शाहरुख नाचलाच पाहिजे!
देशाच्या पंतप्रधानाइतकं व्यस्त कुणी असू शकतं का हो? नाही ना! काल कै. मुंडेंच्या निधनाची बातमी समजल्यानंतर ताबडतोब पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदींनी सारे कार्यक्रम रद्द केले व राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. मात्र बहुतेक हिंदी सिनेमातला बोबडा नाच्या शाहरुख खान हा स्वत:ला पंतप्रधानांपेक्षाही मोठा समजत असावा. कारण या राष्ट्रीय दु:खाच्या प्रसंगी कार्यक्रम रद्द करणे तर दूरच, हा घरबुडव्या बंगालात ठुमके लावत होता – ममता बॅनर्जीसोबत! त्याला देशाच्या दु:खापेक्षा स्वत:च्या संघाच्या विजयाचा जास्त आनंद महत्वाचा वाटत होता. इतके दिवस शाहरुखनामक माकडसदृश प्राणी माझ्या भारत देशात राहातो, याची लाज वाटायची. काल मला त्याची लाज नाही, घृणा वाटली – घृणा! एखाद्या सडलेल्या मांसाच्या तुकड्याची जशी घृणा वाटते, तशी घृणा!
खानाने ‘मोदी पंतप्रधान झाल्यास देश सोडून जाईन’ असे विधान केले नव्हते. मान्य! शंभर टक्के मान्य. ती कुणीतरी पसरवलेली अफवाच होती. परंतू त्यावेळी तावातावाने खानाची बाजू घेऊन भांडायला आलेल्या एकाने तरी हा विचार केला का की — अशी अफवा शाहरुखबद्दलच का पसरते? सलमानसारख्या इतर कुणा खानाबद्दल का नाही? कारण एकच – धूर तिथूनच उठतो, जिथे आग असते! परंतू ‘सत्या’ची बाजू घेतल्याचा आव आणणाऱ्यांपैकी किती लोकांनी त्या अफवेची कारणमीमांसा पाहाण्याचा प्रयत्न केला होता? स्वत:लाच विचारा हा प्रश्न! आणि ज्याचं चारित्र्य आधीच डागाळलेलं असतं, त्याच्याच चारित्र्यावर अफवांचे नवनवे शिंतोडे उडतात ना? खानाने याआधीदेखील कुणाही देशभक्ताच्या डोक्यात संतापाची तिडीक उठावी अश्या गोष्टी केलेल्याच आहेत ना — मग ते पाकिस्तानी खेळाडूंची केलेली वकिली असो, चित्रपटांतून जाणीवपूर्वक केलेला भारत देश व भारतीय संस्कृतीचा अपमान असो, वानखेडे स्टेडियमवर एखाद्या सामान्य टपोरीसारखे केलेले वर्तन असो — एक ना अनेक गोष्टी सांगता येतील.
त्यामुळेच खरं तर एका दृष्टीने बघावयास गेलो तर, काल जो नीचपणा खानाने केला त्यात आश्चर्य वाटायचे काहीच कारण नाही. त्याची लायकीच तेवढी आहे. तो असंच वागणार. आणि तो असं कुणाच्या जीवावर वागतो माहितीये? तुमच्या जीवावर. त्या फडतूस नाच्याला सुपरस्टार समजणाऱ्या प्रत्येकाच्या जीवावर! त्याच्या एका दर्शनासाठी पडद्याकडे चातकासारखे डोळे लावून बसणाऱ्या प्रत्येकाच्या जीवावर! ‘आयपीएल’ नावाची गटारगंगा पाहाणाऱ्या, प्रत्येक चेंडूगणिक स्टेटस-अपडेट करणाऱ्या, कोलकात्याच्या (ज्यात सर्वाधिक पाकिस्तानी खेळाडू आहेत म्हणे!) संघासाठी जल्लोष करणाऱ्या, त्याचा संघ जिंकल्यावर घरी पुत्ररत्न झाल्यागत आनंद साजरा करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवावर! त्यामुळे त्याचं जर कालचं कृत्य देशद्रोहाचं असेल, तर त्या देशद्रोहाला तो कमी आणि तुम्ही जास्त जबाबदार आहात. कारण कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं म्हणून जर माणसेही वाकडी लागायला लागली, तर दोष माणसांचा असतो, कुत्र्याचा नव्हे! किंबहुना कुत्र्यालाच का कुत्रा म्हणावं — एवढे होऊनही मंडळी ना आयपीएल पाहाणे थांबवणार आहेत, ना खानाचे चित्रपट, ना त्याच्या पोकळ स्टारडमचे गोडवे गाणे थांबवणार आहेत. त्यामुळे शेपूट याही मंडळींचे वाकडेच आहे की! करा. अवश्य करा. फक्त इथून पुढे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीलादेखील तोंडातून ‘देशभक्ती’ नावाचा शब्द उच्चारणे बंद करा — शोभत नाही तुमच्या तोंडी!
चला, आयपीएलचा हा हंगाम तर संपला. यंदाच्या दिवाळीत खानाचा नवा चित्रपट प्रदर्शित होतोय. गर्दी तर केलीच पाहिजे ना ‘भक्तांनी’! त्यानंतर येतोच आहे ‘आयपीएल’चा नवा हंगाम! त्यावेळी काय स्टेटस-अपडेट केले पाहिजेत, कसे केकेआरचे उत्साहवर्धन केले पाहिजे याची तयारी तर करायलाच हवी! त्यासाठी गरज पडली तर कामधंदा सोडून तासनतास टिव्हीसमोर तर बसायलाच हवे! आणि हो, काळ्या पैश्यावर पोसलेला आयपीएलचा नंगानाच चवीने पाहातानाच ‘स्विस बँकेतला काळा पैसा भारतात आणणे कसे गरजेचे आहे’ यावर गरमागरम चर्चा केल्याच पाहिजेत! मधल्या काळात नाच्याच्या जाहिराती, एखाद-दुसरा फालतू रिऍलिटी-शो पाहायलाच हवा! त्याची बाजू तर घेतलीच पाहिजे. त्याच्या कुटुंबाचे उदाहरण देऊन सर्वधर्मसमभावाचे पोकळ गोडवे तर गायलेच पाहिजेत (त्याच्या मुलांची नुसती नावेच सर्वसमावेशक आहेत – धर्मही आहे का, कुणी पाहिलंय?)! खानाचा चित्रपट चाललाच पाहिजे! त्याच्या दांभिकतेला विनम्रता म्हटलंच पाहिजे! त्याच्या फिट आल्यागत हावभावांना अभिनय, म्हटलंच पाहिजे! आणि च्यायला तिकडे कुणा लोकनेत्याचे निर्वाण होवो वा आख्खा देश खड्ड्यात जावो, आमचा शाहरुख आनंदाने नाचलाच पाहिजे!! शाहरुख आनंदाने नाचलाच पाहिजे!!!
– © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी व लेखकाची व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)