उडी, नव्हे भारतीय स्वातंत्र्याची गुढी!!

८ जुलै १९१० दिनी स्वा. सावरकरांनी त्रिखंडात गाजलेली उडी मारली. म्हणजे नेमकं काय केलं? गुडघ्यात मेंदू आणि त्या मेंदूलाही मूळव्याध झालेले बिग्रेडी सोडले, तर का त्या उडीला जगभरचे इतिहासकार एवढं महत्त्व देतात? सावरकरांनी उडी मारली ती ‘मोरिया’ नौका मार्सेल्स (फ्रान्स) येथील धक्क्यावर उभी असताना पोर्टहोलमधून! लक्षात घ्या, जहाज ते धक्क्याची भिंत हे अंतर आहे सुमारे ८.५ फूट. सावरकरांचा देह ५-५.५ फुटाचा. म्हणजे उडी मारताना सावरकरांना मोकळी जागा किती मिळतेय? अवघी २.५-३ फूट!! जरादेखील इकडेतिकडे झालं, तरी एकतर कपाळमोक्ष तरी होणार वा हातपाय तरी तुटणार! कारण पुन्हा पोर्टहोल ते समुद्रसपाटी ही उंची आहे सुमारे २७ फूट! एवढ्या उंचीवरुन सावरकर समुद्रात पडले. समुद्रात बरं का! मामाच्या गावच्या विहिरीत नव्हे!! त्यानंतर अवघ्या काही क्षणांत त्यांनी पोहत पोहत जहाजाच्या सुकाणूला वळसा घातला आणि ते बंदराच्या दुसऱ्या भिंतीशी आले! ही भिंत होती सुमारे ९ फूट. शिवाय सतत पाण्याच्या संपर्कामुळे अर्थातच निसरडी झालेली! सावरकर ही ९ फुटांची निसरडी भिंत अवघ्या काही पळांमध्ये चढले, यावरुन कल्पना करा की काय अचाट सामर्थ्याचा माणूस असेल तो. सावरकर बंदरावर पोहोचले, तेव्हा कुठे जहाजावर पहारेकऱ्याच्या लक्षात आलं की, ‘बंदी पळाला’. नाहीतर इतका वेळ सगळे शुंभासारखेच बसून होते. मग धावाधाव सुरु झाली. मग सावरकरांना पकडलं गेलं, जहाजावर परत आणलं गेलं आणि मग पुढचा प्रवास सुरु झाला. (सर्व संदर्भ श्रीमती अनुरुपा सिनार ह्यांच्या संशोधनातून). हे वर्णन वाचायलाही अधिक वेळ लागला असेल, इतक्या कमी वेळात ही जगाच्या इतिहासावर कायमचा परिणाम करणारी घटना घडून गेली. सावरकरांना एकदा एका चिनी सहबंद्याने विचारलं होतं की, ‘किती महिने पोहत होता’? त्यावर सावरकर म्हणाले, ‘महिने कसले? पाच मिनिटंही पोहलो नसेन’!

मग आता प्रश्न असा उभा राहातो की, जी उडी मारुन पुन्हा अटक होईपर्यंत पाच-दहा मिनिटेसुद्धा धड गेली नव्हती, तिला इतिहासाने एवढं महत्त्व का द्यावं? पलायन म्हणाल, तर कुणी म्हणेल ते फसलेलं पलायन होतं. साहस म्हणाल, तर कुणी म्हणेल ते वाया गेलेलं साहस होतं. खरंच का ते फसलेलं पलायन आणि वाया गेलेलं साहस होतं? याचं उत्तर अवघ्या तीनच दिवसांत वृत्तपत्रांनी दिलं!!

१) ‘ल लिबर्सियन’ ह्या वृत्तपत्राने ११ जुलै १९१० ला संपादकीय लिहिलं, “इंग्लंडचे कुख्यात साम्राज्य हे रक्तपात व दडपशाहीवरच आधारलेले आहे. सावरकरांना फ्रान्सच्या भूमीवर केलेली अवैध अटक हे त्याचेच प्रतीक आहे. सरकारने फ्रेंच राज्यक्रांतीची वैभवशाली मर्यादा राखायला हवी व सावरकरांचा ताबा मिळवून त्यांना संपूर्ण संरक्षण द्यावयास हवे”.
२) ‘ल ह्युमनाईत’ने १२ जुलै १९१० दिनी ह्या घटनेचे वर्णन ‘फ्रान्सच्या राज्यक्रांतीशी प्रतारणा’ असे केले.
३) ‘द प्रेझेन्स’ने फ्रान्सच्या विदेशमंत्र्यांकडे मागणी केली की, ‘सावरकरांना ताबडतोब परत मिळवावे’.
४) ‘ल एब्लर’ने १६ जुलै १९१० ला लिहिले की, “स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना आश्रय देण्याची फ्रान्सची परंपरा आहे. तिलाच फ्रेंच सरकारच्या भ्याडपणामुळे काळीमा फासला गेलाय. प्रत्येक फ्रेंच माणसाला शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली आहे”.
५) ‘ल टेम्पस’ने १८ जुलैला लिहिले की, “सावरकरांच्या अलौकिक शौर्याचे कौतुक प्रत्येक फ्रेंच माणसाने करावयास हवे. सावरकरांची मुक्तता व सन्मानपूर्वक फ्रान्समध्ये आगमन हे फ्रेंच सरकारचे कर्तव्य आहे. त्यासाठी सावरकरांवरील अन्याय दूर होईपर्यंत कुणाही फ्रेंच माणसाने विश्रांती घेता कामा नये”.
६) ‘ल मातिम’ने २१ जुलैला लिहिले की, “फ्रेंच सरकारने सावरकरांना सोडवले नाही, तर जगात तोंड दाखवायला जागा राहाणार नाही”.

इंग्लंडमध्येही धुमश्चक्री सुरु झाली. सावरकरांच्या खेळीमुळे ब्रिटिशच कसे ब्रिटिशांवर तुटून पडले पाहा –
७) द डेली मेल’चे संपादक रॉबर्ट लिंड २२ जुलैला लिहितात, “ब्रिटीश पोलिसांच्या नीच कृतीमुळे अन्य देशांमध्ये आश्रय घेण्याच्या कायद्याची थट्टाच झाली आहे. कायद्याची अक्षरशः टवाळी केली आहे आपण ब्रिटिशांनी”.
८) ‘द मॉर्निंग पोस्ट’ने ३० जुलैला लिहिले, “कायद्याचे सार्वभौमत्व जपण्याचा ब्रिटनने आजवर अभिमान बाळगला होता, तो आपण स्वत:च्याच हातांनी आज उद्ध्वस्त केला”.

भारतमंत्री लॉर्ड मोर्लेंना चक्क आपले पद गमवावे लागले. इतर देशांत काय झाले –
९) १२ जुलैच्या ‘द बर्लिन पोस्ट’ ह्या जर्मन वृत्तपत्राच्या अंकात लिहिलेय, “इंग्लंड आजवर जगाला अक्कल शिकवत आलाय, पण स्वतः मात्र किती पाखंडी आहे पाहा. सावरकरांना पकडून प्रत्यक्ष कायद्याचाच बळी दिला त्यांनी”.
१०) इटलीतील रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. झान्द्रीन ह्यांनी सावरकरांच्या मुक्ततेसाठी आंदोलन आरंभले. इटलीत!!
११) स्विस वृत्तपत्र ‘डेर् वॉण्डरर’ लिहिते, “ब्रूटसच्या खंजिराप्रमाणे विश्वासघात करुन ब्रिटिश सरकारने स्वातंत्र्यदेवतेचा खून केलाय”.
१२) ‘ल सोसिएत’ हे बेल्जियन वृत्तपत्र लिहिते, “इंग्लंडच्या एका कृतीने सबंध युरोपला तमोयुगात लोटलेय”.
१३) ब्रिटनमधील स्पेनचे उपाधिकारी पिअरॉ, पॅराग्वेचे राजदूत जॉम्बॉ, पोर्तुगालचे राजदूत इ. सर्व उच्चाधिकाऱ्यांनी ब्रिटिश सरकारचा निषेध केला आणि ब्रिटनची कारवाई अनैतिक आहे व सावरकरांना तात्काळ फ्रान्समध्ये आश्रय द्यावा, असे लेखी पत्र दिले.
१४) ‘द असाही शिम्बुन’ ह्या जपानी वृत्तपत्रानुसार जपानचे सांसद मोयो यांनी संसदेत सावरकरांच्या मुक्ततेची मागणी प्रतिपादली.

उपरोक्त सर्व संदर्भ डॉ. प. वि. वर्तकांच्या ‘सावरकर – चावट की वात्रट’मधून. आंतरराष्ट्रीय राजकारणात असा सर्वत्र दबाव निर्माण झाल्यामुळे अखेरीस २९ जुलैला फ्रेंच सरकारने सावरकरांच्या मुक्ततेची अधिकृत मागणी केली आणि अवघे प्रकरणच हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेले! विचार करा, एका गुलाम देशातला एक साधासा कैदी, पण त्याच्या एकाच डावामुळे फ्रान्स आणि इंग्लंड हे युरोपातले दोन ‘दादा’ देश चक्क न्यायालयात एकमेकांशी भांडताहेत आणि ह्या सगळ्याला कारणीभूत असलेले सावरकर मात्र गावातल्या गालात हसत मजा पाहाताहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल इंग्लंडच्या बाजूने लागला खरा, पण इंग्लंडने शेकडो वर्षे झडून कमावलेला सन्मान सावरकरांनी अवघ्या पाचच मिनिटांत धुळीस मिळवला होता! ह्या निकालाचा परिणाम एवढा खोल झाला की, त्यानंतर अवघ्या ५ च दिवसांत चक्क फ्रान्सच्या पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागला! आता बोला!! सावरकरांच्या ह्या कुटील खेळीमुळे इतिहासात पहिल्यांदाच जगाला समजले की, भारत नावाचा कुणीतरी देश आहे जो आपल्या स्वातंत्र्यासाठी झगडतोय. नाहीतर तोपर्यंत सगळेच आपल्याकडे दुर्लक्ष करायचे! ह्या घटनेमुळे सावरकरांचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर प्रभाव पडला, तो कायमचाच. याच प्रभावाचा पुढे सुभाषबाबूंना उपयोग झाला! अशी ही सावरकरांची त्रिखंडात गाजलेली उडी. अवघ्या जगाला प्रेरणा देणारी. कवींनी थेट हनुमंताच्या उडीसोबत तुलना केलेली. जगाच्या इतिहासात कायमची छाप सोडणारी! काय गंमत आहे पाहा, वर मी संदर्भ दिले आहेत की अवघ्या जगाने काय प्रतिक्रिया दिली. त्यावरुन दिसते की, साऱ्या जगाने सावरकरांच्या चातुर्याला कसा बरोब्बर प्रतिसाद दिला. राजकारणच ना ते! सावरकरांनी साऱ्या जगाचाच पट केला आणि चाल रचली. केवढे मोठे साहस! आपल्याला अभिमान वाटायला हवा याचा. पण आपल्याकडची काही डुकरं मात्र केवळ ‘सावरकर आपल्या जातीचे नाहीत’ एवढ्या एकाच कारणासाठी ह्या उडीची निर्भत्सना करतात. सावरकरांना ‘संडासवीर’ सारखे गलिच्छ दूषण देतात. अरे पावट्यांनो, सावरकरांनी त्या जहाजाच्या संडासातून उडी मारली म्हणून आज तुम्ही मुक्त राहून तोंडाचा कमोड करु शकता, हे विसरु नका!! अन्यथा आज तुम्ही आडून आडून देशशत्रूंचे तळवे चाटताय, ते प्रत्यक्षात चाटत बसावे लागले असते तुम्हाला!! असो. ही तर झाली गद्दारांची लायकी. पण प्रत्येक सच्च्या भारतीयास नेहमीच सावरकरांच्या ह्या उडीचा, नव्हे भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या गुढीचा अभिमान वाटत राहिल. आणि कोटी कोटी मस्तके स्वातंत्र्यवीरांपुढे नतमस्तक होत राहातील, होतच राहातील!!

— © विक्रम श्रीराम एडके.
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा: www.vikramedke.com)

image

2 thoughts on “उडी, नव्हे भारतीय स्वातंत्र्याची गुढी!!

Leave a Reply to Vilas Shinde Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *