Category Archives: A R Rahman

आठवणींच्या गल्लीबोळांतून

नव्वदचं दशक हे अनेक अर्थांनी नॉस्टॅल्जियाचं दशक आहे. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या अनेकांसाठी ते नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद, जतिन-ललित अश्या जोड्यांनी, अन्नू मलिक वगैरेंसारख्या सफाईदार “बाजीगरां”नी व विजू शाहसारख्या अनेकानेक अंडररेटेड माणकांनी बनवलेल्या आणि कुमार, अलका, उदित वगैरेंनी बेभान होऊन गायलेल्या दिलतोड गीतांचं दशक आहे; तर नव्वदच्याच दशकात जन्मलेल्या आजच्या तरुणांसाठी ते इंडीपॉप गाण्यांमधील नव्या प्रवाहांत केलेल्या सचैल स्नानांचं दशक आहे. दोन्हीही प्रकारच्या मंडळींसाठी ते एकत्रितपणे समीरचंदेखील दशक आहे. आणि दोन्हीही प्रकारची मंडळी त्या दिवसांबद्दल बोलताना जरादेखील थकत नाहीत. याच दशकाने सोनू निगम, शान, केके, शंकर असे हिरेसुद्धा दिले! याच दशकाने शंकर-अहसान-लॉय दिले आणि याच दिवसांनी रहमान दिला!! त्यामुळे “आशिकी” (१९९०) …Read more »

Gurupaurnima

Dear A.R. Rahman – You were there when no one was When everyone is there, you still are Shadows leave, you do not Every moment teaching me a lot When I cry, you wipe out my tears You hold my hand, when strike out fears Your are a boat, sailing me through the Bhava-Saagar You not merely entertain, spiritually uplifts me rather You are the one who always give me a smile Which I wear everyday & walk another mile Dear A.R. Rahman, you are a Sad-Guru for me. Always keeping me on the right path & keeping my Vivek …Read more »

जय हो ‘रहमान’भाई!!

रात्रीचे दहा वाजून गेलेले. चेन्नईच्या ‘अपोलो कॅन्सर हॉस्पिटल’मध्ये सर्वत्र निजानीज झालेली. स्पेशल रुम क्र. १३३५ मध्ये लहानग्या निहारिकाचीही झोपायची तयारी चालू होती. अवघी पाच वर्षांची पोर. आजच केमोथेरपीचे एक सत्र संपले होते तिचे. आई — निखिला, बिछाना नीट करून देत होती तिचा. सर्व तयारी मनासारखी झाल्यावर निहारिकाने हळूच आईच्या डोळ्यांत पाहिले. “हो माहितीये मला”, आई निखिला हसून म्हणाली. आणि तिने आपल्या मोबाईलवर मंद आवाजात ‘हायवे’ चित्रपटातले गीत ‘सूहा साहा’ लावले. गेले काही दिवस हा रोजचाच दिनक्रम (की रात्रीक्रम!) झाला होता दोघींचा. रोज झोपताना निहारिकाला ‘सूहा साहा’ ऐकायचेच असायचे. काही दिवसांपूर्वी या गीताची जागा ‘कडल’मधील ‘सिथ्थिरई निला’ कडे होती. त्याआधी निहारिकाला …Read more »

कथा

जुनी गोष्ट आहे. त्याकाळी खूप फळं होते. परंतू सफरचंद सगळ्यांमध्येच सर्वश्रेष्ठ होते. त्याचा रंग, आकार, चव सारे काही दैवी! लोकांनाही इतर फळेही आवडायची, मात्र सफरचंद सगळ्यात जास्त आवडायचे. काळ पुढे पुढे जात राहिला. काही वर्षांनी एक नवीन फळ आले – आंबा! त्याची चव, रंग, आकार, सुवास सारेच निराळे! नुसता जवळ घेतला तरी मन मोहरून जायचे अक्षरशः! साहजिकच कित्येक सफरचंद-रसिक आंब्याकडे वळले. त्यांना आता आंबाच सर्वश्रेष्ठ वाटू लागला. आंबा होताच तेवढा गुणी!! परंतू यासोबतच आणखीही काही घटना घडल्या. ज्यांनी केवळ आणि केवळ सफरचंदालाच आपल्या ह्रदयसिंहासनी बसवले होते, ते केवळ सफरचंदाशीच निष्ठावान राहिले. त्यांच्या दृष्टीने आंबा मुळातच चुकीचा, निकृष्ट ठरला. त्यांनी त्याला …Read more »

जब तक है जान (संगीत-समीक्षण) : भाग – १

चित्रपटागणिक प्रगती करत करत कायम स्वतःची शैली बदलत राहणारा माझ्या माहितीतील एकमेव संगीतकार म्हणजे ए. आर. रहमान! १९९५ च रहमान २००५ साली आढळत नाही आणि २००५ चा रहमान २०१२ साली आढळणार नाही!    परंतु मला सर्वाधिक आकर्षित करणारी गोष्ट हि नव्हे! मला कळतं तेव्हापासून मी रहमानचं सर्व संगीत ऐकत आलोय. सुरुवातीच्या काळात त्याने लता मंगेशकर, आशा भोसले, एस. पी. बालासुब्रह्मण्यम, येसुदास, एस. जानकी, के. एस. चित्रा आदी दिग्गजांसोबत खूप सुरेख गाणी दिली. आजही तो, गीताची तशी गरजच असेल तर या महानुभावांकडून गाऊन घेतोच. पण त्याने लवकरच बहुधा विचार सुरु केला असावा की, ‘ही मंडळी गेल्यानंतर काय‘? म्हणूनच त्याने जाणीवपूर्वक या …Read more »

होस्साना – जयघोष प्रेमाचा… जयघोष माझ्या "देवा"चा..!

११ किंवा १२ जानेवारी २०१० चा काळ असावा. मला त्या काळात तमिळ अजिबातच कळत नव्हतं (अजूनही फार कुठं कळतंय!). तिरूअनंतपूरम ते मदुराई या रेल्वेप्रवासात भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला मी माझ्या “देवा”च्या गाण्यांचे शब्द आठवून-आठवून अर्थ विचारात होतो. त्यावेळी ते तमिळ कुटुंब भेटलं. नवरा-बायको आणि दोन लहान मुलं! ते “अण्णा” भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते पण संगीतात त्यांना प्रचंड रुची. आणि शिवाय कुणाही तमिळ व्यक्तीइतकेच “रहमानियन“! आम्ही खूप वेळ बोलत होतो. त्या भल्या माणसाने मला “सहाना सारल.. (शिवाजी – द बॉस – २००७)”, “एल्लापगळूम.. (आळगिया तमिळ माकन – २००७)” अशी कित्येक गीते संपूर्ण समजावून सांगितली. अचानक मी त्यांना विचारलं, “होस्साना म्हणजे काय हो”? ते …Read more »

इलयराजा", "रहमान" आणि "क्या हैं मुहब्बत…

गुरुदत्तच्या “प्यासा (१९५७)” मधील “ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है…” ज्याला माहिती नसेल असा संगीत-रसिक सापडणे अशक्यच! खरोखरंच, किती सुंदर संगीताची निर्मिती व्हायची त्या काळात! आजही ती अवीट गीते अंगावर रोमांच उभा करतात. याउलट आजच्या काळातील संगीत पहा. “आत्माहीन” एवढे एकाच विशेषण त्यास शोभून दिसेल. याचे मुख्य कारण म्हणजे आजची चित्रपट-गीते ही केवळ तत्काळ आणि तेवढ्यापुरती गाजावित म्हणूनच बनवली जातात. आणि इतकेच नव्हे तर बरेचदा त्यांत मांडलेल्या भावनाही यांत्रिकच असतात. त्यामुळेच आज गाजणारं गीत महिन्याभरानंतर कुणाच्या लक्षातही नसतं.    अर्थातच या सगळ्याला इलयराजा आणि रहमानसारखे काही सन्माननीय अपवादही आहेत (आणि जी. व्ही. प्रकाशकुमारसुद्धा – पण त्याला अजून बराच …Read more »