीर सावरकर स्वतंत्रता एवं अखंडता के साधक’ में पूर्वप्रकाशित

  • पर्सन ऑफ इंटरेस्ट

    तुम्हाला असं कधी वाटतं का की, आपल्या सभोवताली जे जग आपण पाहातो त्याच्या दृश्य पातळीच्या आतसुद्धा खूप काहीतरी आहे? किंवा, आसपासचं जग जरी सारखंच वाटत असलं तरीही त्यात काहीतरी बदल झालाय आणि तो बदल मनाला जाणवतोय पण तरीही त्यावर बोट ठेवता येत नाहीये? हे आणि असे आपल्या अस्तित्वावर आणि स्थानावरच प्रश्न उपस्थित करणारे प्रश्न पडले की जन्माला येतात कारस्थानांचे सिद्धांत अर्थातच कॉन्स्पिरसी थियरीज. त्यातले बहुतांशी निरर्थक असतात, पण काही खरेसुद्धा असतात. एक विशिष्ट कारस्थानाचा सिद्धांत घेऊन त्या भोवती कथा गुंफणे काही नवीन नाही. परंतु याच घासून गुळगुळीत झालेल्या समीकरणाला जेव्हा ‘नोलन’ नावाचा चलांक येऊन मिळतो तेव्हा सारे बीजगणितच बदलून जाते, काहीतरी अव्याख्येय, दैवी होऊन जाते. मी येथे बोलतोय ते ‘मेमेंटो’ (२०००) च्या कथेमागील आणि ‘द डार्क नाईट ट्रिलॉजी’ (२००५-१२), ‘द प्रेस्टीज’ (२००६) आणि ‘इंटरस्टेलर’ (२०१४) यांच्या पटकथांमागील अद्वितीय मेंदू जोनाथन नोलनबद्दल! आणि ते समीकरण म्हणजे जोनाथन नोलनच्या बुद्धीची सुरेख उपज ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’ (२०११-१६) ही सर्वांगसुंदर मालिका!!

    जोनाथनने त्याचा भाऊ व निर्विवादपणे या शतकातील सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या ख्रिस्तोफर नोलनसोबत केलेले काम तर विलक्षण आहेच. परंतु मी त्याचा खऱ्या अर्थाने फॅन झालो ते ‘वेस्टवर्ल्ड’ (२०१६ -) पाहिल्यानंतर. अरेषीय मांडणी, चित्रभाषेतूनही चित्रांच्या पलिकडचा संदेश पोहोचवणारी रचना, प्रश्न पडायला आणि उत्तरं शोधायला भाग पाडणारं कथानक, इंटेलिजंट तरीही अत्यंत भावस्पर्शी कथा, उच्चतम दर्जाचा अभिनय, एक जरी चौकट चुकली तरी पुढे काहीच समजणार नाही इतकी बांधीव पटकथा, सुरुवातीला विचित्र वाटणारं परंतु लक्ष दिलं तर गणित सुटल्यासारखा निखळ आनंद देणारं संपादन, अत्युच्च छायांकन, अर्थवाही संगीत, काळाशी केलेला खेळ व त्यातून तयार होणारा जगावेगळा प्रभाव आणि सगळं काही संपल्यावर आता आपल्यापुढे पसरलेल्या या विस्तीर्ण आयुष्याचं करायचं काय असं वाटायला लावणारी पोकळी निर्माण करण्याची क्षमता; असे खास ‘नोलन’च्या शैलीचे एकूण एक गुण त्यात होते. त्याच वेळेपासून ‘पीओआय’ ठाऊक होती मला. पण मी ती पाहायचे टाळायचो. का? याचं कारण होतं त्याचं कथाबीज!

    एक बेफाट पैसा असलेला आणि साक्षात बृहस्पतीच म्हणावा अशा बुद्धीचा अब्जाधीश हॅरोल्ड फिंच (मायकेल इमर्सन) एक मशिन बनवतो. ही मशिन कोणत्याही आतंकवादी हल्ल्याची पूर्वसूचना देऊ शकत असते. इतकेच नव्हे तर आतंकवाद्यांना लक्षावधी माणसांमधून वेगळे ओळखूही शकत असते. तो ही मशिन सरकारला देतो. हे करण्यासाठी अर्थातच त्या मशिनला सबंध देशावर नजर ठेवावी लागणार! या टेहळणीतून तिला फक्त आतंकवादी हल्लेच समजतात असं नाही, तर तिला इतर गुन्ह्यांचाही आधीच पत्ता लागतो, खास करून जीवघेणे गुन्हे! पण सरकारला या गुन्ह्यांना आधीच रोखण्यात रस नाही. त्यासाठी पोलिस आहेत. त्यांना रस आहे तो फक्त ९/११ नंतर पणास लागलेल्या अमेरिकेच्या सुरक्षिततेची काळजी करण्यात! फिंच ही मशिन सरकारला तर देतो, पण तिचा वाममार्गी वापर होऊ नये, असेही त्याला वाटत असते. शिवाय सगळ्याच नागरिकांवर सरकारने का होईना नजर ठेवणे, त्यांच्या क्षणोक्षणाची माहिती ठेवणे, हे बेकायदेशीरच! त्यासाठी फिंच एक व्यवस्था करतो. मशिन तिच्याकडे असलेली कोणतीच माहिती कधीच उघड करणार नाही, तर फक्त सर्वोच्च प्राधान्याच्या गुन्ह्यातील व्यक्तीचा सोशल सिक्युरिटी नंबर तेवढा देईल. तो गुन्हेगार आहे की गुन्ह्याचा बळी हे सुद्धा समजणार नाही, ते यंत्रणेने शोधायचं. मशिन जसे आतंकी हल्ल्याचे नंबर्स देते, ज्यांना रिलेव्हंट नंबर्स म्हटलं जातं, तसंच इतर गुन्ह्यांचेही नंबर्स देते, ज्यांना इर्रेलेव्हंट नंबर्स म्हटलं जातं. मशिन रोज रात्री सगळा डेटा, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित काही भाग वगळता, पुसून टाकते, जेणेकरून तो कधीच कुणाच्याही हाती पडू नये. सरकारला इर्रेलेव्हंट नंबर्सशी काहीच देणेघेणे नाही, म्हणजे ते गुन्हे नाहीत का? आहेत की! अतिशय हिंसक गुन्हे आहेत ते. पण मग त्या लोकांचं काय करायचं? या साठी फिंच कुणाच्याही नकळत मशिनमध्ये बॅकडोअर प्रोग्रॅम करतो. सगळे इर्रेलेव्हंट नंबर्स त्याला मिळत राहातात. ते गुन्हे रोखण्यासाठी तो एक्स-सीआयए ऑपरेटिव्ह जॉन रीझला (जिम कॅव्हिएझेल) कामावर ठेवतो. आणि दोघं मिळून एकेका गुन्ह्याला रोखू लागतात.

    हे कथाबीज जेव्हा मला समजलं तेव्हा माझ्या मनात पहिला विचार आला तो हा की, अरे ही तर बॅटमॅनची स्टोरी! म्हणजे बॅटमॅन हा टेक्नॉलॉजिकल जिनियस बिलियनेयर आहे आणि तो त्याचा वापर करून वास्तवाच्या भूमीवरही खलनायकांना रोखतो. इथे त्यांनी काय केलंय, तर बॅटमॅनला दोन लोकांमध्ये विभागलंय. फिंच हा तंत्रज्ञानाचा जादूगार आहे तर रीझ हा मानवी शारीरिक ताकदीचा आविष्कार आहे. दोघं मिळून तेच करताहेत जे बॅटमॅन करतो! असं गिमिक बघण्याची माझी जरा सुद्धा इच्छा नसल्यामुळे मी ही मालिका बघणं अनेक वर्षे टाळलं. आणि जेव्हा मी ती पाहिली, तेव्हा मला एक गोष्ट पक्की समजली की मी एक नंबरचा मूर्ख होतो!

    पीओआयचं बीज बॅटमॅनसारखं नक्कीच आहे, पण तिची मांडणी ही बॅटमॅनपेक्षा अनेक कोस दूर आहे. किंबहूना पहिल्या काही भागांमध्ये काहीतरी विलक्षण धक्कातंत्र असलेला क्राईम-फायटिंग शो वाटणारी ही मालिका पहिला सीझन अर्धा व्हायच्या आतच इतक्या गहन प्रश्नांकडे व कथानकांकडे वळते की मेंदू चक्रावून जातो. आणि हे गूढाकाशात खोल खोल शिरणे जे सुरू होते ते थेट शेवटच्या सीझनच्या शेवटच्या भागाच्या शेवटच्या प्रसंगानंतरही सुरूच राहाते. आणि सांगतो! प्रत्येक भागात, होय प्रत्येक भागामध्ये किमान चार-सहा तरी मेंदूचा भुगा करणारे ट्विस्ट्स आहेत. किंबहूना जिथे कोणत्याही रहस्यमय मालिकेच्या भागाचे ट्विस्ट्स संपून रहस्य उलगडते त्याच्या पलिकडे त्या त्या भागाची आणि बहुतांशी वेळा सबंध मालिकेचीच मिती बदलून टाकणारा ट्विस्ट पीओआयमध्ये आहे! या बाबतीत तिची तुलना नोलानच्याच ‘मेमेंटो’शी होऊ शकते. ग़जिनीमुळे संजय रामस्वामीला एसटीएमएल झाला, त्याची कल्पना मेली; संजयने त्याचा बदला घेतला की सिनेमा संपतो. पण ‘मेमेंटो’ तिथे संपत नाही, तो त्याच्याही पुढे जाणारा एक ट्विस्ट देतो. तसेच ट्विस्ट्स पीओआयमध्ये पदोपदी आहेत! त्यामुळेच क्राईम-फायटिंग मालिका म्हणून सुरू झालेली पीओआय कधी टिव्हीवर प्रसारित झालेल्या सर्वश्रेष्ठ सायन्स-फिक्शन मालिकांपैकी एक होऊन बसते, याचा लक्ष न देणाऱ्याला पत्ताही लागत नाही!

    बरं हे सगळं अरेषीय (नॉन-लिनियर) मांडणीत बरं का! त्यामुळे काळाशी खेळ करण्याचा नोलान बंधूंचा छंद या मालिकेतही पुरेपूर दिसून येतो. गंमत म्हणजे, सिनेमात हे करणे त्या मानाने खूपच सोपे असते. कारण सगळे मिळून जास्तीत जास्त तीन-चारच तास लक्षात ठेवायचे असतात. पण १०३ भागांच्या मालिकेत हे लक्षात ठेवणे तर जाऊच द्या, लिहिणेसुद्धा केवढे कठिण असेल कल्पना करा! विशेष म्हणजे या मालिकेत एक सुद्धा प्रसंग उगाचच नाहीये. ४३ मिनिटांचा एक एपिसोड पण प्रत्येक एपिसोड चित्त्यासारखा वेगवान. आणि अतिशय प्रचंड वेगाने घटना घडत असूनही असे कधीच, अगदी एकदा सुद्धा जाणवत नाही की काहीतरी घाई झालीये. कारण, प्रत्येक प्रसंगाला त्या प्रसंगाची जितकी गरज आहे तितकाच वेळ देऊन मांडलेला! त्यामुळे ४३ मिनिटांचाच एक भाग पाहिला तरीही एखादा दोन-अडिच तासाचा चित्रपट पाहिल्याची भावना होते, इतका तो सशक्त आणि भरीव असतो! आणि असे एक-दोन नव्हे तर तब्बल १०३ एपिसोड्स आहेत पीओआयमध्ये! आणि सगळ्यांत विलोभनीय गोष्ट म्हणजे, कुठे थांबायचं हे त्यांना पक्कं ठाऊक आहे! या मालिकेत प्रत्येक पात्राला महत्त्व आहे. कोणतंच पात्र पोकळ नाही, तर प्रत्येकाला उद्दिष्टं आहेत, सकस बॅकस्टोरीज आहेत आणि त्यांच्या प्रत्येक क्रियेचा मालिकेच्या एकूणच कथानकावर काही ना काही परिणाम होतोय. फक्त तो कधी आणि कसा, हे प्रचंड अनपेक्षित आहे! मुख्य दोन पात्रेच नव्हे तर ताराजी हेन्सन (कार्टर), केव्हिन चॅपमन (फ़स्को), अॅमी अॅकर (रूट), साराह शाही (शॉ), एन्रिको कोलँतोनी (एलायास), जॉन ग्रीअर (जॉन नोलान) या आणि मालिकेतील एकूण एक पात्रांनी अनुपमेय सुंदर काम केलेय. एलायास आणि फ़स्को यांची पात्रे तर स्क्रिनरायटिंग करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने अभ्यासायलाच हवीत अशी झालीयेत!

    ही मालिका नुसती ट्विस्ट्सपुरतीच आहे का? तशी ती असती, तरीही ती आजवरच्या सर्वश्रेष्ठ मालिकांच्या यादीत कुठे ना कुठे नक्कीच असली असती. पण पीओआय तेवढ्यापुरतीच मर्यादित नाही. वर म्हटल्याप्रमाणे पहिला सीझन निम्मा व्हायच्या आतच ते त्यांच्या विषयांत इतके खोल खोल शिरू लागतात की विचार करता करतानाही आपला दम तुटू लागतो. वाटतं की हा, हे यांचं अंतिम स्थान आहे. आणि असं वाटे वाटेपर्यंतच मालिका त्याच्याही पलिकडच्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर चाचपू लागते. नोलनचे सिनेमे किती जरी तांत्रिकदृष्ट्या स्वर्गाहून सुंदर असले, तरीही ते का चालतात माहितीये का? कारण, त्यांत मांडलेले प्रश्न हे वैश्विक असतात! न्यूयॉर्कमधील एखाद्या माणसाला त्या चित्रपटातून जी संवेदना जाणवेल तीच अहमदनगरमधील एखाद्या माणसाला जाणवू देण्याची त्यांच्यात क्षमता असते, म्हणून त्याचे सिनेमे जगभरात चालतात. ते तांत्रिकदृष्ट्या जितके कौशल्यपूर्ण असतात, त्याहून जास्त त्यांच्या कथा भावनिकदृष्ट्या शक्तिशाली, हेलावून सोडणाऱ्या असतात. नेमकं हेच ही मालिका टिव्हीच्या क्षेत्रात करते. त्यामुळे ती प्रश्न विचारत जितकी खोल खोल जाऊ लागते तितकीच आपल्याला जास्त जास्त उत्कंठा तर वाटू लागतेच पण त्या सोबतच भितीसुद्धा वाटू लागते. कारण, त्यांनी विचारलेले, विचारत असलेले आणि विचारू पाहाणारे एकूण एक प्रश्न आपल्या जगाशी नव्हे नव्हे आपल्या अस्तित्वाशी निगडीत आहेत! जगाच्या वर वर दिसणाऱ्या छानशा आवरणाखाली काय चालू आहे याची त्यांनी त्यांच्या काल्पनिक विश्वात दिलेली उत्तरे ही आपल्याला खऱ्या विश्वात भिती वाटायला लावण्याइतकी सच्ची आणि शक्यतेच्या कोटीतील आहेत! त्यांची हाताळणी ही नोलनच्या नेहमीच्या अरेषीय शैलीसोबतच स्टिव्हन किंगच्या एखाद्या गूढकथेपासून (टेरा इनकॉग्निटा) ते ‘रन लोला रन’सारख्या (१९९८) एकाच घटनेच्या अनेक पैलूंवर प्रकाश पाडण्यापर्यंत (इफ-देन-एल्स) सातत्याने प्रयोगशील होत राहाते. आता या ट्विस्टच्या पलिकडचा ट्विस्ट सांगतो. हे सगळं चालू असतानाही मालिका त्यांची विनोदबुद्धी एका क्षणासाठीदेखील सोडत नाही! आणि सांगतो, ‘पीओआय’ ही त्या अपवादात्मक मालिकांपैकी आहे जिच्या अनेक एपिसोड्सनी आणि अनेक पात्रांनी (ते एका भागाव्यतिरिक्त परत कधीच येण्याची शक्यताही नसताना) माझ्या डोळ्यांतून वारंवार पाणी काढलंय. संवेदनशील असाल, तर पीओआयचा प्रत्येक एपिसोड भावनिकदृष्ट्या हलवून सोडणारा आहे!

    चांगल्या कथेचं महत्त्व केव्हा, तर त्यातील खलनायक सगळ्यांत चांगला असेल तेव्हा! पीओआयमध्ये एकच कुणी चांगला खलनायक नाही, तर चांगल्या खलनायकांची मालिकाच आहे. या बाबतीत तिची तुलना ‘गेम ऑफ थ्रोन्स’शी (२०११-१९) होऊ शकते. पण जीओटी नंतर नंतर पात्रपरिपोषाच्या बाबतीत पारच गंडलं. पीओआयचे खलनायक मात्र ओळीने एकाहून एक भयंकर आहेत. एक खलनायक बेफाट वाटत असतानाच कुणीतरी त्याच्याहूनही तुफान असा येतो की आधीचा अगदीच चिंधीचोर वाटू लागतो! मानवी मनाच्या इतक्या कंगोऱ्यांचा असा शोध क्वचितच कुणा टिव्ही मालिकेने घेतला असेल. पीओआयमधील प्रत्येक पात्राला अनेक स्तर (लेयर्स) आहेत आणि सुष्ट वा दुष्ट म्हणावं असं त्यांच्यात कुणीच नाही. किंबहूना कुणीतरी चांगलं-चांगलं वाटत असतानाच ते गपकन काहीतरी भयानक करून जातात आणि कुणीतरी अगदीच खलबुद्धीचा पुतळा वाटत असतानाच काहीतरी अनपेक्षित चांगलं करून जातात. या मालिकेचे सगळ्यांत मोठे वैशिष्ट्य जर कोणते असेल, तर ते हे की तिच्यात नग्नता नगण्य आहे आणि रक्तपात जरी असला तरीही रक्त वा बीभत्सपणा अगदीच क्वचित आहे.

    आजच्या नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम आणि टोरेण्टच्या युगात आपल्यासमोर हजारो मालिका उपलब्ध आहेत. त्यातील शेकडो दर्जेदारसुद्धा आहेत. पण आपल्या प्रत्येकाची अशी कोणती ना कोणती एकच मालिका असते जी सगळ्यांपेक्षा खास असते, सगळ्यांहून श्रेष्ठ असते. मी जीओटीचा केवढा मोठा चाहता आहे, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. परंतु माझ्यासाठी ती खास मालिका, ती सर्वश्रेष्ठ मालिका मात्र ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’ आहे. या मालिकेने माझा सिनेमा, मालिका यांच्या तांत्रिक अंगांबद्दलचा, त्यांचे लेखन, दिग्दर्शन, छायांकन, संपादन, नेपथ्य, संगीत, बजेटच्या मर्यादेतही केले जाणारे दर्जेदार काम अशा अनेक बाबतींमधला दृष्टीकोनच बदलून सोडला. तुम्हालाही ती माझ्या इतकीच आवडेल अशी खात्री नाही देत मी. कारण, प्रत्येकाच्या संवेदना वेगळ्या असतात. पण मी खात्रीने सांगतो, तुम्हालाही ती प्रचंड आवडेल, भरून व भारून टाकेल आणि त्या सोबतच निर्वात वाटावं एवढं रितंदेखील करून सोडेल!!

    *५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा: www.vikramedke.com)

    टीप: ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’चे सगळे सीझन्स अॅमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहेत.

  • दोन भेटी

    बाजीराव ८ ऑक्टोबर १७३५ ला (Bajirao I – An Outstanding Cavalry General. Author Col. R. D. Palsokar. Pp 183) उदयपूरकडे निघाले. त्यांच्यासोबत सुमारे ८ ते १० सहस्र सैन्य होते. त्याशिवाय इतर मराठी फौजा मेवाड ते बुंदेलखंडदरम्यान (Palsokar. Pp 183) पसरलेल्या होत्या. जानेवारी १७३६ च्या अखेरीस त्यांनी तापी ओलांडली (Selections of Peshwa Daftar. Author G. S. Sardesai. Vol. 14.42 quoted at The Era of Bajirao. Author Uday S. Kulkarni. Pp 205). पुढे उदय कुलकर्णी (Pp 206-07) वंशभास्करच्या (Vol. 6) हवाल्याने एक घटना देतात. अशीच घटना ई. जयवंत पॉल (Bajirao The Warrior Peshwa. Pp 145) सर जदुनाथ सरकारांच्या हवाल्याने देतात.

    घडले असे की, महाराणा जगतसिंहांनी (दुसरा) पेशव्यांचे ५ सहस्र रुपये नजराणा, मानाची वस्त्रे, घोडे आणि एक हत्ती देऊन यथोचित स्वागत केले. दुसऱ्या दिवशी त्यांना राजदरबारात सन्मानपूर्वक बोलावण्यात आले. तिथे त्यांच्या स्वागतासाठी स्वतः महाराणा सामोरे आले. दरबारात दोन आसने ठेवली होती. एक बाजीरावांसाठी आणि दुसरे साक्षात महाराणांसाठी. बाजीराव पुढे चालत गेले आणि आसनावर न बसता खाली जमिनीवर बसले. एवढेच नव्हे, तर तेथीलच एक चामर घेऊन ते महाराणांना वारासुद्धा घालू लागले. महाराणा अर्थातच भांबावून गेले. ते म्हणाले (Sardesai. E. Jaiwant Paul), “तुम्ही ब्राह्मण आहात, मी तुमची सेवा करायला हवी”. त्यावर बाजीरावांनी त्यांना उत्तर दिले की, “मी इथे फक्त तुम्हालाच राजा मानतो कारण तुमच्या पदरी १६ उमराव आहेत”!

    काही दिवसांनी बाजीरावांनी जयपूरला प्रस्थान केले. तिथे त्यांची सवाई जयसिंहांशी भेट झाली. या ही भेटीबद्दल “वंशभास्कर”च्याच हवाल्याने कुलकर्णी (Pp 208, 209) लिहितात. सवाई जयसिंहांनी जगतसिंहांच्या इतकाच सन्मान बाजीरावांनी मलाही द्यावा अशी मागणी केली. बाजीरावांनी त्यांना ताबडतोब उत्तर दिले, “(स्वैर अनुवाद)उदयपूरच्या महाराण्यांनी कधीच मुघलांची सत्ता मानली नाही, त्या संदर्भाने मी त्यांना आमच्या छत्रपतींसारखेच मानतो. तुम्ही लोक मात्र यवनांच्या चाकरीतच धन्यता मानत आलात. त्यामुळे तुम्ही खरे तर मला कनिष्ठ. पण तरीही मी तुम्हाला बरोबरीचा दर्जा देतोय (गुह्यर्थ – मी त्यांच्याकडे बसलो तसा तुमच्याकडेही खाली बसेन अशी स्वप्नं पाहू नका!). आपण बरोबरीच्या आसनांवर बसू. मी उजवीकडे बसेन आणि तुम्ही डावीकडे बसा”! या भेटीत बाजीरावांनी हुक्क्याची मागणी केली आणि सवाई जयसिंहांना त्रास होत असूनही मुद्दामच त्यांच्या तोंडावर (Paul. Pp 146) धूर सोडत राहिले (Kulkarni. Pp 209. with reference from Vansh Bhaskar)! अशी वागणुक देण्यामागे सवाई जयसिंहांच्या पूर्वजांनी स्वराज्याला दिलेल्या त्रासाची आठवण बाजीरावांना असल्यास नवल नाही!

    गंमत अशी की, बाजीरावांनी एकीकडे महाराणा जगतसिंहांना सन्मान दिला आणि दुसरीकडे सवाई जयसिंहांना त्यांची जागा दाखवून दिली, यात बाजीरावांचे चातुर्य आणि माणसांना जोखण्याचा स्वभाव तर दिसतोच. परंतु बाजीरावांचे खरे कर्तृत्व यात दिसते की, बाजीरावांनी जशी सवाई जयसिंहांकडून चौथाई व इतर रक्कम वसूल केली (Palsokar. Pp 183) तशीच जगतसिंहांकडूनही रक्कम वसूल केली (तत्रोक्त)! किंबहूना दिल्ली दरबाराकडून इतर मागण्याही मान्य करून घेतल्या. थोडक्यात, भावनिकता आपल्या जागी आणि राजकारण आपल्या जागी! अर्थातच बाजीरावांच्या सगळ्याच मागण्या काही मान्य झाल्या नाहीत. त्याचीच परिणती पुढे दिल्लीवर धडक देण्यात (मार्च १७३७) आणि नंतर भोपाळमध्ये निज़ामाला मार देण्यात (डिसेंबर १७३७) झाली. कुलकर्णी (Pp 202) सरदेसाईंच्या हवाल्याने (Marathi Riyasat. Vol. 3. Pp 215) शाहूंचे एक वाक्य देतात त्यातच बाजीरावांचे महत्त्व आणि स्थान कळून येते. शाहू म्हणतात, “मला १ लाख सैन्य आणि बाजीराव यांच्यातून एक निवडायला सांगितले, तर मी बाजीरावांनाच निवडेन”!

    — © विक्रम श्रीराम एडके

    (बाजीरावांचे चरित्र व युद्धनीतीचे अभ्यासक आणि व्याख्याते. अन्य लेख वाचण्यासाठी आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • किंचित भरकटलेला तरीही कमालीचा जबरदस्त: सुपर डिलक्स

    वेंबूचं (समँता) लग्न मुगिलनशी (फ़हाद फ़ासिल) झालंय. पण ती अजूनही तिच्या जुन्या प्रियकरांपैकी एकाला विसरलेली नाहीये. एके दिवशी ती नवरा घरी नसताना प्रियकराला बोलावून घेते आणि एक अनपेक्षित गडबड होते. त्याच वेळी नवरासुद्धा घरी येतो आणि गोष्टी अजूनच वेगळं वळण घेतात. माणिकम (विजय सेतुपती) हा जवळ जवळ साडेसात वर्षांनंतर घरी येणार म्हणून त्याची बायको (गायत्री शंकर) आणि सगळंच कुटूंब खुश आहे. आता इतक्या वर्षांनंतर घरी येणाऱ्या माणसात थोडा फरक तर पडणारच ना? पण माणिकम मात्र अंतर्बाह्य बदललेला असतो. अगदी शब्दशः! किशोरावस्थेतील तीन-चार पोरं आहेत. एकाच्या घरी कुणी नाही म्हटल्यावर ते भाड्याने सिडी आणून थोडीशी मजा करायचं ठरवतात. त्यातल्या एकाला भूतकाळाबद्दल वेगळंच काही तरी समजतं आणि रागाच्या भरात त्याच्या हातून घडू नये ते घडतं. त्याच्या वडलांची (मिस्किन) तर अजूनच वेगळी तऱ्हा. त्यांनी स्वतःचाच एक पंथ स्थापन केलाय. अडनिड्या वयात भयंकर अडचणीत सापडलेला मुलगा आणि भौतिक जगात निष्क्रिय नवरा यांच्या कात्रीत आईचं (रम्या कृष्णन) अक्षरशः भजं झालंय!

    त्यागराजन कुमारराजाच्या ‘सुपर डिलक्स’मधील या तीन कथा. तसं पाहायला गेलं तर त्यांचा एकमेकांशी काही एक संबंध नाही. त्या एकमेकींमध्ये गुंततात असं नाही आणि समांतर जातात म्हणावं तर तसंही नाही. त्या काही काही विवक्षित वेळी एकमेकींना छेदून जातात आणि एकमेकींवर परिणाम करतात, हे मात्र निश्चित. भौतिकशास्त्राचा तो सिद्धांत नाही का, फुलपाखरू परिणाम; ज्यात सगळ्या गोष्टी एकमेकींवर अवलंबून असतात आणि एखाद्या आखीव व अरेषीय संस्थेच्या प्राथमिक स्थितीतील साधासाच बदल सबंध संस्थेवरच खूप मोठा परिणाम घडवून आणतो? त्या बटरफ्लाय इफेक्टचं चपखल उदाहरण म्हणजे ‘सुपर डिलक्स’. आणि हा वैज्ञानिक संदर्भ घेऊन मी उगाचच स्वतःला हुशार दाखवत या सिनेमाला विज्ञानपट ठरवू इच्छितोय, असं नाही बरं का. उत्तरार्धात चित्रपटामध्ये खरोखरच साय-फायच्या काही घटकांचा समावेश होतो!

    मागच्या परिच्छेदात एवढं जडजंबाल लिहिल्यावर साहजिकच कुणालाही वाटेल की मग हा त्या रटाळ, कलात्मकछाप चित्रपटांच्या वर्गातला आहे का? तर मी स्पष्टपणे सांगतो की, गेल्या अनेक दिवसांत मी थिएटरमध्ये चित्रपट पाहाताना क्वचितच एवढा हसलोय. ‘सुपर डिलक्स’ शेवटपर्यंत कमालीचा विनोदी आहे. अगदी चांगल्या अर्थाने आहे. त्यांच्या तिन्ही कथा अतिशय वेगळ्या धाटणीच्या आहेत, अत्यंत संवेदनशील आहेत आणि त्या समाजातल्या वेगवेगळ्या मुद्यांना व्यवस्थित स्पर्श करतात. इतके असूनही त्यांनी विनोदी शैली कायम राखलीये. एवढी की, काही प्रसंगांत त्या त्या प्रसंगाचं गांभीर्य कमी होऊ न देताही दिग्दर्शक आपल्याला हसावं की रडावं हा प्रश्न पडायला भाग पाडतो.

    इतका गुंतागुंतीचा चित्रपट लिहिणं हे एका व्यक्तीला क्वचितच जमण्यासारखं आहे. ‘सुपर डिलक्स’ लिहिलाय चार जणांनी. मिस्किन, नालन कुमारसामी, नीलन के. शेखर आणि त्यागराजन कुमारराजा. चौघेही दिग्दर्शक असल्यामुळे त्यांनी चित्रभाषा संहितेत अचूक उतरवलीये. आणि संहितेतील चित्रभाषा पी. एस. विनोद आणि निरव शाह या दोघा जबरदस्त छायाकारांनी अतिशय ताकदीने पडद्यावर अनुवादलीये! मध्यांतराचा प्रसंग तर एवढा कमाल जमलाय की बासच!! पण चार जणांचं डोकं लागल्यावर ते चार दिशांना जायलाही वेळ लागत नाही. मध्यांतरानंतर चित्रपट काही काळासाठी पूर्णपणे भरकटतो. इतका वेळ वास्तववादी अधिक विनोदी असणाऱ्या चित्रपटात काही अतर्क्य घटक समाविष्ट होतात. कथानकाचा वेग मंदावतो. शेवटी सगळे तुकडे जागेवर बसण्यासाठी बरीच ओढाताण होते. इतका वेळ संयतपणे होत असलेली मांडणी एकाएकी तात्त्विक प्रवचने देणारी व भाषणबाज होत जाते आणि एक चांगला नव्हे तर खूपच जास्त चांगला चित्रपट मास्टरपीस होता होता राहून जातो. त्याचं स्वज्ञानी असणंही तात्कालिकच राहातं मग!

    पण या ही परिस्थितीत चित्रपटातल्या पात्रं हे वाहून जाणारं तारू समर्थपणे मार्गी लावतात. विजय सेतूपती हा माणूस अक्षरशः सोनं आहे सोनं! आणि तो सध्या ज्या कोणत्या चित्रपटाला हात लावतो त्याचंही सोनंच करून सोडतोय. प्रचंड ताकदीचा आणि तरीही स्वतःच्या मर्यादा पूर्णपणे ठाऊक असलेला, असे दोन्हीही दुर्मिळ गुण अंगी असणाऱ्या दुर्मिळ अभिनेत्यांपैकी एक आहे तो. आपल्या ताकद आणि मर्यादेच्या चौकटीत असा काही तुफान खेळतो तो की, काय सांगू! या चित्रपटात त्याने वापरलेला बोलण्याचा पोत आवर्जून ऐका. पण इथे विजय सेतूपतीच्या मदतीला निदान रंगभूषा आणि वेशभूषा तरी आहेत. दोन्हींपैकी कशाचीच साथ नसतानाही खरी मजा आणलीये ती फ़हाद फ़ासिलने. मलयाळम चित्रपटांच्या चाहत्यांना हा केवढा अफाट अभिनेता आहे हे पक्कं ठाऊक असेल. इथे तो त्या अफाट असण्याच्याही खूपच पुढे निघून जातो! विजय सेतूपतीने श्रेष्ठतम काम केलंय आणि फ़हादने त्याच्यापेक्षाही चांगलं काम केलंय, एवढंच सांगतो! या दोघांच्या खालोखाल भूमिकेत जान आणलीये ती रम्या कृष्णनने. तिची भूमिका काही फार मोठी नाही. पण जी आहे ती तिने एवढी जबरदस्त निभावलीये की विचारता सोय नाही. समँता तर अभिनेत्री कमाल आहेच. फक्त फ़हादसमोर किंचित फिकी वाटते, एवढंच. पण दोन व्यक्तींचा मात्र विशेष उल्लेख करावासा वाटतो. एक म्हणजे विजय सेतूपतीच्या मुलाचे काम करणारा लहानगा. दुर्दैवाने मला त्याचे नाव ठाऊक नाही. आणि दुसरी व्यक्ती म्हणजे एस. आय. बर्लिनची भूमिका करणारा भगवती पेरुमाळ. बोलणं, हावभाव वगैरे तर आहेच, पण एखाद्या फ्रेममध्ये नुसत्या अस्तित्वानेसुद्धा किळस आणतो हा माणूस! या सगळ्यांनी चित्रपट तोलून तर धरलाच आहे, परंतु त्याचबरोबर त्याचं मनोरंजन-मूल्यसुद्धा अत्युच्च दर्जाचं राखलंय. पात्रांची नावंही सूचक वाटावीत अशी शंका घ्यायला जागा आहे. असा हा काहीसा भरकटलेला पण तरीही वेगळ्या वाटेवरचा अतिशय मजेदार चित्रपट त्याची वेगळी कथा, चलाख मांडणी आणि दैवी अभिनय या गोष्टींसाठी पाहायलाच हवा असा आहे!!

    *३.७५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • शक्तीशाली पात्रावरचा दुबळा चित्रपट : कॅप्टन मार्व्हल

    “A hero can be anyone, even a man doing something as simple and reassuring as putting a coat on a young boy’s shoulders to let him know that the world hadn’t ended”. नोलनच्या ‘द डार्क नाईट राईज़ेस’मधील (२०१२) श्रेष्ठतम संवादांपैकी एक असा हा संवाद. नायक किंवा नायिका कुणाला म्हणावं याची साधी-सोपी तरीही गहन अशी परिभाषा सांगणारा. या संवादाचं किंचितसं सामान्यीकरण केलं तर काय हाती येतं? नायक किवा नायिका कुणाला म्हणावं, तर ज्या व्यक्तीच्या ह्रदयात मानवता भरलेली आहे आणि गरज पडेल तेव्हा जी व्यक्ती त्या मानवतेला अभिव्यक्त करायला कचरत नाही, अशी व्यक्ती! मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा नुकताच प्रदर्शित झालेला २१वा चित्रपट ‘कॅप्टन मार्व्हल’ नेमक्या याच आघाडीवर तोकडा पडतो.

    चित्रपटाची सुरुवात होते ती क्रींच्या ‘हाल’ नावाच्या ग्रहावर. उदात्त योद्ध्यांचा हा ग्रह. त्यांच्यापैकी एक असते व्हिर्स (ब्री लार्सन). या ग्रहाची सत्ता सुप्रिम इंटेलिजन्स नामक शक्ती चालवते. ही शक्ती प्रत्येकाला ‘भाव तसा देव’ न्यायाने वेगवेगळी भासत असते. व्हिर्सला सातत्याने एकसारखीच स्वप्नं पडत असतात. त्यात दिसणाऱ्या व्यक्ती, घटना यांपैकी कशा कशाचीच तिला काही एक माहिती नसते. एवढंच नाही तर तिला सुप्रिम इंटेलिजन्सदेखील त्या स्वप्नातीलच एका व्यक्तीच्या स्वरूपात दिसते. लवकरच व्हिर्स ही त्यांच्या ग्रहाचं ज्या स्क्रल सभ्यतेशी सातत्याने युद्ध सुरू असतं, त्या युद्धातील एका अभियानावर जाते. गोष्टी चुकतात आणि व्हिर्स येऊन पडते ‘प्लॅनेट सी-५३’ अर्थात, पृथ्वीवर! पृथ्वीवर एकापाठोपाठ एक घटना घडू लागतात आणि व्हिर्ससमोर तिचा भूतकाळ साऱ्या दडलेल्या रहस्यांसह उभा राहातो. यातूनच व्हिर्स तथा कॅरोल डेन्व्हर्स बनते, शक्तीशाली कॅप्टन मार्व्हल!

    हे सारे वाचायला किती रंजक वाटते ना? पाहाताना नाही वाटत! का? कारणं बरीच आहेत. एक तर ही आगळीवेगळी कथा लिहिताना अतिशय घासूनघासून गुळगुळीत झालेल्या चौकटबद्ध रितीने लिहिलेली आहे. इतकी की आपण कोणतीही घटना घडण्याच्या ५-१० मिनिटं आधीच सांगू शकतो, नेमके काय घडणार आहे ते! क्लिषेज़ ठासठासून भरलेले आहेत चित्रपटात. त्यात दुसरी भर म्हणजे अॅना बोडेन आणि रायन फ्लेक या द्वयीचे दिग्दर्शन इतके काही नीरस आहे ना की, सगळी मजाच निघून जाते. ब्री लार्सन चित्रपटाची नायिका आहे. साधीसुधी नायिका नाही, तर मार्व्हलच्या पहिल्यावहिल्या ‘फिमेल सुपरहिरो लेड’ चित्रपटाची नायिका! तिचे पात्र कॅप्टन मार्व्हलदेखील साधे नाही, तर मार्व्हल युनिव्हर्समधील सर्वाधिक शक्तीमान पात्रांपैकी एक! इतके असून तिने काय केले? ती बनली चित्रपट कंटाळवाणा वाटण्याचं तिसरं महत्त्वाचं कारण! “..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर”मधील सुमित राघवनच्या तोंडी असलेला “चेहरा असाच” संवादाचं जिवंत रूप म्हणजे ही ब्री लार्सन! चेहऱ्याची घडी बिघडली तर परत लाँड्रीवाल्याकडे पाठवायला लागेल या भितीमुळेच की काय, तिने बहुतांश वेळेस चेहऱ्यावर सुरकुतीसुद्धा पडू दिलेली नाही. कित्येक पंचलाईन्ससुद्धा तिच्या तोंडी सपाट वाटतात. ती पडद्यावर सुंदर दिसते, पण मार्व्हलचीच नताशा रोमनॉफ जशी इन्स्पायरिंग वाटते, तशी चुकूनसुद्धा वाटत नाही. उलट दिखाऊ वाटते! या बाबतीत तिच्या इतकाच दोष लेखक-दिग्दर्शकांचासुद्धा आहे. सबंध चित्रपटच बऱ्याच तथाकथित उदात्त मुद्यांवर दिखाऊ भूमिका घेतो आणि पात्रांनाही घ्यायला लावतो. चित्रपटांना काहीतरी राजकीय वगैरे धोरण असेल, तर हरकत नाही; पण तुमचे धोरण त्या कथेशी एकरूप करता नाही आले तर ते दिखाऊ आणि उथळच वाटते. भूमिका नीट लिहिल्या-मांडल्या न गेल्यामुळे म्हणा वा नीट न वठवल्यामुळे म्हणा, कॅरोल डेन्व्हर्स अर्थात कॅप्टन मार्व्हल ही चुकूनही डायना प्रिन्स अर्थात वंडर वुमनच्या तोडीची वाटत नाही.

    जवळजवळ १२४ मिनिटं चालणाऱ्या चित्रपटात मोजकेच प्रसंग निर्भेळ आनंद देतात. एक म्हणजे मार्व्हलचा लोगो येतो तो. तिथे त्यांनी काय मजा केलीये, ते चित्रपट पाहाताना आवर्जून पाहा. दुसरा म्हणजे स्टॅन-लीचा मरणोत्तर कॅमिओ. सबंध चित्रपट ज्या दोनच माणसांमुळे सहन होतो ते म्हणजे अत्यंत गुणवान अभिनेता सॅम्युअल जॅक्सन आणि दुसरा बेन मेंडेल्सन. यांपैकी सॅम्युअल एल. जॅक्सन तर एकमेवाद्वितीय आहेच, परंतु मेंडेल्सनला उत्तरार्धात जरासा वाव मिळताच त्यानेही त्याचे सोने केलेय. पण चित्रपटाची सगळ्यांत भारी गोष्ट जर कोणती असेल, तर ती आहे एक मांजर! या मांजराच्या एकही संवाद नसलेल्या पात्राने तिच्या वाट्याला आलेले जवळजवळ सगळेच प्रसंग शब्दशः खाऊन टाकलेयत. असा स्क्रिन-प्रेझेन्स मुख्य नायिकेलाही तिच्या अंतिम रूपांतर प्रसंगाचा अपवाद वगळता साधलेला नाही!

    सगळ्यांत सुरुवातीला जो नोलनचा संवाद दिलाय ना, तो दिसायला साधा असला तरीही हिरोईझमप्रधान चित्रपटांसाठी अक्षरशः वस्तुपाठ म्हणावा असा आहे. ‘कॅप्टन मार्व्हल’मध्ये लेखक-दिग्दर्शक त्यांच्या नायिकेला वेगवेगळ्या दिखाऊ धोरणांच्या बाजूने उभे करताकरता नेमके तिला मानवतेच्या बाजूने उभे करायलाच विसरले. म्हणजे ती बोलते मानवता वगैरे, पण नुसती बोलतेच. ते काही चित्रपटात तिच्या कॅरेक्टरचं मोटिव्हेशन ठरत नाही. यामुळेच चित्रपट सगळ्यांत जास्त अडखळतो. तिच्या भूतकाळातील प्रसंगही इतके जेमतेम दाखवलेयत आणि जे दाखवलेयत ते ही असे उथळपणे हाताळलेयत की, तिच्या पात्राबद्दल प्रेक्षकांना सहानुभूती तर सोडाच, साधी अनुभूतीदेखील वाटत नाही. या गोष्टीसाठी नोलनने ‘बॅटमॅन बिगिन्स’मध्ये (२००५) केवढा वेळ दिला होता, आठवा! आणि नोलनच कशाला, कोणताही चांगला सुपरहिरो-ओरिजिन चित्रपट घ्या, कथा, कादंबरी, कॉमिक्स किंवा मालिका घ्या. त्या प्रत्येकात त्या त्या नायक-नायिकेचं पूर्वायुष्य, त्या व्यक्तीच्या हिरो बनण्यामागच्या प्रेरणा, त्या व्यक्तीचा संघर्ष यांना पुरेसा वेळ दिला तरच नंतर त्या हिरोबद्दल आपल्याला ममत्त्व वाटते. पूर्वायुष्य जितकं ताकदवान तितकीच त्या नायकाबद्दलची सहानुभूती अधिक! इथे हा चित्रपट कॅप्टन मार्व्हल कशी अस्तित्वात आली ते सांगतो, पण कॅरोलच्या आयुष्यात, तिच्या संघर्षात, तिच्या सुख-दु:खात, तिच्या भावविश्वात पुरेसं डोकावतच नाही. त्यामुळे आपण चित्रपटगृहातून बाहेर पडताना कॅप्टन मार्व्हलच्या ताकदीची स्तुती करतो, पण जी आपुलकी आपल्याला मार्व्हलच्या इतर कोणत्याही अगदी दुय्यम पात्रांबद्दलसुद्धा वाटते, ती कॅप्टन मार्व्हलबद्दल वाटत नाही, हे चित्रपटाचं अपयश आहे. नि:संशय हा चित्रपट भरपूर पैसा कमावेल, पण तो चांगला चित्रपट म्हणून नव्हे तर मार्व्हलच्या आधीच्या सुमारे दिड डझन चित्रपटांची पुण्याई म्हणून! ती बाजूला काढली तर कॅप्टन मार्व्हल हा निव्वळ एका शक्तीशाली पात्रावर बेतलेला दुबळा चित्रपट बनून राहातो. मिड क्रेडिट सीनसुद्धा या चित्रपटापेक्षा ‘अँटमॅन अँड द वास्प’चा (२०१८) जास्त टिझिंग होता. थोडक्यात “एंडगेम”च्या उंबरठ्यावर प्रदर्शित होऊनही ‘कॅप्टन मार्व्हल’ कोणत्याच बाबतीत विशेष काहीही देत नाही!

    *२/५

    — © विक्रम श्रीराम एडके

    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • मृद्गंधी झुळूक : गीता-गोविंदम

    विजय गोविंद (विजय देवेरकोंडा) तरुण प्राध्यापक आहे. कॉलेजमध्ये, खासकरून मुलींमध्ये पॉप्युलर आहे. पण त्याला मात्र हवी आहे एखादी सुसंस्कृत आणि पारंपारिक ललना! तशी ती त्याला दिसतेसुद्धा, गीताच्या (रश्मिका मांदण्णा) रुपात. किती घासून घासून गुळगुळीत झालेली पार्श्वभूमी आहे नाही? क्लिषे अगदी! परंतु याच क्लिषेच्या पायावर उभा राहिलेला “गीता गोविंदम” नावाचा २ तास २८ मिनिटे लांबीचा चित्रपट तुम्हाला अक्षरशः एका क्षणासाठीही बोअर करत नाही!

    बॉलिवूडचा आणि त्यांचं अनुकरण करणाऱ्या मराठी इंडस्ट्रीचाही काही प्रमाणात ‘आधुनिकता म्हणजे कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळणं’ असा समज आहे. तमिळ इंडस्ट्री ही त्यांच्या वेगळ्या मांडणीसाठी ओळखली जाते तर मलयाळम इंडस्ट्री त्यांच्या वेगळ्या विषयांसाठी. परंतु तेलुगू इंडस्ट्री अशी आहे जी प्रेमकथा, कौटुंबिक मनोरंजन अश्या हल्ली दुर्मिळ होत चाललेल्या विषयांना पडद्यावर अतिशय सुरेखपणे मांडते. सिद्धार्थ आणि जेनेलियाचा “बोम्मारिल्लू” अथवा अल्लू अर्जुनचा “आर्या” पाहिलेले किंबहूना विजय देवेरकोंडाचाच “पेल्ली चुपूलू” पाहिलेले माझ्या मताशी सहजच सहमत होतील. अगदी त्याच रांगेत “गीता गोविंदम”सुद्धा येतो.

    सबंध चित्रपटभर नितळ विनोदाची पखरण आहे. परंपरेचा सन्मान आहे आणि कुटूंबाला प्राधान्य आहे. आणि तरीदेखील जागोजागी खटकेबाज ट्विट्ससुद्धा आहेत! बॉलिवूडवाल्यांची अडचण ही आहे की, ते ना धड भारतीय मुळं घट्ट धरून ठेवू शकताहेत ना त्यांच्या पाश्चात्यांकडे पसरवलेल्या फांद्यांवर फुलं उमलताहेत. याउलट दक्षिणेची मुळं भारतीय संस्कृतीत घट्ट आहेत. “गीता गोविंदम” पाहाताना ते पदोपदी जाणवतं. आणि तरीही आधुनिक हाताळणीमुळे तो आजच्या पिढीचाच चित्रपट वाटतो. याचे श्रेय लेखक आणि दिग्दर्शक परशुरामला दिलेच पाहिजे.

    गोपी सुंदर या संगीतकाराला तुम्ही ऐकलेय का? नसेल, तर तुम्ही एका खूप मोठ्या ठेव्याला मुकताहात. हिंदीतील तीच ती टेम्प्लेटछाप पंजाबी घुसडलेली किंवा बद्धकोष्ठ झाल्यासारख्या आवाजाच्या गायकांनी गायलेली किंवा जुन्या गाण्यांवर पाशवी अत्याचार केलेली गाणी ऐकून कंटाळला असाल, तर या सुरेल संगीतकाराच्या “चार्ली”, “बंगलोर डेज”, “उस्ताद हॉटेल” वगैरे एकाहून एक सुंदर चित्रपटांची गाणी ऐकाच. तशीच “गीता गोविंदम”ची गाणीसुद्धा ऐका. चित्रपट माध्यमाच्या चौकटीत राहूनही केवढं जिवंत संगीत तयार करता येतं याचा वस्तुपाठ आहेत ही गाणी. चित्रपटाच्या यशात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

    तसाच सिंहाचा वाटा आहे विजय देवेरकोंडाचा. फारशी मोठी पार्श्वभूमी नसलेल्या या पोराने गेल्या तीन वर्षांत “पेल्ली चुपूलू”, “अर्जुन रेड्डी” आणि हा असे तीन ब्लॉकबस्टर दिलेयत. त्याचा अभिनय अक्षरशः घायाळ करणारा आहे! आवडत्या मुलीला अप्रोच करताना झालेली एकच चूक कायमची भोगणाऱ्या परंतु मुळात सरळ स्वभावाच्या विजयची भूमिका त्याने कमालीची सुंदर साकारलीये. ‘कर्नाटका क्रश’ म्हटली जाणारी रश्मिकाही गीता म्हणून अप्रतिम भासते. “बाहूबली – द कन्क्लुजन”मधील कुमारवर्माच्या भूमिकेने आपल्याकडे प्रसिद्ध झालेला सुब्बाराजू त्याच्या भूमिकेत चपखल शोभतो. आणि तुमच्याकडे जर कौशल्य असेल तर भूमिकेची लांबी वगैरे गोष्टी अंधश्रद्धा असतात, हे वेन्नेला किशोर त्याच्या छोट्याशाच भूमिकेतून सहज सिद्ध करतो. पाहुण्या भूमिकेत का होईना, पण नित्या मेनन आणि अनु इमॅन्युएलला पाहून अतिशय छान वाटते. अवघ्या ५ कोटीत बनलेल्या या चित्रपटाने केव्हाच १०० कोटींचा आकडा ओलांडलाय. खरोखरीच “गीता गोविंदम” आजकालच्या विसविशीत कलाकृतींच्या काळात पुन्हापुन्हा अनुभवाव्याश्या मृद्गंधी झुळुकेसारखाच आहे!!

    — © विक्रम श्रीराम एडके

    *४/५