Category Archives: Reviews

किंचित भरकटलेला तरीही कमालीचा जबरदस्त: सुपर डिलक्स

वेंबूचं (समँता) लग्न मुगिलनशी (फ़हाद फ़ासिल) झालंय. पण ती अजूनही तिच्या जुन्या प्रियकरांपैकी एकाला विसरलेली नाहीये. एके दिवशी ती नवरा घरी नसताना प्रियकराला बोलावून घेते आणि एक अनपेक्षित गडबड होते. त्याच वेळी नवरासुद्धा घरी येतो आणि गोष्टी अजूनच वेगळं वळण घेतात. माणिकम (विजय सेतुपती) हा जवळ जवळ साडेसात वर्षांनंतर घरी येणार म्हणून त्याची बायको (गायत्री शंकर) आणि सगळंच कुटूंब खुश आहे. आता इतक्या वर्षांनंतर घरी येणाऱ्या माणसात थोडा फरक तर पडणारच ना? पण माणिकम मात्र अंतर्बाह्य बदललेला असतो. अगदी शब्दशः! किशोरावस्थेतील तीन-चार पोरं आहेत. एकाच्या घरी कुणी नाही म्हटल्यावर ते भाड्याने सिडी आणून थोडीशी मजा करायचं ठरवतात. त्यातल्या एकाला भूतकाळाबद्दल …Read more »

शक्तीशाली पात्रावरचा दुबळा चित्रपट : कॅप्टन मार्व्हल

“A hero can be anyone, even a man doing something as simple and reassuring as putting a coat on a young boy’s shoulders to let him know that the world hadn’t ended”. नोलनच्या ‘द डार्क नाईट राईज़ेस’मधील (२०१२) श्रेष्ठतम संवादांपैकी एक असा हा संवाद. नायक किंवा नायिका कुणाला म्हणावं याची साधी-सोपी तरीही गहन अशी परिभाषा सांगणारा. या संवादाचं किंचितसं सामान्यीकरण केलं तर काय हाती येतं? नायक किवा नायिका कुणाला म्हणावं, तर ज्या व्यक्तीच्या ह्रदयात मानवता भरलेली आहे आणि गरज पडेल तेव्हा जी व्यक्ती त्या मानवतेला अभिव्यक्त करायला कचरत नाही, अशी व्यक्ती! मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा नुकताच प्रदर्शित झालेला २१वा चित्रपट ‘कॅप्टन …Read more »

मृद्गंधी झुळूक : गीता-गोविंदम

विजय गोविंद (विजय देवेरकोंडा) तरुण प्राध्यापक आहे. कॉलेजमध्ये, खासकरून मुलींमध्ये पॉप्युलर आहे. पण त्याला मात्र हवी आहे एखादी सुसंस्कृत आणि पारंपारिक ललना! तशी ती त्याला दिसतेसुद्धा, गीताच्या (रश्मिका मांदण्णा) रुपात. किती घासून घासून गुळगुळीत झालेली पार्श्वभूमी आहे नाही? क्लिषे अगदी! परंतु याच क्लिषेच्या पायावर उभा राहिलेला “गीता गोविंदम” नावाचा २ तास २८ मिनिटे लांबीचा चित्रपट तुम्हाला अक्षरशः एका क्षणासाठीही बोअर करत नाही! बॉलिवूडचा आणि त्यांचं अनुकरण करणाऱ्या मराठी इंडस्ट्रीचाही काही प्रमाणात ‘आधुनिकता म्हणजे कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळणं’ असा समज आहे. तमिळ इंडस्ट्री ही त्यांच्या वेगळ्या मांडणीसाठी ओळखली जाते तर मलयाळम इंडस्ट्री त्यांच्या वेगळ्या विषयांसाठी. परंतु तेलुगू इंडस्ट्री अशी आहे जी …Read more »

अपेक्षाभंग करणारा : मणिकर्णिका

१८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील झाशीच्या राणीचे स्थान केवळ मराठीजनांसाठीच नव्हे, तर सबंध भारतीयांसाठीदेखील कायमच गौरवाचे राहिले आहे. राणीवर आजपर्यंत खूप सारे साहित्य लिहिले गेले, मालिका बनल्या, चित्रपटही बनले. परंतु जेव्हा के. व्ही. विजयेंद्र प्रसाद, प्रसून जोशी, राधाकृष्ण जगर्लामुडी आणि कंगना राणावतसारखे दिग्गज या विषयासाठी एकत्र आले तेव्हा बनणारी कलाकृती निश्चितच वेगळ्या दर्जाची असणार होती. पण बुद्धीमंतांचा एक दोषच असतो की, बरेचदा ते एकत्र आल्यावर त्यांच्या बुद्धीच्या बेरजा होण्याऐवजी एकमेकांना छेद देऊन भागाकार तेवढा होऊन बसतो. माझ्या दृष्टीने ‘मणिकर्णिका’मध्येही तेच झाले. सुरुवातीपासूनच कंगना आणि क्रिशमध्ये दिग्दर्शनावरून वाद होते, हे सर्वश्रृत आहे. कोण चित्रपटाची माती करत होतं आणि कुणी कोणते प्रसंग दिग्दर्शित केले …Read more »

नव्या भारताचा नवा चित्रपट : उरी – द सर्जिकल स्ट्राईक

१८ सप्टेंबर २०१६ यादिवशी पाकिस्तानच्या चार आतंकवाद्यांनी काश्मिरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील आपल्या सैन्यतळावर हल्ला केला. आपण त्या चारही आतंकवाद्यांना नरकात धाडले परंतु हे होईपर्यंत आपले सुमारे एकोणावीस जवान हुतात्मा झाले होते तर सुमारे ऐंशी ते शंभर जखमी. युद्धाची दाहकता ही अशी असते आणि ती कधीच एकतर्फी शांतता राखून कमी होत नाही. आपण जर याचे काही उत्तर दिले नसते, तर उलट त्या अतिरेक्यांच्या मालकांची हिंमत अजूनच वाढली असती. आणि म्हणूनच भारत सरकारने आणि आपल्या भारतीय सैन्याने निर्णय घेतला सर्जिकल स्ट्राईक करण्याचा! शरीरावर शल्यकर्म करताना जसे फक्त त्या रोगग्रस्त भागापुरतेच केले जाते, तसाच हा हल्लादेखील सर्जिकल अर्थातच लक्ष्यांपुरता मर्यादित असतो. यात …Read more »

बऱ्याच गोष्टींनी मारलेला पण अभिनयाने तारलेला : द अॅक्सिडेंटल प्राईममिनिस्टर

‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ सुरू होतो तो काँग्रेसप्रणित संपुआने २००४ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यापासून. त्यानंतर उभ्या राहिलेल्या पेचप्रसंगांतून मनमोहनसिंह (अनुपम खेर) यांना पंतप्रधानपदी निवडले जाते आणि चित्रपटात आरंभ होतो दोन सत्तास्थानांमधील अघोषित संघर्ष. याला मी लिहिण्याच्या सोयीसाठी संघर्ष म्हणतोय कारण, चित्रपटात एक सत्तास्थान खूपच सौम्य चितारलेय तर दुसरे जवळजवळ अप्रत्यक्ष. नेमके हेच सगळ्यांत मोठे कारण आहे की, यावर्षीच्या सगळ्यांत स्फोटक चित्रपटांपैकी एक मानला जाणारा ‘टिएपीएम’ फारसा रंगत नाही. मनमोहनसिंह हे मुळातच मितभाषी नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. चित्रपटातही त्यांची प्रतिमा तिच ठेवण्यात आलीये. असा परोक्ष नायक कसा काय चालेल? म्हणून मग त्यांचा आवाज बनतात संजय बारू (अक्षय खन्ना), सांकेतिक अर्थानेच नव्हे …Read more »

गावाकडचे जॅझ – महेशिण्टे प्रतिकारम

तुमच्याकडे नोकरी, व्यवसाय, शिक्षण वगैरेपैकी काहीतरी एक असतं. चार लोकांत तुमचं काहीतरी अस्तित्व असतं. तुमची लव्हलाईफ फार भारी नसते, पण जे आहे ते आपलं म्हणून तुम्ही त्याचा मनापासून स्वीकार केलेला असतो. थोडक्यात सारं काही छान चाललेलं असतं. संथ वाहाणाऱ्या कृष्णामाईसारखं. पण एक दिवस असा येतो की तुमची प्रतिष्ठा, अब्रू, तुमचं प्रेम सारं सारं काही एका क्षणात हिरावून घेतलं जातं. होत्याचं नव्हतं होतं. बरं झालेली गोष्टदेखील इतकी सहजपणे झालेली असते की, आपल्यावर फार मोठा अन्याय झालाय असं बोंबलायला जागाच नसते. गेलेली अब्रू परत मिळवण्यासाठी आपण जीवतोड प्रयत्न करतो. कारण, तेवढंच आपल्या हातात असतं. पण हरवलेलं प्रेम कुठून परत मिळणार? तुम्ही गेलाय …Read more »

नाव राखणारा अद्वितीय थरारपट : राक्षसन (रात्ससन)

अरुणकुमार (विष्णु विशाल) हा एक होतकरू चित्रपटकार आहे. अतिशय चिकाटीने, खूप सारं संशोधन करून त्याने एक संहितासुद्धा लिहिली आहे. अनेक निर्मात्यांना तो ती ऐकवतो. हाती काय लागतं? कोणत्याही स्ट्रगलरच्या हाती जे सुरुवातीची अनेक वर्षं लागतं तेच, बिनपैश्यांचा तरीही अमूल्य असा अनुभव! कुणीच त्याच्या कथेवर पैसा लावायला तयार होत नाही. हा दुसरे काहीच काम करत नाही, काहीच कमवत नाही त्यामुळे त्याची बहिण (विनोदिनी) आणि भावोजींची (रामदास) सतत भुणभुण चाललेली. अरुणचे वडील पोलिसांत होते. भावोजीही पोलिसच. त्यामुळे साहजिकच अरुणनेही पोलिस व्हावे हा सगळ्यांचा लकडा. शेवटी स्ट्रगल करून करून थकलेला अरुण त्याच्या मनाविरुद्ध पोलिस भरतीच्या परीक्षा देतो आणि उत्तीर्ण होऊन पोलिस खात्यात रुजूसुद्धा …Read more »

रुचकर तरीही अपुरा – सीताकाती

जयन्ति ते सुकृतिना: रससिद्धा: कवीश्वरा: । नास्ति येषां यश:काये जरामरणजं भयम् ।। कला म्हातारी होत नाही, किंबहूना कला कधीच मरत नाही. ती अजर असते, अमर असते. हे आपण नेहमीच तात्त्विक रूपाने आसपास पाहातो, अनुभवतो. असेच अय्या आदिमूलम (विजय सेतुपती) हे रंगमंचावरील निष्णात अभिनेते आणि दिग्दर्शक. वयाच्या दहाव्या वर्षापासून हा माणूस रंगमंचालाच सर्वस्व मानून वावरतोय. त्यांच्या अभिनयपटूतेला पाहून अनेक नावाजलेल्या चित्रपट दिग्दर्शकांनी त्यांना सिनेमाची ऑफर दिली, परंतु त्या साऱ्या धुडकावून त्यांनी फक्त आणि फक्त रंगभूमीची सेवा केली आजवर. आता काळ बदललाय. लोकांना जिवंत रंगभूमीपेक्षा रंगीबेरंगी चित्रपट जास्त भुरळ घालू लागलेयत. रंगमंच ओस पडू लागलेयत. तरुणाई त्याकडे पाठ फिरवू लागलीये. जसजसा जनप्रवाह …Read more »

2.0 नव्हे, ‘शंकर 2.0’

मी परवाच एका व्याख्यानात बोललो होतो की, दिवसेंदिवस आपण सारेच तंत्रज्ञानावर नको तितके अवलंबून राहू लागलोय. याचे शारीरिक, मानसिक परिणाम कल्पनातीत आहेत. जणू काही एखाद्या टाईमबॉम्बचं टायमर सुरू करून त्यावर बसलो आहोत आपण. तो फुटेल तेव्हा काय होईल? भयंकर कल्पना आहे ही! भारतीय चित्रपटसृष्टीतील खऱ्या अर्थाने शो-मन म्हणावा अश्या दिग्दर्शक शंकरचं सगळ्यांत मोठं वैशिष्ट्य काय आहे माहितीये? तो अश्याच रोजच्या आयुष्यातल्या कल्पना घेतो. सत्य हे कल्पनेहून भंयकर असतं म्हणतात, परंतू शंकर त्या कल्पनेला सत्याहूनही भयंकर कल्पनेचा तडका देतो. त्यातून साकारतो तो शंकरचा कोणताही अतिप्रचंड सिनेमा! “2.0”ची कल्पनाही अशीच साधी. मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे पक्ष्यांना विकिरणांचा होणारा त्रास सबंध मानवजातीला (जशी हॉलिवूडच्या …Read more »