जेव्हा तुम्ही-आम्ही घालत असतो आपल्या कुजलेल्या दु:खाचे लोणचे, तेव्हा ‘ते’ आशेचे अंकुर पेरत असतात.. जेव्हा तुम्ही-आम्ही ढाळत असतो वांझोटे अश्रू, तेव्हा ते कष्टाच्या जमिनीवर घामाचं सिंचन करत असतात..! आपल्याला अंधारात दिसतो बागुलबुवा, अन् ‘ते’ आशेच्या किरणांना खेचत असतात.. दिवस सरतात, काळ जातो, तुम्ही-आम्ही उचलत राहातो आयुष्याचे तेच जुने ओझे, अन् तेव्हा ‘ते’ यशोशिखरावर स्वार झालेले असतात.. आपण बुजगावण्यासारखं जगतो, मरून जातो, तेव्हा ‘ते’ अमर झालेले असतात.. असे कसे? कारण… जेव्हा तुम्ही-आम्ही बडवत असतो परिस्थितीचा पोकळ ऊर, तेव्हा ‘ते’ स्वप्नांची धारदार शस्त्रे करून मैदानात उतरलेले असतात.. आणि कदाचित म्हणूनच ‘ते’ सामान्य असूनही असामान्य ठरत असतात..
Leave a Reply