Author: Vikram Edke

  • तृप्त करून सोडणारे पक्वान्न — एजंट साई श्रीनिवास आत्रेय

    रॉबर्ट बोल्टन म्हणतो, “A belief is not merely an idea the mind possesses; it is an idea that possesses the mind”. आपल्या प्रत्येकाला रहस्यकथा वाचण्याची, त्या पडद्यावर घडताना पाहायची आवड असते. कित्येकदा तर पडद्यावर खरा खुनी कोण हे कळण्याच्या आतच आपण ते ओळखतो आणि मग नंतर मुख्य नायक आपलीच रीत वापरून जेव्हा ती केस सोडवतो, त्यावेळी एकाच वेळी आपल्याला आनंदही होतो आणि अभिमानही वाटतो. हीच गोष्ट जर लहानपणापासून घडत असेल, तर कोणत्या ना कोणत्या चोरट्या क्षणी आपणही गुप्तहेर व्हायचं ठरवूनच टाकलेलं असतं. पुढे शिक्षण, करिअरच्या धबडग्यात ते अर्थातच शक्य होत नाहीच म्हणा, पण ती फँटसी पहिल्या प्रेमासारखीच ह्रदयाच्या एका कुपीत सचेतन राहून जाते.

    बरं गुप्तहेर होण्याची जी आवड असते, ती नुसती अवघड आणि अचाट गुन्ह्यांचा थांग लावण्यापुरतीच नसते बरं का! त्या त्या गुप्तहेराची स्टाईल, त्याची बुद्धीमत्ता, हजरजबाबीपणा सगळं सगळं आपल्याला हवंहवंसं वाटत असतं. शेरलॉकचा पाईप, बॉण्डची मार्टिनी, मंकचे वाईप्स हे सगळे आपल्याला नकळतपणे आकर्षित करत असतात. पण खऱ्या गुप्तहेरांचं आयुष्य खरंच एवढं ग्लॅमरस असतं का हो? खून काही रोज घडत नाहीत. इतरवेळी गुप्तहेराचं पोट कसं चालावं? मग कुणाच्या जीवनसाथीवर पाळत ठेव, कुठे नवऱ्या मुलाची पार्श्वभूमीच काढून दे अशी बेचव पण जगवणारी कामं करावी लागतात. किंबहूना तेच मुख्य अन्न आणि मोठ्या केसेस सप्लिमेंटरी असतात खऱ्या गुप्तहेरांच्या आयुष्यात. पण अर्थातच वरलिया रंगा भुललेल्या आपल्याला याची काडीमात्र कल्पना नसते. असाच वास्तवाशी अनभिज्ञ गुप्तहेर आहे, साई श्रीनिवास आत्रेय (नवीन पोलिशेट्टी)! तो स्वतःला एजंट म्हणवतो. विविध रहस्यपटांचे रहस्य आधीच सोडवून दाखवण्याला यश मानतो. भारतात राहूनही ओव्हरकोट वगैरेसारखा तद्दन क्लिषेड पोशाख करतो. हॉलिवूडच्या हिरोची नक्कल करत कॉफीचा मग घेऊन वावरतो. थोडक्यात बाह्यांतरी सगळा आव आणतो. पण! या “पण”मध्येच गोची आहे. — पण त्याच्याकडे काम नाही! — पण तो हुशार, चाणाक्ष, चतुर असूनही त्याला वास्तवात पोलिस तपास आणि दुनियादारीची जरादेखील समज नाही. — पण त्याला लोकांच्या हरवलेल्या दुधाच्या पिशव्या शोधाव्या लागतात. — पण त्याचा सातत्याने अपमान होत राहातो! त्याची ही अतिशय खुमासदार, नर्मविनोदी कथा म्हणजे “एजंट साई श्रीनिवास आत्रेय” या तेलुगू चित्रपटाची सुरुवात!

    मी सुरुवात म्हणालो, संपूर्ण चित्रपट नाही. कारण जसजसा चित्रपट मुख्य विषयाकडे वळतो, तसतशा गोष्टी गहिऱ्या होत जातात. आत्रेयच्या गावी नेल्लोरला रेल्वेच्या रुळांजवळ सापडलेल्या एका बेवारस प्रेताची केस एकामागोमाग एक भयंकर वळणे घेत राहाते आणि आपली कथादेखील एका मागोमाग एक धक्के देत आंध्रप्रदेश, तमिळनाडू, गुजरात, राजस्थान अशी मोठ्या पटावर फिरू लागते. रहस्यांची गुंतागुंत आणि धक्क्यांची तीव्रता वाढू लागते व अखेरीस आपल्या हाती येतो तो किंचित संथ असा परंतु संपूर्ण समाधानी करून सोडणारा एक चित्रपटानुभव! गेल्या कित्येक वर्षांत तेलुगूत इतका चांगला गुप्तहेरपट झाला नसावा. किंबहूना भारतातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेरपटांच्या यादीत मानाचे स्थान मिळावे एवढी या चित्रपटाची योग्यता आहे.

    स्वरूप आर. एस. जे. चं दिग्दर्शन प्रभावी आहे. त्याने कथेतले खूप सारे ट्विस्ट्स कुठेही जडजंबालपणा येऊ न देता उत्कृष्ट हाताळले आहेत. नवीन पोलिशेट्टीचे काम मी पहिल्यांदाच पाहिले. हा तरुण अभिनेता जितक्या सहजपणे विनोद करतो, तितक्याच सहजतेने गंभीर दृश्येही साकारतो. असेच चित्रपट निवडत राहिल्यास त्याला निश्चितपणे उज्वल भविष्य आहे. असेच चित्रपट कशाला, या चित्रपटातच एवढी क्षमता आहे की, याचे स्वत:चेच एक सिनेमॅटिक युनिव्हर्स – आत्रेयव्हर्स बनू शकते. मला सर्वांत जास्त कोणती गोष्ट आवडली माहितीये? श्रृती शर्मा इतकी गोड दिसणारी, तितकंच छान काम करणारी नायिका आणि तिला भरपूर स्क्रिनटाईम असूनही कथेत कुठेच प्रेमकथेचा कोन घुसडण्याचा जरादेखील प्रयत्न केलेला नाही. पटकथेचा विषम वेग, किंबहूना काहीसा संथपणा, ही एकमेव त्रुटी सोडल्यास चित्रपट आपल्या उद्दीष्टाशी आणि कथानकाशी अखेरपर्यंत प्रामाणिक राहातो. तेलुगू प्रेक्षकांची सुजाणता अशी की, इतका वेगळा चित्रपट असूनही केवळ दिडच कोटीत बनलेल्या या चित्रपटाने तब्बल एकवीस कोटींचा व्यवसाय केलाय!

    अजून एक धक्का देऊ? चित्रपट पूर्णपणे काल्पनिक असला तरीही त्यांच्या कथेचा पाया हा खरोखर घडलेल्या घटनांवर आधारित आहे. चित्रपटाच्या शेवटी काही सेकंदांतच ते चित्रपटासाठी वापरलेल्या संदर्भांची दृश्यं दाखवतात, त्यावरून दिग्दर्शकाने इतक्या विविधांगी गोष्टी गोळा करून त्यांना एका धाग्यात बांधण्यासाठी केवढे कष्ट घेतलेयत यांची कल्पना येते. मी सुरुवातीला वापरलेले बोल्टनचे अवतरण शेवटी येते, तेव्हा त्याचा संदर्भ खूपच वेगळा, अगदी वैश्विक होऊन गेलेला असतो. आत्रेयची ही पहिलीवहिली मोठी केस त्याच्या वैयक्तिक आयुष्यालाही अगदी नैसर्गिकपणे स्पर्शून जाते, कसलीही घालघुसड, बळजबरीचा आव नाही त्यात. म्हणून तर वर म्हणालो ना की, “एजंट साई श्रीनिवास आत्रेय” हा अतिशय समाधानी करून सोडणारा चित्रपट आहे. बुद्धीला खाद्य, विचारांना चालना, नेहमीच्या घटनांचा दिसतो त्या पलिकडे अर्थ असण्याची शक्यता आणि भावनेला स्पर्श हे जर तुमचे आवडते उद्योग असतील, चित्रपट जर तुम्ही निव्वळ टाईमपासपेक्षा अडिच तास सार्थकी लावल्याच्या तृप्ततेसाठी पाहात असाल, तर मनापासून सांगतो, “एजंट साई श्रीनिवास आत्रेय” हा तुमचा चित्रपट आहे. तो गुप्तहेरपटांचे प्रहसन तर करतोच, परंतु त्याच्या पलिकडेही खूप काही देऊन समृद्ध करून जातो!

    *४/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    [अन्य लेखांसाठी पाहा www.vikramedke.com]

    टीप: चित्रपट Amazon Prime Video वर उपलब्ध आहे.

  • स्ट्रगलपलिकडचा स्ट्रगलर – पारसमणी ‘पीटर डिंक्लेज’

    स्ट्रगल हा प्रकार म्हटलं तर रोमँटिक असतो, म्हटलं तर अजिबातच नसतो. असतो यासाठी की, यश मिळाल्यावर स्ट्रगल सांगायला आणि ऐकायला, दोन्हींमध्ये मजा येते. आणि नसतो यासाठी की, स्ट्रगल सुरू असताना तो करणाऱ्याला रोमँटिक वगैरे तर सोडाच परंतु अनेकदा हॉररच वाटत असतं. त्याचा स्ट्रगलही असाच, चारचौघांसारखा. आत्ता वाचताना भावनोत्तेजनेने अंगावर काटा आणणारा, पण त्यावेळी त्याच्या फ्लॅटमध्ये हिटर नसल्यामुळे खरोखरीच अंगावर शहारे आणणारा. प्रत्येक स्ट्रगलर करतो तशीच त्याने पोटाची खळगी भरण्यापुरती बरीचशी कामे केली; कुणाचा पियानो साफ करून दे, कुठे फोन ऑपरेटर म्हणून काम कर वगैरै!

    स्ट्रगल तर सगळेच करतात, पण सगळेच स्ट्रगलर्स काही यशस्वी होत नाहीत. कारण, स्वप्नं सगळेच पाहातात, पण ती पूर्ण होण्यासाठी लागणारं परिश्रमांचं इंधन आणि ते जहाज चालू लागण्यासाठी लागणारं नशिबाचं वारं, हा योग सगळ्यांच्याच आयुष्यात नसतो. याच्या बाबतीत गोष्टी अजूनच अवघड होत्या, कारण याची उंची! उंची म्हणण्यापेक्षा, उंचीचा अभाव. तो केवळ साडेचार फुटांचाच होता, किंबहूना आहे. त्यामुळे याला सगळ्या भूमिका तशाच चालून यायच्या, बुटक्यांबाबत झापडबंद विचार करणाऱ्या! हा मानी, त्यामुळे नेमकं तेच तर याला नको होतं. होता होईल तितकं नाकारलंही त्याने, पण अनेक वर्षे रोजच बटाट्याचे वेफर्स रात्रीचं जेवण म्हणून खाणाऱ्याला फारसा चॉईस देत नाही ही चंदेरी दुनिया नावाची जखिण!

    नाटक या विषयावर त्याचं प्रचंड प्रेम. त्याच्याकडे नाट्यशास्त्राची पदवीदेखील आहे. तो आणि त्याच्या एका मित्राने मिळून विल्यम्सन पुलाजवळ एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. हाच तो हिटर नसलेला फ्लॅट. त्यातल्या ओव्हनमध्ये उंदीर पोटभाडेकरूसारखे राहायचे. एकदा तक्रार केली, तर मालक सुरी उगारून अंगावर आला होता म्हणे! अशा परिस्थितीत त्यांच्या तासनतास नाटकांच्या योजना चालायच्या. पण व्यावसायिक नाटकंच नव्हे, तर हे जग नावाचं महानाट्यही एकाच गोष्टीवर चालतं, ती म्हणजे पैसा! नाटकांच्या योजनेसाठी पॅशन पुरते, फ्लॅटच्या भाड्यासाठी खरेखुरे पैसेच लागतात ना! एके दिवशी घरी परतले, तर दरवाज्याला मालकाने घातलेलं भलंमोठ्ठं कुलुप होतं.

    त्याला कामं मिळालीच नाहीत असं नाही. १९९५ पासून चित्रपट मिळत होतेच. पण स्मरणीय काही मिळायला २००३ सालचा “द स्टेशन एजंट” उजाडावा लागला. त्यानंतरही त्याचं नाव फार गाजू लागलं अशातलाही भाग नाही. गाडी चालू लागली, एवढंच. स्ट्रगल संपलं, पण यश मात्र दूर; हा काळ स्ट्रगलपेक्षाही दसपट अवघड असतो. कारण, आता सोबतीला स्ट्रगल करण्याइतका बेबंद नवखेपणा नसतो आणि यशाची चव ऐकूनही माहिती नसते. बरेचसे लोक संपतात ते याच स्ट्रगलनंतरच्या स्ट्रगलमध्ये. हा सुद्धा संपलाच असता. पण तशात त्याला एक भूमिका मिळाली. बुटक्याचीच भूमिका. पण चौकटबद्ध नव्हे, अक्षरशः लाखो पैलू असणारी! मालिकेचं नाव होतं “गेम ऑफ थ्रोन्स” आणि भूमिकेचं नाव होतं टिरियन लॅनिस्टर!!

    याने तिच्यात असा काही जीव ओतला की, “गेम ऑफ थ्रोन्स”च्या महाभारतातला श्रीकृष्ण कुणी असेल, तर तो हाच! त्याची भूमिका राखाडी कंगोऱ्यांची होती, पण त्या मालिकेचं वैशिष्ट्य असलेल्या स्वार्थीपणाच्या पल्याड जाऊ पाहाणारीसुद्धा होती. बुटकेपणामुळे आलेली सारी अवहेलना, अपमान त्याने टिरियनच्या डोळ्यांत उतरवला आणि प्रेक्षक व समीक्षकांनी एकमुखाने डोक्यावर घेतल्यामुळे हा अभिनेता सगळ्यांहून जास्त उंच ठरला! पहिल्या फ्रेमपासून ते शेवटच्या फ्रेमपर्यंत त्याने टिरियनचं केवळ आणि केवळ सोनंच केलं, नंतरच्या काळात शोरनर्सनी माती करण्यात काहीच कसर सोडलेली नसताना!!

    कालच त्याचा एक्कावन्नावा वाढदिवस झाला. मात्र मी अद्याप त्याचे नावच सांगितलेले नाही. कर्तृत्ववान माणसाला वेगळ्या ओळखीची काय गरज? मी न सांगताही तो पीटर डिंक्लेज असल्याचे आपण केव्हाच ओळखले असेल. काल त्याने वयाची पन्नाशी पार केली. पण खरं सांगू, त्याचं स्ट्रगलपलिकडचं स्ट्रगल अद्याप संपलंय असं मला वाटत नाही. कारण “जीओटी” ही आयुष्यात एकदाच घडू शकणारी गोष्ट आहे, ती सतत होत नसते. त्याच्या प्रतिभेची उंची कवेत घेऊ शकणाऱ्या भूमिका मिळणं खरोखरीच दुरापास्त आहे. वॉकिन फिनिक्सने “जोकर”ची पार्श्वभूमी जशी उत्कट साकारली, तशीच हीथ लेजरने “जोकर”ची तिरपागडी शैली अजरामर करून सोडली. माझं वैयक्तिक मत सांगू? “जोकर”ची भूमिका दिल्यास पीटर डिंक्लेज त्याचं कारुण्य आणि बीभत्सपणा, दोन्हीही एकाच वेळी साकारून दाखवू शकतो. पीटर डिंक्लेजला अशा भूमिका मिळत गेल्या, तरच त्याच्या स्ट्रगलपलिकडचा स्ट्रगल खऱ्या अर्थाने संपू शकेल. मात्र तोपर्यंत आणि त्यानंतरही हा पारसमणी येणाऱ्या प्रत्येक भूमिकेचे सोनेच करत राहिल, यात कसलीच शंका नाही!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

  • ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिटेक्टिव्हची गोष्ट — मंक

    मनोव्यापार हे असं गूढ आहे, जे जितकं सोडवू जाल तितकं जास्त भुलवतं. आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या वळणावर लहान किंवा मोठ्या स्वरूपाच्या मानसशास्त्रीय विकाराला सामोरं जावंच लागतं. त्या खेरीज आपण रोजच्या आयुष्यातही कित्येक प्रकारचे गंड, भिती वगैरे घेऊनच जगत असतो. पण जर एखाद्याला ३१२ प्रकारचे भयगंड असतील तर? त्याने काय करावं? कोणता व्यवसाय करावा? आणि भयगंड तरी कसले तर जंतू, टोकदार वस्तू, उंची, कोंदट जागा, अळिंबी, सुया, मृत्यू, साप, वीज, गर्दी, विमाने, मुंग्या, लहान बाळं, पक्षी, माश्या, पांघरूण, जहाज, पूल, मांजरं, गुहा, खडू, बदल, डांबर, ढग, खोकला, विदुषक, कुरळे केस, अंधार, डिकॅफ, वाळवंट, घाण, कुत्रे, ड्रायर, खेळणी, अंड्याचा बलक, आग, विदेश, फ्रेंच सिनेमा, बेडूक, जिराफ, हिमनग, जंगल, खाकी, चुंबन, किवीचे फळ, शिडी, ढेकूण, कुष्ठरोग, २२१ किंवा २२३ आकड्यांनी संपणाऱ्या याद्या, निसर्ग, उंदरं, माकडं, मेड इन चायनाचे लेबल्स, नवीन जागा, नग्नता, फोन बुथ, औषधं, प्रश्न, बाहूल्या, सभा, गर्दी, ससे, नद्या, खारे शेंगदाणे, बिनबाह्यांचे शर्ट, टॅक्सी, स्पर्श, रेल्वे, झाडं, ट्रक, बोगदे, अंतर्वस्त्रे, वारा, झेब्रा, प्राणिसंग्रहालये इ. इ. तुम्ही कदाचित म्हणाल की, अशा माणसाने तर काही व्यवसाय करण्यापेक्षा स्वतःला आयुष्यभर एखाद्या खोलीतच कोंडून घेतले पाहिजे. जो माणूस दुधालाही घाबरतो, तो माणूस काय करणार आयुष्यात? तर श्वास रोखून धरा, हा माणूस आहे एड्रियन मंक (टोनी शॅलूब). जगातील सर्वश्रेष्ठ डिटेक्टिव्ह आणि “मंक” (२००२-२००९) या टिव्ही मालिकेचा नायक!

    जगातल्या बहुतांशी गोष्टींना घाबरणारा, तऱ्हेतऱ्हेचे ओसीडीज असणारा आणि तरीही जगातील सर्वश्रेष्ठ डिटेक्टिव्ह, ही कल्पनाच इतकी अफाट आहे की, नुसत्या तेवढ्याच भांडवलावर मी ही मालिका पाहायला सुरुवात केली होती. परंतु लवकरच माझी खात्री पटली की, ही भन्नाट कल्पना त्या कल्पनेच्या कल्पनेपलिकडे फुलवण्यात मालिकाकार कल्पनातीत यशस्वी झालेयत! “मंक” केवळ नेहमीसारखा प्रोसिजरल ड्रामाच नाहीये, तर त्याहून खूप जास्त आहे.

    एड्रियन मंक एकेकाळी पोलिस अधिकारी होता. त्याही काळात त्याला या सगळ्या प्रकारचे भयगंड होतेच, पण त्यांचं प्रमाण बरंचसं कमी होतं. मात्र एके दिवशी मंकला समजून घेणारी त्याच्या आयुष्यातील एकमेव व्यक्ती, त्याची प्राणप्रिय बायको ट्रूडी कालवश होते आणि मंकचे सारेच गंड कळस गाठतात. वर्षांमागून वर्षं तो नैराश्य आणि विस्मृतीच्या गर्तेत घालवतो. पण एखादा बृहस्पती असा किती काळ राहू शकणार? मंकचा मित्र आणि पोलिस अधिकारी कॅ. लीलंड स्टॉटलमायरच्या (टेड लिव्हाईन) सांगण्यावरून मंक कन्सल्टंट म्हणून पोलिसांना वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या तपासासाठी मदत करायला तयार होतो. अर्थात भीतभीतच. त्याला पदोपदी त्याची नर्स व मदतनीस शॅरोनाची (बिट्टी श्रॅम) मदत लागत असते. आणि अशाप्रकारे मंकचं एक नवंच आयुष्य सुरू होतं. समोर असलेल्या घटनास्थळातून तो त्याच्या अचाट निरीक्षणशक्तीच्या, अफाट आकलनशक्तीच्या आणि असीम प्रतिभेच्या बळावर असे काही धागे शोधून काढत असतो, की कोणताही गुन्हा हा त्याच्यापासून कोडे राहूच शकत नाही.

    वरचं वाक्य वाचून तुम्हाला आपसूकच वाटेल की, “मंक” शेरलॉक होम्सवरून तर प्रेरित नसेल? मालिकेने ही बाब कधीच लपवून ठेवलेली नाही. उलट शक्य तितक्या वेळा मालिका होम्सचे रेफरन्स देत असते. किंबहूना मूळ संहितेत मंकचे वर्णनच “शेरलॉक होम्स, पण सटकलेला” असे केलेय! मंकचा भाऊ अॅम्ब्रोजचे (जॉन टर्टुरो) पात्रदेखील मायक्रॉफ्टवरच बेतलेले आहे. परंतु ही साम्यस्थळे इथेच संपतात. होम्स जरासा तिरसट असला, तरीही निडर आहे. मंक मात्र जगातील जवळपास प्रत्येक गोष्टीला घाबरतो. होम्स गरज पडली तर दोन फटके खाऊ शकतो आणि चार देऊ शकतो, मंकला हे कधीच जमणारे नाही. होम्सला व्यसनं आहेत, मंकला कशाचेच व्यसन नाही. मंकच्या कथेचं मूळ शोकारंभी आहे. शोकारंभी कथा, अवसादग्रस्त नायक आणि प्रोसिजरल ड्रामा, विचार करा मालिका किती गंभीर असायला हवी. या गोष्टींत जर, मंक जगातील प्रत्येक गुन्ह्याचा माग लावू शकतो परंतु बायकोच्या खुन्याचा शोध तो अद्याप घेऊच शकलेला नाही या बाबीची भर टाकली, तर दु:खाची किनार अजूनच गडद होते. “मंक” या सगळ्याच गोष्टी अतिशय ठळकपणे आणि तितक्याच प्रामाणिकपणे मांडते. “मंक”मधील गुन्हे गंभीर आहेत, त्यांचा तपासही प्रामाणिकपणे चालतो. मंक सातत्याने ट्रूडीबद्दल भरभरून बोलत असतो, तिच्या आठवणींनी हळवा होत असतो. आता धक्का देऊ? श्वास रोखून धरा, “मंक” ही एक सिटकॉम आहे! होय, मंक ही एक विनोदी मालिका आहे! फक्त ती किंचित जुनी असल्यामुळे त्यांचा विनोद आजकालच्या पुरोगामी स्टँडअप कमेडियन्ससारखा ओढूनताणून आणलेला नाहीये, तर अतिशय नैसर्गिक आहे!

    डिटेक्टिव्ह मालिकांसाठी सगळ्यांत मोठा सापळा जर कोणता असेल, तर तो म्हणजे प्रेक्षकांनी खुनी कोण ते आधीच ओळखणे. हे एकदा-दोनदा जरी झालं तरी लोकांचा रस संपण्याची शक्यता असते. “मंक” मला आवडण्याचं एक अतिशय महत्त्वाचं कारण हे की, त्यांनी हा प्रकारच ठेवलेला नाही. त्यांचे बहुतांशी भाग खुनी कोण, ते सुरुवातीलाच दाखवून टाकतात. चातुर्याची बाब हीच की, त्यांचा ढाचा “हू-डनिट” नाहीच आहे. ते कुणीही ओळखेल, हे माहितीये त्यांना. ते प्रेक्षकांना प्रत्येकवेळी “हाऊ-डनिट” आणि “व्हाय-डनिट” याच दोन मुद्यांवर खेळवतात आणि अतिशय यशस्वीपणे खेळवतात! एकतर सिटकॉम, त्यात हा फॉर्मॅट-ट्विस्ट “मंक”ला इतर प्रोसिजरल ड्रामांपासून वेगळ्याच श्रेणीत नेऊन बसवतो! ट्विस्टचाच विषय असेल, तर प्रत्येक भागाच्या शेवटी मंक जेव्हा खून नेमका कसा झाला ते विशद करतो, ज्याला मंकव्हर्समध्ये “हिअर इज व्हॉट हॅपण्ड” म्हणतात, त्यात बहुतांशी वेळा वेगवेगळ्या कथनशैली वापरूने ते अधिकच रंजक करण्यात मालिका एवढी यशस्वी झालीये की, ज्याचे नाव ते!!

    तुलनाच करायची झाली, तर शेरलॉक होम्समध्ये शेल्डनची (द बिग बँग थियरी) बुद्धिमत्ता, शेल्डनचे गंड, शेल्डनचा गरजेपेक्षा जास्त नीटसपणा अधिक हॅरल्डची (पर्सन ऑफ इंटरेस्ट) आकलनशक्ती आणि हॅरल्डचे दु:ख मिसळले तर काहीसा मंक तयार होऊ शकतो. पण त्याच्यात शेल्डनच्या स्वभावात नकळतपणे असलेला स्वार्थ नाही आणि हॅरल्डसारखी दुनियादारीची समजदेखील नाही. मंक या सगळ्यांपेक्षा वेगळाच किंबहूना खरोखर एकमेव आहे. एकमेव आहे, म्हणूनच एकटादेखील आहे. त्याच्या भयगंडांमुळे मालिकेत त्याचा वारंवार अपमान होतो. इतका की, अक्षरशः बघवत नाही. त्याला साध्यासाध्या गोष्टीही करणे जमत नाही. पण शेल्डनचा जितक्या वेळा राग येतो, तितक्या वेळा मंकचा राग येत नाही. उलट जास्तीत जास्त वेळा निर्मळ मनाच्या मंकबद्दल सहानुभूतीच वाटत राहाते. किंबहूना शेल्डनचेच पात्र कालानुक्रमे “मंक”मधून उचलले असण्याचीच जास्त शक्यता वाटते.

    “मंक” प्रसंगोपात एड्रियनचे पूर्वायुष्यदेखील उलगडते. त्याला रूढार्थाने मित्र नाहीतच. त्याची स्थिती पाहाता, असूही शकत नाहीत. पण त्याच्या जवळचे लोक त्याच्यासाठी खरोखर जीव टाकतात. स्टॉटलमायर, ल्युटेनंट रँडी डिशर (जेसन ग्रे-स्टॅन्फर्ड), शॅरोना, शॅरोनाचा मुलगा बेंजी हे सगळेच मंकचा तिरसटपणा, तुसडेपणा सहन करतात, त्याला समजून घेतात. लेखनातील गंमत म्हणजे, मंक त्याच्या स्वभावानुसार कुणालाच, अगदी कुणा अपराध्यालादेखील चतुराईपूर्ण उलट उत्तरं देऊ शकत नाही. ते काम मंकसाठी बरेचदा स्टॉटलमायर करतो. तो मंकपेक्षा खूपच कमी हुशार परंतु अतिशय अनुभवी माणूस आहे. तो मंकचा मोठा भाऊ असल्यासारखा त्याला सांभाळून घेतो. मालिकेतील ब्रेन जर मंक असेल, तर मसल स्टॉटलमायर आहे. डिशर हा मेहनती, परंतु अद्याप अनुभवाची शिदोरी गाठिशी जमा न झालेला असा किंचित मंद अधिकारी आहे. तो कामाचा आहे, परंतु त्याचा निर्बुद्धपणा आणि चंचलपणा बरेचदा विनोदाचे कारण बनतात. या दोघांचाही पात्रपरिपोष जितका चांगला केला गेलाय, तितकेच जबरदस्त या दोघा कलाकारांचे कामही झालेय. टेड लिव्हाईन हा दिसायला सुरेश ऑबेरॉयसारखा दिसतो, असे मला उगाचच सातत्याने वाटत राहाते! मंकचं मानसशास्त्र उलगडण्यात, त्याला बोलतं करण्यात सगळ्यांत महत्त्वाची भूमिका बजावतो तो त्याचा मानसोपचारतज्ञ डॉ. चार्ल्स क्रोगर (स्टॅन्ली कामेल). त्या दोघांची केमिस्ट्री वेगळीच जमलीये. आणि टोनी शॅलूब! त्याच्याबद्दल काय बोलू या लेखासारखे अजून पन्नास लेख जरी लिहिले तरी त्याने मंकचे पात्र ज्या प्रतिभेने मांडलेय, ते एक टक्काही समजावून सांगता नाही येणार. त्याचं काम ही पाहाण्याचीच गोष्ट आहे. आनंदाचा ठेवा आहे तो खरोखर!

    एकदा का पात्रांची आणि कलाकारांची भट्टी जमून आली की, कुणा एकाचेही जाणे सबंध मालिकेलाच मारक ठरू शकते. “मंक”मध्येही जेव्हा शॅरोनाची भूमिका करणारी बिट्टी श्रॅम मालिका सोडून गेली, तेव्हा अशीच वेळ आली होती. हा मालिकेचा स्खलनबिंदू ठरू शकला असता. कारण, तिने शॅरोनाची भूमिका एवढी सुंदर वठवलीये की, तिच्या जागी दुसऱ्या कुणाला स्वीकारायची कल्पनाही सहन होत नव्हती. परंतु मंकची नवी असिस्टंट नॅटली टीगरच्या भूमिकेत ट्रेलर हॉवर्ड आली आणि माझे मतच बदलून गेले. शॅरोनाच्या पात्रातील सगळ्याच त्रुटी तिने भरून काढल्या आणि वेगळीच उंची गाठली. शॅरोना जराशी डॅम्सेल इन डिस्ट्रेस होती, नॅटली अतिशय कणखर आहे. शॅरोना मंकला एखादी गोष्ट करायला फार जबरदस्ती करत नसायची, नॅटली बरोब्बर रागावून मंकला ताब्यात ठेवते. तिची मुलगी ज्युलीसुद्धा (एमी क्लार्क) कमाल पात्र आहे. असंच त्यांचं जेफ बिलने बनवलेलं सर्वांगसुंदर थीम म्युझिकही (माझी सध्याची रिंगटोन!) त्यांनी नंतरच्या सीझन्समध्ये रँडी न्यूमनच्या “इट्स अ जंगल आऊट देअर” गाण्याने रिप्लेस केलं, तेव्हा आवडलं नव्हतं. हळूहळू ते गाणं मला आवडू लागलं. गंमत म्हणजे, मालिका सुरू असतानाही प्रेक्षकांच्या शॅरोना आणि गाण्याच्या रिप्लेसमेंटबद्दल सुरुवातीला नेमक्या याच भावना असाव्यात कारण, एका भागात (२/१२) मालिकाकारांनी या बदललेल्या गाण्याचा आडूनआडून मोठ्या खुबीने उल्लेख केलाय! परिवर्तन जरी संसाराचा नियम असला, तरी आपल्या प्रत्येकातच बदलाला घाबरणारा एक मंक दडलाय बहुतेक!

    हाच तर खरा मुद्दा आहे. मंक गटात न बसणारा आहे. सगळ्यांहून वेगळा आहे. पण कोणत्या ना कोणत्या पातळीवर आपण सगळेच तसे नसतो का? आपणही काही बाबतींत तिरसट असतो, तुसडे असतो, हट्टी असतो, दुराग्रही असतो. थोडक्यात, कोणत्या ना कोणत्या स्तरावर आपण प्रत्येकजण मंकच असतो! इतके जगावेगळे पात्र, परंतु एका पातळीवर ती आपल्याच आयुष्यातील गोष्ट वाटू लागते, मला वाटतं की “मंक” मालिकेचे हेच सगळ्यांत मोठे यश आहे. तेव्हा जगभरातील, विशेषतः भारतातील ओटिटी प्लॅटफॉर्म्सवरील प्रोपगेण्डाछाप मालिकांना कंटाळला असाल आणि काहीतरी खरोखरीचे चांगले, सशक्त व सकस पाहायचे असेल, तर “मंक”सारखी मालिकाच नाही!

    *५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    [अन्य लेख वाचण्यासाठी पाहा

    www.vikramedke.com]

  • WW3 Review – This Silliness Hurts The Most

    #Major_Spoilers_Ahead

    Jonathan Nolan, like his brother Christopher Nolan is a maverick. He did the same on small screens what his brother did on big screen, that is redefining the medium. He is known for his subtle, twisty, high-on-cinematic-techniques tales that continuously play with the dimension of Time. He upped the game with each season of his underrated gem Person of Interest and managed to pull the same feat with first two seasons of Westworld. The problems arose when the third season released. Here’s a small list.

    1) Departure from subtlety:
    If there’s one synonym for the Nolan brothers, it has to be subtlety. The way Westworld’s earlier seasons said without saying much and sometimes without saying anything at all, are still a delight for mind and soul. But this season showed a departure from that precious virtue. I’ll give you an example. A bomb explodes in the car killing Charlotte Hale’s family. The very next scene shows Hale rising from the ashes, furious and vengeful. As powerful as it is, it’s not the Nolan’s way. Because this direct approach takes away the punch of the scene where in the middle of a gunfight Hale confronts Dolores. There are so many such instances. Like at the very first scene of Caleb where he talks with Francis the first time, we easily guess that Francis is dead and perhaps by the hands of Caleb only. I liked the post-credit scene for its subtlety though, where Bernard shuts down and later wakes up only to be seen covered in dust, hinting that so many years (or months atleast) have passed.

    2) Straightforward story:
    Casual viewers watch a film or series for their stories from point A to point D via B & C. Not Nolans’ devoted audience. They watch to let their mind to be blown and soul to be crushed with twisted timelines and non-linear storytelling. They watch for the hollowness it creates in their life after it ends. They watch only to question their own existence. Westworld’s earlier two seasons did the trick, but unfortunately not this. The story this time is straight like an arrow and however loaded it was, it always feels like there was a room for betterment. This is the first for a Nolan series and that’s why this silliness is hurting the most.

    3) No element of surprise:
    Whatever be the story, a Nolan always keep hidden one or two arrows of surprise in his quiver only to pierce us at the last moment. They hid a few surprises in this season too, but they don’t hit you hard. Why? Because all these surprises were marred by the swarm of hints. For example, various characters question so many times in various scenes that why Dolores reprinted Bernard that even before Serac starts searching the Key to the sublime in Dolores, we know that the Key must be with Bernard. This lessens the cumulative punch of the series.

    4) Failing to reinvent:
    Reinvention is an underlying theme in each season of Westworld. In the first season everything was a surprise, including the park. In the second season, though it was again confined to the park with the same characters, almost all the characters’ core nature was changed and the surprise element remained intact. It provided utmost attention to character development and creating emotional backstories like Kiksuya that even after knowing they are but the Robots, we cared for them. This season has literally thrown the character development out of the show. There’re tragic backstories but they weren’t rooted in the core. So even if Hector, the love of Maeve’s life dies a sad death, it fails to move us the way it did in earlier seasons. Same happens when Dolores kills herself and Maeve with EMP, for we know that they would be back. In POI too they used two warring AI’s but they treated the theme so well that those seem to be real characters of the show, even without any vocal dialogues. Here Rehoboam and Solomon, for all the power they had, seemed too much passive and kind of lame. Lame, as if the devil Samaritan and the good Machine would eat them for breakfast. Motivations of other characters too seem to be random and won’t take the things forward as they should. The only scene gave me goosebumps was when Caleb tries to protect the Host girls from his friends and later they show Dolores among them. Predictable, but powerful. Serac’s backstory sounds directionless though with too much hangover of the narrative style of POI.

    5) Erroneous settings:
    Nolans always mean pure logic. But sadly not this time. Dolores claims that she chose Caleb for several reasons, but in reality their first meeting (technically second) where he inadvertently finds a wounded Dolores in an alley, was pure chance. She didn’t even know his name at that time and that is why she asks her virtual assistant to get information on him once he tells her his name. This is a huge error, which could have been easily avoided. There are other such small loopholes too.

    Williams character too is entirely pointless, drag and crazy; almost like this whole Season 3. This means, he is still the soul of the show, but in a very bad way. The similarities won’t end there, because at the end he is killed and replaced by a replica, sadly just like the show. Part of my mind says, this season is kind of letdown because D&D are attached with it. But part of me knows that, it’s not the case. It is a bit disappointing because of the hurried writing and sloppy direction. I’m not saying it was bad. For all its mistakes, it is still better than many of the other serieses, most certainly better than the last season of GoT. But as a Nolan fan, I’m not used to a compromised product, however slightly it may be. So it’s a great show, with an unsatisfying season, that’s it. Anyway, however unsatisfying the season is, Ramin Djawadi has simply outdone himself. His music was fab, is fab and will certainly remain fab. He is to Jonathan, what Rahman is to Mani and Hans is to Christopher, simply amazing and divine. Looking forward to the 4th Season now.

    — © Vikram Edke
    [For other articles, visit www.vikramedke.com]

    Westworld #Christopher_Nolan #Jonathan_Nolan #Nolan_Brothers

  • नोलनबंधूंच्या बाबत

    ख्रिस्तोफ़र नोलनच्या चित्रपटांचं आणि त्याच्या भावाच्या अर्थात जोनाथन नोलनच्या मालिकांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अरेषीय कथन. हे सगळ्यांना माहिती आहे. पण या तंत्राच्या दृक्परिणामाकडे क्वचितच कुणी लक्ष देतं.

    समजा एखादी कथा ‘अ’ पासून सुरू होते आणि ‘ड’ पाशी संपते. तर ती सरळ गेली काय किंवा नागमोडी गेली काय, मध्ये ‘ब’ आणि मग ‘क’ हाच क्रम येणार. त्यात किती वळणं आहेत, यावरून त्या कथेची रंजकता ठरत असते. पण जर कुणी डोकेबाज माणूस असेल, तर त्याला ‘अ’ ठाऊक झाल्यावर तो बाकीचे तिन्ही टप्पे सहज सांगू शकतो. याने कथेचं आयुष्य कमी होऊ शकतं. नोलनबंधू यासाठी काय करतात? त्यांची कथा ‘ब’ पासून सुरू होते. मग ती ‘ड’ कडे जाते. मग ‘अ’ येतो आणि मग ‘क’. आणि हे याच क्रमाने होईल याची काहीच खात्री नाही. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, हे टप्पे कथेत एकेकदाच येतील, याचीही काहीच खात्री नाही. त्यामुळे त्यांचे चित्रपट व मालिका हे आपल्याला नेहमीपेक्षा जास्त लक्ष घालायला लावतात. त्यांच्या कथा नेहमीच कमाल असतातच असं नाही, पण त्यांचं कथन हे नेहमीच प्रेक्षकांना नेहमीपेक्षा जास्त गुंतवणूक करायला लावणारं आणि म्हणूनच जास्त कमाल असतं.

    या बाबतीत त्यांची तुलना फक्त आणि फक्त ए. आर. रहमानशीच होऊ शकते. रहमानच्या पूर्वी गाण्याचा क्रम ठरलेला असायचा. मुखडा आणि दोन किंवा तीन अंतरे. रहमानने सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट कोणती केली असेल, तर त्याने हा नियम मोडून फेकून दिला. त्याने मुखडा-अंतरा हा भेद पुसून टाकला आणि गाण्याचं काव्य केलं. मुक्तछंदातलं काव्य! रहमानचं गाणं कोणतं वळण घेईल हे फारच पक्का रहमानियन असल्याशिवाय सांगताच येत नाही. आणि त्या रहमानियन व्यक्तीलाही गाण्याकडे इतरांच्या गाण्यापेक्षा जास्त लक्ष द्यावं लागतं. म्हणजेच रहमान गाण्यामध्ये श्रोत्यांना नोलनबंधूंप्रमाणेच जास्त गुंतवणूक करायला भाग पाडतो. हेच कारण आहे की, या दशकात बरेचसे कॅज्युअल लिसनर्स रहमानला सोडून गेले. रहमान काही जगात सर्वश्रेष्ठ चाली करणारा संगीतकार आहे का? मी रहमानचा अतिशय मोठा चाहता असूनही सांगतो की, या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर आहे, नाही! रहमान शंभरातील नव्वद वेळा दैवी चाली करतो, पण नेहमीच नाही. रहमानपेक्षा अनेक पटींनी चांगल्या चाली करणाऱ्या पाच-दहा संगीतकारांची नावं मी सहज सांगू शकेन. रहमानचं वैशिष्ट्य आहे त्याच्या सादरीकरणात, अर्थात एक्झिक्युशनमध्ये! साधीशीच चाल, पण रहमान तिच्यावर ध्वनि आणि तंत्रज्ञानाच्या अपूर्व ज्ञानाची अशी पटलं चढवतो की गाण्याचे रूपच बदलून जाते. ध्वनिचं त्याचं ज्ञान एवढं कमाल आहे की, जणू काही त्याला ध्वनि दिसत असावा! कोणत्या ध्वनितून ऐकणाऱ्याच्या मनात कोणती भावना निर्माण करायची, याचं त्याला असलेलं ज्ञान अतुलनीय आहे.

    नेमकी अशीच पटलं नोलनबंधू त्यांच्या कथांवर चढवतात. लोकांनी त्यांच्यात गुंतावं याची काळजी घेतानाच रहमान आणि नोलनबंधू आपापल्या कलाविषयाला अजून एक पैलू देतात. कोणता? रहमानचं वर्णन जर एकाच शब्दात करायचं झालं तर मी त्याला म्हणेन, अन्प्रेडिक्टेबल! त्याच्या अल्बमवरून, गाण्याच्या शीर्षकावरून, जॉनरवरून आपण एक अपेक्षा करतो आणि रहमान प्रत्येकवेळी दुसरेच काहीतरी देतो. आणि मग गाणे पचले की आपल्याला समजू लागते, हेच त्या भावनेसाठी, त्या प्रसंगासाठी परफेक्ट होते. नोलनबंधूंचे वर्णनही याच विशेषणाने करता येईल. याचं सगळ्यांत मोठं उदाहरण म्हणजे ‘डंकर्क’ (२०१७). लोकांनी वॉरमुव्हीची अपेक्षा केली होती आणि नोलनने त्याच जॉनरमध्ये राहून, काळाशी खेळ करत एक सर्व्हायव्हल मुव्ही बनवून दाखवली. त्यांच्या या अन्प्रेडिक्टिबिलिटीमुळेच कथेचा अरेषीय प्रवास जास्त रंजक होतो आणि आपल्याला जास्त ओढून घेणारा ठरतो. इथे एक लक्षात घ्या, अरेषीय कथन हे भुसुरूंगांवरून चालण्यासारखे असते. नीट पोहोचलात तर त्याच्यासारखा आनंद नाही. पण एक जरी पाऊल चुकले, तर उडालाच! नोलनबंधू गेली दोन दशकं आपल्याला सुखरूप पोहोचवताहेत. असं ट्रॅकरेकॉर्ड कुणाचंच नाही.

    आणखी एक गोष्ट नोलनबंधूंच्या कलाकृतींचा अविभाज्य भाग असते. त्याला म्हणतात ‘इन मेडियास रेस’. म्हणजे काय तर वर म्हटल्याप्रमाणे त्यांची कथा ‘अ’ बिंदूशी सुरू न होता ‘ब’, ‘क’ किंवा ‘ड’ यांच्यापैकी कुठेही सुरू होऊ शकते. ‘इन मेडियास रेस’ म्हणजे मध्येच कुठेतरी अशा बिंदूला कथा सुरू करणे की, ज्या बिंदूच्या आधी कथेशी संबंधित बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या असतात, ज्या कलात्मक कारणांसाठी नंतरच्या टप्प्यांत हळूहळू उलगडून सांगितल्या जातात. कथनाचे हे तंत्र अनेकांनी वापरले आहे. पण नोलनबंधूंनीच त्याचा वापर अतिशय प्रभावीपणे केलेला दिसतो. ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’च्या पहिल्याच एपिसोडच्या सुरुवातीच्याच सीनमध्ये जॉन भणंगासारखा ट्रेनमधून फिरत असतो. असे वाटते की या घटनेमुळे त्याची आणि हॅरल्डची भेट झाली. पण ते चूक असते. या घटनेच्या पूर्वीच पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असते, हॅरल्ड आणि जॉनचा आधीच संबंध आलेला असतो आणि जॉनच्या आधी हॅरल्डने बरेच एजंट्स ठेवलेले असतात. एवढेच कशाला फ़स्को, रूट, शॉ, एलायास, कार्टर वगैरे सगळ्यांच्या आयुष्यात कथेशी संबंधित बरंच काही घडून गेलेलं होतं. हे सारे आपल्याला टप्प्याटप्प्याने नंतरच्या सीझन्समध्ये कळते.

    आता हे सांगण्याच्या दोन पद्धती आहेत. एक, की पहिल्याच एपिसोडच्या प्रस्तावनेत सारे सांगून टाकायचे नाहीतर दुसरी, की नंतर योग्य जागी ‘अ’ बिंदू पेरायचा. एवढेच नाही, तर प्रत्येक पात्राच्या फ्रेम ऑफ रेफरन्सनुसार अनेक ‘अ’ बिंदू निर्माण करायचे. जोनाथन नोलनने दुसरी पद्धत निवडली आणि साहजिकच तिचा नाट्यमय परिणाम अनेक पटींनी जास्त झाला. मी ‘पीओआय’ला आजवरची सर्वाधिक भारी मालिका म्हणतो, या मागे जी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी हे देखील एक आहे. वाचायला सोपे वाटते. पण करायला केवढे अवघड आहे, हे ज्यांना काहीतरी लालित्यपूर्ण लिहायचा अनुभव आहे, त्यांना पटकन जाणवेल. अगदी पहिल्या प्रसंगापासून प्रत्येक हालचाल आणि प्रत्येक वाक्य त्या संबंधित ‘अ’ पैकी योग्य ‘अ’पाशी कॉन्व्हर्ज व्हावं असंच रचायचं आणि तरीही त्याची रंजकता कमी होऊ द्यायची नाही. दुसरा टप्पा अजूनच अवघड. ‘अ’पाशी आल्यावर सगळं काही तशाच प्रमाणात डायव्हर्ज करायचं. सुरुवातीपासूनच गुंता निर्माण करायचा पण त्यातही सहजी न दिसणारा कलात्मक पॅटर्न निर्माण करायचा. असा की शेवटी तो सुटल्यावर एखादं गणित सुटल्यासारखा निखळ आनंद मिळावा! दोघांही नोलनबंधूंच्या कलाकृतींचे स्वतंत्र आलेख काढले तर त्यात खूप सारी वर्तुळं दिसतील. बरं गुंता करणं सोपं असतं, सोडवणं सगळ्यांत कठिण. चक्रव्यूहात शिरणं सोपं असतं, बाहेर पडणं सगळ्यांत कठिण. नोलनबंधू या दोन्हीही टप्प्यांचे गुरू आहेत, याच्या खुणा ख्रिस्तोफ़रच्या चित्रपटांच्याच इतक्या ठळकपणे जोनाथनच्या ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’च्या स्ट्रक्चरमध्येही जागोजागी दिसतात!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

  • मन आणि मेंदूला पौष्टिक खुराक — ईव्हल

    मन आणि मेंदूला पौष्टिक खुराक — ईव्हल

    ‘प्रोसिजरल ड्रामा’ हा तसा टिव्ही मालिकांच्या इतिहासात अनादि-अनंत काळापासून चालत आलेला प्रकार. आपल्याकडेही ‘करमचंद’ (१९८५-२००७), ‘तहक़ीकात’ (१९९४-१९९५), ‘सुराग़’ (१९९९), ‘अदालत’ (२०१०-२०१६) अशा अनेक नावाजलेल्या मालिकांनी हा प्रकार गाजवलाय. पाश्चात्य, विशेषतः अमेरिकन आणि ब्रिटीश मालिकांमध्ये तर या प्रकारच्या मालिकांच्या अक्षरशः रांगाच लागल्या आहेत. त्यांच्यातही वेगळेपणा म्हणता म्हणता हळूहळू तोचतोचपणा येऊ लागला होता. खूप साऱ्या मालिकांनी या प्रकारात काहीतरी ट्विस्ट आणायचा प्रयत्न केला. पण मला सगळ्यांत जोरात ‘लागलेला’ ट्विस्ट जर कोणता असेल, तर तो होता ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’ (२०११-२०१६)! प्रोसिजरल ड्रामामध्ये साय-फाय, राजकारण, सामाजिक व्यवस्था आणि मानसशास्त्राचं इतकं अफलातून मिश्रण मी तरी कुठेच पाहिलं नाही. मी या मालिकेचा केवढा मोठा भक्त आहे, हे मी वारंवार लिहिलंय आणि इथून पुढेही लिहीत राहीन. ती संपल्यावर मी कित्येक महिने भंजाळल्यासारखा त्या दर्जाच्या किमान जवळपास तरी जाणारं काही सापडतं का याचा निरर्थक शोध घेण्यात घालवलेयत. अनेक मालिका पाहिल्या, पण ‘पीओआय’समोर सगळ्याच पातळ. आणि मग एके दिवशी अवचितपणे, खरं तर ‘पीओआय’मुळेच मला सापडली त्याच सीबीएस वाहिनीवर सध्या प्रसारित होत असलेली ‘ईव्हल’ (२०१९ -)!

    ‘ईव्हल’ मला ‘पीओआय’मुळेच सापडली असे मी म्हणतोय याचे कारण आहे ‘मायकेल इमर्सन’! मी या माणसाच्या कामाचा जबरा फॅन आहे. एवढेच कश्याला, मी ‘पीओआय’ची लागण करून दिल्यावर मायकेल इमर्सनच्या वेड्यागत प्रेमातच पडलेली एक मैत्रिणसुद्धा मला ठाऊक आहे. त्याची ‘लॉस्ट’खेरीज (२००४-२०१०) अन्य कामे शोधत असतानाच मला या आगामी मालिकेबद्दल समजलं. तरीही मी पहिले दहा भाग प्रसारित होईपर्यंत कळ काढली. एखादाच भाग पाहू आणि नाही आवडली तर सोडून देऊ, असा विचार करून मी पहिला भाग पाहायला घेतला. आणि काय सांगू तुम्हाला, कधी ते दहा भाग गपकन संपवले मी हे माझं मलासुद्धा समजलं नाही! मालिकेचं पहिलंच (आणि देव करो – शेवटचं नसलेलं) पर्व सध्या प्रसारित होतंय आणि आता दर आठवड्याला चातकासारखी वाट पाहाण्याखेरीज माझ्या हाती काहीच नाही!

    मी ‘ईव्हल’ला ‘प्रोसिजरल ड्रामा विथ अ ट्विस्ट’ का म्हणतोय, याचे उत्तर तिच्या कथानकात आहे. क्रिस्टन बुशार्ड (कात्या हर्बर्स) ही एक फोरेन्सिक सायकॉलॉजिस्ट आहे. ती क्वीन्सच्या डिस्ट्रिक्ट अॅटर्नी ऑफिसकडून तज्ञ साक्षीदार म्हणून काम करते. एका केससंदर्भात तिची भेट डेव्हिड अकोस्टाशी (माईक कोल्टर) होते. डेव्हिड हा कॅथलिक प्रिस्ट होण्याचं शिक्षण घेतोय. दरम्यान त्याला चर्चने त्यांच्याकडे येणाऱ्या गूढ, अतींद्रिय तक्रारींचा, उदाहरणार्थ झपाटणे, चमत्कार वगैरे, छडा लावण्यासाठी नियुक्त केलेय. परिस्थिती अशी ओढवते की, क्रिस्टन डेव्हिडसोबत अशा केसेसवर सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करू लागते. डेव्हिडचा आधीच एक जोडीदार आहे, टेक्निकल एक्सपर्ट बेन शाक़ीर (आसिफ़ मांडवी). डेव्हिड अतिशय सश्रद्ध आहे. क्रिस्टन अश्रद्ध वा नास्तिक नसली तरीही अजिबातच धार्मिक नाहीये. बेन तर उघड उघडच नास्तिक आहे. केसवर काम करताना तिघेही आपापले अभ्यासविषय आणि विचारधारांनुसार कोडी सोडवू पाहातात. एक एपिसोड, एक केस! आता लक्षात आलं का, मी का ‘ईव्हल’ला ‘प्रोसिजरल ड्रामा विथ अ ट्विस्ट’ म्हणतोय ते!

    ही मालिका एवढ्यापुरतीच मर्यादित असती, तरीही एक वेगळी मालिका एवढ्यापुरतं तिचं महत्त्व राहिलंच असतं. पण क्रिएटर रॉबर्ट आणि मिशेल किंग दांपत्य आपल्या अचाट लेखनाच्या जोरावर तिला तिच्या परीघात राहूनही तो परीघ असा काही विस्तारायला लावतं, की बघतच राहावं! सीबीएसने जरी या मालिकेचं वर्णन ‘सुपरनॅचरल ड्रामा’ असं केलेलं असलं, तरीही ती प्रत्येक भागात, प्रत्येक भागातच कशाला अगदी प्रसंगांमागून प्रसंगांमध्ये सातत्याने ‘सायकॉलॉजिकल थ्रिलर’ ते ‘सुपरनॅचरल ड्रामा’ असे मस्त हिंदोळे खात राहाते. ही सुपरनॅचरल विषयावरची मालिका आहे असा आपला विश्वास बसू लागतो न लागतो तोच एपिसोडमध्ये असा काही ट्विस्ट येतो की ही मालिका कुणातरी सायकोपॅथीचा भयंकर अभ्यास असलेल्याच्या मेंदूतून स्फुरलेली सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे, याची खात्री पटते. आणि ती पटलेली खात्री किंचितशी स्थिरावते न स्थिरावते तोच मालिका क्षणार्धात सुपरनॅचरल गोष्टींच्या शिखरावर उडी मारून स्वार होते! आणि हे सारे ‘फ्रिंज’सारखे (२००८-२०१३) सपाट नाही बरं का, तर इतक्या शैलीदारपणे की डोक्याचा भुगा होत असल्याचा मनापासून आनंद व्हावा!

    क्रिस्टिन, डेव्हिड आणि बेन यांच्या वेगवेगळ्या विचारधारांची सातत्याने होणारी टक्कर हा सुद्धा मेंदूसाठी एक चमचमीत खुराक आहे. पराकोटीची आस्तिकता, पराकोटीची नास्तिकता आणि अज्ञेयवाद या तिन्ही मुद्यांना व्यवस्थित गवसणी घातल्यामुळे मालिका कोणत्याही एका बाजूला झुकत नाही. तिची वस्तुनिष्ठता उणावत नाही. तिघांच्याही आयुष्यातील वैयक्तिक संघर्षसुद्धा इतक्या सखोल आणि संयतपणे लिहिलेयत ना की, त्यांचा त्या तिघांच्याही व्यावसायिक आयुष्यांवर होणारा परिणाम अतिशय नैसर्गिक वाटतो. केवळ सध्या प्रसारित होणाऱ्याच नव्हे तर या आधी येऊन गेलेल्या मालिकांमध्येही ज्यांचे लेखन सर्वश्रेष्ठ होते, अशा मालिकांच्या यादीत ‘ईव्हल’चा कुठे ना कुठे समावेश निश्चितपणे करावा लागेल. या मालिकेतील विनोद जितके नैसर्गिक आहेत, तितक्याच बाकीच्या भावनादेखील नैसर्गिकपणेच येतात. विशेषतः भीती. सुपरनॅचरल म्हटलं की दचकवण्यासारखे जंप स्केअर्स टाकणे हा अतिशय सेफ गेम असतो. ‘ईव्हल’ मात्र जंप स्केअर्सवर अतिशय कमी अवलंबून राहाते. उलट तिचा भर हा कणाकणाने आणि क्षणाक्षणाने ताण व भीती विकसित करण्यावर जास्त आहे, ही तिची आणखी एक जमेची बाजू. ही गोष्ट त्यांनी आत्तापर्यंत प्रसारित झालेल्या प्रत्येक भागामध्ये शंभर टक्के यशस्वी केलीये! काही काही दृश्यांमध्ये तर हा ताण अगदी असह्य वाटायला लावतो.

    ‘ईव्हल’ची दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे ही मालिका ना स्वतःला अतिशहाणी समजते ना प्रेक्षकांना मूर्ख. आपला अंगभूत स्मार्टनेस राखतानाच प्रेक्षकांनाही सतत विचार करायला लावणाऱ्या ज्या काही दुर्मिळ मालिका असतात, त्यांच्यापैकी ‘ईव्हल’ आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांचा जो काही मुख्य स्टोरी आर्क आहे, तो अगदी पहिल्या दिवसापासून चालू होतो. ‘पीओआय’, ‘फ्रिंज’ यांनी मुख्य मुद्याकडे यायला जवळजवळ पहिला सबंध सीझन खर्ची घातलेला असताना, ‘ईव्हल’ खरोखरच सुखद धक्का देणारी आहे. त्याहून विशेष म्हणजे, ही मालिका अद्याप तरी पॉलिटिकल करेक्टनेसच्या अट्टाहासात वाहावत गेल्यासारखी वाटत नाहीये.

    पण ज्या व्यक्तीमुळे मी ही मालिका पाहायला सुरुवात केली, त्या मायकेल इमर्सनचं काय? सगळ्यांचंच काम कमाल झालंय. विशेषतः प्रत्येकाचीच संवादफेक अतिशय स्तुत्य आहे. पण मालिकेतील सगळे सगळे लोक एकीकडे आणि एकटा मायकेल इमर्सन एकीकडे! ‘पीओआय’मधील क्युट, सालस, सज्जन हॅरल्ड. इकडे मात्र तोच चेहरा, तोच बांधा, तोच आवाज आणि तरीही तो डोळ्यांनी अशी काही गंमत करतो ना की, तो दिसताक्षणीच त्याची किळस वाटते. नुसते पाहाताक्षणीच कळते की हा माणूस नीचांमधलाही नीच आहे, म्हणजे त्याने काय पवित्रा घेतला असेल, कल्पना करा! ‘पीओआय’ पाहाणाऱ्यांना हा मुद्दा जास्त चांगला समजेल की, मायकेल इमर्सनचा डॉ. लीलंड टाऊन्सेंड जर ‘पीओआय’च्या एखाद्या एपिसोडमध्ये असता, तर जॉनने दर मिनिटागणिक त्याला आपला स्पेशलवाला गुद्दा मारला असता! अक्षरशः ‘ईव्हल’ या शब्दाचं साकार रूप आहे तो. त्याच्या अतिशय साध्या साध्या शब्दांतून, हालचालींतूनही दुष्टपणाचा, पापाचा घाणेरडा व उग्र दर्प पाझरत राहातो. हे पात्र किंग दांपत्याने काय सुंदर लिहिलं असेल ते असो, पण मायकेल इमर्सनने त्याला ज्या काही उंचीवर नेऊन ठेवलंय ते अकल्पनीय आहे. विकृतीची परिसीमा आहे हा लीलंड टाऊन्सेंड. सगळे मुद्दे बाजूला ठेवून फक्त आणि फक्त त्याचा अफाट अभिनय पाहात राहावंसं वाटतं, बस!!

    याचा अर्थ ‘ईव्हल’मध्ये त्रुटी नाहीत का? आहेत. मालिका ‘सायकॉलॉजिकल थ्रिलर’ ते ‘सुपरनॅचरल’ या हिंदोळ्यांमध्ये काही काही मुद्यांचे स्पष्टीकरणच द्यायचे विसरून जाते. या त्रयीने काम केलेल्या केसेसमध्ये त्या सुटल्यानंतरही ज्या काही महाभयानक उलथापालथी घडतात, त्याकडे या टिमचे (अद्याप तरी) दुर्लक्ष झालेले दिसते. अर्थातच या गोष्टी मालिका जसजशी पुढे सरकेल, तसतश्या उलगडत जातीलच. पण चालू भागांमध्ये त्यांना प्रश्नच न पडणे, ही गोष्ट खटकत राहातेच. ही मालिका ‘पीओआय’च्या दर्जाची आहे का? ‘पीओआय’ हा बेंचमार्क आहे माझ्या दृष्टीने. ‘ईव्हल’चा अद्याप पहिला सीझनसुद्धा पूर्ण झालेला नाही. त्यामुळे अशी तुलना इतक्यातच करणे अनाठायी आहे. पण ‘ईव्हल’ने आत्ता सुरू आहे त्याच दर्जाचे अजून पाच सीझन्स दिले, तर ती ‘पीओआय’च्या दर्जाला शंभर टक्के स्पर्शू शकते, यात काहीच संशय नाही. तितकी तिची क्षमता नक्कीच आहे. नोलनच्या चाहत्याकडून हे वाक्य उच्चारलं जाणं, हीच ‘ईव्हल’च्या यशाची सगळ्यांत मोठ्ठी पोचपावती आहे!

    ४.७५/५

    — © विक्रम श्रीराम एडके.
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

  • पंचेश्वरम्

    लंकादहन करून हनुमान जसा परततो तसे युद्धकांड सुरू होते. श्रीराम हनुमानाला लंकेचे वर्णन करायला सांगतात. लक्षात घ्या, हनुमान हा जरी सीतेचा शोध लावण्यासाठीच गेलेला असला, तरीही लंकादहन करताना आणि त्याहीपूर्वी लंकेत भ्रमण करताना त्याने अतिशय बारीक नजरेने सगळे टिपलेय. तेच तो आता रामाला तपशीलवार सांगतो की (युद्ध. सर्ग ३), “लंका अत्यंत संपन्न असून मत्त हत्तींनी व्याप्त आणि रथांनी समृद्ध आहे. तिला चार मोठमोठे आणि दुर्जेय असे दरवाजे आहेत. या चारही दरवाजांवर यंत्रे बसवलेली आहेत ज्यांच्यातून शत्रूसैन्यावर बाणांचा आणि दगडांचा वर्षाव केला जाऊ शकतो. तिथेच लोखंडाने बनलेल्या अनेक काटेदार शतघ्नीसुद्धा तैनात आहेत. लंकेच्या चहुबाजूंनी अभेद्य अशी तटबंदी आहे. तिच्याभोवती खंदक आहेत ज्यात मगरी आणि मोठमोठे मासे वास करतात. खंदकांवर उपरोक्त चारही दरवाजांना जोडणारे असे चार पूल आहेत. शत्रूसैन्य या पुलांवर चढलं की त्या पुलांना पाण्यात पाडण्याची यंत्रांकरवी सोय केलेली आहे. या पैकी कोणत्याच कामांमध्ये ढिलाई न होण्याकडे रावण स्वतः जातीने लक्ष पुरवतो. याउप्पर लंकेच्या भोवती या कृत्रिम तटबंदीखेरीज नद्या, पर्वत आणि जंगलदेखील आहे. लंका ही समुद्रकिनाऱ्यापासून बरीच आत दक्षिणेकडे आहे. त्यातही ती उंचावर वसलेली आहे. तिच्या पूर्वद्वारावर दहा सहस्र राक्षसांचा खडा पहारा आहे. हे सैनिक हातात शूल धारण करतात आणि युद्धप्रसंगी तलवारींनी झुंजतात. असंच दक्षिणद्वारी एक लाखाचं चतुरंग अर्थातच हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ यांनी सुसज्ज सैन्य आहे. लंकेच्या पश्चिमेकडे सैन्यसंख्या दहा लाख आहे. हे सैनिक अस्त्रशस्त्रांमध्ये निपुण आहेत व त्यांच्याकडे ढाल आणि तलवारीसुद्धा आहेत. उत्तरेच्या दरवाजापाशी असेच दहा कोटी सैनिक उभे आहेत. त्यांच्यापैकी काही रथी आहेत व काही अश्वारोहणात निपुण असून सगळेच उच्चकुळांमध्ये जन्मलेले वीर आहेत. लंकेच्या मध्यभागी साधारण एक कोटीचे सैन्य असावे. परंतु मी इकडे येण्यापूर्वी खंदकांवरील सगळे पुल तोडून टाकलेयत. खंदक फोडून टाकलेयत. सगळीकडे आगी लावल्यायत. ठिकठिकाणी तटबंदी तोडून टाकलीये आणि सुमारे एक चतुर्थांश सैन्यदेखील मारलेय. जर आपण एखाद्या उपायाने समुद्र लांघू शकलो, तर लंका नष्ट झालीच म्हणून समजा”!

    हनुमानाची लंकेवर आक्रमण करण्यासाठी घाई चाललीये याचे कारण उघड आहे की, त्याला रावणाचे झालेले नुकसान दुरुस्त करायला वेळच मिळू द्यायचा नाहीये. त्याने लंकेचे अतिशय बारीकसारीक वर्णन केलेय. जणू लंकेचा शब्दबद्ध नकाशाच! त्यातही एक गोष्ट विशेष लक्ष वेधून घेते. ती म्हणजे (श्लो. २४ ते २७) लंकेच्या पूर्वेला दहा हजार, दक्षिणेला एक लाख, पश्चिमेला दहा लाख आणि उत्तरेला दहा कोटी सैन्य आहे. आता खरोखरच त्या काळी लंकेची लोकसंख्या एवढी होती का या भानगडीत न पडता आपण मुद्याची गोष्ट तेवढी लक्षात घेऊ. मुद्याची गोष्ट अशी की, लंकेच्या पूर्वेकडे सगळ्यांत कमी सैन्य आहे आणि घड्याळी पद्धतीने ते अनुक्रमे दक्षिण, पश्चिम व उत्तरेपर्यंत वाढत जाते. काय कारण असावे याचे? श्रीलंकेचे भौगोलिक स्थान पाहा. पूर्व आणि दक्षिण किनारपट्टीपासून कोणत्याही देशाची भूमी भरपूर लांब आहे. याउलट उत्तर आणि पश्चिमेपासून भारत खूपच जवळ आहे. त्यामुळेच रावणाने उत्तर आणि पश्चिमेकडे, जिथून आक्रमण होण्याची सर्वाधिक शक्यता आहे, तिकडे महाप्रचंड आणि विशेष सैन्य ठेवलेय तर पूर्व व दक्षिणेकडे तुलनेने कमी सैन्य ठेवलेय.

    ही तर झाली सामरिक रचना. परंतु श्रीलंकेच्या भोवती आज अशीच एक आध्यात्मिक रचनासुद्धा आहे. कोणती? लंकेच्या किनारपट्टीवर वेगवेगळ्या ठिकाणी पाच वेगवेगळी शिवमंदिरे आहेत. यांनाच पंचेश्वरम् असे म्हणतात! पहिले आहे ते उत्तरेला जाफनास्थित नगुलेश्वरम्. वायव्येला असलेले मन्नार जिल्ह्यातील केतिश्वरम् हे दुसरे. तिसरे आहे ते ईशान्येकडील त्रिंकोमाली जिल्ह्यातील कोणेश्वरम्. चौथे पश्चिमेला पुट्टालम जिल्ह्यातील मुन्नेश्वरम्. आणि पाचवे आहे दक्षिणेकडील मातरा जिल्ह्यातील तोण्डेश्वरम्! जणू श्रीलंकेचे रक्षण करण्यासाठी तिच्याभोवती उभे असलेले भगवान शिवशंकरच! त्यांचीही रचना बहुतांशी रावणाच्या सैन्यरचनेसारखीच आहे. उत्तरेपाशी तीन शिवमंदिरे आहेत आणि पश्चिम व दक्षिणेकडे अनुक्रमे एक एकच शिवमंदिरे आहेत. जणू एखादं आध्यात्मिक सुरक्षकवचच! कदाचित उत्तर आणि पश्चिमेकडून अर्थातच भारतातून जास्त दळणवळण असल्याने भाविकांची संख्या जास्त असेल व म्हणूनही मंदिरे तिकडे अधिक संख्येने असू शकतील. सतराव्या शतकात पोर्तुगीझ मिशनऱ्यांनी ही पाचही मंदिरं ध्वस्त केली होती. अनेक ठिकाणी मंदिरांच्या जागी चर्च बांधले होते. तिथे भाविकांनी वेळोवेळी परत मंदिरे उभारली आहेत.

    मी येत्या मार्चमध्ये श्रीलंकेला जातोय. या वेळच्या वेळापत्रकात सगळेच नाही तरी पंचेश्वरांपैकी दोन मंदिरांचे दर्शन घेण्याचा कार्यक्रम आहे. एक कोणेश्वरम् आणि दुसरे मुन्नेश्वरम्! यांपैकी कोणेश्वरमला दक्षिण कैलास (तमिळ: तेन कैलासम्) असे म्हणतात. याचं कारण काय असावं याचा शोध घेताना मला एक ब्लॉग आढळला. त्यात कैलास पर्वत आणि कोणेश्वरम् यांचे भौगोलिक स्थान दिले आहे. कैलासाचे स्थान ३१° ४’ उत्तर व ८१°१८’ पूर्व असे सांगितले आहे तर कोणेश्वरमचे स्थान ८°३५’ उत्तर व ८१°११’ पूर्व असे सांगितले आहे. (गुगलवर हीच स्थाने अनुक्रमे ३१°०६’ उत्तर व ८१°३१’ पूर्व आणि ८°५८’ उत्तर व ८१°२४’ पूर्व अशी आढळतात.) उपरोक्त ब्लॉगच्या लेखकाचा दावा आहे की, दोन्ही स्थाने पूर्णार्थाने जरी नाही तरी बऱ्यापैकी एकाच रेखांशावर येतात! हे वाचायला छान वाटतं, परंतु भूगोलातील कुणा तज्ञाने याची सत्यता पडताळून सांगितली तरच विश्वास ठेवलेले चांगले. दुसरे असे की, स्थानिक मान्यतेनुसार रावणाचा वध केल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी ज्या स्थानी भगवान शिवाची अर्चना केली, त्या स्थानावर मुन्नेश्वरम् मंदिर उभे आहे. मला तरी वाल्मिकी रामायणात असा कोणताच संदर्भ अद्याप आढळलेला नाही. परंतु कधीकधी स्थानिक श्रद्धा व परंपरांचे महत्त्व लेखी गोष्टींपेक्षा अधिक हे असतेच.

    दोन्हीही मंदिरांचे दर्शन घेतल्यावर त्यांच्याबद्दल सविस्तर लिहितोच. मी येत्या २ मार्च ते ९ मार्च कालावधीत श्रीलंकेला जातोय. रामायणाशी संबंधित काही स्थळे, काही पर्यटनस्थळे पाहातानाच तिथे रोज एक याप्रमाणे सोबत येणाऱ्या यात्रेकरूंसाठी वाल्मिकींच्या रामायणावर पाच व्याख्याने देणार आहे मी. तुम्हीही सहभागी होऊ इच्छित असाल, तर अद्याप जागा शिल्लक आहेत. ‘माय ट्रॅव्हल वर्ल्ड’च्या श्रीमती वीणा निंबाळकर यांच्याशी +919921907772 या क्रमांकावर संपर्क साधा आणि आजच आपल्या जागा आरक्षित करा! चला अनुभवूया रावणाच्या राज्यात रामायण!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

  • Vivid

    ‘Knock knock!’, the first knocking is always gentle.

    If you want to eat out in Pune, you mustn’t choose the weekend. Because on weekends, you can surely find best food, but in another person’s plate behind whom you are standing in a queue to grab the seat. It could take ages only to get a seat in a busy restaurant on weekends. There is an age-old proverb about Pune that, ‘Pune city, where nothing’s in scarcity’! Sadly, this isn’t true these days. Because where there’s abundance, people ought to follow. And more the people, scarcer the things.

    Today must be an exception that proves the rule, though. Firstly, because the only scarce thing he came across was the crowd on the ever busy JM Road. And secondly, because he found a quiet spot in a strangely quiet restaurant on a Saturday evening. As he took his place, a young and slender waiter arrived and filled an already full glass of water. He made a note of that in mind. Of course, he did. Why wouldn’t he? That was his job, for God’s sake! At least since last few days.

    Since, Baban Atmaram Bharde relocated to Pune, he did quite a few odd jobs and dated quite a few odd women. Though, the pots he smoked were anything but few.
    “Your life is becoming hollow like this joint, day by day”, warned Selma after a round of bad coital performance on his part. That was before she dumped him, or after that? Confusing as it was, he never paid any heed.

    Baban couldn’t get any of his affairs straight, until he found an online group called, ‘The Daily Meal’. It was a social media group of amateur food critics. Their slogan was ‘We are amateur but we got zeal, We’re here to tell you how was the meal’! He laughed at them while signing in. But as the days passed, he realised that what these people were doing, he could do better. He was never a nerd, but surely an avid reader. He started writing reviews of any damn restaurants he had been to. Obviously, the recurring single-hood contributed a lot in these shenanigans of his. And yet, as he practiced more, his reviews became more and more elaborate and in turn more and more viral. Soon he became an online phenomenon in food blogging. Money, fame, respect and on top of that free meals, suddenly he had everything he dreamt of and even what he hadn’t. With his various social media handles having over a million subscribers and counting, Baban Atmaram Bharde became a sensation. Yet he didn’t stop writing in The Daily Meal. Simply because, he considered himself humble enough to remember his roots.

    ‘Thump Thump!’, the knocks obviously grow stronger after a few seconds.

    High pitched tinkles of cutleries on plates perturbed Baban to the present! It was time for the first course, of the meal, and of course it didn’t have seven courses. The young, slender waiter was vanished somewhere and an older, fat one took his place. Baban took the first sip of the soup. And as it’s delicious taste started spreading through his taste buds, his ears filled with an irritating sound,
    “Aur kuch laaun Saab (Can I get you something else, Sir)?”, the old waiter was asking in an aggressively nasal voice.

    The question was simple, yet enough to ruin the maidenhood of Baban’s sipping experience. In old days, he would have seen the waiter more sympathetically. He would have thought that this old and odd personification of hospitality might have been with the restaurant since the beginning. He would have considered him, perhaps the last relic of his kind. But not now. Now he was a star and a guest of honor for the restaurant, whose fate was relying on the matrimony of his fingers and the keyboard. And any unwanted sound could have broken that marriage even before taking place and the concentration of his fork-sharp mind, as it already happened.

    “Aur kuch laaun Saab?”, the waiter kept insisting in his creepy sound. Though Pune is considered as the cultural capital of Maharashtra, people here unfortunately prefer Hindi to start a conversation with a stranger.
    “Bolta hu baad mein (Will tell you later)”, Baban replied with as much irritation in his voice as he could gather.

    The food was really fulfilling. Not just the starters, but every other course after that. Yet everytime the waiter brought him a new dish, he kept asking,
    “Aur kuch laaun Saab”? There was something unsettling in his voice, which Baban couldn’t pinpoint. He tried to change the waiter, but strangely there was none available. In fact the whole gloomy restaurant had only two people, one Baban himself and another Baban wanted to change, practically and if possible behaviorally. Obviously he couldn’t have changed the waiter to himself, so there weren’t any other options left. ‘Where did the slender one go’, Baban wondered. ‘Could that kitchen be empty too’, he thought while glancing at it before getting bombarded by another “Aur kuch laaun Saab”?

    This time Baban kept calm and replied affirmatively for some fennel-seeds. He then got up from his seat and moved towards the wash-basin, where he washed his hands carefully. He closed his eyes and gently washed his face. But as he opened the eyes, he startled to see the waiter by his side, offering him a napkin with, yes you guessed it right, “Aur kuch laaun Saab”? This time with a grin!

    Baban reached his newly bought 3BHK in Kothrud with both his tongue and stomach satisfied. Yet his mind was anything but at peace. He had tasted one of the best meals of his life and still he couldn’t get the creepy voice of that waiter out of his mind. He was filled with an unexplainable rage. So he collected every particle of the negativity that brewed in his mind, seasoned the disappointment with some articulately twisted words and served the article smoking hot on The Daily Meal. With his reputation, the restaurant was bound to lose at least 30% of its business!

    ‘Bang Bang!’, the thumping becomes desperate after a while.

    He tried to sleep. But why wasn’t his mind calm? He remained awake for quite a few hours thinking, before hearing a knock on his door. He couldn’t remember what day it is, at first. But slowly recollected that it’s a week since he posted the review on The Daily Meal. It was a huge hit as expected, with thousands of likes and shares. Two days later came the news that the owner had to close the restaurant after severe online trolling over the waiter’s behavior. ‘Who cares? in this era where virtual life is taking over the real one, everybody has to receive flack for something some day’, Baban brushed off the slightest sense of guilt, if there was any.

    ‘Thud Thud’, the urgency is quite visible now.

    Baban got up against his wish and opened the door. He felt something piercing through his heart. It was a fork. Before closing his eyes for good, Baban tried to see the person at the other end of the fork. But all he could hear was a voice, “Aur kuch laaun Saab”?

    When even the thudding resulted in vain, the neighbours dialed One Zero Zero. Police found the body of Baban Atmaram Bharde, 33 years old, thin male, with whitish brown complexion, in his rented apartment of a single room in Kharadi. The room was smothered with the smoke of weed and the smell of decaying corpse. His desktop PC was playing a screensaver of his name. Behind that they found the half-filled Sign-up page of The Daily Meal social-media group, when one Constable touched the mouse inadvertently. It seemed to be a case of death by starving and heavy intoxication. They sent the body for postmortem, whereupon they were to keep it in the morgue before someone claims it. The latter part seemed to be of lesser possibility, though. Country, where everyday thousands of people die without anyone to cry for, who would have paid attention to an oddly placed fork in the row of some spoons?

    — © Vikram Shriram Edke.

    (Email: edkevikram@gmail.com)

  • यह तो पूरा शैतान है..!

    जेम्स ग्रँट डफ History of Mahrattas च्या पहिल्या खंडात लिहितो की, निज़ामने जेव्हा बाजीरावांना पूर्वी कधीच पाहिले नव्हते, तेव्हा त्याने आपल्या पदरचा एक चित्रकार बाजीरावांकडे धाडला. चित्रकाराला स्पष्ट सूचना होत्या की, तुला बाजीरावांचे जे काही पहिले दर्शन होईल, तसेच्या तसे चित्र काढून मला दाखव. चित्रकार परत आल्यावर त्याने जे चित्र काढले त्याचे वर्णन डफ करतो –
    “The painter executed his task, and on his return exhibited the Peishwa mounted, with the head and heel ropes of his horse in his feeding bag, like that of a common Mahratta, his spear resting on his shoulder, whilst he was rubbing with both his hands some ears of ripened Joowaree, which he was eating as he rode”.

    The Era of Bajirao, पृ. ३०९ येथे लेखक उदय कुलकर्णी मात्र उपरोक्त चित्रकार बादशाह मुहंमदशाहने पाठवल्याचे सांगतात. चित्रकाराला बाजीराव कसे दिसले यासाठी त्यांनी एक सुंदर काव्य दिले आहे –
    “तुरंगमावरी मूर्ती शोभे एक रिकिबित पाय
    दुजा आडवा घोड्यावरती घोडा ठुमकत जाय
    मानेवरती ठेऊनि दिधली अनीन घोड्याची ती
    स्कंधी भाला हसत मुखावरी शोभे अनुपम कांती
    मंदिल मस्तकी रुभरि अांगी अंगरखा तो साजे
    पचंग कटीला वस्त्र नेसले ब्राह्मणघाटीचे जें
    स्वताच हाती कणसे चोळुनी दाणे टाकी वदनी
    लाल ठेविल्या मिरच्या त्यातुनी खाई मधुनी मधुनी”

    रियासतकार सरदेसाई लिहितात (Ibid 310. Quoted from – Peshwa Bakhar, pp 26, 1878) असं बेफिकिर योद्ध्यासारखं वर्णन ऐकून बादशाहच्या मुखातून एकच वाक्य निघालं, “This is but the Devil” – “यह तो पूरा शैतान है”!!

    बाजीराव हे पेशवे असूनही त्यांच्या सैनिकांमध्ये त्यांच्याप्रमाणेच एक होऊन राहात होते, ते जे खातील तेच खात होते, ते जे पितील तेच पीत होते! डफचेच शब्द वापरून सांगायचे झाले तर –
    “Bajee Rao was handsome in his person, and his manner was more that of a frank soldier than of a smooth courtier; when in the field with his troops he kept up no state, and shared in all the privations of the meanest horseman”.

    — © विक्रम श्रीराम एडके
    (बाजीरावांच्या युद्धनीतीचे अभ्यासक आणि ‘मस्तानीपल्याडचे बाजीराव’ या विषयावर व्याख्यान देणारे वक्ते. अधिक माहितीसाठी पाहा www.vikramedke.com)

  • Shards Of Time

    Space: Earth-108

    Time: t+6B

    In the midst of wheeling and whooshing sound the pod disappeared and the lab, officials presiding & the people all over the world watching on live TV, erupted in applause. Many of them thanked the statues of goddess Mother in their homes, offices and public places for this achievement. After all it was the first Time Mission, as they advertised.

    Space: Earth-108

    Time: Pre-history

    “Hamier”, she called. Her voice had a slight tremble.

    The two participant scientists Dr. Ozna and her colleague Dr. Hamier had a simple task. They have to collect a few samples of soil & plants of the pre-historic era and return in an hour. Easy as pie!

    Hamier, who’s become sure about asking her out after they return, turned towards her to reply. Silence around is denser than the forest, he thought. Too much of greenery was making him disoriented (Or was it too much of oxygen?). And yet, he didn’t need to find her. In fact he didn’t need to do anything. A stone twice the size of his head hit him hard. Obviously one blow wasn’t enough to kill a man of his size, Ozna knew that. So she hit again and again until Hamier was cracked to the death!

    Space: Zero

    Time: Real

    “I screwed up. One of them derailed from the programmed path.” T said. His voice was full of regret.

    “Then shut it down and start again from the beginning”. O replied. This crude way of troubleshooting is popular among the aliens too, a human would have thought. Alas, there wasn’t any.

    O was T’s immediate boss.

    “Please, I can fix this. There must be a way”, T begged.

    But the boss is always right, and sometimes livid too.

    “Abort immediately and restart, I said”, O ordered firmly.

    T apologetically pushed the Abort button, as he did hundreds of times before. Now it was only a matter of time for project ‘Earth-108’ to transform into the cosmic ash. His job was to start over again then. Arguing was above T’s pay grade, so did understanding the physics above O’s. Otherwise he’d have known how a time-loop works.

    They started preparing for the iteration 109.

    Space: Earth-108

    Time: t+6B

    In the lab, the statue of Mother seemed to be smiling just for a second before dusting off with the whole Earth!

    Space: Earth-108

    Time: Pre-history

    Ozna was smiling, as unbeknownst to T and O, her subjects have now learnt to light a fire. Making a wheel was obviously next on the cards.

    “Hell Mother“, they cheered for her radiantly, as she watched them with utmost affection!

    — © Vikram Shriram Edke